मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

निवडणूका जवळ आल्या सारखे वाटतंय

निलरंजन ·
लेखनविषय:
काव्यरस
निवडणूका जवळ आल्यासारखे वाटतंय गरीबांची कणव करणारे गल्लोगल्लीत जमलेयं कैवारी जो तो जनतेचा बनू पाहतोय पोटात एक ओठात एक अन मनात काही वेगळच साचलयं पोस्टर फलक बोर्ड नाक्यानाक्यावर लागलेत इच्छुक आणि समर्थक आता आपले घोडे दामटू लागलेत निवडून येण्याची स्वप्न आता घडोघडी पडू लागल्यात जिकण्यासाठीचा हिशेब जे ते ठेवू लागलेत उमेदवारीच्या खेळात आता वजन आपले लावू लागलेत हा आपला हा परका डाव पुन्हा नव्याने मांडू लागलेत आपआपला सवतासुभा मतदार आपले राखू लागलेत मिटींगा मेऴावे भाषण सभा चौकाचौकात घडू लागलेत म्हणूनच म्हणतो निवडणूका जवळ येऊ लागल्यात

मोरारजी देसाई ; स.का. पाटील आणि फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर.

मिट्ट

विकास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या महीन्यापासून बघण्याचे डोक्यात असलेला एक माहितीपट बघायची संधी मिळाली... भारतीय निवडणुकांच्या हंगामात अमेरीकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एका राजकारण्याच्या व्यक्तीगत वर्तनाची एक झलक बघताना नकळत तुलना होते. अर्थात येथे कुठे कुणाला आदर्श समजत नसून आपण कुठले वर्तन मिस करत आहोत इतकेच डोक्यात येते... त्या माहितीपटाचे नाव आहे MITT. अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार मिट्ट रॉमनी यांच्यावरील हा वेगळ्याच पद्धतीने घेतलेला माहितीपट आहे. २००६ साली सर्वप्रथम मिट्ट रॉमनी यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले.

शिवरायांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने... मित्रांनो

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाचे संस्मरण सकाळ मधील अप्रतीम लेखाने या झाले. महाराजांच्या रयतेसाठी मनात असलेल्या सुयोग्य शासनाच्या संकल्पना साकार करायला आपल्याा सारख्या इतिहास संशोधकाने विविध प्रकारे प्रेरणा द्यावी. ही विनंती. काही वर्षांपूर्वी प्रताप गडावरील भेट व चर्चा यांच्या आठवणी ताज्या झाल्या. विंगकमांडर शशिकांत ओक. ... असे तिथे दिलेल्या प्रतिसादातून म्हटले आहे...

मिस्टर प्रामाणिक

तिमा ·
मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं? मग ते वाकवले, मोडले तर एवढी बोंबाबोंब का करायची ?

उध्वस्त इराक

सुधीर मुतालीक ·
२००३ सालच्या १९ मार्च रोजी भल्या पहाटे अमेरिकी विमानांनी बघदादवर आग ओकायला सुरुवात केली आणि २१ दिवसात बघदाद वर संपूर्ण ताबाही मिळवला! २००३ च्या मे महिन्यात युद्ध संपले, पुढे सात महिन्यांनी लपून बसलेला सद्दाम सापडला,३० डिसेंबर २००६ च्या सकाळी सहा वाजता सद्दामला दीडशे शियांची निर्घुण कत्तल केल्याच्या आरोपावरून फासावर लटकवलं. जल्लोष झाला, आता इराकचे प्रश्न सुटले या विषयावर जगातल्या दिग्गज नेत्यांची भाषणे झाली.

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला - झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

माहितगार ·
काव्यरस
तू मोजल्या होत्या तारा नभांतल्या मी-ना वेचले हिरेमोती त्यातऱ्हा आरोपातल्या भूलवतात त्या अजूनी भेटी खणातल्या जाणोनिया मानवी मतांची चांदीकेली अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या जाऊ कसा निघोनी पाऊल अडखळे जनी-मी मलंग व्यवहार देही भावनांचे पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या तळटीप : नमस्कार हे उघड्या पुन्हा जहाल्या या उमाकांत काणेकर लिखीत गीताचे विडंबन आहे. हे विडबंन सुचण्यासाठी पळसाला पाने तीनच या मि.पा.

आपल्याला सगळं कसं,साधं सोपं पाहिजे …

घन निल ·
राज्य करणारे करतात निषेध… पण सैनिक मात्र ,जीवानिशी जतो … शहीद होणं , हुतात्मा होणं म्हणजे नेमक काय ? शेवटी मृत्यूच तो …. नाही का ? मग आपण सजवतो त्यांची प्रेतं … गुंडाळतो आपल्या तिरंग्यात …. आणि जमलंच, तर थोडा संताप व्यक्त करत जोडतो आपले हात … आदरा खातर … मरताना खरंच ,त्याला वेदना झाल्या असतील का हो? आपला गाव,आई-बाप ,मित्राची हाक,बायकोचं हसू छकुलीचं रुसू … यातलं काही आठवलं असेल ? खरं खरं सांगा … कि सांगून टाकू , हसत हसत शहीद झाला तो … ? ऐका माझं ,आपण असंच करु.… तिरंग्यात गुंडाळून आणु ….

प्रचाराची रणधुमाळी

सचीन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२०१४ च्या लोकसभा निवडणुका आता ४ महिन्यांवर आल्यात. सर्व पक्षात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचे पारडे सारखे खाली वर होत आहे. ह्या निवडणुकींचा निकाल काय लागेल ह्याबाबत साऱ्या देशात उत्सुकता आहे.कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? आप ह्या निवडणुकीत काय चमत्कार घडवेल? तिसरी आघाडी सत्तेवर येईल का?

पँथर गेला !

मारकुटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Namdeo-dhasal/articleshow/28815069.cms दलित चळवळीतील आक्रमक नेतृत्वाला भावपूर्ण श्रध्दांजली!!