शंकर अभ्यंकर यांचे ओवीबद्ध रामायण
शंकर अभ्यंकर हे सध्या वाल्मीकि रामायणावर 'शंकर रामायण' या नावाचा एक टीकाग्रंथ लिहित आहेत आणि त्याच्या जवळ जवळ १५,००० ओव्या लिहून झाल्या आहेत. मंगलाचरणच एक हजार ओव्यांचे आहे आणि त्यात हे 'शंकर रामायण' कशासाठी आणि आधीची रामायणे कोणती याचा सविस्तर उहापोह आहे. मिपाकरांच्या सोयीसाठी त्यातील काही ओव्या खाली उधृत करीत आहे. अधिक माहितीसाठी अभ्यंकरांच्या आदित्य प्रतिष्ठान चा २०१४ चा आदित्य दीप हा दिवाळी अंक पहावा (4/15 वेदांतनगरी सोसायटी कर्वेनगर पुणे ४११०५२). माझी खात्री आहे कि गदिमांच्या गीत रामायणाप्रमाणेच हे 'ओवी रामायण' सुद्धा मराठी मनाचा आणि ह्रदयाचा ठाव घेईल.