मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

माझ ब्राम्हण असण

पिंपातला उंदीर ·

जेपी 05/10/2014 - 17:35
पंखासाब पॉपकॉर्न आनलेत . पयल्या रांगेत बसुन आरामात खाऊ. बाकी धागाकर्त्याचे आणभव आमाला का येत नाय.

जेपी 05/10/2014 - 17:54
पंखा साब शमत आहे. उद्या बकरी ईद आहे.त्यामुळे धागा ओस पडु नये याची काळजी घेऊ.नंतर आहेच खंग्री चर्चा.

सर्वसाक्षी 05/10/2014 - 18:41
ब्राम्हण नव्हे, ब्राह्मण. जाता जाता: वरील प्रतिसादकांची सदस्यनावे माम्लेदारचा पन्खा जेपी उगा काहितरीच यावरुन आपण जात कशी काय ओळखता? कुणी मुक्तविहारी कुणा साक्षीला कट्ट्याला बोलावतो यात त्यांची जात कशी काय दिसते? मुळात तुम्हाला समोरच्याची जात शोधाविशी का वाटते?

In reply to by सर्वसाक्षी

मी अस कधी म्हंटलं ? मी मला माहित नसलेल्या मुद्द्यावर प्रश्न विचारले . पुन्हा quote करतो हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे .

In reply to by पिंपातला उंदीर

"इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का?" तुम्ही आत्ता पर्यंत किती कट्टे केलेत? स्वत: अनुभवा आणि मग विचार करा.जमल्यास ह्या महिन्याच्या १८ ता. ते २९ ता. पर्यंत ३ कट्टे होणार आहेत.डोंबोली, ठाणे आणि पुणे. त्यापैकी कुठल्याही एका कट्ट्याला हजेरीपुरते तरी या आणि मग बघा. मी किंवा माझ्या बरोबरच्या कुठल्याही मिपाकराने कधीच आणि कधीही कुठल्याही कट्ट्यावर आलेल्या माणसाला जात विचारली नाही.वैयक्तिक माझ्या पुरते बोलायचे तर, मी फक्त २च जाती मानतो. बाह्मण किंवा अब्राह्मण. ब्राह्मण ====> जो सतत ज्ञान मिळवायच्या मागे असतो तो आणि अब्राह्मण =====> जो आहे त्या ज्ञानात समाधानी असतो किंवा मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग करत नाही, तो. मला नाही वाटत की मिपावर कुणी अब्राह्मण असतील म्हणून. जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.

In reply to by मुक्त विहारि

ज्ञानव 06/10/2014 - 11:36
ब्राम्हण्याची व्याख्या आवडली

जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.

मी पण विचारत नाही. पण धागाकर्त्याच्या म्हणण्यात हि अर्थ आहेच मुवी शेवटी प्रत्येकाचे अनुभव आणि वेदनाच असे काही लिहिण्यास उद्युक्त करत असतात? १) "ब्राम्हणांनी पेशवाई घालवली" हे वाक्य किंवा हा पराक्रम आणि सगळे नॉन-वेज ब्राम्हणांनी महाग करून ठेवले हे ऐकताना होणारी वेदना बरयाच वेळा हमरीतुमरीवर गेली आहे. २) सरकारी नोकरीत ब्राम्हण सहकार्याने आधीच्या कर्मचार्याचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणल्या नंतर जातीविषयक कायद्याचा बडगा उगारलेला पाहून येणारी हतबलता वेदना आजही त्रास देते आहे. ३) dipartmental परीक्षांमध्ये ब्राम्हणांना डावलून इतरेजनांना पास करून सिनिओरीटी घालवलेली पहिली तर वाईट वाटत आले आहे. आणि ब्राम्हणेतर सर्व एरवी भांडले तरी त्यांच्यातल्याच एकावर अन्याय झाला (कुणाकडूनही)तर ते एक होताना कोर्टात जाताना पाहिलेत पण ब्राम्हण कधीही एक होत नाहीत ते आप्ल्यातल्याच ज्याच्यावर अन्याय झालाय तो कसा मूर्ख आहे आणि मी किती शहाणा आहे त्याची फुशारकी मारतो हे हि उद्विग्न करते. ब्राम्हण्याची व्याख्या आवडली पण ती वैयक्तिक जो पर्यंत समोरचा फणा काढत नाही तोपर्यंत. माझे मित्र, क्लायंटस कलीग्स वेग वेगळ्या जातीतले आहेत पण मी त्यांची जात कधी लक्षात घेतली नाही तरी कधी विषय निघाला की ते मला "भटा" म्हणंत आले आहेत पण मी जातीविषयक कुठल्याही कायद्याची मदत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मला ते हसण्यावारीच न्यावे लागते पण मी कुणाला कुठलेही जातीविषयक संबोधन वापरू शकतच नाही स्वभावानेही आणि कायद्यानेही. पण मग एखादा ब्राह्मण जर वरील प्रमाणे आपले मत मांडत असेल तर त्याला माझे नक्की अनुमोदन, पाठींबा आहेच आहे.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 06/10/2014 - 20:12
पुण्याच्या कट्ट्याचा पत्ताच नाहिये...
आम्हाला पुण्याच्या कट्ट्याची माहीती हवीये.. कुठे मिळेल. ?

पैसा 05/10/2014 - 18:46
ज्याचे त्याचे अनुभव आणि विचार. प्रत्येकालाच असे अनुभव असतील असे नव्हे. किंवा तुम्ही जी भीती/गंड याबद्दल बोलताय ते व्यक्तिगत पातळीवर असण्याची शक्यता जास्त वाटते आहे.

उदयन 05/10/2014 - 19:29
ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .
असे लिहायला हिंमत लागते. आपले अभिनंदन

मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे हा माझ्यालेखी आपल्या लिखाणातला षट्कार आहे!!!!. मी शुद्ध इंग्रजीत विचारत असतो " व्हाय स्टीरियोटाईप ??" माझी तर केसच निराळी आजा अन त्याचे दोन भाऊ हिंसप्रसे चे सशस्त्र क्रांतिकारी होते, साक्षात चंद्रशेखर आझाद उर्फ पंडीतजी ह्यांनी क्रांतिदिक्षा दिलेले, मला माझा प्रत्येक ब्राह्मण मित्र काहीतरी वेगळ्या नजरेने पाहतो, अन बहुजन समाज "हा बामन" ह्या इंप्रेशन मधे असतो, आयडेंटीटी क्रायसिस होतो राव कधी कधी!!!

एका आव्हानात्मक विषयावर मोकळेपणाने व संयतपणे लिहिल्याबद्दल अभिनंदन. माझ्या सुदैवाने मला लहानपणापासून सर्व जातिधर्माच्या लोकांबरोबर राहायला मिळालं. वर्तमानपत्रं व मासिकांमधील बातम्यांमध्ये व वैचारिक लेखनांमध्ये जात्यंधपणाच्या बातम्या व उल्लेखांची प्रत्यक्षातली उदाहरणे मला स्वतःला फारच क्वचित दिसली. स्नातकोत्तर शिक्षणासाठी बारामतीला राहत असताना राज्याच्या इतर भागांतून आलेल्या काही सवंगड्यांच्या आचरणातून तीव्र जातीयात प्रथमच दिसली. इसकाळमध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र / मराठी मंडळांच्या बातम्या प्रकाशित झाल्या की त्यावरच्या अनेक प्रतिसादकांचा रोख असतो की सदर सांस्कृतिक चळवळीवर ब्राह्मणांनी एकाधिकार निर्माण केला आहे. प्रत्यक्षात याविरुद्धची उदाहरणे नक्कीच पाहिली आहेत. मी स्वतः अनेक वर्षांपासून या चळवळींमधला स्वयंसेवक आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर मंडळे चालत असल्याने जे अक्षरशः मजुरासारखे परिश्रम करतात ते चळवळीचा चेहरा बनतात. जे मंडळांच्या कार्यक्रमांना प्रेक्षक म्हणून येतात व परत जातात त्यांना कदाचित दूर ठेवले गेल्याची भावना होत असावी. बाकी आपल्याला पटो वा न पटो आपल्या समाजातली जातीयता हे कटू वास्तव आहे.

भाते 05/10/2014 - 20:36
ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर!!! काय फायदे मिळाले ब्राह्मण असल्याचे? मीसुध्दा ब्राह्मण आहे. च्यायला, दहावीनंतर त्या कुठल्यातरी 'अबक' जातीला ३८% मिळाले असताना महाविद्यालयात प्रवेश मिळतो आणि ५८% मिळालेल्याला केवळ (इतर/ब्राह्मण) जातीमुळे त्याच महाविद्यालयात प्रवेश नाकारला जातो! काय वय असतं दहावीला? जेमतेम १५-१६ वर्ष! तेव्हापासुन हा भेदभाव लक्षात आल्यावर पुढे त्याच्याकडुन काय अपेक्षा करणार? ७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन? अर्थात तो ३८% वाला अकरावीला चार विषयात नापास होतो. पण गेली/घालवली ना त्या ५८%/७८% मिळवलेल्याची जागा! दहावीला असताना मी हे अनुभवले आहे.

In reply to by भाते

उदयन 05/10/2014 - 21:06
७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन? ----------------- तुमचे म्हणने रास्त आहे. पण हे केवळ गेले ३०-४० वर्षापासुनच सुरु झाले. तरी तुम्हाला इतका राग. मग विचार करा वर्षानुवर्षे मार्क देणे तर दुर राहिले ज्यांना शिक्षणापासुन देखील वंचित ठेवलेले अशांचे विचार काय असतील ? १५-१६ तर लांबची गोष्ट आहे अजुन ही बर्याच ठिकाणी ५-६ वर्षाच्या मुलांना देखील दुय्यम स्वरुपाची वागणुक मिळते

In reply to by उदयन

ज्ञानव 06/10/2014 - 11:46
पण हा वंचितपणा ब्राम्हणांनी दिला का ? पूर्वीच्या सर्व अत्याचारांचे खापर फक्त ब्राह्मणांवर फोडणे कितपत योग्य आहे. राजकारण हे कायम क्षत्रियांच्या हातात होते त्यांनी का प्रयत्न केले नाहीत सर्वांना योग्य शिक्षण मिळवून देण्याचे ? भातेसाहेब म्हणतात तोच प्रश्न मला पडतो नक्की आम्ही काय फायदे

ओरपले?!!!!

In reply to by भाते

सुहास.. 06/10/2014 - 17:35
डिसक्लेमर : प्रतिसादात जाती-पातीचा उल्लेख केवळ रेफरन्स करिता होय सहानभुतीच !! सर्वच समाजासाठी ... धागा व्यापक असला तरी त्याबाबत अज्ञभिन्न असलेला गट मात्र त्यातील व्यापकता समजण्याकरता पूर्वग्रहाने येणार हे जरी ग्रहीत धरत असलो तरी, तुम्ही म्हणता तितकी अधोगती ( झाली तर काही अंशी का असेना प्रगतीच म्हणेन मी ) झालेली नाही. समाजात कोणीएके काळी असलेली कट्टरता मात्र काही अंशी कमी झाली असे ही याला जोडुन मी म्हणेन. अर्थात तुम्हाला...आय मीन लेखाला विवेकी बुध्दीने आणि समान नजरेने बघणारे कमी आहेत. ( हल्ली काय आहे ना ..लोक गीता देखील त्यात स्वःताचा अर्थ घालुन वाचतात..खरा अर्थ जो आहे तो त्या कृष्णदेवालाच ठाउक ! ) ही उदाहरणे आहेत , समाज दुभंगल्याची, माझ्याकडे उदाहरणे आहेत जिथे मी एकवटल्याचे पाहिले आहे, बेटी चा नसेल जास्त प्रमाणात व्यवहार पण रोटीचा व्यवहार आहे. माझ्या ओळखीच्या एका कडक वैष्णव ब्राम्हणाने, घरात कडाडुन विरोध असुन एका अनाथ मुली शी लग्न केल्याचे उदाहरण आहे ( या अनाथालयात फक्त वेश्यांच्याच मुली असतात ). आज कित्येक वर्षे सुखाचा संसार करतोय, असे दलीत-मुस्लीम-ब्राम्हण-मराठा एकत्र पार्टीला पाहिलेत ..माझा सांगतो अनुभव , पेग क्रमांक तीन, तो मराठा, त्याच्यासमोर बसलेला ब्राम्हण आहे , दलीत एका बाजुला , तिघांना एका प्लेटमध्ये 'प्लेन चीज ' खाताना पाहिलय, वाद चालु आहे " शहाण्णव कुळी म्हणजे काय आहे माहीत आहे का ? " समोरुन आवाज " परशुरामाने काय २१ की ५२ वेळा नि:क्षत्रीय केलीय " याच पार्टीत चौथा देशस्थ म्हणतो " ओ, चित्पावन, गप्प बसा आता " आणि सरते शेवटी सगळे मिळुन दाल-खिचडी खातात, बनविणाना मुस्लीम आहे की नाही याचा विचार न करता ? काय म्हणाल याला ? सावरकर जेवत नव्हते दलीतांच्या पंगतीत? मी स्वःता कितीतरी दलीत भक्त पाहिलेत सावरकरांचे ! आहेत काही ! पब्लीक जरा भयताड झालय ! सुरुवात मी मिपावरच्या एका उदाहरणाने देतो, एरवी वाचन-मात्र असलेला आयडी असे काही धागे दिसले की लगेच " काडीमात्र" होतात, ब्राम्हण्य आणी त्याच श्रेष्ठत्व टिकविण्याची त्या आयडी ची मरमर ( आधी कुत्तरओढ असा शब्द लिहीला होता ) पाहिली की अक्षरशः किळस येते , याचा अर्थ सोनवणींच्या ब्लॉग ची वा चेपुवर ते काय " संभाजी ब्रिगेड - भटांचा कर्दनकाळ " ची येत नाही असे काही नाही , मला त्याहुनी जास्त येते !! कोणीतरी वाघमारे म्हणुन आहेत ..ब्लॉक करुन टाकले मी शेवटी चेपुवर ...हे असे अनेक किस्से आहे ..जात लागते ती एकदा का निवड्णुका जाहीर झाल्या की ( काय च्या मारी ! पण मी आशावादी आहे, एक ना एक दिवस हे ही चित्र बदलेल ) थोडेसे आरक्षणाविषयी .. मी ब्राम्हण वर्गाचा राग समजु शकतो ..पण काही करु शकत नाही, खर तर ! सध्या कोणीच काही करु शकत नाही (अगदी समान नागरी कायदा ही ) आरक्षणाला लागुन एक कलम आहे , की दरवर्षी आरक्षितांच 'समाजातील' प्रमाण आणि शैक्षणिक पातळीवरच, सरकारी नौकर्‍यांमधल प्रमाण, सम ( सारखं ) झाल की मग ते लगेच रद्द होवु शकते. जातीनिहाय जणगणना होते ती यामुळेच !! आणि आरक्षणाच्या मुदतीची डेट पुढे ढकलावी ते ही याच मुळे !! फायदे-तोटे ही आहेत, आहे थोडी प्रगती आहे ! पण काय करणार समाज इतका जात-पात मानतो की विचारु नका, :( आधी राजस्थान राज्य सरकार ला गुज्जर समाज आरक्षित करता आला, आता कॉन्ग्रेस ने मराठा ला दिलं, हे मराठा समाजाच झाल असे की , त्या आधी मराठा- कुणबी समाज आरक्षित होता, आता हे कुणबी म्हणजेच ९६ कुळी म्हणणारे काही आणि ९६ कुळी च कुणबी म्हणनारे काही, त्यांचा टक्का बघीतला गेला आणि राज्य सरकार ने देवुन टाकल आरक्षण !! ) फायदा होईल की नाही माहीत नाही ( आपल्या राज्य सरकारकडे साध्या पोलीस भरत्या करायला वेळ नाही, उगा राजकारण तिज्यायला ! ) ब्राम्हण समाजाच हे असं होत, सामाजिक दृष्ट्या समाज दुर्बल दिसत नाही ( एकही किस्सा आठवेना मला ज्यामध्ये दलीत मुलीने ब्राम्ह्ण वा उच्चजातीतील मुलाशी प्रेम केले म्हणुन दलीतांनी ब्राम्हण/उच्चवर्णीयाची हत्या केली ती) , आर्थिक दृष्ट्या बघावं तर ( तुम्हाला इथलेच किती-तरी लोक्स परदेशात सेटल झालेले दाखवेल मी ) असेल एखादा दुसरं गंविनी लिहिल्याप्रमाण, मुळात लक्षात घेतला जातो ते टक्का ! अश्या कित्येक बाबी आरक्षणची डेट वाढविताना लक्षात घेण्यात येतात, वाजपेंयी नी एकदा असा अहवाल मागविला होता, वर्ष आठवत नाही , पण त्यांनी तो पाहिल्यावर ते थक्कच झाले होते , केवळ ४० % आरक्षितापर्यंत च आरक्षणाचे फायदे पोचले होते, त्यांना तो गुंडाळुन ठेवावा लागला आणि उलट ते प्रकरण हाताशी धरुन मायावती खाजगी क्षेत्रातही आरक्षण द्या ही मागणी पुढे ढकलली होती. आणि मला वाटते मागाहुन कॉन्ग्रेस कडुन प्रमोशन मध्येही आरक्षण मंजुर करून घेतले होते ! पण आता याचा अर्थ असा नाही की दलीत समाज आरक्षणाच्या विरुध्द नाही , एक खुप मोठा गट आहे, विषेशतः प्रकाश आबेंडकराना मानणारा, त्याच म्हणणे असे आहे की जात ही टीसी मधुनच काढुन टाका, मग ती कोणती का असेना, आणि क्लॅरिटी आणा ! सर्वच क्षेत्रात, मग ती शैक्षणिक असो वा सरकारी नौकर्‍या, पारदर्शकता आणा !! लायकी ही सिध्द होईल , पण यामुळे राजकारण्यांना एक सर्वात मोठा तोटा होवु शकतो ...असे केले सर्व समाज एकवटेल , मग यांना जाती-पातीची आणि मुळे मते कशी मिळतील ( आठवा , बापटअण्णांना तिकीट न मिळाल्याने आणि कुठला ब्राम्ह्ण उमेदवार नसल्याने " पुणे ब्राम्हण सभेने मतदानावर टाकलेला बहिष्कार, खर सांगा असे वांझोटे धंदे केल्यावर कसा एकवटणार समाज ) मी तर काही लोकांना तो एकवटु नये म्हणुन ही शर्थीचे प्रयत्न करताना पाहिले आहे ! ब्राम्हण मित्राच्या, नितीन आगेच्या ब्रुटल मर्डर विषयीच्या, निषेधात्मक पोस्ट वर, " अंथरुण पाहुन पाय पसरावे " अशी मराठा समाजाचे आडनाव असलेल्या ची कमेंट आल्यावर काय समजायचे मातंग समाजाच्या लोकांनी... इथल्या काही कमेंट वाचल्यावर तर मीही त्याविषयी लिहायचचं बंद केले . .. आहेत अश्या बर्‍याच थेरॉटिकल गोष्टी , ज्याचा मागमुस ही नसतो लोकांना . प्रॅक्टीकली होते असे की , ब्राम्हण ब्राम्हण संस्काराच्या चौकटीत जगतो , दलीत दलीत मध्ये , मुस्लीम मुस्लीम चौकटी मध्ये, मराठा मराठा मध्ये त्यामूळे माझ्या जातीतील मुल्ये श्रेष्ठ्च असे बिंबविले जाते मग मी श्रेष्ठ म्हटल आपोआप दुसरा कनिष्ठ होतो !! हे मनामध्ये हळु-हळु वाढत जाते ......खुप कमी लोक असतात जी ही चौकट मोडतात आणि तेच वर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच उत्तर आहे . धन्यवाद !

In reply to by सुहास..

मृत्युन्जय 07/10/2014 - 12:02
+ १ फक्त एका बाबतीत थोडासा विरोध आहे सुहास. लग्न आणि त्यातुन झालेल्या हत्यांबद्दल. उच्चवर्णीयांनी निम्न वर्णीय कुटुंबातील मुलांची आणि मुलींची (उच्चवर्णीय मुलांना अथवा मुलींना फूस लावली म्हणून) हत्या केल्याची कैक उदाहरणे मिळतील. तु म्हणतोस त्याप्रमाणे उलटे झाल्याचे दिसत नाही. उच्चवर्णीयांनी केलेल्या या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या किती आढळतात आणि त्यातही महारष्ट्रीय ब्राह्मणांनी केलेल्या किती आढळतात? त्यामानाने इतर जातींनी केलेल्या आधिक आढळतील. खैरलांजी प्रकरण कशाचे द्योतक म्हणता येइल? तिथे उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांची हत्या केली (लग्न संबंधात नाही). उच्चवर्णीय म्ह्णजे कुणबी. निम्नवर्णीय होते महार. लातुर मध्ये बरोबर उलटी घटना देखील दिसुन येते. महाराष्ट्रात बघितले तर जातीपातीवरौन उच्चवर्णीयांनी केलेल्या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या फारच कमी प्रमाणात आढळतील. इतर जातींनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्या अधिक सापडतील. ब्राह्मणांनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्येचे प्रमाण उत्तर प्रदेशात अधिक आढळेल. हे सर्व सांगण्याचे कारण इतर कुठल्या जातीवर ठपका ठेवायचे नसुन फक्त हे सांगण्याचे आहे की महाराष्ट्रातीय ब्राह्मणवर्ग उर्वरीत भारतातल्या ब्राह्मणांपेक्षा बराच सुधारित आहे. त्यामुळेच अस्पृश्य निवारणाची चळवल सुरुही महाराष्ट्रात झाली आणि वाढलीही इथेच. महाराष्ट्रीयन समाजातच कर्वे, आगरकर, सावरकर आणि रानडे यांसारखे जातीभेदाविरुद्ध आवाज उठवणारे समाजधुरीण निर्माण होउ शकले. दुसरी दुर्दैवी गोष्ट अशी की अस्पृश्यता जणु ब्राह्मणांनी निर्माण केली आणी जातिभेद त्यांच्यामुळेच वाढला असे चित्र निर्माण केले जाते, तसे असेल तर मग आज खैरलांजीसारख्या घटना का होतात? इतर जातीतले लोक इतकी अस्पृश्यता आणि जातिभेद का पाळतात? थोडेसे आरक्षणाबद्दल. आरक्षण सुरु होउन ६० वर्षे उलटली. जेव्हा सुरु झाले तेव्हा मागस वर्ग निश्चित केला नव्हता का? केलाच होता ना? मग ६० वर्षात त्या मागास वर्गात कुणबी, गुज्जर, मराठा अशी भर कशी काय पडली? हे उलटे आरक्षण नक्की कशाचे द्योतक आहे? ब्राह्मण सोडुन सगळे आरक्षित का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज नक्की का भासते? तो समाज पहिल्यापासुन सधन, शिक्षित आणि राज्यकर्ता नाही का? मग त्यांना आरक्षण का? आरक्षण हे गरज म्हणुन न वापरले जाता एक राजकीय साधन म्हणुन वापरले जाते हे खेदजनक आहे. आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे. आरक्षित समाजातील सनदी अधिकार्‍यांची मुले अजुनही आरक्षणाचा उपभोग का घेतात (फक्त सनदी अधिकारी असेच नाही तर मध्यमवर्गीय किंवा खाउन पिउन सुखी असलेले कनिष्ठ मध्यमवर्गीयांचेही उदाहरण घे). त्यांना अजुन किती काळ आरक्षण? ते लोक अजुनही उद्धारित नाही झालेले का? निम्नवर्णीय पण अजुनही आर्थिअक्दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना अजुनही आरक्षणाचा लाभ दिला तर एकवेळ समजु शकतो पण शिक्षित आणि सधन लोकांना का? एक नाही अनेक उदाहरणे देतो. माझ्या डोळ्यासमोर घडलेली. सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का? समजा काही शतके उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांचे शोषण केले. मग आता कालचक्र उलटे फिरवायचे का? आणि ब्राह्मणांचे शोषण करायचे का? की जितकी शतके शोषण झाले तितकी शतके आरक्षण चालु ठेवायचे? आणि किती शतके मागे जायचे? आणि ठरवा एकदाचे की शोषण नक्की कोणाचे झाले. राज्यकर्त्या मराठा समाजाचे? सधन कुणबी आणी धनगर समाजाचे? असो. चर्चा करु तितकी कमीच आहे. उत्तरे कुणाकडेच नाहित. उगाच चिखलफेक करण्यात काही हशील नाही. अवांतरः प्रतिसाद जरी तुझ्या प्रतिसादाला उप प्रतिसाद म्हणून असेल तरी हा प्रतिसाद तुझा प्रतिसाद मान्य नाही म्हणुन दिलेला नाही तर त्या अनुषंगाने लिहावेसे वाटले म्हणुन दिलेला आहे. तुझा प्रतिसाद पटलेला आहेच.

In reply to by मृत्युन्जय

एस 07/10/2014 - 13:04
सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का?
फक्त एवढ्या एका मुद्द्याबद्दल बोलायचे झाले तर आरक्षण घेणे ही बर्‍याचदा सवलत लाटणे ह्या उद्देशाने नसून तसे ते घ्यावे लागते कारण खुल्या वर्गातून प्रवेश/नोकरी स्वीकारली तर पुढे आरक्षण म्हणा किंवा शिष्यवृत्ती म्हणा, अशा कुठल्याच बाबींचा लाभ होत नाही. ह्याची दुसरी बाजू अशी की पुरेसे मार्क असूनही जर खुल्या वर्गातून प्रवेश घेतला तरीही त्या वर्गातील एक सीट अडवल्याचाही दोष लागतो. त्यामुळे आरक्षण घेतले तर सवर्ण सहाध्यायांच्या नजरेतील 'सरकारी ब्राह्मण' अशी तुच्छता सोसणे आणि नाही घेतले तर आमची एक सीट अडवली म्हणून राग ओढवून घेणे अशा दुहेरी कात्रीत लोक सापडतात हो! मी माझ्यापुरतं जात-धर्म-वंश वगैरे संपवून टाकलं आहे, म्हणून समोरचा मला त्याच्या चष्म्यातून पाहणं थांबवत नाही ही खरी मेख आहे. जाऊ द्यात! या विषयावर अजून बोलायची इच्छा नाही.

In reply to by एस

सह्यमित्र 07/10/2014 - 15:03
हे तितकेसे पटत नाहि. बऱ्याचदा असे बघण्यात आले आहे कि आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन असणार्यांच्या मुलाना पुरेसे मार्क नसताना केवळ आरक्षणा च्या लाभा मुळे प्रवेश मिळतो काही वेळेला फी मध्ये सवलत देखील आणि आर्थिक दृष्ट्या निम्न पण केवळ उच्चवर्णीय असल्या मुळे प्रवेश मिळत नाहि. अशीच उदाहरणे पाहण्यात जास्त आलि आहेत.

In reply to by एस

सुबोध खरे 07/10/2014 - 18:46
देवयानी खोब्रागडे यांचे वडील उच्च स्तरीय(प्रमुख सचिव) आय ए एस अधिकारी होते ना मग त्यांनी आपल्या वैद्यकीय प्रवेशासाठी आणी नंतरच्या विदेश सेवेसाठी त्यांनी आरक्षण वापरलेच. (शिवाय त्यांचा मुंबईत एक फ्लैट असताना आदर्श मध्ये त्यांना दुसरा फ्लैट मंजूर झाला आणी हे त्यांच्या वडिलांना "माहित" नव्हते). अशा उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो. वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क सर्वाना एक लाख आहे तर मागास वर्गीयांना १० हजार आहे. ज्यांचे वडील अत्युच्च दर्जाचे शासकीय अधिकारी आहेत त्यांना हि फी ची सवलत म्हणजे अपात्री दान आहे. आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. ( हा एक मोठा वादग्रस्त राजकीय निर्णय आहे आणि कोणीही नेता हा निखारा आपल्या अस्तनीत ठेवणार नाही हेही मला माहीत आहे ).

In reply to by सुबोध खरे

सुहास.. 07/10/2014 - 18:56
उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो. +१ आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. >>> यावर मौनीबाबाचं सरकार विचार करत होते , अहवाल धुळ खात पडुन आहे असे सध्यातरी एकुन आहे !! कोणीतरी या विषयावर ' जनहित याचिका ' टाकायला हवी , माझा अभ्यास चालु आहे यावर ..खात्रीने सांगतो हा विषय खरोखरच चिंताजनक आहे !! नक्कीच कधी ना कधी हा विषय घेईल मी ...किमान याचिका दाखल करण्याबाबत तरी असो , बाकी सर्वांनी माझ्या प्रतिसादावर जी चर्चा आरंभली आहे त्यांचे धन्यवाद , आवडते ही आहे ...!! मी सविस्तर लिहेन वेळ मिळेल तसा ..

In reply to by सुबोध खरे

अजया 07/10/2014 - 19:13
हा अनुभव मी पण घेतलाय.नावाने मागासवर्गीय, सरकारी पदस्थांची अत्यंत कमी गुण मिळवुन आलेली धनाढ्य मुलं!! मात्र चार वर्ष पास होता होता नाकात दम आलेली!!

In reply to by सुबोध खरे

चिगो 08/10/2014 - 16:34
आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.
ह्याच मुद्द्यावरुन सुमारे दोन वर्षांपुर्वी लिहीलेल्या लेखाची ही झैरात..

In reply to by मृत्युन्जय

सहमत. आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे. माझे तर म्हणणे आहे कांही टक्के आरक्षण ठेवण्या ऐवजी १०० टक्के आरक्षित महाविद्यालये सुरु करा. आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं. तिथे कोणाही उच्चवर्णियांना प्रवेश नसावा. शिपाई ते मुख्याध्यापक सर्व फक्त मागास वर्गातूनच पुढे आलेले असावेत. सर्व मागास विद्यार्थ्यांना अशा महाविद्यालयातून प्रवेश मिळावा. बाकी सर्व महाविद्यालयामधून इतरांना (ओपन वर्ग) प्रवेश द्यावा. मागास विद्यार्थ्यांनाही अशा (ओपन) वर्गात प्रवेश हवा असेल तर गुणवत्तेवर देण्यात यावा. तिथे कुठलेही आरक्षण नसावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

इरसाल 07/10/2014 - 15:00
आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं. काका तुमचा डाव कळला हं मला, अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही. ;)

In reply to by इरसाल

अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही. का बरं? असं का वाटलं? मागास वर्गात आपल्या बांधवांना शिकवू शकतील असे ज्ञानी नाहीत की स्वतः शिकल्यावर ते समदु:खी बांधवांचा कैवार घेऊ इच्छित नाहीत? डॉ. आंबेडकरांपासून डॉ. नरेन्द्र जाधवांपर्यंत अनेक ज्ञानी पुरुष मागास वर्गात होऊन गेलेत आणि अजूनही आहेत. आपल्या ज्ञाती बांधवांना शिकवू शकतील असे कांही प्रोफेसर मिळू शकणार नाहीत? अशा व्यवस्थेत मागासांना शिक्षणही मिळेल आणि राजकार॑ण्यांना गलिच्छ राजकारण करायची संधी मिळणार नाही शिवाय पुढारलेले आणि मागास अशी दरीही उरणार नाही.

In reply to by सुहास..

राजाभाउ 07/10/2014 - 13:39
+१ अतिशय सुंदर प्रतिसाद. मला जवळपास असेच वाटते पण एतके व्यवस्थीत मांडता आले नसते. धन्यवाद सुहास

श्रीगुरुजी 05/10/2014 - 21:05
तुम्हाला जे अनुभव आले तसले अनुभव मला कधीही आलेले नाहीत. उलट ब्राह्मण हा विषय जास्त करून टिंगलीचा, उपहासाचा व मत्सराचा असल्याचे अनुभव आहेत. >>> ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? खरं तर ब्राह्मण असण्याचे फायदे कमी व तोटे जास्त आहेत. आता तर मराठा व मुस्लिम राखीव जागांमुळे तोटे अजूनच वाढले आहेत. ब्राह्मण असण्याचे नक्की कोणते फायदे ब्राह्मण ओरपतात ते सांगता का जरा? म्हणजे लग्नकार्यात, सत्यनारायणाची पूजा वगैरे कार्यात भटजींना जी दक्षिणा मिळते तो फायदा तुम्हाला अपेक्षित आहे का?

ब्राम्हण असल्याचे फायदे असण्यापेक्षा तोटे जास्त आहेत हे खरं. पण एक गोष्ट सर्व जाती जमातीमधल्या लोकांनी लक्षात घ्यावी ही कळकळीची विनंती. आरक्षण झगडायची ताकद कमी करेल. आयतं किंवा कमी कष्टात मिळालेली गोष्ट फार का़ळं टिकत नाही. मे बी आज नाही, पण साधारण १००-२०० वर्षांनी जेव्हा सर्व आरक्षित लोकं आरक्षण टेकन फॉर ग्रँटेड घेतील त्यादिवशी स्वतःचा नाश ओढवुन घेतील. प्रॅक्टीकल जगामधे, कामामधे ब्राम्हण असो वा दुसरा कोणी, जर का कामाचा नसेल तर टिकु शकणार नाही. त्यामुळे झगडायचं विसरु नका, कष्टाला पर्याय नाही. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ह्या नियमात कोणीही तुम्हाला आरक्षण देणार नाहीये.

In reply to by सस्नेह

सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम जगातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीला लागु होतो. जी गोष्ट वापरात राहात नाही ती कालौघात नष्ट होते हा इतिहास आहे आणि राहील.

In reply to by सस्नेह

एका समाजाला वारंवार वापरण्याची संधी मिळाली..म्हणून वृद्धी दुसर्याला अनेक पिढ्या ती नाकारली गेली .., ~हास !
अगदी बरोबर. पण त्याबरोबर ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की संधी नाकारणारे हा समाजाचा एक भाग होते आणि संपुर्ण समाज नव्हे. त्यामुळे सर्व समाजाचा द्वेश करणे योग्य नाही. मा़झ्याच ब्राम्हण समाजाच्या काही लोकांनी नाकारलेल्या लोकांना संधी उपलब्ध करुन देण्यामधे सिंहाचा वाटा उचलला ही गोष्ट सोयिस्करपणे विस्मरणात जाऊ नये म्हणुन हा लेखनप्रपंच.

दशानन 05/10/2014 - 22:18
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय। जो मन खोजा अपना, मुझ-सा बुरा न कोय।। - कबीर आजच कबीर वाचत होतो, त्यात हा मला आवडलेला दोहा मी नोट करून ठेवला होता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसा की आपला जन्म!

पैसा 05/10/2014 - 22:47
मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .
हे फारच धाडसी वक्तव्य आहे. व पु काळे आणि देशपांडे ही नावेसुद्धा माहिती नसलेले कित्येक ब्राह्मण मला माहित आहेत. मला स्वतःला व पु काळे अजिबात आवडत नाहीत, पु ल काही ठिकाणी आवडतात. तसेच यातल्या इतर विधानांच्याबाबत माझं उत्तर नकारार्थीच असेल मात्र माझी जात कोणती हे असं तुमच्यासारख्या कोणीतरी लिहिल्यावरच लक्षात येतं. एरवी नाही. ब्राह्मण समाजातसुद्धा अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा अजूनही किती प्रमाणात आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर ह.मो. मराठ्यांचं 'बालकांड' वाचा. उपरा किंवा बलुतं इतकाच दाहक आणि अस्वस्थ करणारा अनुभव मिळेल. तुमचं आतापर्यंतचं एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही. या लेखावर "वा वा काय छान लिहिलंय" असं मला म्हणून बाजूला रहाता आलं असतंच किंवा संपूर्ण दुर्लक्षही करता आलं असतं, पण तुम्ही लिहिली आहे तेवढी एकच बाजू या गोष्टीला नाही हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. याव्यतिरिक्त चर्चेला विनाकारण आरक्षण वगैरे वळणं लागणार असं दिसतंय. ते एक असोच. या संदर्भात मार्मिक गोडसे यांचा मिपावर हल्लीच आलेला लेख आठवला. असो. तेवढी मॅच्युरिटी सगळ्यांकडून अपेक्षित नाही.

In reply to by पैसा

रेवती 05/10/2014 - 23:05
सहमत आहेच पण हा विषय इतक्या जास्तवेळा चघळला जाऊनही तू प्रतिसादास टंकाळा केला नाहीस म्हणून धन्यवाद. मला भयंकर टंकाळा आलाय. ज्यांना यापलिकडे पाहणं जमतं ते या चर्चेत फारसे नसतात.

In reply to by पैसा

निश 06/10/2014 - 12:26
पैसा ताईशी १००% सहमत. ह मो मराठे ह्यांचे बालकांण्ड हे वाचताना खरच रडु येत.ब्राम्हण आहे म्हणुन त्याना कष्ट करावे लागत नाही अस मुळिच नाही. जेव्हा माणुस कष्ट करुन मोठा होतो समाजात नाव करतो त्याचा अभिमान खरच बाळगला पाहीजे मग तो कुठ्ल्याही जातीचाही का असेना. मी ब्राम्हण आहे पण अस असताना मला ही खंत व दु:ख नक्कीच आहे की माझ्या आधीच्या पिढी़कडुन दलित समाजावर अन्याय झाला आहे पण मी त्याना दलित न समजता माझ्यासारखीच माणुस म्हणुन समजतो व हे ही सांगतो की आज त्या समाजातले माझे मित्र फार खुप मोठया स्थानी आहेत. आणि मला त्याचा खुप अभिमान आहे. माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.

In reply to by निश

vikramaditya 06/10/2014 - 16:23
चांगले लिहिलेत. पुर्वी अमानुष अत्याचार करण्यात आले ह्यात काही शंका नाही. तसेच
माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.
हे वाक्य पटले.

In reply to by पैसा

एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही.
अगदी +१००. एकूणच काय की कोणत्याही माणसाचे जात-धर्म इत्यादी चष्म्यांमधून न बघता एक माणूस म्हणून मूल्यमापन व्हावे असे म्हणणारे लोकच त्याच चष्म्यांचा वापर करून ब्राह्मणांविरूध्द काहीतरी लिहितात ते बघून त्या दुटप्पीपणाचा भयंकर संताप येतो.या चष्म्यांचा वापर करून इतर जातींविषयी काही लिहिले की तो माणूस मोठा पुराणमतवादी पण ब्राह्मणांविषयी काही लिहिले की तो माणूस मात्र मोठा आधुनिक विचारांचा, पुरोगामी इत्यादी ठरतो. लेख आणि त्यातून होणारे सरसकटीकरण अजिबात आवडले नाही.विशेषतः कट्ट्यांवर एकाच जातीच्या लोकांचे वर्चस्व का असते यावर "तुम्ही आतापर्यंत किती कट्टे अटेंड केले आहेत" या प्रश्नावरील मौनच बरेच काही सांगून जाते.म्हणजे हे महाशय एकाही कट्ट्याला जाणार नाहीत आणि तरीही छातीठोक दावा करणार की कट्ट्यावर एका जातीच्या लोकांचे वर्चस्व असते!! याला उंटावरून शेळ्या हाकणे म्हणतात. बाकी काही नाही.

In reply to by पैसा

प्रदीप 06/10/2014 - 20:34
अत्यंत चपखल आहे, अतिशय आवडला. बालकांडचा* ह्या संदर्भातील उल्लेख सोडून, १०० % सहमत. * 'बालकांड' वाचल्यावर, मराठ्यांच्या वडिलांनी, स्वतःच्या विक्षीप्त स्वभावामुळे, स्वत:वर व स्वतःच्या कुटुंबावर दु:खे नाहक ओढवून घेतली, असे माझे मत झाले. म्हणून तेव्हढ्यापुरती सहमती नाही.

In reply to by प्रदीप

पैसा 06/10/2014 - 22:55
बालकांड च्या बाबतीत तुम्ही लिहिलंय ते १००% पटलं. ह.मो.मराठ्यांच्या वडिलांच्या विक्षिप्तपणामुळे त्यांना फार दु:खे सहन करावी लागली. मात्र ते कारण असलं तरी परिणाम जो झाला, (त्यांच्या आईच्या बाबतीत आजार असताना भूत लागलंय म्हणणे) तशा प्रकारचं दारिद्र्य आणि भुताखेतांनी झपाटलेले म्हणणे इ. अंधश्रद्धा मी लहान असताना सगळ्या जातींमधे, ब्राह्मणांमधेही पाहिल्या आहेत. त्यामुळे हे उदाहरण सहज आठवले ते इथे दिले. मात्र आठवायला बसलं तर श्री.ना.पेंडसे, दळवी आणि इतर कितीतरी लेखकांच्या लिखाणातून अशी उदाहरणे सहज देता येतील. या संदर्भात 'किरवंत' चीही आठवण झाली.

सस्नेह 05/10/2014 - 23:15
लेख छान आहे असे काही म्हणवत नाही. वैयक्तिक पातळीवर आलेले काही अनुभव तटस्थपणे मान्डण्यात लेखक यशस्वी झाला आहे एवढेच म्हणते. शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकेल असे वाटत नाही

भिंगरी 05/10/2014 - 23:25
मार्मिक गोडसे यांचा'आडनावाच्या आडून'या लेखातही अशाच प्रकारची माहिती दिसते.

खटपट्या 06/10/2014 - 00:36
मला माहित नाही कि हे अवांतर आहे कि नाही. आंतरजालावर शोध घेत असताना मला http://www.thebrahminsamaj.com/index.php या संकेतस्थळावर खालील विडिओ सापडला. http://www.youtube.com/watch?v=P7Xgc4ljHKM या विडिओवर काही ब्राह्मण जातीत जन्माला आलेले लोक झाडू मारणे किंवा साफसफाई करणे असली कामे नाईलाजास्तव करीत आहेत असे दिसते. आणि एकंदर सूर असा दिसला कि आम्ही ब्राह्मण असून आम्हाला अशी हलक्या दर्जाची कामे करावी लागत आहेत. झाडू मारणे, शौचालय साफ करणे ही ब्राह्मणाची कामे नाहीत, या मानसिकतेतून अजून कोणी बाहेर यायला तयार नाही. शारीरिक श्रमांची कामे करणे म्हणजे कमीपणा, असल्या मानसिकतेतून आपण बाहेर येणारच नाही आहोत का. जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार. परदेशी सर्रास सर्व ब्राह्मण मुले उपहारगृहात कामे करतात. मग भारतातच काय होते?

In reply to by खटपट्या

"जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार?" आमच्याच घरातील काही उदाहरणे. १. एका भावाला शिकण्याची आवड न्हवती.तो रिक्षा चालवायचा. २. दुसर्‍या भावाला पण शिकण्याची आवड न्हवती.तो टायपिंग शिकला आणि नौकरीला लागला. ३. तिसर्‍या भावाला व्यवहार ज्ञान भरपूर.तो आय.टी.आय. झाला.आज स्वतःचा व्यवसाय करतो. ४. चौथ्या भावाला व्यवहार ज्ञान प्रचंड. तो ११वी नापास. शिक्षणाचे सगळे कागद दहावीच्या मार्क-लिस्ट सकट बंबात टाकले.एका बिल्डरकडे १०रु.रोजावर सळ्या तोडायला लागला.थोडे वर्षांनी वायरिंगची कामे घ्यायला लागला. नंतर बरेच धंदे सुरू केले.आज वयाच्या ४७व्या वर्षी सगळे धंदे बंद करून मस्त मजेत जगत आहे. ५. पाचव्या भावाचे पुणे शहरात स्वतःचे गॅरेज आहे. ६. माझ्या एका मित्राचे वडील टाटा कं.त मोठ्या हुद्द्यावर होते.मुलगा जेमतेम बी.कॉम. झाला.पण आवड म्हणून गाड्या दुरुस्त करतो आणि आता त्यातच जम बसवून आहे. ७.ह्या भावाने स्वतःचे पैसे शेयर मध्ये गुंतवून रोज स्वतःपुरते कमावतो. ह्यातला एक टायपिंग करणारा सोडला तर इतर सगळे रस्त्यावरच धंदा करतात. असो... अजूनही खूप उदाहरणे देता येतील.

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या 06/10/2014 - 04:35
सर, बरोबर आहे तुमचे म्हणणे, माझ्याही माहितीत बरेच जण आहेत. माझे विधान सरसकट नव्हते. पण विडिओ दुव्यावर ज्या प्रतिक्रिया होत्या त्या बहुतांशी माझ्या म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या आहेत. माझे निरीक्षण असे आहे कि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज उत्तर भारतातील ब्राह्मण समाजापेक्षा खूपच पुरोगामी आहे.

स्पंदना 06/10/2014 - 05:26
कोणाला कसला अभिमान असला तर तो स्वतःबद्दल असावा या मताची होउन राहिले आहे मी आता. त्यामुळे उगा उठुन कुणी स्वतःच्या अनुभवाबद्दल लिहीत असेल तर त्यात माझा अनुभव मिसळुन बे दुनी चार करण सोडुन दिलयं. जाती वरुन हीनवणे , मग ती उच्च असो वा हीन हे जितके इनह्युमन तितकेच जातीवरुन वागणुक देणे सुद्धा वाईटच. त्याही पलिकडे जाउन जेंव्हा एक स्त्री म्हणुन कनिष्ठ वागवल जात तेंव्हा तर जातसुद्धा गळुन पडते. एकून माणसांचे मुखवटे गळुन पडायला ना जातीच कारण पुरतं ना धर्माचं, नाही लिंग!

वेल्लाभट 06/10/2014 - 10:25
धाग्यातील विचार, पुढच्या प्रतिसादांतील अनुभव इत्यादी सर्व गोष्टी वास्तवाला धरूनच आहेत. मग वैयक्तिक पातळीवर असतील किंवा व्यापक पातळीवर. त्याबाबत भाष्य न करता एक प्रांजळ मत मांडू इच्छितो. आरक्षणाबाबत आणि त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत. एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जो सतत ज्ञानार्जनास उत्सुक असतो तो ब्राह्मण. ही व्याख्या धरून पुढे म्हणावसं वाटतं, अशा ब्राह्मणाला त्याच्या ज्ञानाचा अभिमान असतो आणि तीच त्याची ताकद असते. आता, सर्वसाधारण अर्थाने किंवा जातीने जे अब्राह्मण असतात ते मूर्ख असतात का? मुळीच नाही. मग; आरक्षणाचा उपयोग करून शिक्षणसंस्थात प्रवेश मिळवणं त्यांना मोठेपणाचं का वाटतं? त्याची गरज त्यांना का लागते? 'आरक्षण' या गोष्टीकडे मी कुबड्यांसारखं बघेन. मला नीटपणे चालता येत असताना कुबड्या घेऊन चालण्याची आणि स्वतःला अपंग म्हणवून घेण्याची इच्छा मला होणार नाही. पण तसं समाजात होताना दिसत नाही. 'मला रिझर्वेशन आहे मित्रा! ओबीसी! ' हे अभिमानाने सांगणारे मित्र बघितलेले आहेत मी. त्यांनाही हा विचार सांगून बघितला, पण मिळतोय फायदा तर का न घ्या? ही त्यांची त्यावरची प्रतिक्रीया असायची. तेंव्हा जोवर हा विचार समाजमनातून नष्ट होत नाही (कठीण आहे ते) तोपर्यंत ७८-३८ चा फॉर्म्युला अबाधित आहे.

बाळ सप्रे 06/10/2014 - 11:09
लेख आवडला !! जन्माने जात असु नये हे तात्विक दृष्ट्या सर्व जण मान्य करतात.. पण व्यवहारात जात ही जन्मानेच ठरते हे सत्य आहे. काळाप्रमाणे लोकांचे व्यवसाय कामधंदे बदलले पण जाती त्याप्रमाणे बदलल्या नाहीत..

In reply to by बाळ सप्रे

असंका 06/10/2014 - 12:23
लेख आवडला असे म्हणून आपण लेखकाला शालजोडीतले देत आहात का? कारण ह्या वाक्यानं सरसकट सगळ्या लेखाचं कौतुक होत आहे. सरसकटीकरण हे तर लेखकाला मुळीच आवडत नाही. लेखातल्या या वाक्याबद्दल आपले काय मत आहे? तेही आपल्याला आवडले का? "हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या" ब्राह्मण समाजाला बहुजन समाज हा आपला शत्रु म्हणून लागतो? मुस्लिम लोक शत्रु म्हणून लागतात? युपीचे भय्ये शत्रु म्हणून लागतात? ही कसली गरज म्हणायची ब्राह्मणांची? उत्तर देण्याचे बंधन नाही. मी हा प्रश्न पुन्हा लेखकालापण विचारणारच आहे.

खरं पाहता मी कांहीच प्रतिसाद ह्या धाग्यावर देणार नव्हतो. मुळात, एकदा पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . असा डिस्क्लेमर सुरुवातीलाच टाकला की आपला कल्पनाविलास आपल्याला हव्या त्या दिशेने नेता येतो. कुठल्याही काल्पनिक गोष्टी 'मला आलेला अनुभव' ह्या नांवाखाली लिहून समाजातील कांही जाती वर्गाला भडकवायचं, वादविवाद घडवून आणायचे आणि मिटक्या मारत मजा बघत राहायची, ह्या विकृत उद्देशाव्यतिरिक्त ह्या धाग्यात मला तरी कांही दिसत नाही. ज्यांना भांडायचे असेल त्यांनी भांडावे, पण सूज्ञांनी विचारपूर्वक दूर राहावे असे मी आवाहन करेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्णपणे सहमत आहे. एकद्याच्या वैयक्तिक अनुभवावर काय बोलणार ?? कुठेतरी काड्या लावायच्या आणि आग लागल्यावर गंमत पहात उभे रहायचे..

सूड 06/10/2014 - 15:20
तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून ठीकाय पण बर्‍याचदा चर्वितचर्वण झालेला विषय असल्याने आता प्रतिसाद द्यायचा उबग आलाय. तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचले हेही नसे थोडके!! मिपाच्या कट्ट्यांबद्दल म्हणाल तर प्रश्न विचारण्यापेक्षा एकदा येऊन बघा तुमचं तुम्हालाच उत्तर मिळेल. ॥इति लेखनसीमा॥

विटेकर 06/10/2014 - 15:59
हीन दर्जाच्या लोकप्रियतेसाठी लिहिलेला लेख ! माझे बालपण ठार खेड्यात गेले. माझे आई- वडील शिक्षक होते त्याच शाळेत ,तरीही आमचे जाधव मास्तर सानुनासिक स्वरात " काका" म्हणून आम्हाला हाक मारायचे ! माझे वय तेव्हा फक्त ८ वर्षे होते. अश्या शालेतून मी चौथीची शिष्यवृत्ती मिळवल्यावर हा द्वेष आणखीनच वाढला ! शेवटी जंग जंग पछाडून वडिलांनी बदली करुन घेतली तालुकयाच्या गावाला !. (तालुक्याचा सभापती ९६ कुळी , तो कशाला बामणाचे काम करेल? पण एका मुसलमान शिक्षणाधिकार्‍याला दया आली.)तिथेही द्वेष होताच पण तुलनेने कमी .. त्याच गावांत मी कॉलेजला गेल्यावर मराठ्यांच्या पोरांना , " ए कुळवाड्या " म्हनून हाक मारुन बदला घेतल्याचे समाधान मिळवायचो ! आजही त्या खेड्यातील ब्राह्मण द्वेष तसाच आहे !!! गेल्या १० वर्षात तर तिथे आता नावाला देखील ब्राह्मण राहिला नाही. मग संघाच्या संपर्कात आलो, राजाभाऊ भोसले होते प्रचारक , त्यांनी समाजावून सांगितले आणि अंतर्बाह्य शुद्ध झालो. पुढे तर औरन्गाबादला असताना स्वरुपवर्धिनीचे काम करायला लागलो , बुद्धवंदना शिकलो. मनात कसलेही किल्मिष राहीले नाही. ब्राहमण असल्याचा मला काहीही फायदा झाला नाही, उलट बाल-मनावर अत्यन्त वाईट आघात झाले. माझे आई- वडील नीर-क्षीर विवेक करणारे होते, मला संघाचा परिस स्पर्श झाला म्ह्णून माझे किल्मिष जळून गेले. असे किती भाग्यवंत असतील? उदगीरकरांचा धागा निव्वळ राळ उडविण्यासाठी काढला आहे. ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. पु. लं नी दलित साहित्याचे स्वागत आणि कौतुक दोन्ही केले.. असो अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण लक्षात कोण घेतो ? खरे तर प्रतिसाद देणारच नव्हतो .. पण अगदीच राहवले नाही . म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , काळ सोकावतो आहे.

ज्ञानव 06/10/2014 - 16:51
ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. तो बहुजन समाजही किती लक्षात ठेऊन आहे? ब्राम्हणांनी माझा उद्धार (चांगल्या अर्थाने) केला / ब्राम्हणांची सांगत होती म्हणून माझ्यात अमुलाग्र बदल झाला हे कितीजण मान्य करतील ? दुर्दैव हेच आहे की ब्राम्हणाने काढलेला धागा त्यावर ब्राम्हणांनी दिलेले प्रतिसाद आणि ब्राम्हणेतरानी दिलेले प्रतिसाद किंवा "मला आहे अभिमान दलित असण्याचा " किंवा "आहे मी मराठा मग...?" असा एखादा धागा ब्राम्ह्णेतराने काढावा त्याला येणारे प्रतिसाद तपासावेत मगच कळेल काहीतरी. एक ब्राम्हण दुसर्या ब्राम्हणाच्या बाजूने उभा रहात नाही पण बाकी सगळ्या जातीतले लोक आपल्या जातीतल्या माणसामागे उभे राहतातच हा अनुभव आहे.

एस 06/10/2014 - 16:51
अशा विषयांवर उघडपणे काही लिहिण्याबोलण्याची सोय राहिलेली नाही. मग ते एका समाजातले असो वा दुसर्‍या. वेळ मिळाल्यास व्यनि/खवद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

समीरसूर 06/10/2014 - 17:19
ब्राह्मणांनी कुठले फायदे ओरपले ते कळले नाही. अजूनही दरिद्री ब्राह्मण खूप आहेत. ब्राह्मणांची शेती कुळकायद्यात गेली. आरक्षण नसल्याने ब्राह्मणांना शासकीय नोकर्‍यांची आणि शिक्षणाची शक्यता जवळ-जवळ संपुष्टात आलेली आहे. ब्राह्मण शेकडो एकर जमिनीचे मालक, जमीनदार, साखर कारखान्यांचे मालक, भव्य कॉलेजेसचे मालक, सहकारी सूत गिरण्यांचे प्रवर्तक वगैरे कधीच नव्हते. ते आधीपासूनच शिक्षणाच्या बळावर जगत आलेले आहेत. कधी काळी (६०-७० वर्षांपूर्वी) ब्राह्मणांनी पाळलेल्या अस्पृश्यतेपेक्षा कितीतरी पट जास्त अस्पृश्यता आणि पराकोटीचा आकस पाळणार्‍या जाती आजही महाराष्ट्रात आहेत. ब्राह्मण कुणालाही मदत करतांना जात विचारून कधीच मदत करत नाहीत. माझ्या बाबांनी गेल्या ४५ वर्षात कित्येक गरीब आणि ब्राह्मण (उच्चवर्णीय) नसणार्‍या गरीब मुलांना मोफत शिकवले आहे. त्यांनी कुणालाही मदत करतांना कधीच जात विचारात घेतलेली नाही. आणि अशी कित्येक उदाहरणे मला माहित आहेत. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात (आणि इतर क्षेत्रातदेखील) कित्येक ब्राह्मणांनी कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता आयुष्याचे प्रामाणिक समर्पण केले आहे. राजगुरु, सेनापती बापट, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, यांनी आयुष्य देशासाठी वेचले. साने गुरुजी, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, टिळक, दादा धर्माधिकारी, र. धो. कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाबा आमटे अशा कित्येक थोर ब्राह्मणांनी समाजसुधारणेसाठी आयुष्य खर्ची घातले. ही यादी अजून बरीच मोठी होऊ शकेल. या लोकांनी फक्त ब्राह्मण लोकांचेच भले व्हावे म्हणून आयुष्य वेचले असेल असे वाटत नाही. संत ज्ञानेश्वरांनी जे अलौकिक साहित्य निर्माण केले त्यात कुठेही जातीपातीचा किंवा इतर जातींचा द्वेष करावा असे लिहिलेले नाही. काळाच्या पुढचे इतके सुंदर पद्धतीने लिहिणारे हे संत ब्राह्मणच होते. संत एकनाथांनी कधी जात-पात पाळली नाही. आजच्या युगातदेखील माधव गाडगीळांसारखे निस्वार्थ आणि निस्पृह व्यक्तिमत्व निसर्ग वाचावा म्हणून जीवाचे रान करत आहे. अंधश्रद्धेचे निर्मुलन व्हावे म्हणून झटणारे दाभोलकर असोत किंवा तर्कशुद्ध जगण्याची शिकवण देणारे डॉ. श्रीराम लागू असोत, ब्राह्मणांनी प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि जीव तोडून काम केलेले आहे. आजची परिस्थिती ब्राह्मणांसाठी उलट भयावह आहे. कुठलेच संरक्षण नाही. अकारण पसरविलेल्या गेलेल्या ब्राह्मणद्वेषाने आजचा ब्राह्मण हवालदिल झालेला आहे. जीव मुठीत धरून जगतो आहे. मी स्वत: कधीच जातपात मानली नाही आणि माझ्या आई-बाबांनी तसे मला कधीच चुकूनही शिकवले नाही. असा भेद करावा असे इतक्या वर्षात माझ्या मनालादेखील कधी शिवले नाही. आणि मी नेहमी तसेच वागत आलो. माझ्यासोबतचे कित्येक ब्राह्मण अगदी असेच वागतात हे मी अनुभवले आहे. माझ्या कित्येक चुलत-मावस बहिणींनी केलेले आंतरजातीय विवाह माझ्या नातेवाईकांनी आनंदाने स्वीकारले आहेत आणि त्या गेली कित्येक वर्षे सुखाने जगत आहेत. त्यावरून कधी हाणामारी, कापाकापी, सूडनाट्य वगैरे कधीच घडले नाही. माझ्या कमीत कमी ५ चुलत-आते-मावस भावांनी आंतरजातीय विवाह केले आहेत आणि ते देखील यशस्वी झालेले आहेत. मी ब्राह्मण असल्याचा मला अभिमान वगैरे नाही पण त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी, विचार, संस्कार वाट्याला आले त्यांचा अभिमान नक्कीच आहे. प्रत्येक जातीमध्ये, धर्मामध्ये, माणसामध्ये गुण-दोष असतातच. म्हणून ती जातच वाईट ठरत नाही. ब्राह्मणांविषयीचा हा अनाठायी द्वेष जेव्हा संपेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

ज्ञानव 06/10/2014 - 18:12
दरिद्री + ब्राम्हण हीच मुळात द्विरुक्ती आहे. बाकी माझा एक मित्र नेहमी त्याच्या मोठ्या भावाबद्दल सांगतो "तसा आमचा णाणा म्हणजे ब्राम्हनच"

जेपी 05/10/2014 - 17:35
पंखासाब पॉपकॉर्न आनलेत . पयल्या रांगेत बसुन आरामात खाऊ. बाकी धागाकर्त्याचे आणभव आमाला का येत नाय.

जेपी 05/10/2014 - 17:54
पंखा साब शमत आहे. उद्या बकरी ईद आहे.त्यामुळे धागा ओस पडु नये याची काळजी घेऊ.नंतर आहेच खंग्री चर्चा.

सर्वसाक्षी 05/10/2014 - 18:41
ब्राम्हण नव्हे, ब्राह्मण. जाता जाता: वरील प्रतिसादकांची सदस्यनावे माम्लेदारचा पन्खा जेपी उगा काहितरीच यावरुन आपण जात कशी काय ओळखता? कुणी मुक्तविहारी कुणा साक्षीला कट्ट्याला बोलावतो यात त्यांची जात कशी काय दिसते? मुळात तुम्हाला समोरच्याची जात शोधाविशी का वाटते?

In reply to by सर्वसाक्षी

मी अस कधी म्हंटलं ? मी मला माहित नसलेल्या मुद्द्यावर प्रश्न विचारले . पुन्हा quote करतो हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे .

In reply to by पिंपातला उंदीर

"इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का?" तुम्ही आत्ता पर्यंत किती कट्टे केलेत? स्वत: अनुभवा आणि मग विचार करा.जमल्यास ह्या महिन्याच्या १८ ता. ते २९ ता. पर्यंत ३ कट्टे होणार आहेत.डोंबोली, ठाणे आणि पुणे. त्यापैकी कुठल्याही एका कट्ट्याला हजेरीपुरते तरी या आणि मग बघा. मी किंवा माझ्या बरोबरच्या कुठल्याही मिपाकराने कधीच आणि कधीही कुठल्याही कट्ट्यावर आलेल्या माणसाला जात विचारली नाही.वैयक्तिक माझ्या पुरते बोलायचे तर, मी फक्त २च जाती मानतो. बाह्मण किंवा अब्राह्मण. ब्राह्मण ====> जो सतत ज्ञान मिळवायच्या मागे असतो तो आणि अब्राह्मण =====> जो आहे त्या ज्ञानात समाधानी असतो किंवा मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग करत नाही, तो. मला नाही वाटत की मिपावर कुणी अब्राह्मण असतील म्हणून. जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.

In reply to by मुक्त विहारि

ज्ञानव 06/10/2014 - 11:36
ब्राम्हण्याची व्याख्या आवडली

जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.

मी पण विचारत नाही. पण धागाकर्त्याच्या म्हणण्यात हि अर्थ आहेच मुवी शेवटी प्रत्येकाचे अनुभव आणि वेदनाच असे काही लिहिण्यास उद्युक्त करत असतात? १) "ब्राम्हणांनी पेशवाई घालवली" हे वाक्य किंवा हा पराक्रम आणि सगळे नॉन-वेज ब्राम्हणांनी महाग करून ठेवले हे ऐकताना होणारी वेदना बरयाच वेळा हमरीतुमरीवर गेली आहे. २) सरकारी नोकरीत ब्राम्हण सहकार्याने आधीच्या कर्मचार्याचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणल्या नंतर जातीविषयक कायद्याचा बडगा उगारलेला पाहून येणारी हतबलता वेदना आजही त्रास देते आहे. ३) dipartmental परीक्षांमध्ये ब्राम्हणांना डावलून इतरेजनांना पास करून सिनिओरीटी घालवलेली पहिली तर वाईट वाटत आले आहे. आणि ब्राम्हणेतर सर्व एरवी भांडले तरी त्यांच्यातल्याच एकावर अन्याय झाला (कुणाकडूनही)तर ते एक होताना कोर्टात जाताना पाहिलेत पण ब्राम्हण कधीही एक होत नाहीत ते आप्ल्यातल्याच ज्याच्यावर अन्याय झालाय तो कसा मूर्ख आहे आणि मी किती शहाणा आहे त्याची फुशारकी मारतो हे हि उद्विग्न करते. ब्राम्हण्याची व्याख्या आवडली पण ती वैयक्तिक जो पर्यंत समोरचा फणा काढत नाही तोपर्यंत. माझे मित्र, क्लायंटस कलीग्स वेग वेगळ्या जातीतले आहेत पण मी त्यांची जात कधी लक्षात घेतली नाही तरी कधी विषय निघाला की ते मला "भटा" म्हणंत आले आहेत पण मी जातीविषयक कुठल्याही कायद्याची मदत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मला ते हसण्यावारीच न्यावे लागते पण मी कुणाला कुठलेही जातीविषयक संबोधन वापरू शकतच नाही स्वभावानेही आणि कायद्यानेही. पण मग एखादा ब्राह्मण जर वरील प्रमाणे आपले मत मांडत असेल तर त्याला माझे नक्की अनुमोदन, पाठींबा आहेच आहे.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 06/10/2014 - 20:12
पुण्याच्या कट्ट्याचा पत्ताच नाहिये...
आम्हाला पुण्याच्या कट्ट्याची माहीती हवीये.. कुठे मिळेल. ?

पैसा 05/10/2014 - 18:46
ज्याचे त्याचे अनुभव आणि विचार. प्रत्येकालाच असे अनुभव असतील असे नव्हे. किंवा तुम्ही जी भीती/गंड याबद्दल बोलताय ते व्यक्तिगत पातळीवर असण्याची शक्यता जास्त वाटते आहे.

उदयन 05/10/2014 - 19:29
ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .
असे लिहायला हिंमत लागते. आपले अभिनंदन

मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे हा माझ्यालेखी आपल्या लिखाणातला षट्कार आहे!!!!. मी शुद्ध इंग्रजीत विचारत असतो " व्हाय स्टीरियोटाईप ??" माझी तर केसच निराळी आजा अन त्याचे दोन भाऊ हिंसप्रसे चे सशस्त्र क्रांतिकारी होते, साक्षात चंद्रशेखर आझाद उर्फ पंडीतजी ह्यांनी क्रांतिदिक्षा दिलेले, मला माझा प्रत्येक ब्राह्मण मित्र काहीतरी वेगळ्या नजरेने पाहतो, अन बहुजन समाज "हा बामन" ह्या इंप्रेशन मधे असतो, आयडेंटीटी क्रायसिस होतो राव कधी कधी!!!

एका आव्हानात्मक विषयावर मोकळेपणाने व संयतपणे लिहिल्याबद्दल अभिनंदन. माझ्या सुदैवाने मला लहानपणापासून सर्व जातिधर्माच्या लोकांबरोबर राहायला मिळालं. वर्तमानपत्रं व मासिकांमधील बातम्यांमध्ये व वैचारिक लेखनांमध्ये जात्यंधपणाच्या बातम्या व उल्लेखांची प्रत्यक्षातली उदाहरणे मला स्वतःला फारच क्वचित दिसली. स्नातकोत्तर शिक्षणासाठी बारामतीला राहत असताना राज्याच्या इतर भागांतून आलेल्या काही सवंगड्यांच्या आचरणातून तीव्र जातीयात प्रथमच दिसली. इसकाळमध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र / मराठी मंडळांच्या बातम्या प्रकाशित झाल्या की त्यावरच्या अनेक प्रतिसादकांचा रोख असतो की सदर सांस्कृतिक चळवळीवर ब्राह्मणांनी एकाधिकार निर्माण केला आहे. प्रत्यक्षात याविरुद्धची उदाहरणे नक्कीच पाहिली आहेत. मी स्वतः अनेक वर्षांपासून या चळवळींमधला स्वयंसेवक आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर मंडळे चालत असल्याने जे अक्षरशः मजुरासारखे परिश्रम करतात ते चळवळीचा चेहरा बनतात. जे मंडळांच्या कार्यक्रमांना प्रेक्षक म्हणून येतात व परत जातात त्यांना कदाचित दूर ठेवले गेल्याची भावना होत असावी. बाकी आपल्याला पटो वा न पटो आपल्या समाजातली जातीयता हे कटू वास्तव आहे.

भाते 05/10/2014 - 20:36
ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर!!! काय फायदे मिळाले ब्राह्मण असल्याचे? मीसुध्दा ब्राह्मण आहे. च्यायला, दहावीनंतर त्या कुठल्यातरी 'अबक' जातीला ३८% मिळाले असताना महाविद्यालयात प्रवेश मिळतो आणि ५८% मिळालेल्याला केवळ (इतर/ब्राह्मण) जातीमुळे त्याच महाविद्यालयात प्रवेश नाकारला जातो! काय वय असतं दहावीला? जेमतेम १५-१६ वर्ष! तेव्हापासुन हा भेदभाव लक्षात आल्यावर पुढे त्याच्याकडुन काय अपेक्षा करणार? ७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन? अर्थात तो ३८% वाला अकरावीला चार विषयात नापास होतो. पण गेली/घालवली ना त्या ५८%/७८% मिळवलेल्याची जागा! दहावीला असताना मी हे अनुभवले आहे.

In reply to by भाते

उदयन 05/10/2014 - 21:06
७८% मिळालेल्याला ती जागा नाकारली गेली तर? काय करायची आहे ब्राह्मण जात! त्यापेक्षा 'अबक' जात लावली तर ३८% मिळवुनसुध्दा मिळतो ना त्याच महाविद्यालयात प्रवेश! मग कशाला करायचा वर्षभर अभ्यास रक्त अटवुन? ----------------- तुमचे म्हणने रास्त आहे. पण हे केवळ गेले ३०-४० वर्षापासुनच सुरु झाले. तरी तुम्हाला इतका राग. मग विचार करा वर्षानुवर्षे मार्क देणे तर दुर राहिले ज्यांना शिक्षणापासुन देखील वंचित ठेवलेले अशांचे विचार काय असतील ? १५-१६ तर लांबची गोष्ट आहे अजुन ही बर्याच ठिकाणी ५-६ वर्षाच्या मुलांना देखील दुय्यम स्वरुपाची वागणुक मिळते

In reply to by उदयन

ज्ञानव 06/10/2014 - 11:46
पण हा वंचितपणा ब्राम्हणांनी दिला का ? पूर्वीच्या सर्व अत्याचारांचे खापर फक्त ब्राह्मणांवर फोडणे कितपत योग्य आहे. राजकारण हे कायम क्षत्रियांच्या हातात होते त्यांनी का प्रयत्न केले नाहीत सर्वांना योग्य शिक्षण मिळवून देण्याचे ? भातेसाहेब म्हणतात तोच प्रश्न मला पडतो नक्की आम्ही काय फायदे

ओरपले?!!!!

In reply to by भाते

सुहास.. 06/10/2014 - 17:35
डिसक्लेमर : प्रतिसादात जाती-पातीचा उल्लेख केवळ रेफरन्स करिता होय सहानभुतीच !! सर्वच समाजासाठी ... धागा व्यापक असला तरी त्याबाबत अज्ञभिन्न असलेला गट मात्र त्यातील व्यापकता समजण्याकरता पूर्वग्रहाने येणार हे जरी ग्रहीत धरत असलो तरी, तुम्ही म्हणता तितकी अधोगती ( झाली तर काही अंशी का असेना प्रगतीच म्हणेन मी ) झालेली नाही. समाजात कोणीएके काळी असलेली कट्टरता मात्र काही अंशी कमी झाली असे ही याला जोडुन मी म्हणेन. अर्थात तुम्हाला...आय मीन लेखाला विवेकी बुध्दीने आणि समान नजरेने बघणारे कमी आहेत. ( हल्ली काय आहे ना ..लोक गीता देखील त्यात स्वःताचा अर्थ घालुन वाचतात..खरा अर्थ जो आहे तो त्या कृष्णदेवालाच ठाउक ! ) ही उदाहरणे आहेत , समाज दुभंगल्याची, माझ्याकडे उदाहरणे आहेत जिथे मी एकवटल्याचे पाहिले आहे, बेटी चा नसेल जास्त प्रमाणात व्यवहार पण रोटीचा व्यवहार आहे. माझ्या ओळखीच्या एका कडक वैष्णव ब्राम्हणाने, घरात कडाडुन विरोध असुन एका अनाथ मुली शी लग्न केल्याचे उदाहरण आहे ( या अनाथालयात फक्त वेश्यांच्याच मुली असतात ). आज कित्येक वर्षे सुखाचा संसार करतोय, असे दलीत-मुस्लीम-ब्राम्हण-मराठा एकत्र पार्टीला पाहिलेत ..माझा सांगतो अनुभव , पेग क्रमांक तीन, तो मराठा, त्याच्यासमोर बसलेला ब्राम्हण आहे , दलीत एका बाजुला , तिघांना एका प्लेटमध्ये 'प्लेन चीज ' खाताना पाहिलय, वाद चालु आहे " शहाण्णव कुळी म्हणजे काय आहे माहीत आहे का ? " समोरुन आवाज " परशुरामाने काय २१ की ५२ वेळा नि:क्षत्रीय केलीय " याच पार्टीत चौथा देशस्थ म्हणतो " ओ, चित्पावन, गप्प बसा आता " आणि सरते शेवटी सगळे मिळुन दाल-खिचडी खातात, बनविणाना मुस्लीम आहे की नाही याचा विचार न करता ? काय म्हणाल याला ? सावरकर जेवत नव्हते दलीतांच्या पंगतीत? मी स्वःता कितीतरी दलीत भक्त पाहिलेत सावरकरांचे ! आहेत काही ! पब्लीक जरा भयताड झालय ! सुरुवात मी मिपावरच्या एका उदाहरणाने देतो, एरवी वाचन-मात्र असलेला आयडी असे काही धागे दिसले की लगेच " काडीमात्र" होतात, ब्राम्हण्य आणी त्याच श्रेष्ठत्व टिकविण्याची त्या आयडी ची मरमर ( आधी कुत्तरओढ असा शब्द लिहीला होता ) पाहिली की अक्षरशः किळस येते , याचा अर्थ सोनवणींच्या ब्लॉग ची वा चेपुवर ते काय " संभाजी ब्रिगेड - भटांचा कर्दनकाळ " ची येत नाही असे काही नाही , मला त्याहुनी जास्त येते !! कोणीतरी वाघमारे म्हणुन आहेत ..ब्लॉक करुन टाकले मी शेवटी चेपुवर ...हे असे अनेक किस्से आहे ..जात लागते ती एकदा का निवड्णुका जाहीर झाल्या की ( काय च्या मारी ! पण मी आशावादी आहे, एक ना एक दिवस हे ही चित्र बदलेल ) थोडेसे आरक्षणाविषयी .. मी ब्राम्हण वर्गाचा राग समजु शकतो ..पण काही करु शकत नाही, खर तर ! सध्या कोणीच काही करु शकत नाही (अगदी समान नागरी कायदा ही ) आरक्षणाला लागुन एक कलम आहे , की दरवर्षी आरक्षितांच 'समाजातील' प्रमाण आणि शैक्षणिक पातळीवरच, सरकारी नौकर्‍यांमधल प्रमाण, सम ( सारखं ) झाल की मग ते लगेच रद्द होवु शकते. जातीनिहाय जणगणना होते ती यामुळेच !! आणि आरक्षणाच्या मुदतीची डेट पुढे ढकलावी ते ही याच मुळे !! फायदे-तोटे ही आहेत, आहे थोडी प्रगती आहे ! पण काय करणार समाज इतका जात-पात मानतो की विचारु नका, :( आधी राजस्थान राज्य सरकार ला गुज्जर समाज आरक्षित करता आला, आता कॉन्ग्रेस ने मराठा ला दिलं, हे मराठा समाजाच झाल असे की , त्या आधी मराठा- कुणबी समाज आरक्षित होता, आता हे कुणबी म्हणजेच ९६ कुळी म्हणणारे काही आणि ९६ कुळी च कुणबी म्हणनारे काही, त्यांचा टक्का बघीतला गेला आणि राज्य सरकार ने देवुन टाकल आरक्षण !! ) फायदा होईल की नाही माहीत नाही ( आपल्या राज्य सरकारकडे साध्या पोलीस भरत्या करायला वेळ नाही, उगा राजकारण तिज्यायला ! ) ब्राम्हण समाजाच हे असं होत, सामाजिक दृष्ट्या समाज दुर्बल दिसत नाही ( एकही किस्सा आठवेना मला ज्यामध्ये दलीत मुलीने ब्राम्ह्ण वा उच्चजातीतील मुलाशी प्रेम केले म्हणुन दलीतांनी ब्राम्हण/उच्चवर्णीयाची हत्या केली ती) , आर्थिक दृष्ट्या बघावं तर ( तुम्हाला इथलेच किती-तरी लोक्स परदेशात सेटल झालेले दाखवेल मी ) असेल एखादा दुसरं गंविनी लिहिल्याप्रमाण, मुळात लक्षात घेतला जातो ते टक्का ! अश्या कित्येक बाबी आरक्षणची डेट वाढविताना लक्षात घेण्यात येतात, वाजपेंयी नी एकदा असा अहवाल मागविला होता, वर्ष आठवत नाही , पण त्यांनी तो पाहिल्यावर ते थक्कच झाले होते , केवळ ४० % आरक्षितापर्यंत च आरक्षणाचे फायदे पोचले होते, त्यांना तो गुंडाळुन ठेवावा लागला आणि उलट ते प्रकरण हाताशी धरुन मायावती खाजगी क्षेत्रातही आरक्षण द्या ही मागणी पुढे ढकलली होती. आणि मला वाटते मागाहुन कॉन्ग्रेस कडुन प्रमोशन मध्येही आरक्षण मंजुर करून घेतले होते ! पण आता याचा अर्थ असा नाही की दलीत समाज आरक्षणाच्या विरुध्द नाही , एक खुप मोठा गट आहे, विषेशतः प्रकाश आबेंडकराना मानणारा, त्याच म्हणणे असे आहे की जात ही टीसी मधुनच काढुन टाका, मग ती कोणती का असेना, आणि क्लॅरिटी आणा ! सर्वच क्षेत्रात, मग ती शैक्षणिक असो वा सरकारी नौकर्‍या, पारदर्शकता आणा !! लायकी ही सिध्द होईल , पण यामुळे राजकारण्यांना एक सर्वात मोठा तोटा होवु शकतो ...असे केले सर्व समाज एकवटेल , मग यांना जाती-पातीची आणि मुळे मते कशी मिळतील ( आठवा , बापटअण्णांना तिकीट न मिळाल्याने आणि कुठला ब्राम्ह्ण उमेदवार नसल्याने " पुणे ब्राम्हण सभेने मतदानावर टाकलेला बहिष्कार, खर सांगा असे वांझोटे धंदे केल्यावर कसा एकवटणार समाज ) मी तर काही लोकांना तो एकवटु नये म्हणुन ही शर्थीचे प्रयत्न करताना पाहिले आहे ! ब्राम्हण मित्राच्या, नितीन आगेच्या ब्रुटल मर्डर विषयीच्या, निषेधात्मक पोस्ट वर, " अंथरुण पाहुन पाय पसरावे " अशी मराठा समाजाचे आडनाव असलेल्या ची कमेंट आल्यावर काय समजायचे मातंग समाजाच्या लोकांनी... इथल्या काही कमेंट वाचल्यावर तर मीही त्याविषयी लिहायचचं बंद केले . .. आहेत अश्या बर्‍याच थेरॉटिकल गोष्टी , ज्याचा मागमुस ही नसतो लोकांना . प्रॅक्टीकली होते असे की , ब्राम्हण ब्राम्हण संस्काराच्या चौकटीत जगतो , दलीत दलीत मध्ये , मुस्लीम मुस्लीम चौकटी मध्ये, मराठा मराठा मध्ये त्यामूळे माझ्या जातीतील मुल्ये श्रेष्ठ्च असे बिंबविले जाते मग मी श्रेष्ठ म्हटल आपोआप दुसरा कनिष्ठ होतो !! हे मनामध्ये हळु-हळु वाढत जाते ......खुप कमी लोक असतात जी ही चौकट मोडतात आणि तेच वर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच उत्तर आहे . धन्यवाद !

In reply to by सुहास..

मृत्युन्जय 07/10/2014 - 12:02
+ १ फक्त एका बाबतीत थोडासा विरोध आहे सुहास. लग्न आणि त्यातुन झालेल्या हत्यांबद्दल. उच्चवर्णीयांनी निम्न वर्णीय कुटुंबातील मुलांची आणि मुलींची (उच्चवर्णीय मुलांना अथवा मुलींना फूस लावली म्हणून) हत्या केल्याची कैक उदाहरणे मिळतील. तु म्हणतोस त्याप्रमाणे उलटे झाल्याचे दिसत नाही. उच्चवर्णीयांनी केलेल्या या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या किती आढळतात आणि त्यातही महारष्ट्रीय ब्राह्मणांनी केलेल्या किती आढळतात? त्यामानाने इतर जातींनी केलेल्या आधिक आढळतील. खैरलांजी प्रकरण कशाचे द्योतक म्हणता येइल? तिथे उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांची हत्या केली (लग्न संबंधात नाही). उच्चवर्णीय म्ह्णजे कुणबी. निम्नवर्णीय होते महार. लातुर मध्ये बरोबर उलटी घटना देखील दिसुन येते. महाराष्ट्रात बघितले तर जातीपातीवरौन उच्चवर्णीयांनी केलेल्या हत्यांमध्ये ब्राह्मणांनी केलेल्या हत्या फारच कमी प्रमाणात आढळतील. इतर जातींनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्या अधिक सापडतील. ब्राह्मणांनी केलेल्या निम्नवर्णीयांच्या हत्येचे प्रमाण उत्तर प्रदेशात अधिक आढळेल. हे सर्व सांगण्याचे कारण इतर कुठल्या जातीवर ठपका ठेवायचे नसुन फक्त हे सांगण्याचे आहे की महाराष्ट्रातीय ब्राह्मणवर्ग उर्वरीत भारतातल्या ब्राह्मणांपेक्षा बराच सुधारित आहे. त्यामुळेच अस्पृश्य निवारणाची चळवल सुरुही महाराष्ट्रात झाली आणि वाढलीही इथेच. महाराष्ट्रीयन समाजातच कर्वे, आगरकर, सावरकर आणि रानडे यांसारखे जातीभेदाविरुद्ध आवाज उठवणारे समाजधुरीण निर्माण होउ शकले. दुसरी दुर्दैवी गोष्ट अशी की अस्पृश्यता जणु ब्राह्मणांनी निर्माण केली आणी जातिभेद त्यांच्यामुळेच वाढला असे चित्र निर्माण केले जाते, तसे असेल तर मग आज खैरलांजीसारख्या घटना का होतात? इतर जातीतले लोक इतकी अस्पृश्यता आणि जातिभेद का पाळतात? थोडेसे आरक्षणाबद्दल. आरक्षण सुरु होउन ६० वर्षे उलटली. जेव्हा सुरु झाले तेव्हा मागस वर्ग निश्चित केला नव्हता का? केलाच होता ना? मग ६० वर्षात त्या मागास वर्गात कुणबी, गुज्जर, मराठा अशी भर कशी काय पडली? हे उलटे आरक्षण नक्की कशाचे द्योतक आहे? ब्राह्मण सोडुन सगळे आरक्षित का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज नक्की का भासते? तो समाज पहिल्यापासुन सधन, शिक्षित आणि राज्यकर्ता नाही का? मग त्यांना आरक्षण का? आरक्षण हे गरज म्हणुन न वापरले जाता एक राजकीय साधन म्हणुन वापरले जाते हे खेदजनक आहे. आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे. आरक्षित समाजातील सनदी अधिकार्‍यांची मुले अजुनही आरक्षणाचा उपभोग का घेतात (फक्त सनदी अधिकारी असेच नाही तर मध्यमवर्गीय किंवा खाउन पिउन सुखी असलेले कनिष्ठ मध्यमवर्गीयांचेही उदाहरण घे). त्यांना अजुन किती काळ आरक्षण? ते लोक अजुनही उद्धारित नाही झालेले का? निम्नवर्णीय पण अजुनही आर्थिअक्दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना अजुनही आरक्षणाचा लाभ दिला तर एकवेळ समजु शकतो पण शिक्षित आणि सधन लोकांना का? एक नाही अनेक उदाहरणे देतो. माझ्या डोळ्यासमोर घडलेली. सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का? समजा काही शतके उच्चवर्णीयांनी निम्नवर्णीयांचे शोषण केले. मग आता कालचक्र उलटे फिरवायचे का? आणि ब्राह्मणांचे शोषण करायचे का? की जितकी शतके शोषण झाले तितकी शतके आरक्षण चालु ठेवायचे? आणि किती शतके मागे जायचे? आणि ठरवा एकदाचे की शोषण नक्की कोणाचे झाले. राज्यकर्त्या मराठा समाजाचे? सधन कुणबी आणी धनगर समाजाचे? असो. चर्चा करु तितकी कमीच आहे. उत्तरे कुणाकडेच नाहित. उगाच चिखलफेक करण्यात काही हशील नाही. अवांतरः प्रतिसाद जरी तुझ्या प्रतिसादाला उप प्रतिसाद म्हणून असेल तरी हा प्रतिसाद तुझा प्रतिसाद मान्य नाही म्हणुन दिलेला नाही तर त्या अनुषंगाने लिहावेसे वाटले म्हणुन दिलेला आहे. तुझा प्रतिसाद पटलेला आहेच.

In reply to by मृत्युन्जय

एस 07/10/2014 - 13:04
सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका बड्या अधिकार्‍याची मुलगी, एका सधन महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलगी असे अजुनही अनेक लोक पाहण्यात आले ज्यांनी महाविद्यालयातच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि एमबीए च्या अभ्यासक्रमासाठीही आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांना खरेच आरक्षणाची गरज होती का आणि आरक्षण त्यांचा अधिकार होता का?
फक्त एवढ्या एका मुद्द्याबद्दल बोलायचे झाले तर आरक्षण घेणे ही बर्‍याचदा सवलत लाटणे ह्या उद्देशाने नसून तसे ते घ्यावे लागते कारण खुल्या वर्गातून प्रवेश/नोकरी स्वीकारली तर पुढे आरक्षण म्हणा किंवा शिष्यवृत्ती म्हणा, अशा कुठल्याच बाबींचा लाभ होत नाही. ह्याची दुसरी बाजू अशी की पुरेसे मार्क असूनही जर खुल्या वर्गातून प्रवेश घेतला तरीही त्या वर्गातील एक सीट अडवल्याचाही दोष लागतो. त्यामुळे आरक्षण घेतले तर सवर्ण सहाध्यायांच्या नजरेतील 'सरकारी ब्राह्मण' अशी तुच्छता सोसणे आणि नाही घेतले तर आमची एक सीट अडवली म्हणून राग ओढवून घेणे अशा दुहेरी कात्रीत लोक सापडतात हो! मी माझ्यापुरतं जात-धर्म-वंश वगैरे संपवून टाकलं आहे, म्हणून समोरचा मला त्याच्या चष्म्यातून पाहणं थांबवत नाही ही खरी मेख आहे. जाऊ द्यात! या विषयावर अजून बोलायची इच्छा नाही.

In reply to by एस

सह्यमित्र 07/10/2014 - 15:03
हे तितकेसे पटत नाहि. बऱ्याचदा असे बघण्यात आले आहे कि आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन असणार्यांच्या मुलाना पुरेसे मार्क नसताना केवळ आरक्षणा च्या लाभा मुळे प्रवेश मिळतो काही वेळेला फी मध्ये सवलत देखील आणि आर्थिक दृष्ट्या निम्न पण केवळ उच्चवर्णीय असल्या मुळे प्रवेश मिळत नाहि. अशीच उदाहरणे पाहण्यात जास्त आलि आहेत.

In reply to by एस

सुबोध खरे 07/10/2014 - 18:46
देवयानी खोब्रागडे यांचे वडील उच्च स्तरीय(प्रमुख सचिव) आय ए एस अधिकारी होते ना मग त्यांनी आपल्या वैद्यकीय प्रवेशासाठी आणी नंतरच्या विदेश सेवेसाठी त्यांनी आरक्षण वापरलेच. (शिवाय त्यांचा मुंबईत एक फ्लैट असताना आदर्श मध्ये त्यांना दुसरा फ्लैट मंजूर झाला आणी हे त्यांच्या वडिलांना "माहित" नव्हते). अशा उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो. वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क सर्वाना एक लाख आहे तर मागास वर्गीयांना १० हजार आहे. ज्यांचे वडील अत्युच्च दर्जाचे शासकीय अधिकारी आहेत त्यांना हि फी ची सवलत म्हणजे अपात्री दान आहे. आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. ( हा एक मोठा वादग्रस्त राजकीय निर्णय आहे आणि कोणीही नेता हा निखारा आपल्या अस्तनीत ठेवणार नाही हेही मला माहीत आहे ).

In reply to by सुबोध खरे

सुहास.. 07/10/2014 - 18:56
उच्च स्तरीय अधिकार्याच्या अपत्यांना आरक्षण दिल्यामुळे त्याच कोट्यातील कोणा खरोखरीच गरज असलेल्या मागास वर्गीयावर अन्यायच होतो. +१ आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. >>> यावर मौनीबाबाचं सरकार विचार करत होते , अहवाल धुळ खात पडुन आहे असे सध्यातरी एकुन आहे !! कोणीतरी या विषयावर ' जनहित याचिका ' टाकायला हवी , माझा अभ्यास चालु आहे यावर ..खात्रीने सांगतो हा विषय खरोखरच चिंताजनक आहे !! नक्कीच कधी ना कधी हा विषय घेईल मी ...किमान याचिका दाखल करण्याबाबत तरी असो , बाकी सर्वांनी माझ्या प्रतिसादावर जी चर्चा आरंभली आहे त्यांचे धन्यवाद , आवडते ही आहे ...!! मी सविस्तर लिहेन वेळ मिळेल तसा ..

In reply to by सुबोध खरे

अजया 07/10/2014 - 19:13
हा अनुभव मी पण घेतलाय.नावाने मागासवर्गीय, सरकारी पदस्थांची अत्यंत कमी गुण मिळवुन आलेली धनाढ्य मुलं!! मात्र चार वर्ष पास होता होता नाकात दम आलेली!!

In reply to by सुबोध खरे

चिगो 08/10/2014 - 16:34
आरक्षण ठेवावे पण त्याला क्रिमी लेयर लागू करावा. सध्या तो फक्त इतर मागास वर्गाला लागू आहे तो सर्व आरक्षणाला लागू करावा म्हणजे जे त्या वर्गातील खरोखर गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.
ह्याच मुद्द्यावरुन सुमारे दोन वर्षांपुर्वी लिहीलेल्या लेखाची ही झैरात..

In reply to by मृत्युन्जय

सहमत. आरक्षण वाटल्यास अजुन १०० वर्षे ठेवा पण त्यांच्यासाठी ज्यांना याची गरज आहे. माझे तर म्हणणे आहे कांही टक्के आरक्षण ठेवण्या ऐवजी १०० टक्के आरक्षित महाविद्यालये सुरु करा. आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं. तिथे कोणाही उच्चवर्णियांना प्रवेश नसावा. शिपाई ते मुख्याध्यापक सर्व फक्त मागास वर्गातूनच पुढे आलेले असावेत. सर्व मागास विद्यार्थ्यांना अशा महाविद्यालयातून प्रवेश मिळावा. बाकी सर्व महाविद्यालयामधून इतरांना (ओपन वर्ग) प्रवेश द्यावा. मागास विद्यार्थ्यांनाही अशा (ओपन) वर्गात प्रवेश हवा असेल तर गुणवत्तेवर देण्यात यावा. तिथे कुठलेही आरक्षण नसावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

इरसाल 07/10/2014 - 15:00
आधी आरक्षणाचा फायदा घेऊन जे उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी ह्या महाविद्यालयातून आपल्या बांधवांना ज्ञानदान करावं. काका तुमचा डाव कळला हं मला, अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही. ;)

In reply to by इरसाल

अस सांगा ना की तिथे अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांना, तुम्हाला शिकुच द्यायचे नाही. का बरं? असं का वाटलं? मागास वर्गात आपल्या बांधवांना शिकवू शकतील असे ज्ञानी नाहीत की स्वतः शिकल्यावर ते समदु:खी बांधवांचा कैवार घेऊ इच्छित नाहीत? डॉ. आंबेडकरांपासून डॉ. नरेन्द्र जाधवांपर्यंत अनेक ज्ञानी पुरुष मागास वर्गात होऊन गेलेत आणि अजूनही आहेत. आपल्या ज्ञाती बांधवांना शिकवू शकतील असे कांही प्रोफेसर मिळू शकणार नाहीत? अशा व्यवस्थेत मागासांना शिक्षणही मिळेल आणि राजकार॑ण्यांना गलिच्छ राजकारण करायची संधी मिळणार नाही शिवाय पुढारलेले आणि मागास अशी दरीही उरणार नाही.

In reply to by सुहास..

राजाभाउ 07/10/2014 - 13:39
+१ अतिशय सुंदर प्रतिसाद. मला जवळपास असेच वाटते पण एतके व्यवस्थीत मांडता आले नसते. धन्यवाद सुहास

श्रीगुरुजी 05/10/2014 - 21:05
तुम्हाला जे अनुभव आले तसले अनुभव मला कधीही आलेले नाहीत. उलट ब्राह्मण हा विषय जास्त करून टिंगलीचा, उपहासाचा व मत्सराचा असल्याचे अनुभव आहेत. >>> ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? खरं तर ब्राह्मण असण्याचे फायदे कमी व तोटे जास्त आहेत. आता तर मराठा व मुस्लिम राखीव जागांमुळे तोटे अजूनच वाढले आहेत. ब्राह्मण असण्याचे नक्की कोणते फायदे ब्राह्मण ओरपतात ते सांगता का जरा? म्हणजे लग्नकार्यात, सत्यनारायणाची पूजा वगैरे कार्यात भटजींना जी दक्षिणा मिळते तो फायदा तुम्हाला अपेक्षित आहे का?

ब्राम्हण असल्याचे फायदे असण्यापेक्षा तोटे जास्त आहेत हे खरं. पण एक गोष्ट सर्व जाती जमातीमधल्या लोकांनी लक्षात घ्यावी ही कळकळीची विनंती. आरक्षण झगडायची ताकद कमी करेल. आयतं किंवा कमी कष्टात मिळालेली गोष्ट फार का़ळं टिकत नाही. मे बी आज नाही, पण साधारण १००-२०० वर्षांनी जेव्हा सर्व आरक्षित लोकं आरक्षण टेकन फॉर ग्रँटेड घेतील त्यादिवशी स्वतःचा नाश ओढवुन घेतील. प्रॅक्टीकल जगामधे, कामामधे ब्राम्हण असो वा दुसरा कोणी, जर का कामाचा नसेल तर टिकु शकणार नाही. त्यामुळे झगडायचं विसरु नका, कष्टाला पर्याय नाही. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ह्या नियमात कोणीही तुम्हाला आरक्षण देणार नाहीये.

In reply to by सस्नेह

सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम जगातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीला लागु होतो. जी गोष्ट वापरात राहात नाही ती कालौघात नष्ट होते हा इतिहास आहे आणि राहील.

In reply to by सस्नेह

एका समाजाला वारंवार वापरण्याची संधी मिळाली..म्हणून वृद्धी दुसर्याला अनेक पिढ्या ती नाकारली गेली .., ~हास !
अगदी बरोबर. पण त्याबरोबर ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की संधी नाकारणारे हा समाजाचा एक भाग होते आणि संपुर्ण समाज नव्हे. त्यामुळे सर्व समाजाचा द्वेश करणे योग्य नाही. मा़झ्याच ब्राम्हण समाजाच्या काही लोकांनी नाकारलेल्या लोकांना संधी उपलब्ध करुन देण्यामधे सिंहाचा वाटा उचलला ही गोष्ट सोयिस्करपणे विस्मरणात जाऊ नये म्हणुन हा लेखनप्रपंच.

दशानन 05/10/2014 - 22:18
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय। जो मन खोजा अपना, मुझ-सा बुरा न कोय।। - कबीर आजच कबीर वाचत होतो, त्यात हा मला आवडलेला दोहा मी नोट करून ठेवला होता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसा की आपला जन्म!

पैसा 05/10/2014 - 22:47
मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .
हे फारच धाडसी वक्तव्य आहे. व पु काळे आणि देशपांडे ही नावेसुद्धा माहिती नसलेले कित्येक ब्राह्मण मला माहित आहेत. मला स्वतःला व पु काळे अजिबात आवडत नाहीत, पु ल काही ठिकाणी आवडतात. तसेच यातल्या इतर विधानांच्याबाबत माझं उत्तर नकारार्थीच असेल मात्र माझी जात कोणती हे असं तुमच्यासारख्या कोणीतरी लिहिल्यावरच लक्षात येतं. एरवी नाही. ब्राह्मण समाजातसुद्धा अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा अजूनही किती प्रमाणात आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर ह.मो. मराठ्यांचं 'बालकांड' वाचा. उपरा किंवा बलुतं इतकाच दाहक आणि अस्वस्थ करणारा अनुभव मिळेल. तुमचं आतापर्यंतचं एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही. या लेखावर "वा वा काय छान लिहिलंय" असं मला म्हणून बाजूला रहाता आलं असतंच किंवा संपूर्ण दुर्लक्षही करता आलं असतं, पण तुम्ही लिहिली आहे तेवढी एकच बाजू या गोष्टीला नाही हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. याव्यतिरिक्त चर्चेला विनाकारण आरक्षण वगैरे वळणं लागणार असं दिसतंय. ते एक असोच. या संदर्भात मार्मिक गोडसे यांचा मिपावर हल्लीच आलेला लेख आठवला. असो. तेवढी मॅच्युरिटी सगळ्यांकडून अपेक्षित नाही.

In reply to by पैसा

रेवती 05/10/2014 - 23:05
सहमत आहेच पण हा विषय इतक्या जास्तवेळा चघळला जाऊनही तू प्रतिसादास टंकाळा केला नाहीस म्हणून धन्यवाद. मला भयंकर टंकाळा आलाय. ज्यांना यापलिकडे पाहणं जमतं ते या चर्चेत फारसे नसतात.

In reply to by पैसा

निश 06/10/2014 - 12:26
पैसा ताईशी १००% सहमत. ह मो मराठे ह्यांचे बालकांण्ड हे वाचताना खरच रडु येत.ब्राम्हण आहे म्हणुन त्याना कष्ट करावे लागत नाही अस मुळिच नाही. जेव्हा माणुस कष्ट करुन मोठा होतो समाजात नाव करतो त्याचा अभिमान खरच बाळगला पाहीजे मग तो कुठ्ल्याही जातीचाही का असेना. मी ब्राम्हण आहे पण अस असताना मला ही खंत व दु:ख नक्कीच आहे की माझ्या आधीच्या पिढी़कडुन दलित समाजावर अन्याय झाला आहे पण मी त्याना दलित न समजता माझ्यासारखीच माणुस म्हणुन समजतो व हे ही सांगतो की आज त्या समाजातले माझे मित्र फार खुप मोठया स्थानी आहेत. आणि मला त्याचा खुप अभिमान आहे. माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.

In reply to by निश

vikramaditya 06/10/2014 - 16:23
चांगले लिहिलेत. पुर्वी अमानुष अत्याचार करण्यात आले ह्यात काही शंका नाही. तसेच
माणसाला संधी दिली की तो कोणीहि का असेना तो त्याच्या प्रयत्नानि त्या संधीचे सोन करतो हे मात्र खर.
हे वाक्य पटले.

In reply to by पैसा

एकूण लिखाण प्रचंड प्रमाणात सरसकट म्हणावं असं असतं, किंवा मला माहिती आहे तेवढंच जग अशी तुमची भूमिका बरेचदा दिसते. हा लेखही त्याला अपवाद नाही.
अगदी +१००. एकूणच काय की कोणत्याही माणसाचे जात-धर्म इत्यादी चष्म्यांमधून न बघता एक माणूस म्हणून मूल्यमापन व्हावे असे म्हणणारे लोकच त्याच चष्म्यांचा वापर करून ब्राह्मणांविरूध्द काहीतरी लिहितात ते बघून त्या दुटप्पीपणाचा भयंकर संताप येतो.या चष्म्यांचा वापर करून इतर जातींविषयी काही लिहिले की तो माणूस मोठा पुराणमतवादी पण ब्राह्मणांविषयी काही लिहिले की तो माणूस मात्र मोठा आधुनिक विचारांचा, पुरोगामी इत्यादी ठरतो. लेख आणि त्यातून होणारे सरसकटीकरण अजिबात आवडले नाही.विशेषतः कट्ट्यांवर एकाच जातीच्या लोकांचे वर्चस्व का असते यावर "तुम्ही आतापर्यंत किती कट्टे अटेंड केले आहेत" या प्रश्नावरील मौनच बरेच काही सांगून जाते.म्हणजे हे महाशय एकाही कट्ट्याला जाणार नाहीत आणि तरीही छातीठोक दावा करणार की कट्ट्यावर एका जातीच्या लोकांचे वर्चस्व असते!! याला उंटावरून शेळ्या हाकणे म्हणतात. बाकी काही नाही.

In reply to by पैसा

प्रदीप 06/10/2014 - 20:34
अत्यंत चपखल आहे, अतिशय आवडला. बालकांडचा* ह्या संदर्भातील उल्लेख सोडून, १०० % सहमत. * 'बालकांड' वाचल्यावर, मराठ्यांच्या वडिलांनी, स्वतःच्या विक्षीप्त स्वभावामुळे, स्वत:वर व स्वतःच्या कुटुंबावर दु:खे नाहक ओढवून घेतली, असे माझे मत झाले. म्हणून तेव्हढ्यापुरती सहमती नाही.

In reply to by प्रदीप

पैसा 06/10/2014 - 22:55
बालकांड च्या बाबतीत तुम्ही लिहिलंय ते १००% पटलं. ह.मो.मराठ्यांच्या वडिलांच्या विक्षिप्तपणामुळे त्यांना फार दु:खे सहन करावी लागली. मात्र ते कारण असलं तरी परिणाम जो झाला, (त्यांच्या आईच्या बाबतीत आजार असताना भूत लागलंय म्हणणे) तशा प्रकारचं दारिद्र्य आणि भुताखेतांनी झपाटलेले म्हणणे इ. अंधश्रद्धा मी लहान असताना सगळ्या जातींमधे, ब्राह्मणांमधेही पाहिल्या आहेत. त्यामुळे हे उदाहरण सहज आठवले ते इथे दिले. मात्र आठवायला बसलं तर श्री.ना.पेंडसे, दळवी आणि इतर कितीतरी लेखकांच्या लिखाणातून अशी उदाहरणे सहज देता येतील. या संदर्भात 'किरवंत' चीही आठवण झाली.

सस्नेह 05/10/2014 - 23:15
लेख छान आहे असे काही म्हणवत नाही. वैयक्तिक पातळीवर आलेले काही अनुभव तटस्थपणे मान्डण्यात लेखक यशस्वी झाला आहे एवढेच म्हणते. शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकेल असे वाटत नाही

भिंगरी 05/10/2014 - 23:25
मार्मिक गोडसे यांचा'आडनावाच्या आडून'या लेखातही अशाच प्रकारची माहिती दिसते.

खटपट्या 06/10/2014 - 00:36
मला माहित नाही कि हे अवांतर आहे कि नाही. आंतरजालावर शोध घेत असताना मला http://www.thebrahminsamaj.com/index.php या संकेतस्थळावर खालील विडिओ सापडला. http://www.youtube.com/watch?v=P7Xgc4ljHKM या विडिओवर काही ब्राह्मण जातीत जन्माला आलेले लोक झाडू मारणे किंवा साफसफाई करणे असली कामे नाईलाजास्तव करीत आहेत असे दिसते. आणि एकंदर सूर असा दिसला कि आम्ही ब्राह्मण असून आम्हाला अशी हलक्या दर्जाची कामे करावी लागत आहेत. झाडू मारणे, शौचालय साफ करणे ही ब्राह्मणाची कामे नाहीत, या मानसिकतेतून अजून कोणी बाहेर यायला तयार नाही. शारीरिक श्रमांची कामे करणे म्हणजे कमीपणा, असल्या मानसिकतेतून आपण बाहेर येणारच नाही आहोत का. जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार. परदेशी सर्रास सर्व ब्राह्मण मुले उपहारगृहात कामे करतात. मग भारतातच काय होते?

In reply to by खटपट्या

"जन्माने ब्राह्मण असलो म्हणजे आपण कोणीतरी उच्च आहोत आणि आपल्याला फक्त खुर्चीत बसायची कामे मिळणार, यातून बाहेर कधी पडणार?" आमच्याच घरातील काही उदाहरणे. १. एका भावाला शिकण्याची आवड न्हवती.तो रिक्षा चालवायचा. २. दुसर्‍या भावाला पण शिकण्याची आवड न्हवती.तो टायपिंग शिकला आणि नौकरीला लागला. ३. तिसर्‍या भावाला व्यवहार ज्ञान भरपूर.तो आय.टी.आय. झाला.आज स्वतःचा व्यवसाय करतो. ४. चौथ्या भावाला व्यवहार ज्ञान प्रचंड. तो ११वी नापास. शिक्षणाचे सगळे कागद दहावीच्या मार्क-लिस्ट सकट बंबात टाकले.एका बिल्डरकडे १०रु.रोजावर सळ्या तोडायला लागला.थोडे वर्षांनी वायरिंगची कामे घ्यायला लागला. नंतर बरेच धंदे सुरू केले.आज वयाच्या ४७व्या वर्षी सगळे धंदे बंद करून मस्त मजेत जगत आहे. ५. पाचव्या भावाचे पुणे शहरात स्वतःचे गॅरेज आहे. ६. माझ्या एका मित्राचे वडील टाटा कं.त मोठ्या हुद्द्यावर होते.मुलगा जेमतेम बी.कॉम. झाला.पण आवड म्हणून गाड्या दुरुस्त करतो आणि आता त्यातच जम बसवून आहे. ७.ह्या भावाने स्वतःचे पैसे शेयर मध्ये गुंतवून रोज स्वतःपुरते कमावतो. ह्यातला एक टायपिंग करणारा सोडला तर इतर सगळे रस्त्यावरच धंदा करतात. असो... अजूनही खूप उदाहरणे देता येतील.

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या 06/10/2014 - 04:35
सर, बरोबर आहे तुमचे म्हणणे, माझ्याही माहितीत बरेच जण आहेत. माझे विधान सरसकट नव्हते. पण विडिओ दुव्यावर ज्या प्रतिक्रिया होत्या त्या बहुतांशी माझ्या म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या आहेत. माझे निरीक्षण असे आहे कि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज उत्तर भारतातील ब्राह्मण समाजापेक्षा खूपच पुरोगामी आहे.

स्पंदना 06/10/2014 - 05:26
कोणाला कसला अभिमान असला तर तो स्वतःबद्दल असावा या मताची होउन राहिले आहे मी आता. त्यामुळे उगा उठुन कुणी स्वतःच्या अनुभवाबद्दल लिहीत असेल तर त्यात माझा अनुभव मिसळुन बे दुनी चार करण सोडुन दिलयं. जाती वरुन हीनवणे , मग ती उच्च असो वा हीन हे जितके इनह्युमन तितकेच जातीवरुन वागणुक देणे सुद्धा वाईटच. त्याही पलिकडे जाउन जेंव्हा एक स्त्री म्हणुन कनिष्ठ वागवल जात तेंव्हा तर जातसुद्धा गळुन पडते. एकून माणसांचे मुखवटे गळुन पडायला ना जातीच कारण पुरतं ना धर्माचं, नाही लिंग!

वेल्लाभट 06/10/2014 - 10:25
धाग्यातील विचार, पुढच्या प्रतिसादांतील अनुभव इत्यादी सर्व गोष्टी वास्तवाला धरूनच आहेत. मग वैयक्तिक पातळीवर असतील किंवा व्यापक पातळीवर. त्याबाबत भाष्य न करता एक प्रांजळ मत मांडू इच्छितो. आरक्षणाबाबत आणि त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत. एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जो सतत ज्ञानार्जनास उत्सुक असतो तो ब्राह्मण. ही व्याख्या धरून पुढे म्हणावसं वाटतं, अशा ब्राह्मणाला त्याच्या ज्ञानाचा अभिमान असतो आणि तीच त्याची ताकद असते. आता, सर्वसाधारण अर्थाने किंवा जातीने जे अब्राह्मण असतात ते मूर्ख असतात का? मुळीच नाही. मग; आरक्षणाचा उपयोग करून शिक्षणसंस्थात प्रवेश मिळवणं त्यांना मोठेपणाचं का वाटतं? त्याची गरज त्यांना का लागते? 'आरक्षण' या गोष्टीकडे मी कुबड्यांसारखं बघेन. मला नीटपणे चालता येत असताना कुबड्या घेऊन चालण्याची आणि स्वतःला अपंग म्हणवून घेण्याची इच्छा मला होणार नाही. पण तसं समाजात होताना दिसत नाही. 'मला रिझर्वेशन आहे मित्रा! ओबीसी! ' हे अभिमानाने सांगणारे मित्र बघितलेले आहेत मी. त्यांनाही हा विचार सांगून बघितला, पण मिळतोय फायदा तर का न घ्या? ही त्यांची त्यावरची प्रतिक्रीया असायची. तेंव्हा जोवर हा विचार समाजमनातून नष्ट होत नाही (कठीण आहे ते) तोपर्यंत ७८-३८ चा फॉर्म्युला अबाधित आहे.

बाळ सप्रे 06/10/2014 - 11:09
लेख आवडला !! जन्माने जात असु नये हे तात्विक दृष्ट्या सर्व जण मान्य करतात.. पण व्यवहारात जात ही जन्मानेच ठरते हे सत्य आहे. काळाप्रमाणे लोकांचे व्यवसाय कामधंदे बदलले पण जाती त्याप्रमाणे बदलल्या नाहीत..

In reply to by बाळ सप्रे

असंका 06/10/2014 - 12:23
लेख आवडला असे म्हणून आपण लेखकाला शालजोडीतले देत आहात का? कारण ह्या वाक्यानं सरसकट सगळ्या लेखाचं कौतुक होत आहे. सरसकटीकरण हे तर लेखकाला मुळीच आवडत नाही. लेखातल्या या वाक्याबद्दल आपले काय मत आहे? तेही आपल्याला आवडले का? "हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या" ब्राह्मण समाजाला बहुजन समाज हा आपला शत्रु म्हणून लागतो? मुस्लिम लोक शत्रु म्हणून लागतात? युपीचे भय्ये शत्रु म्हणून लागतात? ही कसली गरज म्हणायची ब्राह्मणांची? उत्तर देण्याचे बंधन नाही. मी हा प्रश्न पुन्हा लेखकालापण विचारणारच आहे.

खरं पाहता मी कांहीच प्रतिसाद ह्या धाग्यावर देणार नव्हतो. मुळात, एकदा पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . असा डिस्क्लेमर सुरुवातीलाच टाकला की आपला कल्पनाविलास आपल्याला हव्या त्या दिशेने नेता येतो. कुठल्याही काल्पनिक गोष्टी 'मला आलेला अनुभव' ह्या नांवाखाली लिहून समाजातील कांही जाती वर्गाला भडकवायचं, वादविवाद घडवून आणायचे आणि मिटक्या मारत मजा बघत राहायची, ह्या विकृत उद्देशाव्यतिरिक्त ह्या धाग्यात मला तरी कांही दिसत नाही. ज्यांना भांडायचे असेल त्यांनी भांडावे, पण सूज्ञांनी विचारपूर्वक दूर राहावे असे मी आवाहन करेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्णपणे सहमत आहे. एकद्याच्या वैयक्तिक अनुभवावर काय बोलणार ?? कुठेतरी काड्या लावायच्या आणि आग लागल्यावर गंमत पहात उभे रहायचे..

सूड 06/10/2014 - 15:20
तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून ठीकाय पण बर्‍याचदा चर्वितचर्वण झालेला विषय असल्याने आता प्रतिसाद द्यायचा उबग आलाय. तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचले हेही नसे थोडके!! मिपाच्या कट्ट्यांबद्दल म्हणाल तर प्रश्न विचारण्यापेक्षा एकदा येऊन बघा तुमचं तुम्हालाच उत्तर मिळेल. ॥इति लेखनसीमा॥

विटेकर 06/10/2014 - 15:59
हीन दर्जाच्या लोकप्रियतेसाठी लिहिलेला लेख ! माझे बालपण ठार खेड्यात गेले. माझे आई- वडील शिक्षक होते त्याच शाळेत ,तरीही आमचे जाधव मास्तर सानुनासिक स्वरात " काका" म्हणून आम्हाला हाक मारायचे ! माझे वय तेव्हा फक्त ८ वर्षे होते. अश्या शालेतून मी चौथीची शिष्यवृत्ती मिळवल्यावर हा द्वेष आणखीनच वाढला ! शेवटी जंग जंग पछाडून वडिलांनी बदली करुन घेतली तालुकयाच्या गावाला !. (तालुक्याचा सभापती ९६ कुळी , तो कशाला बामणाचे काम करेल? पण एका मुसलमान शिक्षणाधिकार्‍याला दया आली.)तिथेही द्वेष होताच पण तुलनेने कमी .. त्याच गावांत मी कॉलेजला गेल्यावर मराठ्यांच्या पोरांना , " ए कुळवाड्या " म्हनून हाक मारुन बदला घेतल्याचे समाधान मिळवायचो ! आजही त्या खेड्यातील ब्राह्मण द्वेष तसाच आहे !!! गेल्या १० वर्षात तर तिथे आता नावाला देखील ब्राह्मण राहिला नाही. मग संघाच्या संपर्कात आलो, राजाभाऊ भोसले होते प्रचारक , त्यांनी समाजावून सांगितले आणि अंतर्बाह्य शुद्ध झालो. पुढे तर औरन्गाबादला असताना स्वरुपवर्धिनीचे काम करायला लागलो , बुद्धवंदना शिकलो. मनात कसलेही किल्मिष राहीले नाही. ब्राहमण असल्याचा मला काहीही फायदा झाला नाही, उलट बाल-मनावर अत्यन्त वाईट आघात झाले. माझे आई- वडील नीर-क्षीर विवेक करणारे होते, मला संघाचा परिस स्पर्श झाला म्ह्णून माझे किल्मिष जळून गेले. असे किती भाग्यवंत असतील? उदगीरकरांचा धागा निव्वळ राळ उडविण्यासाठी काढला आहे. ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. पु. लं नी दलित साहित्याचे स्वागत आणि कौतुक दोन्ही केले.. असो अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण लक्षात कोण घेतो ? खरे तर प्रतिसाद देणारच नव्हतो .. पण अगदीच राहवले नाही . म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , काळ सोकावतो आहे.

ज्ञानव 06/10/2014 - 16:51
ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. तो बहुजन समाजही किती लक्षात ठेऊन आहे? ब्राम्हणांनी माझा उद्धार (चांगल्या अर्थाने) केला / ब्राम्हणांची सांगत होती म्हणून माझ्यात अमुलाग्र बदल झाला हे कितीजण मान्य करतील ? दुर्दैव हेच आहे की ब्राम्हणाने काढलेला धागा त्यावर ब्राम्हणांनी दिलेले प्रतिसाद आणि ब्राम्हणेतरानी दिलेले प्रतिसाद किंवा "मला आहे अभिमान दलित असण्याचा " किंवा "आहे मी मराठा मग...?" असा एखादा धागा ब्राम्ह्णेतराने काढावा त्याला येणारे प्रतिसाद तपासावेत मगच कळेल काहीतरी. एक ब्राम्हण दुसर्या ब्राम्हणाच्या बाजूने उभा रहात नाही पण बाकी सगळ्या जातीतले लोक आपल्या जातीतल्या माणसामागे उभे राहतातच हा अनुभव आहे.

एस 06/10/2014 - 16:51
अशा विषयांवर उघडपणे काही लिहिण्याबोलण्याची सोय राहिलेली नाही. मग ते एका समाजातले असो वा दुसर्‍या. वेळ मिळाल्यास व्यनि/खवद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

समीरसूर 06/10/2014 - 17:19
ब्राह्मणांनी कुठले फायदे ओरपले ते कळले नाही. अजूनही दरिद्री ब्राह्मण खूप आहेत. ब्राह्मणांची शेती कुळकायद्यात गेली. आरक्षण नसल्याने ब्राह्मणांना शासकीय नोकर्‍यांची आणि शिक्षणाची शक्यता जवळ-जवळ संपुष्टात आलेली आहे. ब्राह्मण शेकडो एकर जमिनीचे मालक, जमीनदार, साखर कारखान्यांचे मालक, भव्य कॉलेजेसचे मालक, सहकारी सूत गिरण्यांचे प्रवर्तक वगैरे कधीच नव्हते. ते आधीपासूनच शिक्षणाच्या बळावर जगत आलेले आहेत. कधी काळी (६०-७० वर्षांपूर्वी) ब्राह्मणांनी पाळलेल्या अस्पृश्यतेपेक्षा कितीतरी पट जास्त अस्पृश्यता आणि पराकोटीचा आकस पाळणार्‍या जाती आजही महाराष्ट्रात आहेत. ब्राह्मण कुणालाही मदत करतांना जात विचारून कधीच मदत करत नाहीत. माझ्या बाबांनी गेल्या ४५ वर्षात कित्येक गरीब आणि ब्राह्मण (उच्चवर्णीय) नसणार्‍या गरीब मुलांना मोफत शिकवले आहे. त्यांनी कुणालाही मदत करतांना कधीच जात विचारात घेतलेली नाही. आणि अशी कित्येक उदाहरणे मला माहित आहेत. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात (आणि इतर क्षेत्रातदेखील) कित्येक ब्राह्मणांनी कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता आयुष्याचे प्रामाणिक समर्पण केले आहे. राजगुरु, सेनापती बापट, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, यांनी आयुष्य देशासाठी वेचले. साने गुरुजी, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, टिळक, दादा धर्माधिकारी, र. धो. कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाबा आमटे अशा कित्येक थोर ब्राह्मणांनी समाजसुधारणेसाठी आयुष्य खर्ची घातले. ही यादी अजून बरीच मोठी होऊ शकेल. या लोकांनी फक्त ब्राह्मण लोकांचेच भले व्हावे म्हणून आयुष्य वेचले असेल असे वाटत नाही. संत ज्ञानेश्वरांनी जे अलौकिक साहित्य निर्माण केले त्यात कुठेही जातीपातीचा किंवा इतर जातींचा द्वेष करावा असे लिहिलेले नाही. काळाच्या पुढचे इतके सुंदर पद्धतीने लिहिणारे हे संत ब्राह्मणच होते. संत एकनाथांनी कधी जात-पात पाळली नाही. आजच्या युगातदेखील माधव गाडगीळांसारखे निस्वार्थ आणि निस्पृह व्यक्तिमत्व निसर्ग वाचावा म्हणून जीवाचे रान करत आहे. अंधश्रद्धेचे निर्मुलन व्हावे म्हणून झटणारे दाभोलकर असोत किंवा तर्कशुद्ध जगण्याची शिकवण देणारे डॉ. श्रीराम लागू असोत, ब्राह्मणांनी प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि जीव तोडून काम केलेले आहे. आजची परिस्थिती ब्राह्मणांसाठी उलट भयावह आहे. कुठलेच संरक्षण नाही. अकारण पसरविलेल्या गेलेल्या ब्राह्मणद्वेषाने आजचा ब्राह्मण हवालदिल झालेला आहे. जीव मुठीत धरून जगतो आहे. मी स्वत: कधीच जातपात मानली नाही आणि माझ्या आई-बाबांनी तसे मला कधीच चुकूनही शिकवले नाही. असा भेद करावा असे इतक्या वर्षात माझ्या मनालादेखील कधी शिवले नाही. आणि मी नेहमी तसेच वागत आलो. माझ्यासोबतचे कित्येक ब्राह्मण अगदी असेच वागतात हे मी अनुभवले आहे. माझ्या कित्येक चुलत-मावस बहिणींनी केलेले आंतरजातीय विवाह माझ्या नातेवाईकांनी आनंदाने स्वीकारले आहेत आणि त्या गेली कित्येक वर्षे सुखाने जगत आहेत. त्यावरून कधी हाणामारी, कापाकापी, सूडनाट्य वगैरे कधीच घडले नाही. माझ्या कमीत कमी ५ चुलत-आते-मावस भावांनी आंतरजातीय विवाह केले आहेत आणि ते देखील यशस्वी झालेले आहेत. मी ब्राह्मण असल्याचा मला अभिमान वगैरे नाही पण त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी, विचार, संस्कार वाट्याला आले त्यांचा अभिमान नक्कीच आहे. प्रत्येक जातीमध्ये, धर्मामध्ये, माणसामध्ये गुण-दोष असतातच. म्हणून ती जातच वाईट ठरत नाही. ब्राह्मणांविषयीचा हा अनाठायी द्वेष जेव्हा संपेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

ज्ञानव 06/10/2014 - 18:12
दरिद्री + ब्राम्हण हीच मुळात द्विरुक्ती आहे. बाकी माझा एक मित्र नेहमी त्याच्या मोठ्या भावाबद्दल सांगतो "तसा आमचा णाणा म्हणजे ब्राम्हनच"
सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये .

वरून दट्ट्या बसला की.... !

शशिकांत ओक ·

अमित खोजे 02/10/2014 - 02:28
हवाई दलामध्ये किंवा एकंदरच संरक्षण खात्याची प्रवेश परीक्षा कशी असते याचे वर्णन मला मित्रांकडून ऐकायला मिळाले. त्यामध्ये विशेष जाणवले कि निवडणारे परीक्षक अशी मुले बघतात जी हुशार असतात, ग्रुप लीड वगैरे असतात, क्षणात निर्णय घेणारे असतात आणि मुख्य म्हणजे दिलेल्या ऑर्डर्स प्रश्न न करता पाळणाऱ्या असतात. परंतु जर एखाद्या जुन्या पद्धती मध्ये कुणाला बदल करावासा वाटत असेल (जसे तुम्हाला वाटले) तशी सूचनासुद्द्धा करू नये अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अपेक्षा असते का? आपण संरक्षण खात्यात जावे असे मला मनापासून वाटत होते आणि लहानपणी ती संधी दडवल्याबद्दल मला वाईटही वाटे. परंतु आता मी स्वतः इंजिनिअर असल्याने प्रत्येक ठिकाणी 'का?' हा प्रश्न विचाराणे किती जरुरी आहे हे सुद्धा मला माहित आहे. तुमचा हा अनुभव आणि बाकी ऐकीव माहिती बघता असे वाटते कि संरक्षण खात्यात गेलो नाही तेच बरे झाले. 'यस्स स्सार नो स्सार' अजिबात जमले नसते बुवा आपल्याला. ऑफ कोर्स हे सर्व क्षेत्रात होते माहिती आहे परंतु संरक्षण खात्यात ती requirement आहे असे वाटते.

In reply to by अमित खोजे

शशिकांत ओक 03/10/2014 - 00:34
मित्रा, तुला हांजी हांजी करावी लागते असे अपेक्षित आहे असे वाटते. पण सेना दळ हे वरिष्ठाने सांगितले किंवा ऑर्डर दिली की जशीच्या तशी तत्परतेने पाळणे यालाच शिस्त असे म्हणतात. त्याला हांजी असे नाव न दिलेले चांगले... आपली कल्पना चांगली आहे असे प्रत्येकाला वाटते पण इतरांना सांगितली की त्यातील इफ अन बट कळून येतात. म्हणून तोंडच उघडू नये असे नाही. परेड करताना सावधान - विश्राम करताना न कळत शिपाई आज्ञा पाळायला शिकतात.असो.

असंका 02/10/2014 - 12:50
वरून दट्ट्या बसला की असं का म्हणत आहात साहेब? 'वरचा दट्ट्या' म्हणण्याने असं वाटतं की, करायला पाहिजे असं एखादं काम केवळ दबावा अभावी होत नव्हतं. दबावाचा प्रश्नच नाहिये इथे. कालपर्यंत पैसे घेऊन अकाउंट उघडावे असा नियम होता. पैसे न घेता अकाउंट उघडा म्हणणे म्हणजे नियम मोडा असे म्हणणे झाले. असा निर्णय शाखा पातळीवर घेणे म्हणजे वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या पद्धतीने काम न करणे. ज्या संस्थेत वरीष्ठांनी ठरवून दिलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम चालते, तिथे सहसा कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही असं दिसतं! बँकिंग हे असे क्षेत्र आहे, ज्याचे मुलभूत नियम काही'शे' वर्षांपासून बदललेले नाहीत! पुरेशा अभ्यासाशिवाय ज्यांनी ते बदलू बघितले, त्यांनी आपले हात पोळून घेतले! संपूर्ण संस्थेवर परीणाम करणारे निर्णय, संपूर्ण संस्थेची जबाबदारी घेऊ शकणार्‍या व्यक्तीनी घ्यावेत. वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतले जातात तेव्हा त्यांच्याकडे तेवढे अधिकार, आणि जबाबदारी असते. एखादा निर्णय चुकला, तर सुधारणा करण्याची किंवा नुकसान कमीत कमी ठेवण्याची क्षमता वरिष्ठांमध्ये असते. आता सरकारने म्हणजे- खुद्द बँकांच्या मालकानेच बॅंकांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने माणशी एक अकाउंट उघडावे. तसा नियम तयार केला. मग पैसे न घेता अकाउंट उघडणे सुरु झाले! दट्ट्या कसला? (जास्तीत जास्त अकाउंट कमीत कमी दिवसात उघडण्याबाबत बोलत असताल, तर गोष्ट वेगळी!!) बाकी: प्रिअँबल मध्येच 'कर्ज द्यायची नाहीत' असं लिहायचा काय उद्देश होता?

शशिकांत ओक 03/10/2014 - 01:12
मित्रा,
दबावाचा प्रश्नच नाहिये इथे.
बँकिंग हे असे क्षेत्र आहे, ज्याचे मुलभूत नियम काही'शे' वर्षांपासून बदललेले नाहीत!
दट्ट्या कसला?
तुझ्या विचारणे काही उत्तरे आहेत - बँकिंग नियमात बदल केले गेलेले नाहीत. ते करायची जबाबदारी त्या क्षेत्रातील वरिष्ठांची आहे. शेवटी मोदींच्या हाती सत्ता आल्यावर त्यांनी हा बदल करायचा त्या वरिष्ठांवर दट्टया आणला म्हणून, आणि म्हणूनच फुकटात खाते उघडायचे धारिष्ठ्य त्यांच्या अंगी आले. आता एकदा कायदा किंवा नियमच बदलला की मग तो पाळायला दबावाचा प्रश्न उरत नाही. (
जास्तीत जास्त अकाउंट कमीत कमी दिवसात उघडण्याबाबत बोलत असताल, तर गोष्ट वेगळी!!
नक्कीच तोही दट्ट्या आहेतच. आता पहा ना प्रत्येकाने आज हातात झाडू पकडलेला पाहताना या धेंडांना कधीच हातात झाडू धरायची वेळ आली नव्हती त्यांच्यावर नमोंनी ती आणली असे मनात म्हणत वरकरणी तरी राजीखुशी हे अंग मेहनतचे काम कॅमेऱ्या समोर केलेले पाहिले... मोदी म्हणतील, म्हणतील पण मग बसतील गप्प असे वाटून अनेकांनी त्यात फार्स जादा असल्याचे मत जाहीर केले. पण मोंदींचे पाणी काही और आहे, हे हळ हळू कळेल. त्यांच्या पक्षातील वरिष्ठांची मस्त गठडी त्यांनी वळली आहे. तर इतरांची काय कथा?
प्रिअँबल मध्येच 'कर्ज द्यायची नाहीत' असं लिहायचा काय उद्देश होता?
बँकिग व्यवसाय कर्ज देण्याच्या पायावर उभा आहे. विमा हे सामाजिक सुरक्षेच्या अखत्यारित येते. शिवाय सैन्यातील विमा उतरवताना कर्ज देणे म्हणजेच बँकिंग - फायदा तो अभिप्रेत नाही. म्हणूनच तसे कर्ज दिले जाणार नाही असे लिहिले गेले होते.

अमित खोजे 02/10/2014 - 02:28
हवाई दलामध्ये किंवा एकंदरच संरक्षण खात्याची प्रवेश परीक्षा कशी असते याचे वर्णन मला मित्रांकडून ऐकायला मिळाले. त्यामध्ये विशेष जाणवले कि निवडणारे परीक्षक अशी मुले बघतात जी हुशार असतात, ग्रुप लीड वगैरे असतात, क्षणात निर्णय घेणारे असतात आणि मुख्य म्हणजे दिलेल्या ऑर्डर्स प्रश्न न करता पाळणाऱ्या असतात. परंतु जर एखाद्या जुन्या पद्धती मध्ये कुणाला बदल करावासा वाटत असेल (जसे तुम्हाला वाटले) तशी सूचनासुद्द्धा करू नये अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अपेक्षा असते का? आपण संरक्षण खात्यात जावे असे मला मनापासून वाटत होते आणि लहानपणी ती संधी दडवल्याबद्दल मला वाईटही वाटे. परंतु आता मी स्वतः इंजिनिअर असल्याने प्रत्येक ठिकाणी 'का?' हा प्रश्न विचाराणे किती जरुरी आहे हे सुद्धा मला माहित आहे. तुमचा हा अनुभव आणि बाकी ऐकीव माहिती बघता असे वाटते कि संरक्षण खात्यात गेलो नाही तेच बरे झाले. 'यस्स स्सार नो स्सार' अजिबात जमले नसते बुवा आपल्याला. ऑफ कोर्स हे सर्व क्षेत्रात होते माहिती आहे परंतु संरक्षण खात्यात ती requirement आहे असे वाटते.

In reply to by अमित खोजे

शशिकांत ओक 03/10/2014 - 00:34
मित्रा, तुला हांजी हांजी करावी लागते असे अपेक्षित आहे असे वाटते. पण सेना दळ हे वरिष्ठाने सांगितले किंवा ऑर्डर दिली की जशीच्या तशी तत्परतेने पाळणे यालाच शिस्त असे म्हणतात. त्याला हांजी असे नाव न दिलेले चांगले... आपली कल्पना चांगली आहे असे प्रत्येकाला वाटते पण इतरांना सांगितली की त्यातील इफ अन बट कळून येतात. म्हणून तोंडच उघडू नये असे नाही. परेड करताना सावधान - विश्राम करताना न कळत शिपाई आज्ञा पाळायला शिकतात.असो.

असंका 02/10/2014 - 12:50
वरून दट्ट्या बसला की असं का म्हणत आहात साहेब? 'वरचा दट्ट्या' म्हणण्याने असं वाटतं की, करायला पाहिजे असं एखादं काम केवळ दबावा अभावी होत नव्हतं. दबावाचा प्रश्नच नाहिये इथे. कालपर्यंत पैसे घेऊन अकाउंट उघडावे असा नियम होता. पैसे न घेता अकाउंट उघडा म्हणणे म्हणजे नियम मोडा असे म्हणणे झाले. असा निर्णय शाखा पातळीवर घेणे म्हणजे वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या पद्धतीने काम न करणे. ज्या संस्थेत वरीष्ठांनी ठरवून दिलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम चालते, तिथे सहसा कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही असं दिसतं! बँकिंग हे असे क्षेत्र आहे, ज्याचे मुलभूत नियम काही'शे' वर्षांपासून बदललेले नाहीत! पुरेशा अभ्यासाशिवाय ज्यांनी ते बदलू बघितले, त्यांनी आपले हात पोळून घेतले! संपूर्ण संस्थेवर परीणाम करणारे निर्णय, संपूर्ण संस्थेची जबाबदारी घेऊ शकणार्‍या व्यक्तीनी घ्यावेत. वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतले जातात तेव्हा त्यांच्याकडे तेवढे अधिकार, आणि जबाबदारी असते. एखादा निर्णय चुकला, तर सुधारणा करण्याची किंवा नुकसान कमीत कमी ठेवण्याची क्षमता वरिष्ठांमध्ये असते. आता सरकारने म्हणजे- खुद्द बँकांच्या मालकानेच बॅंकांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने माणशी एक अकाउंट उघडावे. तसा नियम तयार केला. मग पैसे न घेता अकाउंट उघडणे सुरु झाले! दट्ट्या कसला? (जास्तीत जास्त अकाउंट कमीत कमी दिवसात उघडण्याबाबत बोलत असताल, तर गोष्ट वेगळी!!) बाकी: प्रिअँबल मध्येच 'कर्ज द्यायची नाहीत' असं लिहायचा काय उद्देश होता?

शशिकांत ओक 03/10/2014 - 01:12
मित्रा,
दबावाचा प्रश्नच नाहिये इथे.
बँकिंग हे असे क्षेत्र आहे, ज्याचे मुलभूत नियम काही'शे' वर्षांपासून बदललेले नाहीत!
दट्ट्या कसला?
तुझ्या विचारणे काही उत्तरे आहेत - बँकिंग नियमात बदल केले गेलेले नाहीत. ते करायची जबाबदारी त्या क्षेत्रातील वरिष्ठांची आहे. शेवटी मोदींच्या हाती सत्ता आल्यावर त्यांनी हा बदल करायचा त्या वरिष्ठांवर दट्टया आणला म्हणून, आणि म्हणूनच फुकटात खाते उघडायचे धारिष्ठ्य त्यांच्या अंगी आले. आता एकदा कायदा किंवा नियमच बदलला की मग तो पाळायला दबावाचा प्रश्न उरत नाही. (
जास्तीत जास्त अकाउंट कमीत कमी दिवसात उघडण्याबाबत बोलत असताल, तर गोष्ट वेगळी!!
नक्कीच तोही दट्ट्या आहेतच. आता पहा ना प्रत्येकाने आज हातात झाडू पकडलेला पाहताना या धेंडांना कधीच हातात झाडू धरायची वेळ आली नव्हती त्यांच्यावर नमोंनी ती आणली असे मनात म्हणत वरकरणी तरी राजीखुशी हे अंग मेहनतचे काम कॅमेऱ्या समोर केलेले पाहिले... मोदी म्हणतील, म्हणतील पण मग बसतील गप्प असे वाटून अनेकांनी त्यात फार्स जादा असल्याचे मत जाहीर केले. पण मोंदींचे पाणी काही और आहे, हे हळ हळू कळेल. त्यांच्या पक्षातील वरिष्ठांची मस्त गठडी त्यांनी वळली आहे. तर इतरांची काय कथा?
प्रिअँबल मध्येच 'कर्ज द्यायची नाहीत' असं लिहायचा काय उद्देश होता?
बँकिग व्यवसाय कर्ज देण्याच्या पायावर उभा आहे. विमा हे सामाजिक सुरक्षेच्या अखत्यारित येते. शिवाय सैन्यातील विमा उतरवताना कर्ज देणे म्हणजेच बँकिंग - फायदा तो अभिप्रेत नाही. म्हणूनच तसे कर्ज दिले जाणार नाही असे लिहिले गेले होते.

वरून दट्ट्या बसला की....

मेणाचा मृत्युंजय भावला

मारवा ·

आदूबाळ 01/10/2014 - 11:27
जबरदस्त! अतिशय परिणामकारक लिहिलंय. एक विनंती - शुद्धलेखनाकडे लक्ष देता आलं तर चार चांद लागतील. एरवी फारसा फरक पडत नाही, पण इतक्या दर्जेदार लेखनात अशुद्धलेखन खुपतं.

विटेकर 01/10/2014 - 12:21
.... नि: शब्द ! हल्ली मला पिळवणुकीची वर्णने ऐकवत नाहीत , वाढत्या वयाबरोबर मी अति संवेदनाशील झालोय ! फार सुन्दर लिहिलयं तुम्ही ! त्याबद्दल प्रश्नच नाही पण मलाच पेलेले नाही !

कंजूस 01/10/2014 - 13:23
रिचर्ड बर्टनचे १००१ अरेबिअन नाइटस मी वाचलंय(यात ६४०गोष्टी आहेत). त्यामुळे समजू शकतो त्यातल्या तळटीपा खूपच महत्त्वाच्या आहेत. व्यापारामुळे युअरोपिअनांना अरबांच्या समाजजीवनाबद्दल फारच उत्सुकता होती. काहीजण ते जाणून घेण्यासाठी मुसलमान बनून राहिले. भाषा शिकले आणि सर्व माहिती काढली.

राही 01/10/2014 - 16:13
रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाइट्सचा मराठीमध्ये गौरी देशपांडे यांनी फार सुंदर मराठी अनुवाद केला आहे. मला वाटते तो चार खंडांत असावा. (कदाचित अधिकच. दहा सुद्धा असू शकेल.आता आठवत नाही.)सर्व तळटीपांसहित विस्तृत अशा या मौल्यवान संदर्भग्रंथाच्या अनुवादाचे मोठेच काम पार पाडून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जरूर वाचावा असा हा ग्रंथराज. जाता जाता : किलवर हा रंग सर्वात कमी दर्जाचा. त्यातूनही गुलाम. असा हा यःकश्चित माणूस बदामी होत जातो. बदाम हे प्रेमाचे (लव मेकिंग्) प्रतीक. या बदामीपणामुळे थोडीशी सुरक्षितताही मिळते, तो सलामत रहातो. (अर्थात कवीला हाच अर्थ अभिप्रेत असेल असे नाही. इतरही अनेक अर्थ असू शकतील.)

एस 01/10/2014 - 19:12
अरूण कोलटकर जे काही थोडके लिहून गेलेत ते असे काही लिहून गेलेत की बस्स... वरील कविताही त्याच पठडीतील. काही दुर्दैवी जीवांच्या तोंडून पहिल्यांदा त्यांचे अनुभव ऐकले होते तेव्हा जसा अंगावर काटा आला होता तसाच अनुभव तुमचा लेख वाचून आला. हल्ली फारसं काही वाटत नाही. जास्त लावून घेतलं तर काम कसं करणार. असो.

अरुण कोल्हटकरांच्या कवितांवर मिपावर ब-याचदा रसग्रहण आलं आहे. हेही तसंच अप्रतिम....आज अरुण कोल्हटकरांची ’एकटी’ कविता वाचत होतो, म्हणून धाग्याची आठवण. ’तुझ्यासारखी बेढब बाई कुणी क्वचितच पाहिली असेल पण तुला एक कविता मी देऊ लागतोे’ बाकी, कवितेचा शेवट सुंदर आहे. -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 11/03/2023 - 11:39
भावनांच्या जंजाळात न अडकता तटस्थ आस्वादकाच्या भूमिकेतून वाचली तर ही कविता विस्मयकारक आहे. काहीशी दुर्बोधही. ("दुर्बोधता हे नवकवितेचे व्यवच्छेदक लक्षण होय"- गंगाधर गाडगीळ) 'ताज'चा अर्थ नव्यानेच समजला. 'ताजमहाल' मधील 'ताज' हाच तर नव्हे ? 'मुमताज' चे मढे बुरहाणपुराहून आणून तिचे थडगे बसवण्यापूर्वी ती लाटलेली इमारत 'ताज' मडळींच्या उपभोगासाठी वापरला जात असलेला महाल असावा का ? मला कवितेतले काही भाग समजले नाहीत, उदाहरणार्थः रंगमहालात मी उताणा उखाणा पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम बदामी होणारा सलामत नसत्या झुंबराला पेटवतो माझा दुबारा सलाम यातील 'बिलोरी छत' आणि 'नसते झुंबर' यात काही संबंध दर्शवायचा असेल का? 'उताणा उखाणा' म्हणजे काय ? बिलोरी छतात दिसणारी त्या (काळ्या/ सिद्दी/ हबशी ?) मुलाची छोटीशी प्रतिमा 'किलावर' चिन्हासारखी दिसते आहे का? आणि ती 'बदामी' म्हणजे लाल, रक्तरंजित होते आहे का ? 'दुबारा सलाम' म्हणजे पहिल्यांदा बादशाह रंगमहालात प्रविशतो तेंव्हा केलेला, आणि 'दुबारा' प्रत्यक्ष कामाच्या आधीचा? तसेच सलाम करताना किंचितसे पुढे वाकतात, त्याचाही हा संदर्भ असावा का ? 'मृत्युंजय' का म्हटले आहे ? आणि लेखाच्या अगदी शेवटल्या "स्वत: च असणं गरजेचं आहे," याचाही अर्थ कळला नाही. यावरून थायलंडातील 'लेडीबॉय' हा प्रकार आठवला: . वरील प्रतिमा सर्चिताना थायलंडातील आणखी एक रोचक प्रकार समजला, तो म्हणजे 'तेरा प्रकारचे स्मितहास्यः

आदूबाळ 01/10/2014 - 11:27
जबरदस्त! अतिशय परिणामकारक लिहिलंय. एक विनंती - शुद्धलेखनाकडे लक्ष देता आलं तर चार चांद लागतील. एरवी फारसा फरक पडत नाही, पण इतक्या दर्जेदार लेखनात अशुद्धलेखन खुपतं.

विटेकर 01/10/2014 - 12:21
.... नि: शब्द ! हल्ली मला पिळवणुकीची वर्णने ऐकवत नाहीत , वाढत्या वयाबरोबर मी अति संवेदनाशील झालोय ! फार सुन्दर लिहिलयं तुम्ही ! त्याबद्दल प्रश्नच नाही पण मलाच पेलेले नाही !

कंजूस 01/10/2014 - 13:23
रिचर्ड बर्टनचे १००१ अरेबिअन नाइटस मी वाचलंय(यात ६४०गोष्टी आहेत). त्यामुळे समजू शकतो त्यातल्या तळटीपा खूपच महत्त्वाच्या आहेत. व्यापारामुळे युअरोपिअनांना अरबांच्या समाजजीवनाबद्दल फारच उत्सुकता होती. काहीजण ते जाणून घेण्यासाठी मुसलमान बनून राहिले. भाषा शिकले आणि सर्व माहिती काढली.

राही 01/10/2014 - 16:13
रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाइट्सचा मराठीमध्ये गौरी देशपांडे यांनी फार सुंदर मराठी अनुवाद केला आहे. मला वाटते तो चार खंडांत असावा. (कदाचित अधिकच. दहा सुद्धा असू शकेल.आता आठवत नाही.)सर्व तळटीपांसहित विस्तृत अशा या मौल्यवान संदर्भग्रंथाच्या अनुवादाचे मोठेच काम पार पाडून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जरूर वाचावा असा हा ग्रंथराज. जाता जाता : किलवर हा रंग सर्वात कमी दर्जाचा. त्यातूनही गुलाम. असा हा यःकश्चित माणूस बदामी होत जातो. बदाम हे प्रेमाचे (लव मेकिंग्) प्रतीक. या बदामीपणामुळे थोडीशी सुरक्षितताही मिळते, तो सलामत रहातो. (अर्थात कवीला हाच अर्थ अभिप्रेत असेल असे नाही. इतरही अनेक अर्थ असू शकतील.)

एस 01/10/2014 - 19:12
अरूण कोलटकर जे काही थोडके लिहून गेलेत ते असे काही लिहून गेलेत की बस्स... वरील कविताही त्याच पठडीतील. काही दुर्दैवी जीवांच्या तोंडून पहिल्यांदा त्यांचे अनुभव ऐकले होते तेव्हा जसा अंगावर काटा आला होता तसाच अनुभव तुमचा लेख वाचून आला. हल्ली फारसं काही वाटत नाही. जास्त लावून घेतलं तर काम कसं करणार. असो.

अरुण कोल्हटकरांच्या कवितांवर मिपावर ब-याचदा रसग्रहण आलं आहे. हेही तसंच अप्रतिम....आज अरुण कोल्हटकरांची ’एकटी’ कविता वाचत होतो, म्हणून धाग्याची आठवण. ’तुझ्यासारखी बेढब बाई कुणी क्वचितच पाहिली असेल पण तुला एक कविता मी देऊ लागतोे’ बाकी, कवितेचा शेवट सुंदर आहे. -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 11/03/2023 - 11:39
भावनांच्या जंजाळात न अडकता तटस्थ आस्वादकाच्या भूमिकेतून वाचली तर ही कविता विस्मयकारक आहे. काहीशी दुर्बोधही. ("दुर्बोधता हे नवकवितेचे व्यवच्छेदक लक्षण होय"- गंगाधर गाडगीळ) 'ताज'चा अर्थ नव्यानेच समजला. 'ताजमहाल' मधील 'ताज' हाच तर नव्हे ? 'मुमताज' चे मढे बुरहाणपुराहून आणून तिचे थडगे बसवण्यापूर्वी ती लाटलेली इमारत 'ताज' मडळींच्या उपभोगासाठी वापरला जात असलेला महाल असावा का ? मला कवितेतले काही भाग समजले नाहीत, उदाहरणार्थः रंगमहालात मी उताणा उखाणा पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम बदामी होणारा सलामत नसत्या झुंबराला पेटवतो माझा दुबारा सलाम यातील 'बिलोरी छत' आणि 'नसते झुंबर' यात काही संबंध दर्शवायचा असेल का? 'उताणा उखाणा' म्हणजे काय ? बिलोरी छतात दिसणारी त्या (काळ्या/ सिद्दी/ हबशी ?) मुलाची छोटीशी प्रतिमा 'किलावर' चिन्हासारखी दिसते आहे का? आणि ती 'बदामी' म्हणजे लाल, रक्तरंजित होते आहे का ? 'दुबारा सलाम' म्हणजे पहिल्यांदा बादशाह रंगमहालात प्रविशतो तेंव्हा केलेला, आणि 'दुबारा' प्रत्यक्ष कामाच्या आधीचा? तसेच सलाम करताना किंचितसे पुढे वाकतात, त्याचाही हा संदर्भ असावा का ? 'मृत्युंजय' का म्हटले आहे ? आणि लेखाच्या अगदी शेवटल्या "स्वत: च असणं गरजेचं आहे," याचाही अर्थ कळला नाही. यावरून थायलंडातील 'लेडीबॉय' हा प्रकार आठवला: . वरील प्रतिमा सर्चिताना थायलंडातील आणखी एक रोचक प्रकार समजला, तो म्हणजे 'तेरा प्रकारचे स्मितहास्यः
अरूण कोलटकर हे माझ्या मते मराठीतील महाकवीं पैकी एक आहेत. यांनी ज्या कविता मराठीत लिहीलेल्या आहेत तशा त्यांच्या अगोदर कोणी लिहील्या असतील असे वाटत नाही. त्यांच्या काही कवितांवर अतिशय सुंदर रसग्रहण पुर्वी मिपा वर आलेली आहेत. अनेक अर्थांनी अनोखा असा हा माणुस होता. यांचे कवितेतील अनुभव शैली इमानदारी सारेच काही विलक्षण होते. त्यांची एक विलक्षण कविता जी अतिशय अस्वस्थ करुन जाते तिच्यावीषयी त्याचा अर्थ जसा मला लागतोय तो सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यापुर्वी एक सांगावेसे वाटते की खालील कविते चे आकलन जर काही संदर्भ माहीत असतील तर सुगम होते. अन्यथा कविता क्लीष्ट वाटु शकते.

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

शशिकांत ओक ·

काउबॉय 22/09/2014 - 19:28
नाही थूंकने बाबत आक्षेप मान्य कारण ते आपोआप स्वच्छ होत नाही पण शिव्याही द्यायच्या नाहित म्हणजे....क्ष्क्ष्क्ष्फ़्फ़्ध्ब्द

बॅटमॅन 22/09/2014 - 19:37
पण शिव्या हा किमान गधेगाळकालीन वारसा आहे. अन तोही थेट मातृकुलाशी गर्दभाचा संबंध जोडणारा. ती पवित्र परंपरा टाकवेल तर लोकच "तेहाची माये...गाढवे...." इ.इ. उद्धार करतील =))

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 23/09/2014 - 22:38
=)) शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या देवळात १६३० सालचा एक घंटालेख आहे. घंटेवर मराठी भाषेत पुढीलप्रमाणे मजकूर कोरलेला आहे. वाग्या तुरंबेकार हे कोण घेईल तो मात्रागमनी १६३०"

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 23/09/2014 - 23:32
हाण तेच्या मारी =)) म्हणजे मात्रागमनी हा शब्द पेशवाईच्या अगोदरपासून लेखनप्रचारात आहे म्हणायचा!!! रोचक आहे. :) मला आपले 'मात्रागमनी नजीब' इ.इ. च माहिती होते.

पोटे 22/09/2014 - 20:09
पुलंच्या ती फुलराणी नाटकातही शिव्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण केले आहे. मराठी शिव्या वर्गातील आहेत... पु ..... फो..... भो... मा..... त्याचेही स्पष्टीकरण त्यात आहे. :)

बाबा पाटील 22/09/2014 - 21:03
उच्च रक्तदाब कमी करण्याचे व हिंसा टाळण्याचे अत्यंत महत्वपुर्ण साधन आहे हो,कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त फक्त शिव्यांनेच होतात,शिव्या नाही दिल्या तर माणसे वेडी होतील नाहीतर सरळ एकमेकांवर हात उचलतील,चालेल का ?

In reply to by बाबा पाटील

कवितानागेश 23/09/2014 - 15:25
निदान मनातल्या मनात / किंवा तिसर्‍याच कुणासमोर तरी खच्चून शिव्या घालून सगळा वैताग vent out केलेला बरा असतो. एकदम थंड वाटतं अश्या शिव्या घातल्या की. ;)

ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
णाय चालनार!!!!!!!!!!! अवो श्या देता येनार नसतील तर मग मिपाकर र्‍हायाचं कशाला? सरळ नमोगतीच होऊ की!!! उलट तुमी असला कायतरी येडाखुळा इचार मांडल्याबद्दल प्रायाश्चित्त म्हणून आमाला आता पुढले सात दिवस खच्चून श्या देन्याचा संकल्प करावा लागतोय!!! (संबंधितांनी नोंद घ्यावी!!) :)

यसवायजी 22/09/2014 - 21:46
जसे की 'गांx फाटणे' म्हणजे काही खरोखर फाटत नाही काही. रूपक आहे ते. :)) शिव्या ह्या आभूषण/अलंकार असतात. योग्य जागी वापरल्यास त्या भाषेची शोभा वाढवतात. पिलीज्य, असू देत की त्यांना.

शशिकांत ओक 22/09/2014 - 21:48
प्रतिज्ञा काही मानसिकता बदल करायला केल्या जाव्यात. जे 'हम नही सुधरेंगे' असा हट्ट करून बसतात त्यांच्या साठी हा धागा नाही...

प्यारे१ 22/09/2014 - 22:38
'श्या' देण्याच्या स्पेशल प्लेसेस फिक्स करुन अकॉर्डिंगली त्यांना एक्झिक्युट करावं. श्या देणं अ‍ॅब्सोल्युटली बंद करणं इज इन्ज्युरस टु हेल्थ. ;)

ठीक आहे..मी ही असा संकल्प एक दोन वेळा केला(होता),काहि कालावधी पर्यंत पाळ्लाही(होता) पण मग मनात आलेल्या त्या अनुषंगिक भावना व्यक्त कश्या करायच्या कोणत्या भाषेत? उदा:- माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. ते ही जिन्यात येता जाता नजरानजर झाली..तर अश्यावेळी मी मागितले तर, "बुडवणार नाही हो तुमचे पैशे..देतो २ दिवसात" असे उर्मट उत्तर येते. मी मग त्याला, "अरे भिकारड्या ..अशी शिवी हसडून मनातला राग व्यक्त करतो. इमारतीतली आजुबाजुची लहानमुलं हे ऐकतात. आता तुमच्या म्हणण्यानुसार ,मग मी इथे काय करावं. शब्द बदलावे? की भावना बदलून शांत बोलावं??? ..ज्याचा त्या उर्मट शेजार्‍यावर अजिबातच परिणाम घडत नाही! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>>>माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. देता कशाला? देऊ नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

@देता कशाला? देऊ नका.>>> हां निर्णय अमलात आला सुद्धा कधीच! पण तुम्ही दिलेलं उत्तर ही पळवाट झाली. त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

@कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! >>> हे वाक्य रद्दबातल समजावं , ते ढागाविष याला लागू पडणार आहे. सदर प्रतिसाद ओकांचा वाटल्यामुळे ते लिहील गेलं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>> त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! नाही हो. तुम्हाला मनस्ताप होऊ नये आणि कोणाला शिव्या देण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, इतका सोज्वळ विचार माझ्या प्रतिसादामागे आहे.

शशिकांत ओक 22/09/2014 - 23:49
मित्रा, आपण प्रयत्न तरी केलात, पण अपशब्द बोलले म्हणून तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. पण एक मानसिक समाधान मिळाल्यासारखे वाटले. पण ज्याला उद्देशून ते बोलले गेले त्यांनी निगरगट्टपणा सोडावा व आपले देणे परत करावे हा माफक उद्देश मात्र उलट न देण्यात परिवर्तित झाला असे ही होऊ शकेल.

In reply to by शशिकांत ओक

दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी किंवा तत्सम कृतीनीच पैसे मिळाले आहेत. त्या आधीच्या शांत बोलण्याच्या धोरणानी निराशा आणि वैफल्य पदरी आलं होतं. औरंगजेब शांततावचनांनी बदलत नसतात हो..तिथे शिव्याच पाहिजेत!

In reply to by दिपक.कुवेत

@आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>> :-D काय करणार दादा!? नाविलाज जाल्याव्? कै वेळे ला शिवी हाच मंत्र होतो,तर काही वेळे ला मंत्र ही पण शिवी होते! :-D मानवी जीवन! नाविलाज रे नाविलाज!!!

In reply to by खटपट्या

@लग्नकार्यात शिवी हासडू नका म्हणजे झालं >>> छ्छे!!! तिथे (असं काहि झालं की!) मंत्रच हसडायचे! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 23/09/2014 - 12:16
मग तर अजूनच कठीण. श्या देण्याचा पर्यायही नाही ! डोक्याची केवळ मंडई होईल हा हा हा , अनुभव हाच गुरु. श्या देण्याचा पर्यायही नाही ! बरोबर . पन ह्याला कायतरी पर्याय असावा हेच पटते. काय म्हणतात ना एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो वगैरे. आपल्याला तर श्या दिल्याशिवाय होत नाही बॉ. श्या नं देणं /देता येणं हे माझ्यासाठी विशेष कौशल्याचं काम आहे. कूठे शिकवणी वगैरे चालते का ह्या विषयाची?

चित्रगुप्त 23/09/2014 - 00:17
हल्ली अमेरिकेत पूर्वीच्या काही शब्दांऐवजी नवे जरा सभ्य शब्द वापरण्याचे फ्याड आहे म्हणे, त्याप्रमाणे धागाकर्त्याने मराठीतील ग्राम्य शब्दांऐवजी तोच अर्थ वहन करणार्‍या सुसंस्कृत नागरी शब्दांचा कोश निर्माण करावा, ही विनंती. (उदा: गणिकामध्यस्थ, भगिनीमैथुनप्रवण इ.)

In reply to by मार्क ट्वेन

शशिकांत ओक 23/09/2014 - 00:33
काळ्ळ्यांना आफ्रो अमेरिकन असे म्हटले तरी माणसे तीच... त्याच मापाने शिवी देणे सोडणार नाही फक्त फुल्या फुल्या असे म्हणून वेळ साजरी करेन....

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 23/09/2014 - 12:58
हा हा हा =)) गणिकामध्यस्थ लैच आवडल्या गेले आहे _/\_ दुसर्‍या शब्दाला 'स्वस्रागमनी' हा एक सुटसुटीत पर्याय सुचवतो. आमच्या एका मित्राने तयार केलेला हा शब्द. झालंच तर रासभीपुत्र, गणिकासुत, गमनव्याकुल, भगनंदन, इ.इ. पर्यायही विचारात घेतल्या जावेत ;)

In reply to by बॅटमॅन

सूड 23/09/2014 - 16:39
शष्प हाही एक सुरेख शब्द सापडलाय, आपल्याला बोलल्याचं समाधान आणि ऐकणार्‍याला शष्प चा अर्थ शष्प माहित नसल्याने त्याला सभ्य काहीतरी ऐकल्याचं समाधान!! ;) या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. =))))

In reply to by सूड

मदनबाण 23/09/2014 - 16:53
या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by सूड

बॅटमॅन 23/09/2014 - 17:55
शष्पू =)) =)) =)) =)) =)) धन्य _/\_ हे म्हणजे मुलाचं नाव शष्प असेल तर त्याच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोने लाडात त्याला बिलगून वगैरे हाक मारल्यापैकी - "ए काऽय रे शष्पू" इ.इ.इ.

In reply to by सूड

यावरून मिपावर काही महिन्यांपूर्वी झालेला किस्सा आठवला. एका स्त्री आयडीने एका पुरुष आयडीला असभ्य बोलण्यावरुन झापताना हा शब्द वापरला होता. तिला बिचारीला विरोधाभास लक्षात आला नसावा. ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:21
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by सूड

बालगंधर्व 30/09/2014 - 10:07
माझया गावाला पूरवी एक मदरसा अले होति. तिच नाव शुबहनगी होता. गवातले सगले पोर तिचयावर मरयचि. मि पन मरयचो. मि तिच मोबयल नमबर मिलविला. तिला मेसेज केला. तिचा कदे मझे पेरेम बोलओलो. पन तिने मला शश्प रिसपोनस दिला.

In reply to by बालगंधर्व

खटपट्या 30/09/2014 - 10:39
"मदरसा" आली होते ? म्हणजे नक्की कोण आली होती तिचे नाव शुभहनगि म्हणजे शुभांगी होते का ? पेरेम, रीसपोनस…. जावूदे…. काय ते सपष्ट लिवा वो ? मराटी मदी

In reply to by चित्रगुप्त

गणिकामध्यस्थ हे लै म्हणजे लैच आवडले आहे हे नम्रपणे नमुद करुन अशा संस्कृतोद्भव श्या देण्या मुळे त्या श्यांमधला जोर निघुन जातो (शिवी देताना आणि घेताना अर्थ कोणी लक्षात घेतो का? उदा. टिनपाट, सरमाळ्या ) . शिवी कोणती आहे या पेक्षा ती कोणी व कशी उच्चारली या वरुन तीच्या परीणामाची तिव्रता ठरते. कल्पना करा आत्मुगुरुजी त्यांच्या देणेकर्‍याला म्हणत आहेत "अरे गणिकामध्यस्था माझे ॠण कधी चुकते करणार आहेस?" तो कधीच पैसे द्यायचा नाही. त्या ऐवजी "भा* दे ना पैसे" कसे वजनदार वाटते म्हणणार्‍याला पण आणि ऐकणार्‍याला पण. शिवी देताना गुर्मी दिसलीच पाहिजे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बॅटमॅन 23/09/2014 - 17:58
अहो त्या संस्कृतवाल्या श्या फक्त ग्रंथनिविष्ट करायला म्हणून. खर्‍या हातघाईच्या प्रसंगी प्राकृतच लागते!

प्रतिसादांचे अवलोकन केले असता (प्रस्तुत धागाकर्त्याचे, फॉर रीझन ऑफ बायस, आणि उपप्रतिसादांचे गणन न करता) हा प्रस्ताव ६-१२ प्रतिसादांनी हरला आहे!!!! मिपाचे मूळ स्थान, त्याची प्रतिष्ठानापासूनची भूमिका, धागाकर्त्यांच्या लक्षात न आल्याबद्दल त्यांचे सांत्वन! आणि, मिपासंस्थापक तात्या अभ्यंकरांच्या शाब्दिक पुण्याईचा विजय असो!!!!! :)

सर्वसाक्षी 23/09/2014 - 10:30
ओकसाहेब जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!" ज्यांना शिव्या दिलेल्या आवडत नाहीत किंवा ज्यांना उघड शिव्या देणे परवडणारे नसते त्यांना कुणी शिव्या देत नाही. आजुबाजुला अपरिचीत स्त्रिया असतील शिवी देणे टाळले जाते. रस्त्यावरील भांडणे, हमरीतुमरीचा भाग वगळता शिव्या या आपुलकीनेच दिल्या जातात. शिव्या नसल्या तर मित्रांचे संभाषण कसे होईल? मुळात बहुत्वेकरुन शिव्या या उद्गारवाचक चिन्हांऐवजी वापरल्या जातात, त्या कुणाला उद्देशून वगैरे नसतात. शिव्या देणे बंद वगैरे करणे अमान्य. अर्थात आजुबाजुला कोण आहे आणि आपण कुठे आहोत याचे थोडे तारतम्य अवश्य बाळगावे.

In reply to by सर्वसाक्षी

जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!"--१०० % राईट्ट , सर्वसाक्षी साहेबांशी सहमत ,आताच बोर्डावर आलेला पटाईत साहेबांचा लेख ही हेच मत व्यक्त करतोय असे वाटते.

मदनबाण 23/09/2014 - 11:19
शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय जस्ट कान्ट इमॅजिन यू नो ! ;) मी शक्यतो शिव्या देत नाही, दिल्याच तर त्या मनातल्या मनात देण्यावर जास्त भर असतो. ट्रॅफिक जाम मुळे आणि अतरंगी वाहन चालकांमुळे मात्र हल्ली टाळक सटकुन २-४ सॉफ्टकोअर शिव्या हासडतो... परवाच हायवेवर मधेच बाईक वळवु का नओ वळवु का नको अशा विचार मग्न असलेल्या पोराने माझी दुचाकी जवळ येताच मधेच बाईक वळवली ! मी ओरडले ! अरे छगन च्यायला डोक घरी ठेवुन आलास काय ? भाउला राग आला ! पुढे जाउन त्याने बाईक थांबवली आणि वाद घालायला सुरुवात केली,मी म्हंटल काय प्रॉब्लेम झाला, तर तो बोलाला की चूक झाली म्हणुन काय झालं छगन कशाला म्हणालास ? तो आग्री बाला आहे हे त्याच्या बोलण्यावरुन कळले, मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ? कन्फुज झाला आणि कीक मारुन मुकाट निघुन गेला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ?
"मिथुन' म्हण!!!! जल्लां सगलां काय नांवानच हाय!!! :)

विटेकर 23/09/2014 - 11:35
"छगन" ही शिवी आहे का ? शिव्यांचा काही भौगोलिक मापदंड ( जी आय) असतो का? नाशिक परिसरात " छगन" ही शिवा नसावी ( असे वाटते )

In reply to by विटेकर

मदनबाण 23/09/2014 - 11:47
अहो विटुकाका... ती शिवी नाही, पण ते सुद्धा लोकांना सहन होत नाही ! शिव्यांचा काहीही मापदंड नसतो ! देणारा सुद्धा गमतीने देउ शकतो आणि घेणारा सुद्धा गमतीने घेउ शकतो ! अर्थात पुरुष मित्रपरिवारात हे सहज होत्,स्त्रीयांचे काय माहित नाही... बहुधा परवा पमाकडे {प्रमिला}मंगळागौर झाली, काय सुरेख कार्यक्रम झाला होता ! पण आंबेडाळ काय नीट जमली नव्हती ! या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} ;) बाकी प्रकाकांनी दिलेला कोणत्या तरी स्त्रीचा *** पिळीन असा संवाद आठवतोय ! बहुधा त्यांनीच अशाच विषयावर धागा काढला होता का ? ते नीट आढवत नाही आता ! प्रकाका यावर अधिक प्रकाश टाकु शकतात याची बेशर्त गॅरेंटी देतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

विटेकर 23/09/2014 - 11:55
या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink अगदी अगदी ! फार तरं " पण तू काहीही म्हण , पमाचा नवरा अगदीच हेंदरट आहे " ही परमावधी !

काउबॉय 22/09/2014 - 19:28
नाही थूंकने बाबत आक्षेप मान्य कारण ते आपोआप स्वच्छ होत नाही पण शिव्याही द्यायच्या नाहित म्हणजे....क्ष्क्ष्क्ष्फ़्फ़्ध्ब्द

बॅटमॅन 22/09/2014 - 19:37
पण शिव्या हा किमान गधेगाळकालीन वारसा आहे. अन तोही थेट मातृकुलाशी गर्दभाचा संबंध जोडणारा. ती पवित्र परंपरा टाकवेल तर लोकच "तेहाची माये...गाढवे...." इ.इ. उद्धार करतील =))

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 23/09/2014 - 22:38
=)) शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या देवळात १६३० सालचा एक घंटालेख आहे. घंटेवर मराठी भाषेत पुढीलप्रमाणे मजकूर कोरलेला आहे. वाग्या तुरंबेकार हे कोण घेईल तो मात्रागमनी १६३०"

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 23/09/2014 - 23:32
हाण तेच्या मारी =)) म्हणजे मात्रागमनी हा शब्द पेशवाईच्या अगोदरपासून लेखनप्रचारात आहे म्हणायचा!!! रोचक आहे. :) मला आपले 'मात्रागमनी नजीब' इ.इ. च माहिती होते.

पोटे 22/09/2014 - 20:09
पुलंच्या ती फुलराणी नाटकातही शिव्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण केले आहे. मराठी शिव्या वर्गातील आहेत... पु ..... फो..... भो... मा..... त्याचेही स्पष्टीकरण त्यात आहे. :)

बाबा पाटील 22/09/2014 - 21:03
उच्च रक्तदाब कमी करण्याचे व हिंसा टाळण्याचे अत्यंत महत्वपुर्ण साधन आहे हो,कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त फक्त शिव्यांनेच होतात,शिव्या नाही दिल्या तर माणसे वेडी होतील नाहीतर सरळ एकमेकांवर हात उचलतील,चालेल का ?

In reply to by बाबा पाटील

कवितानागेश 23/09/2014 - 15:25
निदान मनातल्या मनात / किंवा तिसर्‍याच कुणासमोर तरी खच्चून शिव्या घालून सगळा वैताग vent out केलेला बरा असतो. एकदम थंड वाटतं अश्या शिव्या घातल्या की. ;)

ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
णाय चालनार!!!!!!!!!!! अवो श्या देता येनार नसतील तर मग मिपाकर र्‍हायाचं कशाला? सरळ नमोगतीच होऊ की!!! उलट तुमी असला कायतरी येडाखुळा इचार मांडल्याबद्दल प्रायाश्चित्त म्हणून आमाला आता पुढले सात दिवस खच्चून श्या देन्याचा संकल्प करावा लागतोय!!! (संबंधितांनी नोंद घ्यावी!!) :)

यसवायजी 22/09/2014 - 21:46
जसे की 'गांx फाटणे' म्हणजे काही खरोखर फाटत नाही काही. रूपक आहे ते. :)) शिव्या ह्या आभूषण/अलंकार असतात. योग्य जागी वापरल्यास त्या भाषेची शोभा वाढवतात. पिलीज्य, असू देत की त्यांना.

शशिकांत ओक 22/09/2014 - 21:48
प्रतिज्ञा काही मानसिकता बदल करायला केल्या जाव्यात. जे 'हम नही सुधरेंगे' असा हट्ट करून बसतात त्यांच्या साठी हा धागा नाही...

प्यारे१ 22/09/2014 - 22:38
'श्या' देण्याच्या स्पेशल प्लेसेस फिक्स करुन अकॉर्डिंगली त्यांना एक्झिक्युट करावं. श्या देणं अ‍ॅब्सोल्युटली बंद करणं इज इन्ज्युरस टु हेल्थ. ;)

ठीक आहे..मी ही असा संकल्प एक दोन वेळा केला(होता),काहि कालावधी पर्यंत पाळ्लाही(होता) पण मग मनात आलेल्या त्या अनुषंगिक भावना व्यक्त कश्या करायच्या कोणत्या भाषेत? उदा:- माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. ते ही जिन्यात येता जाता नजरानजर झाली..तर अश्यावेळी मी मागितले तर, "बुडवणार नाही हो तुमचे पैशे..देतो २ दिवसात" असे उर्मट उत्तर येते. मी मग त्याला, "अरे भिकारड्या ..अशी शिवी हसडून मनातला राग व्यक्त करतो. इमारतीतली आजुबाजुची लहानमुलं हे ऐकतात. आता तुमच्या म्हणण्यानुसार ,मग मी इथे काय करावं. शब्द बदलावे? की भावना बदलून शांत बोलावं??? ..ज्याचा त्या उर्मट शेजार्‍यावर अजिबातच परिणाम घडत नाही! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>>>माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. देता कशाला? देऊ नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

@देता कशाला? देऊ नका.>>> हां निर्णय अमलात आला सुद्धा कधीच! पण तुम्ही दिलेलं उत्तर ही पळवाट झाली. त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

@कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! >>> हे वाक्य रद्दबातल समजावं , ते ढागाविष याला लागू पडणार आहे. सदर प्रतिसाद ओकांचा वाटल्यामुळे ते लिहील गेलं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>> त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! नाही हो. तुम्हाला मनस्ताप होऊ नये आणि कोणाला शिव्या देण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, इतका सोज्वळ विचार माझ्या प्रतिसादामागे आहे.

शशिकांत ओक 22/09/2014 - 23:49
मित्रा, आपण प्रयत्न तरी केलात, पण अपशब्द बोलले म्हणून तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. पण एक मानसिक समाधान मिळाल्यासारखे वाटले. पण ज्याला उद्देशून ते बोलले गेले त्यांनी निगरगट्टपणा सोडावा व आपले देणे परत करावे हा माफक उद्देश मात्र उलट न देण्यात परिवर्तित झाला असे ही होऊ शकेल.

In reply to by शशिकांत ओक

दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी किंवा तत्सम कृतीनीच पैसे मिळाले आहेत. त्या आधीच्या शांत बोलण्याच्या धोरणानी निराशा आणि वैफल्य पदरी आलं होतं. औरंगजेब शांततावचनांनी बदलत नसतात हो..तिथे शिव्याच पाहिजेत!

In reply to by दिपक.कुवेत

@आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>> :-D काय करणार दादा!? नाविलाज जाल्याव्? कै वेळे ला शिवी हाच मंत्र होतो,तर काही वेळे ला मंत्र ही पण शिवी होते! :-D मानवी जीवन! नाविलाज रे नाविलाज!!!

In reply to by खटपट्या

@लग्नकार्यात शिवी हासडू नका म्हणजे झालं >>> छ्छे!!! तिथे (असं काहि झालं की!) मंत्रच हसडायचे! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 23/09/2014 - 12:16
मग तर अजूनच कठीण. श्या देण्याचा पर्यायही नाही ! डोक्याची केवळ मंडई होईल हा हा हा , अनुभव हाच गुरु. श्या देण्याचा पर्यायही नाही ! बरोबर . पन ह्याला कायतरी पर्याय असावा हेच पटते. काय म्हणतात ना एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो वगैरे. आपल्याला तर श्या दिल्याशिवाय होत नाही बॉ. श्या नं देणं /देता येणं हे माझ्यासाठी विशेष कौशल्याचं काम आहे. कूठे शिकवणी वगैरे चालते का ह्या विषयाची?

चित्रगुप्त 23/09/2014 - 00:17
हल्ली अमेरिकेत पूर्वीच्या काही शब्दांऐवजी नवे जरा सभ्य शब्द वापरण्याचे फ्याड आहे म्हणे, त्याप्रमाणे धागाकर्त्याने मराठीतील ग्राम्य शब्दांऐवजी तोच अर्थ वहन करणार्‍या सुसंस्कृत नागरी शब्दांचा कोश निर्माण करावा, ही विनंती. (उदा: गणिकामध्यस्थ, भगिनीमैथुनप्रवण इ.)

In reply to by मार्क ट्वेन

शशिकांत ओक 23/09/2014 - 00:33
काळ्ळ्यांना आफ्रो अमेरिकन असे म्हटले तरी माणसे तीच... त्याच मापाने शिवी देणे सोडणार नाही फक्त फुल्या फुल्या असे म्हणून वेळ साजरी करेन....

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 23/09/2014 - 12:58
हा हा हा =)) गणिकामध्यस्थ लैच आवडल्या गेले आहे _/\_ दुसर्‍या शब्दाला 'स्वस्रागमनी' हा एक सुटसुटीत पर्याय सुचवतो. आमच्या एका मित्राने तयार केलेला हा शब्द. झालंच तर रासभीपुत्र, गणिकासुत, गमनव्याकुल, भगनंदन, इ.इ. पर्यायही विचारात घेतल्या जावेत ;)

In reply to by बॅटमॅन

सूड 23/09/2014 - 16:39
शष्प हाही एक सुरेख शब्द सापडलाय, आपल्याला बोलल्याचं समाधान आणि ऐकणार्‍याला शष्प चा अर्थ शष्प माहित नसल्याने त्याला सभ्य काहीतरी ऐकल्याचं समाधान!! ;) या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. =))))

In reply to by सूड

मदनबाण 23/09/2014 - 16:53
या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by सूड

बॅटमॅन 23/09/2014 - 17:55
शष्पू =)) =)) =)) =)) =)) धन्य _/\_ हे म्हणजे मुलाचं नाव शष्प असेल तर त्याच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोने लाडात त्याला बिलगून वगैरे हाक मारल्यापैकी - "ए काऽय रे शष्पू" इ.इ.इ.

In reply to by सूड

यावरून मिपावर काही महिन्यांपूर्वी झालेला किस्सा आठवला. एका स्त्री आयडीने एका पुरुष आयडीला असभ्य बोलण्यावरुन झापताना हा शब्द वापरला होता. तिला बिचारीला विरोधाभास लक्षात आला नसावा. ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:20
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बालगंधर्व 29/09/2014 - 15:21
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?

In reply to by सूड

बालगंधर्व 30/09/2014 - 10:07
माझया गावाला पूरवी एक मदरसा अले होति. तिच नाव शुबहनगी होता. गवातले सगले पोर तिचयावर मरयचि. मि पन मरयचो. मि तिच मोबयल नमबर मिलविला. तिला मेसेज केला. तिचा कदे मझे पेरेम बोलओलो. पन तिने मला शश्प रिसपोनस दिला.

In reply to by बालगंधर्व

खटपट्या 30/09/2014 - 10:39
"मदरसा" आली होते ? म्हणजे नक्की कोण आली होती तिचे नाव शुभहनगि म्हणजे शुभांगी होते का ? पेरेम, रीसपोनस…. जावूदे…. काय ते सपष्ट लिवा वो ? मराटी मदी

In reply to by चित्रगुप्त

गणिकामध्यस्थ हे लै म्हणजे लैच आवडले आहे हे नम्रपणे नमुद करुन अशा संस्कृतोद्भव श्या देण्या मुळे त्या श्यांमधला जोर निघुन जातो (शिवी देताना आणि घेताना अर्थ कोणी लक्षात घेतो का? उदा. टिनपाट, सरमाळ्या ) . शिवी कोणती आहे या पेक्षा ती कोणी व कशी उच्चारली या वरुन तीच्या परीणामाची तिव्रता ठरते. कल्पना करा आत्मुगुरुजी त्यांच्या देणेकर्‍याला म्हणत आहेत "अरे गणिकामध्यस्था माझे ॠण कधी चुकते करणार आहेस?" तो कधीच पैसे द्यायचा नाही. त्या ऐवजी "भा* दे ना पैसे" कसे वजनदार वाटते म्हणणार्‍याला पण आणि ऐकणार्‍याला पण. शिवी देताना गुर्मी दिसलीच पाहिजे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बॅटमॅन 23/09/2014 - 17:58
अहो त्या संस्कृतवाल्या श्या फक्त ग्रंथनिविष्ट करायला म्हणून. खर्‍या हातघाईच्या प्रसंगी प्राकृतच लागते!

प्रतिसादांचे अवलोकन केले असता (प्रस्तुत धागाकर्त्याचे, फॉर रीझन ऑफ बायस, आणि उपप्रतिसादांचे गणन न करता) हा प्रस्ताव ६-१२ प्रतिसादांनी हरला आहे!!!! मिपाचे मूळ स्थान, त्याची प्रतिष्ठानापासूनची भूमिका, धागाकर्त्यांच्या लक्षात न आल्याबद्दल त्यांचे सांत्वन! आणि, मिपासंस्थापक तात्या अभ्यंकरांच्या शाब्दिक पुण्याईचा विजय असो!!!!! :)

सर्वसाक्षी 23/09/2014 - 10:30
ओकसाहेब जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!" ज्यांना शिव्या दिलेल्या आवडत नाहीत किंवा ज्यांना उघड शिव्या देणे परवडणारे नसते त्यांना कुणी शिव्या देत नाही. आजुबाजुला अपरिचीत स्त्रिया असतील शिवी देणे टाळले जाते. रस्त्यावरील भांडणे, हमरीतुमरीचा भाग वगळता शिव्या या आपुलकीनेच दिल्या जातात. शिव्या नसल्या तर मित्रांचे संभाषण कसे होईल? मुळात बहुत्वेकरुन शिव्या या उद्गारवाचक चिन्हांऐवजी वापरल्या जातात, त्या कुणाला उद्देशून वगैरे नसतात. शिव्या देणे बंद वगैरे करणे अमान्य. अर्थात आजुबाजुला कोण आहे आणि आपण कुठे आहोत याचे थोडे तारतम्य अवश्य बाळगावे.

In reply to by सर्वसाक्षी

जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!"--१०० % राईट्ट , सर्वसाक्षी साहेबांशी सहमत ,आताच बोर्डावर आलेला पटाईत साहेबांचा लेख ही हेच मत व्यक्त करतोय असे वाटते.

मदनबाण 23/09/2014 - 11:19
शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय जस्ट कान्ट इमॅजिन यू नो ! ;) मी शक्यतो शिव्या देत नाही, दिल्याच तर त्या मनातल्या मनात देण्यावर जास्त भर असतो. ट्रॅफिक जाम मुळे आणि अतरंगी वाहन चालकांमुळे मात्र हल्ली टाळक सटकुन २-४ सॉफ्टकोअर शिव्या हासडतो... परवाच हायवेवर मधेच बाईक वळवु का नओ वळवु का नको अशा विचार मग्न असलेल्या पोराने माझी दुचाकी जवळ येताच मधेच बाईक वळवली ! मी ओरडले ! अरे छगन च्यायला डोक घरी ठेवुन आलास काय ? भाउला राग आला ! पुढे जाउन त्याने बाईक थांबवली आणि वाद घालायला सुरुवात केली,मी म्हंटल काय प्रॉब्लेम झाला, तर तो बोलाला की चूक झाली म्हणुन काय झालं छगन कशाला म्हणालास ? तो आग्री बाला आहे हे त्याच्या बोलण्यावरुन कळले, मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ? कन्फुज झाला आणि कीक मारुन मुकाट निघुन गेला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ?
"मिथुन' म्हण!!!! जल्लां सगलां काय नांवानच हाय!!! :)

विटेकर 23/09/2014 - 11:35
"छगन" ही शिवी आहे का ? शिव्यांचा काही भौगोलिक मापदंड ( जी आय) असतो का? नाशिक परिसरात " छगन" ही शिवा नसावी ( असे वाटते )

In reply to by विटेकर

मदनबाण 23/09/2014 - 11:47
अहो विटुकाका... ती शिवी नाही, पण ते सुद्धा लोकांना सहन होत नाही ! शिव्यांचा काहीही मापदंड नसतो ! देणारा सुद्धा गमतीने देउ शकतो आणि घेणारा सुद्धा गमतीने घेउ शकतो ! अर्थात पुरुष मित्रपरिवारात हे सहज होत्,स्त्रीयांचे काय माहित नाही... बहुधा परवा पमाकडे {प्रमिला}मंगळागौर झाली, काय सुरेख कार्यक्रम झाला होता ! पण आंबेडाळ काय नीट जमली नव्हती ! या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} ;) बाकी प्रकाकांनी दिलेला कोणत्या तरी स्त्रीचा *** पिळीन असा संवाद आठवतोय ! बहुधा त्यांनीच अशाच विषयावर धागा काढला होता का ? ते नीट आढवत नाही आता ! प्रकाका यावर अधिक प्रकाश टाकु शकतात याची बेशर्त गॅरेंटी देतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

विटेकर 23/09/2014 - 11:55
या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink अगदी अगदी ! फार तरं " पण तू काहीही म्हण , पमाचा नवरा अगदीच हेंदरट आहे " ही परमावधी !

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे. बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...! भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी?

एक रात्र फुटपाथवरील

शशिकांत ओक ·

गणपा 21/09/2014 - 12:39
ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या नजरेतून ज्यांच्या जवळ आहे अशा जगाला आजच्या रात्री बघा, अनुभवा. आजच्या रात्रीतील विचार तुमची जगाकडे पहायची नजर, उन्मत्त व उत्शृंखल होऊ देणार नाही. आयुष्यात काहीतरी बनायला त्यातून प्रेरणा घ्या..
मित्राच्या बाबांचे अनुभवी बोल आवडले.

त्या रात्री खिशात भरपूर पैसे असूनही आम्हाला असे कष्टमय जिणे वाट्याला का यावे अशी सुरवातीला आलेली मनाची चडफड शांत झाली. पण खरंच अशी वेळ का आली?

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा 21/09/2014 - 12:51
पन्नास वर्षांपुर्वीचा काळ आहे. कुठलं ठिकाण ते त्यांनी लिहिलं नाही. पण मुंबई जरी असली तरी तेव्हाची अन आत्ताची मुंबई बराच फरक असणार. हल्ली आसतात तशी २४ तास सेवा पुरवणारी लॉजेस तेव्हा नसावीत. (किंवा ते ज्या भागात होते तिथे तरी नसावीत.)

In reply to by गणपा

शशिकांत ओक 21/09/2014 - 17:32
आधीच्या प्रवासात बस बंद पडल्याने काही बाही करत रत्नागिरी ला पोहोचलो तेंव्हा शेवटची बस हुकली होती. म्हणून ती वेळ आली...

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव 21/09/2014 - 21:30
अहो ५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत एस्टी स्टँडजवळच्या कोणाचंही दार ठोठावलं असतंत तर पिठलंभात टाकला असतान आणि ओसरीत झोपायची सोय केली असतीन. असो. पण अनुभवाच्या पोतडीत चांगली भर पडली हे खरं.

In reply to by मिसळपाव

शशिकांत ओक 21/09/2014 - 22:51
कोणाचेही कोकणातील दार ठोठवले तर जेवण घालायचे जमले असते? पुणेरी म्हणून हिणवले जाणाऱ्या व्यक्ति कोकणातील मुल वाले साधा पत्ता विचारला तर हुडूत्त करतात असा अनेकांचे अनुभव आहेत!

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव 22/09/2014 - 02:22
हो. पुणेरी हिणवले जाणारे..पत्ता विचारला... वगैरे जाउंद्या. पण हो, स्टँडजवळच्या कोणीहि तुम्हाला उपाशी राहू दिले नसते. मधल्या आळीतल्या माझ्या आजी-आजोबांकडे आला असतात तर नक्किच नाहि पण ते तिथे रहात होते म्हणून त्यांचं नाव घेतलं एव्हढंच. आळीतल्या कोणाकडेहि गेला असतात तरी हाच प्रातिनिधिक अनुभव आला असता.

काउबॉय 22/09/2014 - 16:06
अंगावर मायेने हात फिरवणारे कोणी नाही, राहायला निवारा नाही, उद्याच्या भाकरीसाठी करायला लागणारे कष्ट करून थकलेले शरीर, कपड्याला घामाचे वास येऊन कडक झालेला सदरा अशा अवस्थेत आकाशातील तारे व चंद्र याकडे पाहून मनात काय विचार येत असतील याचा विचार करत आजची रात्र काढा
अशा अवस्थेत मनात विचारच येत नसतात. प्रयत्न करुनही.

vikramaditya 22/09/2014 - 19:50
काही प्रसंग, घटना आयुष्यात अचानक घडतात आणि काही अनुभव देवुन जातात. काही गोष्टी शिकवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करत बसण्यात कधी कधी अर्थ नसतो. कारण तो अनुभव व्यक्तीसापेक्ष असतो. असो.

असंका 23/09/2014 - 11:24
त्या रात्रीतले अजून काही अनुभव सांगा ना इथे! वय काय होते आपले त्यावेळी? एस टी स्टँड वगैरे नसायचे का? कारण एस टी स्टँडवर पडायला तशी मजा येते..अनेक लोक दिसतात! कोण कसे, कोण कसे!! (रत्नागिरीत आजही रात्रीच्या वेळी एस टी स्टँडवर फार वर्दळ नस्ते हे खरं, पण आतातरी तिथे झोपायला लागणं हे एवढं त्रासदायक वाटत नाही. तेव्हा कसं होतं, हे सांगाल का? )

आदिजोशी 23/09/2014 - 16:02
फुटपाथवर का झोपलात हे कळलं नाही. स्टँडवर जाऊन झोपायचं की. मजा येते. आम्ही झोपलो आहे कैक वेळा ट्रेकिंगच्या वेळी - स्टँडवर, प्लॅटफॉर्मवर, देवळात, लोकांच्या पडवीत, कधी नुसतंच डोंगराच्या पायथ्याशी, माळरानावर, वगैरे वगैरे.

In reply to by आदिजोशी

शशिकांत ओक 27/09/2014 - 10:40
त्या जागा आधी बळकावल्या गेल्या होत्या. ५० वर्षा पुर्वी घडलेल्या एका घटनेवर आत्ता असे करायला हवे होते असे भाष्य करायच्या आधी त्या रात्रीने माझ्या मनावर काय प्रभाव टाकला ते महत्वाचे. असो.

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 16:27
मला लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. मी सुद्धा एक रात्र रेल्वे फलाटावर काढली आहे ( १५ -२० वर्षा पूर्वी गुजराथ मधे पूर आला होता तेंव्हा ). बर्‍याच लोकांनी असे काहीतरी अनुभवलेच असेल. ह्या एकदम "विचारीपणाने, जिद्दीने सामोरे गेले तर ही दशा पण बदले" एव्ह्डे मोठे तत्वज्ञान कळण्यासारखे काय आहे? आणि एक रात्र बस, रेल्वे, विमान चुकले म्हणुन रस्त्यावर, फलाट अश्या ठीकाणी काढण्यात विषेश काय आहे?

In reply to by प्रसाद१९७१

शशिकांत ओक 23/09/2014 - 22:03
विक्रमादित्य यांनी विचार व्यक्त केलेत ते संक्षेपाने योग्य वाटतात.

In reply to by विलासराव

संदीप डांगे 27/09/2014 - 10:41
आजकाल पादचारी मार्ग झोपायलासुद्धा मिळत नाहीत. मी फोटो काढला तेंव्हा ह्या बाई नुकत्याच उठल्या होत्या. फोटोचा उद्देशही तोच होता. पन्नास वर्षांपूर्वी फूटपाथ मिळायचे आता रस्ता दुभाजक. पुढे काय?

In reply to by संदीप डांगे

विलासराव 27/09/2014 - 10:48
पुढे काय? माहीत नाही पण कदाचीत मंगळावरील फुटपाथवर. मी गोवंडीजवळ दोन रेल्वे ट्रॅकमधे झोपडी बांधुन रहात असलेले कुटुंब पाहीले होते, तेही १० वर्षापुर्वी.

गणपा 21/09/2014 - 12:39
ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या नजरेतून ज्यांच्या जवळ आहे अशा जगाला आजच्या रात्री बघा, अनुभवा. आजच्या रात्रीतील विचार तुमची जगाकडे पहायची नजर, उन्मत्त व उत्शृंखल होऊ देणार नाही. आयुष्यात काहीतरी बनायला त्यातून प्रेरणा घ्या..
मित्राच्या बाबांचे अनुभवी बोल आवडले.

त्या रात्री खिशात भरपूर पैसे असूनही आम्हाला असे कष्टमय जिणे वाट्याला का यावे अशी सुरवातीला आलेली मनाची चडफड शांत झाली. पण खरंच अशी वेळ का आली?

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा 21/09/2014 - 12:51
पन्नास वर्षांपुर्वीचा काळ आहे. कुठलं ठिकाण ते त्यांनी लिहिलं नाही. पण मुंबई जरी असली तरी तेव्हाची अन आत्ताची मुंबई बराच फरक असणार. हल्ली आसतात तशी २४ तास सेवा पुरवणारी लॉजेस तेव्हा नसावीत. (किंवा ते ज्या भागात होते तिथे तरी नसावीत.)

In reply to by गणपा

शशिकांत ओक 21/09/2014 - 17:32
आधीच्या प्रवासात बस बंद पडल्याने काही बाही करत रत्नागिरी ला पोहोचलो तेंव्हा शेवटची बस हुकली होती. म्हणून ती वेळ आली...

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव 21/09/2014 - 21:30
अहो ५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत एस्टी स्टँडजवळच्या कोणाचंही दार ठोठावलं असतंत तर पिठलंभात टाकला असतान आणि ओसरीत झोपायची सोय केली असतीन. असो. पण अनुभवाच्या पोतडीत चांगली भर पडली हे खरं.

In reply to by मिसळपाव

शशिकांत ओक 21/09/2014 - 22:51
कोणाचेही कोकणातील दार ठोठवले तर जेवण घालायचे जमले असते? पुणेरी म्हणून हिणवले जाणाऱ्या व्यक्ति कोकणातील मुल वाले साधा पत्ता विचारला तर हुडूत्त करतात असा अनेकांचे अनुभव आहेत!

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव 22/09/2014 - 02:22
हो. पुणेरी हिणवले जाणारे..पत्ता विचारला... वगैरे जाउंद्या. पण हो, स्टँडजवळच्या कोणीहि तुम्हाला उपाशी राहू दिले नसते. मधल्या आळीतल्या माझ्या आजी-आजोबांकडे आला असतात तर नक्किच नाहि पण ते तिथे रहात होते म्हणून त्यांचं नाव घेतलं एव्हढंच. आळीतल्या कोणाकडेहि गेला असतात तरी हाच प्रातिनिधिक अनुभव आला असता.

काउबॉय 22/09/2014 - 16:06
अंगावर मायेने हात फिरवणारे कोणी नाही, राहायला निवारा नाही, उद्याच्या भाकरीसाठी करायला लागणारे कष्ट करून थकलेले शरीर, कपड्याला घामाचे वास येऊन कडक झालेला सदरा अशा अवस्थेत आकाशातील तारे व चंद्र याकडे पाहून मनात काय विचार येत असतील याचा विचार करत आजची रात्र काढा
अशा अवस्थेत मनात विचारच येत नसतात. प्रयत्न करुनही.

vikramaditya 22/09/2014 - 19:50
काही प्रसंग, घटना आयुष्यात अचानक घडतात आणि काही अनुभव देवुन जातात. काही गोष्टी शिकवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करत बसण्यात कधी कधी अर्थ नसतो. कारण तो अनुभव व्यक्तीसापेक्ष असतो. असो.

असंका 23/09/2014 - 11:24
त्या रात्रीतले अजून काही अनुभव सांगा ना इथे! वय काय होते आपले त्यावेळी? एस टी स्टँड वगैरे नसायचे का? कारण एस टी स्टँडवर पडायला तशी मजा येते..अनेक लोक दिसतात! कोण कसे, कोण कसे!! (रत्नागिरीत आजही रात्रीच्या वेळी एस टी स्टँडवर फार वर्दळ नस्ते हे खरं, पण आतातरी तिथे झोपायला लागणं हे एवढं त्रासदायक वाटत नाही. तेव्हा कसं होतं, हे सांगाल का? )

आदिजोशी 23/09/2014 - 16:02
फुटपाथवर का झोपलात हे कळलं नाही. स्टँडवर जाऊन झोपायचं की. मजा येते. आम्ही झोपलो आहे कैक वेळा ट्रेकिंगच्या वेळी - स्टँडवर, प्लॅटफॉर्मवर, देवळात, लोकांच्या पडवीत, कधी नुसतंच डोंगराच्या पायथ्याशी, माळरानावर, वगैरे वगैरे.

In reply to by आदिजोशी

शशिकांत ओक 27/09/2014 - 10:40
त्या जागा आधी बळकावल्या गेल्या होत्या. ५० वर्षा पुर्वी घडलेल्या एका घटनेवर आत्ता असे करायला हवे होते असे भाष्य करायच्या आधी त्या रात्रीने माझ्या मनावर काय प्रभाव टाकला ते महत्वाचे. असो.

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 16:27
मला लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. मी सुद्धा एक रात्र रेल्वे फलाटावर काढली आहे ( १५ -२० वर्षा पूर्वी गुजराथ मधे पूर आला होता तेंव्हा ). बर्‍याच लोकांनी असे काहीतरी अनुभवलेच असेल. ह्या एकदम "विचारीपणाने, जिद्दीने सामोरे गेले तर ही दशा पण बदले" एव्ह्डे मोठे तत्वज्ञान कळण्यासारखे काय आहे? आणि एक रात्र बस, रेल्वे, विमान चुकले म्हणुन रस्त्यावर, फलाट अश्या ठीकाणी काढण्यात विषेश काय आहे?

In reply to by प्रसाद१९७१

शशिकांत ओक 23/09/2014 - 22:03
विक्रमादित्य यांनी विचार व्यक्त केलेत ते संक्षेपाने योग्य वाटतात.

In reply to by विलासराव

संदीप डांगे 27/09/2014 - 10:41
आजकाल पादचारी मार्ग झोपायलासुद्धा मिळत नाहीत. मी फोटो काढला तेंव्हा ह्या बाई नुकत्याच उठल्या होत्या. फोटोचा उद्देशही तोच होता. पन्नास वर्षांपूर्वी फूटपाथ मिळायचे आता रस्ता दुभाजक. पुढे काय?

In reply to by संदीप डांगे

विलासराव 27/09/2014 - 10:48
पुढे काय? माहीत नाही पण कदाचीत मंगळावरील फुटपाथवर. मी गोवंडीजवळ दोन रेल्वे ट्रॅकमधे झोपडी बांधुन रहात असलेले कुटुंब पाहीले होते, तेही १० वर्षापुर्वी.

एक रात्र फुटपाथवरील

पन्नास वर्षांपुर्वीची गोष्ट. पावसाची रिप रिप. वीज गेलेली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. कुठलेच हॉटेल खायला व राहायला उघडे नाही. अशा अवस्थेत मी आणि माझा मित्र व त्याचे वडील दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या एसटीसाठी वणवण भटकत फिरून शेवटी हाताची उशी करून फुटपाथवर उताणे पडलो होतो. “...

गाढव ऐकेना, गाढव समजेना

संजय क्षीरसागर ·

सुहास.. 18/09/2014 - 23:02
=)) =)) ही मस्त काव्य-जुगलबंदी चालु आहे ...

In reply to by संजय क्षीरसागर

किसन शिंदे 18/09/2014 - 23:55
मुळात जोडा हाणावाच कशाला हा प्रश्न पडतोय मला संक्षी साहेब. समोरच्याने पातळी सोडली तरी आपण सोडू नये असं नाही का वाटत तुम्हाला? तुमच्यासारख्या सूज्ञ माणसाने एका गाढवाच्या नादी लागून असलं काही लिहिणे माझ्यासारख्याला पटले नाही. साॅरी!! आणि हे लिहिताना मला तुमचे जुुने चांगले लेख आठवताहेत.

In reply to by किसन शिंदे

आणि जे पोस्टवर जमत नाही म्हणून तिथे जाऊन स्कोर सेटल असतील तर माझी बाजू मांडायला लेखनाशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. तुम्हाला माझं चांगलं लेखन स्मरतंय याचा आनंद आहे पण तशा लेखनाची अपेक्षा करतांना सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.

In reply to by संजय क्षीरसागर

सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.
ही अपेक्षा इतरांकडून करण्यापूर्वी त्याच्या १% विचार तुम्ही स्वतः केलात तर असे का होते हे समजून यायला हवे. मिसळपाववर इतके सदस्य आहेत पण दरवेळा तुम्हीच का टार्गेट होतात? कारण इतर कोणीही सदस्य अन्य सभासदांच्या बुध्दीवर/ विचारशक्तीवर/ आकलनशक्तीवर कमेन्ट करत नाही.बाकी काहीही माणूस एकवेळ सहन करेल पण सतत आपली अक्कल काढली गेल्यास ते मात्र कोणीच सहन करणार नाही. अर्थात तुमच्यासारख्या महान विद्वान तत्ववेत्त्याला काय बोला?असे लोक समाजात असतात आणि मिसळपावही त्याच समाजाचे प्रतिबिंब आहे त्यामुळे असे लोक तिथेही अ॑सणारच ही बेशर्त स्विकृती मात्र कधीच केली आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तो कृपया दूर करा. आता याच पोस्टचं उदाहरण पाहा. मी आपणहून कधीही कुणाची कुरापत काढत नाही. या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!) वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा. म्हणजे बाकी सर्वांनी मला कॉर्नर करा आणि मी मात्र मोठेपणा घ्या. आता यांच्या गर्दभलीलांना टाळ्या पिटणारे कोण तर ज्यांना स्वतःच्या पोस्टवर (माझा) प्रतिवाद करता आलेला नाही ते सगळे! मग मी जर म्हटलं `गाढवावर बसून युद्ध जिंकता येत नाही, थोडा तरी प्रामाणिकपणा ठेवा', तर पुन्हा अपमान केल्याचा रुसवा. तर सारांश काय? मी कधी कुणाच्या वाटेला जात नाही पण संगनमत आणि कंपूबाजीनं कुणी मला घेरण्याचा प्रयत्न केला तर, मी एकटा पुरेसा आहे. अर्थात, माझा आयडी परावलंबी असला तरी अपमानापुढे त्याची मला किंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बाळ सप्रे 19/09/2014 - 13:26
वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा.
मलाही तोच सल्ला योग्य वाटतो.. आपल्या हिरिरीने एखाद्या मुद्द्याच्या प्रतिवाद करण्याच्या गुणाचं कौतुक वाटतं. वैयक्तिक हल्ल्यांकडे दुर्लक्ष हाच उपाय सर्वोत्तम वाटतो. शेवटी अशा वादात जय पराजय नसतो. काथ्याकूटात काय घ्यायचय काय सोडायच ते प्रत्येक जण आपापलच ठरवणार .

In reply to by संजय क्षीरसागर

सूड 19/09/2014 - 14:38
तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे. तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही सवाई आहात, पुरुन उरणारे आहात तर मग येवढा काव्यप्रपंच कशासाठी? तुम्ही चिडावेच अशासाठी जर सगळं चाललंय हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चिडलायेत हे दाखवून त्यांचे प्रयत्न यशस्वी केलेत. हल्लीच वाचण्यात आलेलं वाक्य: Keep smiling - it makes people wonder what you've been up to..

In reply to by संजय क्षीरसागर

होकाका 20/09/2014 - 01:05
हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे,
का हो पण, सगळेच जण का हो तुमच्याच बद्दल हे असे गैरसमज पसरवतायत?

In reply to by संजय क्षीरसागर

जेनी... 19/09/2014 - 00:38
संजु काका किसन काका म्हणताय्त ते मलाहि पटतय ... वर आणखी एक गोष्ट ... कि तुम्ही हाणलेला जोडा गाडवाने पळ्वुन नेला तं तुम्ही दुसर्या जोड्याचे काय बरे कर्णार ?? हाणायचेच आहे तर जोडे हाणा ... फक्त जोडा नको ... :-/

धन्या 18/09/2014 - 23:16
गाढवावर सलग दुसरा धागा :( शेवटी व पू काळेंनी लिहीलंय तेच खरं. "माणसाबद्दल एकच गोष्ट ठामपणे सांगता येते की माणसाबद्दल काहीच ठामपणे सांगता येत नाही. "

In reply to by धन्या

काउबॉय 18/09/2014 - 23:57
मग गाढवाला वाटले की ते कवी झाले मग त्याने कविता लिहली का अथवा त्याकवितेवर कोणी कोणी हजेरी लावली यावर नो कमेंट्स.

In reply to by गवि

सूड 18/09/2014 - 23:38
मी तर जीवलगा राहिले दूर घर माझे, शिट्टी वाजली आणि डोंगराचे आडून एक बाय चांद उंगवला अशा तीन चालीवर म्हणून पाह्यलं !!

In reply to by सूड

गवि 18/09/2014 - 23:45
__/\__ मी हाय कोली , एकविराआई तू डोंगरावरी आणि दिवस तुझे हे फुलायचे .. हे नाही केलेस वाट्टे.. ;-)

In reply to by विजुभाऊ

धन्या 20/09/2014 - 16:24
पदोपदी अपार असती पुण्याच्या राशी.धन्य धन्य हो प्रदक्षणा..
ही नेमकी काय भानगड आहे? अमच्या सोसायटीत दिवाळीनंतर जवळपास महिनाभर रोज सकाळी प्रदक्षिणा धन्य होत असते. झोपेचे खोबरे होते पार.

In reply to by पैसा

गाढव खिंकाळले का हो? स्वतःची बसली, स्वतःला हो | आयडीची वाट लागली हो आता लागा कामाला हो | झक अशी मारली का हो? बावळ्या लपूनी पाहातो हो | फुंकले किती तू उकिरडे बहुविध उपद्व्याप केले जनाचे खाऊन उष्टे-माष्टे शेपूट हलते का पाहे पुढचा कुठला आयडी रे? पुरता पोपट झाला हो |

In reply to by जेनी...

याला कामकाज बहुत ओझी वाहातो कुठ पर्यंत आयडी जौंदे नाही खंत गाढवा नांवे अनंत आता याची करुणा येऊ द्या हो याला बाहेर जाऊं द्या हो |

In reply to by यशोधरा

पेटला प्रतिसाद वणवा गाढवा कैसा सोसावा वेड लागेल नैतर काय लॉगीन नको करायाला आयच्या गावात गेला हो स्वामी याला वाचवा हो बावळ्या कुठे खेटतो हो डाँकी फंकी झाला हो झाला दिगंबर पाहा हो स्वामी याला वाचवा हो |

धन्या 19/09/2014 - 08:31
शहाण्याच्या शहाणपणाला शहाण्याच्या शहाणपणाला गाव हे सारं हासतंय गाव हे सारं हासतंय हॉ आ हॉ आ हॉ आ हॉ आ बघ बघ बघ सखे कसं गाढव हे नाचतंय * कुठल्या गाण्याच्या चालीत म्हणावे हे माहीती करुन घेण्यासाठी व्यनि करावा.

कंजूस 19/09/2014 - 09:21
एका कोपऱ्यात पडलेल्या डबड्याने उधळलेलं गाढव पाहिलं. मी इकडे पडून आहे असं उधळायला आणि खिंकाळायला मिळालं तर किती मजा येईल? पुढे ---

जेपी 19/09/2014 - 09:46
गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही. मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

सौंदाळा 19/09/2014 - 11:05
संक्षींचा स्ट्राईक रेट निराकार गाढवापेक्षा जास्त आहे. निराकार गाढव : २८ संक्षी : नॉट आउट ४०

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

काउबॉय 19/09/2014 - 12:41
संजय अंकल गाढवाशी स्पर्धा करत नाहीयेत हो. :( किसनद्येव सुधा संजय अंकलना हेच हेच सामजावु पहात आहेत. पण...

दिनेश सायगल 19/09/2014 - 12:02
निराकार गाढव नावाच्या आयडीनं आपले गुर्जी कोण ते आजपर्यंत कवाच सांगितलं नाही. कोण बेचारा एकलव्य आहे कोणजाणे! पण तुम्ही कशाला कोणा गाढवाच्या पाठी काठी घेऊन लागताय! शहाण्यासुरत्या माणसाला हे बरं दिसत नाही. हे सगळं वाचून तेन्नालीराम आणि पंडित व्हायची इच्छा असलेल्या माणसाची कथा मात्र आठवली!

In reply to by हाडक्या

पैसा 20/09/2014 - 01:31
मला तरी बिरबल आणि पंडिताची गोष्ट माहिती आहे. ही तीच का ते माहिती नाही. एका ब्राह्मणाला काही विद्या नव्हती पण आपल्याला सर्वांनी पंडित म्हणावे असे त्याला वाटे. मग तो बिरबलाला भेटला आणि म्हणाला की मला लोकानी पंडित म्हणावेसे वाटते. मग बिरबल म्हणाला की तुला जे पंडित म्हणून हाक मारतील त्याना तू दगड मार. मग बघ काय होते ते. तो ब्राह्मण बाहेर गेल्यावर बिरबलाने त्याच्या गल्लीतल्या लहान मुलांना बोलावून सांगितले की अमूक एक ब्राह्मण आहे त्याच्या मागे पंडित म्हणत धावा आणि मजा बघा. याच्या पुढची गोष्ट सांगायला पाहिजे काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

चला तुमची पण हौस पुरी करतो : एका गावात होती, टोपणे-बुचे अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक आहे असाच पपलू, हा आमच्यात एक |

In reply to by संजय क्षीरसागर

टग्या , भूत , विनम्र , प्रगो , पंत , गिरीजा , मोहीनी , काका इत्यादी माझे ड्यु आयडी आहेत . नोट करुन ठेवा म्हणजे सारखी सारखी गिरीजा ह्या एकाच आयडी वर ठेच लागणार नाही =))

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 19/09/2014 - 13:37
दोघांना आणि त्या निमित्ताने गाढव आदि सर्वच जणांना मनापासून प्रश्न: असे ओरबाडाओरबाडी करण्यात खुद्द स्वत:ला आनंद सुख मिळते का? मनाला लागले म्हणून प्रतिहल्ले होतात ना? स्वत:ला त्रास सोसून इतरांना मजा पाहू देणे यात आनंद आहे का? धागे अप्रकाशित करण्याच्या कामात संपादकांना आनंद वा इंसेंटिव्ह आहे का ? सगळी उत्तरे "नाही" अशी असावीत.. मग हे धागे आणि हिशोब टाळता येणार नाहीत का? बाकी काय बोलणार ?

In reply to by गवि

गणपा 19/09/2014 - 13:44
लोकांच्या 'मनोरंजना'चं व्रत घेतलेल्यांना काय सांगायचं गवि? शब्दाचा मार शहाण्या लोकांसाठी असतो. यातुन कुणी शहाणं झालं तर आनंदच आहे.

In reply to by गवि

नमस्कार गवि काका ! इथे माझं , रादर कोणाचंच संक्षींशी वैयक्तिक भांडण नाहीये . (एक्वेळ तर अशी होती की मी संक्षींच्या लिखाणाचे फॅन होतो , परवा मेल चाळताना माझ्या लक्षात आले ... २००९ मध्ये माझ्या मित्राने मला लिहिलेल्या एका मेल मधे "संक्षी उत्तम लेखन करतात ते आवर्जुन वाच" असा उल्लेख आहे ) पण सध्या संक्षींचा मी एक्की मी , मी दुणे आम्ही , मी त्रिक भास , मी चोक निराकार , मी पंचे सर्वज्ञ हा पाढा लक्षात आल्याने फार हसु येते , मग कोणीतरी निराकार गाढव त्यांना डिवचते अन संक्षी दुर्लक्ष करायचे सोडुन परत मी चा पाढा सुरु करतात , हे सारे पहायला लय मजा येते राव . मग आम्ही कधी कधी त्याला हातभार लावतो =)) तुम्हीही कधीतरी ट्राय करुन पहा , मी चा पाढा लय भारी आघे राव ... आधीचे पाढे वाचयचे असल्यास सांगा लिंका पाठवतो ;) हा प्रतिसाद भास आहे . प्रतिसाद असे काहीच नसते . मी कधीच चुकत नसतो अन आजपर्यंत कोणीच माझ्या मताचे खंडन करु शकले नाहीये . =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 19/09/2014 - 14:25
प्रगोशी सहमत!!!! मीच काय तो सर्वज्ञ असे अ‍ॅटिट्यूड घेतल्यानेच लोकं चेकाळली. एकट्या संक्षीला का टार्गेट करता म्हणण्यापेक्षा तो पाढा बघा म्हणावं अगोदर नीट.

In reply to by गवि

मूळ धागा प्रकाशित होऊन कायम राहणं याचा अर्थ तो धोरणात बसतो असा होतो. थोडक्यात, त्यात काहीही व्यक्तिगत नाही असा निर्वाळा दिला जातो. मग त्यावर प्रत्युत्तर आल्यावर मान्यवरांना झळ पोहोचली की दोन्ही धागे डिलीट होतात (असा मागच्या पोस्टचा अनुभव आहे). तुम्ही सदस्यात डिस्क्रीमिनेट करा असं म्हणणार नाही पण लेट ऑल हॅव अ‍ॅन इक्वल चान्स. जर मूळ धागा `ओरबाडी' वाटत असेल तर तो प्रकाशित व्ह्यायला नको होता. आणि उत्तर देण्यात मला काय आनंद मिळणार? मी फक्त उत्तर देऊ शकतो इतकंच दाखवून दिलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 19/09/2014 - 14:11
म्हणूनच तर माझ्या प्रश्नात गाढवालाही इन्क्लूड केलंय ना. नुसते नियमात बसणे आणि राहणे हा भाग पूर्ण वेगळा आहे. आणि अप्रकाशित होणे हाही भाग एकाच एका फॅक्टरवर अवलंबून नसतो. ते जाऊ दे. मुळात कोणीच असे धागे / प्रतिसाद देण्याविषयी प्रश्न होता.

In reply to by गवि

म्हणजे तुम्ही हाणा आणि मी ऐकून घेऊ? अरे मूळ पोस्ट जर प्रकाशित झाली तर उत्तर येणारच. आणि हे बर्‍याच पूर्वीपासून चालू आहे. मी वर म्हटलंय :
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!)
जर अ‍ॅक्शन घ्यायची असती तर केव्हाच घेतली असती असा कुणाचाही निष्कर्श निघणार नाही का?

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 19/09/2014 - 14:31
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला ,
हे जरा विस्कटून सांगता का ? निराकार गाढव हे जे काही आहे त्याने आपली खिल्ली कशी काय उड़ते ?

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 19/09/2014 - 20:37
एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो. .

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 19/09/2014 - 20:38
एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

एका गावात होती, टोपणे-बुचे http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक ...............http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif आहे असाच पपलू, हा आमच्यात एक | =========== http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif

बॅटमॅन 19/09/2014 - 12:48
बेशर्त स्वीकृती कुठल्या ***च्या **त गेली???????? सॉरी हं निराकारभौ. भाषेतला प्रचलित वाक्प्रचार म्हणून वापरलं, नायतर आम्ही तुमचे लय मोठ्ठे (५ वर फिरणारे) फॅन हाओत. पण निव्वळ काव्यमूल्य पाहिलं तर ठीक आहे =))

In reply to by रामपुरी

प्रतिसाद बघा लेख बघा सगळीकडे "मी"च आहे. "तो मीच"
+१. याच कारणामुळे तर आपल्या गुरूजींना सगळे टार्गेट करत असतात.पण मीपणाचा चष्मा सतत लावल्यामुळे ते त्यांच्या लक्षात येत नाही. ठिक आहे. आपले काय जाते निराकार गाढव आणि गुरूजींमधली जुगलबंदी बघायला? :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तरी म्हटलं बोथट सुरी अजून कसे उगवले नाहीत! कारण माझ्याविरोधात काही लिहीलं गेलंय आणि वेळात वेळ काढून हे आले नाहीत असं अद्यापी कधी झालेलं नाही. बाकी कुठे न का देईना, अशा वेळी ते प्रतिसादाचा हक्क हमखास बजावणार! बाय द वे, `मी' हे मराठीतलं सर्वनाम आहे. तुम्हाला कंटेंटपेक्षा `मी' आला की पुढचं दिसेनासं होतंय बहुदा. तुमच्या प्रश्नाला पहिला प्रतिसाद यथोचित दिला होता (तो सोईस्करपणे सोडून दिलायं). काही हरकत नाही, आता स्वतःबद्दल लिहीतांना, कोणतं सर्वनाम वापरतात ते सांगा. आणि मला एक कळत नाही, एका उपद्रवी आयडीला पाचर बसल्यावर इतरांना इतकी व्याकूळता का येतेयं?

प्रतिसाद वाचणे आणि त्यावर विचार करुन एकमेकांस घायाळ करणारे प्रतिसाद लिहिणे यात किती वेळ जात असेल याची कल्पना केलेली बरी......यातून कोणाला काय आनंद मिळतो हा एक संशोधनाचा विषय ठरावा....सगळ्यांना नम्र विनंती की यात वेळ व बुद्धी वाय घालवू नये..........बघा पटले तर !

In reply to by संजय क्षीरसागर

घडून गेलेल्या घटनांना इतिहास म्हणतात. त्यातून काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने शोधायचे असते. बर्^याच वेळा हे असे घडू नये यासाठीही तपशिलात जाऊन लिखाण करावे लागते. पण जाऊदेत.......क्रौर्याबद्दल कोणाला आकर्षण असेल असे मला वाटत नाही....आता मला पटले की चांगल्या भावनेने काहीही लिहा, तुम्हाला त्यात वाकड्यातच शिरायची भारी हौस आहे....त्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो हे स्पष्ट आहे... हा प्रतिसाद शेवटचा........

सुहास.. 18/09/2014 - 23:02
=)) =)) ही मस्त काव्य-जुगलबंदी चालु आहे ...

In reply to by संजय क्षीरसागर

किसन शिंदे 18/09/2014 - 23:55
मुळात जोडा हाणावाच कशाला हा प्रश्न पडतोय मला संक्षी साहेब. समोरच्याने पातळी सोडली तरी आपण सोडू नये असं नाही का वाटत तुम्हाला? तुमच्यासारख्या सूज्ञ माणसाने एका गाढवाच्या नादी लागून असलं काही लिहिणे माझ्यासारख्याला पटले नाही. साॅरी!! आणि हे लिहिताना मला तुमचे जुुने चांगले लेख आठवताहेत.

In reply to by किसन शिंदे

आणि जे पोस्टवर जमत नाही म्हणून तिथे जाऊन स्कोर सेटल असतील तर माझी बाजू मांडायला लेखनाशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. तुम्हाला माझं चांगलं लेखन स्मरतंय याचा आनंद आहे पण तशा लेखनाची अपेक्षा करतांना सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.

In reply to by संजय क्षीरसागर

सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.
ही अपेक्षा इतरांकडून करण्यापूर्वी त्याच्या १% विचार तुम्ही स्वतः केलात तर असे का होते हे समजून यायला हवे. मिसळपाववर इतके सदस्य आहेत पण दरवेळा तुम्हीच का टार्गेट होतात? कारण इतर कोणीही सदस्य अन्य सभासदांच्या बुध्दीवर/ विचारशक्तीवर/ आकलनशक्तीवर कमेन्ट करत नाही.बाकी काहीही माणूस एकवेळ सहन करेल पण सतत आपली अक्कल काढली गेल्यास ते मात्र कोणीच सहन करणार नाही. अर्थात तुमच्यासारख्या महान विद्वान तत्ववेत्त्याला काय बोला?असे लोक समाजात असतात आणि मिसळपावही त्याच समाजाचे प्रतिबिंब आहे त्यामुळे असे लोक तिथेही अ॑सणारच ही बेशर्त स्विकृती मात्र कधीच केली आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तो कृपया दूर करा. आता याच पोस्टचं उदाहरण पाहा. मी आपणहून कधीही कुणाची कुरापत काढत नाही. या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!) वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा. म्हणजे बाकी सर्वांनी मला कॉर्नर करा आणि मी मात्र मोठेपणा घ्या. आता यांच्या गर्दभलीलांना टाळ्या पिटणारे कोण तर ज्यांना स्वतःच्या पोस्टवर (माझा) प्रतिवाद करता आलेला नाही ते सगळे! मग मी जर म्हटलं `गाढवावर बसून युद्ध जिंकता येत नाही, थोडा तरी प्रामाणिकपणा ठेवा', तर पुन्हा अपमान केल्याचा रुसवा. तर सारांश काय? मी कधी कुणाच्या वाटेला जात नाही पण संगनमत आणि कंपूबाजीनं कुणी मला घेरण्याचा प्रयत्न केला तर, मी एकटा पुरेसा आहे. अर्थात, माझा आयडी परावलंबी असला तरी अपमानापुढे त्याची मला किंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बाळ सप्रे 19/09/2014 - 13:26
वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा.
मलाही तोच सल्ला योग्य वाटतो.. आपल्या हिरिरीने एखाद्या मुद्द्याच्या प्रतिवाद करण्याच्या गुणाचं कौतुक वाटतं. वैयक्तिक हल्ल्यांकडे दुर्लक्ष हाच उपाय सर्वोत्तम वाटतो. शेवटी अशा वादात जय पराजय नसतो. काथ्याकूटात काय घ्यायचय काय सोडायच ते प्रत्येक जण आपापलच ठरवणार .

In reply to by संजय क्षीरसागर

सूड 19/09/2014 - 14:38
तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे. तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही सवाई आहात, पुरुन उरणारे आहात तर मग येवढा काव्यप्रपंच कशासाठी? तुम्ही चिडावेच अशासाठी जर सगळं चाललंय हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चिडलायेत हे दाखवून त्यांचे प्रयत्न यशस्वी केलेत. हल्लीच वाचण्यात आलेलं वाक्य: Keep smiling - it makes people wonder what you've been up to..

In reply to by संजय क्षीरसागर

होकाका 20/09/2014 - 01:05
हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे,
का हो पण, सगळेच जण का हो तुमच्याच बद्दल हे असे गैरसमज पसरवतायत?

In reply to by संजय क्षीरसागर

जेनी... 19/09/2014 - 00:38
संजु काका किसन काका म्हणताय्त ते मलाहि पटतय ... वर आणखी एक गोष्ट ... कि तुम्ही हाणलेला जोडा गाडवाने पळ्वुन नेला तं तुम्ही दुसर्या जोड्याचे काय बरे कर्णार ?? हाणायचेच आहे तर जोडे हाणा ... फक्त जोडा नको ... :-/

धन्या 18/09/2014 - 23:16
गाढवावर सलग दुसरा धागा :( शेवटी व पू काळेंनी लिहीलंय तेच खरं. "माणसाबद्दल एकच गोष्ट ठामपणे सांगता येते की माणसाबद्दल काहीच ठामपणे सांगता येत नाही. "

In reply to by धन्या

काउबॉय 18/09/2014 - 23:57
मग गाढवाला वाटले की ते कवी झाले मग त्याने कविता लिहली का अथवा त्याकवितेवर कोणी कोणी हजेरी लावली यावर नो कमेंट्स.

In reply to by गवि

सूड 18/09/2014 - 23:38
मी तर जीवलगा राहिले दूर घर माझे, शिट्टी वाजली आणि डोंगराचे आडून एक बाय चांद उंगवला अशा तीन चालीवर म्हणून पाह्यलं !!

In reply to by सूड

गवि 18/09/2014 - 23:45
__/\__ मी हाय कोली , एकविराआई तू डोंगरावरी आणि दिवस तुझे हे फुलायचे .. हे नाही केलेस वाट्टे.. ;-)

In reply to by विजुभाऊ

धन्या 20/09/2014 - 16:24
पदोपदी अपार असती पुण्याच्या राशी.धन्य धन्य हो प्रदक्षणा..
ही नेमकी काय भानगड आहे? अमच्या सोसायटीत दिवाळीनंतर जवळपास महिनाभर रोज सकाळी प्रदक्षिणा धन्य होत असते. झोपेचे खोबरे होते पार.

In reply to by पैसा

गाढव खिंकाळले का हो? स्वतःची बसली, स्वतःला हो | आयडीची वाट लागली हो आता लागा कामाला हो | झक अशी मारली का हो? बावळ्या लपूनी पाहातो हो | फुंकले किती तू उकिरडे बहुविध उपद्व्याप केले जनाचे खाऊन उष्टे-माष्टे शेपूट हलते का पाहे पुढचा कुठला आयडी रे? पुरता पोपट झाला हो |

In reply to by जेनी...

याला कामकाज बहुत ओझी वाहातो कुठ पर्यंत आयडी जौंदे नाही खंत गाढवा नांवे अनंत आता याची करुणा येऊ द्या हो याला बाहेर जाऊं द्या हो |

In reply to by यशोधरा

पेटला प्रतिसाद वणवा गाढवा कैसा सोसावा वेड लागेल नैतर काय लॉगीन नको करायाला आयच्या गावात गेला हो स्वामी याला वाचवा हो बावळ्या कुठे खेटतो हो डाँकी फंकी झाला हो झाला दिगंबर पाहा हो स्वामी याला वाचवा हो |

धन्या 19/09/2014 - 08:31
शहाण्याच्या शहाणपणाला शहाण्याच्या शहाणपणाला गाव हे सारं हासतंय गाव हे सारं हासतंय हॉ आ हॉ आ हॉ आ हॉ आ बघ बघ बघ सखे कसं गाढव हे नाचतंय * कुठल्या गाण्याच्या चालीत म्हणावे हे माहीती करुन घेण्यासाठी व्यनि करावा.

कंजूस 19/09/2014 - 09:21
एका कोपऱ्यात पडलेल्या डबड्याने उधळलेलं गाढव पाहिलं. मी इकडे पडून आहे असं उधळायला आणि खिंकाळायला मिळालं तर किती मजा येईल? पुढे ---

जेपी 19/09/2014 - 09:46
गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही. मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

सौंदाळा 19/09/2014 - 11:05
संक्षींचा स्ट्राईक रेट निराकार गाढवापेक्षा जास्त आहे. निराकार गाढव : २८ संक्षी : नॉट आउट ४०

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

काउबॉय 19/09/2014 - 12:41
संजय अंकल गाढवाशी स्पर्धा करत नाहीयेत हो. :( किसनद्येव सुधा संजय अंकलना हेच हेच सामजावु पहात आहेत. पण...

दिनेश सायगल 19/09/2014 - 12:02
निराकार गाढव नावाच्या आयडीनं आपले गुर्जी कोण ते आजपर्यंत कवाच सांगितलं नाही. कोण बेचारा एकलव्य आहे कोणजाणे! पण तुम्ही कशाला कोणा गाढवाच्या पाठी काठी घेऊन लागताय! शहाण्यासुरत्या माणसाला हे बरं दिसत नाही. हे सगळं वाचून तेन्नालीराम आणि पंडित व्हायची इच्छा असलेल्या माणसाची कथा मात्र आठवली!

In reply to by हाडक्या

पैसा 20/09/2014 - 01:31
मला तरी बिरबल आणि पंडिताची गोष्ट माहिती आहे. ही तीच का ते माहिती नाही. एका ब्राह्मणाला काही विद्या नव्हती पण आपल्याला सर्वांनी पंडित म्हणावे असे त्याला वाटे. मग तो बिरबलाला भेटला आणि म्हणाला की मला लोकानी पंडित म्हणावेसे वाटते. मग बिरबल म्हणाला की तुला जे पंडित म्हणून हाक मारतील त्याना तू दगड मार. मग बघ काय होते ते. तो ब्राह्मण बाहेर गेल्यावर बिरबलाने त्याच्या गल्लीतल्या लहान मुलांना बोलावून सांगितले की अमूक एक ब्राह्मण आहे त्याच्या मागे पंडित म्हणत धावा आणि मजा बघा. याच्या पुढची गोष्ट सांगायला पाहिजे काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

चला तुमची पण हौस पुरी करतो : एका गावात होती, टोपणे-बुचे अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक आहे असाच पपलू, हा आमच्यात एक |

In reply to by संजय क्षीरसागर

टग्या , भूत , विनम्र , प्रगो , पंत , गिरीजा , मोहीनी , काका इत्यादी माझे ड्यु आयडी आहेत . नोट करुन ठेवा म्हणजे सारखी सारखी गिरीजा ह्या एकाच आयडी वर ठेच लागणार नाही =))

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 19/09/2014 - 13:37
दोघांना आणि त्या निमित्ताने गाढव आदि सर्वच जणांना मनापासून प्रश्न: असे ओरबाडाओरबाडी करण्यात खुद्द स्वत:ला आनंद सुख मिळते का? मनाला लागले म्हणून प्रतिहल्ले होतात ना? स्वत:ला त्रास सोसून इतरांना मजा पाहू देणे यात आनंद आहे का? धागे अप्रकाशित करण्याच्या कामात संपादकांना आनंद वा इंसेंटिव्ह आहे का ? सगळी उत्तरे "नाही" अशी असावीत.. मग हे धागे आणि हिशोब टाळता येणार नाहीत का? बाकी काय बोलणार ?

In reply to by गवि

गणपा 19/09/2014 - 13:44
लोकांच्या 'मनोरंजना'चं व्रत घेतलेल्यांना काय सांगायचं गवि? शब्दाचा मार शहाण्या लोकांसाठी असतो. यातुन कुणी शहाणं झालं तर आनंदच आहे.

In reply to by गवि

नमस्कार गवि काका ! इथे माझं , रादर कोणाचंच संक्षींशी वैयक्तिक भांडण नाहीये . (एक्वेळ तर अशी होती की मी संक्षींच्या लिखाणाचे फॅन होतो , परवा मेल चाळताना माझ्या लक्षात आले ... २००९ मध्ये माझ्या मित्राने मला लिहिलेल्या एका मेल मधे "संक्षी उत्तम लेखन करतात ते आवर्जुन वाच" असा उल्लेख आहे ) पण सध्या संक्षींचा मी एक्की मी , मी दुणे आम्ही , मी त्रिक भास , मी चोक निराकार , मी पंचे सर्वज्ञ हा पाढा लक्षात आल्याने फार हसु येते , मग कोणीतरी निराकार गाढव त्यांना डिवचते अन संक्षी दुर्लक्ष करायचे सोडुन परत मी चा पाढा सुरु करतात , हे सारे पहायला लय मजा येते राव . मग आम्ही कधी कधी त्याला हातभार लावतो =)) तुम्हीही कधीतरी ट्राय करुन पहा , मी चा पाढा लय भारी आघे राव ... आधीचे पाढे वाचयचे असल्यास सांगा लिंका पाठवतो ;) हा प्रतिसाद भास आहे . प्रतिसाद असे काहीच नसते . मी कधीच चुकत नसतो अन आजपर्यंत कोणीच माझ्या मताचे खंडन करु शकले नाहीये . =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 19/09/2014 - 14:25
प्रगोशी सहमत!!!! मीच काय तो सर्वज्ञ असे अ‍ॅटिट्यूड घेतल्यानेच लोकं चेकाळली. एकट्या संक्षीला का टार्गेट करता म्हणण्यापेक्षा तो पाढा बघा म्हणावं अगोदर नीट.

In reply to by गवि

मूळ धागा प्रकाशित होऊन कायम राहणं याचा अर्थ तो धोरणात बसतो असा होतो. थोडक्यात, त्यात काहीही व्यक्तिगत नाही असा निर्वाळा दिला जातो. मग त्यावर प्रत्युत्तर आल्यावर मान्यवरांना झळ पोहोचली की दोन्ही धागे डिलीट होतात (असा मागच्या पोस्टचा अनुभव आहे). तुम्ही सदस्यात डिस्क्रीमिनेट करा असं म्हणणार नाही पण लेट ऑल हॅव अ‍ॅन इक्वल चान्स. जर मूळ धागा `ओरबाडी' वाटत असेल तर तो प्रकाशित व्ह्यायला नको होता. आणि उत्तर देण्यात मला काय आनंद मिळणार? मी फक्त उत्तर देऊ शकतो इतकंच दाखवून दिलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 19/09/2014 - 14:11
म्हणूनच तर माझ्या प्रश्नात गाढवालाही इन्क्लूड केलंय ना. नुसते नियमात बसणे आणि राहणे हा भाग पूर्ण वेगळा आहे. आणि अप्रकाशित होणे हाही भाग एकाच एका फॅक्टरवर अवलंबून नसतो. ते जाऊ दे. मुळात कोणीच असे धागे / प्रतिसाद देण्याविषयी प्रश्न होता.

In reply to by गवि

म्हणजे तुम्ही हाणा आणि मी ऐकून घेऊ? अरे मूळ पोस्ट जर प्रकाशित झाली तर उत्तर येणारच. आणि हे बर्‍याच पूर्वीपासून चालू आहे. मी वर म्हटलंय :
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!)
जर अ‍ॅक्शन घ्यायची असती तर केव्हाच घेतली असती असा कुणाचाही निष्कर्श निघणार नाही का?

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 19/09/2014 - 14:31
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला ,
हे जरा विस्कटून सांगता का ? निराकार गाढव हे जे काही आहे त्याने आपली खिल्ली कशी काय उड़ते ?

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 19/09/2014 - 20:37
एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो. .

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 19/09/2014 - 20:38
एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

एका गावात होती, टोपणे-बुचे http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक ...............http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif आहे असाच पपलू, हा आमच्यात एक | =========== http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif

बॅटमॅन 19/09/2014 - 12:48
बेशर्त स्वीकृती कुठल्या ***च्या **त गेली???????? सॉरी हं निराकारभौ. भाषेतला प्रचलित वाक्प्रचार म्हणून वापरलं, नायतर आम्ही तुमचे लय मोठ्ठे (५ वर फिरणारे) फॅन हाओत. पण निव्वळ काव्यमूल्य पाहिलं तर ठीक आहे =))

In reply to by रामपुरी

प्रतिसाद बघा लेख बघा सगळीकडे "मी"च आहे. "तो मीच"
+१. याच कारणामुळे तर आपल्या गुरूजींना सगळे टार्गेट करत असतात.पण मीपणाचा चष्मा सतत लावल्यामुळे ते त्यांच्या लक्षात येत नाही. ठिक आहे. आपले काय जाते निराकार गाढव आणि गुरूजींमधली जुगलबंदी बघायला? :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तरी म्हटलं बोथट सुरी अजून कसे उगवले नाहीत! कारण माझ्याविरोधात काही लिहीलं गेलंय आणि वेळात वेळ काढून हे आले नाहीत असं अद्यापी कधी झालेलं नाही. बाकी कुठे न का देईना, अशा वेळी ते प्रतिसादाचा हक्क हमखास बजावणार! बाय द वे, `मी' हे मराठीतलं सर्वनाम आहे. तुम्हाला कंटेंटपेक्षा `मी' आला की पुढचं दिसेनासं होतंय बहुदा. तुमच्या प्रश्नाला पहिला प्रतिसाद यथोचित दिला होता (तो सोईस्करपणे सोडून दिलायं). काही हरकत नाही, आता स्वतःबद्दल लिहीतांना, कोणतं सर्वनाम वापरतात ते सांगा. आणि मला एक कळत नाही, एका उपद्रवी आयडीला पाचर बसल्यावर इतरांना इतकी व्याकूळता का येतेयं?

प्रतिसाद वाचणे आणि त्यावर विचार करुन एकमेकांस घायाळ करणारे प्रतिसाद लिहिणे यात किती वेळ जात असेल याची कल्पना केलेली बरी......यातून कोणाला काय आनंद मिळतो हा एक संशोधनाचा विषय ठरावा....सगळ्यांना नम्र विनंती की यात वेळ व बुद्धी वाय घालवू नये..........बघा पटले तर !

In reply to by संजय क्षीरसागर

घडून गेलेल्या घटनांना इतिहास म्हणतात. त्यातून काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने शोधायचे असते. बर्^याच वेळा हे असे घडू नये यासाठीही तपशिलात जाऊन लिखाण करावे लागते. पण जाऊदेत.......क्रौर्याबद्दल कोणाला आकर्षण असेल असे मला वाटत नाही....आता मला पटले की चांगल्या भावनेने काहीही लिहा, तुम्हाला त्यात वाकड्यातच शिरायची भारी हौस आहे....त्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो हे स्पष्ट आहे... हा प्रतिसाद शेवटचा........
गाढव ऐकेना, गाढव समजेना गाढवा उसंत नाही, खिंकाळण्याचे थांबेना. गाढव ऐकेना ऽऽ । _______________________ डकवी अल्बमचे फोटो, शोभा साइटची होई फुकटचा घेतला कुणी गावात रे? काय गाढवाला नै ऐडिया? आयडी जाईल नको गमजा. होईल गोची, ढिंगटांग-ढिंगटांग, ढिंगटांग-ढिंगटांग ढींग । गाढव ऐकेना ऽऽ । ________________________ हे फुकटचे आंगण, आम्हा लाभे जैसे आंदण रे नको पडू उताणा इथे-तिथे रे हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे नको झाडू दुगाण्या नित्य-नेमे रे. आले मालक वाट पाहून, बघते गाढव मागे वळून, कोण तू कुठला? पळाले आप्तजन रे. आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आ ।

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

अन्नू ·

जेपी 05/09/2014 - 16:00
तेचते, हायला बर्याच दिवसांनी मी पयला. (चेपु बंद केलेला) जेपी

आनन्दा 05/09/2014 - 16:08
आवडला.
सध्या ‘जय मल्हार’ सिरिअलमधली म्हाळसा हाय रिसोल्युशनचा टच स्क्रिन मोबाईल (दर्पण) वापरत असल्याचे समजले..
तो आयपॅड आहे हो.

एक ओळीचे धागे काढणा~याना फे,बु पर्वणी आहे..आजच शिक्षक दिना निमित्त " पुणेकर हा जन्मजात स्वयंभू शिक्षक असतो......पुणेकराना वंदन करा" अशी पोस्ट २ समुहावर व भिंतिवर टाकली..१५० च्या वर लाईक१५० च्या आसपास कोमेंट...धमाल येते..

पैसा 05/09/2014 - 21:43
आवडले. आम्ही पण काही भिंतींवर नित्यनेमाने डोकी आपटत असतो!

जेपी 05/09/2014 - 16:00
तेचते, हायला बर्याच दिवसांनी मी पयला. (चेपु बंद केलेला) जेपी

आनन्दा 05/09/2014 - 16:08
आवडला.
सध्या ‘जय मल्हार’ सिरिअलमधली म्हाळसा हाय रिसोल्युशनचा टच स्क्रिन मोबाईल (दर्पण) वापरत असल्याचे समजले..
तो आयपॅड आहे हो.

एक ओळीचे धागे काढणा~याना फे,बु पर्वणी आहे..आजच शिक्षक दिना निमित्त " पुणेकर हा जन्मजात स्वयंभू शिक्षक असतो......पुणेकराना वंदन करा" अशी पोस्ट २ समुहावर व भिंतिवर टाकली..१५० च्या वर लाईक१५० च्या आसपास कोमेंट...धमाल येते..

पैसा 05/09/2014 - 21:43
आवडले. आम्ही पण काही भिंतींवर नित्यनेमाने डोकी आपटत असतो!

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो! फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB ! –यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल

संपादक मंडळ ·

सौंदाळा 04/09/2014 - 14:13
'विजेत्यांचे अभिनंदन आणि परिक्षकांचे आभार' म्हणुन मी माझे २ शब्द संपवतो. विजेते फोटो याच भागात परत असते तर मजा आली असती असे वाटते. किंवा आधीच्या धाग्याची लिंक तरी ईकडे असु देत म्हणजे भविष्यात खोद्काम करायला बरे पडेल :)

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. प्रत्येक विजेत्याच्या नांवा पुढे त्याचे विजयी छायाचित्र टाकले असते तर ते नक्कीच उचीत ठरले असते. पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं. असे केल्याने मतदात्यांच्या मनावर स्पर्धकांच्या नांवाचा भला-बुरा प्रभाव असणार नाही आणि मतदान 'छायाचित्रालाच' होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

नंदन 04/09/2014 - 14:48
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं.
सहमत आहे. कौलाच्या व्यवस्थेप्रमाणे मतदान घेता येईल का?

In reply to by नंदन

शिद 04/09/2014 - 14:59
असेच म्हणतो. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by शिद

आतिवास 04/09/2014 - 15:19
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने अप्रतिम फोटो पाहायला मिळाले आणि बरंच शिकता आलं याबद्दल 'मिपा' आणि सहभागी 'मिपाकरांचे' आभार.

मृत्युन्जय 04/09/2014 - 15:20
३ पैक्की २ क्रमांक माझ्या क्रमांकाशी अगदी जुळले :). अगदी त्याच नंबरात. वेल्लाभट यांच्या छायाचित्राला पारितोषिक न मिळाल्याचे बघुन थोडे आश्चर्य वाटले. पण अर्थात समर्पक यांचेही छायाचित्र उत्तमच होते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन

पैसा 04/09/2014 - 16:03
सर्वच विजेते आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन! ही चित्रे आता पाहताना एक गोष्ट सहजच लक्षात आली की तिन्ही चित्रांत अंतराची कल्पना काही प्रमाणात येत आहे. इथे काहीजणांनी छायाचित्रकारांची नावे दिसू नयेत अशी सूचना केली आहे. आदर्श परिस्थितीत ते तसे करता येईल. मात्र सध्या इतका वेळ देणे कोणाच संपादकाला वैयक्तिक रीत्या शक्य नाही. दिवाळी अंकाचेही काम आहे. पहिल्या धाग्यात सगळी छायाचित्रे पुन्हा कॉपी पेस्ट करून धागा तयार करावा लागला होता. ते वाचवण्यासाठी आता फक्त चित्रांचा एक आणि प्रतिक्रियांचा एक असे २ धागे करूया अशी कल्पना अंमलात आणली आहे. माझे वैयक्तिक मत विचाराल तर छायाचित्रे चित्रकाराच्या नावाने देण्यात फार काही बिघडते असे नव्हे. आताही मत देणार्‍यांवर ओळखीचा काही परिणाम झाला आहे असे वाटत नाही. त्यामुळे Kohalea आणि समर्पक या रोज रोज न दिसणार्‍या/नवीन आयडींची चित्रे एक व दोन क्रमांकावर आली आहेत. (समर्पकची सुरेख लेखमालिका चालू आहे हे मी विसरलेले नाहीये! :D) त्यातूनही इतरांना आपले मत कळू नये असे वाटल्यास सदस्य व्यनि करू शकताच. म्हणजे छायाचित्रे निनावी देण्यापेक्षा मते निनावी राहतील. फारसा फरक पडत नाही. यावेळीही ७ जणांनी आपापली मते व्यनि ने दिली आहेत. मिपा सदस्य नि:पक्षपातीपणे मते देतात यावर माझा विश्वास आहे, आणि तो बहुतांशी सार्थ ठरला आहे. मात्र संपादक मंडळात या सूचनेवर पुढच्या स्पर्धेपर्यंत अवश्य विचार होईल. आणि शक्य असेल, बहुमताचा निर्णय असेल तर नियम बदलले जातीलच! तोपर्यंत पुढच्या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

वेल्लाभट 04/09/2014 - 16:30
उत्तमोत्तम छायाचित्र बघण्याची, त्यातून शिकण्याची संधी मिपाने उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मिपा संपादकांना सलाम. जी जबर छायाचित्र इथे विजयी ठरली आहेत त्यांच्यासाठी टाळ्या! आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा ! जय कॅमेरा ! जय क्लिक !

सर्वसाक्षी 04/09/2014 - 17:33
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचेही अभिनंदन. अनेक सुरेख चित्रे पाहायला मिळाली. नव्या स्पर्धेचा विषय फारच कल्पक आहे.

जुइ 04/09/2014 - 20:04
सर्व विजेत्यांचे हार्दि़क अभिनंदन!! संपादक मंडळ आणि मिपाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्द्ल आभार! सर्व सहभागी स्पर्धाकांचे ही आभार खुप छान फोटो टाकल्याबद्दल.

In reply to by जुइ

एस 04/09/2014 - 20:18
अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त यशस्वी ठरलेली स्पर्धा! संपादकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल खास आभार. सर्व छायाचित्रकारांचे आणि प्रतिसादकांचेही आभार!

In reply to by प्यारे१

मी ही तेच म्हाणतो वेळात वेळ काढुन हि स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. विजेत्यांचे अभिनंदन.

कवितानागेश 04/09/2014 - 21:05
पहिल्या क्रमाम्काचं चित्र खरोखरच फार सुंदर आहे. मी ते पहिल्यांदा पाहिल्यापासून चोरलंय आणि डेस्कटॉपवर लावलंय. :) त्यातले आकाश, पाणी, डोन्गरकडा आणि पूल हे सर्व एक्मेकांत अगदी सहज मिसळून गेलंय.

प्यारे१ 04/09/2014 - 21:05
पण मुलांनो ;) एक लक्षात आलं का? तिन्ही पारितोषिक प्राप्त छायाचित्रांमध्ये कुठून तरी कुठं तरी जाण्याचा मार्ग आहे, गतिमानता आहे, थंडपणा नाही. कदाचित मिपाचं उत्साहाचं गतिशील हॅपनिंग प्रतिबिंबच दिसतंय म्हणा ना! - प्यारेण दवणे

सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रण दिवसाच्या शुभेच्छा!! आजपासून तीन वर्षांपूर्वी मिपावर छायाचित्रणकला स्पर्धा हा उपक्रम सुरु झाला होता. आजही 'छायाचित्रणकला स्पर्धा' या दोन शब्दांनी इमेज सर्च केल्यास केवळ मिपावरच्या धाग्यांमधले फोटो दिसतात :-) . सोळा महिन्यांपूर्वी मिपावरची सतरावी छायाचित्रणकला स्पर्धा पार पडली. या लोकप्रिय उपक्रमाचे पुनुरुज्जीवन करावे ही विनंती मी साहित्य संपादकांना करतो. या दिवसानिमित्त छायाचित्रणाशी संबंधीत मी काढलेला एक फोटो तसेच आजचा बिंगच्या होमपेजवरचा फोटो हे स्थळ आहे St. Andrews Bay, South Georgia (अर्जेंटिना व अंटार्क्टिकादरम्यानचे एक बेट).

In reply to by श्रीरंग_जोशी

+१ गेल्या स्पर्धांच्या त्सुनामीनंतर (हघ्याहेवेसांन) खूप वेळ केवळ ओहोटी आहे. एक मस्तं स्पर्धा आयोजित करून मिपाकरांमध्ये चैतन्य जागवायची वेळ झाली आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 20/08/2017 - 04:18
श्रीगणेश लेखमाला झाली की एक स्पर्धा घेऊयात दिवाळी अंकाआधी.

सौंदाळा 04/09/2014 - 14:13
'विजेत्यांचे अभिनंदन आणि परिक्षकांचे आभार' म्हणुन मी माझे २ शब्द संपवतो. विजेते फोटो याच भागात परत असते तर मजा आली असती असे वाटते. किंवा आधीच्या धाग्याची लिंक तरी ईकडे असु देत म्हणजे भविष्यात खोद्काम करायला बरे पडेल :)

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. प्रत्येक विजेत्याच्या नांवा पुढे त्याचे विजयी छायाचित्र टाकले असते तर ते नक्कीच उचीत ठरले असते. पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं. असे केल्याने मतदात्यांच्या मनावर स्पर्धकांच्या नांवाचा भला-बुरा प्रभाव असणार नाही आणि मतदान 'छायाचित्रालाच' होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

नंदन 04/09/2014 - 14:48
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं.
सहमत आहे. कौलाच्या व्यवस्थेप्रमाणे मतदान घेता येईल का?

In reply to by नंदन

शिद 04/09/2014 - 14:59
असेच म्हणतो. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by शिद

आतिवास 04/09/2014 - 15:19
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने अप्रतिम फोटो पाहायला मिळाले आणि बरंच शिकता आलं याबद्दल 'मिपा' आणि सहभागी 'मिपाकरांचे' आभार.

मृत्युन्जय 04/09/2014 - 15:20
३ पैक्की २ क्रमांक माझ्या क्रमांकाशी अगदी जुळले :). अगदी त्याच नंबरात. वेल्लाभट यांच्या छायाचित्राला पारितोषिक न मिळाल्याचे बघुन थोडे आश्चर्य वाटले. पण अर्थात समर्पक यांचेही छायाचित्र उत्तमच होते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन

पैसा 04/09/2014 - 16:03
सर्वच विजेते आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन! ही चित्रे आता पाहताना एक गोष्ट सहजच लक्षात आली की तिन्ही चित्रांत अंतराची कल्पना काही प्रमाणात येत आहे. इथे काहीजणांनी छायाचित्रकारांची नावे दिसू नयेत अशी सूचना केली आहे. आदर्श परिस्थितीत ते तसे करता येईल. मात्र सध्या इतका वेळ देणे कोणाच संपादकाला वैयक्तिक रीत्या शक्य नाही. दिवाळी अंकाचेही काम आहे. पहिल्या धाग्यात सगळी छायाचित्रे पुन्हा कॉपी पेस्ट करून धागा तयार करावा लागला होता. ते वाचवण्यासाठी आता फक्त चित्रांचा एक आणि प्रतिक्रियांचा एक असे २ धागे करूया अशी कल्पना अंमलात आणली आहे. माझे वैयक्तिक मत विचाराल तर छायाचित्रे चित्रकाराच्या नावाने देण्यात फार काही बिघडते असे नव्हे. आताही मत देणार्‍यांवर ओळखीचा काही परिणाम झाला आहे असे वाटत नाही. त्यामुळे Kohalea आणि समर्पक या रोज रोज न दिसणार्‍या/नवीन आयडींची चित्रे एक व दोन क्रमांकावर आली आहेत. (समर्पकची सुरेख लेखमालिका चालू आहे हे मी विसरलेले नाहीये! :D) त्यातूनही इतरांना आपले मत कळू नये असे वाटल्यास सदस्य व्यनि करू शकताच. म्हणजे छायाचित्रे निनावी देण्यापेक्षा मते निनावी राहतील. फारसा फरक पडत नाही. यावेळीही ७ जणांनी आपापली मते व्यनि ने दिली आहेत. मिपा सदस्य नि:पक्षपातीपणे मते देतात यावर माझा विश्वास आहे, आणि तो बहुतांशी सार्थ ठरला आहे. मात्र संपादक मंडळात या सूचनेवर पुढच्या स्पर्धेपर्यंत अवश्य विचार होईल. आणि शक्य असेल, बहुमताचा निर्णय असेल तर नियम बदलले जातीलच! तोपर्यंत पुढच्या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

वेल्लाभट 04/09/2014 - 16:30
उत्तमोत्तम छायाचित्र बघण्याची, त्यातून शिकण्याची संधी मिपाने उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मिपा संपादकांना सलाम. जी जबर छायाचित्र इथे विजयी ठरली आहेत त्यांच्यासाठी टाळ्या! आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा ! जय कॅमेरा ! जय क्लिक !

सर्वसाक्षी 04/09/2014 - 17:33
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचेही अभिनंदन. अनेक सुरेख चित्रे पाहायला मिळाली. नव्या स्पर्धेचा विषय फारच कल्पक आहे.

जुइ 04/09/2014 - 20:04
सर्व विजेत्यांचे हार्दि़क अभिनंदन!! संपादक मंडळ आणि मिपाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्द्ल आभार! सर्व सहभागी स्पर्धाकांचे ही आभार खुप छान फोटो टाकल्याबद्दल.

In reply to by जुइ

एस 04/09/2014 - 20:18
अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त यशस्वी ठरलेली स्पर्धा! संपादकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल खास आभार. सर्व छायाचित्रकारांचे आणि प्रतिसादकांचेही आभार!

In reply to by प्यारे१

मी ही तेच म्हाणतो वेळात वेळ काढुन हि स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. विजेत्यांचे अभिनंदन.

कवितानागेश 04/09/2014 - 21:05
पहिल्या क्रमाम्काचं चित्र खरोखरच फार सुंदर आहे. मी ते पहिल्यांदा पाहिल्यापासून चोरलंय आणि डेस्कटॉपवर लावलंय. :) त्यातले आकाश, पाणी, डोन्गरकडा आणि पूल हे सर्व एक्मेकांत अगदी सहज मिसळून गेलंय.

प्यारे१ 04/09/2014 - 21:05
पण मुलांनो ;) एक लक्षात आलं का? तिन्ही पारितोषिक प्राप्त छायाचित्रांमध्ये कुठून तरी कुठं तरी जाण्याचा मार्ग आहे, गतिमानता आहे, थंडपणा नाही. कदाचित मिपाचं उत्साहाचं गतिशील हॅपनिंग प्रतिबिंबच दिसतंय म्हणा ना! - प्यारेण दवणे

सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रण दिवसाच्या शुभेच्छा!! आजपासून तीन वर्षांपूर्वी मिपावर छायाचित्रणकला स्पर्धा हा उपक्रम सुरु झाला होता. आजही 'छायाचित्रणकला स्पर्धा' या दोन शब्दांनी इमेज सर्च केल्यास केवळ मिपावरच्या धाग्यांमधले फोटो दिसतात :-) . सोळा महिन्यांपूर्वी मिपावरची सतरावी छायाचित्रणकला स्पर्धा पार पडली. या लोकप्रिय उपक्रमाचे पुनुरुज्जीवन करावे ही विनंती मी साहित्य संपादकांना करतो. या दिवसानिमित्त छायाचित्रणाशी संबंधीत मी काढलेला एक फोटो तसेच आजचा बिंगच्या होमपेजवरचा फोटो हे स्थळ आहे St. Andrews Bay, South Georgia (अर्जेंटिना व अंटार्क्टिकादरम्यानचे एक बेट).

In reply to by श्रीरंग_जोशी

+१ गेल्या स्पर्धांच्या त्सुनामीनंतर (हघ्याहेवेसांन) खूप वेळ केवळ ओहोटी आहे. एक मस्तं स्पर्धा आयोजित करून मिपाकरांमध्ये चैतन्य जागवायची वेळ झाली आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 20/08/2017 - 04:18
श्रीगणेश लेखमाला झाली की एक स्पर्धा घेऊयात दिवाळी अंकाआधी.
छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य ********************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसद देऊन यशस्वी करण्यात तुमचा सर्वांचा हातभार लागला आहे. आलेली सर्वच छायाचित्रे अतिशय सुरेख होती आणि डावे-उजवे करणे फारच कठीण. म्हणूनच सर्व सदस्यांना चित्रे निवडायची विनंती केली होती. एकूण २८ स्पर्धकांची ७९ छायाचित्रे आली. निकाल लावताना ४० सदस्यांनी आपल्या पसंतीची चित्रे निवडली.

आळस

वडापाव ·

कवितानागेश 02/09/2014 - 23:42
माझा एक मित्र म्ह्णतो, 'आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं सांगतात. पण माझा तर बाबा मित्रच आहे! मला फार आवडतो. नेहमी माझ्यासोबत असतो. कध्धी मला सोडून जात नाही.' ;)

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ 03/09/2014 - 12:17
खरे आहे आळस हा मोठ्ठा शत्रु आहे. पण गांधी म्हणायचे शत्रुवरही प्रेम करा. त्यामुळे या शत्रुवर माझे प्रेम आहे

In reply to by प्यारे१

सोत्रि 03/09/2014 - 00:38
आराम हा राम आहे.
हे असं ते तुमच्या (पक्षी: तुमच्या पिढ्यांमधे कोणाच्यातरी) कानात बोलले होते का? - (छिद्रान्वेषी) सोकाजी

कवितानागेश 03/09/2014 - 09:43
मी वर पाण्चटपणा उगीच केलाय. (सवयीनी) पण जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो.>> हे अगदी पटतंय. :)

बॅटमॅन 03/09/2014 - 12:23
खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे.
एकच नंबर!!!! पण एका कवीने म्हटलेय त्याप्रमाणे या जन्मावर, या आळसावर, शतदा प्रेम करावे. म्हणून मी आळसावर प्रेम करतो.

समीरसूर 03/09/2014 - 12:26
अगदी बरोबर विचार! कृती श्रेष्ठच असते. ती चुकली तरी शिकवून जाते. कृतीशून्यता माणसाला मूढ बनवते. विचार पटले.

कवितानागेश 02/09/2014 - 23:42
माझा एक मित्र म्ह्णतो, 'आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं सांगतात. पण माझा तर बाबा मित्रच आहे! मला फार आवडतो. नेहमी माझ्यासोबत असतो. कध्धी मला सोडून जात नाही.' ;)

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ 03/09/2014 - 12:17
खरे आहे आळस हा मोठ्ठा शत्रु आहे. पण गांधी म्हणायचे शत्रुवरही प्रेम करा. त्यामुळे या शत्रुवर माझे प्रेम आहे

In reply to by प्यारे१

सोत्रि 03/09/2014 - 00:38
आराम हा राम आहे.
हे असं ते तुमच्या (पक्षी: तुमच्या पिढ्यांमधे कोणाच्यातरी) कानात बोलले होते का? - (छिद्रान्वेषी) सोकाजी

कवितानागेश 03/09/2014 - 09:43
मी वर पाण्चटपणा उगीच केलाय. (सवयीनी) पण जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो.>> हे अगदी पटतंय. :)

बॅटमॅन 03/09/2014 - 12:23
खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे.
एकच नंबर!!!! पण एका कवीने म्हटलेय त्याप्रमाणे या जन्मावर, या आळसावर, शतदा प्रेम करावे. म्हणून मी आळसावर प्रेम करतो.

समीरसूर 03/09/2014 - 12:26
अगदी बरोबर विचार! कृती श्रेष्ठच असते. ती चुकली तरी शिकवून जाते. कृतीशून्यता माणसाला मूढ बनवते. विचार पटले.
मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा. माणूस सतत धावत असतो, पळत असतो. समोरची ट्रेन सुटली आणि तिच्यानंतर अजून एक ट्रेन येणार असली तरी मनातून एक आवाज उमटतो जो ओरडून ओरडून आपल्याला ती सुटणारी ट्रेन पकडायला सांगतो, आणि मग आपण जीवाची पर्वा न करता ती ट्रेन पकडायला धावत सुटतो. का? कारण समोर दिसणारी संधी सोडायला मन कधीच धजावत नाही. मनाला अनुभवाची भूक असते आणि प्रत्येक अनुभव एक वेगळीच शिकवण देऊन जात असतो. ही भूक भागवायची, वाढवायची प्रत्येक संधी मन हेरत असतं. आपल्याला मागे धरून ठेवतो तो शिकण्याचा आळस.

रनिंग फ़्रॉम लिंचींग

मारवा ·

स्पंदना 02/09/2014 - 04:12
किती भयानक! किती घाणेरडी विचारसरणी. मला दुसर्‍याचा छळ करुन सुख भोगणे ही कल्पनाच उमजत नाही.

एस 03/09/2014 - 13:01
त्यातले क्रौर्य अंगावर काटा आणणारे आहे. त्याहुन शॉकींग म्हणजे त्या काळातील त्या विशीष्ट समाजाचा या सर्व प्रकाराला असणारा पाठींबा व या प्रकाराला ते कीती सहजतेने व नॉर्मल ट्रीट करीत असत हे बघुन आश्चर्य वाटते.
मानवी समाजातल्या अशा विकृती पूर्णपणे संपल्या आहेत असे अजूनही म्हणता येत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. तूर्तास लेखाबद्दल आणि 'रुट्स' या कादंबरीच्या ओळखीबद्दल धन्यवाद.

पैसा 03/09/2014 - 17:17
रूट्स वाचायची आहे. माणसाने माणसाला गुलाम करणे हेच फार भयानक आहे.

In reply to by पैसा

नक्की वाचा... भयानक पुस्तक आहे.मी सहज म्हणून वाचायला घेतली आणि पुर्ण रात्र वाचत बसलो होतो.दुसर्‍या दिवशी कामावर पण गेलो नाही.

स्पंदना 02/09/2014 - 04:12
किती भयानक! किती घाणेरडी विचारसरणी. मला दुसर्‍याचा छळ करुन सुख भोगणे ही कल्पनाच उमजत नाही.

एस 03/09/2014 - 13:01
त्यातले क्रौर्य अंगावर काटा आणणारे आहे. त्याहुन शॉकींग म्हणजे त्या काळातील त्या विशीष्ट समाजाचा या सर्व प्रकाराला असणारा पाठींबा व या प्रकाराला ते कीती सहजतेने व नॉर्मल ट्रीट करीत असत हे बघुन आश्चर्य वाटते.
मानवी समाजातल्या अशा विकृती पूर्णपणे संपल्या आहेत असे अजूनही म्हणता येत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. तूर्तास लेखाबद्दल आणि 'रुट्स' या कादंबरीच्या ओळखीबद्दल धन्यवाद.

पैसा 03/09/2014 - 17:17
रूट्स वाचायची आहे. माणसाने माणसाला गुलाम करणे हेच फार भयानक आहे.

In reply to by पैसा

नक्की वाचा... भयानक पुस्तक आहे.मी सहज म्हणून वाचायला घेतली आणि पुर्ण रात्र वाचत बसलो होतो.दुसर्‍या दिवशी कामावर पण गेलो नाही.
१२ डीसेंबर १७१२ हा दिवस व्हर्जीनीयातील जंटलमेन्स साठी फ़ार महत्वाचा होता. कारण त्यांच्याइतकाच जेंटल (इंग्रजी तील ) असणारा मॅन Willie Lynch त्यांना त्याच्या मेहनतीने व कल्पकतेने डेव्हलप केलेली. गुलाम बनविण्याची रेसीपी शेअर करायला येणार होता. हा पाहुणा दयाळु इश्वराचा अर्थातच मोठा भक्त होता राजा जेम्स ची ही त्याने आवर्जुन आठवण भाषणाच्या सुरुवातीला च काढली. (बायबल वाला जेम्स ) प्राचीन रोमन्स ही माझ्या गुलाम बनविण्याच्या मेथड चा हेवा करतील हे ही ठणकावुन सांगुन भाषणाला सुरुवात केली. या भाषणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे बघा लिंच ची अप्रतिम इंग्रजी भाषा. अतिशय आखीव रेखीव अत्यंत नीटनेटकी.