विरंगुळा
चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य
“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.
“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.
“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.
गम्मत (शतशब्दकथा)
''तुला काय काय करता येतं बेटा ?''
''मला … नं ? जादू करता येते !''
''कसली ? ''
''मी जादूनं काळंकुट्ट करून टाकते माझं नाई ऐकलं कुणी तर . . ''
''बापरे ! मलां नको गं काळं करूस . मी तुला बिस्कीट आणलं ना?''
''हेहे ! तुमाला कसं काळं करणार? तुमी आधीच तर काळे आहात ! ''
ममानं डोळे मोठे केले- '' शरू! काकांना असं बोलतात? से सॉरी !''
''सॉरी अंकल !''
वेरी सॉरी हं . .
'' जाउद्या हो - लहान आहे ती'' - काका म्हणले .
- काईपण बोल्लं तरी रागवतेच !
''थांबा -आता - मी ना, ममाची एक गम्मतच सांगते सगळ्यांना ! ''
नथ........भाग १
झक मारली का?
नुकतेच मा.रा.रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत टिका करताना खालील भाषण केले..
"उजनीच्या २१ टीएमसी पाण्याचा कांगावा करीत निवडणूक लढविणारे मधुकर चव्हाण इतके दिवस काय 'झक' मारीत होते का?"
लगेच प्रसारमाध्यमांनी खालच्या पातळीवरची टिका, पवारांचा दर्जा घसरला असे बोलायला सुरूवात केली. सविस्तर बातमी
आता मला सांगा,
ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.
डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.
ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.
डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...
१. ठिकाण ===> नंदी पॅलेस
२. दिनांक ===> १८-१०-२०१४
३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०
४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.
डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.
ओम भवती भिक्षांदेही
डिस्क्लेमर : खालील लेख हा तद्दन पोरकटपणा असून त्यात कुठलीही वैचारीक मुल्ये नाहीत.
खूप दिवसांनी "बाबां"कडे गेलो होतो.त्यावेळेचा किस्सा.
सौदीला जाण्यापुर्वी बाबांनी. "धन्य ते संताजी धनाजी" अशी दीक्षा दिली होती.त्या दीक्षेचा थोडा-फार फायदा झाला आणि आम्ही "संताजी-धनाजी" यांच्या सहवासात वेळ काढायला लागलो.विचारांत आणि आचारात काही विशेष फरक पडला नाही.(असे आमची सौ. म्हणते...म्हणजे ते नक्कीच सत्य असेल...असे समजायला हरकत नाही.)
शेख चिल्ली !
कुणीही अजाणता अथवा बावळटपणे स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागत असेल तर सहसा ज्या चित्राची पटकन आठवण येते त्यातील एक म्हणजे शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय, झाडाची फांदी कापून झाली की तो आपोआप झाडावरून फांदी सहीत खाली पडणार हे सुज्ञांच्या लक्षात येतच. या शेख चिल्लीच्या इतर बर्याच कथा असल्या तरीही या धाग्याचा उद्देश अजाणता अथवा अज्ञानातून स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, तर्क मांडणे या संदर्भाने आहे.
कुणी प्याल का पिलवाल का
कुणी प्याल का पिलवाल का
खिलवाल का तो चकणा |
रात्री तरी पिऊ नको
सोडू नको अपुला बाणा || धृ ||
आधीच संध्याकाळची
पार्टी आहे लांबली |
परत जाता अजून एक
पेग देत थांबली ||
चकणा शिळा दिला
जो मद्य सांडुन भिजला |
आत्ताच हातातला
ग्लास मी कुरवाळीला || १ ||
सांभाळुनी माझ्या जीवाला,
मी जराशी घेतली |
बोकाणा भरताना चकण्याचा,
हिची चाहूल लागली ||
सांगाल का त्या महिलेला,
कि जास्त नाही ढोसली ||
आणि उतराया नशा कोणी
रात्र जागून काढली || २ ||
वरून दट्ट्या बसला की.... !
वरून दट्ट्या बसला की.... !