आरक्षण....! समाजातील ज्वलंत आणि संवेदनशील मुद्दा. मग ते गुजरातेत पटेल आरक्षणासाठी पेटलेलं रण असो की, महाराष्टातील मराठा,धनगर किंवा मुस्लिम आरक्षणाची मागणी असो, या सा-यामागे निव्वळ राजकारण आणि जातीच्या मतांसाठी राखुन ठेवलेलं एक हत्यार म्हणूनच राजकारणी लोकं उपयोग करवून घेतांना दिसून येतय. मुळात आरक्षण हवय कशाला..? त्याची गरज खरचं कुणाला आहे, याकडे कुणाचच लक्ष नाहीय. सगळेच आपल्या पेटीत जास्तीचे मतं कशी पडतील याकडेच लक्ष ठेउन आहेत. त्यात अजुन भगवं,हिरवं,निळं,पिवळं वादळ आहेच समाज पेटवायला. ओपन वर्गात मोडणारे सर्वच लोक खरचं प्रगत आणि उन्नत आहेत काय..? आरक्षणाचे निकष आज खरचं योग्य आहेत काय...?