मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

गणपती बप्प वर आय० ने बनवलेले पूर्ण गाणे

स्वरुपसुमित ·

बघीतले.आवडले पण संपूर्ण करावयास हवे. आणखीन प्रसंग चित्रण करावयास. लाईक केले. घंटी वाजवतो. पुढील शार्टस् साठी शुभेच्छा.

बघीतले.आवडले पण संपूर्ण करावयास हवे. आणखीन प्रसंग चित्रण करावयास. लाईक केले. घंटी वाजवतो. पुढील शार्टस् साठी शुभेच्छा.
मित्रानी तसे हे गाणे खुप आधी बनवलेले होते थोडे काम कराय चे होते पण राहुन गेले तुमचे प्रतिसाद नकी कळवा च्यानेल ला लाइक आणि सुब स्क्राइब नक्के करा https://www.youtube.com/shorts/XTTqu5viY5E

'किशोर‘स्वरातील ‘साहेबा‘चे गाणे

हेमंतकुमार ·

सौन्दर्य 05/09/2025 - 22:57
हिंदी चित्रपट सृष्टीने आयुष्यातील प्रत्येक प्रसंगासाठी शेकडो गाणी दिली आहेत. 'बार बार दिन ये आये ' हे असेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे गाणे. पूर्वी २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट ह्या दिवशी 'मेरे देश की धरती' लागले नाही असा दिवस विरळा. त्या शिवाय लग्न, प्रेम, प्रेमभंग, रक्षाबंधन, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, दिवाळी, दसरा, ईद, जन्म, मरण इत्यादी प्रत्येक प्रसंगाला अनुरूप गाणी आहेतच. विषय/प्रसंग सांगा - गाणी हजर होतील.

आलो आलो 10/09/2025 - 23:43
अगदि अगदि …३र्या पेग नम्तर तर्र हेच गाने आठवते म्हाँजे ठल्लक शब्द नाही आले ओठांबाहेर तरी षारिरिक आव (मनीचा भाव) तर्र नक्कीच अस्साच असतो .

सौन्दर्य 05/09/2025 - 22:57
हिंदी चित्रपट सृष्टीने आयुष्यातील प्रत्येक प्रसंगासाठी शेकडो गाणी दिली आहेत. 'बार बार दिन ये आये ' हे असेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे गाणे. पूर्वी २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट ह्या दिवशी 'मेरे देश की धरती' लागले नाही असा दिवस विरळा. त्या शिवाय लग्न, प्रेम, प्रेमभंग, रक्षाबंधन, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, दिवाळी, दसरा, ईद, जन्म, मरण इत्यादी प्रत्येक प्रसंगाला अनुरूप गाणी आहेतच. विषय/प्रसंग सांगा - गाणी हजर होतील.

आलो आलो 10/09/2025 - 23:43
अगदि अगदि …३र्या पेग नम्तर तर्र हेच गाने आठवते म्हाँजे ठल्लक शब्द नाही आले ओठांबाहेर तरी षारिरिक आव (मनीचा भाव) तर्र नक्कीच अस्साच असतो .
हिंदी चित्रपटांमधील काही गाणी अजरामर आहेत. ती कितीही जुनी झाली तरी ताजीतवानीच राहतात आणि रसिकांना कायमच भुरळ घालतात. किशोरकुमार हे चित्रसृष्टीमधील एक आघाडीचे गायक. अनेक प्रकारांमधली गाणी गाण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक गायकांबाबत रसिकांच्या विशिष्ट आवडीनिवडी असतात. तरी पण किशोरकुमारने गायलेली कुठली ना कुठली गीते प्रत्येक गानरसिकाला आवडतातच. असेच एक गाजलेले गाणे म्हणजे सगिना चित्रपटातील साला मैं तो साहब बन गया. . . या गाण्याने गतवर्षी आपली पन्नाशी पूर्ण केलेली असल्यामुळे त्याची ही आठवण आणि त्यानिमित्ताने संबंधित मूळ चित्रपटाचा हा अल्प परिचय.

बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण

Bhakti ·

छान कार्यक्रम दिसतो. ग्रेस यांच्या कविता कायम आनंद देतात. पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा कविता. आमच्याकडे आला की कार्यक्रमास नक्की हजेरी लावणार. कार्यक्रमाची ओळख करुन दिली. तहे दिलसे शुक्रीया. भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 24/08/2025 - 15:24
ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे. अत्यंत समर्पक... यांच्या कविता वाचल्या की मनात घोळत राहतात...

In reply to by कंजूस

Bhakti 24/08/2025 - 17:27
अजिबात गंभीर नाहीये.उलट सांगितिक मेजवानी आहे. दग्ध या मराठी शब्दाचा अर्थ आहे “जळालेले”, “भस्म झालेले” किंवा “ज्याचे ज्वलन झाले आहे”. ग्रेस यांना येथे अपेक्षित असलेल्या मुली द्रौपदी,गांधारी,कुंती इत्यादी अशा आपल्याच दु:खात जळून गेलेल्या तरीही आयुष्य पुढे नेणाऱ्या स्त्रियांचे हे गीत आहे.सांजभयाच्या साजणी या काव्यसंग्रहातील 'दग्ध मुलींचे संध्यागीत' ही कविता आहे.

ग्रेस यांची कवीता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सुचवून जाते. बहुआयामी कवीता, वेगवेगळ्या परिप्रेक्षातून तीचे वेगवेगळे रूप दिसते व मी संभ्रमात पडतो आणी कवी ग्रेस दुर्बोध वाटू लागतात. उदा. कवी म्हणतात , क्षितिज जसे दिसते तशीच म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही इतकी विचारांची स्पष्टता असणारा कवी आई बद्दल काय लिहीतो त्या भावना पटतात,समजतात. ती गेली तेंव्हा ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता _____________ उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त ____________ नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ____________ आई करता एवढे व्याकूळ होऊन तीला देवत्वाचे स्थान देणारा कवी त्याच्याच दुदुसऱ्या एका कविते मधे काहीतरीच अनाकलनीय लिहीतो आणी ती वाचताना गोधंळ उडतो आणी मग त्याच्यावर दुर्बोध हे लेबल लावून वाचक मोकळा होतो. त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा अतिशय वेगळा कवी. जरी दुर्बोध वाटत असला तरी मनात अनवट ठसा सोडून जातो. म्या पामराने त्या बद्दल काय लिहावे. फक्त वाचणे आणी जसे समजेल, जेंव्हा उलगडेल तसे समजून घेणे एवढेच आपल्या हातात आहे. असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/08/2025 - 11:27
ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारी 'आई' ही पारंपरिक कवितांमधील केवळ मायेची सावली नाही.ती अनेकदा स्वतंत्र आई असलेली स्त्रीही दिसते.ग्रेस मात्र तिच्या‌ प्रत्येक रूपात व्याकूळता शोधतात,वाचकांना व्याकूळ करतात.
आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?'

Conviction is my character याचे प्रवर्तक ग्रेस स्पष्टवक्ते,निरंकुश विचारसरणीचे होते. कवितांमधून केलेले शब्द प्रयोग आशयघन असून त्याला विचारसरणीची सशक्त व संयुक्तिक अशी बैठक असावी असे वाटते. खालील कवितांमधून असे वाटते की त्यांना कसलातरी सल,आकस, अनाकलनीय गुढ वैरभाव असावा. नाहीतर कुठला मुलगा आई बद्दल लौकिकार्थाने अश्लाघ्य शब्दांचा प्रयोग करेल. आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?' उर्मिला,द्रौपदी,सखी अशा कवितांमधून स्त्रीच्या आयुष्यावर परखड लिहले आहे. ग्रेसांचे वृत्त, कावळा या कवितांमधून स्वतःबद्दल व त्यांच्या कवितांना दुर्बोध लेबल लावणाऱ्या बद्दल परखड मत मांडले आहे. खाली दिलेल्या कवीते मधे ग्रेस आई बद्दल काय भावना व्यक्त करतात ते बघा. माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... हे माझे आकलन आहे.

आणि कर्नल तपस्वींचे अमूल्य प्रतिसाद. _/\_ मला कविता जवळजवळ अजिबात कळत नाही. त्यामुळे हे सारे वाचून खूपच बरे वाटले. हृदयनाथांनी म्हटलेले 'तू गेलीस तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता' हे पण ग्रेसांचेच ना? अनेक अनेक धन्यवाद.

या काही कविता--ज्यांची गाणी झाली https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace घर थकलेले संन्यासी आणि वार्‍याने हलते रान ऐकाच पण माझे सर्वात आवडते "भय ईथले संपत नाही"

छान कार्यक्रम दिसतो. ग्रेस यांच्या कविता कायम आनंद देतात. पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा कविता. आमच्याकडे आला की कार्यक्रमास नक्की हजेरी लावणार. कार्यक्रमाची ओळख करुन दिली. तहे दिलसे शुक्रीया. भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 24/08/2025 - 15:24
ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे. अत्यंत समर्पक... यांच्या कविता वाचल्या की मनात घोळत राहतात...

In reply to by कंजूस

Bhakti 24/08/2025 - 17:27
अजिबात गंभीर नाहीये.उलट सांगितिक मेजवानी आहे. दग्ध या मराठी शब्दाचा अर्थ आहे “जळालेले”, “भस्म झालेले” किंवा “ज्याचे ज्वलन झाले आहे”. ग्रेस यांना येथे अपेक्षित असलेल्या मुली द्रौपदी,गांधारी,कुंती इत्यादी अशा आपल्याच दु:खात जळून गेलेल्या तरीही आयुष्य पुढे नेणाऱ्या स्त्रियांचे हे गीत आहे.सांजभयाच्या साजणी या काव्यसंग्रहातील 'दग्ध मुलींचे संध्यागीत' ही कविता आहे.

ग्रेस यांची कवीता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सुचवून जाते. बहुआयामी कवीता, वेगवेगळ्या परिप्रेक्षातून तीचे वेगवेगळे रूप दिसते व मी संभ्रमात पडतो आणी कवी ग्रेस दुर्बोध वाटू लागतात. उदा. कवी म्हणतात , क्षितिज जसे दिसते तशीच म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही इतकी विचारांची स्पष्टता असणारा कवी आई बद्दल काय लिहीतो त्या भावना पटतात,समजतात. ती गेली तेंव्हा ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता _____________ उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त ____________ नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ____________ आई करता एवढे व्याकूळ होऊन तीला देवत्वाचे स्थान देणारा कवी त्याच्याच दुदुसऱ्या एका कविते मधे काहीतरीच अनाकलनीय लिहीतो आणी ती वाचताना गोधंळ उडतो आणी मग त्याच्यावर दुर्बोध हे लेबल लावून वाचक मोकळा होतो. त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा अतिशय वेगळा कवी. जरी दुर्बोध वाटत असला तरी मनात अनवट ठसा सोडून जातो. म्या पामराने त्या बद्दल काय लिहावे. फक्त वाचणे आणी जसे समजेल, जेंव्हा उलगडेल तसे समजून घेणे एवढेच आपल्या हातात आहे. असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/08/2025 - 11:27
ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारी 'आई' ही पारंपरिक कवितांमधील केवळ मायेची सावली नाही.ती अनेकदा स्वतंत्र आई असलेली स्त्रीही दिसते.ग्रेस मात्र तिच्या‌ प्रत्येक रूपात व्याकूळता शोधतात,वाचकांना व्याकूळ करतात.
आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?'

Conviction is my character याचे प्रवर्तक ग्रेस स्पष्टवक्ते,निरंकुश विचारसरणीचे होते. कवितांमधून केलेले शब्द प्रयोग आशयघन असून त्याला विचारसरणीची सशक्त व संयुक्तिक अशी बैठक असावी असे वाटते. खालील कवितांमधून असे वाटते की त्यांना कसलातरी सल,आकस, अनाकलनीय गुढ वैरभाव असावा. नाहीतर कुठला मुलगा आई बद्दल लौकिकार्थाने अश्लाघ्य शब्दांचा प्रयोग करेल. आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?' उर्मिला,द्रौपदी,सखी अशा कवितांमधून स्त्रीच्या आयुष्यावर परखड लिहले आहे. ग्रेसांचे वृत्त, कावळा या कवितांमधून स्वतःबद्दल व त्यांच्या कवितांना दुर्बोध लेबल लावणाऱ्या बद्दल परखड मत मांडले आहे. खाली दिलेल्या कवीते मधे ग्रेस आई बद्दल काय भावना व्यक्त करतात ते बघा. माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... हे माझे आकलन आहे.

आणि कर्नल तपस्वींचे अमूल्य प्रतिसाद. _/\_ मला कविता जवळजवळ अजिबात कळत नाही. त्यामुळे हे सारे वाचून खूपच बरे वाटले. हृदयनाथांनी म्हटलेले 'तू गेलीस तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता' हे पण ग्रेसांचेच ना? अनेक अनेक धन्यवाद.

या काही कविता--ज्यांची गाणी झाली https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace घर थकलेले संन्यासी आणि वार्‍याने हलते रान ऐकाच पण माझे सर्वात आवडते "भय ईथले संपत नाही"
बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण १ कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.

बैलपोळ्या निमित्ताने

Bhakti ·

सुबोध खरे 22/08/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 22/08/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti 23/08/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य 22/08/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 23/08/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी 23/08/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य 25/08/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता 24/08/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ 24/08/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. 25/08/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti 26/08/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा 03/09/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.

सुबोध खरे 22/08/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 22/08/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti 23/08/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य 22/08/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 23/08/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी 23/08/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य 25/08/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता 24/08/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ 24/08/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. 25/08/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti 26/08/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा 03/09/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

अखेर जमलं !

नूतन ·

खेडूत 26/07/2025 - 20:25
मस्तच.. छान जमलं आहे! मी काचेवर चित्र रंगवायला एक box मागवला आहे. बघू चित्राला कधी मुहूर्त मिळतो. (अजून चित्र काढत रहा..)

नूतन 26/07/2025 - 23:55
बाकी आवडीच्या गोष्टींचा त्रास होत नाही. असो.प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

अरे वाह ! छान रंगकाम आणि आवड. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छाही देणार होतो. पुढे सर्व खुलासा वाचला आणि आवरलं. :) -दिलीप बिरुटे

नादिष्हेटपणा एक मेडिटेशन चा प्रकार आहे जो स्वता करता मेडिसीन आणी दुसर्‍यासाठीचे टेन्शन असते. बाकी, लेख मस्त.

चित्र आणि पेन्सिली ठेवायची युक्ती--दोन्हीही. वाढदिवसाच्या शुभेच्छा!! मी ही असाच एक तूनळी चॅनल बघुन प्रभावित झालो होतो आणि एक मोठी चित्रकला वही आणि बरेच अ‍ॅक्रिलिक रंग घेउन बसलो होतो. पण बरीच धडपड करुनही जमले नाही. हा तो चॅनल https://www.youtube.com/channel/UCHm9SiOLG8UoBT8STWY5mVA

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नूतन 28/07/2025 - 15:12
शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा धडपड करून बघायला काय हरकत आहे? त्यासाठी शुभेच्छा.

सोत्रि 29/07/2025 - 02:57
वाढदिवसाच्या लेटलतीफ शुभेच्छा!! चित्र सुंदर आणि पेन्सिली ठेवायची युक्ती व त्यासाठीचे प्रयत्न भन्नाट आणि प्रेरणादायी!! - (जमवण्याचे प्रयत्न आवडलेला) सोकाजी

ज्या इरेने पेटून तुम्ही हवी त्या रंगाची पेन्सिल हवी तेव्हा चटकन मिळेल अशा रीतीने पेन्सिली व्यवस्थित ठेवण्याचे साधन बनवले त्या ईर्षेला विनम्र अभिवादन. आपले छंद आपल्याला जीवन ऊर्जा देतात आणि चिरतरुण ठेवतात. आतां हवे तेव्हां हवा तितका वेळ बालवयात वा किशोरवयात शिरून चित्रकारी, रंगकाम करा आणि चित्रकारी/रंगकाम सत्र आटोपले की मगच या खर्‍या जगात परत या. अनेक अनेक शुभेच्छा.

In reply to by सुधीर कांदळकर

नूतन 29/07/2025 - 12:01
शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले छंद आपल्याला जीवन ऊर्जा देतात आणि चिरतरुण ठेवतात. १००% खरं!

खेडूत 26/07/2025 - 20:25
मस्तच.. छान जमलं आहे! मी काचेवर चित्र रंगवायला एक box मागवला आहे. बघू चित्राला कधी मुहूर्त मिळतो. (अजून चित्र काढत रहा..)

नूतन 26/07/2025 - 23:55
बाकी आवडीच्या गोष्टींचा त्रास होत नाही. असो.प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

अरे वाह ! छान रंगकाम आणि आवड. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छाही देणार होतो. पुढे सर्व खुलासा वाचला आणि आवरलं. :) -दिलीप बिरुटे

नादिष्हेटपणा एक मेडिटेशन चा प्रकार आहे जो स्वता करता मेडिसीन आणी दुसर्‍यासाठीचे टेन्शन असते. बाकी, लेख मस्त.

चित्र आणि पेन्सिली ठेवायची युक्ती--दोन्हीही. वाढदिवसाच्या शुभेच्छा!! मी ही असाच एक तूनळी चॅनल बघुन प्रभावित झालो होतो आणि एक मोठी चित्रकला वही आणि बरेच अ‍ॅक्रिलिक रंग घेउन बसलो होतो. पण बरीच धडपड करुनही जमले नाही. हा तो चॅनल https://www.youtube.com/channel/UCHm9SiOLG8UoBT8STWY5mVA

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नूतन 28/07/2025 - 15:12
शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा धडपड करून बघायला काय हरकत आहे? त्यासाठी शुभेच्छा.

सोत्रि 29/07/2025 - 02:57
वाढदिवसाच्या लेटलतीफ शुभेच्छा!! चित्र सुंदर आणि पेन्सिली ठेवायची युक्ती व त्यासाठीचे प्रयत्न भन्नाट आणि प्रेरणादायी!! - (जमवण्याचे प्रयत्न आवडलेला) सोकाजी

ज्या इरेने पेटून तुम्ही हवी त्या रंगाची पेन्सिल हवी तेव्हा चटकन मिळेल अशा रीतीने पेन्सिली व्यवस्थित ठेवण्याचे साधन बनवले त्या ईर्षेला विनम्र अभिवादन. आपले छंद आपल्याला जीवन ऊर्जा देतात आणि चिरतरुण ठेवतात. आतां हवे तेव्हां हवा तितका वेळ बालवयात वा किशोरवयात शिरून चित्रकारी, रंगकाम करा आणि चित्रकारी/रंगकाम सत्र आटोपले की मगच या खर्‍या जगात परत या. अनेक अनेक शुभेच्छा.

In reply to by सुधीर कांदळकर

नूतन 29/07/2025 - 12:01
शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले छंद आपल्याला जीवन ऊर्जा देतात आणि चिरतरुण ठेवतात. १००% खरं!
नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक‌‌ गोष्ट सांगणार आहे. तर झालं असं की, अलीकडेच‌ माझा‌ वाढदिवस झाला. आता या‌ वयात कसलं आलंय " सेलीब्रेशन" वगैरे! ना खाण्याचा पराक्रम ना पायात फिरण्याचा जोर. तेव्हा वाढदिवस आणि नित्यक्रम ‌यात फारसा काही फरक पडत नाही. नाही म्हणायला मित्रमंडळी,नातेवाईकांचे फोन येतात. झालंच तर व्हाटस् ॲप ग्रुपवर ,वाढदिवसाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा, आज काय स्पेशल? आणि तत्सम संदेशांचा धबधबा वाहतो.

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३ ·

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ 28/07/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा 29/07/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत 29/07/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti 29/07/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 30/07/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ 29/07/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म 29/07/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ 29/07/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 29/07/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा 29/07/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक 29/07/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ 28/07/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा 29/07/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत 29/07/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti 29/07/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 30/07/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ 29/07/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म 29/07/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ 29/07/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 29/07/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा 29/07/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक 29/07/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (ऐसी अक्षरे ३१)

Bhakti ·

पुस्तक जाऊ दे खड्ड्यात, म्हणजे ते आधीच गेलेले आहे पण मला एक प्रश्न पडला आहे की प्रकाशकांना परवडते कसे अशी पुस्तके प्रकाशित करणे ? मराठी प्रकाशन व्यवसायातील कोणाला तरी बोलावून पॉडकास्ट करायला मजा येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 23/07/2025 - 14:20
काय माहीती नाही? पॉप्युलर प्रकाशन आहे. अवांतर पण प्रकाशक आणि लेखक यांच्यातील मधुर नात्यांचं एक उदाहरण पुन्हा समजले.पद्मगंधा चे जाखडे हे २१ जुलैला रा.चि.ढेरे यांच्या जन्मदिनी त्यांचे एकतरी पुस्तक पुर्नप्रकाशन करतात.नरहर कुरुंदकर म्हटले की देशमुख आणि कंपनी अजोड नातं होतं.गो.नी.दांडेकर आणि मृण्मयी प्रकाशन आहेच. हरारी,डारियस प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद, अच्युत गोडबोले म्हटलं की मधुश्री प्रकाशन समीकरण दिसते. अजून आठवलं की सांगते.

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 06:09
गोनीदा आणि मॅजेस्टिक हे नातं होतं. त्यांची बहुतेक पुस्तकं मॅजेस्टिकची आहेत. मृण्मयी प्रकाशन ही त्यांच्या मुलीची, वीणा देव यांची प्रकाशन संस्था आहे जी गोनीदांची पुस्तके आता पुन:प्रकाशित करत आहे

In reply to by प्रचेतस

Bhakti 26/07/2025 - 10:46
अच्छा! मृण्मयी वीणा देव यांचे हे माहिती होतं.पण वाटलं सुरूवात गोनीदा यांनी केली असेल. पु.लं.ची पुस्तके मौज प्रकाशनाची दिसत आहेत.दुर्गाबाईंची वरदा प्रकाशनाची आहेत,पण पैसे,दुपानी,ऋतूचक्र इतर प्रकाशनाची आहेत.प्रसिद्ध पुस्तकांचे हक्क मिळवण्यासाठी नंतर चढाओढ असते असे वाचलं होतं.

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 11:13
रामदास भटकळांचे पॉप्युलर, श्री पु भागवतांचे मौज, कोठावळ्यांचे मॅजेस्टिक, माजगावकरांचे राजहंस, अनंतराव कुलकर्ण्यांचे कॉन्टिनेन्टल ह्या जुन्या प्रकाशन संस्थांनी अनेक दर्जेदार लेखक घडवून पुस्तकेही दर्जेदार दिली असे म्हणता येईल. ह्या संस्था उत्तम लेखक जिव्हाळ्याने राखून ठेवण्यासाठी देखील प्रसिद्ध होत्या आणि आहेत. वरदाच्या ह. अ. भावेंनी प्राचीन साहित्य मराठीत आणून आतबट्ट्याचाही व्यवहार केला असे म्हणता येईल. मराठी वाचकांवर ह्यांचे मोठे ऋण आहे. आता मात्र तसे लेखक राहिले नाहीत आणि मेहतांसारख्या तद्दन बाजारु प्रकाशन संस्था सध्या जोरात कार्यरत आहेत. मात्र त्यांनी देखील भैरप्पांची पुस्तके मराठीत आणून मोठे कार्य केले आहे असे म्हणता येईल.

चौथा कोनाडा 23/07/2025 - 13:41
आटोपशीर आणि सुंदर ओळख. मी पहिले तीनही भाग वाचलेले आहेत.. काही ठिकाणी रटाळपणा नक्कीच अनुभवायला येतो.. कादंबऱ्यांमध्ये सुद्धा पुनरुक्ती जाणवत राहते. पण त्या रटाळपणासहित कादंबऱ्या आवडून जातात.. मनात घर करून राहतात. ही सुद्धा यादीच आहे.. अजून योग आलेला नाहीये. ही तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकली?

कपिलमुनी 25/07/2025 - 21:35
रामूने सत्या बनवला.. मग सत्यासारखं काहीतरी बनवायचा म्हणून ढीगभर पिक्चर केले.. नेमाडेंनी कोसला लिहिली..मग कोसला सारखा काहीतरी लिहायचा म्हणून हिंदू लिहिली.

यांची कोसला खुप लोकांना आवडले. माझ्या संग्रहात आहे पण कधीही वाचायला घेतल्यावर एकदोन पानाच्या पुढे प्रगती होत नाही. तेच भैरप्पांचे अनुवादित पुस्तक एका बैठकीत संपते. असो. किंडलपेक्षा कागदी पुस्तके आवडतात. नवीन आणले की त्याचा येणारा वेगळाच सुवास लहानपणीच्या नवीन शाळेची पुस्तके आठवतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 26/07/2025 - 10:54
भैरप्पा _/\_ सध्या ' पर्व 'ऐकायला सुरूवात केली आहे.माझं आताच भैरप्पांच्या कादंबरीबरोबर नातं निर्माण झालंय.आवरण,वंशवृक्ष अक्षरशः वेड लावलं.त्यांच्या कानडी कादंबरींचा भावानुवाद मराठीत करून उमा कुलकर्णी यांनी वाचकांसाठी खुप खुप बहुमोल कार्य केले‌ आहे _/\_

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 11:22
जा ओलांडूनी, सार्थ, पारखा ह्या देखील उत्कृष्ट कादंबर्‍या आहेत, त्या आवर्जून वाचा. कन्नड कादंबर्‍यांमुळे मी तर भारावून गेलोय. अफलातून चित्रण असते. शिवराम कारंथांची पुस्तके तर आवर्जून वाचा, मुकज्जी, अशी ही धरणीची माया, चोमा महार, डोंगराएव्हढा ह्या त्यांच्या एकाहून एक सरस कादंबर्‍या आहेत. ह्या शिवाय अनंतमूर्ती ह्यांची संस्कार, रावबहादूर कुलकर्णी ह्यांची ग्रामायण, गोपाळकृष्ण पै यांची स्वप्न सारस्वत ह्या सर्वच कादंबर्‍या आवर्जून वाचण्यासारख्या आहेत.

In reply to by प्रचेतस

अंजावर चकटफू पडफ मिळाले. तीनशे पानं एका सटक्यात वाचली. महाभारतावरील एक वेगळा दृष्टिकोन आवडला म्हणून अमेझोन वरून मागवले. नंतर तुमच्याच (प्रचेतस, ) शिफारशीनुसार बाकीची अक्षरधारामधे खरेदी केली. सर्व चांगली आहेत.. कारंथांची मागवतो. सध्या फोटोग्राफी चा नाद लागलाय. अधुनिक तंत्रज्ञानामुळे बरेच फोटो बरेच येतात पण जरा शास्त्रशुद्ध शिकावे म्हणून डाॅक्टर कात्रे यांचे डिजीटल फोटोग्राफी हे पुस्तक मागवले आहे.

श्वेता२४ 26/07/2025 - 13:14
म्हणून ऑफीसच्या पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक खरेदी करणार एवढ्यात माझ्या वरीष्ठांनी माझ्यकडे आहे घेउ नका म्हणाले. नंतर त्यांनी आणून दिले. काही पाने वाचूनच ही पुस्तक पूर्ण होणर नाही याची खात्री पटली. पुस्तक परत केले व पैसे वाचवल्याबद्दल सरांना चहा दिला. :))

मारवा 27/07/2025 - 19:42
मौज प्रकाशनाने नेमाडे यांचे महत्व ओळखण्यात चूक केली. माझ्या माहितीप्रमाणे कोसला चा पहिला खर्डा मौजेकडे गेला होता व तो नाकारण्यात आला होता चूकभूल देणे घेणे. मौजे च्या प्रकाशकांचा एक साहित्यविषयक विशिष्ट दृष्टीकोन होता. कलात्मक सौंदर्य त्यात ते महत्वाचे मानत. त्यांना सामाजिकतेचे वावडे होते असे नव्हे.पण त्यांना मूलभूत कलात्मक सौंदर्य साहित्यिक मूल्य जे घाट शैली आशय संदर्भात आहे ते अधिक मोलाचे वाटत. कलेसाठी कला या बाजूचे मौज प्रकाशन होते. पण त्यांनी या मर्यादेमुळे एकीकडे अनेक चांगलेनलेखन नाकारले हे जसे खरे आहे तसेच भागवत आदींनी त्यांच्या साहित्य तत्वांचा अंगीकार असलेले अतिशय सकानसुंदर साहित्य सुद्धा प्रकाशित करून एकूण मराठी साहित्य समृद्ध केले. श्रीपु एकदा म्हणाले की आम्ही काय नाही दिले पेक्षा काय दिले प्रकाशिले त्यावरून आमचं मूल्यमापन करावे पॉप्युलर चे भटकळ हे मौजेचे उत्तम तत्व आणि मौजे ने नाकारलेले किंवा सामाजिक आशयप्रधान साहित्य या दोघांचा उत्कृष्ट balance पॉप्युलर ने केला असे माझे मत आहे. एकीकडे ग्रेस यांचे सर्व साहित्य आणि एकीकडे नेमाडे यांचे साहित्य पॉप्युलर सारखी संस्था प्रकाशित करू शकते हे भटकळ यांचे greatness आहे विशाल साहित्यिक दृष्टिकोन आहे. Best of both worlds मौज चां दमदार विरोधी बाजूचा काउंटर प्रवाह प्रकाशित करणारी संस्था बघू गेलो तर सर्वात वर लोक vangmay गृह हे आहे. ही साम्यवादी मंडळींची संस्था आहे पण अतिशय दमदार सकस साहित्य निर्मिती इथे होते. राजहंस ही पॉप्युलर चा पाया प्रेरणा असलेली संस्था आहे. पण त्याहून अधिक चे वैशिष्ट्य म्हणजे ती आधुनिक आणि खऱ्या अर्थाने पॉप्युलर साहित्या ची सुद्धा प्रकाशन करणारी आहे. गंमत म्हणजे मौज आणि पॉप्युलर हे जसे नावाच्या विरुद्ध गंभीर साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्था आहेत. Lokwvangmay गृह नावाला जगते. पद्मगंधेचा कल हा संशोधनात्मक वैचारिक स्वरूपाच्या साहित्य कडे अधिक आहे. (या सर्वांनी या प्रकाशक मी लेखक घडवले असे म्हणणे हा सर्व महान लेखकांचा अपमान आहे ) मला स्वतःला भागवत फार snobbish elite वाटतात. त्यापेक्षा मला भटकळ जवळचे वाटतात. भागवत मला गमतीने कधी कधी fountain head कादंबरीतील ellsworth toohey पात्रासारखे भासतात. काही लेखक स्वतः च प्रकाशित होतात जसे उत्तम कसदार लेखन असले तरी आणिंकही ठिकाणी पूर्णपणे प्रचारी चुकीचे असले तरी आ हा साळुंखे वगैरे स्वतःची पुस्तके स्वच्छ छापतात. उद्धव शेळके धग कार स्वतः प्रकाशन संस्था चालवत त्यांची परिस्थिती हलाखीची होती पुस्तक विक्री हा पोटाचा व्यवसाय होता असेही आहेत काहींप्रकाशक. प्रास प्रकाशन सारखे अशोक शहाणे सारखे अतिशय मनस्वी प्रकाशक ज्यांनी अरुण कोल्हटकरांच्या अद्भुत सुंदर कविता अतीव सुंदर रीतीने प्रकाशित केल्या या कवितेच्या पुस्तकांचा कागद त्यांचा रंग त्यांचा आकार सर्व काही वेगळा प्रयोगशील आणि फार काबील ए तारीफ असा आहे. याला म्हणतात साहित्यावरील प्रेम. निर्मितीं मूल्ये राजहंस ची उत्कृष्ट आहेत .मेहता प्रकाशन प्रामुख्याने अनुवादित साहित्य प्रकाशित करते आणि बिकने वाला मालं त्यांची काही साहित्यिक धारणा असेल असे वाटत नाही. श्री गजानन बुक डेपो म्हणजे महाराष्ट्राचा गीता प्रेस सारखा अवतार काहीसा. शब्दालय हे श्रीरामपूर सारख्या आडगावचे प्रकाशन पण भारी पुस्तके प्रकाशित करतात विलास सारंग आदनची सुद्धा. पेंग्विन सारख्या जागतिक प्रकाशनाने एक उत्तम.मराठी कथांचे संकलन प्रसिद्ध केले होते. ते कौतुकाने घेतले. निशिकांत मिरजकर हे संकलक होते उत्तम कथा पण पुस्तकात इतक्या ढिगाने व्याकरण आणि शब्द यांच्या चुका होत्या की माझ्या या प्रतिसादाला तुम्ही चक्क निर्दोष म्हणाल.त्यावर मेघना पेठे यांनी पेंग्विन ची खूप खेचली होती. मराठीत आहे तर काहीही छापा अशी चूक पठ्ठे इंग्रजीत करतील का ? अंतर्नाद चे प्रकाशन मौजे च्या सत्यकथे ला टक्कर होते. कॉम्रेड भानू काळे हे थोर साहित्यिक जाण असलेले प्रकाशक होते. अंतर्नाद बंद करावे लागले याची मोती खंत आहे सध्या नव्या दमाचे पपायरस प्रकाशन सुंदर आणि उत्कृष्ट लेखन घेऊन येत आहे.

In reply to by मारवा

Bhakti 27/07/2025 - 20:21
खुपच सुंदर प्रतिसाद!मला म्हणून मिपावर लेख लिहायला आवडतात.नाहीतर ही माहिती माझ्यापर्यंत यायला अजून पाच वर्षे लागली असती :) लोकवाङमयची पुस्तकं हा समाज हुंकार आहे.आ.ह.साळुंखे म्हणजे लोकायत संस्था.होय पपायरस प्रकाशनही उत्तम पुस्तकं छापित आहेत.

पुस्तक जाऊ दे खड्ड्यात, म्हणजे ते आधीच गेलेले आहे पण मला एक प्रश्न पडला आहे की प्रकाशकांना परवडते कसे अशी पुस्तके प्रकाशित करणे ? मराठी प्रकाशन व्यवसायातील कोणाला तरी बोलावून पॉडकास्ट करायला मजा येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 23/07/2025 - 14:20
काय माहीती नाही? पॉप्युलर प्रकाशन आहे. अवांतर पण प्रकाशक आणि लेखक यांच्यातील मधुर नात्यांचं एक उदाहरण पुन्हा समजले.पद्मगंधा चे जाखडे हे २१ जुलैला रा.चि.ढेरे यांच्या जन्मदिनी त्यांचे एकतरी पुस्तक पुर्नप्रकाशन करतात.नरहर कुरुंदकर म्हटले की देशमुख आणि कंपनी अजोड नातं होतं.गो.नी.दांडेकर आणि मृण्मयी प्रकाशन आहेच. हरारी,डारियस प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद, अच्युत गोडबोले म्हटलं की मधुश्री प्रकाशन समीकरण दिसते. अजून आठवलं की सांगते.

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 06:09
गोनीदा आणि मॅजेस्टिक हे नातं होतं. त्यांची बहुतेक पुस्तकं मॅजेस्टिकची आहेत. मृण्मयी प्रकाशन ही त्यांच्या मुलीची, वीणा देव यांची प्रकाशन संस्था आहे जी गोनीदांची पुस्तके आता पुन:प्रकाशित करत आहे

In reply to by प्रचेतस

Bhakti 26/07/2025 - 10:46
अच्छा! मृण्मयी वीणा देव यांचे हे माहिती होतं.पण वाटलं सुरूवात गोनीदा यांनी केली असेल. पु.लं.ची पुस्तके मौज प्रकाशनाची दिसत आहेत.दुर्गाबाईंची वरदा प्रकाशनाची आहेत,पण पैसे,दुपानी,ऋतूचक्र इतर प्रकाशनाची आहेत.प्रसिद्ध पुस्तकांचे हक्क मिळवण्यासाठी नंतर चढाओढ असते असे वाचलं होतं.

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 11:13
रामदास भटकळांचे पॉप्युलर, श्री पु भागवतांचे मौज, कोठावळ्यांचे मॅजेस्टिक, माजगावकरांचे राजहंस, अनंतराव कुलकर्ण्यांचे कॉन्टिनेन्टल ह्या जुन्या प्रकाशन संस्थांनी अनेक दर्जेदार लेखक घडवून पुस्तकेही दर्जेदार दिली असे म्हणता येईल. ह्या संस्था उत्तम लेखक जिव्हाळ्याने राखून ठेवण्यासाठी देखील प्रसिद्ध होत्या आणि आहेत. वरदाच्या ह. अ. भावेंनी प्राचीन साहित्य मराठीत आणून आतबट्ट्याचाही व्यवहार केला असे म्हणता येईल. मराठी वाचकांवर ह्यांचे मोठे ऋण आहे. आता मात्र तसे लेखक राहिले नाहीत आणि मेहतांसारख्या तद्दन बाजारु प्रकाशन संस्था सध्या जोरात कार्यरत आहेत. मात्र त्यांनी देखील भैरप्पांची पुस्तके मराठीत आणून मोठे कार्य केले आहे असे म्हणता येईल.

चौथा कोनाडा 23/07/2025 - 13:41
आटोपशीर आणि सुंदर ओळख. मी पहिले तीनही भाग वाचलेले आहेत.. काही ठिकाणी रटाळपणा नक्कीच अनुभवायला येतो.. कादंबऱ्यांमध्ये सुद्धा पुनरुक्ती जाणवत राहते. पण त्या रटाळपणासहित कादंबऱ्या आवडून जातात.. मनात घर करून राहतात. ही सुद्धा यादीच आहे.. अजून योग आलेला नाहीये. ही तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकली?

कपिलमुनी 25/07/2025 - 21:35
रामूने सत्या बनवला.. मग सत्यासारखं काहीतरी बनवायचा म्हणून ढीगभर पिक्चर केले.. नेमाडेंनी कोसला लिहिली..मग कोसला सारखा काहीतरी लिहायचा म्हणून हिंदू लिहिली.

यांची कोसला खुप लोकांना आवडले. माझ्या संग्रहात आहे पण कधीही वाचायला घेतल्यावर एकदोन पानाच्या पुढे प्रगती होत नाही. तेच भैरप्पांचे अनुवादित पुस्तक एका बैठकीत संपते. असो. किंडलपेक्षा कागदी पुस्तके आवडतात. नवीन आणले की त्याचा येणारा वेगळाच सुवास लहानपणीच्या नवीन शाळेची पुस्तके आठवतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 26/07/2025 - 10:54
भैरप्पा _/\_ सध्या ' पर्व 'ऐकायला सुरूवात केली आहे.माझं आताच भैरप्पांच्या कादंबरीबरोबर नातं निर्माण झालंय.आवरण,वंशवृक्ष अक्षरशः वेड लावलं.त्यांच्या कानडी कादंबरींचा भावानुवाद मराठीत करून उमा कुलकर्णी यांनी वाचकांसाठी खुप खुप बहुमोल कार्य केले‌ आहे _/\_

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 11:22
जा ओलांडूनी, सार्थ, पारखा ह्या देखील उत्कृष्ट कादंबर्‍या आहेत, त्या आवर्जून वाचा. कन्नड कादंबर्‍यांमुळे मी तर भारावून गेलोय. अफलातून चित्रण असते. शिवराम कारंथांची पुस्तके तर आवर्जून वाचा, मुकज्जी, अशी ही धरणीची माया, चोमा महार, डोंगराएव्हढा ह्या त्यांच्या एकाहून एक सरस कादंबर्‍या आहेत. ह्या शिवाय अनंतमूर्ती ह्यांची संस्कार, रावबहादूर कुलकर्णी ह्यांची ग्रामायण, गोपाळकृष्ण पै यांची स्वप्न सारस्वत ह्या सर्वच कादंबर्‍या आवर्जून वाचण्यासारख्या आहेत.

In reply to by प्रचेतस

अंजावर चकटफू पडफ मिळाले. तीनशे पानं एका सटक्यात वाचली. महाभारतावरील एक वेगळा दृष्टिकोन आवडला म्हणून अमेझोन वरून मागवले. नंतर तुमच्याच (प्रचेतस, ) शिफारशीनुसार बाकीची अक्षरधारामधे खरेदी केली. सर्व चांगली आहेत.. कारंथांची मागवतो. सध्या फोटोग्राफी चा नाद लागलाय. अधुनिक तंत्रज्ञानामुळे बरेच फोटो बरेच येतात पण जरा शास्त्रशुद्ध शिकावे म्हणून डाॅक्टर कात्रे यांचे डिजीटल फोटोग्राफी हे पुस्तक मागवले आहे.

श्वेता२४ 26/07/2025 - 13:14
म्हणून ऑफीसच्या पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक खरेदी करणार एवढ्यात माझ्या वरीष्ठांनी माझ्यकडे आहे घेउ नका म्हणाले. नंतर त्यांनी आणून दिले. काही पाने वाचूनच ही पुस्तक पूर्ण होणर नाही याची खात्री पटली. पुस्तक परत केले व पैसे वाचवल्याबद्दल सरांना चहा दिला. :))

मारवा 27/07/2025 - 19:42
मौज प्रकाशनाने नेमाडे यांचे महत्व ओळखण्यात चूक केली. माझ्या माहितीप्रमाणे कोसला चा पहिला खर्डा मौजेकडे गेला होता व तो नाकारण्यात आला होता चूकभूल देणे घेणे. मौजे च्या प्रकाशकांचा एक साहित्यविषयक विशिष्ट दृष्टीकोन होता. कलात्मक सौंदर्य त्यात ते महत्वाचे मानत. त्यांना सामाजिकतेचे वावडे होते असे नव्हे.पण त्यांना मूलभूत कलात्मक सौंदर्य साहित्यिक मूल्य जे घाट शैली आशय संदर्भात आहे ते अधिक मोलाचे वाटत. कलेसाठी कला या बाजूचे मौज प्रकाशन होते. पण त्यांनी या मर्यादेमुळे एकीकडे अनेक चांगलेनलेखन नाकारले हे जसे खरे आहे तसेच भागवत आदींनी त्यांच्या साहित्य तत्वांचा अंगीकार असलेले अतिशय सकानसुंदर साहित्य सुद्धा प्रकाशित करून एकूण मराठी साहित्य समृद्ध केले. श्रीपु एकदा म्हणाले की आम्ही काय नाही दिले पेक्षा काय दिले प्रकाशिले त्यावरून आमचं मूल्यमापन करावे पॉप्युलर चे भटकळ हे मौजेचे उत्तम तत्व आणि मौजे ने नाकारलेले किंवा सामाजिक आशयप्रधान साहित्य या दोघांचा उत्कृष्ट balance पॉप्युलर ने केला असे माझे मत आहे. एकीकडे ग्रेस यांचे सर्व साहित्य आणि एकीकडे नेमाडे यांचे साहित्य पॉप्युलर सारखी संस्था प्रकाशित करू शकते हे भटकळ यांचे greatness आहे विशाल साहित्यिक दृष्टिकोन आहे. Best of both worlds मौज चां दमदार विरोधी बाजूचा काउंटर प्रवाह प्रकाशित करणारी संस्था बघू गेलो तर सर्वात वर लोक vangmay गृह हे आहे. ही साम्यवादी मंडळींची संस्था आहे पण अतिशय दमदार सकस साहित्य निर्मिती इथे होते. राजहंस ही पॉप्युलर चा पाया प्रेरणा असलेली संस्था आहे. पण त्याहून अधिक चे वैशिष्ट्य म्हणजे ती आधुनिक आणि खऱ्या अर्थाने पॉप्युलर साहित्या ची सुद्धा प्रकाशन करणारी आहे. गंमत म्हणजे मौज आणि पॉप्युलर हे जसे नावाच्या विरुद्ध गंभीर साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्था आहेत. Lokwvangmay गृह नावाला जगते. पद्मगंधेचा कल हा संशोधनात्मक वैचारिक स्वरूपाच्या साहित्य कडे अधिक आहे. (या सर्वांनी या प्रकाशक मी लेखक घडवले असे म्हणणे हा सर्व महान लेखकांचा अपमान आहे ) मला स्वतःला भागवत फार snobbish elite वाटतात. त्यापेक्षा मला भटकळ जवळचे वाटतात. भागवत मला गमतीने कधी कधी fountain head कादंबरीतील ellsworth toohey पात्रासारखे भासतात. काही लेखक स्वतः च प्रकाशित होतात जसे उत्तम कसदार लेखन असले तरी आणिंकही ठिकाणी पूर्णपणे प्रचारी चुकीचे असले तरी आ हा साळुंखे वगैरे स्वतःची पुस्तके स्वच्छ छापतात. उद्धव शेळके धग कार स्वतः प्रकाशन संस्था चालवत त्यांची परिस्थिती हलाखीची होती पुस्तक विक्री हा पोटाचा व्यवसाय होता असेही आहेत काहींप्रकाशक. प्रास प्रकाशन सारखे अशोक शहाणे सारखे अतिशय मनस्वी प्रकाशक ज्यांनी अरुण कोल्हटकरांच्या अद्भुत सुंदर कविता अतीव सुंदर रीतीने प्रकाशित केल्या या कवितेच्या पुस्तकांचा कागद त्यांचा रंग त्यांचा आकार सर्व काही वेगळा प्रयोगशील आणि फार काबील ए तारीफ असा आहे. याला म्हणतात साहित्यावरील प्रेम. निर्मितीं मूल्ये राजहंस ची उत्कृष्ट आहेत .मेहता प्रकाशन प्रामुख्याने अनुवादित साहित्य प्रकाशित करते आणि बिकने वाला मालं त्यांची काही साहित्यिक धारणा असेल असे वाटत नाही. श्री गजानन बुक डेपो म्हणजे महाराष्ट्राचा गीता प्रेस सारखा अवतार काहीसा. शब्दालय हे श्रीरामपूर सारख्या आडगावचे प्रकाशन पण भारी पुस्तके प्रकाशित करतात विलास सारंग आदनची सुद्धा. पेंग्विन सारख्या जागतिक प्रकाशनाने एक उत्तम.मराठी कथांचे संकलन प्रसिद्ध केले होते. ते कौतुकाने घेतले. निशिकांत मिरजकर हे संकलक होते उत्तम कथा पण पुस्तकात इतक्या ढिगाने व्याकरण आणि शब्द यांच्या चुका होत्या की माझ्या या प्रतिसादाला तुम्ही चक्क निर्दोष म्हणाल.त्यावर मेघना पेठे यांनी पेंग्विन ची खूप खेचली होती. मराठीत आहे तर काहीही छापा अशी चूक पठ्ठे इंग्रजीत करतील का ? अंतर्नाद चे प्रकाशन मौजे च्या सत्यकथे ला टक्कर होते. कॉम्रेड भानू काळे हे थोर साहित्यिक जाण असलेले प्रकाशक होते. अंतर्नाद बंद करावे लागले याची मोती खंत आहे सध्या नव्या दमाचे पपायरस प्रकाशन सुंदर आणि उत्कृष्ट लेखन घेऊन येत आहे.

In reply to by मारवा

Bhakti 27/07/2025 - 20:21
खुपच सुंदर प्रतिसाद!मला म्हणून मिपावर लेख लिहायला आवडतात.नाहीतर ही माहिती माझ्यापर्यंत यायला अजून पाच वर्षे लागली असती :) लोकवाङमयची पुस्तकं हा समाज हुंकार आहे.आ.ह.साळुंखे म्हणजे लोकायत संस्था.होय पपायरस प्रकाशनही उत्तम पुस्तकं छापित आहेत.
गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :) हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे .

निसर्गायण (ऐसी अक्षरे -३०)

Bhakti ·

In reply to by श्वेता व्यास

Bhakti 21/07/2025 - 19:36
धन्यवाद श्वेता.व्यक्तीनिष्ठता नैतिक वैचारिक घडवून आणल्यास हळूहळू जागतिक गोंधळ कमी होऊन भोगवादी होण्याऐवजी,निसर्गाच्या‌ ऋणात व्यक्ती येईल,असे पुस्तकात सुचवले आहे.समोरचा करत नाही तर मी का सुरुवात करू ही वृत्ती बदलली पाहिजे.

In reply to by श्वेता व्यास

Bhakti 21/07/2025 - 19:36
धन्यवाद श्वेता.व्यक्तीनिष्ठता नैतिक वैचारिक घडवून आणल्यास हळूहळू जागतिक गोंधळ कमी होऊन भोगवादी होण्याऐवजी,निसर्गाच्या‌ ऋणात व्यक्ती येईल,असे पुस्तकात सुचवले आहे.समोरचा करत नाही तर मी का सुरुवात करू ही वृत्ती बदलली पाहिजे.
निसर्गायण लेखक- दिलीप कुलकर्णी. १ जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे. हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो.

वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 15/07/2025 - 14:01
समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेल्या मार्गाचे अवलंबन केले तर आयुष्यात संपन्न आणि वैभवशाली बनता येते. याशिवाय दासबोध वाचल्याने किडलेले विचार मनात येत नाही. मानसिक उन्नती होते आणि डोक्यातला केमिकल लोचा दूर करण्यास मदत होते

विवेकपटाईत 15/07/2025 - 14:01
समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेल्या मार्गाचे अवलंबन केले तर आयुष्यात संपन्न आणि वैभवशाली बनता येते. याशिवाय दासबोध वाचल्याने किडलेले विचार मनात येत नाही. मानसिक उन्नती होते आणि डोक्यातला केमिकल लोचा दूर करण्यास मदत होते
जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे.

खडपाकोळी

कर्नलतपस्वी ·

सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस 03/07/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.

सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस 03/07/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी राखू कशी, अंगावरली ? राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!! कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील. सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो. पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.