फ्री स्टाइल
बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
मैं तुझे फिर मिलूँगी- अमृता प्रीतम मुक्त अनुवाद
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही,
कदाचित तुझ्या कल्पनांची प्रेरणा बनून तुझ्या कॅनव्हास वर उतरेन
की तुझ्या कॅनव्हास वरचीच एक रहस्यमयी रेखा बनून तुला शांतपणे तुला निरखत राहीन
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही.
सूर्याचा एक किरण बनून तुझ्या रंगांमधे मिसळून राहीन
की तुझ्या रंगामधे बसून तुझ्या कॅनव्हासभर पसरत जाइन
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही.
धबधब्यातून मुक्त उडणाऱ्या तुषारांप्रमाणे तुला भेटेन
आणि एक थंड अनुभुती बनून तुझ्या गळ्यात पडेन
मी तुला पुन्हा भेटेन तुला कुठे कसं माहित नाही.
कोणी राहत नाही...
जाती जन्मतात.
जाती शाळेत जातात.
जाती प्रौढ़ होतात.
जाती जातीशी(च) लग्न करतात.
जाती पहिल्या -कधी सोळाव्या रात्री
आपल्याच जातीवर चढ़तात.
मग अशा रीतीने जाती
..पुन्हा कंटीन्यू होतात.
जाती गावा.बाहेरच्या
'म्हारवाड्याला' असतात.
--- जाती शहरा.बाहेच्या
'झोपड़पट्टीलाही' असतात.
जाती देशा -त्याच्या झेंड्यात असतात.
जाती
गरीबांच्या कातड्याला कायमचा चिकटलेला सर्वात वरचा 'थर' असतात.
जाती अंतयात्रा, जनाज्याला असतात.
जाती दंगली. सना-उत्सवालाही असतात.
मंदिरा, मशिदी, गुरूद्वारयाला जाती असतात.
बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर
बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !
नकोत संदर्भ, नको पुरावे, तर्कविवेक नकोच नको,
माझा नंबर पह्यला !
बेछूट लिहिण्यात, माझा नंबर पह्यला !
शंका काढलीस तर आरोप करेन
जखमी असशील तर दोष तुझाच धरेन
माझा नंबर पह्यला !
बे रोकटोक बोलण्यात माझा नंबर पह्यला
माझा विरोध म्हणजे तुझेच चूक, वादविवाद हवा कशाला
एक माझे अन शांती मिळव
माझा नंबर पह्यला !
सेंसॉर करण्यात गचांडी धरण्यात माझा नंबर पह्यला
बातमीत येईन, सत्ता घेईन
सगळे म्हणतात बघ मलाच बरोबर
माझा नंबर पह्यला !
बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !
<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!)
प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे -
('खरे' कवी यांची माफी मागून...)
‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो
दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’. त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही. पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनात ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरी ही मला उमगलेले सत्य मी माझ्या मित्राला सांगितले.....
आमचाही पाउस.....
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच.
काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले.
फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...
आम्ही पाडलेल्या चकल्या चावायच्या आधी त्या चकल्यांमधले खरे पीठ कोणाचे आहे ते बघावे आणि मग आमच्या चकलीचा आस्वाद घ्यावा...
अणुयुद्ध (शतशब्दकथा)
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट..
रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !!
त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त..
युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !!
केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात...
जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !!
अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी...
बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !!
आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता...
त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !!
राधाबाई
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
गोकुळ त्यागीले, वृंदावनहि, मथुरेत ही नाही !
नेल्या माता, दादा ताता, भद्रा आणि गाई !
अठरा पद्म गोपहि नेले; तुज पुसले देखील नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा !
पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा !
गोपिकांच्या गराड्यातं; तव विस्मरण झाले पाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
साता समुद्रा पार वसे ती सोन्याची द्वारिका !
वसतो तेथे कृष्ण मुरारी सवे आठ बायका !
आता कैचा, परत यायचा, फिरकायाचा नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!