राजकारण

बांग्लादेशची सुरक्षास्थिती आणि भारता समोरचे आव्हान

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 8:01 am

बांग्लादेशात असुरक्षीतता नवीन नसावी, कडवे लोक हिंसेच्या माध्यमातून व्यवस्था हातात घेण्यास आतूर होताना दिसतात. गेल्या दोन दिवसा पुर्वी ढाक्यातील परदेशी दूतावास क्षेत्रातील परदेशी लोकांचा वावर असलेल्या बेकरीवरील दहशतवादी हल्ला, बांग्लादेशातील सुरक्षा व्यवस्थेची समस्या हाताच्या बाहेर जात नाहीए ना अशी साशंकता निर्माण करतो.

समाजराजकारणविचारबातमी

...आणि मॅनीमल प्ल्यानेटात निवडून येताना .... :( :( :( :) :) :)

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
8 Jun 2016 - 3:01 pm

"आहा लssय भारी, मी उत्तर, दक्षीण, पूर्व आणि पश्चिमच्या मतदारांपासून आभार व्यक्त करण्यास सुरवात करतो. दिस लय महत्वाचे हाएत, मोठ्ठे मोठ्ठे आकडे लागताहेत. :) :)

कस्स सांगू तुमच्या पाठींब्यामुळे मला कित्ती म्हणूण अत्यानंद झाला आहे. :) कुण्णीपण विचारही करु शकणार नाही ते तुमच्या पाठींब्यामुळे साध्य होणार हाय. तुम्हाला माहितीए साध्य काय हाय त्ये :)

आज राजखारणात नवा इति-हास खेळण्याची वेळ आली हाय. आज राज्या राज्यातून पाठींबा मिळत आहे. कित्ती मस्त वाटतयं कित्ती मस्त वाटतय, :) हो क्की नाही ? :) :)

इतिहाससमाजभूगोलगुंतवणूकराजकारणस्थिरचित्रविरंगुळा

आयड्याबाज

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 4:37 pm

गांव जन्मल्यापासून म्हणा किंवा मग देशात आमदार-खासदार निवाडायची प्रथा चालु झाल्यापासून म्हणा, पहिल्यांदाच या गावाला कुणी आमदार भेट द्यायला येणार होता. मागचे इलेक्शन झाल्यापासुन जवळपास पाच वर्षात या गावाची लोकसंख्या दोनावरून चारावर गेली. बहुदा त्याचेच गणित बांधुन ही भेट योजिलेली असावी.

कथाविनोदराजकारण

कोहीनूर हिरा, .. आणि इतिहासाच्या मागील पानावरुन पुढे जाताना .. ..

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
19 Apr 2016 - 12:54 pm

सोने असो वा जड जवाहीर यांच्यावर निव्वळ अय्याशीखातर आयातीसाठी परकीय चलन वाया घालवावे एवढे नक्कीच महत्वाचे नाहीत. पण काही गोष्टींना सांस्कृतीक वारशाचे महत्व असते, अशा वारशा सोबत अस्मिता जोडल्या गेल्या असतात. एखादी गोष्ट तुम्ही बाजारात सहज विकायला ऑक्शनमध्ये ठेवता आणि कुणि विकत घेऊन जाते तर तुमचा अभिमान आणि तुमचे मन दुखावले जात नाही. पण कुणि तुमच्या पराभवाचा लाभ घेऊन वस्तु आणि तेही अस्मिता जोडलेली सांस्कृतीक वारसा असलेली असेल तर समाजमनाचा हळवा कोपरा दुखावला जातोच. अस्मिता हिरावलं जाण्याचं हे खुपणं वस्तु हिरावून घेऊन जाणार्‍यांना लक्षात येतच असं नाही.

संस्कृतीइतिहासदेशांतरराजकारण

मारीचझंपीचे (बंगाली) कम्युनीस्ट ( )मृग ( )

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
18 Apr 2016 - 5:24 pm

आंतरजाल न्याहाळताना कोणतीशी दडपशाहींची यादी नजरे समोर उगवली, सहसा दडपशाहीच्या कथांमध्ये केवळ पात्रे बदललेली मनुष्य सर्वत्र सारखा असतो असा विचार करत फारसे डिटेल्स न वाचता वेगाने पुढे गेलो पण एक वेगळच नाव दिसलं मारीचझंपी, स्थळनामांची गमंत असते काय असेल या स्थळनामा मागे या उत्सुकतेने डिटेल्स उघडले. मारीचझंपी हे एक बेट आहे, पश्चिम बंगालच्या सुंदरबनातील एक संरक्षीत वन्यक्षेत्र हे लक्षात आलं.

इतिहासराजकारण

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
9 Apr 2016 - 6:49 pm

वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
1 Apr 2016 - 5:46 pm

नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली.

संस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयसाहित्यिकराजकारणप्रकटनलेखमतविरंगुळा

१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
25 Mar 2016 - 3:49 pm

पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे.
वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा.

राजकारणप्रकटन

पट पट पट मोजीत नोटा

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
23 Mar 2016 - 12:47 pm

पट पट पट पट मोजित नोटा चाले राजा नेता
ओठावरती जीन मिसळूनी घेतो रुपेरी सोडा

उंची फेरारी स्वतःस छान
जनास करी ईंधन दरवाढ
भाववाढ ती सामान्यांस अन स्वत: फिरवीतो स्कोडा

नेता राजा फार हुषार
सत्तेवर तो होता स्वार
नुसता त्याला पुरे हवाला स्वीस अकौन्ट काढा

सात सदनिका भूखंड सात
बळकावितो हा एक दमात
आला आला राजा नेता सोडा रस्ता सोडा

मूळ कविता:

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा

उंच भरारी दोन्ही कान
ऐटीत वळवी मान कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा

vidambanराजकारण

सरकार...- मलाबी दयाना

Dinesh Satpute's picture
Dinesh Satpute in जनातलं, मनातलं
21 Mar 2016 - 7:51 pm

गावाकडच्या मित्रा सोबत गप्पा सुरु होत्या. मित्राने सुरुवात केली. सरकारनं मल्ल्यांची मालमत्ता जप्त केली तरी त्याने बुडविलेल्या अशा किती कर्जाची वसुली होईल. मी म्हटलं ..जेवढे वसूल होईल तेवढे होईल ..पण सरकारनं ठरवलं तर त्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून सरकारला गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणता येतील....पैसा हि कमवता येईल. हे काय नवीन..मित्राने मधेच प्रश्न केला. मी सुद्धा मग योजना काय असू शकते हे सांगण्यास सुरुवात केली...

राजकारणप्रतिक्रिया