संस्कृती

नाणी ते नोटा छपाई : नाशिक उद्योग ०७

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
19 May 2017 - 2:26 pm

पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती.

धोरणसंस्कृतीइतिहाससमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचार

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
2 May 2017 - 7:32 pm

आगमन निर्गमन आणि पुनरागमन ह्या तीन संकल्पना आपण कुठल्याही समाजाला किंवा असामान्य आणि सामान्य व्यक्तींच्या आयुष्याला लावून पाहू शकतो. जेव्हा समाज किंवा व्यक्ती आगमन, निर्गमन किंवा पुनरागमानापैकी कुठल्याही एका वादळात सापडतात तेव्हा त्या वादळाला त्यांनी ज्या प्रकारे तोंड दिले त्यावरून त्यांचा भविष्यकाळ ठरतो.

संस्कृतीआस्वाद

होशंगाबादला काय काय बघावे? मिपाकर हैत का तिथे ?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
2 May 2017 - 3:06 pm

मित्रहो, उद्या संध्याकाळी मी होशंगाबादला पोहोचून ४ दिवस तिथे रहाणार आहे. बहुशः मोकळाच असेन. तरी तिकडे काय काय बघण्यासारखे आहे ? नर्मदेचे सौंदर्य बघायला सर्वोत्तम जागा/वेळ कोणती? काही प्राचीन अवशेष, किल्ला, जंगल वगैरे आहेत का ? शिवाय कोणी मिपाकर आहेत का ? कळवावे.
जायचे अचानक ठरल्याने आधी विचारणा करता आली नाही. कदाचित तिथे नेट नसेल, त्यामुळे तिथे मिपाकर कुणी असतील तर मला कृपया फोनने संपर्क करावा.
९९५३९०८२२१.

संस्कृतीप्रवासभूगोलप्रकटनअनुभवसल्लामाहितीचौकशीविरंगुळा

अक्षय्य तृतीया

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
28 Apr 2017 - 6:28 pm

अक्षय्य तृतीया म्हणलं कि मुहूर्ताची सोनेखरेदी, आंब्याच्या सीझन मुळे दुपारच्या जेवणाला आमरस पुरी अश्या गोष्टी आठवतात. मला मात्र ह्या दिवशी कायम 'घोसाळ्याचा (घोसावळ्याचा) वेल आणि बालपणीचे दिवस' आठवतात.

संस्कृतीप्रकटनविचार

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
27 Apr 2017 - 7:36 pm

भारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता?

परमार्थाच्या आवरणाखाली लपवलेला पण सदासर्वकाळ जागृत असलेला स्वार्थ; पुनर्जन्म संकल्पनेतुन स्वकेंद्री बनलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या वर्तुळांचा बनलेला समाज; जन्माधारीत जातीव्यवस्थेतून तयार झालेली शोषणमूलक समाजव्यवस्था; दैवतीकरण, बालविवाह, हुंडा व सतीप्रथा या सर्वांतून होणारे स्त्रीशोषण आणि कामसूत्राचा इतिहास असूनही लैंगिक संबंधांमध्ये असलेला चोरटेपणा; हे सर्व आपले पूर्वसंचित होते.

संस्कृतीआस्वाद

बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
26 Apr 2017 - 2:14 pm

h

.
.
(प्रासंगिक)

सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत.

धोरणमांडणीसंस्कृतीकलाजीवनमानतंत्रप्रकटनविचारप्रतिसादशिफारसमाहितीप्रतिभा

आगमन, निर्गमन पुनरागमन (भाग ४)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
25 Apr 2017 - 6:54 pm

माझ्या आयुष्यात कन्नड साहित्य उशीरा आले. तोपर्यंत मराठी साहित्याने माझ्या मनावर गरूड केले होते. (इथे साहित्य हा शब्द मी कथा आणि कादंबरी इतक्या मर्यादित अर्थानेच वापरला आहे. त्यात वैचारिक लेखन गृहीत धरलेले नाही.) पण उशीरा येऊनसुद्धा एक मात्र स्पष्ट जाणवले की मी वाचलेले कन्नड साहित्य मी वाचलेल्या मराठी साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. बहुतांश मराठी कादंबऱ्या मला व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि व्यक्ती किंवा व्यक्ती आणि त्याचा समाज यांच्यापैकी कुठल्यातरी एकाच नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या वाटल्या.

संस्कृतीआस्वाद

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
24 Apr 2017 - 7:15 pm

भारतीपूरच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असते मंजुनाथाचे मंदिर. हा मंजुनाथ भारतीपूरच्या पंचक्रोशीत आपली सत्ता गाजवत असतो. त्यासाठी त्याचा सहाय्यक असतो भूतराया नावाचा देव. तो अंगात येतो आणि लोकांवर वचक ठेवतो. मंजुनाथ सर्वशक्तिमान पण निष्क्रिय असतो तर भूतराया सेवक पण क्रियाशील असतो. या भूतरायाची कीर्ती इतकी मोठी की प्रत्यक्ष राष्ट्रपती त्याच्या दर्शनाला येऊन जातात आणि प्रसाद म्हणून कपाळभर कुंकू माखून घेतात. भूतरायाचा प्रभाव एव्हढा मोठा की भारतीपूरमध्ये कोणीही आपले वाद विवाद कोर्टात घेऊन जात नाही. सगळे वादविवाद भूतरायच्या मर्जीने सुटतात.

संस्कृतीआस्वाद

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
23 Apr 2017 - 11:09 am

सधन ब्राह्मण जमीनदार कुटुंबातील एकुलता एक मुलगा परदेशी शिक्षणासाठी जातो. त्याचे नाव जगन्नाथ. तिथे एका भारतीय वंशाच्या आंग्ल युवतीबरोबर लग्न न करता राहतो. मद्यपान आणि मांसाशन करतो. क्रांतीच्या गप्पा मारतो. पण तो सगळ्यांशी जुळवून घेत खोटे खोटे जगतो असे त्याला कायम जाणवत असते. ई एम फॉर्स्टर या नोबेल पारितोषिकविजेत्या लेखकाच्या विचारांचा तो अभ्यास करत असतो. पण वर्गकलह आणि दांभिकपणा या फॉर्स्टरच्या लेखनविषयाबाबत तो स्वतःची म्हणता येतील अशी स्वतंत्र मतेदेखील तयार करू शकत नसतो. त्या मागचे कारण म्हणजे आपण आयुष्याला सर्वांगाने जाणत नाही, केवळ पुस्तकांतून ओळखतो, हेच असावे असे त्याला वाटते.

संस्कृतीआस्वाद

पुस्तकं

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
23 Apr 2017 - 9:21 am

पुस्तकं जिवंत असतात.
जन्माला यायच्या आधीच लेखकाच्या हृदयात ती धडधडत असतात. एखादं नवजात पुस्तक हळुवार जवळ घेतलंत तर जावळांचा वासही येतो.
अनोळखी हातात ती आधी फडफडतात पण एकदा त्या हातानी आपलं म्हणलं की त्याच्या नजरेखाली शांत निवांत होतात.

काही पुस्तकं वाढतात,विकसित होतात, थोर होतात आभाळएवढी; काही खुरटी च राहतात.
अधलीमधली सामान्य माणसासारखी आयुष्यभर अजून एक पायरी वर चढायची धडपड करत राहतात.
पुस्तकांना आकांक्षा असतात
कधी व्यक्त कधी लपलेल्या..
डोळ्यातून उरात झिरपत राहणाऱ्या...
पुस्तकांचीही स्वप्नं असतात
स्वप्नांना पोसतात पुस्तकं..

वावरसंस्कृतीधर्मवाङ्मयप्रकटनशुभेच्छा