विचार

दुष्काळवाडा..... अंतिम भाग मिशन म्हणून लढण्याची गरज

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
14 Sep 2015 - 4:42 pm

दुष्काळवाडा..... अंतिम भाग
मिशन म्हणून लढण्याची गरज
शेतकरी

मांडणीविचार

एक प्रेमपत्र

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
14 Sep 2015 - 6:54 am

मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे! तुला पत्र लिहिताना प्रचंड आनंद होतोय. अक्षरश: शब्द सुचत नाहीत. काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू अशी अवस्था होतेय! खूप भरून येतंय.

तू! तुझ्याबद्दल काय लिहू? लिहून व बोलून जे सांगता येईल ते फार फार थोडं आहे. कणभर आहे. पण तू, तुझं व माझं नातं, तू माझ्या आयुष्यात आलीस तो काळ व तिथून बदललेलं आयुष्य... काय काय आणि कसं सांगू!

मुक्तकसमाजजीवनमानविचारसद्भावनाविरंगुळा

पण लक्षात कोण घेतो ??

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
10 Sep 2015 - 4:35 pm

तो आला पण नेहमीप्रमाणे घुश्शातच होता …. तोंडाने नेहमीची बडबड चालली होती, हातवारे चालले होते ….

आमचं भेटायचं ठरतं नेहमी… मी वेळेवर पोचतो पण ह्याचा उशीर कायम ठरलेला…कारण ह्याचे समाजकार्य ! त्याला काहीच वेळ काळ नसतो…सदानकदा कुठेतरी वाहिलेलाच…. जिथे कुठे काही चुकीचं चाललं असेल तिथे हा बरोब्बर पोचतो …. मला नेहमी कुतूहल वाटतं ह्याचं पण त्यावर त्याचं ठरलेलं उत्तर …"अरे, सध्या वेळच अशी आहे की कुठेतरी काहीतरी चाललेलं असतंच… इतरांनी झापडं लावून घेतली आहेत , फक्त माझे डोळे उघडे असतात !"

अरे पण तू कशाला तुझा जीव धोक्यात घालतोस नाहक ?? आपण बरं आणि आपलं काम बरं….

समाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचार

या पाच गोष्टी कायम कराव्यात

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जनातलं, मनातलं
8 Sep 2015 - 2:12 pm

1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल.

2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील.

3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

...घे जगून !

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
8 Sep 2015 - 12:18 pm

गेल्या वर्षीचा फेब्रुवारी महिना. लेकाची दहावीची परीक्षा पंधरा दिवसांनी सुरु व्हायची होती. एका रविवारच्या सु-प्रभाती मी आणि मुलगा पुस्तकं आणि इतर शालेय साहित्य आवरत होतो. आठ दिवसापूर्वी शाळेतून मुलाचं परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं होतं ते मी बंदोबस्तात कपाटात ठेवलं होतं. त्याला लॅमिनेशन करायचे होते म्हणून लॉकरचा कप्पा उघडला. सगळे कागद बाहेर काढले. हॉल तिकीट त्यात सापडेना. कपाट पालथं घातलं, सगळ्या वस्तू, कपडे बाहेर काढून शोधलं, लॉफ्टवरच्या सगळ्या जिनसा खाली आल्या, कागद अन कागद विंचरून काढला. पण हॉल तिकीट मिळालं नाही. हॉल तिकीट म्हणजे परीक्षेचा प्रवेश परवाना. महत्वाचा कागद !

मांडणीराहणीप्रकटनविचारअनुभव

बंधन बँक

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जनातलं, मनातलं
7 Sep 2015 - 11:51 pm

आपल्याला आयुष्यात केव्हा ना केव्हा आर्थिक मदतीची गरज भासते. काही वेळा आपण ही मदत नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून घेतो तर काही वेळा कर्ज पुरवठा करणा-या वित्त संस्थांकडून. जर आर्थिक साहाय्याची मागणी करणारी व्यक्ती सधन वर्तुळातील असेल किंवा पगारदार नोकर असेल किंवा त्या व्यक्तीचा चांगले उत्पन्न असणारा व्यवसाय असेल तर आर्थिक मदत मिळण्यास शक्यतो अडचण येत नाही. मात्र ही व्यक्ती जर का आर्थिकदृष्टया कनिष्ठ स्तरातील असेल किंवा जर गरीब असेल तर मात्र अशी मदत मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. बरेचदा नातेवाईकही या व्यक्तीसारखेच गरीब असतात. वित्त संस्था परतीची हमी नसल्याने कर्ज देत नाहीत.

वावरविचार

अन्नदाता सुखी भव भाग २ - डॉ नॉर्मन बोरलॉग, डॉ स्वामिनाथन आणि इतर चेले

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
7 Sep 2015 - 9:44 pm

अन्नदाता सुखी भव भाग १ - PL 480

(मागील भागाच्या सुरवातीला थोडीशी छपाईची गल्लत झाल्याने "अन्न दाता सुखी भव" या नंतर दिसणारा विसर्ग असा दिला गेला की "भव" हा शब्द "…सुखी भव : भाग १" असा दिसण्याऐवजी "…. सुखी भवः भाग १" असा दिसत होता. त्यांत आता योग्य ती सुधारणा केली आहे. सध्याच्या काळांत संस्कृत भाषेचा असा अजाणता देखील केलेला चुकीचा वापर अक्षम्य ठरेल. तरीही क्षमस्व!)

धोरणविज्ञानविचार

या पाच गोष्टी रोज सकाळी कराव्यात!

दमामि's picture
दमामि in जनातलं, मनातलं
7 Sep 2015 - 1:23 pm

१ रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळे उघडावेत. यामुळे झोप निघून जाण्यास फायदा होतो.
2 नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे ताजेतवाने वाटते.
३ यानंतर दात घासावेत. टुथपेस्ट आणि ब्रशने घासले तर फारच उत्तम, पण ते नसल्यास मीठ, हळद, लिंबू, कोळसा यापैकी काहिही वापरले तरी चालेल. मुख आरोग्यास लाभदायक असते.
४ यानंतर शौचास जाऊन यावे. कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ)
५ आणि नंतर पेला भरून वाफाळता चहा घ्यावा.

विडंबनविचार