भाजपचा बुडबुडा फुटला - लालू प्रसाद
मला प्रश्न पडतो कि भाजपचा खरेच बुडबुडा आहे का, मला तरी हे पटत नाही. आजच्या घडीला आर्धाच्या वर भारताला कवेत घेणारा पक्ष खरेच बुडबुडयाच्या स्वरुपात आहे काय ? मला वाटते 'आप' आणि भाजप यामध्ये निवड करताना बर्याच जणांची द्विधा मनस्थिती झाली असावी. मला वाटते दिल्लीतील भाजपच्या अवस्थेला तीन प्रमुख मुद्दे असावेत
१. राष्ट्रपती शासनाचा मोठा काळ
हा निर्नायकी काळ भाजपच्या माथी मारण्यात केजू यशस्वी झाला.
२. किरण बेदी यांची मुखमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवड (आतिशय कर्कश्य उमेदवार)
३. कॉग्रेसचे खच्चीकरण
भाजपचे मला न पटलेले (अजून तरी) दोनच मुद्दे आहेत