राजकारण
भाजपचा बुडबुडा फुटला - लालू प्रसाद
मला प्रश्न पडतो कि भाजपचा खरेच बुडबुडा आहे का, मला तरी हे पटत नाही. आजच्या घडीला आर्धाच्या वर भारताला कवेत घेणारा पक्ष खरेच बुडबुडयाच्या स्वरुपात आहे काय ? मला वाटते 'आप' आणि भाजप यामध्ये निवड करताना बर्याच जणांची द्विधा मनस्थिती झाली असावी. मला वाटते दिल्लीतील भाजपच्या अवस्थेला तीन प्रमुख मुद्दे असावेत
१. राष्ट्रपती शासनाचा मोठा काळ
हा निर्नायकी काळ भाजपच्या माथी मारण्यात केजू यशस्वी झाला.
२. किरण बेदी यांची मुखमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवड (आतिशय कर्कश्य उमेदवार)
३. कॉग्रेसचे खच्चीकरण
भाजपचे मला न पटलेले (अजून तरी) दोनच मुद्दे आहेत
काथ्याकुटातून रसग्रहण
(काल्पनिक)
आज टीम लंचला बाहेर पडलो, टेबलावरची महत्वाची डायरी ड्रोवरमधे लॉक करायची विसरलो.
टीमबरोबर हॉटेलमधे गेल्यावर जेवताना लक्षात आलं, ऑफीसात फोन करून कोणाला तरी सांगाव म्हटलं, तर
जवळ बसणारे सगळे इथे हॉटेलात, धाकधूक होतीच, पण म्हटलं जाऊ दे, हा लंच तर एन्जोय करू. लंचवरून
परत आलो तर डायरी टेबलावरच होती पण, माझ्या डायरीच्या ऐका पानावर कोणीतरी लिहून ठेवलं होत.
म्हटलं मिपाकरांना सुद्धा ते शेअर करू, प्रतीक्रीयामधून काथ्याकुटातून रसग्रहण तरी होईल.
भूमी अधिग्रहण कायदा
भूमी अधिग्रहण कायदामध्ये सध्याच्या केंद्र सरकारने काही बदल केले आहेत.
त्यामधले मुख्य बदल खालीलप्रमाणे
१. पूर्वी संपादनासाठी 70 टक्के शेतकऱ्यांची संमती बंधनकारक होती . ही अट आता काढून टाकण्यात आली आहे.
यामुळे विरोध असतानाही सरकार बळजबरीने खाजगी / सरकारी प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेउ शकते .
२. संपादन केलेली जमीन त्या प्रोजेक्टसाठी जर ५ वर्षात वापरली गेली नाही तर ती जमीन मूळ शेतकर्याला परत करण्यात यावी . ही अट काढून टाकली आहे.
चावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार
“भाजपाचा चौखूर उधळलेला वारू रोखला गेला की दिल्लीत! आप ने इतिहास घडवला.”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.
“अहो बहुजनहृदयसम्राट, अशा थाटात बोलताय की अश्वमेधच रोखला जणू!”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.
“अहो नारूतात्या, अवघा भारत भगवा करण्याचा 56 इंची अश्वमेधच होता तो.”, बारामतीकर खोचकपणे.
“एका उथळ माणसाला आणि पर्यायाने उथळ पार्टीला निवडून देऊन अराजकाला आमंत्रण दिले आहे दिल्लीने.”, चिंतोपंत हताशपणे.
पराभव नक्की कोणाचा ?
आजच्या सकाळ मध्ये एक बातमी आली आहे. दुवा खाली दिलेला आहे.
५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५
(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे)
ये कहाणी थी दियेकी और तुफानकी
जर तुम्हापैकी काही लोकांना आठवत असेल, कि ८ वी किंवा ९ वी मध्ये इंग्रजीच्या पुस्तकात बायबलमधील ऐक कथा धडा म्हणून होती, 'डेविड आणी गोलायथ' असा, अश्याच काहिश्या आधुनिक कथेचा मी आज इंटरनेटद्वारे अनुभव घेत आहे. अस म्हणतात, जेव्हा इस्रायेलचा राजा सॉल आणि फिलीस्तिनी सैन्य लढाईमधे एकमेका समोर उभे ठाकले होते, जेव्हा फिलीस्तिनी योद्धा गोलायथ, जो की जवळ जवळ ९ हात उंच, व बराच धिप्पाड, मजबूत चिलखताने मढलेला, मैदानात पाहून, इस्रायेली सैन्यातले बहुसंख्य भीतीने चळाचळा कापू लागले, त्यांची लढ्याची उर्मी कमी होऊ लागली. अश्या परिस्थितीत ऐक तरुण पुढे आला, तो होता डेविड.
केजरीवाल / राज ठाकरे
दिल्लीत केजरीवाळ यांच्या आम आदमी पक्षाला टोलेजंग बहुमत मिळाले आहे.
त्यांची लढाई अक्षरशः दिया और तुफान की लडाई होती. तरीही त्यानी नेत्रदीपक यश मिळवले.
कदाचित त्यांचेकडे नक्की काय करायचे आहे याचे प्लॅनिंग होते.
भाजपचा पूर्ण नि:पात झाला. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सुद्धा निवडणूक हरला.
याची कारणे काय याची चर्चा होईल.
मात्र हा धागा काढलाय तो केजरीवालांच्या या विजयातुन महाराष्ट्रात मनसे या पक्षाला बरेच काही शिकण्यासारखे आहे.
मुंबईत ६ हजार सीसीटीव्ही
बातमी
http://www.business-standard.com/article/companies/l-t-to-complete-installation-of-6-000-cctv-cameras-in-mumbai-by-2016-115020700860_1.html
म्हणजे एका CCTV कॅमेर्याला (दुरूस्ती, देखभाल) १५ लाख ८३ हजार समथिंग रूपये !
प्रामाणिकपणे सांगतो, माझे गणित खूप कच्चे आहे. :(
काही चुकत असेल तर कृपया दुरूस्त करा.
खरंच इतके पैसे लागतात का ?