आज जानेकी ज़िद ना करो (दोन)
ही गज़ल (म्हणजे तिचा काव्यविषय), जनसामन्यांसाठी कवि-कल्पना आहे. त्यामुळे, उर्दू शायरी ज्या प्रेमाची कहाणी आहे ते प्रेम, ती `उल्फ़त' काय आहे ते आधी सांगायला हवं.
उर्दू गज़लेत प्रिया कधीही पत्नी होत नाही, ती फक्त एक ‘चाहत’ असते. पूरे-उम्र-भरकी चाहत. सार्या आयुष्याला पुरुन उरेल अशी अभिलाषा! म्हणजे प्रियकराचं प्रेम बेतहाशा असतं पण ती कधीही त्याला संमती देत नाही. (या अर्थानं मात्र उर्दू गज़ल अनेकांच्या हृदयाला स्पर्शून जाते, कारण ती त्यांच्या अयशस्वी प्रेमाची कहाणी असते.)