राजकारण

शरद जोशी पुन्हा रणांगणात उतरणार!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
14 Jul 2014 - 2:34 pm

शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत

             दिनांक १० जुलै २०१४ ला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत देशातील एकूण राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेची बलस्थाने असलेल्या काही मोजक्या जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sharad Joshi

राजकारणबातमी

पुन्हा ५ रुपयात जेवण!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
6 Jul 2014 - 6:36 am

कुठलाही पक्ष सत्तेवर बसला की आपोआप माजोरडा बनून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मनोभावे करू लागतो असे वाटू लागले आहे. अच्छे दिन येतील तेव्हा येतील. तूर्तास महागाई, दुष्काळ, अन्नटंचाई ह्या गोष्टी अक्राळविक्राळ रुप धारण करत असताना भाजपाच्या एका मस्तवाल नेत्याने, आशिष शेलारने असे विधान केले की मुंबईत ५ रू. मधे पोट भरता येते आणि ५००० रु. मधेही भरता येते.

महाराष्ट्रवादी पक्षांचे स्वबळाचे तुणतुणे

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in काथ्याकूट
4 Jul 2014 - 8:24 pm

च्यामारी महाराष्ट्रात दररोज एक एक जण नुसत्या दंडाच्या बेटक्या दाखवतायेत,्खरच एकदा होवुन जावुद्या खडाखडी,पाचही पक्षांना एकमेकांची लायकी तरी कळेल.(अवांतर -आप नावाच्या पक्षाला व इतर चिल्लर मंडळी यांना आम्ही महाराष्ट्रवादी पक्ष मानत नाही त्यामुळे त्यांच्या निष्टावंतानी पोटशुल करुन घेवु नये)

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
20 Jun 2014 - 6:37 pm

आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे. आणि त्यांचा हा नवा नाट्यप्रवेश नेहेमीप्रमाणे जनतेपर्यंत नेण्याचे 'बहुतही क्रांतीकारी' काम अर्थातच केले आहे मिडीयातील एकमेव KCHP (केजरी सर्टिफाईड ऑनेस्ट पर्सन [या सर्टिफिकेशनसाठी देणगीसह भेटा अथवा लिहा.....]) पुण्यप्रसून वाजपेयी यांनी.

समाजराजकारणप्रकटनमाध्यमवेध

महाराष्ट्रातील पाणि व्यवस्थापन आणि सिंचनाच्या समस्यांचा मान्सून

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
16 Jun 2014 - 11:37 am

गोदावरी नदीचा इतिहास अभ्यासताना गौतम ऋषिंनी गोदावरीचा प्रवाह महाराष्ट्रात आणण्यापुर्वी म्हणे २१ दुष्काळ पडले हि झाली आख्यायीका, पण नवीनतम हवामान पुरातत्व संशोधनांनुसार भारतातील दुष्काळांचा इतिहासही सिंधू संस्कृती इतकाच जुना म्हणजे चार साडे चार हजार वर्षे पर्यंत मागे जातो आहे असे दिसते; हा झाला प्राचीन इतिहास. अलिकडच्या इतिहासाकडे पाहीलतरी आधून मधून दुष्काळ हे महाराष्ट्राच्या पाचवीला नेहमीच पुजलेले.

गोपिनाथ मुंडे

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
3 Jun 2014 - 9:12 am

Munde

भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले.

स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...

त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...

राजकारणप्रतिक्रिया

महाभारत

निलरंजन's picture
निलरंजन in जे न देखे रवी...
31 May 2014 - 12:16 am

हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे परकीयांपेक्षा स्वकीयांची भीती जास्त वाटते,
जगण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागते,
छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार
झगडावे लागते,

हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे नीतीमत्तेची रोजच होळी केली जातेय,
जातीच्या धर्माच्या आधारावर उचनीच ठरवले जातेय,
तरी जो तत्वांना जागतो त्याला षंढ ठरवले जातेय,

हे जीवन एक महाभारत झालेय हे भाऊ !!
इथे स्वार्थासाठी जो तो हपापलाय,
माझे माझे करताना परिवार माञ विसरलाय,
दूरदूरवर पसरलाय अन्याय,
न्याय माञ कुठेतरी हरवलाय,

संस्कृतीसमाजजीवनमानराजकारण

राजजामातांचे विमान जमिनीवर येणार ?

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
30 May 2014 - 8:18 pm

गांधी घराण्याचा आणि पर्यायाने देशाचा जावई असणारे श्रीमंत राबर्ट वदराजी सोनियाजींच्या राज्यात एखाद्या राज्याप्रमाणेच वावरत असत. त्यांच्याकरता खास अशी योजना होती की सामान्यांना लागू असणारी सुरक्षा तपासणी त्यांना लागत नसे. तसे बोर्ड तमाम भारतीय विमानतळावर होते. बाकी मंडळी ज्यांना अशी सवलत असते त्यांना विशिष्ट पदाकरता असते. त्यामुळे ह्या बोर्डावर त्या पदाचा उल्लेख असे. म्हणजे माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री वगैरे. केवळ राजजामातांचा उल्लेख निव्वळ नावाने होत असे.