तळ्याकाठी
तळ्याकाठी
तळ्याकाठी
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.
वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.
- डॉ. सुधीर रा. देवरे
कुसुमाग्रजांच्या ‘याचक’ या कवितेचा मी घेतलेला आस्वाद इथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो :
याचक
असा याचक
ज्याच्या हातातील कटोरा
कशानेच भरत नव्हता.
नृपाळांनी टाकली सिंहासने
कुबेरांनी टाकली
सुवर्णाची भांडारे
तरीही तो रिताच.
सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.
'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.
आताच हिंजवडीत मस्त पाऊस पडला आणि मग हे सुचलं....
आभाळ आला कि मन हळवं होतं....
असंख्य आठवणी बरसू लागतात..
मग माझी मीच ह्या पावसासोबत वाहत जाते...
सरींसारखे विचार मनात सरसर कोसळतात
भूतकाळाच्या पानात मग मी रमत जाते..
पावसात भिजली नाही तरी मनात खूप पाऊस पडतो..
कितीही नाही म्हटलं तरी वेळेचा काटा पळत असतो..
पाऊस संपत संपत माझा आनंदही घेऊन जातो..
का हा पाऊस असा ह्रदयाला चिरून चेहऱ्यावर एक गोड हास्य देऊन जातो...
नटनागर कृष्ण
"ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू... उद्या सांच्याला आपल्या घरला!" शंकऱ्याने तळहातावरील तंबाखूवर थापा मारल्या व इतरांपुढे तंबाखूचा हात पसरीत प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला.
***************************************************************************************
दिवसाचा ताप संपला
कि ऊन उदास होऊन
कोपऱ्यात एकटे बसते.
आपण कुणासाठी सावली
झालो नाही म्हणून
हुरहुरते, हळहळते.
अंधारात गडप होऊन
पाण्यापलीकडचे मृगजळ
शोधू लागते.
-शिवकन्या
आमची हि प्रस्तावना वाचलीच पाहीजे असे नाही.