मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.

सरनौबत ·

वामन देशमुख 13/01/2024 - 16:34
एकाकी बिंदूने सजलेला हा अभ्यासपूर्ण लेख, विरामचिन्हांच्या सीमा ओलांडून बौद्धिक शोधाचा लेखपट बनतो. तो आपल्याला शैक्षणिक संवादाच्या मूलतत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे करतो. एक बिंदू खरोखर हजार शब्दांपेक्षा शक्तिशाली असू शकतो असा आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो. म्हणून, प्रिय वाचकहो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला विद्वान साहित्याच्या विशाल विस्तारामध्ये असाच एखादा एकाकी बिंदू आढळेल तेव्हा तो केवळ विरामचिन्ह म्हणून नाकारू नका. त्याऐवजी, त्यामागे लपलेल्या गहन रहस्यांच्या शोधासाठी कालातीत प्रवास सुरू करा.

सरनौबत 14/01/2024 - 11:51
अनेक महिन्यांनी मिपावर लेख डकवताना काहीतरी गडबड झाली आणि नुसते टिम्ब पडले. मात्र ह्या वरील प्रतिक्रिया वाचताना हसून हसून पुरेवाट झाली आणि गेला बाजार परत एकदा मिपाकरांचे सखोल ज्ञान समजले. अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥ प्रमाणे अणूरेणूच्या लेखावर आकाशाएवढ्या प्रतिक्रिया केवळ मिपाकर देऊ जाणे

In reply to by मुक्त विहारि

सरनौबत 14/01/2024 - 13:08
मुक्त विहारी: भोगी आणि संक्रात आहे त्यामुळे हे दोन टिम्ब मी तीळगुळातले तीळ ह्या अर्थी स्वीकारतो

In reply to by सरनौबत

इकडून तिकडून, आपण टिंबच असतो... बॉस पुढे पण, टिंबच.. आणि घरी पण टिंबच... आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, "पुरुषांचा प्रवास हा, टिंबा पासून टिंबा कडे.. आणि जाता जाता प्रवासात, भेटतील तितकी टिंबे गोळा करत जायची आणि वेळ प्रसंगी देत रहायची..."

नठ्यारा 20/01/2024 - 02:33
मी वर टाकलेला प्रतिसाद https://www.misalpav.com/comment/1174232#comment-1174232 व विषय पूर्णपणे कोरे आहेत. कोणास काही दिसले का त्यात? -ना.न.

वामन देशमुख 13/01/2024 - 16:34
एकाकी बिंदूने सजलेला हा अभ्यासपूर्ण लेख, विरामचिन्हांच्या सीमा ओलांडून बौद्धिक शोधाचा लेखपट बनतो. तो आपल्याला शैक्षणिक संवादाच्या मूलतत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे करतो. एक बिंदू खरोखर हजार शब्दांपेक्षा शक्तिशाली असू शकतो असा आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो. म्हणून, प्रिय वाचकहो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला विद्वान साहित्याच्या विशाल विस्तारामध्ये असाच एखादा एकाकी बिंदू आढळेल तेव्हा तो केवळ विरामचिन्ह म्हणून नाकारू नका. त्याऐवजी, त्यामागे लपलेल्या गहन रहस्यांच्या शोधासाठी कालातीत प्रवास सुरू करा.

सरनौबत 14/01/2024 - 11:51
अनेक महिन्यांनी मिपावर लेख डकवताना काहीतरी गडबड झाली आणि नुसते टिम्ब पडले. मात्र ह्या वरील प्रतिक्रिया वाचताना हसून हसून पुरेवाट झाली आणि गेला बाजार परत एकदा मिपाकरांचे सखोल ज्ञान समजले. अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥ प्रमाणे अणूरेणूच्या लेखावर आकाशाएवढ्या प्रतिक्रिया केवळ मिपाकर देऊ जाणे

In reply to by मुक्त विहारि

सरनौबत 14/01/2024 - 13:08
मुक्त विहारी: भोगी आणि संक्रात आहे त्यामुळे हे दोन टिम्ब मी तीळगुळातले तीळ ह्या अर्थी स्वीकारतो

In reply to by सरनौबत

इकडून तिकडून, आपण टिंबच असतो... बॉस पुढे पण, टिंबच.. आणि घरी पण टिंबच... आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, "पुरुषांचा प्रवास हा, टिंबा पासून टिंबा कडे.. आणि जाता जाता प्रवासात, भेटतील तितकी टिंबे गोळा करत जायची आणि वेळ प्रसंगी देत रहायची..."

नठ्यारा 20/01/2024 - 02:33
मी वर टाकलेला प्रतिसाद https://www.misalpav.com/comment/1174232#comment-1174232 व विषय पूर्णपणे कोरे आहेत. कोणास काही दिसले का त्यात? -ना.न.
लेखनविषय:
लेखनप्रकार
.

पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

विवेकपटाईत ·

रामचंद्र 07/11/2023 - 15:27
या बाबतीत मुस्लिम समाजाचे कौतुक करावेसे वाटते. फारशा सरकारी नोकऱ्या नाहीत. शिक्षण असतेच असेही नाही. पण रडत न बसता अंगमेहनत-छोटामोठा हंगामी का असेना स्वयंरोजगार करत या समाजातले तरुण आनंदात राहतात. एकमेकांना धरून राहणे आणि परिस्थितीशी शक्य तेवढे जमवून घेणे यामुळे बहुतेकदा ते तगून जातात. शिवाय वृद्ध व्यक्तींना घरातच कसे का होईना सांभाळले जाते, वृद्धाश्रमाची वाट दाखवली जात नाही. आणि आत्महत्या किंवा मानसिक रुग्ण यांचे प्रमाणही फारसे दिसत नाही. यातून इतरांनाही काही घेण्यासारखे नक्कीच आहे.

In reply to by रामचंद्र

अहिरावण 08/11/2023 - 19:08
सहमत आहे. कौटुंबिक एकोपा खूप असतो. वृद्धांना हाडहूड करण्याचे, डस्टबीन समजण्याचे, लाथ मारुन हाकलून देण्याचे प्रमाण हिंदू (विशेषतः ब्राह्मण) समाजापेक्षा खुप कमी आहे.

In reply to by अहिरावण

मी गेली, २०-२२ वर्षे, ह्या ना त्या नात्याने, वृद्धाश्रम आधारीत काम करत आहे... त्यामुळे, तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही.. आणि वृद्ध माणसांना जातपात किंवा धर्म नसतो... ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात...

In reply to by मुक्त विहारि

अहिरावण 09/11/2023 - 10:47
असहमतीबद्दल सहमती. गेल्या चाळीस वर्षांमधे आजुबाजूच्या पन्नास एक (त्यातील तीस एक ब्राह्मण) कुटुंबातील वृद्धांची वाताहात, विशेषतः आयटीमधे कामाला असलेल्या मुलामुलींनी केलेली आहे ती अगदी जवळून पाहिली आहे. अनेक जण वृद्धाश्रमात निधन पावल्यावर त्यांच्या त्याच गावात रहाणा-या मुलामुलींनी स्मशानात आम्ही नेणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा आमचा संबंध नाही अशी भुमिका घेतल्यावर समविचारी मित्रांच्या सहाय्याने त्यांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. >>>तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही.. तशीच काही अडचण केवळ २०-३० टक्के वृध्दांच्या बाबत असते. बाकी अडगड झालेले आहेत. >>ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात... हे मात्र अगदी खरे...

In reply to by अहिरावण

रामचंद्र 09/11/2023 - 02:56
चाळीसेक वर्षांपूर्वीपर्यंतच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण समाजात जेवढी तडजोडीची-जमवून घेण्याची वृत्ती होती, ती आता कमी झालेली दिसते. याला आर्थिक परिस्थितीत झालेली सुधारणा हे कारण वाटते. मात्र बऱ्यापैकी उच्चशिक्षित आणि सुस्थितीत असलेल्या बहुजनसमाजात ब्राह्मणांचा हा दुर्गुण सुदैवाने अजूनतरी तितकासा दिसून येत नाही. त्यांचाही शेतीचा आधार फारसा राहिला नाही. बहुतेकजण नोकरीपेशातच स्थिरावले आहेत. पण माणसं धरून ठेवण्याकडेच त्यांचा एकंदरीत कल दिसतो.

विजुभाऊ 07/11/2023 - 16:06
सरकारी नोकरी हा एक मोठा छलावा आहे. त्यातूनही युपीएस्सी ची परिक्षा ही उगाचच घरातल्याना आशा लावण्यासाठी ठेवली असावी असेच वाटते. सी ए पार्ट २ ही परीक्षा देखील अशीच. पार्ट १ बरेचजण क्लीअर करतात. आणि मग वर्षानुवर्षे पार्ट २ करत बसतात. निदान ते काही क्लेरीकल काम तरी करत असतात. कामाची लाज वाटणे या बरोबरच घरातल्यानी सहन करणे हे सर्वात मोठे कारण असते असल्या कर्मदरिद्री वागण्याचे. ( शब्द वाईट आहे .............पण वस्तुस्थिती आहे ही)

स्वधर्म 09/11/2023 - 19:26
या लेखाच्या शिर्षकात आरक्षण आहे, पण मजकूराशी त्याचा संबंध समजला नाही.

In reply to by स्वधर्म

सर टोबी 09/11/2023 - 22:17
सदर धागालेखकांच्या लेखांमध्ये मोदींची स्तुती अथवा मागील सरकारांवरील टिका अथवा दोन्ही गोष्टी कोणत्याही संदर्भाशिवाय येऊ शकतात.

In reply to by सर टोबी

सुबोध खरे 13/11/2023 - 09:41
आपला कोणताही प्रतिसाद श्री मोदींबद्दल गरळ टाकल्याशिवाय आला आहे का? इतका मोदीद्वेष बरा नव्हे प्रकृतीला. काळजी घ्या

रामचंद्र 07/11/2023 - 15:27
या बाबतीत मुस्लिम समाजाचे कौतुक करावेसे वाटते. फारशा सरकारी नोकऱ्या नाहीत. शिक्षण असतेच असेही नाही. पण रडत न बसता अंगमेहनत-छोटामोठा हंगामी का असेना स्वयंरोजगार करत या समाजातले तरुण आनंदात राहतात. एकमेकांना धरून राहणे आणि परिस्थितीशी शक्य तेवढे जमवून घेणे यामुळे बहुतेकदा ते तगून जातात. शिवाय वृद्ध व्यक्तींना घरातच कसे का होईना सांभाळले जाते, वृद्धाश्रमाची वाट दाखवली जात नाही. आणि आत्महत्या किंवा मानसिक रुग्ण यांचे प्रमाणही फारसे दिसत नाही. यातून इतरांनाही काही घेण्यासारखे नक्कीच आहे.

In reply to by रामचंद्र

अहिरावण 08/11/2023 - 19:08
सहमत आहे. कौटुंबिक एकोपा खूप असतो. वृद्धांना हाडहूड करण्याचे, डस्टबीन समजण्याचे, लाथ मारुन हाकलून देण्याचे प्रमाण हिंदू (विशेषतः ब्राह्मण) समाजापेक्षा खुप कमी आहे.

In reply to by अहिरावण

मी गेली, २०-२२ वर्षे, ह्या ना त्या नात्याने, वृद्धाश्रम आधारीत काम करत आहे... त्यामुळे, तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही.. आणि वृद्ध माणसांना जातपात किंवा धर्म नसतो... ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात...

In reply to by मुक्त विहारि

अहिरावण 09/11/2023 - 10:47
असहमतीबद्दल सहमती. गेल्या चाळीस वर्षांमधे आजुबाजूच्या पन्नास एक (त्यातील तीस एक ब्राह्मण) कुटुंबातील वृद्धांची वाताहात, विशेषतः आयटीमधे कामाला असलेल्या मुलामुलींनी केलेली आहे ती अगदी जवळून पाहिली आहे. अनेक जण वृद्धाश्रमात निधन पावल्यावर त्यांच्या त्याच गावात रहाणा-या मुलामुलींनी स्मशानात आम्ही नेणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा आमचा संबंध नाही अशी भुमिका घेतल्यावर समविचारी मित्रांच्या सहाय्याने त्यांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. >>>तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही.. तशीच काही अडचण केवळ २०-३० टक्के वृध्दांच्या बाबत असते. बाकी अडगड झालेले आहेत. >>ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात... हे मात्र अगदी खरे...

In reply to by अहिरावण

रामचंद्र 09/11/2023 - 02:56
चाळीसेक वर्षांपूर्वीपर्यंतच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण समाजात जेवढी तडजोडीची-जमवून घेण्याची वृत्ती होती, ती आता कमी झालेली दिसते. याला आर्थिक परिस्थितीत झालेली सुधारणा हे कारण वाटते. मात्र बऱ्यापैकी उच्चशिक्षित आणि सुस्थितीत असलेल्या बहुजनसमाजात ब्राह्मणांचा हा दुर्गुण सुदैवाने अजूनतरी तितकासा दिसून येत नाही. त्यांचाही शेतीचा आधार फारसा राहिला नाही. बहुतेकजण नोकरीपेशातच स्थिरावले आहेत. पण माणसं धरून ठेवण्याकडेच त्यांचा एकंदरीत कल दिसतो.

विजुभाऊ 07/11/2023 - 16:06
सरकारी नोकरी हा एक मोठा छलावा आहे. त्यातूनही युपीएस्सी ची परिक्षा ही उगाचच घरातल्याना आशा लावण्यासाठी ठेवली असावी असेच वाटते. सी ए पार्ट २ ही परीक्षा देखील अशीच. पार्ट १ बरेचजण क्लीअर करतात. आणि मग वर्षानुवर्षे पार्ट २ करत बसतात. निदान ते काही क्लेरीकल काम तरी करत असतात. कामाची लाज वाटणे या बरोबरच घरातल्यानी सहन करणे हे सर्वात मोठे कारण असते असल्या कर्मदरिद्री वागण्याचे. ( शब्द वाईट आहे .............पण वस्तुस्थिती आहे ही)

स्वधर्म 09/11/2023 - 19:26
या लेखाच्या शिर्षकात आरक्षण आहे, पण मजकूराशी त्याचा संबंध समजला नाही.

In reply to by स्वधर्म

सर टोबी 09/11/2023 - 22:17
सदर धागालेखकांच्या लेखांमध्ये मोदींची स्तुती अथवा मागील सरकारांवरील टिका अथवा दोन्ही गोष्टी कोणत्याही संदर्भाशिवाय येऊ शकतात.

In reply to by सर टोबी

सुबोध खरे 13/11/2023 - 09:41
आपला कोणताही प्रतिसाद श्री मोदींबद्दल गरळ टाकल्याशिवाय आला आहे का? इतका मोदीद्वेष बरा नव्हे प्रकृतीला. काळजी घ्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
(काही सत्य सत्य आणि काही काल्पनिक ) आठ- नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी जर सहा साडेसहा पर्यंत कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी चार्टर्ड बस घेत होतो. चार्टर्ड बस मध्ये सीटवर बसायला मिळत असे. त्या बसेस मध्ये जनकपुरी आणि उत्तम नगर जाणारे सरकारी कर्मचारी असायचे. जनकपुरी येथे राहणाऱ्या सुनील( टोपण नाव) नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याशी माझे चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्याने मला विचारले पटाईत, तुझा ओळखीचा एखादा चांगला मनोचिकित्सक आहे का. कारण विचारल्यावर त्याने मला सांगितले त्याचा 32 वर्षाचा लहान भाऊ डिप्रेशन मध्ये आहे, नौकरी सोडा, घरात ही काही काम करत नाही. दिवसभर शून्यात पाहत बसून राहतो.

वेलणकर चाफा

राजेंद्र मेहेंदळे ·

कंजूस 27/09/2023 - 14:47
नक्कीच फुलणार तुमचा चाफा. इकडे कल्याणला पाठारे नर्सरीत मिळतात ही रोपे. दोन /तीन/चार फुट वाढलेली रोपे १५०/२५०/३५० रु. फुले येतात. मी आणले नाही. बाल्कनीत (open terrace नाही.) वाढवणे जमणार नाही म्हणून. पाच सहा उंचीचे फुले असलेले पारिजातक मात्र उचलले. पण ते म्हणाले हे dwarf variety आहे ,किंमत दोनशे रु आहे. तुम्हाला तीसरुपयेवाले देतो. ते दीड फुट होते ते आणले. बाल्कनीत कट्ट्याजवळ टांगले. शेंडा भराभर बाहेर झुकून वाढला आणि त्यास भरपूर कळ्या,फुले येत आहेत. मजा. स्वस्त झाडे ट्राई करतो. Russellia नावाचे एक झाड तीस रुपयाला मिळाले. शेपूसारखी बारीक पाने येतात. मोठा शेंडा येतो त्यास असंख्य लाल फुले येतात. त्यातला मध प्यायला फुलचुकी पक्षी येतात. त्याची बारीक पाने मुनिया पक्षी काढतात घर बांधण्यासाठी. ----------- चाफ्याचे ( आणि पारिजातक)बी लावून येणाऱ्या झाडांना पंधरा वर्षांनी फुले येतात . हे लोक गुटी कलम करून रोपे बनवतात त्यास लगेच फुले येतात.

In reply to by कंजूस

धन्यवाद कंजूसकाका. आणि काय म्हणता? पाठारे नर्सरीत वेलणकर चाफा मिळतो? मग तिथुनच मागवला असता ना?( रच्याकने -त्यांचा मुलगा माझ्याच शाळेत १ वर्षे पुढे होता)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 27/09/2023 - 16:43
अगदी वेलणकर नसेल. पण चाफ्याची कलमे (गुटी कलमे ) खूप ठिकाणी केली जातात. मूळ झाड जेवढे फुलणारे असेल तसे कलमही होते. दापोली भागात ती पाहिली आहेत. श्रीवर्धनला जात असाल ट्रिपला तेव्हा विचारा. पाच वेगवेगळे रंगीत जाम (कलमे) मिळतील.

बागवान सारखं सुख नाही. चाफा फुलला की चित्र जरूर टाका. बादवे,जास्वंद हे बारमाही फुलणारे कमी मेन्टेनन्स वाले झाड. रिपाॅटिंग केले होते. गणेशचतुर्थीस पहिले फुल आले.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सोपा उपाय, एक लिटर पाणी ,दोन टेबलस्पून शाम्पू, दोन टेबलस्पून तेल व एक टेबलस्पून इनो . घोळ बनवा व फवारून बघा. मी वापरतो.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 27/09/2023 - 16:48
जास्वंद - चिकट बुरशी १)ऊन भरपूर मिळावे. २) पाणी मुळाशी तुंबत असेल तर पाहा. एवढ्यावर झाड निरोगी व्हायला हवे. ३) थंडीमध्ये जवळपासच्या पेरूच्या झाडांवरून ही बुरशी येते. धुके फार वाईट.

गवि 27/09/2023 - 21:55
धाग्याचे नाव वाचता "साठे फायकस" सारखा काही प्रकार असावा की काय असे वाटले. बाकी सोनचाफा आवडतो. सिग्नलवर छोटा गजरा/माळ विकायला पोरे आणतात तो कारमध्ये लावला की दोन तीन दिवस छान नैसर्गिक सुगंध दरवळतो. बाकी कवठी चाफा आणि अन्यही एक प्रकार (नाव विसरलो) यांचा सुगंध तर आणखी घमघमता विलक्षण असतो.

In reply to by गवि

विंजिनेर 28/09/2023 - 00:54
अन्यही एक प्रकार (नाव विसरलो)
हिरवा चाफा हो... वेड लावणारा सुगंध - वासाने साप झाडाशी असतात असं म्हणतात म्हणून जायचो नाही घाबरून

कंजूस 27/09/2023 - 14:47
नक्कीच फुलणार तुमचा चाफा. इकडे कल्याणला पाठारे नर्सरीत मिळतात ही रोपे. दोन /तीन/चार फुट वाढलेली रोपे १५०/२५०/३५० रु. फुले येतात. मी आणले नाही. बाल्कनीत (open terrace नाही.) वाढवणे जमणार नाही म्हणून. पाच सहा उंचीचे फुले असलेले पारिजातक मात्र उचलले. पण ते म्हणाले हे dwarf variety आहे ,किंमत दोनशे रु आहे. तुम्हाला तीसरुपयेवाले देतो. ते दीड फुट होते ते आणले. बाल्कनीत कट्ट्याजवळ टांगले. शेंडा भराभर बाहेर झुकून वाढला आणि त्यास भरपूर कळ्या,फुले येत आहेत. मजा. स्वस्त झाडे ट्राई करतो. Russellia नावाचे एक झाड तीस रुपयाला मिळाले. शेपूसारखी बारीक पाने येतात. मोठा शेंडा येतो त्यास असंख्य लाल फुले येतात. त्यातला मध प्यायला फुलचुकी पक्षी येतात. त्याची बारीक पाने मुनिया पक्षी काढतात घर बांधण्यासाठी. ----------- चाफ्याचे ( आणि पारिजातक)बी लावून येणाऱ्या झाडांना पंधरा वर्षांनी फुले येतात . हे लोक गुटी कलम करून रोपे बनवतात त्यास लगेच फुले येतात.

In reply to by कंजूस

धन्यवाद कंजूसकाका. आणि काय म्हणता? पाठारे नर्सरीत वेलणकर चाफा मिळतो? मग तिथुनच मागवला असता ना?( रच्याकने -त्यांचा मुलगा माझ्याच शाळेत १ वर्षे पुढे होता)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 27/09/2023 - 16:43
अगदी वेलणकर नसेल. पण चाफ्याची कलमे (गुटी कलमे ) खूप ठिकाणी केली जातात. मूळ झाड जेवढे फुलणारे असेल तसे कलमही होते. दापोली भागात ती पाहिली आहेत. श्रीवर्धनला जात असाल ट्रिपला तेव्हा विचारा. पाच वेगवेगळे रंगीत जाम (कलमे) मिळतील.

बागवान सारखं सुख नाही. चाफा फुलला की चित्र जरूर टाका. बादवे,जास्वंद हे बारमाही फुलणारे कमी मेन्टेनन्स वाले झाड. रिपाॅटिंग केले होते. गणेशचतुर्थीस पहिले फुल आले.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सोपा उपाय, एक लिटर पाणी ,दोन टेबलस्पून शाम्पू, दोन टेबलस्पून तेल व एक टेबलस्पून इनो . घोळ बनवा व फवारून बघा. मी वापरतो.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 27/09/2023 - 16:48
जास्वंद - चिकट बुरशी १)ऊन भरपूर मिळावे. २) पाणी मुळाशी तुंबत असेल तर पाहा. एवढ्यावर झाड निरोगी व्हायला हवे. ३) थंडीमध्ये जवळपासच्या पेरूच्या झाडांवरून ही बुरशी येते. धुके फार वाईट.

गवि 27/09/2023 - 21:55
धाग्याचे नाव वाचता "साठे फायकस" सारखा काही प्रकार असावा की काय असे वाटले. बाकी सोनचाफा आवडतो. सिग्नलवर छोटा गजरा/माळ विकायला पोरे आणतात तो कारमध्ये लावला की दोन तीन दिवस छान नैसर्गिक सुगंध दरवळतो. बाकी कवठी चाफा आणि अन्यही एक प्रकार (नाव विसरलो) यांचा सुगंध तर आणखी घमघमता विलक्षण असतो.

In reply to by गवि

विंजिनेर 28/09/2023 - 00:54
अन्यही एक प्रकार (नाव विसरलो)
हिरवा चाफा हो... वेड लावणारा सुगंध - वासाने साप झाडाशी असतात असं म्हणतात म्हणून जायचो नाही घाबरून
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी माझ्या अनेक आवडींपैकी एक म्हणजे बागकाम. त्यासाठी नेहमी वेळ मिळत नसला तरी सकाळचा चहा घेउन गॅलरीत झोपाळ्यावर बसणे आणि मेहनतीने लावलेल्या बागेतील झाडांची विचारपूस करणे ईतके तरी मी करतोच. कधीतरी विकांताला सगळी हत्यारे परजून कुठेतरी खुरपणे, खते देणे, दोर्‍या बांधुन वेल वर चढवणे , बांबूच्या कामट्या खुपसुन आधार देणे, कुंड्या बदलणे असे काहीतरी चालु असते. मग गॅलरी मातीने माखली की घरच्यांचा रोष होण्याच्या आत गॅलरी धुणे हेही त्यात आलेच. अर्थात माझे हात माखलेले असल्याने त्यातही मला मदतीला बायको लागतेच.

श्री गणेशोत्सव - अजुन काही ऐतिहासिक कविता

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त 21/09/2023 - 04:42
राष्ट्रभक्तीने भारून गेलेले तरूण, त्यांचे जाज्वल्य विचार, प्रत्यक्ष कृती आणि त्यांचे कवित्व. सगळेच अद्भुत. खालील शार्दूलविक्रीडितातले पद उत्तमच रचले गेले आहे.
हिंदुस्थान असे जनांत म्हणती लोकास ह्या सर्वही | येथे आंग्ल कसे स्वराज्य करिती जाणा महालाज ही नावाला विसरु नका, दृढ धरा देशाभिमाना मनी | ठोका दंड, उठा , भिडा सुयशया दुष्टाचिया कंदनी होते पुर्वज आमचे दृढ कसे झुंजावया कंदनी | गेले मेळवुनी यशास अपुल्या देशास ह्या रक्षुनी त्यांचे पोटी आम्ही कसे निपजलो भानूस जैसे शनी | नेले राज्य हरुनि अमुचे तरी लज्जा न वाटे मनी
देशभरातून अशा अगणित तरूणांची आहुती स्वातंत्र्ययज्ञात दिली गेली. आमच्या पिढीवर मात्र लहानपणी 'बिना खड्ग बिना ढाल'चेच महात्म्य ठसवले गेले.

चित्रगुप्त 21/09/2023 - 05:20
लेखाचे शेवटी दुव्यात दिलेले 'हुतात्मा दामोदर हरि चापेकर ह्यांचे आत्मवृत्त' हे मुळात मोडीत असलेले बाड 'बाळबोधी' मधे लिहून १९७४ साली प्रकाशित करण्यात आले. सुरूवातीची काही पाने आज वाचली. त्या काळाविषयी अतिशय रोचक माहिती यातून मिळते. दामोदर हरि दररोज १२०० (बाराशे) सूर्यनमस्कार घालणे आणि एका तासात ११ मैल दौडणे असा व्यायाम करीत असत. वडील 'हरि विनायक चापेकर' हे पूर्वी सोलापुरात कलेक्टर आफिसात आणि नंतर तार आफिसात चाकरी करत, परंतु नंतर चाकरी सोडून ते कीर्तनकार झाले. त्यांचे तिन्ही मुलगे कीर्तनात बाजाची पेटी, सारमंडळ आणि टाळ वाजवून साथ देत असत. त्यांनी जमवलेल्या हत्यारांची यादी/माहिती विस्मयजनक आहे. जिज्ञासूंनी अवश्य हा ग्रंथ वाचावा. .

Bhakti 21/09/2023 - 08:37
नाही होत स्वतंत्रता शिवकथा घोटुनी भाटापरी | घ्यावे लागतसे शिवाजी बाजीपरी हे मस्तक स्वहस्तावरी ||
करेक्ट हाच फरक आहे.शौर्याने तरुणांना प्रेरणा द्यायला हवी ना ... द्वेषभावनेने राष्ट्राला दुभंग पडतो.

चित्रगुप्त 21/09/2023 - 13:10
ऐतिहासिक कवितांच्या लेखमालेचा प्रारंभ उत्कृष्ट झालेला आहे. सांप्रतकाळी बहुतांशी विस्मरणात गेलेल्या साहित्याचा शोध घेऊन ते या ठिकाणी जिज्ञासू वाचकांस उपलब्ध करून देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे असे आम्हास वाटते. या निमित्ताने वाचकांचे ठायी कुतुहल निर्माण होवून ते जुन्या काळच्या क्रांतीकारी, संत, पंत, भक्त, विरक्त, ज्ञानी कवी-लेखकांच्या साहित्याचे परिशीलन करिण्यास उद्युक्त होतील, याविषयी आमचे मनात किमपि किंतु नाही, किंबहुना तसेच होईल याची आम्हास खातरी वाटत्ये आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. यापुढील लेखांचे शीर्षकात त्या त्या लेखनकर्त्याचे नाव दिल्यास भविष्यकाळी ते शोधण्यास सोपे पडेल असे वाटते. तसेच दरएक लेखामध्यी त्या लेखनकर्त्याचे आणि पुस्तकाचे चित्र, त्यासंबंधी उपलब्ध असलेली अन्य काही चित्रे-नकाशे, जालावरील साहित्याचे दुवे वगैरे दिल्यास लेखमाला आणखी रोचक, माहितीपूर्ण होईल. आगामी लेखनासाठी शुभेच्छा. . . . क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र) चापेकर बंधुंचे जन्म या वाड्यात झाले आणि बालपणही याच वाड्यात गेले. याच वाड्यात त्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने पाहिली, त्यासाठीची खलबतही येथेच पार पडली. त्यांच्या फ़ाशीनंतर दामोदर चापेक़रांच्या वीरपत्नी दुर्ग़ाबाई चापेकर, त्यांच्या अन्य दोन जावा व मुलांना सोबत घेऊन चिंचवड़ येथील या वाडयात राहिल्या.चिंचवड़ येथे राममंदिराच्या समोर हा वाडा आहे. चापेकर समितीने १९७२ मध्ये या वाड्याचा ताबा मिळवून वाड्याच्या विकासकामांना सुरूवात केली.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 21/09/2023 - 13:19
वाड्याविषयी मी पूर्वी येथे अल्पसे लिहिले होते आणि त्याची छायाचित्रे टाकली होती.

In reply to by स्वधर्म

हाच की तो गट क्र. १ आणि २ मधला फरक ! तुम्हाला तर माहीत आहे की सगळं. तुमच्या प्रतिसादावरून दिसत आहेच की तुम्हाला गट क्रं. २ च्या विचारसरणीची व्यवस्थित जाण आहे ते. उगाच कशाला मला विचारता की व्याख्या काय गटांची म्हणून ! आता पुढचा लेख मोरोपंतांच्या कवितांवर लिहिणार आहे, त्यावरही असेच काहीसे तुमच्या गटाचे प्रतिसाद असतीलच ते तयार ठेवा. अर्थात तयार नसतील तर तुम्ही लागलीच काय प्रतिसाद देणार ह्याची आम्हाला कल्पना आहे आधीच. आम्हाला हे टेम्प्लेट चांगलेच ठाउक आहे आता. हा हा हा.

अहिरावण 21/09/2023 - 19:50
देव, देश आणि धर्मासाठी लाख संकटे छातीवरती झेलून घेणारी माणसे !! त्या दिडशे वर्षांच्या गुलामीने अशी भली भली माणसे देशाला लाभली ज्यातील एकेका नररत्नांसाठी इतर देशांना शेकडो वर्षे वाट पाहावी लागली. इतकंच आणि एवढंच क्रेडीट ब्रिटीशांना... बाकी ब्रिटीश जमात जगातली एक नालायक जमात याविषयी कोणतीही शंका आमच्या मनात नाही.

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 21/09/2023 - 20:47
'गोरे' भारतात आलेच नसते, तर आजचा भारत कसा असता ? असा काथ्याकूट सुरु करावा असा विचार आहे. परंतु त्या आधी थोडा अभ्यासही आवश्यक आहे. बघूया केंव्हा जमते ते. हा काथ्याकूट आणखी कुणी सुरु केला तरी उत्तमच.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 22/09/2023 - 11:01
नाही मिळणार. ए आय उपलब्ध विदाच्या आधारे काम करते. पाश्चिमात्यांनी गेल्या १०० वर्षांत त्यांचे गोमटे रुप(च) जगासमोर दाखवले आहे.

In reply to by अहिरावण

अहिरावण 22/09/2023 - 11:11
जगासमोर म्हणजे इंटरनेटवर. कारण ए आय इंटरनेटवरुनच माहिती गोळा करते. आणि पाश्चिमात्यांनी विशेषतः अमेरिकन आणि इंग्रजांनी इंटरनेटवर प्रचंड हुकुमत ठेवलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 22/09/2023 - 11:00
जरुर करा. त्याआधी वसाहतवादाने केलेले जगाचे नुकसान तपासा, कदाचित फायदे नगण्य आणि नुकसान खुप असा लेखाजोखा यायचा.

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 21/09/2023 - 21:03
बाकी ब्रिटीश जमात जगातली एक नालायक जमात याविषयी कोणतीही शंका आमच्या मनात नाही.
-- हे ब्रिटिश राजकारणी लोकांबद्दल जरी खरे असले तरी अनेक ब्रिटिश चित्रकार, वास्तुकार, कवी, लेखक, तत्वज्ञ, संगीतज्ञ वगैरे वंदनीय आहेत. उदाहरणार्थ खालील चित्र बघा. जॉन कॉन्स्टेबल हा चित्रकार निगर्वी, प्रेमळ, सरळमार्गी, कलानिर्मितीत दंग असा विलक्षण चित्रकार होता, आणि असे हजारो-लाखो लोक प्रत्येक देशात असतात. . चित्रकारः John Constable (१८२१) तैलचित्र. (51+1⁄4 in × 73 in) Location:National Gallery, London

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 22/09/2023 - 10:59
मी ब्रिटीश जमात असा समुहवाचक उल्लेख केला आहे, ब्रिटीश व्यक्ती असा नाही. व्यक्तिगत द्वेषाचे काही कारणच नाही. पण जेव्हा ते एकत्रितरित्या राज्यकर्ते, आक्रमक म्हणून वावरतात तेव्हा नालायक असतात. हेच आणि असेच अमेरीकेला सुध्दा लागु. युरोपीयनांना सुद्धा लागु. पाश्चिमात्य लोक समुह म्हणून नालायक असतात. विशेषतः आशियाई (त्यात भारत जास्त) लोकांविरुद्ध एक आकस असतो त्यांच्या मनात.

In reply to by अहिरावण

पाश्चिमात्य लोक समुह म्हणून नालायक असतात अगदी ! हेच वर्णन तंतोतंत भारतीयांना देखील लागू होते. अवांतर किस्सा आणि शंका : वरील धागा आणि चर्चेशी संबंध नाही मुंबईत (साकीनाका ते घाटकोपर) भागात ब्रिटीशांनी एक पाईपलाईन बांधली होती. ती साधारण १००-१५० वर्षे तरी जुनी असावी. ती एके वर्षी एका ठिकाणी काही कारणास्तव फुटली. ती मुंबई महानगर पालिकेने दुरुस्त केली. तीच पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर साधारण ४-५ वर्षे त्याच जागेवर सतत फुटायची. ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक इमारती, पुल पुणे-मुंबईत अजुनही दिमाखात उभ्या आहेत मात्र आता बांधलेल्या इमारतींना, पुलांना तेवढे आयुष्य नसते. काय कारण असावे ? तंत्रज्ञान म्हणावे तर मागच्या काळापेक्षा प्रगत झालेय, नवे नवे शोध लागताहेत पन कोणत्याच कामाची २०-२५ वर्षांची खात्री देता येत नाही. नक्की काय कारण असावे ?

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 22/09/2023 - 18:59
>>>अगदी ! हेच वर्णन तंतोतंत भारतीयांना देखील लागू होते. असु शकेल. पण भारतीय समुह म्हणून इतर देशांवर, समाजावर आम्ही तुमचे भले करतो म्हणून आक्रमण करत नाहीत. तुम्ही आमचा धर्म स्विकाराच म्हणून हातात पुस्तक देत नाही की मानेला तलवार लावत नाही. वसाहतवाद, गुलामी लादत नाहीत. त्यांना जी काही कृत्ये करायची असतात ती आपल्या देशात करतात. फरक कळावा. >>>ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक इमारती, पुल पुणे-मुंबईत अजुनही दिमाखात उभ्या आहेत मात्र आता बांधलेल्या इमारतींना, पुलांना तेवढे आयुष्य नसते. जुन्या पद्धतीचे बांधकाम आठवण म्हणून राहू द्यावे या विचाराने त्यांचे जतन होत असते. >>>काय कारण असावे ? तंत्रज्ञान म्हणावे तर मागच्या काळापेक्षा प्रगत झालेय, नवे नवे शोध लागताहेत पन कोणत्याच कामाची २०-२५ वर्षांची खात्री देता येत नाही. नक्की काय कारण असावे ? आपणच केलेले बांधकाम २०-२५ वर्षांनी गरज आणि आवश्यकता बदलल्याने पुन्हा बांधकाम केले जाते. आपण रहातो त्या सोसायट्या, घरे सुद्धा रीडेवलपमेंट करतो. पणजोबांच्या काळातले वाडे पाडून फ्लॅट बांधतो. मात्र तेच गेल्या शतकातील थोर मनुष्यांची निवासस्थाने आपण जतन करतो.

In reply to by अहिरावण

पण भारतीय समुह म्हणून इतर देशांवर, समाजावर आम्ही तुमचे भले करतो म्हणून आक्रमण करत नाहीत. कदाचित भारतीयांत तेवढी ताकद नसावी अशी शक्यता असू शकते काय ?
आपण रहातो त्या सोसायट्या, घरे सुद्धा रीडेवलपमेंट करतो. पणजोबांच्या काळातले वाडे पाडून फ्लॅट बांधतो.
पाडून परत बांधणे आणि आपोआप १०-१५ वर्षात मोडकळीस येणे यात गल्लत होत असावी बहुतेक. सा. बा. विभागांनी केलेल्या बांधकामांबद्दल विशेषत्वाने. असो. जाऊ द्या.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 22/09/2023 - 19:26
>>कदाचित भारतीयांत तेवढी ताकद नसावी अशी शक्यता असू शकते काय ? अशी दुस-यावर आक्रमणे करण्याची ताकद असायला हवी हा आदर्श मानणे हे योग्य आहे का? >>सा. बा. विभागांनी केलेल्या बांधकामांबद्दल विशेषत्वाने. विषय गहन आहे. पहीले तो दगड फेकेल ज्याने आयुष्यात पाप केले नाही. - जॉन ८:७-११ (राजा जेम्स प्रत) जाऊ द्या तर जाऊ द्या.

In reply to by अहिरावण

अशी दुस-यावर आक्रमणे करण्याची ताकद असायला हवी हा आदर्श मानणे हे योग्य आहे का?
मुळीच नाही पण सामर्थ्यवंताने समोरच्याला अपराधासाठी क्षमा करणे आणि दुर्बलाने समोरच्या अपराध्याचे काही वाकडे करु शकत नाही म्हणून निमूट गप्प बसणे यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक भारतीय समूह आणि पाश्चात्य समूह यांच्या ताकदीत असावा असे प्रथमदर्शनी वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 22/09/2023 - 19:48
इतिहास जेत्यांनी (पाश्चिमात्यांनी) लिहिलेला आहे. त्यांचे जयाचे गुणगान आणि पराजय लपवणे हे ते करणारच. शे दोनशे वर्षांत अरबस्तानातील वावटल अख्खा युरोप कवेत घेते. तुर्क, मंगोल अख्या जगावर शंभर वर्षांत अधिराज्य गाजवतात. हजार वर्षे लोटून सुद्धा अख्खा हिंदूस्तान अहिंदू झाला नाही. हे हिंदूंनी टक्कर दिली म्हणूनच झाले. ताकद होती. दिडशे वर्षांच्या आंग्लांच्या, आधीच्या इतर युरोपीय आक्रमकांपुढे सुद्धा आपण हिंदू म्हणूनच शिल्लक राहीलो. ताकद होती म्हणून शिल्लक राहीलो. मराठे आणि इंग्रज लढाईत दोघांची ताकद समान होती, फक्त नियतीचे दान त्यांना पडले. (आंग्ल समर्थक कितीही मातीचे भांडे, पितळी भांडे वगैरे "खरे" खोटे आलाप काढो). पाच हजार वर्षापेक्षा जास्त काळ टिकलेली आणी अजुनही कित्येक शतके टिकून रहाण्याची शक्यता असलेली संस्कृती ही शस्त्राने नव्हे तर वृत्तीने निर्माण होते. अर्थात हे आमचे म्हणणे आहे. फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

In reply to by अहिरावण

अर्थात हे आमचे म्हणणे आहे. फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.
तुमचे सगळेच म्हणणे नाकारण्यासारखे आहे असे आमचे देखील म्हणणे नाही :) आवश्यक तिथे गांभीर्य / सहमती दाखवायला / माफी मागायला मला कोणताही अभिनिवेश आडवा येत नाही. थोडे शब्द बदल करुन म्हणणे मांडतो.
दिडशे वर्षांच्या आंग्लांच्या, आधीच्या इतर युरोपीय आक्रमकांपुढे सुद्धा आपण हिंदू म्हणूनच शिल्लक राहीलो. ताकद होती म्हणून शिल्लक राहीलो.
एक आक्रमक वृत्ती असते जी आंग्ल, युरोपिय, तुर्क, मंगोलांमधे आहे. भारतीयांमधे बचावात्मक वृत्ती आहे. आपले आहे ते संरक्षण करणे ह्यात त्यांनी ताकद खर्च केली पण धर्म वाढावा म्हणून विशेष प्रयत्न करणे हिंदू / सनातनी (जे काही म्हणायचे ते म्हणावे) यांना जमत नाही. धर्म वाढवण्यासाठी बळाचा वापर करणे योग्य नाही हे मला देखील मान्य आहे मात्र किरिस्तावांप्रमाणे गोड बोलून, शांततामय पद्धतीने प्रसार करण्यास हरकत नसावी. उलट आपल्याच धर्मातील ३.५ ते ४ लाख बांधवांना आपण एका झटक्यात आपल्यातून कमी केले हे शल्य आहेच. भारतीय समाजाची अल्पसंतुष्टता, ऐहिक गोष्टींबद्दलची नावड/तुच्छता / जग नश्वर आहे ही विचारधारा हे देखील हिंदु / सनातन धर्माचा प्रसार न होण्याचे एक कारण असावे असे मला वाटते. (आमचेही मत गांभीर्याने घेण्याची गरज नाही). जाता जाता एक ऐकीव किस्सा : अलेक्झांडर द ग्रेट याने भारतवर्ष पादाक्रांत केले होते. प्रवास करता करता त्याला एके ठिकाणी एक साधू बसलेला आढळला. केवळ लंगोटीवर बसलेल्या साधूला पाहून अलेक्झांडर त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला मी जगज्जेता आहे. तुला काय हवे ते माग. "बाजूला उभे रहा, तेवढा सुर्यप्रकाश माझ्या अंगावर पडू दे" एवढ्या शब्दावर साधूने जगजेत्त्याची बोळवण केली. मार्कस ऑरेलियस यांच्या कविता प्रसिद्ध करण्याच्या मुळ उद्देशास हरताळ फासायला नको म्हणून माझे दोन ? शब्द आवरते घेतो.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 23/09/2023 - 09:57
>>माझे दोन ? शब्द आवरते घेतो. ओके. फक्त जाता जाता सहज दिसणारा किस्सा : आठ दहा वर्षांची मुले भरपुर खेळत, हुंदडत असतात. मस्ती करत असतात. तेच मुल मोठे होते वीस बावीस त्याच्या डोळ्यात स्वप्ने असतात. तो हवी ती जोखीम घेतो, कधी जिंकतो कधी हरतो. तेच मुल जेव्हा पन्नाशीत येते, बायका मुले असतात. जबाबदारीने वागतो. थोडा नरमतो. कदाचित हाच फरक हजार बाराशे वर्षांपुर्वी उदयास आलेल्या युरोपिय आणि पाच हजाराहून अधिक काळाच्या पोक्त सनातन संस्कृतीत असावा असे वाटते. पुन्हा तेच सांगुन माझे शब्द आवरते घेतो : हे आमचे म्हणणे आहे. फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन पुस्तक वाचले. काही म्हणा पण सशस्त्र क्रांती, हिंसा, माझ्या मनास तरी पचत नाही. यात देशभक्तांना कमी लेखण्याचा उद्देश नाही. कृष्णाने अर्जुनाऐवजी मलाच उपदेश केला असता तर बरे झाले असते असे कधी कधी वाटते.

चित्रगुप्त 22/09/2023 - 14:40
मुळात 'झुंडशाही' हेच मोठे संकट असते. मग ती कुणाचीही असो. एकेश्वरवादी झुंडींनी 'एकत्रितरित्या राज्यकर्ते, आक्रमक म्हणून' अनेक शतके जगभरात काय केले, ते सर्वविदित आहे वरील वाक्य लिहील्यावर सहज 'झुंडशाही' हा शब्द गुगलल्यावर मिपावरचा २०१० चा एक लेख सापडला: झुंडशाही म्हणजे देशद्रोहच https://www.misalpav.com/node/11128

चित्रगुप्त 21/09/2023 - 04:42
राष्ट्रभक्तीने भारून गेलेले तरूण, त्यांचे जाज्वल्य विचार, प्रत्यक्ष कृती आणि त्यांचे कवित्व. सगळेच अद्भुत. खालील शार्दूलविक्रीडितातले पद उत्तमच रचले गेले आहे.
हिंदुस्थान असे जनांत म्हणती लोकास ह्या सर्वही | येथे आंग्ल कसे स्वराज्य करिती जाणा महालाज ही नावाला विसरु नका, दृढ धरा देशाभिमाना मनी | ठोका दंड, उठा , भिडा सुयशया दुष्टाचिया कंदनी होते पुर्वज आमचे दृढ कसे झुंजावया कंदनी | गेले मेळवुनी यशास अपुल्या देशास ह्या रक्षुनी त्यांचे पोटी आम्ही कसे निपजलो भानूस जैसे शनी | नेले राज्य हरुनि अमुचे तरी लज्जा न वाटे मनी
देशभरातून अशा अगणित तरूणांची आहुती स्वातंत्र्ययज्ञात दिली गेली. आमच्या पिढीवर मात्र लहानपणी 'बिना खड्ग बिना ढाल'चेच महात्म्य ठसवले गेले.

चित्रगुप्त 21/09/2023 - 05:20
लेखाचे शेवटी दुव्यात दिलेले 'हुतात्मा दामोदर हरि चापेकर ह्यांचे आत्मवृत्त' हे मुळात मोडीत असलेले बाड 'बाळबोधी' मधे लिहून १९७४ साली प्रकाशित करण्यात आले. सुरूवातीची काही पाने आज वाचली. त्या काळाविषयी अतिशय रोचक माहिती यातून मिळते. दामोदर हरि दररोज १२०० (बाराशे) सूर्यनमस्कार घालणे आणि एका तासात ११ मैल दौडणे असा व्यायाम करीत असत. वडील 'हरि विनायक चापेकर' हे पूर्वी सोलापुरात कलेक्टर आफिसात आणि नंतर तार आफिसात चाकरी करत, परंतु नंतर चाकरी सोडून ते कीर्तनकार झाले. त्यांचे तिन्ही मुलगे कीर्तनात बाजाची पेटी, सारमंडळ आणि टाळ वाजवून साथ देत असत. त्यांनी जमवलेल्या हत्यारांची यादी/माहिती विस्मयजनक आहे. जिज्ञासूंनी अवश्य हा ग्रंथ वाचावा. .

Bhakti 21/09/2023 - 08:37
नाही होत स्वतंत्रता शिवकथा घोटुनी भाटापरी | घ्यावे लागतसे शिवाजी बाजीपरी हे मस्तक स्वहस्तावरी ||
करेक्ट हाच फरक आहे.शौर्याने तरुणांना प्रेरणा द्यायला हवी ना ... द्वेषभावनेने राष्ट्राला दुभंग पडतो.

चित्रगुप्त 21/09/2023 - 13:10
ऐतिहासिक कवितांच्या लेखमालेचा प्रारंभ उत्कृष्ट झालेला आहे. सांप्रतकाळी बहुतांशी विस्मरणात गेलेल्या साहित्याचा शोध घेऊन ते या ठिकाणी जिज्ञासू वाचकांस उपलब्ध करून देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे असे आम्हास वाटते. या निमित्ताने वाचकांचे ठायी कुतुहल निर्माण होवून ते जुन्या काळच्या क्रांतीकारी, संत, पंत, भक्त, विरक्त, ज्ञानी कवी-लेखकांच्या साहित्याचे परिशीलन करिण्यास उद्युक्त होतील, याविषयी आमचे मनात किमपि किंतु नाही, किंबहुना तसेच होईल याची आम्हास खातरी वाटत्ये आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. यापुढील लेखांचे शीर्षकात त्या त्या लेखनकर्त्याचे नाव दिल्यास भविष्यकाळी ते शोधण्यास सोपे पडेल असे वाटते. तसेच दरएक लेखामध्यी त्या लेखनकर्त्याचे आणि पुस्तकाचे चित्र, त्यासंबंधी उपलब्ध असलेली अन्य काही चित्रे-नकाशे, जालावरील साहित्याचे दुवे वगैरे दिल्यास लेखमाला आणखी रोचक, माहितीपूर्ण होईल. आगामी लेखनासाठी शुभेच्छा. . . . क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र) चापेकर बंधुंचे जन्म या वाड्यात झाले आणि बालपणही याच वाड्यात गेले. याच वाड्यात त्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने पाहिली, त्यासाठीची खलबतही येथेच पार पडली. त्यांच्या फ़ाशीनंतर दामोदर चापेक़रांच्या वीरपत्नी दुर्ग़ाबाई चापेकर, त्यांच्या अन्य दोन जावा व मुलांना सोबत घेऊन चिंचवड़ येथील या वाडयात राहिल्या.चिंचवड़ येथे राममंदिराच्या समोर हा वाडा आहे. चापेकर समितीने १९७२ मध्ये या वाड्याचा ताबा मिळवून वाड्याच्या विकासकामांना सुरूवात केली.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 21/09/2023 - 13:19
वाड्याविषयी मी पूर्वी येथे अल्पसे लिहिले होते आणि त्याची छायाचित्रे टाकली होती.

In reply to by स्वधर्म

हाच की तो गट क्र. १ आणि २ मधला फरक ! तुम्हाला तर माहीत आहे की सगळं. तुमच्या प्रतिसादावरून दिसत आहेच की तुम्हाला गट क्रं. २ च्या विचारसरणीची व्यवस्थित जाण आहे ते. उगाच कशाला मला विचारता की व्याख्या काय गटांची म्हणून ! आता पुढचा लेख मोरोपंतांच्या कवितांवर लिहिणार आहे, त्यावरही असेच काहीसे तुमच्या गटाचे प्रतिसाद असतीलच ते तयार ठेवा. अर्थात तयार नसतील तर तुम्ही लागलीच काय प्रतिसाद देणार ह्याची आम्हाला कल्पना आहे आधीच. आम्हाला हे टेम्प्लेट चांगलेच ठाउक आहे आता. हा हा हा.

अहिरावण 21/09/2023 - 19:50
देव, देश आणि धर्मासाठी लाख संकटे छातीवरती झेलून घेणारी माणसे !! त्या दिडशे वर्षांच्या गुलामीने अशी भली भली माणसे देशाला लाभली ज्यातील एकेका नररत्नांसाठी इतर देशांना शेकडो वर्षे वाट पाहावी लागली. इतकंच आणि एवढंच क्रेडीट ब्रिटीशांना... बाकी ब्रिटीश जमात जगातली एक नालायक जमात याविषयी कोणतीही शंका आमच्या मनात नाही.

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 21/09/2023 - 20:47
'गोरे' भारतात आलेच नसते, तर आजचा भारत कसा असता ? असा काथ्याकूट सुरु करावा असा विचार आहे. परंतु त्या आधी थोडा अभ्यासही आवश्यक आहे. बघूया केंव्हा जमते ते. हा काथ्याकूट आणखी कुणी सुरु केला तरी उत्तमच.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 22/09/2023 - 11:01
नाही मिळणार. ए आय उपलब्ध विदाच्या आधारे काम करते. पाश्चिमात्यांनी गेल्या १०० वर्षांत त्यांचे गोमटे रुप(च) जगासमोर दाखवले आहे.

In reply to by अहिरावण

अहिरावण 22/09/2023 - 11:11
जगासमोर म्हणजे इंटरनेटवर. कारण ए आय इंटरनेटवरुनच माहिती गोळा करते. आणि पाश्चिमात्यांनी विशेषतः अमेरिकन आणि इंग्रजांनी इंटरनेटवर प्रचंड हुकुमत ठेवलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 22/09/2023 - 11:00
जरुर करा. त्याआधी वसाहतवादाने केलेले जगाचे नुकसान तपासा, कदाचित फायदे नगण्य आणि नुकसान खुप असा लेखाजोखा यायचा.

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 21/09/2023 - 21:03
बाकी ब्रिटीश जमात जगातली एक नालायक जमात याविषयी कोणतीही शंका आमच्या मनात नाही.
-- हे ब्रिटिश राजकारणी लोकांबद्दल जरी खरे असले तरी अनेक ब्रिटिश चित्रकार, वास्तुकार, कवी, लेखक, तत्वज्ञ, संगीतज्ञ वगैरे वंदनीय आहेत. उदाहरणार्थ खालील चित्र बघा. जॉन कॉन्स्टेबल हा चित्रकार निगर्वी, प्रेमळ, सरळमार्गी, कलानिर्मितीत दंग असा विलक्षण चित्रकार होता, आणि असे हजारो-लाखो लोक प्रत्येक देशात असतात. . चित्रकारः John Constable (१८२१) तैलचित्र. (51+1⁄4 in × 73 in) Location:National Gallery, London

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 22/09/2023 - 10:59
मी ब्रिटीश जमात असा समुहवाचक उल्लेख केला आहे, ब्रिटीश व्यक्ती असा नाही. व्यक्तिगत द्वेषाचे काही कारणच नाही. पण जेव्हा ते एकत्रितरित्या राज्यकर्ते, आक्रमक म्हणून वावरतात तेव्हा नालायक असतात. हेच आणि असेच अमेरीकेला सुध्दा लागु. युरोपीयनांना सुद्धा लागु. पाश्चिमात्य लोक समुह म्हणून नालायक असतात. विशेषतः आशियाई (त्यात भारत जास्त) लोकांविरुद्ध एक आकस असतो त्यांच्या मनात.

In reply to by अहिरावण

पाश्चिमात्य लोक समुह म्हणून नालायक असतात अगदी ! हेच वर्णन तंतोतंत भारतीयांना देखील लागू होते. अवांतर किस्सा आणि शंका : वरील धागा आणि चर्चेशी संबंध नाही मुंबईत (साकीनाका ते घाटकोपर) भागात ब्रिटीशांनी एक पाईपलाईन बांधली होती. ती साधारण १००-१५० वर्षे तरी जुनी असावी. ती एके वर्षी एका ठिकाणी काही कारणास्तव फुटली. ती मुंबई महानगर पालिकेने दुरुस्त केली. तीच पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर साधारण ४-५ वर्षे त्याच जागेवर सतत फुटायची. ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक इमारती, पुल पुणे-मुंबईत अजुनही दिमाखात उभ्या आहेत मात्र आता बांधलेल्या इमारतींना, पुलांना तेवढे आयुष्य नसते. काय कारण असावे ? तंत्रज्ञान म्हणावे तर मागच्या काळापेक्षा प्रगत झालेय, नवे नवे शोध लागताहेत पन कोणत्याच कामाची २०-२५ वर्षांची खात्री देता येत नाही. नक्की काय कारण असावे ?

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 22/09/2023 - 18:59
>>>अगदी ! हेच वर्णन तंतोतंत भारतीयांना देखील लागू होते. असु शकेल. पण भारतीय समुह म्हणून इतर देशांवर, समाजावर आम्ही तुमचे भले करतो म्हणून आक्रमण करत नाहीत. तुम्ही आमचा धर्म स्विकाराच म्हणून हातात पुस्तक देत नाही की मानेला तलवार लावत नाही. वसाहतवाद, गुलामी लादत नाहीत. त्यांना जी काही कृत्ये करायची असतात ती आपल्या देशात करतात. फरक कळावा. >>>ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक इमारती, पुल पुणे-मुंबईत अजुनही दिमाखात उभ्या आहेत मात्र आता बांधलेल्या इमारतींना, पुलांना तेवढे आयुष्य नसते. जुन्या पद्धतीचे बांधकाम आठवण म्हणून राहू द्यावे या विचाराने त्यांचे जतन होत असते. >>>काय कारण असावे ? तंत्रज्ञान म्हणावे तर मागच्या काळापेक्षा प्रगत झालेय, नवे नवे शोध लागताहेत पन कोणत्याच कामाची २०-२५ वर्षांची खात्री देता येत नाही. नक्की काय कारण असावे ? आपणच केलेले बांधकाम २०-२५ वर्षांनी गरज आणि आवश्यकता बदलल्याने पुन्हा बांधकाम केले जाते. आपण रहातो त्या सोसायट्या, घरे सुद्धा रीडेवलपमेंट करतो. पणजोबांच्या काळातले वाडे पाडून फ्लॅट बांधतो. मात्र तेच गेल्या शतकातील थोर मनुष्यांची निवासस्थाने आपण जतन करतो.

In reply to by अहिरावण

पण भारतीय समुह म्हणून इतर देशांवर, समाजावर आम्ही तुमचे भले करतो म्हणून आक्रमण करत नाहीत. कदाचित भारतीयांत तेवढी ताकद नसावी अशी शक्यता असू शकते काय ?
आपण रहातो त्या सोसायट्या, घरे सुद्धा रीडेवलपमेंट करतो. पणजोबांच्या काळातले वाडे पाडून फ्लॅट बांधतो.
पाडून परत बांधणे आणि आपोआप १०-१५ वर्षात मोडकळीस येणे यात गल्लत होत असावी बहुतेक. सा. बा. विभागांनी केलेल्या बांधकामांबद्दल विशेषत्वाने. असो. जाऊ द्या.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 22/09/2023 - 19:26
>>कदाचित भारतीयांत तेवढी ताकद नसावी अशी शक्यता असू शकते काय ? अशी दुस-यावर आक्रमणे करण्याची ताकद असायला हवी हा आदर्श मानणे हे योग्य आहे का? >>सा. बा. विभागांनी केलेल्या बांधकामांबद्दल विशेषत्वाने. विषय गहन आहे. पहीले तो दगड फेकेल ज्याने आयुष्यात पाप केले नाही. - जॉन ८:७-११ (राजा जेम्स प्रत) जाऊ द्या तर जाऊ द्या.

In reply to by अहिरावण

अशी दुस-यावर आक्रमणे करण्याची ताकद असायला हवी हा आदर्श मानणे हे योग्य आहे का?
मुळीच नाही पण सामर्थ्यवंताने समोरच्याला अपराधासाठी क्षमा करणे आणि दुर्बलाने समोरच्या अपराध्याचे काही वाकडे करु शकत नाही म्हणून निमूट गप्प बसणे यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक भारतीय समूह आणि पाश्चात्य समूह यांच्या ताकदीत असावा असे प्रथमदर्शनी वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 22/09/2023 - 19:48
इतिहास जेत्यांनी (पाश्चिमात्यांनी) लिहिलेला आहे. त्यांचे जयाचे गुणगान आणि पराजय लपवणे हे ते करणारच. शे दोनशे वर्षांत अरबस्तानातील वावटल अख्खा युरोप कवेत घेते. तुर्क, मंगोल अख्या जगावर शंभर वर्षांत अधिराज्य गाजवतात. हजार वर्षे लोटून सुद्धा अख्खा हिंदूस्तान अहिंदू झाला नाही. हे हिंदूंनी टक्कर दिली म्हणूनच झाले. ताकद होती. दिडशे वर्षांच्या आंग्लांच्या, आधीच्या इतर युरोपीय आक्रमकांपुढे सुद्धा आपण हिंदू म्हणूनच शिल्लक राहीलो. ताकद होती म्हणून शिल्लक राहीलो. मराठे आणि इंग्रज लढाईत दोघांची ताकद समान होती, फक्त नियतीचे दान त्यांना पडले. (आंग्ल समर्थक कितीही मातीचे भांडे, पितळी भांडे वगैरे "खरे" खोटे आलाप काढो). पाच हजार वर्षापेक्षा जास्त काळ टिकलेली आणी अजुनही कित्येक शतके टिकून रहाण्याची शक्यता असलेली संस्कृती ही शस्त्राने नव्हे तर वृत्तीने निर्माण होते. अर्थात हे आमचे म्हणणे आहे. फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

In reply to by अहिरावण

अर्थात हे आमचे म्हणणे आहे. फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.
तुमचे सगळेच म्हणणे नाकारण्यासारखे आहे असे आमचे देखील म्हणणे नाही :) आवश्यक तिथे गांभीर्य / सहमती दाखवायला / माफी मागायला मला कोणताही अभिनिवेश आडवा येत नाही. थोडे शब्द बदल करुन म्हणणे मांडतो.
दिडशे वर्षांच्या आंग्लांच्या, आधीच्या इतर युरोपीय आक्रमकांपुढे सुद्धा आपण हिंदू म्हणूनच शिल्लक राहीलो. ताकद होती म्हणून शिल्लक राहीलो.
एक आक्रमक वृत्ती असते जी आंग्ल, युरोपिय, तुर्क, मंगोलांमधे आहे. भारतीयांमधे बचावात्मक वृत्ती आहे. आपले आहे ते संरक्षण करणे ह्यात त्यांनी ताकद खर्च केली पण धर्म वाढावा म्हणून विशेष प्रयत्न करणे हिंदू / सनातनी (जे काही म्हणायचे ते म्हणावे) यांना जमत नाही. धर्म वाढवण्यासाठी बळाचा वापर करणे योग्य नाही हे मला देखील मान्य आहे मात्र किरिस्तावांप्रमाणे गोड बोलून, शांततामय पद्धतीने प्रसार करण्यास हरकत नसावी. उलट आपल्याच धर्मातील ३.५ ते ४ लाख बांधवांना आपण एका झटक्यात आपल्यातून कमी केले हे शल्य आहेच. भारतीय समाजाची अल्पसंतुष्टता, ऐहिक गोष्टींबद्दलची नावड/तुच्छता / जग नश्वर आहे ही विचारधारा हे देखील हिंदु / सनातन धर्माचा प्रसार न होण्याचे एक कारण असावे असे मला वाटते. (आमचेही मत गांभीर्याने घेण्याची गरज नाही). जाता जाता एक ऐकीव किस्सा : अलेक्झांडर द ग्रेट याने भारतवर्ष पादाक्रांत केले होते. प्रवास करता करता त्याला एके ठिकाणी एक साधू बसलेला आढळला. केवळ लंगोटीवर बसलेल्या साधूला पाहून अलेक्झांडर त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला मी जगज्जेता आहे. तुला काय हवे ते माग. "बाजूला उभे रहा, तेवढा सुर्यप्रकाश माझ्या अंगावर पडू दे" एवढ्या शब्दावर साधूने जगजेत्त्याची बोळवण केली. मार्कस ऑरेलियस यांच्या कविता प्रसिद्ध करण्याच्या मुळ उद्देशास हरताळ फासायला नको म्हणून माझे दोन ? शब्द आवरते घेतो.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 23/09/2023 - 09:57
>>माझे दोन ? शब्द आवरते घेतो. ओके. फक्त जाता जाता सहज दिसणारा किस्सा : आठ दहा वर्षांची मुले भरपुर खेळत, हुंदडत असतात. मस्ती करत असतात. तेच मुल मोठे होते वीस बावीस त्याच्या डोळ्यात स्वप्ने असतात. तो हवी ती जोखीम घेतो, कधी जिंकतो कधी हरतो. तेच मुल जेव्हा पन्नाशीत येते, बायका मुले असतात. जबाबदारीने वागतो. थोडा नरमतो. कदाचित हाच फरक हजार बाराशे वर्षांपुर्वी उदयास आलेल्या युरोपिय आणि पाच हजाराहून अधिक काळाच्या पोक्त सनातन संस्कृतीत असावा असे वाटते. पुन्हा तेच सांगुन माझे शब्द आवरते घेतो : हे आमचे म्हणणे आहे. फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन पुस्तक वाचले. काही म्हणा पण सशस्त्र क्रांती, हिंसा, माझ्या मनास तरी पचत नाही. यात देशभक्तांना कमी लेखण्याचा उद्देश नाही. कृष्णाने अर्जुनाऐवजी मलाच उपदेश केला असता तर बरे झाले असते असे कधी कधी वाटते.

चित्रगुप्त 22/09/2023 - 14:40
मुळात 'झुंडशाही' हेच मोठे संकट असते. मग ती कुणाचीही असो. एकेश्वरवादी झुंडींनी 'एकत्रितरित्या राज्यकर्ते, आक्रमक म्हणून' अनेक शतके जगभरात काय केले, ते सर्वविदित आहे वरील वाक्य लिहील्यावर सहज 'झुंडशाही' हा शब्द गुगलल्यावर मिपावरचा २०१० चा एक लेख सापडला: झुंडशाही म्हणजे देशद्रोहच https://www.misalpav.com/node/11128
लेखनविषय:
लेखनप्रकार
गणेसोत्सवात एक सकाळची पुजा आरती आणि एक संध्याकाळची पुजा आरती केली की उर्वरीत वेळ रिकामा असतो, किंबहुना जाणीवपुर्वक काही वाचनास, चिंतनास वेळ रिकामा ठेवलेला असतो. आज सहज वाचन करताना अजुन काही ऐतिहासिक कविता वाचनात आल्या त्या येथे उधृत करीत आहे. सदर लेखन दामोदर हरि चापेकर ह्यांनी येरवडा जेल मध्ये असताना लिहिलेले आहे. सर्वप्रथम म्हणजे त्यांचे आडनाव चाफेकर असे नसुन चापेकर असे आहे. हे तिघे भाऊ १. दामोदर हरि - वय २७, २. बाळकृष्ण हरि - वय २४ आणि ३. वासुदेव हरि - वय १८. दामोदर आणि बाळकृष्ण ह्यांनी गणेशखिंडीत रॅन्ड ह्या अधिकार्‍याचा वध केला.

श्रीगणेशोत्सव - एक ऐतिहासिक कविता

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त 19/09/2023 - 02:49
हल्लीच्या गणेशोत्सवाचे वर्णन आणि महात्मा फुलेंची गणेशस्तुती, दोन्ही जबरदस्त.
ढ्यंड ढ्यंड ढ्यंड ढोलताशांचा कर्णकर्कश गोंधळ ऐकला, बाजारपेठेत कशच्या तरी थातुरमातुर गवताची किंमत तब्बल ५० रुपये लावुन चाललेली लुट पाहिली , प्लॅस्टिक थर्मॉकोलचे मखर , चायनीजच्या माळा, अव्वाच्या सव्वा रेटने विकली जात असलेली सुमार दर्जाच्या पाच फळांच्या पिशव्या पाहिल्या . रस्त्यात टृअ‍ॅफिकला अडचण होत असुनही उभे केलेले मांडव पाहिले, अन माहात्मा फुलेंच्या लेखनाची आठवण झाली.
आजच्या काळात लोकं जास्त वाचन करीत नाहीत, जुने ऐतिहासिक लेखन वाचत नाहीत. नुसतेच कोठेतरी काहीतरी वाचुन मते बनवतात. इन्स्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सॅप युनिव्हर्सिटीच्या काळात आपल्या देशातील लोकोत्तर महापुरुष आणि त्यांचे अभिजात लेखन काळाच्या पडद्याआड चालले आहे , हे पाहुन फार खंत वाटते.
--- अगदी खरे. भारताच्या इतिहासातील लोकोत्तर महापुरुषांनी प्रकट केलेले विचारधन पुन्हा आजच्या वाचकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या फुल्या फुल्या बघून आश्चर्य वाटले.

समाज विघातक. पुस्तक फक्त ब्राह्मण द्वेषातून लिहीले गेले आहे. याच विचारांना सामान्य जनतेला सांगुन मतलबी लोक आपली पोळी भाजत आहे. यामुळेच समाज पुढे न जाता मागे खेचला जातोय. दंगल, तोडफोड आपसातील संबध कलुषित होत आहेत. सरकारकडून, समाज सुधारकां कडून समाज बांधणीची अपेक्षित ना की जे घडून गेले व ज्यावर आजच्या पिढीचा कुठलाच सहभाग अथवा दोष नाही तरीही त्यांनाच वेठीस धरले जात आहे. या आगोदर समाज व्यवस्था, इतीहास काय होता सर्व मिपाकरांना माहीत नाही असे लेखकाने समजू नये.प्रतिसादात फारसे काही लिहीता येणार. सांप्रत विषय अप्रासंगीक म्हणणे चुकीचे होईल पण अवांछित जरूर आहे. जे लिहून ठेवले आहे तेच तेच उगाळण्यात काहीच अर्थ नाही. शिळ्या कढीला उत आणणे फक्त एवढेच म्हणेन. इथे वडलांचे कर्ज मुलगा फेडत नाही तीथे इतीहास दाखवून आजच्या पिढीतील समाजाला दोषारोप करण्यात मुर्ख पणा व लबाड हेतू आहे. इतर समाज सुधारकांनी सुद्धा समाजातील दुर्बल, दुर्लक्षित घटकांसाठी काम केले पण उदो उदो फक्त आणी फक्त शाहू फुले अंबेडकरांचा झाला. जीसकी लाठी उसकी भैंस/बळी तो कान पिळी या न्यायाने सामान्य समाज हाकलला जातो एवढे मात्र खरे. इतीहास वाचून जमत असल्यास चुका सुधाराव्यात ना की खत पाणी घालून त्याची समाजाला घातक आशी विषवल्ली जोपासायची. बाकी लेखकाचे अभिनंदन, लेखनावर भरपूर फटाके उडणार यात शंका नाही. बाकी, उत्सवाचे बाजारीकरण व पर्यावरण इत्यादींवर संपूर्ण सहमत. साहित्य संपादकांनी असा जाती द्वेषावर लेखन संस्थाळवर प्रकाशीत केल्याबद्दल त्यांचाही तिव्र निषेध करतो.

या लेखना मुळे आजच्या काळात गणपती किवां फुले यांना काही फरक पडणार नाही पण काहींचे उखळ तर काहीचें कपाळ पांढरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कंजूस 19/09/2023 - 08:22
वि.द.घाटे यांनी त्यांच्या आत्मकथनात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या विषयावर बराच उजेड पाडला आहे. तो म्हणजे फक्त मतप्रदर्शन नसून काय काय कसे घडत गेले ते मांडलं आहे. स्वानुभव,वर्तमान घडामोडी. फुले हे समाज सुधारक होते आणि त्यांचा विरोध ब्राह्मण्य पाळणाऱ्यांवर होता. असा भेदभाव न पाळणाऱ्यांशी ब्राह्मणांशी सख्य होतं. त्यांनी ज्या संस्था काढल्या त्यावर संचालक म्हणून पुरोगामी ब्राह्मणांनाच नेमले होते. गणेशोत्सव म्हटला तर त्याचा त्रास होण्याचं कारण नाही. त्रास होतो तो उत्सवातील वाईट प्रघातांचा. मोठ्या आवाजात रेकॉर्ड गाणी लावणे हे त्यापैकी एक. नाही तर उत्सव कधी आला आणि संपला हे कळणार नाही. दुसरा एक गुप्त त्रास दुकानदारांना होतो. वर्गणी गोळा करणारे खूप पैसे मागतात. कुणी कोणत्या समाजाने कोणतं दैवत आदरणीय मानायचे हा त्यांचा विषय आहे. पण त्याबाहेर जाऊन दरारा वाढवत आहेत.

In reply to by कंजूस

फुले हे समाज सुधारक होते आणि त्यांचा विरोध ब्राह्मण्य पाळणाऱ्यांवर होता. असा भेदभाव न पाळणाऱ्यांशी ब्राह्मणांशी सख्य होतं. त्यांनी ज्या संस्था काढल्या त्यावर संचालक म्हणून पुरोगामी ब्राह्मणांनाच नेमले होते.
प्रथमदर्शनी असे वाटत नाही. मुळ कविता किंवा कोणतेही दलितांसाठीचे लिहिले गेलेले जुने साहित्य पाहिले तर आलोचनेचा रोख हिंदू देवतांवरच असतो. देवता फक्त ब्राह्मणांच्याच असतील तर वेगळी गोष्ट असते. राम, कृष्ण, गणपती,शंकर, सरस्वती, ब्रह्मदेव कोणीही या टिकेतून सुटलेले नाहित. तत्कालीन समाजात एक वर्ग खूप नाडला गेला होता हे सत्य स्वीकारुन त्यापोटी निर्माण झालेल्या चीडीमधून हे साहित्य प्रसवले असावे असा माझा अंदाज ! फार मनावर घेऊ नये. जुने जाऊद्या मरणालागूनी असे म्हणुन सोडून द्यावे. नव्या युगात विषमता नष्ट कशी होईल याचा काही सामाईक कार्यक्रम असेल तो राबवावा. फारच आरडा ओरडा झाला तर आमचा विरोध ब्राह्नंणांना नाही तर ब्राह्मण्याला आहे असा एक सेफ डायलॉग सदा सदा सर्वदा मुखी बाळगावा.

लेखाची सुरूवात गणेशोत्सवा ने सुरवात केल्याने गैरसमज झाला. विनाशर्त ममनापासुन साहित्य संपादकांची जाहीर क्षमा मागून दिलगीरी व्यक्त करतो. पैजारबुवांनी चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. क लो आ

आजानुकर्ण 19/09/2023 - 18:46
चांगली कविता. फुल्यांनी गोरगरिबांना नाडणाऱ्यांचा चांगलाच समाचार या कवितेतून घेतला आहे. अर्थात मार्कस ऑरेलियस यांचा काडी घालण्याचा हेतू असल्याने त्यांनी अशुद्धलेखनाने बुजबुजलेल्या तळटीपा टाकून पळ काढलेला दिसतोय. किमान या कवितेबाबत त्यांचे आकलन काय आहे हे सांगितले तर बरे होईल.

In reply to by आजानुकर्ण

हेतु: सदर कविता उधृत करण्याचा हेतु अतिषय सरळ आणि सोप्पा आहे. आपले लोकोत्तर समाजसुधारक महात्मा फुले ह्यांचे लुप्तप्राय होत चाललेले अभिजात लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावे. हे लेखन खरेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. हे मी अत्यंत मनापासुन , खर्‍या कळकळीने म्हणत आहे , ह्यात काहीही उपरोध वगैरे नाही. मी आधीच लिहिल्याप्रमाणे - "सुजाण" नागरिक ह्यातुन नक्कीच "ज्याला जो घ्यायचा तो" बोध घेतील अशी आशा आहे !
सर्व भूतां निर्मी धोंड्याचा विठ्ठल ॥ पंढरी सकळ ॥ वेडी केली ॥ १ ॥ विठ्ठलाची मूती ध्यांनीं मनीं धरी ॥ गातां ताल धरी ॥ नाच्यापरी ॥ २ ॥ निर्लज्य होऊनी फुगड्या खेळतो ॥ पक्व्यास घालितो ॥ स्त्रीयांसंगें ॥ ३ ॥ “सुखरूप होशी” उपदेश करी ॥ वेडा वारकरी ॥ जोती म्हणे ॥ ४ ॥ - संदर्भ : पान क्रं. ५०५ , महात्मा फुले समग्र वाङमय
आणि माझे आकलन काय हे माझे मला ठाऊक आहे. मला ते तुम्हाला सांगायची किंव्वा पटवुन द्यायची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही तुमचे अंदाज बांधायला स्वतंत्र आहात. ह्या कवितेवर येणार्‍या लोकांच्या प्रतिक्रिया पाहुन त्यांच्याशी कसे आणि काय बोलायचे हे मला ठरवता येते . आता हेच बघा ना , तुम्हाला ही कविता "चांगली कविता " वाटली आहे it says a lot about you. ! तसेच इतरांच्या प्रतिक्रिया पाहुन ते कसे व्यक्ती आहेत ह्या बद्दल देखील देखील सहज अनुमान बांधता येत आहे ! इत्यलम :)

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 21/09/2023 - 03:24
यापूर्वी तुंम्हाला चातुर्वर्ण्यामुळे झालेले अन्याय इ. विचारले होते, तर प्रश्न विचारणार्या आमच्यासारख्या लोकांना गट क्र. २ मध्ये टाकले होते. तुम्हीं तर त्यांना काही समजवायला जात नाही, फ़क्त स्वांतसुखाय लेखन करता. मग गट क्र. २ चे अग्रणी महात्मा फुले यांची ऐन गणपतीउत्सवात इथे टाकून काय साध्य करायचे आहे? बरं, पुन्हा उपरोध नाही, असेही साळसूदपणे म्हटले आहे. निदान इथेतरी प्रामाणिकपणे खरा हेतू सांगून टाका. महात्मा फुले, आंबेडकर यांच्याबद्दलची तुमची विरोधाभक्ती: http://misalpav.com/comment/1169353#comment-1169353 बाय द वे: तुमची ती मूळ गटांची वर्गवारी सापडली नाही, ती इथे देण्याची हिंमत दाखवा म्हणजे सगळ्यांनाच क्लिअर होईल.

In reply to by स्वधर्म

उपरोध नाहीच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत महात्मा फुले ह्यांचे हे पुरोगामी विचार, हे अभिजात लेखन पोहचले पाहिजे, जेणे करून ते त्यांची मते बनवू शकतील. हाच सरळ स्पष्ट उद्देश आहे. आणि हो , हे लेखनही स्वंत:सुखायच आहे. लोकांची शालेय शिक्सनातील थातूरमातूर पाठ्यक्रम वाचून बनलेली मते बदलताना पाहून , डोळे उघडले जाताना पाहून, किंवा मते अधिक कट्टर होत जाताना, अधिक दीर्घद्वेषयुक्त होत जाताना पाहून मला मनापासून आनंद होतो. बाकी ते गटवारी तुम्हाला आमच्याच अन्य एका लेखात सापडेल. थोडे तरी कष्ट घ्या. ह्या निमित्ताने तुम्ही आमचे अजून काही लेखन वाचाल आणि स्कोर करायला अजुन काही ब्राऊनी पॉइंट्स सापडतील तुम्हाला. आता ह्या लेखावर इतके बास. २

In reply to by स्वधर्म

आजानुकर्ण 22/09/2023 - 22:38
मी झक मारली आणि वेळ घालवला. मार्कस ऑरेलियस यांची मूलभूत मुद्द्यांवर चर्चा करण्याची कुवत आणि तेवढे आकलन नाही. एखादी कविता टाकून गोंधळ उडवून द्यायचा आणि फुल्यांविरुद्ध मने दूषित करायची इतकाच त्यांचा मर्यादित हेतू आहे. वेळ घालवू नका.

In reply to by आजानुकर्ण

एखादी कविता टाकून गोंधळ उडवून द्यायचा आणि फुल्यांविरुद्ध मने दूषित करायची
>>> चला, म्हणजे ही कविता वाचून लोकांची मने दूषित होतील इतके तरी तुम्हाला मान्य आहे. हे ही नसे थोडके ! हे सारं लोकांपर्यंत पोहचले च पाहिजे. ती वारकरी सांप्रदायिक लोकांविषयी ची कविताही जास्तीत जास्त लोकांना माहीत असायला हवी. त्यावर कार्तिकी एकादशीला लेख लिहिणार आहे. त्यातच ज्ञानेश्वरी मधील १२ व्या अध्यायावर माउलींनी जे विवेचन केले आहे , ज्याला ज्ञानेश्वरी चा परमोच्च बिंदू म्हणता येईल त्यावर महापुरुषांनी काय टिप्पणी केली आहे ते ही लिहीन. एकनाथ षष्ठी चया मुहूर्तावर नाथांनी ज्या कृष्णावर नितांत सुंदर एकनाथी भागवत लिहिले , त्या कृष्णबद्दल काय लिहून ठेवले आहे ते लिहीन म्हणतो. शाहू फुले आंबेडकर ह्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सर्वांनाच माहीत असायला हवे.

कविता छान आहे. फुलेंबद्दल सनातनींत द्वेष दिसतो. पण फुले जातीच्या नाहीतर वृत्तीच्या विरूध्द होते हे समजण्याची कूवत तेव्हाच्या सनातनीत नव्हतीच पण आताच्या सनातनीत तर आजिबातच नाही. फुले ब्राम्हण जाती विरूध्द असते तर “भिडे” वाडा मूलींच्या शिक्षणाला घेतला नसता. ब्राम्हण मूलगा दत्तक घेऊन वाढवला नसता. संघटनेत, संस्थेत ब्राम्हण जातीच्या लोकांत स्थान नसते.

Bhakti 20/09/2023 - 11:19
सर्व महापुरुषांनी आज सगळ्या जयंत्या,उत्सवातला डीजेचा उन्माद ,प्लास्टिकचा कचरा,मूर्तीची विसर्जनानंतरची विटंबना पाहिली असती तर समाजसुधारणाचे कार्य सुरूच केले नसते.शेवटी हेच बरोबर.. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडाव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहाचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्यायीजे, मनी पाविजे, चिंत्त लाभिजे, मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि किजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण. ;) :)

आनन्दा 20/09/2023 - 12:59
काय मजा नाही आली राव. अजून फटाके फुटले नाहीत. बाकी, सनातन प्रभात मध्ये 10 वर्षापूर्वी महात्मा फुलेंचे निवडक वांगमय छापले आहे. ते वाचले तरी पुरेसे आहे अभ्यास करायला.

चित्रगुप्त 19/09/2023 - 02:49
हल्लीच्या गणेशोत्सवाचे वर्णन आणि महात्मा फुलेंची गणेशस्तुती, दोन्ही जबरदस्त.
ढ्यंड ढ्यंड ढ्यंड ढोलताशांचा कर्णकर्कश गोंधळ ऐकला, बाजारपेठेत कशच्या तरी थातुरमातुर गवताची किंमत तब्बल ५० रुपये लावुन चाललेली लुट पाहिली , प्लॅस्टिक थर्मॉकोलचे मखर , चायनीजच्या माळा, अव्वाच्या सव्वा रेटने विकली जात असलेली सुमार दर्जाच्या पाच फळांच्या पिशव्या पाहिल्या . रस्त्यात टृअ‍ॅफिकला अडचण होत असुनही उभे केलेले मांडव पाहिले, अन माहात्मा फुलेंच्या लेखनाची आठवण झाली.
आजच्या काळात लोकं जास्त वाचन करीत नाहीत, जुने ऐतिहासिक लेखन वाचत नाहीत. नुसतेच कोठेतरी काहीतरी वाचुन मते बनवतात. इन्स्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सॅप युनिव्हर्सिटीच्या काळात आपल्या देशातील लोकोत्तर महापुरुष आणि त्यांचे अभिजात लेखन काळाच्या पडद्याआड चालले आहे , हे पाहुन फार खंत वाटते.
--- अगदी खरे. भारताच्या इतिहासातील लोकोत्तर महापुरुषांनी प्रकट केलेले विचारधन पुन्हा आजच्या वाचकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या फुल्या फुल्या बघून आश्चर्य वाटले.

समाज विघातक. पुस्तक फक्त ब्राह्मण द्वेषातून लिहीले गेले आहे. याच विचारांना सामान्य जनतेला सांगुन मतलबी लोक आपली पोळी भाजत आहे. यामुळेच समाज पुढे न जाता मागे खेचला जातोय. दंगल, तोडफोड आपसातील संबध कलुषित होत आहेत. सरकारकडून, समाज सुधारकां कडून समाज बांधणीची अपेक्षित ना की जे घडून गेले व ज्यावर आजच्या पिढीचा कुठलाच सहभाग अथवा दोष नाही तरीही त्यांनाच वेठीस धरले जात आहे. या आगोदर समाज व्यवस्था, इतीहास काय होता सर्व मिपाकरांना माहीत नाही असे लेखकाने समजू नये.प्रतिसादात फारसे काही लिहीता येणार. सांप्रत विषय अप्रासंगीक म्हणणे चुकीचे होईल पण अवांछित जरूर आहे. जे लिहून ठेवले आहे तेच तेच उगाळण्यात काहीच अर्थ नाही. शिळ्या कढीला उत आणणे फक्त एवढेच म्हणेन. इथे वडलांचे कर्ज मुलगा फेडत नाही तीथे इतीहास दाखवून आजच्या पिढीतील समाजाला दोषारोप करण्यात मुर्ख पणा व लबाड हेतू आहे. इतर समाज सुधारकांनी सुद्धा समाजातील दुर्बल, दुर्लक्षित घटकांसाठी काम केले पण उदो उदो फक्त आणी फक्त शाहू फुले अंबेडकरांचा झाला. जीसकी लाठी उसकी भैंस/बळी तो कान पिळी या न्यायाने सामान्य समाज हाकलला जातो एवढे मात्र खरे. इतीहास वाचून जमत असल्यास चुका सुधाराव्यात ना की खत पाणी घालून त्याची समाजाला घातक आशी विषवल्ली जोपासायची. बाकी लेखकाचे अभिनंदन, लेखनावर भरपूर फटाके उडणार यात शंका नाही. बाकी, उत्सवाचे बाजारीकरण व पर्यावरण इत्यादींवर संपूर्ण सहमत. साहित्य संपादकांनी असा जाती द्वेषावर लेखन संस्थाळवर प्रकाशीत केल्याबद्दल त्यांचाही तिव्र निषेध करतो.

या लेखना मुळे आजच्या काळात गणपती किवां फुले यांना काही फरक पडणार नाही पण काहींचे उखळ तर काहीचें कपाळ पांढरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कंजूस 19/09/2023 - 08:22
वि.द.घाटे यांनी त्यांच्या आत्मकथनात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या विषयावर बराच उजेड पाडला आहे. तो म्हणजे फक्त मतप्रदर्शन नसून काय काय कसे घडत गेले ते मांडलं आहे. स्वानुभव,वर्तमान घडामोडी. फुले हे समाज सुधारक होते आणि त्यांचा विरोध ब्राह्मण्य पाळणाऱ्यांवर होता. असा भेदभाव न पाळणाऱ्यांशी ब्राह्मणांशी सख्य होतं. त्यांनी ज्या संस्था काढल्या त्यावर संचालक म्हणून पुरोगामी ब्राह्मणांनाच नेमले होते. गणेशोत्सव म्हटला तर त्याचा त्रास होण्याचं कारण नाही. त्रास होतो तो उत्सवातील वाईट प्रघातांचा. मोठ्या आवाजात रेकॉर्ड गाणी लावणे हे त्यापैकी एक. नाही तर उत्सव कधी आला आणि संपला हे कळणार नाही. दुसरा एक गुप्त त्रास दुकानदारांना होतो. वर्गणी गोळा करणारे खूप पैसे मागतात. कुणी कोणत्या समाजाने कोणतं दैवत आदरणीय मानायचे हा त्यांचा विषय आहे. पण त्याबाहेर जाऊन दरारा वाढवत आहेत.

In reply to by कंजूस

फुले हे समाज सुधारक होते आणि त्यांचा विरोध ब्राह्मण्य पाळणाऱ्यांवर होता. असा भेदभाव न पाळणाऱ्यांशी ब्राह्मणांशी सख्य होतं. त्यांनी ज्या संस्था काढल्या त्यावर संचालक म्हणून पुरोगामी ब्राह्मणांनाच नेमले होते.
प्रथमदर्शनी असे वाटत नाही. मुळ कविता किंवा कोणतेही दलितांसाठीचे लिहिले गेलेले जुने साहित्य पाहिले तर आलोचनेचा रोख हिंदू देवतांवरच असतो. देवता फक्त ब्राह्मणांच्याच असतील तर वेगळी गोष्ट असते. राम, कृष्ण, गणपती,शंकर, सरस्वती, ब्रह्मदेव कोणीही या टिकेतून सुटलेले नाहित. तत्कालीन समाजात एक वर्ग खूप नाडला गेला होता हे सत्य स्वीकारुन त्यापोटी निर्माण झालेल्या चीडीमधून हे साहित्य प्रसवले असावे असा माझा अंदाज ! फार मनावर घेऊ नये. जुने जाऊद्या मरणालागूनी असे म्हणुन सोडून द्यावे. नव्या युगात विषमता नष्ट कशी होईल याचा काही सामाईक कार्यक्रम असेल तो राबवावा. फारच आरडा ओरडा झाला तर आमचा विरोध ब्राह्नंणांना नाही तर ब्राह्मण्याला आहे असा एक सेफ डायलॉग सदा सदा सर्वदा मुखी बाळगावा.

लेखाची सुरूवात गणेशोत्सवा ने सुरवात केल्याने गैरसमज झाला. विनाशर्त ममनापासुन साहित्य संपादकांची जाहीर क्षमा मागून दिलगीरी व्यक्त करतो. पैजारबुवांनी चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. क लो आ

आजानुकर्ण 19/09/2023 - 18:46
चांगली कविता. फुल्यांनी गोरगरिबांना नाडणाऱ्यांचा चांगलाच समाचार या कवितेतून घेतला आहे. अर्थात मार्कस ऑरेलियस यांचा काडी घालण्याचा हेतू असल्याने त्यांनी अशुद्धलेखनाने बुजबुजलेल्या तळटीपा टाकून पळ काढलेला दिसतोय. किमान या कवितेबाबत त्यांचे आकलन काय आहे हे सांगितले तर बरे होईल.

In reply to by आजानुकर्ण

हेतु: सदर कविता उधृत करण्याचा हेतु अतिषय सरळ आणि सोप्पा आहे. आपले लोकोत्तर समाजसुधारक महात्मा फुले ह्यांचे लुप्तप्राय होत चाललेले अभिजात लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावे. हे लेखन खरेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. हे मी अत्यंत मनापासुन , खर्‍या कळकळीने म्हणत आहे , ह्यात काहीही उपरोध वगैरे नाही. मी आधीच लिहिल्याप्रमाणे - "सुजाण" नागरिक ह्यातुन नक्कीच "ज्याला जो घ्यायचा तो" बोध घेतील अशी आशा आहे !
सर्व भूतां निर्मी धोंड्याचा विठ्ठल ॥ पंढरी सकळ ॥ वेडी केली ॥ १ ॥ विठ्ठलाची मूती ध्यांनीं मनीं धरी ॥ गातां ताल धरी ॥ नाच्यापरी ॥ २ ॥ निर्लज्य होऊनी फुगड्या खेळतो ॥ पक्व्यास घालितो ॥ स्त्रीयांसंगें ॥ ३ ॥ “सुखरूप होशी” उपदेश करी ॥ वेडा वारकरी ॥ जोती म्हणे ॥ ४ ॥ - संदर्भ : पान क्रं. ५०५ , महात्मा फुले समग्र वाङमय
आणि माझे आकलन काय हे माझे मला ठाऊक आहे. मला ते तुम्हाला सांगायची किंव्वा पटवुन द्यायची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही तुमचे अंदाज बांधायला स्वतंत्र आहात. ह्या कवितेवर येणार्‍या लोकांच्या प्रतिक्रिया पाहुन त्यांच्याशी कसे आणि काय बोलायचे हे मला ठरवता येते . आता हेच बघा ना , तुम्हाला ही कविता "चांगली कविता " वाटली आहे it says a lot about you. ! तसेच इतरांच्या प्रतिक्रिया पाहुन ते कसे व्यक्ती आहेत ह्या बद्दल देखील देखील सहज अनुमान बांधता येत आहे ! इत्यलम :)

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 21/09/2023 - 03:24
यापूर्वी तुंम्हाला चातुर्वर्ण्यामुळे झालेले अन्याय इ. विचारले होते, तर प्रश्न विचारणार्या आमच्यासारख्या लोकांना गट क्र. २ मध्ये टाकले होते. तुम्हीं तर त्यांना काही समजवायला जात नाही, फ़क्त स्वांतसुखाय लेखन करता. मग गट क्र. २ चे अग्रणी महात्मा फुले यांची ऐन गणपतीउत्सवात इथे टाकून काय साध्य करायचे आहे? बरं, पुन्हा उपरोध नाही, असेही साळसूदपणे म्हटले आहे. निदान इथेतरी प्रामाणिकपणे खरा हेतू सांगून टाका. महात्मा फुले, आंबेडकर यांच्याबद्दलची तुमची विरोधाभक्ती: http://misalpav.com/comment/1169353#comment-1169353 बाय द वे: तुमची ती मूळ गटांची वर्गवारी सापडली नाही, ती इथे देण्याची हिंमत दाखवा म्हणजे सगळ्यांनाच क्लिअर होईल.

In reply to by स्वधर्म

उपरोध नाहीच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत महात्मा फुले ह्यांचे हे पुरोगामी विचार, हे अभिजात लेखन पोहचले पाहिजे, जेणे करून ते त्यांची मते बनवू शकतील. हाच सरळ स्पष्ट उद्देश आहे. आणि हो , हे लेखनही स्वंत:सुखायच आहे. लोकांची शालेय शिक्सनातील थातूरमातूर पाठ्यक्रम वाचून बनलेली मते बदलताना पाहून , डोळे उघडले जाताना पाहून, किंवा मते अधिक कट्टर होत जाताना, अधिक दीर्घद्वेषयुक्त होत जाताना पाहून मला मनापासून आनंद होतो. बाकी ते गटवारी तुम्हाला आमच्याच अन्य एका लेखात सापडेल. थोडे तरी कष्ट घ्या. ह्या निमित्ताने तुम्ही आमचे अजून काही लेखन वाचाल आणि स्कोर करायला अजुन काही ब्राऊनी पॉइंट्स सापडतील तुम्हाला. आता ह्या लेखावर इतके बास. २

In reply to by स्वधर्म

आजानुकर्ण 22/09/2023 - 22:38
मी झक मारली आणि वेळ घालवला. मार्कस ऑरेलियस यांची मूलभूत मुद्द्यांवर चर्चा करण्याची कुवत आणि तेवढे आकलन नाही. एखादी कविता टाकून गोंधळ उडवून द्यायचा आणि फुल्यांविरुद्ध मने दूषित करायची इतकाच त्यांचा मर्यादित हेतू आहे. वेळ घालवू नका.

In reply to by आजानुकर्ण

एखादी कविता टाकून गोंधळ उडवून द्यायचा आणि फुल्यांविरुद्ध मने दूषित करायची
>>> चला, म्हणजे ही कविता वाचून लोकांची मने दूषित होतील इतके तरी तुम्हाला मान्य आहे. हे ही नसे थोडके ! हे सारं लोकांपर्यंत पोहचले च पाहिजे. ती वारकरी सांप्रदायिक लोकांविषयी ची कविताही जास्तीत जास्त लोकांना माहीत असायला हवी. त्यावर कार्तिकी एकादशीला लेख लिहिणार आहे. त्यातच ज्ञानेश्वरी मधील १२ व्या अध्यायावर माउलींनी जे विवेचन केले आहे , ज्याला ज्ञानेश्वरी चा परमोच्च बिंदू म्हणता येईल त्यावर महापुरुषांनी काय टिप्पणी केली आहे ते ही लिहीन. एकनाथ षष्ठी चया मुहूर्तावर नाथांनी ज्या कृष्णावर नितांत सुंदर एकनाथी भागवत लिहिले , त्या कृष्णबद्दल काय लिहून ठेवले आहे ते लिहीन म्हणतो. शाहू फुले आंबेडकर ह्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सर्वांनाच माहीत असायला हवे.

कविता छान आहे. फुलेंबद्दल सनातनींत द्वेष दिसतो. पण फुले जातीच्या नाहीतर वृत्तीच्या विरूध्द होते हे समजण्याची कूवत तेव्हाच्या सनातनीत नव्हतीच पण आताच्या सनातनीत तर आजिबातच नाही. फुले ब्राम्हण जाती विरूध्द असते तर “भिडे” वाडा मूलींच्या शिक्षणाला घेतला नसता. ब्राम्हण मूलगा दत्तक घेऊन वाढवला नसता. संघटनेत, संस्थेत ब्राम्हण जातीच्या लोकांत स्थान नसते.

Bhakti 20/09/2023 - 11:19
सर्व महापुरुषांनी आज सगळ्या जयंत्या,उत्सवातला डीजेचा उन्माद ,प्लास्टिकचा कचरा,मूर्तीची विसर्जनानंतरची विटंबना पाहिली असती तर समाजसुधारणाचे कार्य सुरूच केले नसते.शेवटी हेच बरोबर.. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडाव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहाचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्यायीजे, मनी पाविजे, चिंत्त लाभिजे, मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि किजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण. ;) :)

आनन्दा 20/09/2023 - 12:59
काय मजा नाही आली राव. अजून फटाके फुटले नाहीत. बाकी, सनातन प्रभात मध्ये 10 वर्षापूर्वी महात्मा फुलेंचे निवडक वांगमय छापले आहे. ते वाचले तरी पुरेसे आहे अभ्यास करायला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड एक गोष्ट आजकाल प्रकर्षाने जाणवते आहे की आजच्या काळात लोकं जास्त वाचन करीत नाहीत, जुने ऐतिहासिक लेखन वाचत नाहीत. नुसतेच कोठेतरी काहीतरी वाचुन मते बनवतात. इन्स्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सॅप युनिव्हर्सिटीच्या काळात आपल्या देशातील लोकोत्तर महापुरुष आणि त्यांचे अभिजात लेखन काळाच्या पडद्याआड चालले आहे , हे पाहुन फार खंत वाटते. विशेष करुन शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ही समाज सुधारकांची विचारधारा अशी लुप्त होत जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे.

२४० वर्षांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

पराग१२२६३ ·

In reply to by अहिरावण

पराग१२२६३ 14/09/2023 - 15:34
प्राचीन काळापासून भारतातील राज्यांचे परकीय राज्यांशी व्यवहार होत होते. शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळात सुमंताकडे परराज्य व्यवहाराची जबाबदारी असे. पण आजच्या आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं मूळ ईस्ट इंडिया कंपनीच्या परराष्ट्र मंत्रालयात मानलं जातं.

In reply to by पराग१२२६३

अहिरावण 15/09/2023 - 10:31
चुकीची मान्यता आहे ती. ज्या गोष्टींचे ब्रिटीशांना क्रेडीट द्यायचे ते जरुर देऊ पण हे चुकीचे क्रेडीट आहे. सुधारणा आवश्यक आहे.

In reply to by अहिरावण

विजुभाऊ 14/09/2023 - 19:52
वेगळ्या पारराष्ट्र मंत्रालयाची संकल्पना कौटिल्याने मांडलेली होती. शिवाजी महाराजांच्या अष्ट्प्रधानांधे परराष्ट्र व्यवहारासंबंधी वेगळा प्रधान होता. संभाजी महाराजानी राजव्यवहारकोष तयार करून घेतला होता. दुर्दैवाने आपल्या इतिहासात ब्रिटिशांनी राजव्यवहार आणला असेच शिकवले जाते. मुघलांना व्यवहार म्हणजे लुलूट आणि दगाबाजी हेच माहीत होते. खरेतर त्यांच्या इतके विषेशतः औरंग्या इतके भारताचे नुकसान इतर कोणत्याही लुटारूने केले नाही.

सातवाहन कालापासून किंबहुना आगोदर पासूनच परराष्ट्र व्यवहार चालू होते. तेर ते तगर या पुस्तकात धाराशिव व रोम यांचे संबंध होते असे वाचल्याचे आठवतेय.

In reply to by अहिरावण

पराग१२२६३ 14/09/2023 - 15:34
प्राचीन काळापासून भारतातील राज्यांचे परकीय राज्यांशी व्यवहार होत होते. शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळात सुमंताकडे परराज्य व्यवहाराची जबाबदारी असे. पण आजच्या आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं मूळ ईस्ट इंडिया कंपनीच्या परराष्ट्र मंत्रालयात मानलं जातं.

In reply to by पराग१२२६३

अहिरावण 15/09/2023 - 10:31
चुकीची मान्यता आहे ती. ज्या गोष्टींचे ब्रिटीशांना क्रेडीट द्यायचे ते जरुर देऊ पण हे चुकीचे क्रेडीट आहे. सुधारणा आवश्यक आहे.

In reply to by अहिरावण

विजुभाऊ 14/09/2023 - 19:52
वेगळ्या पारराष्ट्र मंत्रालयाची संकल्पना कौटिल्याने मांडलेली होती. शिवाजी महाराजांच्या अष्ट्प्रधानांधे परराष्ट्र व्यवहारासंबंधी वेगळा प्रधान होता. संभाजी महाराजानी राजव्यवहारकोष तयार करून घेतला होता. दुर्दैवाने आपल्या इतिहासात ब्रिटिशांनी राजव्यवहार आणला असेच शिकवले जाते. मुघलांना व्यवहार म्हणजे लुलूट आणि दगाबाजी हेच माहीत होते. खरेतर त्यांच्या इतके विषेशतः औरंग्या इतके भारताचे नुकसान इतर कोणत्याही लुटारूने केले नाही.

सातवाहन कालापासून किंबहुना आगोदर पासूनच परराष्ट्र व्यवहार चालू होते. तेर ते तगर या पुस्तकात धाराशिव व रोम यांचे संबंध होते असे वाचल्याचे आठवतेय.
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.

वार्तालाप: नेणतां वैरी जिंकती

विवेकपटाईत ·

लिओ 01/09/2023 - 18:42
छान लिहिले आहे. एक प्रश्न राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हि ओवी फक्त नेहेरुंनीच आचरणात घेण्याची गरज होती काय ? समर्थांची ही ओवी फक्त नेहेरुंसाठी लिहिलि होती का ??

Nitin Palkar 01/09/2023 - 19:03
मोजक्या शब्दात चांगला आशय मंडला आहे. समर्थ रामदासांचे कार्य महानच आहे. नेहरूंच्या अनेक चुकांपैकी एकच तुम्ही दाखवली आहे. अनेकांना ते सलू शकेल. राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हे सदा सर्वदा सत्य आहे.

अहिरावण 01/09/2023 - 19:09
आता पुढील ओव्यांचे प्रवचन करतांना खालिल क्रमाने नेते घ्या, नेहरुंना सध्या विश्रांती द्या बोस शास्री पटेल नंदा इंदिरा गांधी संजय गांधी रा़जीव गांधी चंद्रशेखर वीपीसिंग नरसिंह राव अटल बिहारी सोनीया गांधी मनमोहन सिंग नरेंद्र मोदी आणि हो, विश्लेषण करतांना यांच्या चुकाच दाखवा. नाहीतर सोईने त्यांचे गोडवे गाल. नसेल जमत तर निदान यांच्या चुका दाखवा सावरकर गांधी इतकेही नसेल जमत तर परखडपणे तुमची स्वतःची चुक दाखवा बघु दासबोध किती उमजला आहे तुम्हाला ते

सर टोबी 01/09/2023 - 20:22
लुबाडला गेलेला देश. जिथे अन्नधान्य, अवजारं, वाहतुकीची साधनं या सर्वांची वानवा होती. भरीला शिक्षण, आरोग्य, सिंचन, दळणवळण या महत्वाच्या प्राथमिकता होत्या. अशा खचलेल्या देशाची धुरा वाहणाऱ्यांनी कधीही दुसऱ्याला किंवा परिस्थीला दोष दिला नाही. त्या उलट, एक प्रबळ लष्कर असतांना चीनच्या नव्या आक्रमकतेपुढे मौनात गेलेल्या सध्याच्या नेतृत्वाची काहीही करून री ओढायची असा खाक्या आहे. दासबोधाचं निरूपण फक्त निमित्त आहे.

भागो 02/09/2023 - 08:51
दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी>>> कोण हे नेहरू? माझ्या माहितीप्रमाणे "नेहरू" ही एक प्रधान खुंटी आहे. कुणीही यावे टपली मारून जावे. कुणीही यावे नि त्यावर काहीही लटकावून जावे. नेहरू नसते तर ह्या देशाचे काय झाले असते? जाता जाता दासबोधाचे हिंदी/गुजराती भाषांतर आहेका? नसेल तर मग मोठ्या लोकांचे काही खरे नाही रे बाबा.

In reply to by भागो

नेहरूंहद्दल ”जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” असे म्हणावेसे वाटते. वाईट काळात ज्याने घर सावरलं, श्रीमंती आणली , त्यालाच नंतरच्या नालायक पिढ्या शिव्या देतात अशी अवस्था नेहरूंची झालीय. पण ह्यामूळे नेहरूंचे महत्व आजीबात कमी होत नाही. नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. मोतीलाल नेहरूंनी कोंग्रेसला भरमसाठ पैसा लावला होता, इंदिरा गांधींबद्दल तर काय वर्णावे? वाघीन होती भारताची. असो. कूठे राजा भोज…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 04/09/2023 - 13:43
नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. आणि आपण त्यांची गुलामगिरी आणि लोकशाही च्या नावाखाली आपण त्यांची घराणेशाही चालू दयायची असेच ना

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 04/09/2023 - 10:10
जिथे तुम्ही विषयाला धरुन लिहित नाही तिथे प्रतिसाद कसे काय येतील? तुम्ही राजनीती आणता आम्ही नाही

चित्रगुप्त 02/09/2023 - 21:51
अज्ञानात असणारे 'सुख'(असलेच तर) तोपावेतोच टिकून रहाते, जोवर तुमच्याहून अधिक ज्ञानी- जाणकार येऊन तुमच्या डोक्यावर बसत नाही. त्या त्या काळी उपलब्ध असलेले 'तंत्रज्ञान' ज्यांनी जाणतेपणे वापरले (मुळात असे तंत्रज्ञान विकसित केले-) त्यांचा विजय होत असल्याची उदाहरणे इतिहासात विपुल मिळतात. समर्थांनी केलेल्या छ्त्रपतींच्या वर्णनात आलेले 'जाणता राजा' हे विशेषण महत्वाचे आहे: निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

लिओ 01/09/2023 - 18:42
छान लिहिले आहे. एक प्रश्न राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हि ओवी फक्त नेहेरुंनीच आचरणात घेण्याची गरज होती काय ? समर्थांची ही ओवी फक्त नेहेरुंसाठी लिहिलि होती का ??

Nitin Palkar 01/09/2023 - 19:03
मोजक्या शब्दात चांगला आशय मंडला आहे. समर्थ रामदासांचे कार्य महानच आहे. नेहरूंच्या अनेक चुकांपैकी एकच तुम्ही दाखवली आहे. अनेकांना ते सलू शकेल. राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हे सदा सर्वदा सत्य आहे.

अहिरावण 01/09/2023 - 19:09
आता पुढील ओव्यांचे प्रवचन करतांना खालिल क्रमाने नेते घ्या, नेहरुंना सध्या विश्रांती द्या बोस शास्री पटेल नंदा इंदिरा गांधी संजय गांधी रा़जीव गांधी चंद्रशेखर वीपीसिंग नरसिंह राव अटल बिहारी सोनीया गांधी मनमोहन सिंग नरेंद्र मोदी आणि हो, विश्लेषण करतांना यांच्या चुकाच दाखवा. नाहीतर सोईने त्यांचे गोडवे गाल. नसेल जमत तर निदान यांच्या चुका दाखवा सावरकर गांधी इतकेही नसेल जमत तर परखडपणे तुमची स्वतःची चुक दाखवा बघु दासबोध किती उमजला आहे तुम्हाला ते

सर टोबी 01/09/2023 - 20:22
लुबाडला गेलेला देश. जिथे अन्नधान्य, अवजारं, वाहतुकीची साधनं या सर्वांची वानवा होती. भरीला शिक्षण, आरोग्य, सिंचन, दळणवळण या महत्वाच्या प्राथमिकता होत्या. अशा खचलेल्या देशाची धुरा वाहणाऱ्यांनी कधीही दुसऱ्याला किंवा परिस्थीला दोष दिला नाही. त्या उलट, एक प्रबळ लष्कर असतांना चीनच्या नव्या आक्रमकतेपुढे मौनात गेलेल्या सध्याच्या नेतृत्वाची काहीही करून री ओढायची असा खाक्या आहे. दासबोधाचं निरूपण फक्त निमित्त आहे.

भागो 02/09/2023 - 08:51
दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी>>> कोण हे नेहरू? माझ्या माहितीप्रमाणे "नेहरू" ही एक प्रधान खुंटी आहे. कुणीही यावे टपली मारून जावे. कुणीही यावे नि त्यावर काहीही लटकावून जावे. नेहरू नसते तर ह्या देशाचे काय झाले असते? जाता जाता दासबोधाचे हिंदी/गुजराती भाषांतर आहेका? नसेल तर मग मोठ्या लोकांचे काही खरे नाही रे बाबा.

In reply to by भागो

नेहरूंहद्दल ”जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” असे म्हणावेसे वाटते. वाईट काळात ज्याने घर सावरलं, श्रीमंती आणली , त्यालाच नंतरच्या नालायक पिढ्या शिव्या देतात अशी अवस्था नेहरूंची झालीय. पण ह्यामूळे नेहरूंचे महत्व आजीबात कमी होत नाही. नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. मोतीलाल नेहरूंनी कोंग्रेसला भरमसाठ पैसा लावला होता, इंदिरा गांधींबद्दल तर काय वर्णावे? वाघीन होती भारताची. असो. कूठे राजा भोज…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 04/09/2023 - 13:43
नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. आणि आपण त्यांची गुलामगिरी आणि लोकशाही च्या नावाखाली आपण त्यांची घराणेशाही चालू दयायची असेच ना

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 04/09/2023 - 10:10
जिथे तुम्ही विषयाला धरुन लिहित नाही तिथे प्रतिसाद कसे काय येतील? तुम्ही राजनीती आणता आम्ही नाही

चित्रगुप्त 02/09/2023 - 21:51
अज्ञानात असणारे 'सुख'(असलेच तर) तोपावेतोच टिकून रहाते, जोवर तुमच्याहून अधिक ज्ञानी- जाणकार येऊन तुमच्या डोक्यावर बसत नाही. त्या त्या काळी उपलब्ध असलेले 'तंत्रज्ञान' ज्यांनी जाणतेपणे वापरले (मुळात असे तंत्रज्ञान विकसित केले-) त्यांचा विजय होत असल्याची उदाहरणे इतिहासात विपुल मिळतात. समर्थांनी केलेल्या छ्त्रपतींच्या वर्णनात आलेले 'जाणता राजा' हे विशेषण महत्वाचे आहे: निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥
लेखनविषय:
लेखनप्रकार
नेणतां वैरी जिंकती. नेणतां अपाई पडती. नेणतां संहारती घडती. जीवनाश. समर्थ म्हणतात नेणते पणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो. या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो. समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे.

अमेरिकेतील रस्ते -१

साहना ·

चित्रगुप्त 17/08/2023 - 23:57
वा. लेखमाला सुरू केलीत हे खूपच छान झाले. आता मुलाबरोबर गाडीतून जात असताना मुद्दाम बघत जाईन. पुढल्या एकाद्या भागात रस्त्यांची नावे कशी ठरवली जातात, उदा. कोर्ट, अवेन्यू, लेन, बुल्वार, रोड, स्ट्रीट इत्यादि बरेच प्रकार असतात त्यांचे वेगवेगळे अर्थ काय असतात हे दर्शवणारी आकृती दिल्यास फार उपयोगी होइल. पु.भा.प्र.

चित्रगुप्त 18/08/2023 - 00:14
आत्ता सहज गूगलाळवताना खालील चित्र दिसले. असेही काही असते हे बघून मौज वाटली. या सगळ्या प्रकारचे रस्ते एकाच आकृतीत देणारे चित्र मिळाले तर एकदम स्पष्ट कल्पना येईल. .

निमी 18/08/2023 - 04:54
साहना, आपल्या विविध लेखन मधून आपले सखोल ज्ञान तर दिसतेच पण त्याचबरोबर ते उत्तम पद्धतीने आपण देत आहात याचे विशेष कौतुक..पुलेप्र...काही शब्द अनेक महिन्यांनी पुन्हा वाचताना मजा वाटली..उदाहरणार्थ ठोंब्या!!

भुजंग पाटील 18/08/2023 - 08:23
पण ह्या सर्वांत एक विलक्षण गोष्ट आहे जी अगदी अमेरिकन मंडळींना सुद्धा ठाऊक नसते.
हो, कारण निळे रिफ्लेक्टर्स अगदी अलीकडेच (२००५ पासून) वापरात आले आहेत. सेंटर टर्न लेन ला सुसाईड लेन पण म्हणतात.

मालिका उत्तम होणार. पुभाप्र दुसरा फोटो भारतातील दक्षिणेकडील वाटतो आहे. त्याच्यावरचे वाक्य तुम्हाला रेषा अतूट तूटक होई पर्यंत गाडी चालवावी लागेल. असे आहे का?

चित्रगुप्त 17/08/2023 - 23:57
वा. लेखमाला सुरू केलीत हे खूपच छान झाले. आता मुलाबरोबर गाडीतून जात असताना मुद्दाम बघत जाईन. पुढल्या एकाद्या भागात रस्त्यांची नावे कशी ठरवली जातात, उदा. कोर्ट, अवेन्यू, लेन, बुल्वार, रोड, स्ट्रीट इत्यादि बरेच प्रकार असतात त्यांचे वेगवेगळे अर्थ काय असतात हे दर्शवणारी आकृती दिल्यास फार उपयोगी होइल. पु.भा.प्र.

चित्रगुप्त 18/08/2023 - 00:14
आत्ता सहज गूगलाळवताना खालील चित्र दिसले. असेही काही असते हे बघून मौज वाटली. या सगळ्या प्रकारचे रस्ते एकाच आकृतीत देणारे चित्र मिळाले तर एकदम स्पष्ट कल्पना येईल. .

निमी 18/08/2023 - 04:54
साहना, आपल्या विविध लेखन मधून आपले सखोल ज्ञान तर दिसतेच पण त्याचबरोबर ते उत्तम पद्धतीने आपण देत आहात याचे विशेष कौतुक..पुलेप्र...काही शब्द अनेक महिन्यांनी पुन्हा वाचताना मजा वाटली..उदाहरणार्थ ठोंब्या!!

भुजंग पाटील 18/08/2023 - 08:23
पण ह्या सर्वांत एक विलक्षण गोष्ट आहे जी अगदी अमेरिकन मंडळींना सुद्धा ठाऊक नसते.
हो, कारण निळे रिफ्लेक्टर्स अगदी अलीकडेच (२००५ पासून) वापरात आले आहेत. सेंटर टर्न लेन ला सुसाईड लेन पण म्हणतात.

मालिका उत्तम होणार. पुभाप्र दुसरा फोटो भारतातील दक्षिणेकडील वाटतो आहे. त्याच्यावरचे वाक्य तुम्हाला रेषा अतूट तूटक होई पर्यंत गाडी चालवावी लागेल. असे आहे का?
लेखनविषय:
तुम्ही अमेरिकेत कुठल्याही रस्त्यावरून प्रवास करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट आढळेल. बहुतेक रस्ते हे दुतर्फा असतील आणि मध्यभागी एक बहुतांशी पांढर्या रंगाची ओळ असेल जी लेन डिव्हाईड करते. अनेक प्रकारच्या ओळी इथे शक्य आहेत पण आम्ही ४ प्रकार पाहु. १. पांढरी अतूट रेखा पांढरी रेखा नेहमी एकाच दिशेने प्रवास करणाऱ्या लेन्स ना आखते. पण ती अतूट असली तर त्याचा अर्थ होतो कि तुम्हाला लेन बदलण्यास मनाई आहे. लेन बदलणे किंवा दुसरी लेन वापरून पुढील वाहनास "टेक ओव्हर" करण्यास मनाई आहे. टेक ओव्हर किंवा ओव्हरटेक ह्याला अमेरिकेत "पासिंग" म्हटले जाते. वळणे, पूल अश्या विविध ठिकाणी तुम्हाला हि ओळ सापडेल.

पाहिले म्यां डोळा..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मृत्यू! एक भयभीत करणारा शब्द! पण जन्मलेल्या प्रत्येकाला तो अटळ आहे. मृत्यूचा विषय निघाला की बरेच जण रादर सगळेच गंभीर होतात. नको तो अभद्र विषय अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया असते. काहीजण मात्र थोड्या वेगळ्या प्रतिक्रिया देतात, अर्थात् त्यातली अटळता स्वीकारुन. "येईल तेव्हा बघू. आत्तापासूनच कशाला काळजी?" "मरणाच्या भीतीने काय काही मजा करायचीच नाही?" "भीतीपोटी काय घाबरत घाबरत जन्म काढायचा की काय?" "येऊ दे. यायचा तेव्हा येईल. तेव्हाचं तेव्हा बघता येईल. " "प्रत्येकाला जायचंच आहे. कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. " "मरणात खरोखर जग जगते." कुणीतरी मरतं त्याचवेळी कुणीतरी जन्म घेतं.

ना. धों. महानोर-एक सांगितिक श्रद्धांजली

राजेंद्र मेहेंदळे ·

जितके वर जाल तेव्हढी दृष्टी विशाल होईल. राया माझे हात तुझ्या हातात गुंफूनी उन्हात चांदण आलं लाज पांघरूनी काय अप्रतिम उपमा आहे ,तोड नाही. येणाऱ्या पिढ्यांसाठी हा खजीना ठेवून गेले. आदरांजली.

टीपीके 04/08/2023 - 18:33
आयला, "राजसा जवळी जरा बसा" पण यांचीच? अफाट आणि वेगळंच लिहायचा हा माणूस. आपल्याला मराठी कळत नाही याची जाणीव यांच्यासारख्या कवींनी प्रकर्षाने करून दिली. अजूनही अनेक शब्द अनोळखीच आहेत.

nutanm 05/08/2023 - 06:01
छान लेख पण फारच कमी‌ लिहिलाय‌. अजून‌ ‌जास्त भावना‌. व्यक्त व्हायला हव्यात कारण ‌आमच्याच. भावना ‌तुम्ही‌. लिहितायत‌. असे‌. वाटतेय. म्हणून ‌सांगणयाचा खटाटोप.

मित्रहो 05/08/2023 - 17:46
गावरान कविता छान आल्यात. आणखीन आल्या असत्या तर अजून छान झाले असते.

ना.धों.महानोर महाकवी आहेत, गीतकार म्हणून ते मोठेच आहेत पण त्यांच्या गीतांना ज्यांनी ज्यांनी साज चढवला त्यात गायक, संगीतकार, यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ही गाणी घराघरात आणि प्रत्येकाच्या ओठी झाली. श्रीधर फडक्यांनी गायलेलं 'अवेळीच केव्हा दाटला अंधार, तिला गळा जड झाले काळे सर' आहे. लता मंगेशकर यांनीच गीतांचं सोनं केलेलं 'आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या, एकांताच्या पारावर हीरमुसल्या डहाळ्या' यातलं 'काही केल्या करमेना, कसा जीवच लागेना' काळजात हुरहुर लावते. तसंच लता मंगेशकरांचंच 'किती जिवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरु टाकलं. हे एक वेगळंच गाणं. तर, घन ओथंबून येती याचं संगीत बोलांनी गाणं कायम मनात रुंजी घालते. अशी सगळीच गाणी ती वेगळी आहेत. जैत रे जैत मधली गाणी तशीच. आता लिहिण्याचा कंटाळा आलाय नाय तर, मोठं दळण केलं असतं. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 07/08/2023 - 17:21
व्वा, खुप सुंदर !
पण हा लिहिण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा विषय आहे.
अगदी खरंय .. पण लिहून त्या अनुभावांना उजाळा दिलात ... क्या बात ! ना. धों. महानोरां यांच्या गाण्यांनी आपल्या हृदयाचा एक कप्पा कायमचा काबीज केला आहे !

सौंदाळा 07/08/2023 - 18:57
सुंदर लेख. ना. धों ची केवळ निसर्ग कविता नाही तर शृंगारीक कविता पण छानच आहे. थोडे अवांतर - सध्या मारुती चितमपल्ली यांचे 'रानवाटा' हे पुस्तक वाचत आहे. ना. धों ना निसर्गकवी म्हटल्यावर मारुती चितमपल्ली हे निसर्ग लेखक म्हटले पाहिजे. खूप सुंदर लिहितात.

जितके वर जाल तेव्हढी दृष्टी विशाल होईल. राया माझे हात तुझ्या हातात गुंफूनी उन्हात चांदण आलं लाज पांघरूनी काय अप्रतिम उपमा आहे ,तोड नाही. येणाऱ्या पिढ्यांसाठी हा खजीना ठेवून गेले. आदरांजली.

टीपीके 04/08/2023 - 18:33
आयला, "राजसा जवळी जरा बसा" पण यांचीच? अफाट आणि वेगळंच लिहायचा हा माणूस. आपल्याला मराठी कळत नाही याची जाणीव यांच्यासारख्या कवींनी प्रकर्षाने करून दिली. अजूनही अनेक शब्द अनोळखीच आहेत.

nutanm 05/08/2023 - 06:01
छान लेख पण फारच कमी‌ लिहिलाय‌. अजून‌ ‌जास्त भावना‌. व्यक्त व्हायला हव्यात कारण ‌आमच्याच. भावना ‌तुम्ही‌. लिहितायत‌. असे‌. वाटतेय. म्हणून ‌सांगणयाचा खटाटोप.

मित्रहो 05/08/2023 - 17:46
गावरान कविता छान आल्यात. आणखीन आल्या असत्या तर अजून छान झाले असते.

ना.धों.महानोर महाकवी आहेत, गीतकार म्हणून ते मोठेच आहेत पण त्यांच्या गीतांना ज्यांनी ज्यांनी साज चढवला त्यात गायक, संगीतकार, यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ही गाणी घराघरात आणि प्रत्येकाच्या ओठी झाली. श्रीधर फडक्यांनी गायलेलं 'अवेळीच केव्हा दाटला अंधार, तिला गळा जड झाले काळे सर' आहे. लता मंगेशकर यांनीच गीतांचं सोनं केलेलं 'आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या, एकांताच्या पारावर हीरमुसल्या डहाळ्या' यातलं 'काही केल्या करमेना, कसा जीवच लागेना' काळजात हुरहुर लावते. तसंच लता मंगेशकरांचंच 'किती जिवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरु टाकलं. हे एक वेगळंच गाणं. तर, घन ओथंबून येती याचं संगीत बोलांनी गाणं कायम मनात रुंजी घालते. अशी सगळीच गाणी ती वेगळी आहेत. जैत रे जैत मधली गाणी तशीच. आता लिहिण्याचा कंटाळा आलाय नाय तर, मोठं दळण केलं असतं. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 07/08/2023 - 17:21
व्वा, खुप सुंदर !
पण हा लिहिण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा विषय आहे.
अगदी खरंय .. पण लिहून त्या अनुभावांना उजाळा दिलात ... क्या बात ! ना. धों. महानोरां यांच्या गाण्यांनी आपल्या हृदयाचा एक कप्पा कायमचा काबीज केला आहे !

सौंदाळा 07/08/2023 - 18:57
सुंदर लेख. ना. धों ची केवळ निसर्ग कविता नाही तर शृंगारीक कविता पण छानच आहे. थोडे अवांतर - सध्या मारुती चितमपल्ली यांचे 'रानवाटा' हे पुस्तक वाचत आहे. ना. धों ना निसर्गकवी म्हटल्यावर मारुती चितमपल्ली हे निसर्ग लेखक म्हटले पाहिजे. खूप सुंदर लिहितात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांनी ना. धों. महानोरांबद्दल मिपावर सुंदर लेख लिहीला आहेच, पण तरीही राहवले नाही म्हणुन माझ्याकडुनही चार ओळी ======================================= ना. धों. महानोर गेल्याचे काल पेपरात वाचले. आणि सर्रकन मन भूतकाळात गेले. मी चौथी/पाचवीत असेन. नुकतेच रंगीत टि.व्ही. आले होते आणि त्यावर "चिंब पावसानं रान झालं आबादानी" गाणं लागलं होतं. सूर्/ताल वगैरे कळण्याचं वय नव्हतं तरीही ते धिन तांग तांग्,धिधिन तांग तांग डोक्यात बसलं. गाणं आवडुन गेलं. पुढे कित्येक दिवस तेच मनात घोळत होतं. मग रेडिओवर "मी काट्यातुन चालुन थकले" ऐकलं आणि तेही आवडलं.