मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौजमजा

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

आज, 24 मार्च 2022, आपल्या सर्वांना, "गाॅडफादर डे" च्या शुभेच्छा...

मुक्त विहारि ·

In reply to by हेमंतकुमार

बाजीगर 24/03/2022 - 23:18
हा dialigue चोरला, आणि कालीया मधे अमजदखान च्या तोंडी दिलाय, अमजद बच्चन ला भेटायला त्याच्या घरी जातो, बच्चन नसतो, भाभी वहिदा रेहमान असते, अमजद फ्लॅट च्या इंटिरियल डेकोरेशन ची तारिफ करतो, वहिदा म्हणते,ये मेरे देवर ने मेहनत से कमाया है. अमजद म्हणतो, " मेहनत से आदमी झोपडी बना सकता है, आलीशान महल नही...." मी ऐकून स्टन झालो होतो, एवढ चिरंतन सत्य आणि ते हि व्हिलन च्या तोंडी कसं दिलं ...काय सोच कि उडिन है लेखकाची वगैरे.

In reply to by धर्मराजमुटके

पण, पुस्तक वाचतांना, साधारण पणे, पात्रांची चेहरेपट्टी कशी असेल? कसे बोलतील? हा विचार येतोच ... पुस्तका वरून चित्रपट तयार करतांना, पात्रांची निवड, योग्य नसेल तर, चित्रपट मनावर पकड घेत नाही... उदाहरण म्हणजे, जॅक रीचर हे पात्र साधारण कसे दिसत असेल? हे मनावर ठसत जाते, त्यामुळे टाॅम कृज पेक्षा, सिरीज मधला, Alan Ritchson, जास्त आवडला .... जॅक रीचर, अस्सल सैनिक असल्याने, Alan Ritchson, जास्त आवडला. अर्थात, चित्रपट व्यक्ती सापेक्ष असल्याने, कुणाला जेम्स बाॅन्ड म्हणून सीन काॅनेरी आवडतो तर कुणाला डॅनियल क्रेग... वैयक्तिक सांगायचे तर, मला डॅनियल क्रेग जास्त आवडला .... (जाता जाता, "द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू", ह्यात देखील, Mikael Blomkvist च्या भुमिकेत आवडला.... तोडीस तोड अभिनय करायला, Rooney Mara, Lisbeth Salander ह्या भुमिकेत चपखल बसली...आता, परत एकदा ,द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू, हा सिनेमा बघणे आले...)

कॉमी 24/03/2022 - 20:21
गॉडफादर II> गॉडफादर I> गॉडफादर III मार्लन ब्रँडो तर भारीच आहे. पण डीनिरो ने तरुण व्हीटो सुद्धा भारी साकारलाय.

मदनबाण 24/03/2022 - 20:48
वेळ काढुन हा चित्रपट पाहिला आहे. कमल हसन वर देखील अगदी खोल प्रभाव आहे. परत मोकळा वेळ मिळाला तर परत पाहीन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao

In reply to by हेमंतकुमार

बाजीगर 24/03/2022 - 23:18
हा dialigue चोरला, आणि कालीया मधे अमजदखान च्या तोंडी दिलाय, अमजद बच्चन ला भेटायला त्याच्या घरी जातो, बच्चन नसतो, भाभी वहिदा रेहमान असते, अमजद फ्लॅट च्या इंटिरियल डेकोरेशन ची तारिफ करतो, वहिदा म्हणते,ये मेरे देवर ने मेहनत से कमाया है. अमजद म्हणतो, " मेहनत से आदमी झोपडी बना सकता है, आलीशान महल नही...." मी ऐकून स्टन झालो होतो, एवढ चिरंतन सत्य आणि ते हि व्हिलन च्या तोंडी कसं दिलं ...काय सोच कि उडिन है लेखकाची वगैरे.

In reply to by धर्मराजमुटके

पण, पुस्तक वाचतांना, साधारण पणे, पात्रांची चेहरेपट्टी कशी असेल? कसे बोलतील? हा विचार येतोच ... पुस्तका वरून चित्रपट तयार करतांना, पात्रांची निवड, योग्य नसेल तर, चित्रपट मनावर पकड घेत नाही... उदाहरण म्हणजे, जॅक रीचर हे पात्र साधारण कसे दिसत असेल? हे मनावर ठसत जाते, त्यामुळे टाॅम कृज पेक्षा, सिरीज मधला, Alan Ritchson, जास्त आवडला .... जॅक रीचर, अस्सल सैनिक असल्याने, Alan Ritchson, जास्त आवडला. अर्थात, चित्रपट व्यक्ती सापेक्ष असल्याने, कुणाला जेम्स बाॅन्ड म्हणून सीन काॅनेरी आवडतो तर कुणाला डॅनियल क्रेग... वैयक्तिक सांगायचे तर, मला डॅनियल क्रेग जास्त आवडला .... (जाता जाता, "द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू", ह्यात देखील, Mikael Blomkvist च्या भुमिकेत आवडला.... तोडीस तोड अभिनय करायला, Rooney Mara, Lisbeth Salander ह्या भुमिकेत चपखल बसली...आता, परत एकदा ,द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू, हा सिनेमा बघणे आले...)

कॉमी 24/03/2022 - 20:21
गॉडफादर II> गॉडफादर I> गॉडफादर III मार्लन ब्रँडो तर भारीच आहे. पण डीनिरो ने तरुण व्हीटो सुद्धा भारी साकारलाय.

मदनबाण 24/03/2022 - 20:48
वेळ काढुन हा चित्रपट पाहिला आहे. कमल हसन वर देखील अगदी खोल प्रभाव आहे. परत मोकळा वेळ मिळाला तर परत पाहीन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao
50 वर्षांपुर्वी, आजच्याच दिवशी, द गाॅडफादर, हा अविस्मरणीय सिनेमा प्रदर्शित झाला ... काही काही चित्रपट, एखादी लाट तयार करतात. द गाॅडफादर, हा पण असाच. चित्रपट परिक्षण, हा माझा प्रांत नाही. कारण, चित्र, नाटक, सिनेमा, अभिजात संगीत हे व्यक्तीसापेक्ष असते. माफिया, हा शब्द माहिती पडला तो, ही कादंबरी वाचतांना आणि संघटित गुन्हेगारीचे, भारतातील स्वरूप देखील समजत गेले... बाबू रेशीम, मन्या सुर्वे, इत्यादी समकालीन गुन्हेगारांपेक्षा, दाऊद इब्राहीमच साम्राज्य का उभारू शकला? ह्याची थोडीफार कल्पना, ही कादंबरी वाचतांना येतेच येते.

एकदिवसीय क्रिकेट, महिला विश्र्वचषक-2022

मुक्त विहारि ·

वेस्ट इंडीज विरूद्ध न्यूझीलंड... (मॅथ्यूजचे अप्रतिम शतक आणि सोफी डिव्हाइनचा कडवा प्रतिकार, दोन्ही शतके जबरदस्त, पण वेस्ट इंडीजचा निसटता विजय) साउथ आफ्रिका विरूद्ध बांगलादेश, साउथ आफ्रिकेचा अपेक्षित विजय ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड... रंगतदार मॅच, WBBL मुळे, ऑस्ट्रेलियन महिला अतिशय सहजतेने खेळत आहेत, संघाची उत्तम आखणी... ऑस्ट्रेलियाला रोखणे, अतिशय कठीण आहे... भारत विरूद्ध पाकिस्तान... अपेक्षे प्रमाणे, मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांनी घाण केलीच, पुजा वस्त्रकार आणि स्नेह राणा, यांनी योग्य रित्या फलंदाजी केली म्हणून जिंकलो... गेल्या दोन वर्षांत स्नेह राणाने चांगले पुनरागमन केले आहे... बांगलादेश विरूद्ध न्यूझीलंड... एकतर्फी मॅच... सुझी बेटस् आणि अॅमेलिया केर, यांनी बांगलादेशला सहज पराभूत केले... (वेस्ट इंडीज विरूद्ध देखील, अॅमेलिया केर उत्तम खेळली होती...

पी महेश००७ 11/03/2022 - 20:02
मिताली राज का संघात आहे तर केवळ प्रतिष्ठेसाठी... तिला हा वर्ल्डकप खेळून निवृत्त व्हायचंं आहे. त्यासाठीच तिला संघात घेतलंय... हे खरंय, की इतर खेळाडूंवर अन्याय झालाय... मिताली राज या दिवशी होणार निवृत्त...

In reply to by पी महेश००७

संघ जिंकणे महत्वाचे आहे. न्यूझीलंड विरूद्धची मॅच हरण्यामागे, हिचा आणि स्मृती मंदानाचा संथ खेळ आणि शेफाली वर्माची अनुपस्थिति, हीच कारणे आहेत... मितालीच्याच पावलावर पाऊल टाकून, स्मृती मंदाना चालत आहे की काय? असे वाटते ...

सुजित जाधव 25/03/2022 - 20:12
मिथाली राज बद्दल माहित नाही पण हरमन प्रीत सिंग ला बाहेर ठेवणे योग्य नाही वाटत..कारण ती एक अनुभवी बॅटर आहे आणि तिच्याकडे मोठे फटके खेळण्याचे कौशल आहे..आणि तिने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध पण करून दाखवले.

वेस्ट इंडीज विरूद्ध न्यूझीलंड... (मॅथ्यूजचे अप्रतिम शतक आणि सोफी डिव्हाइनचा कडवा प्रतिकार, दोन्ही शतके जबरदस्त, पण वेस्ट इंडीजचा निसटता विजय) साउथ आफ्रिका विरूद्ध बांगलादेश, साउथ आफ्रिकेचा अपेक्षित विजय ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड... रंगतदार मॅच, WBBL मुळे, ऑस्ट्रेलियन महिला अतिशय सहजतेने खेळत आहेत, संघाची उत्तम आखणी... ऑस्ट्रेलियाला रोखणे, अतिशय कठीण आहे... भारत विरूद्ध पाकिस्तान... अपेक्षे प्रमाणे, मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांनी घाण केलीच, पुजा वस्त्रकार आणि स्नेह राणा, यांनी योग्य रित्या फलंदाजी केली म्हणून जिंकलो... गेल्या दोन वर्षांत स्नेह राणाने चांगले पुनरागमन केले आहे... बांगलादेश विरूद्ध न्यूझीलंड... एकतर्फी मॅच... सुझी बेटस् आणि अॅमेलिया केर, यांनी बांगलादेशला सहज पराभूत केले... (वेस्ट इंडीज विरूद्ध देखील, अॅमेलिया केर उत्तम खेळली होती...

पी महेश००७ 11/03/2022 - 20:02
मिताली राज का संघात आहे तर केवळ प्रतिष्ठेसाठी... तिला हा वर्ल्डकप खेळून निवृत्त व्हायचंं आहे. त्यासाठीच तिला संघात घेतलंय... हे खरंय, की इतर खेळाडूंवर अन्याय झालाय... मिताली राज या दिवशी होणार निवृत्त...

In reply to by पी महेश००७

संघ जिंकणे महत्वाचे आहे. न्यूझीलंड विरूद्धची मॅच हरण्यामागे, हिचा आणि स्मृती मंदानाचा संथ खेळ आणि शेफाली वर्माची अनुपस्थिति, हीच कारणे आहेत... मितालीच्याच पावलावर पाऊल टाकून, स्मृती मंदाना चालत आहे की काय? असे वाटते ...

सुजित जाधव 25/03/2022 - 20:12
मिथाली राज बद्दल माहित नाही पण हरमन प्रीत सिंग ला बाहेर ठेवणे योग्य नाही वाटत..कारण ती एक अनुभवी बॅटर आहे आणि तिच्याकडे मोठे फटके खेळण्याचे कौशल आहे..आणि तिने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध पण करून दाखवले.
कुणीतरी, ह्या विषयावर धागा काढेल, असे वाटले होते, म्हणून थांबलो होतो... 2017 पासून, भारतीय महिला, ह्या प्रकारच्या खेळांत चांगल्याच प्रवीण झाल्या आहेत... पण, व्यक्तीपूजेच्या शापातून, अद्याप तरी, ह्या संघाची सुटका झालेली नाही. मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांना अजूनही संघात का घेतले आहे? हा एक अनाकलनीय प्रश्र्न .... ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता जास्त आहे, हे माझे वैयक्तिक मत ...

१५.२५ करोड, पांढरे कपडे आणि लाल चेंडू !

जे.पी.मॉर्गन ·

तरूण वयांत, पटकन निर्णय हवे असतात आणि उतारवयांत उत्तम निकाल हवा असतो... शृंगार तोच असतो, पण तरूणपणी धसमुसळेपणा आणि उतारवयांत आरामात... नैसर्गिक आहे ...

बाजार आहे यात बरोबर चुक काहीच नाही आता करोडो रूपयाची गुंतवणुक या मधे खेळ किती आणी सट्टा किती ! मला वाटते खेळाची वाट लागलीय. पण लेख जबरदस्त

In reply to by कर्नलतपस्वी

१. वस्तुंसारखा माणसांचा पण लिलाव केला जातो. २. पूर्वीच्या काळात जसे गुलाम विकले जायचे तसंच आहे हे. फ़क्त गुलाम पंचतारांकित हॉटेलात रहातात. ३. जी किंमत दिली गेली त्याच्या एक दशांश पैश्यात आपल्या देशात खुनाची सुपारी दिली जाते. ४. असे असूनही मैदानावर जे काही चालते ते ’ जंटलमन्स क्रिकेट ’ आहे असे समजुन आपण सगळे आपला वेळ देऊन टीव्ही समोर बसून सामने बघतो. ५. हा सगळा केअरफ़ुली ऑर्केस्ट्रेटेड तमाशा आहे. अजुनही आपण वेड्यासारखे मागे धावतो म्हणून त्याचा फ़ायदा घेउन आय पी एल च्या संघांचे मालक करोडॊ कमावत आहेत किंवा करोडॊ काळ्याचे पांढरे करुन घेतायत. पहिला मॅच फ़िक्सींग चा मामला समोर आला तेंव्हाच मी क्रिकेट बघणं सोडुन दिलं. अजुनही लोकांना आशा आहे की ते चांगलं असेल.

जेम्स वांड 15/02/2022 - 09:16
उत्तम लेख आहे, पण काळ बदलतच जाणार, आपण बुढा पारशी असल्यागत गुड ओल्ड ब्रिटिश डेजचे सुस्कारे सोडून काय होतंय

तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते ते पहावे. लिलाव न झालेल्या खेळाडूंच्या यादितली काही नावे वाचून खरच वाईट वाटले पैजारबुवा,

सुबोध खरे 15/02/2022 - 10:01
आय पी एल यात मूलभूत गोची हीच आहे कि हि मालिका केवळ मनोरंजनासाठी निर्माण केलेली आहे. त्यात समानता किंवा न्याय इ. अपेक्षितच नाही. केवळ चौकार षटकार यांची आतिषबाजी करून दोन घडीचे मनोरंजन एवढाच याचा अर्थ आहे. अन्यथा फलंदाज २० षटके खेळू शकतो परंतु गोलंदाज मात्र १० षटके टाकू शकत नाही असे का? त्यांना ४ च षटके टाकू द्यायची हा दुजा भाव का? विचार करा लय सापडलेला बुमराह सतत १० शतके टाकतो आहे तर या ( तथाकथित) ताबडतोड खेळणाऱ्या पोरांना त्याच्या समोर उभे राहता येईल का? सध्या त्याच्या दोन ओव्हर खेळून काढा असा सल्ला देणारे त्यांचे सल्लागार काय सल्ला देतील? हे केवल दोन घटकेचे मनोरंजन आहे एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा आणि सोडून द्यायचं

मार्गी 15/02/2022 - 17:44
खूपच जबरदस्त लिहीलंय!! टेस्ट क्रिकेट = जीवन हे मलाही नेहमी वाटतं! जीवनात काहीही एका दिवसात होत नाही. कधी ५० ओव्हर्स टाकूनही विकेट मिळत नाही! संपूर्ण सहमत. सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

डायरेक्ट काळजाला हात घालणारा विषय! आयपीएल विषयी काही तक्रार नाही. काळाचा महिमा म्हणून सोडून द्यायचे. पण, कसोटी क्रिकेट म्हणजे... जगात सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या फलंदाजाला ऑफ साइडला एकही चौकार ना मारता द्विशतक करायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट. पहिल्या डावात पावणे तीनशे धावांनी मागे असताना, साडे सहाशे धावा करून ऑस्ट्रेलियाला हरवायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट.

In reply to by तुषार काळभोर

खरंय! आय.पी.एल ने अगदी कर्दनकाळ गोलंदाजाला सुध्दा सर्कशीतला केविलवाणा सिंह बनवले आहे. आधी दया यायची. पण ८३ च्या निमित्तने जुने किस्से ऐकिवात आले त्यानुसार तेज गोलंदाजांनी पिचवर अक्षरशः रक्तपात करुन माज दाखवला होता. त्यानंतर त्यांना काबुत ठेवण्यासाठी एका षटकात तीनच बाऊन्सर व फिल्डींग मर्यादा वगैरे नियम आणले गेले व खेळ पुरता फलंदाज धार्जिणा बन(व)ला. मला वाटते आय.पी.एल मध्ये गोलंदाजांनी युनियन तयार करुन फलंदाजांपेक्षा जास्त किंमत वसुल करायला भाग पाडायला हवे.कारण जे रिकामटेकडे पब्लिक हे सामने पाहतात त्यांना गोलंदाजांची कत्तल पाहण्यातच जास्त स्वारस्य असते.

In reply to by तुषार काळभोर

सुबोध खरे 16/02/2022 - 10:01
कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय संगीतासारखे असते. कितीही अभिजात आहे म्हटले तरी ३ तास आलाप आणि ताना ऐकण्याची क्षमता सामान्य रसिकाला नसते. तद्वतच पाच दिवस सकाळी ९ ते ५ पाहत बसायला सामान्य माणसाला वेळ असतो का? शेवटी चार घटका मनोरंजन म्हणूनच लोक याकडे पाहतात. दर्दी रसिक आहेत ते कसोटी क्रिकेट किंवा शास्त्रीय संगीताच्या मैफलीला जातील पण त्यात भरपूर पैसे अपेक्षित असेल तर चूक आहे

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 16/02/2022 - 10:15
नुसती करमणूक किंवा पैसे लावण्यासाठी ( या देशात अधिकृत आहे ) टी २० ठीक वाटले पण आत्मीयता निर्माण होऊ शकली नाही ... जसे पूर्वी आपल्या " राज्याचा संघ" म्हणून आपुलकी वाटायची कारण कदाचित हे कि भले एखाद्या संघ आपलय शहराच्या नावाचा असेल पण त्यातीळ अनेक खेळाडू जर आज इथे उदय तिथे असतील तर तो संघ "आपला" कसा वाटणार? देश विरुद्ध देश असा तो २० असो एकदिवसिय असो किंवा कसोटी मग ती "आत्मीयता " अपॊआप असते

सौंदाळा 15/02/2022 - 22:51
नेहमीप्रमाणेच धडाकेबाज लेख सुरुवातीचे दोन सिझन येड्यागत आयपील पाहिले. तिसर्‍या सिझन पासून अधून मधून काही महत्वाच्या मॅचेस बघायला लागलो. नंतर कधी कधी चॅनल बदलताना फोर, सिक्स, विकेट असे काही दिसले तर तेवढ्यापुरते आणी आता मागील काही वर्षे ढुंकून पण बघत नाही. मात्र कसोटी सामने बघायला खूप मजा येते. मात्र आता झटपट क्रिकेट्मुळे कसोटी सामन्यांचा दर्जा पण खालवला आहे. श्रीलंका, विंडीज हे चांगले संघ ढेपाळले आहेत. नुकतीच झालेली अ‍ॅशेस मालिका पण अत्यंत एकतर्फी झाली. आम्ही एकदा गप्पा मारताना मी म्हणालेलो : लावयचा बैल (ट२०), शर्यतीचा बैल (एकदिवसीय) आणि शेतात भरपूर काम करणारा बैल (कसोटी) हे वेगवेगळे असतात तसेच संघाचे करायला पाहिजे आणि सगळीकडे समान पैसे, संधी तयार व्हायला पाहिजेत नाहीतर कसोटी क्रिकेटचे अवघड आहे.

पब्लिक अजूनही क्रिकेट बघतं ? अवघड आहे. मी प्रो कबड्डी चे पहिले २-३ सिजन बघीतले आणि इथे मिसळपाववर त्याबद्द्ल लिहिले होते. मात्र आता त्याचे देखिल पुर्ण बाजारीकरण झाले त्यामुळे मजा राहिली नाही. बघणं बंद केलं.

राघव 16/02/2022 - 11:10
खास प्रतिसाद लिहिण्यासाठी लॉग इन करायला भाग पाडणारा लेख! मुजरा घ्यावा पंत! :-) आयपीएल - टी २० च्या विरोधात मी नाही. हा प्रकार फुटबॉल लीग्स, बेसबॉल लीग्स, बास्केटबॉल लीग्स या धरतीवर आला आहे. क्लब्सचे मालक, टीम तयार करणं, अ‍ॅनालिसिस, प्लेयर्स हुडकून काढणं, दुसर्‍या टीम्स सोबत सौदे करणं हे सगळं यात आलं. अगदी प्रोफेशनल एजंट्स च्या कंपनीज असतात टीम्स तयार करण्यात. एक टीम तयार करण्यात जवळपास २०० लोकांचा स्टाफ राबत असावा. ही स्वतःच एक कंपनी असते आणि कंपनी सारखीच नफा/तोट्याचा व्यवहार बघते. फक्त प्रॉडक्ट म्हणजे इथे एक खेळाडू असतो किंवा सपोर्ट स्टाफ असतो. याचा फायदा १३० कोटी लोकसंख्येच्या देशात खेळाडूंना नक्कीच होतो. अनेक जण तर रणजी/दुलीप/ईराणी चषक स्पर्धांमधे खेळतही नाहीत. कदाचित संधीच मिळत नसावी. हे खूप अगोदर पासून आहे. या अशा खेळाडूंना आयपीएल सारखी लीग्स म्हणजे खूप मोठी संधी असते. त्यात चूक काय? अर्थात् मॉर्गन म्हणतात तसेच मलाही क्रिकेटचा मुळापासून आस्वाद घ्यायला टेस्ट क्रिकेटच आवडते. आणि जे आपल्यासारख्या रसिकांना समजते ते काय स्वत: खेळाडूला समजणार नाही. पण संधीच मिळत नसेल तर त्यानं तरी काय करावं? मला तर या पॅशननं जगणार्‍या लोकांचा फार अभिमान वाटतो. खेळावरच्या प्रेमापोटी हे लोक्स अनेक गोष्टी बाजूला सारतात. अशा खेळाडूंसाठी हे मोठं स्टेज आहे. हां हे खरं की यामुळे गेम मारकुटा झालाय, पण टेस्ट क्रिकेट मधे संधी मिळालेल्या खेळाडूला धीर धरणं शिकावंच लागतं [सन्माननीय अपवादः सेहवाग]. तीच तर टेस्ट क्रिकेटची खासियत आहे, फक्त ते बंद न पडू देणे एवढे आयसीसीने केले पाहिजे.

सर्वांच्याच मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मी सहसा लेखामागचे माझे विचार विशद करायला जात नाही पण सगळ्यांचेच तळमळीचे प्रतिसाद वाचून राहवलं नाही. खरंतर आयपीएलचा लिलाव हे निमित्त ठरलं. मु.वि., सुबोध खरे, जेम्स वांड, राघव, आदींनी म्हटल्याप्रमाणे बदल तर होणारच आणि त्यासाठी "हा हन्त हन्त" म्हणून उसासे सोडण्यात काहीच अर्थ नाही. एक मुद्दा लेखात जास्त अधोरेखित व्हायला हवा होता तो म्हणजे आताच्या "इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन" आणि त्यायोगे "इन्स्टन्ट फ्रस्ट्रेशनच्या" एकंदर कलाचा. सी ए च्या परीक्षेत पास झाली नाही म्हणून एक २४ वर्षीय मुलगी आत्महत्या करते किंवा १०वीच्या रिझल्टचं टेन्शन घेऊन एखादा मुलगा फास लावून घेतो हे एक समाज म्हणून आपलं अपयश आहे असं मला वाटतं. माझ्या मते जीवन कौशल्य (life skills) शिकवायला खेळांइतकं सोपं आणि रंजक माध्यम नाही. अपयश पचवणं, एखाद्या गोष्टीसाठी दीर्घकालीन योजना आखणं, चिकाटी, संयम, अपयशसुद्धा सकारात्मकतेनी घेणं ह्या सगळ्या गोष्टीच मुलांमध्ये बिंबवणं खूप गरजेचं आहे. खेळ आणि संगीत हे प्रत्येकाशी दुवा साधतं. आणि म्हणूनच खेळांची, कसोटी क्रिकेटची किंवा शास्त्रीय संगीताची आवड लागावी ह्यासाठी पालकांनी आणि शाळांनीदेखील विशेष प्रयत्न केले पहिजेत. कारण एरवी दीर्घकाळ टिकून राहणार्‍या फार गोष्टी आता आपल्याला दिसत नाहीत. ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या महत्वाच्या मुद्द्यावर तुमचे विचार वाचायला नक्की आवडेल. जे.पी.मॉर्गन.

In reply to by जे.पी.मॉर्गन

यश नक्कीच मिळेल.... छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचले की, आयुष्यात संकट आले की, कसा मार्ग काढायचा? हे समजत जाते.. संधी मिळाली की फायदा घेणे, हा एक भाग झाला...तोरणा किल्ला ताब्यात घेणे.. काही काळा पर्यंत, योग्य त्या संधीची वाट बघायची आणि संधी मिळताच, उपाय योजना अंमलात आणायची, हा दुसरा मुद्दा झाला.... शाहिस्तेखानाला पळवून लावणे.. आणि संधी निर्माण करणे, हा तिसरा मुद्दा झाला...अफजलखानाचा वध...

भीमराव 17/02/2022 - 15:29
सगळी सोंगं आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही. भारतीय खेळाडू असतील अंबानी, वेस्ट इंडिज चे खेळाडू वर्ल्ड कप BCCI च्या फंडावर खेळले होते. IPL चा पैसा कसोटी क्रिकेट चा शौक पाळण्यासाठी वापरला जात असेल तर IPL चांगलंच आहे.

फारएन्ड 19/02/2022 - 22:04
जबरी. मागच्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया सिरीज ने कसोटी क्रिकेट पुन्हा "कूल" केले होते. ती ब्रिस्बेनची टेस्ट असंख्य लोकांनी पाहिली/फॉलो केली. पहिल्या मॅच पासून मुख्य संघातील लोक जखमी होउन बाहेर गेले, पण प्रत्येक वेळेस जे बदली खेळाडू आले त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या कसोटीपर्यंत जवळजवळ अर्ध्याहून अधिक संघ वेगळा होता. आणि तरी आपण जिंकलो. या अशा आठवणी अनेक वर्षे राहतात. अजूनही २००१ च्या सिरीज चे हायलाइट्स बघायला मजा येते. गावसकर वि. वेस्ट इंडिज, तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया, लक्ष्मण वि. ऑस्ट्रेलिया, सेहवाग वि पाकिस्तान या लढती "२-३ तास विरंगुळा" सदरात येत नाहीत. स्टीव वॉ ने १९९५ मधे विंडीज चे साम्राज्य खालसा करून ऑस्ट्रेलियाचे राज्य आणले ती सिरीज. ब्रायन लाराने १९९९ मधे ऑल्मोस्ट एकहाती ऑस्ट्रेलियाला थोपवून धरले ती सिरीज, भारताने ऑस्ट्रेलियाचा १६ कसोटी सलग जिंकणारा अश्वमेध एकदाच नव्हे, तर दोनदा थोपवला (२००१ कलकत्ता व २००८ पर्थ) त्या सिरीज, "दिल जीतो" ऐकून २००४ मधे पाकला गेलेला संघ सिरीजही जिंकून आला ते - ज्या पिढीने हे सगळे लाइव्ह पाहिले त्यांना वर्षानुवर्षे हे क्रिकेट म्हणजे चर्चेचा विषय आहेत. अजूनही वेळ असला की यातील क्लिप्स पाहाव्याश्या वाटतात. आयपीएल हे डायल्यूटेड क्रिकेट आहे हे नक्की. पण मला ते ही आवडते. त्याची एक स्वतःची सिस्टीम तयार झाली आहे. तेथेही सतत यशस्वी व्हायला काही कौशल्ये लागतात. मूळचे कसोटीचे तंत्र असलेले पण आयपीएल मधे तावून सुलाखून निघालेले खेळाडू कसोटी क्रिकेटचाही दर्जा उंचावतात. गेल्या काही वर्षात कसोटी सामने जास्त निर्णायक होउ लागले, तेथेही खतरनाक फिल्डिंग दिसू लागली. तोटेही आहेत. सामन्यात चिकार वेळ हाताशी असताना अनावश्यक फटके मारून विकेट फेकण्याचे प्रमाण खूप आहे. वेळाचा वापर हे कसोटी क्रिकेटमधले एक तंत्र आहे. ते नवीन खेळाडूंना फारसे ज्ञात नसावे असे अनेकदा दिसते. पण तरीही आयपीएल किंवा टी-२० चीही एक मजा आहे. मला पहिल्यांदा सचिन, द्रविड सारखे लोक हे मल्ल्या, अंबानी ई. ना "अन्सरेबल" आहेत ही कल्पनाच सहन होत नसे. पण ७०, ८० च्या दशकातील हलाखीची परिस्थिती ऐकल्यावर त्यापेक्षा हे बरे असेच वाटते आजकाल. वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे २० ओव्हर्सचे सामने जर कसोटी क्रिकेट सबसिडाइज करत असतील तर ते चांगलेच आहे.

तरूण वयांत, पटकन निर्णय हवे असतात आणि उतारवयांत उत्तम निकाल हवा असतो... शृंगार तोच असतो, पण तरूणपणी धसमुसळेपणा आणि उतारवयांत आरामात... नैसर्गिक आहे ...

बाजार आहे यात बरोबर चुक काहीच नाही आता करोडो रूपयाची गुंतवणुक या मधे खेळ किती आणी सट्टा किती ! मला वाटते खेळाची वाट लागलीय. पण लेख जबरदस्त

In reply to by कर्नलतपस्वी

१. वस्तुंसारखा माणसांचा पण लिलाव केला जातो. २. पूर्वीच्या काळात जसे गुलाम विकले जायचे तसंच आहे हे. फ़क्त गुलाम पंचतारांकित हॉटेलात रहातात. ३. जी किंमत दिली गेली त्याच्या एक दशांश पैश्यात आपल्या देशात खुनाची सुपारी दिली जाते. ४. असे असूनही मैदानावर जे काही चालते ते ’ जंटलमन्स क्रिकेट ’ आहे असे समजुन आपण सगळे आपला वेळ देऊन टीव्ही समोर बसून सामने बघतो. ५. हा सगळा केअरफ़ुली ऑर्केस्ट्रेटेड तमाशा आहे. अजुनही आपण वेड्यासारखे मागे धावतो म्हणून त्याचा फ़ायदा घेउन आय पी एल च्या संघांचे मालक करोडॊ कमावत आहेत किंवा करोडॊ काळ्याचे पांढरे करुन घेतायत. पहिला मॅच फ़िक्सींग चा मामला समोर आला तेंव्हाच मी क्रिकेट बघणं सोडुन दिलं. अजुनही लोकांना आशा आहे की ते चांगलं असेल.

जेम्स वांड 15/02/2022 - 09:16
उत्तम लेख आहे, पण काळ बदलतच जाणार, आपण बुढा पारशी असल्यागत गुड ओल्ड ब्रिटिश डेजचे सुस्कारे सोडून काय होतंय

तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते ते पहावे. लिलाव न झालेल्या खेळाडूंच्या यादितली काही नावे वाचून खरच वाईट वाटले पैजारबुवा,

सुबोध खरे 15/02/2022 - 10:01
आय पी एल यात मूलभूत गोची हीच आहे कि हि मालिका केवळ मनोरंजनासाठी निर्माण केलेली आहे. त्यात समानता किंवा न्याय इ. अपेक्षितच नाही. केवळ चौकार षटकार यांची आतिषबाजी करून दोन घडीचे मनोरंजन एवढाच याचा अर्थ आहे. अन्यथा फलंदाज २० षटके खेळू शकतो परंतु गोलंदाज मात्र १० षटके टाकू शकत नाही असे का? त्यांना ४ च षटके टाकू द्यायची हा दुजा भाव का? विचार करा लय सापडलेला बुमराह सतत १० शतके टाकतो आहे तर या ( तथाकथित) ताबडतोड खेळणाऱ्या पोरांना त्याच्या समोर उभे राहता येईल का? सध्या त्याच्या दोन ओव्हर खेळून काढा असा सल्ला देणारे त्यांचे सल्लागार काय सल्ला देतील? हे केवल दोन घटकेचे मनोरंजन आहे एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा आणि सोडून द्यायचं

मार्गी 15/02/2022 - 17:44
खूपच जबरदस्त लिहीलंय!! टेस्ट क्रिकेट = जीवन हे मलाही नेहमी वाटतं! जीवनात काहीही एका दिवसात होत नाही. कधी ५० ओव्हर्स टाकूनही विकेट मिळत नाही! संपूर्ण सहमत. सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

डायरेक्ट काळजाला हात घालणारा विषय! आयपीएल विषयी काही तक्रार नाही. काळाचा महिमा म्हणून सोडून द्यायचे. पण, कसोटी क्रिकेट म्हणजे... जगात सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या फलंदाजाला ऑफ साइडला एकही चौकार ना मारता द्विशतक करायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट. पहिल्या डावात पावणे तीनशे धावांनी मागे असताना, साडे सहाशे धावा करून ऑस्ट्रेलियाला हरवायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट.

In reply to by तुषार काळभोर

खरंय! आय.पी.एल ने अगदी कर्दनकाळ गोलंदाजाला सुध्दा सर्कशीतला केविलवाणा सिंह बनवले आहे. आधी दया यायची. पण ८३ च्या निमित्तने जुने किस्से ऐकिवात आले त्यानुसार तेज गोलंदाजांनी पिचवर अक्षरशः रक्तपात करुन माज दाखवला होता. त्यानंतर त्यांना काबुत ठेवण्यासाठी एका षटकात तीनच बाऊन्सर व फिल्डींग मर्यादा वगैरे नियम आणले गेले व खेळ पुरता फलंदाज धार्जिणा बन(व)ला. मला वाटते आय.पी.एल मध्ये गोलंदाजांनी युनियन तयार करुन फलंदाजांपेक्षा जास्त किंमत वसुल करायला भाग पाडायला हवे.कारण जे रिकामटेकडे पब्लिक हे सामने पाहतात त्यांना गोलंदाजांची कत्तल पाहण्यातच जास्त स्वारस्य असते.

In reply to by तुषार काळभोर

सुबोध खरे 16/02/2022 - 10:01
कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय संगीतासारखे असते. कितीही अभिजात आहे म्हटले तरी ३ तास आलाप आणि ताना ऐकण्याची क्षमता सामान्य रसिकाला नसते. तद्वतच पाच दिवस सकाळी ९ ते ५ पाहत बसायला सामान्य माणसाला वेळ असतो का? शेवटी चार घटका मनोरंजन म्हणूनच लोक याकडे पाहतात. दर्दी रसिक आहेत ते कसोटी क्रिकेट किंवा शास्त्रीय संगीताच्या मैफलीला जातील पण त्यात भरपूर पैसे अपेक्षित असेल तर चूक आहे

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 16/02/2022 - 10:15
नुसती करमणूक किंवा पैसे लावण्यासाठी ( या देशात अधिकृत आहे ) टी २० ठीक वाटले पण आत्मीयता निर्माण होऊ शकली नाही ... जसे पूर्वी आपल्या " राज्याचा संघ" म्हणून आपुलकी वाटायची कारण कदाचित हे कि भले एखाद्या संघ आपलय शहराच्या नावाचा असेल पण त्यातीळ अनेक खेळाडू जर आज इथे उदय तिथे असतील तर तो संघ "आपला" कसा वाटणार? देश विरुद्ध देश असा तो २० असो एकदिवसिय असो किंवा कसोटी मग ती "आत्मीयता " अपॊआप असते

सौंदाळा 15/02/2022 - 22:51
नेहमीप्रमाणेच धडाकेबाज लेख सुरुवातीचे दोन सिझन येड्यागत आयपील पाहिले. तिसर्‍या सिझन पासून अधून मधून काही महत्वाच्या मॅचेस बघायला लागलो. नंतर कधी कधी चॅनल बदलताना फोर, सिक्स, विकेट असे काही दिसले तर तेवढ्यापुरते आणी आता मागील काही वर्षे ढुंकून पण बघत नाही. मात्र कसोटी सामने बघायला खूप मजा येते. मात्र आता झटपट क्रिकेट्मुळे कसोटी सामन्यांचा दर्जा पण खालवला आहे. श्रीलंका, विंडीज हे चांगले संघ ढेपाळले आहेत. नुकतीच झालेली अ‍ॅशेस मालिका पण अत्यंत एकतर्फी झाली. आम्ही एकदा गप्पा मारताना मी म्हणालेलो : लावयचा बैल (ट२०), शर्यतीचा बैल (एकदिवसीय) आणि शेतात भरपूर काम करणारा बैल (कसोटी) हे वेगवेगळे असतात तसेच संघाचे करायला पाहिजे आणि सगळीकडे समान पैसे, संधी तयार व्हायला पाहिजेत नाहीतर कसोटी क्रिकेटचे अवघड आहे.

पब्लिक अजूनही क्रिकेट बघतं ? अवघड आहे. मी प्रो कबड्डी चे पहिले २-३ सिजन बघीतले आणि इथे मिसळपाववर त्याबद्द्ल लिहिले होते. मात्र आता त्याचे देखिल पुर्ण बाजारीकरण झाले त्यामुळे मजा राहिली नाही. बघणं बंद केलं.

राघव 16/02/2022 - 11:10
खास प्रतिसाद लिहिण्यासाठी लॉग इन करायला भाग पाडणारा लेख! मुजरा घ्यावा पंत! :-) आयपीएल - टी २० च्या विरोधात मी नाही. हा प्रकार फुटबॉल लीग्स, बेसबॉल लीग्स, बास्केटबॉल लीग्स या धरतीवर आला आहे. क्लब्सचे मालक, टीम तयार करणं, अ‍ॅनालिसिस, प्लेयर्स हुडकून काढणं, दुसर्‍या टीम्स सोबत सौदे करणं हे सगळं यात आलं. अगदी प्रोफेशनल एजंट्स च्या कंपनीज असतात टीम्स तयार करण्यात. एक टीम तयार करण्यात जवळपास २०० लोकांचा स्टाफ राबत असावा. ही स्वतःच एक कंपनी असते आणि कंपनी सारखीच नफा/तोट्याचा व्यवहार बघते. फक्त प्रॉडक्ट म्हणजे इथे एक खेळाडू असतो किंवा सपोर्ट स्टाफ असतो. याचा फायदा १३० कोटी लोकसंख्येच्या देशात खेळाडूंना नक्कीच होतो. अनेक जण तर रणजी/दुलीप/ईराणी चषक स्पर्धांमधे खेळतही नाहीत. कदाचित संधीच मिळत नसावी. हे खूप अगोदर पासून आहे. या अशा खेळाडूंना आयपीएल सारखी लीग्स म्हणजे खूप मोठी संधी असते. त्यात चूक काय? अर्थात् मॉर्गन म्हणतात तसेच मलाही क्रिकेटचा मुळापासून आस्वाद घ्यायला टेस्ट क्रिकेटच आवडते. आणि जे आपल्यासारख्या रसिकांना समजते ते काय स्वत: खेळाडूला समजणार नाही. पण संधीच मिळत नसेल तर त्यानं तरी काय करावं? मला तर या पॅशननं जगणार्‍या लोकांचा फार अभिमान वाटतो. खेळावरच्या प्रेमापोटी हे लोक्स अनेक गोष्टी बाजूला सारतात. अशा खेळाडूंसाठी हे मोठं स्टेज आहे. हां हे खरं की यामुळे गेम मारकुटा झालाय, पण टेस्ट क्रिकेट मधे संधी मिळालेल्या खेळाडूला धीर धरणं शिकावंच लागतं [सन्माननीय अपवादः सेहवाग]. तीच तर टेस्ट क्रिकेटची खासियत आहे, फक्त ते बंद न पडू देणे एवढे आयसीसीने केले पाहिजे.

सर्वांच्याच मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मी सहसा लेखामागचे माझे विचार विशद करायला जात नाही पण सगळ्यांचेच तळमळीचे प्रतिसाद वाचून राहवलं नाही. खरंतर आयपीएलचा लिलाव हे निमित्त ठरलं. मु.वि., सुबोध खरे, जेम्स वांड, राघव, आदींनी म्हटल्याप्रमाणे बदल तर होणारच आणि त्यासाठी "हा हन्त हन्त" म्हणून उसासे सोडण्यात काहीच अर्थ नाही. एक मुद्दा लेखात जास्त अधोरेखित व्हायला हवा होता तो म्हणजे आताच्या "इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन" आणि त्यायोगे "इन्स्टन्ट फ्रस्ट्रेशनच्या" एकंदर कलाचा. सी ए च्या परीक्षेत पास झाली नाही म्हणून एक २४ वर्षीय मुलगी आत्महत्या करते किंवा १०वीच्या रिझल्टचं टेन्शन घेऊन एखादा मुलगा फास लावून घेतो हे एक समाज म्हणून आपलं अपयश आहे असं मला वाटतं. माझ्या मते जीवन कौशल्य (life skills) शिकवायला खेळांइतकं सोपं आणि रंजक माध्यम नाही. अपयश पचवणं, एखाद्या गोष्टीसाठी दीर्घकालीन योजना आखणं, चिकाटी, संयम, अपयशसुद्धा सकारात्मकतेनी घेणं ह्या सगळ्या गोष्टीच मुलांमध्ये बिंबवणं खूप गरजेचं आहे. खेळ आणि संगीत हे प्रत्येकाशी दुवा साधतं. आणि म्हणूनच खेळांची, कसोटी क्रिकेटची किंवा शास्त्रीय संगीताची आवड लागावी ह्यासाठी पालकांनी आणि शाळांनीदेखील विशेष प्रयत्न केले पहिजेत. कारण एरवी दीर्घकाळ टिकून राहणार्‍या फार गोष्टी आता आपल्याला दिसत नाहीत. ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या महत्वाच्या मुद्द्यावर तुमचे विचार वाचायला नक्की आवडेल. जे.पी.मॉर्गन.

In reply to by जे.पी.मॉर्गन

यश नक्कीच मिळेल.... छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचले की, आयुष्यात संकट आले की, कसा मार्ग काढायचा? हे समजत जाते.. संधी मिळाली की फायदा घेणे, हा एक भाग झाला...तोरणा किल्ला ताब्यात घेणे.. काही काळा पर्यंत, योग्य त्या संधीची वाट बघायची आणि संधी मिळताच, उपाय योजना अंमलात आणायची, हा दुसरा मुद्दा झाला.... शाहिस्तेखानाला पळवून लावणे.. आणि संधी निर्माण करणे, हा तिसरा मुद्दा झाला...अफजलखानाचा वध...

भीमराव 17/02/2022 - 15:29
सगळी सोंगं आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही. भारतीय खेळाडू असतील अंबानी, वेस्ट इंडिज चे खेळाडू वर्ल्ड कप BCCI च्या फंडावर खेळले होते. IPL चा पैसा कसोटी क्रिकेट चा शौक पाळण्यासाठी वापरला जात असेल तर IPL चांगलंच आहे.

फारएन्ड 19/02/2022 - 22:04
जबरी. मागच्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया सिरीज ने कसोटी क्रिकेट पुन्हा "कूल" केले होते. ती ब्रिस्बेनची टेस्ट असंख्य लोकांनी पाहिली/फॉलो केली. पहिल्या मॅच पासून मुख्य संघातील लोक जखमी होउन बाहेर गेले, पण प्रत्येक वेळेस जे बदली खेळाडू आले त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या कसोटीपर्यंत जवळजवळ अर्ध्याहून अधिक संघ वेगळा होता. आणि तरी आपण जिंकलो. या अशा आठवणी अनेक वर्षे राहतात. अजूनही २००१ च्या सिरीज चे हायलाइट्स बघायला मजा येते. गावसकर वि. वेस्ट इंडिज, तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया, लक्ष्मण वि. ऑस्ट्रेलिया, सेहवाग वि पाकिस्तान या लढती "२-३ तास विरंगुळा" सदरात येत नाहीत. स्टीव वॉ ने १९९५ मधे विंडीज चे साम्राज्य खालसा करून ऑस्ट्रेलियाचे राज्य आणले ती सिरीज. ब्रायन लाराने १९९९ मधे ऑल्मोस्ट एकहाती ऑस्ट्रेलियाला थोपवून धरले ती सिरीज, भारताने ऑस्ट्रेलियाचा १६ कसोटी सलग जिंकणारा अश्वमेध एकदाच नव्हे, तर दोनदा थोपवला (२००१ कलकत्ता व २००८ पर्थ) त्या सिरीज, "दिल जीतो" ऐकून २००४ मधे पाकला गेलेला संघ सिरीजही जिंकून आला ते - ज्या पिढीने हे सगळे लाइव्ह पाहिले त्यांना वर्षानुवर्षे हे क्रिकेट म्हणजे चर्चेचा विषय आहेत. अजूनही वेळ असला की यातील क्लिप्स पाहाव्याश्या वाटतात. आयपीएल हे डायल्यूटेड क्रिकेट आहे हे नक्की. पण मला ते ही आवडते. त्याची एक स्वतःची सिस्टीम तयार झाली आहे. तेथेही सतत यशस्वी व्हायला काही कौशल्ये लागतात. मूळचे कसोटीचे तंत्र असलेले पण आयपीएल मधे तावून सुलाखून निघालेले खेळाडू कसोटी क्रिकेटचाही दर्जा उंचावतात. गेल्या काही वर्षात कसोटी सामने जास्त निर्णायक होउ लागले, तेथेही खतरनाक फिल्डिंग दिसू लागली. तोटेही आहेत. सामन्यात चिकार वेळ हाताशी असताना अनावश्यक फटके मारून विकेट फेकण्याचे प्रमाण खूप आहे. वेळाचा वापर हे कसोटी क्रिकेटमधले एक तंत्र आहे. ते नवीन खेळाडूंना फारसे ज्ञात नसावे असे अनेकदा दिसते. पण तरीही आयपीएल किंवा टी-२० चीही एक मजा आहे. मला पहिल्यांदा सचिन, द्रविड सारखे लोक हे मल्ल्या, अंबानी ई. ना "अन्सरेबल" आहेत ही कल्पनाच सहन होत नसे. पण ७०, ८० च्या दशकातील हलाखीची परिस्थिती ऐकल्यावर त्यापेक्षा हे बरे असेच वाटते आजकाल. वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे २० ओव्हर्सचे सामने जर कसोटी क्रिकेट सबसिडाइज करत असतील तर ते चांगलेच आहे.
बोला पाच करोड... पाच करोड... जनाब फक्त पाच करोड..... फिनिशिंग बॅट्समन आणि शिवाय विकेटकीपर.... प्रत्येक स्पर्धेचा अनुभव... बोला पाच करोड... गरज लागली तर कॅप्टनशिप पण करणार... नवीन लप्पेवाला शॉट तयार केलेला....बोला पाच करोड... पाच करोड एक.... पाच करोड दोन.... "सव्वापाच करोड"!!! क्या बात है! इसे कहते हैं कद्रदान... है कोई जोहरी जो इस हीरेको उसका मोल देगा???? सवापाच करोड एक.....सवापाच करोड दो..... आज अग्रेशन ला डिमांड आहे साहेब .... २० ओव्हरमध्ये सेटल व्ह्यायला वेळ कोणाला आहे? यू शुड मेक एव्हरी बॉल काउंट. मल्टीटास्किंग हवंच ना. मी बॅटिंगच करणार...

फोन

पाटिल ·

श्रीगणेशा 09/02/2022 - 02:48
भारी :-) बोलीभाषेतील संवाद छान टिपले आहेत!
"बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?"
"आरे पवन बोलतोय पवन.!"

पाटिल 09/02/2022 - 10:22
:-) चौथा कोनाडा, श्रीगणेशा, सुखी, सुजित, कंजूस, भक्ती. अभिप्रायाबद्दल तुमचे सर्वांचे आभार :-)

मोबाईलवरच्या संवादातुन रंगवलेला लेख आवडला. ते " बर्मंग्ठिव्का" आलं असतं तर मजा आली असती. रच्याकने--ईथे मोठ्या शहरातील शिकली सवरलेली मुले तिशीपर्यंत बिनलग्नाची आहेत्,चिपळुण्,दापोली,रत्नागिरी वगैरे तुलनेने लहान ठिकाणी तर परिस्थिती अजुनच गंभीर. त्यात गावाकडुन शहरात आलेला माणुस सेटल होणार कधी न लग्न करणार कधी हा एक प्रश्नच आहे.

sunil kachure 09/02/2022 - 13:39
ग्रामीण भागातील लोकांची शहरात राहणाऱ्या लोकांविषयी जी धारणा असते ती विनोदी शैलीत मस्त मांडली आहे. राज्याचा काही ग्रामीण भाग अतिशय उत्तम स्थिती मध्ये आहे तिथे शहरी लोक आर्थिक बाबतीत सू स्थिती मध्ये असतात असे समजले जात नाही. बेरकी पना नी प्रेमाचा आभास निर्माण करून स्वार्थ साधण्याची माणसाची वृत्ती वर तुम्ही छान प्रकाश टाकला आहे.

श्रीगणेशा 09/02/2022 - 02:48
भारी :-) बोलीभाषेतील संवाद छान टिपले आहेत!
"बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?"
"आरे पवन बोलतोय पवन.!"

पाटिल 09/02/2022 - 10:22
:-) चौथा कोनाडा, श्रीगणेशा, सुखी, सुजित, कंजूस, भक्ती. अभिप्रायाबद्दल तुमचे सर्वांचे आभार :-)

मोबाईलवरच्या संवादातुन रंगवलेला लेख आवडला. ते " बर्मंग्ठिव्का" आलं असतं तर मजा आली असती. रच्याकने--ईथे मोठ्या शहरातील शिकली सवरलेली मुले तिशीपर्यंत बिनलग्नाची आहेत्,चिपळुण्,दापोली,रत्नागिरी वगैरे तुलनेने लहान ठिकाणी तर परिस्थिती अजुनच गंभीर. त्यात गावाकडुन शहरात आलेला माणुस सेटल होणार कधी न लग्न करणार कधी हा एक प्रश्नच आहे.

sunil kachure 09/02/2022 - 13:39
ग्रामीण भागातील लोकांची शहरात राहणाऱ्या लोकांविषयी जी धारणा असते ती विनोदी शैलीत मस्त मांडली आहे. राज्याचा काही ग्रामीण भाग अतिशय उत्तम स्थिती मध्ये आहे तिथे शहरी लोक आर्थिक बाबतीत सू स्थिती मध्ये असतात असे समजले जात नाही. बेरकी पना नी प्रेमाचा आभास निर्माण करून स्वार्थ साधण्याची माणसाची वृत्ती वर तुम्ही छान प्रकाश टाकला आहे.
"आरे पत्त्या कुठाय तुजा‌.! किती फोन केलं मी.! सगळं बंदच असतंय गा कायम?" हॅलोs ? कोण ? "बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?" नाय रे.. आवाज नाय ओळखला मी. "आरे पवन बोलतोय पवन.!" पवन ?.. पवन ताटे का? मला आवाजाची काय ओळख लागली नाय रे आजून. "पवन जाधव बोलतो. पळशीवरनं." आरे हां हां.. हां.. बोल बोल.. कसा काय फोन केला..? "काय नाय.. बगावं म्हणलं काय चाललंय..! तुजा काय फोन नाय काय नाय..कुठं हाईस कुटं तू ? " हाय की.. हितंचाय.. चाललंय निवांत. "आरं पन आसं कुटं आस्तंय गा ? एवडं करूनी लगा.. एवडं कुटं तोडत आस्तेत गा?

जेथोनि सुरुवात होते..

पाटिल ·

सुरिया 07/01/2022 - 10:30
चाराण्याची सगळी कडे कॉमन असणारी कथा कोंबडी. तिला बाराण्याचा सुहास शिरवळकरांचां उधार घेतलेला मसाला. . एकूण काही मजा नाही. पुलेशु.

सुरिया 07/01/2022 - 10:30
चाराण्याची सगळी कडे कॉमन असणारी कथा कोंबडी. तिला बाराण्याचा सुहास शिरवळकरांचां उधार घेतलेला मसाला. . एकूण काही मजा नाही. पुलेशु.
तर तेव्हा समजा शाळेत वगैरे जावं लागत असलं आणि अभ्यास वगैरे असला तरीही आम्हाला अगदीच काही कंदीलाच्या वगैरे उजेडात अभ्यास करायची गरज पडली नाही, कारण दुर्दैवाने त्या गावात आधीच लाईट आली होती..! त्यामुळे "आम्ही कंदीलाच्या उजेडात अभ्यास करून आयुष्यात असे असे झेंडे लावले!" ह्याप्रकारचे चमकदार डायलॉग वेळप्रसंगी मारता येत नाहीत, याची आज मोठीच हळहळ वाटते. तर जन्मदाते म्हणाले की,''सगळीच पोरं जातेत तर तू बी जात जा शाळेला. उगा पांदीवगळीतनं खेकडी हुडकत फिरण्याबगर हितं बसून तरी दुसरं काय करनार हैस तू ?'' सवाल बिनतोड होता. आणि माझ्याकडे ठोस असं उत्तर नव्हतं.

(स्वप्ना, जागृती, सीमा)

प्रसाद गोडबोले ·

तिघिंच्या आठवणीने काळजात कळ गेली ते स्वसंपादन काय असेल याचा साधारण अंदाज आला, तरी सुध्दा एक उत्सुकता म्हणून..... शक्य असेल तर व्यनि करा. पैजारबुवा,

राघव 20/12/2021 - 17:01
धन्य आहात!! स्वसंपादनाची कल्पनाही भारी!! हा हा हा..

साहित्यिकाने नापास केलेली दवणीय लेखनकामाठी आपल्या अतुलनीय स्वयंसंपादित नवनिर्मितीची प्रेरणा ठरू शकते याचे सानंद आश्चर्य वाटले.

तिघिंच्या आठवणीने काळजात कळ गेली ते स्वसंपादन काय असेल याचा साधारण अंदाज आला, तरी सुध्दा एक उत्सुकता म्हणून..... शक्य असेल तर व्यनि करा. पैजारबुवा,

राघव 20/12/2021 - 17:01
धन्य आहात!! स्वसंपादनाची कल्पनाही भारी!! हा हा हा..

साहित्यिकाने नापास केलेली दवणीय लेखनकामाठी आपल्या अतुलनीय स्वयंसंपादित नवनिर्मितीची प्रेरणा ठरू शकते याचे सानंद आश्चर्य वाटले.
स्वप्ना, जागृती, सीमा आल्या तिघीही घरी कुणास घेवु कवेत अन कुणास ठेऊ दुरी? सीमेसोबत जरा लोळलो कामज्वराच्या धगीं पोळलो स्वप्ना, जागुस शेजेघेऊनी षड्-मोहघटांसवे खेळलो (स्वसंपादित) (अतिशृंगारिक कडवी स्वसंपादित) (स्वसंपादित) आवेगाचे वेग अनावर असे गळुनी पडताना एकांमेकीं विरुनी जाऊ द्वैत आपुले विस्मरताना - शृंगार्_रात्रीं

प्रेमअगन..!

पाटिल ·

मस्तक चरणी / ठेवितसे //
मधला कंसातला भाग सोडला तर बाकी लेख भन्नाट झालाय. लेखासाठी नाही पण प्रेम अगन बघितल्याबद्दल तुम्हाला (अनुपमपापांच्या) हेलिकॉप्टरमधून (हरिहरेश्वरच्या) समुद्राची सैर घडवण्याचं मी जाहीर वाचन देतो. असो. भारतीय चित्रपटसृष्टीत पोलीस आणि सैन्य (इन्क्लुडिंग वायू आणि नौसेना) दलातील अधिकारी पदांविषयी प्रचंड अज्ञान आहे. आपल्या पीच्चरांमध्ये आर्मीतील मोठा अधिकारी कॅप्टन असतो. मेजर म्हणजे उच्चाधिकाराची परिसीमा. त्यामुळे पन्नाशीचा राज बब्बर कॅप्टन आणि निवृत्तीतून माघारी आलेला बच्चन मेजर असतो. बिनलग्नाचा तरुण एसीपी पहिल्यांदा सरफरोष मध्ये दिसला होता. त्याआधी ढेरपोटे साठीचे म्हातारे एसीपी आणि डीवायएसपी (हा एक लोकप्रिय अधिकारी असतो हिंदी पिक्चर मध्ये. दुसरा फेवरेट अधिकारी आयजी) असत. त्याशिवाय कॅप्टन आणि मेजरला अनिर्बंध अधिकार असतात. खडकवासल्याच्या एनडीएचा सर्वेसर्वा साठीचा मेजर असतो जो कॅडेट्सला बंड करायला लावतो. त्याशिवाय सैन्याचे लोक सदा सर्वकाळ गणवेशात असतात. (पण एकचाही क्रू-कट नसतो. अगदी बॉर्डर या बऱ्यापैकी बऱ्या चित्रपटातसुद्धा अक्षय खन्ना आणि सुनील शेट्टी जुल्फे घेऊन हिंडतात. मुख्य हिरोने सैन्याच्या भूमिकेसाठी क्रू-कट केल्याचं पहिलं उदाहरण कदाचित लक्ष्य असेल.) आणि दिसेल त्याला कडक सॅल्युट मारतात. तसेच इतर सामान्य जनता त्यांना उगाच सॅल्युट मारत असते. ते बुलेट आणि उघडी जीप (महिंद्रा कमांडर) शिवाय इतर वाहने त्याज्य मानतात. माहेरच्या साडीतला कॅप्टन रमेश भाटकर नेहमी कडक गणवेशात बुलेटवर घरी येतो. दुसरं अज्ञान असतं महाविद्यालयीन तरुणाई विषयी. दिल चाहता है (परत एकदा फरहान अख्तर) कदाचित पहिला पिक्चर असेल ज्यात मुंबईच्या उच्चभ्रू तरुणाईचं वास्तव चित्रण आहे. बाकी मग अस्वल कपूर बारावी पास (एन्सीसी नेव्ही कॅडेट) असतो, 'विदेश में पढी' हिरोईन अती तोकड्या कपड्यात मुंबईच्या कॉलेजात प्रवेश घेते. तिथे शिवणकाम करणाऱ्या विधवा आईचा मुलगा अक्षयकुमार किंवा सुनील शेट्टी फर्स्ट क्लास फर्स्ट पास होतात. व्हीलन असलेला अमीर बाप का बिगडा मुलगा त्याच कॉलेजात असतो. तो अर्थात तोकड्या कपड्यात फिरणाऱ्या 'विदेश में पढी' हिरोईनच्या मागे असतो. ती मात्र शिवणकाम करणाऱ्या विधवा आईचा मुलगा अक्षयकुमार किंवा सुनील शेट्टी च्या प्रेमात असते. हिरोइनच्या बापाचे उद्योग सीमा टेक्सटाइल किंवा वर्मा/मल्होत्रा/खन्ना/कपूर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज याच्या पलीकडे नसतात. अगदीच हटके म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट का बिजनेस. असो लिहावं तेवढं कमी. आपण काही डॉक्युमेंट्री बघायला थेटरमध्ये नाही जात. एन्जॉय करायला जायचं. (पण प्रेम अगन? Urgghh!)

एका पात्राच्या तोंडातून शब्द घरंगळायचे बंद झाले की लगेच पुढचे पात्र घडाघडा शब्द ओकून मोकळे होते..! त्या ओकण्यामध्येही एक घाई आहे. एक धडपड आहे. एक नवखा बथ्थडपणा आहे..भकासपणा आहे.. रंग-उडालेपणा आहे. म्हणजे डायलॉग आठवून आठवून म्हणणे हा एक भाग झाला..‌ पण सोबतच ह्यात एक दुर्मिळ प्रकारचे कुंथणेही आहे..!! सूरज-सपना आणि विशालभैय्या ह्यांच्या संवादफेकीत तर कुंथण्याची अक्षरशः चढाओढच आहे.
अशक्य हसलोय पूर्ण लेख वाचून. धन्यवाद.

आणि त्याची चिरफाडही अशक्य आहे. रेडिओ वर याची जाहिरात नेहमी असायची ती ऐकून मला याचे नाव "प्रेम अ गन" असे आहे असे बरेच दिवस वाटायचे. पैजारबुवा,

चलत मुसाफिर 19/12/2021 - 20:16
या सिनेमाचे बरेच शुटिंग पुण्याच्या एनडीएमधे झाले होते. सुदान ब्लॉकची भव्य इमारत सहज ओळखू येते (पण सिनेमात हे उडाणटप्पू मुलामुलींचे कॉलेज असे दाखवले आहे)

मस्तक चरणी / ठेवितसे //
मधला कंसातला भाग सोडला तर बाकी लेख भन्नाट झालाय. लेखासाठी नाही पण प्रेम अगन बघितल्याबद्दल तुम्हाला (अनुपमपापांच्या) हेलिकॉप्टरमधून (हरिहरेश्वरच्या) समुद्राची सैर घडवण्याचं मी जाहीर वाचन देतो. असो. भारतीय चित्रपटसृष्टीत पोलीस आणि सैन्य (इन्क्लुडिंग वायू आणि नौसेना) दलातील अधिकारी पदांविषयी प्रचंड अज्ञान आहे. आपल्या पीच्चरांमध्ये आर्मीतील मोठा अधिकारी कॅप्टन असतो. मेजर म्हणजे उच्चाधिकाराची परिसीमा. त्यामुळे पन्नाशीचा राज बब्बर कॅप्टन आणि निवृत्तीतून माघारी आलेला बच्चन मेजर असतो. बिनलग्नाचा तरुण एसीपी पहिल्यांदा सरफरोष मध्ये दिसला होता. त्याआधी ढेरपोटे साठीचे म्हातारे एसीपी आणि डीवायएसपी (हा एक लोकप्रिय अधिकारी असतो हिंदी पिक्चर मध्ये. दुसरा फेवरेट अधिकारी आयजी) असत. त्याशिवाय कॅप्टन आणि मेजरला अनिर्बंध अधिकार असतात. खडकवासल्याच्या एनडीएचा सर्वेसर्वा साठीचा मेजर असतो जो कॅडेट्सला बंड करायला लावतो. त्याशिवाय सैन्याचे लोक सदा सर्वकाळ गणवेशात असतात. (पण एकचाही क्रू-कट नसतो. अगदी बॉर्डर या बऱ्यापैकी बऱ्या चित्रपटातसुद्धा अक्षय खन्ना आणि सुनील शेट्टी जुल्फे घेऊन हिंडतात. मुख्य हिरोने सैन्याच्या भूमिकेसाठी क्रू-कट केल्याचं पहिलं उदाहरण कदाचित लक्ष्य असेल.) आणि दिसेल त्याला कडक सॅल्युट मारतात. तसेच इतर सामान्य जनता त्यांना उगाच सॅल्युट मारत असते. ते बुलेट आणि उघडी जीप (महिंद्रा कमांडर) शिवाय इतर वाहने त्याज्य मानतात. माहेरच्या साडीतला कॅप्टन रमेश भाटकर नेहमी कडक गणवेशात बुलेटवर घरी येतो. दुसरं अज्ञान असतं महाविद्यालयीन तरुणाई विषयी. दिल चाहता है (परत एकदा फरहान अख्तर) कदाचित पहिला पिक्चर असेल ज्यात मुंबईच्या उच्चभ्रू तरुणाईचं वास्तव चित्रण आहे. बाकी मग अस्वल कपूर बारावी पास (एन्सीसी नेव्ही कॅडेट) असतो, 'विदेश में पढी' हिरोईन अती तोकड्या कपड्यात मुंबईच्या कॉलेजात प्रवेश घेते. तिथे शिवणकाम करणाऱ्या विधवा आईचा मुलगा अक्षयकुमार किंवा सुनील शेट्टी फर्स्ट क्लास फर्स्ट पास होतात. व्हीलन असलेला अमीर बाप का बिगडा मुलगा त्याच कॉलेजात असतो. तो अर्थात तोकड्या कपड्यात फिरणाऱ्या 'विदेश में पढी' हिरोईनच्या मागे असतो. ती मात्र शिवणकाम करणाऱ्या विधवा आईचा मुलगा अक्षयकुमार किंवा सुनील शेट्टी च्या प्रेमात असते. हिरोइनच्या बापाचे उद्योग सीमा टेक्सटाइल किंवा वर्मा/मल्होत्रा/खन्ना/कपूर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज याच्या पलीकडे नसतात. अगदीच हटके म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट का बिजनेस. असो लिहावं तेवढं कमी. आपण काही डॉक्युमेंट्री बघायला थेटरमध्ये नाही जात. एन्जॉय करायला जायचं. (पण प्रेम अगन? Urgghh!)

एका पात्राच्या तोंडातून शब्द घरंगळायचे बंद झाले की लगेच पुढचे पात्र घडाघडा शब्द ओकून मोकळे होते..! त्या ओकण्यामध्येही एक घाई आहे. एक धडपड आहे. एक नवखा बथ्थडपणा आहे..भकासपणा आहे.. रंग-उडालेपणा आहे. म्हणजे डायलॉग आठवून आठवून म्हणणे हा एक भाग झाला..‌ पण सोबतच ह्यात एक दुर्मिळ प्रकारचे कुंथणेही आहे..!! सूरज-सपना आणि विशालभैय्या ह्यांच्या संवादफेकीत तर कुंथण्याची अक्षरशः चढाओढच आहे.
अशक्य हसलोय पूर्ण लेख वाचून. धन्यवाद.

आणि त्याची चिरफाडही अशक्य आहे. रेडिओ वर याची जाहिरात नेहमी असायची ती ऐकून मला याचे नाव "प्रेम अ गन" असे आहे असे बरेच दिवस वाटायचे. पैजारबुवा,

चलत मुसाफिर 19/12/2021 - 20:16
या सिनेमाचे बरेच शुटिंग पुण्याच्या एनडीएमधे झाले होते. सुदान ब्लॉकची भव्य इमारत सहज ओळखू येते (पण सिनेमात हे उडाणटप्पू मुलामुलींचे कॉलेज असे दाखवले आहे)
प्रेमअगन. इसवी सन १९९८. फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना. राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन. स्मिता जयकर- सूरजची आई. अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे. बीना बॅनर्जी- सपनाची आई. समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ). पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे..! विशालभैय्या आणि सपना रोज वेगवेगळ्या स्पोर्ट्सकारमधून कॉलेजला जातात. कारण अनुपमपापा अब्जाधीश आहेत. कॉलेजात एअरोबिक्सची ट्रेनर किरकोळ रजेवर असल्याने सपनावर ट्रेनिंगची जबाबदारी पडतेय..

स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका

Trump ·

गॉडजिला 08/10/2021 - 22:01
मस्त... शेवट जरा लांबला पणं परफेक्ट शेवट केला. ९०% स्टार्टप काय अनुभवातून जातात हे समजुन घ्यायचे असेल ते ही मिश्किलपने तर सिलिकॉन व्हॅली चांगली सुरुवात आहे...

श्रीगुरुजी 08/10/2021 - 23:28
Nerd म्हणजे स्वयंकेंद्री नाही. Nerd म्हणजे काहीसा बावळट, वर्गात पहिल्या बाकावर बसून घोकंपट्टी करणारा चष्मा लावणारा, इतरांमध्ये मिसळायला घाबरणारा असा अर्थ होतो. अवांतर - Revenge of the nerds या धमाल विनोदी चित्रपटाचे दोन्ही भाग पहा.

In reply to by श्रीगुरुजी

Trump 08/10/2021 - 23:43
Nerd म्हणजे काहीसा बावळट, वर्गात पहिल्या बाकावर बसून घोकंपट्टी करणारा चष्मा लावणारा, इतरांमध्ये मिसळायला घाबरणारा असा अर्थ होतो.
मराठी प्रतिशब्द द्या

In reply to by Trump

सुक्या 09/10/2021 - 00:27
अभ्यासु किडा. Nerd म्हणजे एखादा माणुस / मुलगा जो अभ्यासात खुप हुशार आहे, मेहेनती आहे परंतु त्याचबरोबर इतरांशी मिळुन मिसळुन वागता येत नाही असा.

In reply to by सुक्या

कॉमी 09/10/2021 - 07:28
NERD शब्द वरीलप्रमाणे वापरतात, पण हे केवळ अभ्यास किंवा पुस्तकांशीच संबंधित असते असे नाही. गेम, चित्रपट, मालिकांच्या एकनेक पात्र आणि घटनांबद्दल खडानखडा माहिती असणारी पोरं पोरी सुद्धा नर्डच.

In reply to by कॉमी

गॉडजिला 09/10/2021 - 14:24
लौकीक द्रुश्ट्या कमालिचे अल्पसंख्यांक पण तरीही एखाद्या विषयात अतीविषेश गती, प्राविण्य/प्रभुत्व व रमायची वृत्ती असणार्‍या व्यक्तींना वापरला जातो... it is justifiable if you say saints are spiritual nerds.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 09/10/2021 - 14:42
it is justifiable if you say saints are spiritual nerds.
हे विधान मी मागे घेतो कारण गुगलबाबा म्हणतात नर्ड शब्द दोन प्रकारे वापरला जातो noun १) a foolish or contemptible person who lacks social skills or is boringly studious. verb २) engage in or discuss a technical field obsessively or with great attention to detail. यामुळे माझ्या मते संताना स्पिरीचुअल नर्ड शब्द चपखलपणे लागु होउ शकत नाही.

कॉमी 09/10/2021 - 07:32
स्ट्रेंजर थिंग्स पाहायला नक्कीच सुखद आहे (अगदी ग्रेट वैगेरे नसले तरी.) लहान नर्ड्सच्या मैत्रीचे चित्रण मात्र छान घेतले आहे त्यात.

गॉडजिला 09/10/2021 - 12:31
हे आपण तेंव्हा अनुभवतो जेंव्हा एक अथवा एका पेक्षा जास्त व्यक्ती त्यांच्या आवडीच्या विषयावर चर्चा/विचार करत असताना सुचणार्‍या /माहित पडणार्‍या नवनवीन मुद्देसुद कल्पना जबरा मनोरंजन देतात. (Nerdgasm - a thrill of excitement felt in response to something relating to a subject in which a person has an obsessive interest. )

गॉडजिला 09/10/2021 - 12:37
सुंदर ट्रायल, कोर्टरुम ड्रामा आहे. सत्य घटनेवर आधारीत आहे. गुगलने गुगल अर्थ प्रोडक्ट कसे ढापले व त्यावरील कोर्ट केस हे कथानक जरी असले तर सीलीकॉन वॅली सिलीकॉन वॅली का आहे आणी इतर देशात ती का तयार होउ शकत नाही यावर अतिशय चांगला प्रकाश इथे टाकला आहे. थोडी तांत्रीक माहिती असेल तर कथानक जास्त रंजक बनते. कोर्टरुम ड्रामा देखील सुरेख.

गॉडजिला 08/10/2021 - 22:01
मस्त... शेवट जरा लांबला पणं परफेक्ट शेवट केला. ९०% स्टार्टप काय अनुभवातून जातात हे समजुन घ्यायचे असेल ते ही मिश्किलपने तर सिलिकॉन व्हॅली चांगली सुरुवात आहे...

श्रीगुरुजी 08/10/2021 - 23:28
Nerd म्हणजे स्वयंकेंद्री नाही. Nerd म्हणजे काहीसा बावळट, वर्गात पहिल्या बाकावर बसून घोकंपट्टी करणारा चष्मा लावणारा, इतरांमध्ये मिसळायला घाबरणारा असा अर्थ होतो. अवांतर - Revenge of the nerds या धमाल विनोदी चित्रपटाचे दोन्ही भाग पहा.

In reply to by श्रीगुरुजी

Trump 08/10/2021 - 23:43
Nerd म्हणजे काहीसा बावळट, वर्गात पहिल्या बाकावर बसून घोकंपट्टी करणारा चष्मा लावणारा, इतरांमध्ये मिसळायला घाबरणारा असा अर्थ होतो.
मराठी प्रतिशब्द द्या

In reply to by Trump

सुक्या 09/10/2021 - 00:27
अभ्यासु किडा. Nerd म्हणजे एखादा माणुस / मुलगा जो अभ्यासात खुप हुशार आहे, मेहेनती आहे परंतु त्याचबरोबर इतरांशी मिळुन मिसळुन वागता येत नाही असा.

In reply to by सुक्या

कॉमी 09/10/2021 - 07:28
NERD शब्द वरीलप्रमाणे वापरतात, पण हे केवळ अभ्यास किंवा पुस्तकांशीच संबंधित असते असे नाही. गेम, चित्रपट, मालिकांच्या एकनेक पात्र आणि घटनांबद्दल खडानखडा माहिती असणारी पोरं पोरी सुद्धा नर्डच.

In reply to by कॉमी

गॉडजिला 09/10/2021 - 14:24
लौकीक द्रुश्ट्या कमालिचे अल्पसंख्यांक पण तरीही एखाद्या विषयात अतीविषेश गती, प्राविण्य/प्रभुत्व व रमायची वृत्ती असणार्‍या व्यक्तींना वापरला जातो... it is justifiable if you say saints are spiritual nerds.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 09/10/2021 - 14:42
it is justifiable if you say saints are spiritual nerds.
हे विधान मी मागे घेतो कारण गुगलबाबा म्हणतात नर्ड शब्द दोन प्रकारे वापरला जातो noun १) a foolish or contemptible person who lacks social skills or is boringly studious. verb २) engage in or discuss a technical field obsessively or with great attention to detail. यामुळे माझ्या मते संताना स्पिरीचुअल नर्ड शब्द चपखलपणे लागु होउ शकत नाही.

कॉमी 09/10/2021 - 07:32
स्ट्रेंजर थिंग्स पाहायला नक्कीच सुखद आहे (अगदी ग्रेट वैगेरे नसले तरी.) लहान नर्ड्सच्या मैत्रीचे चित्रण मात्र छान घेतले आहे त्यात.

गॉडजिला 09/10/2021 - 12:31
हे आपण तेंव्हा अनुभवतो जेंव्हा एक अथवा एका पेक्षा जास्त व्यक्ती त्यांच्या आवडीच्या विषयावर चर्चा/विचार करत असताना सुचणार्‍या /माहित पडणार्‍या नवनवीन मुद्देसुद कल्पना जबरा मनोरंजन देतात. (Nerdgasm - a thrill of excitement felt in response to something relating to a subject in which a person has an obsessive interest. )

गॉडजिला 09/10/2021 - 12:37
सुंदर ट्रायल, कोर्टरुम ड्रामा आहे. सत्य घटनेवर आधारीत आहे. गुगलने गुगल अर्थ प्रोडक्ट कसे ढापले व त्यावरील कोर्ट केस हे कथानक जरी असले तर सीलीकॉन वॅली सिलीकॉन वॅली का आहे आणी इतर देशात ती का तयार होउ शकत नाही यावर अतिशय चांगला प्रकाश इथे टाकला आहे. थोडी तांत्रीक माहिती असेल तर कथानक जास्त रंजक बनते. कोर्टरुम ड्रामा देखील सुरेख.
स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत. तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा. १. बिग बँग थियरी (BBT) सुरवातीला छान होती. नंतर पुढे जशी जशी पात्रे पुढे प्रेमात पडु लागली तशी, मजा कमी होत गेली.

बखरीतून निसटलेलं पान..

पाटिल ·

कासव 03/10/2021 - 23:50
त्या जागेची खूण आपल्या नकाशा वर साठवून ठेवणे. एकाध्या आला गेल्या बुरा वखता ला ती जागा लोभ पावेल. त्या इसमाचा काही संपर्क अंक पण मिळाला तर दुधात साखरच. आपले कर्तबगार पुण्य नगरीचे नागरिक बहुत दुवा देतील कळावे लोभ असावा

कासव 03/10/2021 - 23:50
त्या जागेची खूण आपल्या नकाशा वर साठवून ठेवणे. एकाध्या आला गेल्या बुरा वखता ला ती जागा लोभ पावेल. त्या इसमाचा काही संपर्क अंक पण मिळाला तर दुधात साखरच. आपले कर्तबगार पुण्य नगरीचे नागरिक बहुत दुवा देतील कळावे लोभ असावा

ऐसे बसणियाचे प्रसंग गतकाळी आम्हांवरी बहुत आले. ऐसिया बसण्याच्या समयी आम्हांस 'सावरकर' हे उपनाम लाभते. परंतु, ऐसे बुधले आणावयाच्या कष्टप्रद मोहीमेपासून ईश्वराने आम्हांस कायमच रक्षिले ह्याकारणे आम्ही ईश्वराचे सर्वस्वी आभारच मानतो. पाटील सरकारांसी विनंती असें की, तयांनी कायमच आपल्या बोरूस धारेवर धरोन ऐसे लेखन मिपावर उमटवावे. __/\__ सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

पाटिल 04/10/2021 - 19:52
'डोलकरां'स सावरणेंसाटी कवण्या येकाने 'सावरकर' होणें बहुत जरूरी असें. बैठकीची ती ही बाजू कवणीतरीं सांभाळिली पाहिजें‌. नाही तों समस्त 'डोलकर' मंडळी बेहोष होवोनिया कवण्या थरास जाऊन कैसा उत्पात घडवितील, हे ज्ञान तैशा प्रसंगातून निभावलेल्यांसच ठावें..! :-)) _/\_

चौथा कोनाडा 04/10/2021 - 18:01
लै बाहरी

😀

चित्र तंतोतंत डोळियापुढे उभे राहिले असें

🍷

लेखनास चियर्स म्हंणणे मनास कृतघ्नता वाटें

पाटिल 04/10/2021 - 19:33
समस्तांची पोच पावलीं असें. कवतुकाचे बोल ऐकोन फुर्ती येणें, हा तों मनुष्य स्वभाव..! पाटीलही मनुष्यच असलें कारणें त्यांसही खुसी जाली..! :-)) ही कीर्त म-हाटी भासेची..! आपुली म-हाटी बोली ऐशी आबरूदार असें, ऐशी डौलदार असें, ऐशी रगदार असें, ऐशी गोमटी आसें, ऐशी साजिरीं आसें आणि शब्दकळेच्या बहुविधतेची ऐसी मालकीण असें ही मरहट्टी भासा, कीं जो कवणें ल्हिवू बोलूं ऐको लागावें तो तयाचें रोखें आपसूकच बळ यावें, ह्यांत कैसे आच्छेर्य..! :-)) _/\_

शेखरमोघे 05/10/2021 - 02:44
खाशियान्ची पुण्याई जबर - फत्ते करूनच स्वार्‍या परतल्या. प्रसन्ग बान्का, वर्णनही तितकेच बैजवार. मोहीमेवर आयत्या वेळी निघून फत्ते करून गनीम (म्हणजेच "सवता काही न करता फक्त कोकलणारे") जास्त जोर करणे आधीच स्वार परतही फिरले. वा, वा!! वापसी नन्तरची खबर देखील थरारारकच असणार. येऊ दे लौकर.

बाजीगर 07/10/2021 - 15:43
वाचोनी मोठाच संतोष जाला. की आपण बवखत जावोनि ठाओठाई नाकार जालियावरी हे काज फतेह करोनि आलात. चैतन्यद्रव्य आंग्ल मुलूखातले आणिले ही खासाच थोर बात जाहली. टाकोटाक पुढली बखर लिहिनेस घेणे. क्षेम.

ही अशी कित्येक पाने हरवलेली असतिल, ती शोधुन पुन्हा उजेडात आणणे हे मोठे पुण्याचेच काम म्हणावे लागेल, अजून अशी काही पाने सापडली तर वाचायला द्या. पैजारबुवा,

कासव 03/10/2021 - 23:50
त्या जागेची खूण आपल्या नकाशा वर साठवून ठेवणे. एकाध्या आला गेल्या बुरा वखता ला ती जागा लोभ पावेल. त्या इसमाचा काही संपर्क अंक पण मिळाला तर दुधात साखरच. आपले कर्तबगार पुण्य नगरीचे नागरिक बहुत दुवा देतील कळावे लोभ असावा

कासव 03/10/2021 - 23:50
त्या जागेची खूण आपल्या नकाशा वर साठवून ठेवणे. एकाध्या आला गेल्या बुरा वखता ला ती जागा लोभ पावेल. त्या इसमाचा काही संपर्क अंक पण मिळाला तर दुधात साखरच. आपले कर्तबगार पुण्य नगरीचे नागरिक बहुत दुवा देतील कळावे लोभ असावा

ऐसे बसणियाचे प्रसंग गतकाळी आम्हांवरी बहुत आले. ऐसिया बसण्याच्या समयी आम्हांस 'सावरकर' हे उपनाम लाभते. परंतु, ऐसे बुधले आणावयाच्या कष्टप्रद मोहीमेपासून ईश्वराने आम्हांस कायमच रक्षिले ह्याकारणे आम्ही ईश्वराचे सर्वस्वी आभारच मानतो. पाटील सरकारांसी विनंती असें की, तयांनी कायमच आपल्या बोरूस धारेवर धरोन ऐसे लेखन मिपावर उमटवावे. __/\__ सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

पाटिल 04/10/2021 - 19:52
'डोलकरां'स सावरणेंसाटी कवण्या येकाने 'सावरकर' होणें बहुत जरूरी असें. बैठकीची ती ही बाजू कवणीतरीं सांभाळिली पाहिजें‌. नाही तों समस्त 'डोलकर' मंडळी बेहोष होवोनिया कवण्या थरास जाऊन कैसा उत्पात घडवितील, हे ज्ञान तैशा प्रसंगातून निभावलेल्यांसच ठावें..! :-)) _/\_

चौथा कोनाडा 04/10/2021 - 18:01
लै बाहरी

😀

चित्र तंतोतंत डोळियापुढे उभे राहिले असें

🍷

लेखनास चियर्स म्हंणणे मनास कृतघ्नता वाटें

पाटिल 04/10/2021 - 19:33
समस्तांची पोच पावलीं असें. कवतुकाचे बोल ऐकोन फुर्ती येणें, हा तों मनुष्य स्वभाव..! पाटीलही मनुष्यच असलें कारणें त्यांसही खुसी जाली..! :-)) ही कीर्त म-हाटी भासेची..! आपुली म-हाटी बोली ऐशी आबरूदार असें, ऐशी डौलदार असें, ऐशी रगदार असें, ऐशी गोमटी आसें, ऐशी साजिरीं आसें आणि शब्दकळेच्या बहुविधतेची ऐसी मालकीण असें ही मरहट्टी भासा, कीं जो कवणें ल्हिवू बोलूं ऐको लागावें तो तयाचें रोखें आपसूकच बळ यावें, ह्यांत कैसे आच्छेर्य..! :-)) _/\_

शेखरमोघे 05/10/2021 - 02:44
खाशियान्ची पुण्याई जबर - फत्ते करूनच स्वार्‍या परतल्या. प्रसन्ग बान्का, वर्णनही तितकेच बैजवार. मोहीमेवर आयत्या वेळी निघून फत्ते करून गनीम (म्हणजेच "सवता काही न करता फक्त कोकलणारे") जास्त जोर करणे आधीच स्वार परतही फिरले. वा, वा!! वापसी नन्तरची खबर देखील थरारारकच असणार. येऊ दे लौकर.

बाजीगर 07/10/2021 - 15:43
वाचोनी मोठाच संतोष जाला. की आपण बवखत जावोनि ठाओठाई नाकार जालियावरी हे काज फतेह करोनि आलात. चैतन्यद्रव्य आंग्ल मुलूखातले आणिले ही खासाच थोर बात जाहली. टाकोटाक पुढली बखर लिहिनेस घेणे. क्षेम.

ही अशी कित्येक पाने हरवलेली असतिल, ती शोधुन पुन्हा उजेडात आणणे हे मोठे पुण्याचेच काम म्हणावे लागेल, अजून अशी काही पाने सापडली तर वाचायला द्या. पैजारबुवा,
(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे..