राजकारण

कर्त्याचे उत्तरदायित्व

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
5 Feb 2015 - 9:14 am

पंतप्रधान महोदय, सादर प्रणाम,

(हे पत्र २०१२ साली, तत्कालीन पंतप्रधान श्री.मनमोहनसिंग ह्यांना उद्देशून लिहिलेले असले तरी आजही ते संदर्भहीन झाले आहे असे नाही. वाचून सांगा की, याबाबत आपण काय म्हणता?)

समाजजीवनमानराहणीराजकारणप्रकटनविचारमतशिफारस

कर्सिव का टचपॅड ?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
3 Feb 2015 - 6:06 pm

फिनलंडमधील पुढील शैक्षणिक वर्षापासून, कर्सिव हस्तलिपी (cursive handwriting) हा शैक्षणिक घटक, बाद होणार असून, त्याजागी शाळांना (किबोर्ड/टचपॅड वर ) टेक-टायपिंग चा पर्याय देण्यात येणार आहे. हा बदल अमेरिकेतील काही राज्यांनी त्यांच्या शैक्षणिक 'मध्यवर्ती मूल्यात'(core-values) मधे केलेल्या बदलामागोमाग फिनलंडमध्येसुद्धा येवू घातला आहे. शैक्षणिक मंडळाने सुचवलेला हा बदल, अधिकृतपणे २०१५ च्या शरदऋतूपासून कदाचित अमलात येईल असा अंदाज आहे. 'उत्कृष्ठ टायपिंग हे राष्ट्रीय उत्पादकता कौशल्यांचा ऐक महत्वाचा घटक आहे', असा, काही शैक्षणिक मंडळांच्या सदस्यांचा विश्वास आहे.

देश कसा बुडवावा

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
2 Feb 2015 - 4:19 pm

देश कसा बुडवावा, तुला ऐकायचं होतं ना
ऐक, फार काही करावं लागत नाही मित्रा
देशनिंदा अतिशय सोपी गोष्ट आहे
देशभक्ती आचरटपणा
आ़णि द्रोह करणं फ्याशन आहे

तत्परतेने शत्रूची बोट उडवली रे उडवली
की सैन्यदलांना नावे ठेव
जाब विचार, साधे स्मगलर हो ते
दहशतवादी नाहीच्चेत मुळी, अशी कशी उडवली?
बघ, देश बुडतो की नाही

इतिहासमुक्तकसमाजजीवनमानराजकारण

टोपणनाव

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
30 Jan 2015 - 12:39 pm

नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ?

कोण जिंकणार दिल्ली?

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
29 Jan 2015 - 8:43 pm

अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते.

शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी?

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in काथ्याकूट
25 Jan 2015 - 11:10 am

मित्रहो, बेळगाव प्रश्न या विषयावर इथे पूर्वी चर्चा झालेली असणार यात तिळमात्र संदेह नाही. परंतु मला या भांडणाचा उलगडा अद्याप झालेला नाही, म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतो.

बहुतांश आयुष्य महाराष्ट्राबाहेर (जरी भारतातच) काढलेले असल्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न हा मला एक निरुद्योगी (किंवा मतलबी) लोकानी जाणूनबुजून धुमसत ठेवलेला मुद्दा वाटतो. याची कारणे खालीलप्रमाणे:

स्वच्छ भारत अभियान की पब्लिसीटी स्टंट ??

Sanjay Kokare's picture
Sanjay Kokare in जनातलं, मनातलं
23 Jan 2015 - 3:57 pm

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे.

राजकारणलेख

पोरगीपटाव शास्त्रानंतर...

जेम्स बॉन्ड ००७'s picture
जेम्स बॉन्ड ००७ in काथ्याकूट
22 Jan 2015 - 3:49 pm

पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे?

(सोबती)

स्वप्नज's picture
स्वप्नज in जे न देखे रवी...
22 Jan 2015 - 8:08 am

प्रेरणा- www.misalpav.com/node/30059

मुळ कवीयित्रीची क्षमा मागून तसेच 'तांब्या' संप्रदायाच्या मठाधिपती, महागुरु, सर्व सेवक व भक्त यांना वंदन करुन हे विडंबन सादर करत आहे.

जेवणाला मिळतील सोबती खूप
सोडायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी लांबूनच पाहणारे निघतात

ज्याचं त्याला लागतं कुंथावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी खाल्ला मऊ घास
दैवात कुंथणे टळत नसतं

विडंबनराजकारण