पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की
ऑफिसला लागताना आम्ही दोघी एकत्रच लागलो. बाकी सगळे मुलगे होते. मुली अशा आम्ही दोघीच. खर तर ती थोडी उशिरानीच जॉईन झाली . जवळ जवळ एक महिना उशिरा. मी तिची अगदी आतुरतेने वाट बघत होते आणि ती जॉईन झाली. साडी नेसलेली ( मी आश्चर्यचकित -ऑफिस ला जॉईन होताना साडी ?). दिसायला पोक्त वगैरे चष्मा/ पदर दोन्ही खांद्यावरून पुढे घेतलेला. डोक्याला चपचपीत तेल लाऊन त्याची एक छोटीशी वेणी घालणारी. बंगलोर जवळच्या एका कुठल्यातरी आडगावातून आलेली. मुंबईत राहायला घर नाही म्हणून लांबच्या नातेवाईकांकडे राहणारी. आली तेव्हा अशी होती.
समाजमाध्यमांमुळे कधी कधी रोचक माहिती शोधत नसताना देखील मिळते. युरी बेझमेनोव्ह या केजिबीच्या हेराच्या मुलाखतीच्या बाबतीत असेच झाले. वास्तवीक एका अमेरीकन पत्रकारास १९८५ सालात दिलेल्या या फुटीर (रशियाच्या दृष्टीने देशद्रोही) हेराने सांगितलेली गोष्ट आणि त्यात (कदाचीत वाढवून चढवून) सांगितलेले अमेरीकेत (त्याआधीच्या काळातली) सोव्हिएट ढवळाढवळ इतकेच या गोष्टीचे महत्व नव्हते हे सुरवातीस लक्षात आले...
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.
तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५
वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता
स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा
कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे
फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.
कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?
(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)
रामराम मंडळी!
शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं .
पोर्तुगीज व्यापारी लोकांची भारताला सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी मुंबई शहराचा पाया रचला. ते मुळात सक्तीने धर्मप्रसार करायला आले होते. १५०९ साली फ्रान्सिस्को अल्मेडाने मुंबई बेटावर पहिली धाड घातली आणि स्थानिक लोकांना लुटले. अनेकांना जबरदस्तीने किरिस्तांव केले. पुढे अशाच धाडी पडत गेल्या आणि १५३२ साली नुनो डाकुन्हाने गुजरातच्या सुलतानाला हरवून वसई काबीज केली.
मुंबईची सुरुवात ही अशी झाली.
दोन वर्षांपूर्वी नणंद म्हणाली,”हल्ली न् बऱ्याच वेळा मी माच्छिन्द्रगडावर जाऊन आले. खूप छान वाटतं तिथे.”
“म्हणजेकुठे ग?” या माझ्या पृच्छेवर तिने सविस्तर उत्तर दिले.
फाट्यावरच्या ट्रकमधून गर्दी सांडून ओघळ फुटल्यासारखी गाव आणि वस्त्यांकड निघालेली.
कलंडलेल्या उन्हातनं तिघी वस्तीकडं निघाल्या. गर्दीत मिसळू न देण्यासाठी सासूने त्या दोघींचे हात धरलेले!
भयानक दुष्काळ पडलेला! दुष्काळी कामावरूनच तिघी परतत होत्या. स्वयंपाकासाठी काय करायचं हा नेहमीचा प्रश्नही सोबत चालत होता. पण कुणीच काही बोलत नव्हत. मुक्याच जणू!
नेहमीच्या वळणावर तिघी थांबल्या. थोरली सून रस्ता उतरली, ढासळलेल्या पवळंवरून पलिकडं गेली. कंबरेच्या विळ्याने 'विचका' स्वयंपाकासाठी काढू लागली. अचानक पलिकडे एक बैल मरून पडलेला दिसला तसं दचकून तिनं मागं पाहिलं!
माझ्या एका मित्राच्या ऑफ़िसमध्ये एका मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवात सी सी टि व्ही संदर्भात चर्चा करण्यास आले होते.
पण अजून फ़्लेक्स स्टार अध्यक्ष आले नव्हते म्हणून ते गप्पा मारत बसले होते.
कार्यकर्ता नं 1- आपण ह्या वर्षी काहितरी वेगळा देखावा करुया.
कार्यकर्ता नं 2- आयला खरच आपण कायतर वेगळे केल पाह्यजे. साले ते वरच्या मंडळाचा तो अमर्या लय भाव खातो.
का. 1- आं काय? अमर्या साला त्याचा काय संबंध?
का. 2- तसं नाय
ते काय करतय नगरसेवकाच्या हापीस वर पडीक असतय ना मग तिथ कामासाठी आलेले त्याला ओळखत्यात मग वर्गणीच्या येळेला सालं चांगल्या पावत्या फ़ाडतय.
साधरणपणे १० वर्षापुर्वी पर्यंत आपल्यातील बहुतेक जण व काही ठिकाणी आतासुध्दा काही जण सार्वजनिक शौचालय वापरत आहेत.
तेंव्हा त्या शौचालयात काही कलाकृती व गावातील,आळीतील भानगडी,वाद एकतर्फी प्रेमाची जाहिरात वाचायला मिळत असे.
एवढेच नाही त्या बातम्या अपडेट करणारे व त्या चविने वाचणारे,पाहणारे आज बहुसंख्येने व्हाट्स अप वर व उरले सूरलेले ईतर सोशल नेटवर्कवर आजही आहेत.
खरेच या महाभागांमुळे आपण किती डिजिटल झालो आहोत हे समजते आहे.