म्हण
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साहेबांचा पुढचा पुर्ण आठवडा धावपळीतच गेलेला. कसली कसली उदघाटनं, सत्कार समारंभ, मिरवणुका. नुसती पळापळ. आता आख्ख पोलिस खातं त्यांच्या हातात आलेलं म्हटल्यावर या गोष्टी कायम असनारच. पण पुढच्या पाच वर्षाची गणितं मांडुन त्यांना ते खातं त्यांच्याच पध्दतीनं चालवायचं होतं. मागच्या मंत्री साहेबांनी पाडलेले वळणं बुजवुन त्यांना ती नव्यानं टाकायची होती. त्यासाठी संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजीत केलेली. राज्यातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांचे पत्रकार साहेबांच्या बंगल्यावर जमा झाले.

