मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हातारा न इतूका....

कर्नलतपस्वी ·

Bhakti 19/06/2025 - 10:52
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..

सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.

फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.

Bhakti 19/06/2025 - 10:52
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..

सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.

फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.
लेखनविषय:
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली.

गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

Bhakti ·

प्रचेतस 19/06/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/06/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_

प्रचेतस 19/06/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/06/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_
लेखनविषय:
गीतारहस्य-७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्‌धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्‌धांताला अद्वैत सिद्‌धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे. सांख्य शब्दाचा अर्थ- १.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले. २.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे) असा व्यापक अर्थ बनला. ३.ईश्वरकृष्णाचा (इ.स.

भारतीय संगीतातली साथसंगत आणि कांही अनोखे प्रयोग

सुधीर कांदळकर ·

लेख वाचताना माझ्या मनातही असाच विचार आला की लेखकाने कुठल्या धुदींत हा लेख लिहीला असावा? कमीत कमी तीन चार वेळातही वाचला पाहिजे. वाचताना पं जयतिर्थ मेवूंडी आणी कौशीकी यानी गायलेले "बाजे रे मुरलिया" गाणे आठवले. गाण्याच्या आगोदर मेवूंडी व कौशिकी यांचा संवाद मनाला भुरळ घालतो. तसे हे गाणे पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांनी अजरामर करून ठेवले आहे . मेवूंडी,कौशिक यांच्या जोडीने तेव्हढ्याच ताकदीने पेलले आहे. https://youtu.be/DwvWvjszKas?si=_3WbFcaosKOXZC7b धन्यवाद. गागाण्यातले काही कळत नाही पण कानाला गोड वाटते म्हणून जीवाला ओढ लागते.

मारवा 15/06/2025 - 09:08
सुधीरजी भारतीय संगीतावरील तुमचे उत्कट प्रेम जाणवते. तुम्ही दिलेले दुवे पण मेजवानी आहेत. मी कौशिकीपेक्षा त्यांच्या वडिलांचा अजॉय चक्रवर्ती यांचा फॅन आहे. जगजितसिंग सुद्धा कौशिकी प्रमाणे नेहमीच त्यांच्या सहकलाकारांना मानाची वागणूक देत असत. या गायकांचं हे वेगळेपणं उठून दिसतं. लेखाचा विषय साथ सांगत आहे तरीही ध्रुपद गायक उदय भवाळकर यांचा हा दरबारी तुम्ही ऐकलाय का ? https://youtu.be/gBHZmbyyynU?si=GZWRS5FW2K500_Dj अतीव सुंदर असा आहे.

सुंदर लेख ! कौशिकी चक्रवर्ती माझ्या आवडत्या गायिका आहेत. मी पहिल्यांदा युट्यूबवर त्यांच्याच ध्वनिफिती पाहिल्या. त्यांच्या वडीलांच्या नंतर. दोन्ही अतिशय उत्तम गायक आहेत. या निमित्ताने सारेगामा लिटील चॅप्स मधून पुढे आलेली बाल गायिका आर्या आंबेकर हिने गायलेलेलं "सहेला रे" आठवलं. वयाच्या मानाने चांगले गायलयं.

In reply to by कर्नलतपस्वी

हे गाणेच मुळी स्वतंत्र लेखाचा विषय आहे. फार कमी गायक हे गाणे गातात आणि त्यातही अपेक्षित उंची गाठू शकतात. पं. भीमसेन जोशी यांसारख्या कलाकारांनी हे गाणे वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. एकदम घरगुती वाटणार्‍या कार्यक्रमात आर्या आंबेकरने गायलेले हे गाणे पहा. साथीला असणारे कलाकारही दिग्गज आहेत. तबल्यावर भरत कामत, पेटीवर तन्मय देवचके आणि टाळ वादन करणारे माउली टाकळकर सुद्धा. https://www.youtube.com/watch?v=UeQtfXbs8gc बाकी लेखाबद्दल काय बोलावे? बर्‍याच दिवसांनी मिपावर असा तब्येतीत लिहिलेला लेख (ए आय वगैरे कुबड्या न वापरता) बघितला आणि भरुन आले. असे अभ्यासपूर्ण लेख वाचणे हीच आमच्यासारख्या कानसेनांना मेजवानी. लिहित रहा.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

विजुभाऊ 15/06/2025 - 21:46
ऐकताना आपनी श्रीमंती कित्येक पटीने वाढलेली असते. फक्त ऐकताना हेडफोन किंवा मोठ्या स्पीकरवर ऐका. आसपासचा विसर पडतो. बासरी आणि मृदुंगही आनंदात भर घालतात

सुक्या 16/06/2025 - 00:14
सुंदर लेख. आसे लेख मिपा वर यायला हवे. जगजित सिंह, पं झाजिर हुसैन, पं हरीप्रसाद चौरासिया यांचे गायन / वादन प्रत्यक्ष अनुभवनाची संधी मिळाली असल्याने मैफिली चे वातावरण अनुभवले आहे. पं हरीप्रसाद चौरासिया यांच्या कार्यक्रमात तर ते बासरी वाजवत असताना लोक ईतके मंत्रमुग्ध झाले की त्यांचे वादन संपले तरी सारा हॉल स्तब्ध बसुन राहीला ... मग स्वतः हरीप्रसाद चौरासिया यांनी सांगीतले की या रागाचे वादन संपले आहे. मग कुठे लोक भानावर आली नी टाळ्या वाजवत राहीली. नवीन पीढी ची नव्या दमाचे वादक / गायक आता दिसायला लागले आहेत. वारसा चालवत आहेत. मला आवडलेल्या अभंगापैकी हा एक. विश्वजित बोरवण्कर. https://www.youtube.com/watch?app=desktop&v=o8vEdhKHMms&t=0s

वेढा वेढा रे बोरवणकरांनी अप्रतिम गायले आहे. अनेक वेळा ऐकले तरी गोडी अवीट. मंजुषा कुलकर्णी पाटील अशीच उभरती कलाकार. मास्टर कृष्णराव आणी राम मराठे यांनी गायलेला "परब्रह्म निष्काम तो हा",नामदेवांचा अभंग अतिशय सुंदर गायला आहे. https://youtu.be/BeZS_9du3Og?si=HK80SgeOYLOMx3LP बादवे, वेढा वेढा वर राजकिय विडंबन मिसळपाव वर आहे कदाचित आवडेल. ज्याहीरात केली. https://misalpav.com/node/51141

In reply to by कर्नलतपस्वी

सुक्या 16/06/2025 - 08:39
तुमचा बेतुक्याचे चऱ्हाट कसा काय सुटला बॉ? आज वाचली कवीता :). जुणी असली तरी अगदी समयोचित कविता होती ... भारतीय संगीतकारांची अजुन एक जमेची बाजु म्हणजे त्यांचा रियाज. रियाज करुन करुन त्यांच्ये सुर / ताल ईतके घट्ट झालेले असतात की समोर त्यांना कागद लागतच नाही. पं झाकीर हुसेन, कमला रमानाथ व जयन्ति कुमारेश यांची मैफील बघायला मी सहकुटूंब गेलो असता, दोन तास तिन्ही संगीतकारांनी कुठलाही स्कोर न बघता अप्रतीम पर्फॉर्मन्स दिला त्याचे माझ्या मुलीला खुप अप्रुप वाटले होते. अजुन गंम्म्त म्हणजे सारा कार्यक्रम झाल्यावर, तिघेही स्टेज वरुन निघुन गेले. लोक मात्र तसेच उभे राहुन जवळ्पास १० मिनिटे टाळ्या वाजवत होते. ते पाहुन पं. झकिर हुसेन दोन्ही कलाकारंसोबत परत स्टेज वर आले व त्यांनी १५ मिनिटे अजुन एक अप्रतिम राग सादर केला. केवळ अप्रतीम.

युयुत्सु 16/06/2025 - 18:19
कौशिकी चक्रवर्ती या बाईंबद्दल इतकं उत्कटेने लिहीलेले वाचून मला भडभडून आलं. यांच्या पुण्यात प्रवेशबंदी आणि गायनबंदी घालावी अशा मताचा मी आहे.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 17/06/2025 - 09:56
प्रत्येकाची आवडनिवड असू शकते वेगळी. आता एखाद्याला जर अमरीशपुरीने म्हंटलेला राग दरबारी कानडा आवडत असेल आणि त्यापुढे इतर सर्व फिक्के ,इतर कोणी गावू ऐकू नये असे वाटत असेल तर काय बोलावे . पण एव्हरी वन हॅज राइट टू गो राँग....... या वचनावर ठाम विश्वास ठेवून चालतोय अजूनही. असो.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 10:16
हो, हो नक्कीच! प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक भेटला पाहिजे आणि प्रत्येक गायकाला त्याचा श्रोता मिळायलाच हवा! पण पुण्याच्या गायनसंस्कृतीला विटाळणारे कलाकार वेशीबाहेर असावेत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 18/06/2025 - 10:29
प्रत्येकाचे मत हे घड्याळासारखे असते. प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर. त्यातून काही लोकांचा नुसता असा विश्वास नसतो कि आपलेच घड्याळ बरोबर आहे. तर इतरांचे घड्याळ चूकच आहे.

@विजूभाऊ: ऐकण्यासाठी हेडफोन वा होम थिएटर हवेच. धन्यवाद. @ सुक्या: बोरवणकर उत्कृष्टच. धन्यवाद. @ कर्नल तपस्वी: मंजुषाताईंचे गाणे प्रत्यक्ष देखील ऐकले आहे. परब्रह्म ... छान. @मूकवाचकः धन्यवाद.

@अनिंद्यः आपल्या शब्दपारखी नजरेची तारीफ करावी तेवढी थोडीच. अन्यत्र प्रशंसिलेला मोदवर्तमान हा शब्दहीआठवतो आहे. धन्यवाद.

मा. साहित्य संपादक यांस, या लेखातल्या कांही भागामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. तरी कांही मिपकरांच्या तीव्र भावना लक्षांत घेऊन हा संपूर्ण लेख डिलीट करावा ही नम्र विनंती. सुधीर कांदळकर

In reply to by सुधीर कांदळकर

मारवा 17/06/2025 - 21:51
सुधीरजी माझ्यासारख्या अनेकांच्या भावना हबलेख वाचून सुखावल्या देखील आहेत. त्यामुळे हा लेख राहू द्यावा. प्रत्येकाचे एकमत व्हावे ही अपेक्षाच चुकीची आहे. लेख कुठलाही असो उडविण्याची गरजच नाही. लेख हा व्हिडिओ सारखा आढळत नसतो तो वाचणे न वाचणे किंवा वाचून सोडून देणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. आपण लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम केले. गाढवाला गुळाची चव नसते त्यात गुळाचा काय दोष.? जसा गुळ आपला गोडाचा गुणधर्म सोडत नाही तसेच आपणही लिहीत रहा. अशाच सुंदर लेखाच्या प्रतिक्षेत असलेला कानसेन.

विजुभाऊ 17/06/2025 - 17:00
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. नेहमीप्रमाणे ते कारण त्यानाही अज्ञातच असते. काळजी करू नका. तुमचे लिखाण मस्त आहे. सौंदर्यचा आस्वाद घेण्याच्या प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असते. सुंदरीच्या गालावरच्या तीळाला, गालबोट म्हणणारे महाभाग सर्वत्र असतात.

काय संतुलित प्रतिसाद, आगदी तुकोबारायांचा अभंग आठवतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्या आधी. मला कधी जमेल हे माहीत नाही.

मूकवाचक 17/06/2025 - 23:04
कौशिकी चक्रवर्ती या पं. अजय चक्रवर्ती यांची पतियाळा घराण्याची परंपरा पुढे चालवत आहेत. पतियाळा घराणे म्हणजेच उस्ताद बडे गुलाम अली असे एक समीकरण देखील रसिकांच्या मनात पक्के ठसलेले आहे. घरंदाज गायकीबद्दल कित्येक दशकांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्याचा सारांश आजही लक्षात आहे. तपशील थोडाफार चुकू शकेल, पण त्यातले विश्लेषण साधारणपणे असे आहे: किराणा घराणे स्वरप्रधान - सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल गया अशी या घराण्याची पहचान काही लोक करून देतात. आग्रा घराणे लयकारी प्रधान - ताल आणि लयीत 'जहांबाज' असलेले गायक अशी या घराण्याची ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्यात स्वर आणि ताल दोन्हींना समतोल महत्व आहे, पण गायकी बरीच सरधोपट किंवा सुगम आहे. जयपूर घराण्यात स्वर आणि ताल यांचा बुद्धीप्रधान, काहीसा समजायला क्लिष्ट पण सौंदर्यप्रधान असा मिलाफ आहे. ही चार प्रमुख घराण्यांची खासियत. या पुस्तकात पतियाळा घराण्याच्या गायकीबद्दलचे मतप्रदर्शन साधारण या धर्तीवर आहे - गायकीमधली 'तयारी' या बाबतीत पतियाळा घराण्याची बरोबरी करायला कुणीही धजावणार नाही. विलक्षण तयारी बरोबरच गायकीतले सगळे प्रकार (शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत वगैरे) तितक्याच समर्थपणे पेलणे हे काम देखील प्राधान्याने पतियाळा घराण्यातल्या गायकांनीच केलेले आहे. चमत्कृतीप्रधान गाण्याकडे कल असल्याने, काही वेळा या चमत्कृतींचा अनाठायी वापर केल्याने गाण्यातून रसनिर्मिती होत नाही, भाव निर्मिती होत नाही असा आक्षेप पतियाळा घराण्याच्या गायकांवर पूर्वापार होत आलेला आहे. कौशिकी चक्रवर्ती यांचा आणि त्यांच्या टीकाकारांचा जन्म होण्यापूर्वीपासून अशी टीका होत आलेली आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. पतियाळा घराण्याचा एकही गायक अशा टीकेने विचलीत झालेला नाही. या गायकांनी आपल्या तयारी, कल्पकता आणि रसिकांचे प्रेम या जोरावर मैफिली गाजवलेल्या आहेत, पद्म पुरस्कार वगैरेंना गवसणी घातलेली आहे. आजचे शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल (विचार) गायकी. यात व्यक्तिपरत्वे भिन्नता असणारच. वानगीदाखल सांगायचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायकीतून 'सरगम' हा प्रकार वर्ज्य मानलेला होता, तर डॉ. प्रभा अत्रे 'सरगम' विषयी कित्येक तास भरभरून बोलू शकतील इतके त्यांचे सरगम वर प्रेम होते, व्यासंग होता. तेव्हा थोडा साक्षेप बाळगत विचार केला, तर टोकाचे मतप्रदर्शन करण्याची गरज उरणार नाही. पण यातही व्यक्तिपरत्वे भिन्नता असायचीच. असो.

सुबोध खरे 18/06/2025 - 10:41
@सुधीर कांदळकर आपण लेख अप्रतिम लिहिला आहे. यातील अनेक कलाकारांचे गायन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. मला संगीतात काहीही कळत नाही राग ओळखता येत नाही परंतु शास्त्रीय संगीत तीन चार तास सलग ऐकू शकतो इतकं आवडतं. उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत हे जास्त आवडतं. अर्थात आपण लिहिलंय तसं उत्कटपणे लिहिणं सुद्द्धा जमत नाही. आपण लिहीत रहा. काही विघ्न संतोषी लोक सर्वत्र असतातच. आता औरंगजेब ९० वर्षे जगला म्हणजे त्याचे वंशज पण बरेच असणार. तुम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. आणि लिहीते राहा

धन्यवाद. मारवा, सुक्या, कर्नल तपस्वी, विजूभाऊ, मूकवाचक, डॉ. खरेसाहेब, सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. आता सत्तरीपार गेल्यानंतर मला आयुष्यात आणखी काहीही कमवायचे नाही. जरी रक्तदाब हृदय सारे सामान्य असले तरी आता मानसिकदृष्ट्या माझ्यात काहीही फायटिंग स्पिरीट राहिलेले नाही. आयुष्यातले उरलेले दिवस मस्त मनोरंजनात घालवायचे एवढाच उद्योग आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या संस्कृतीत नम्रता, सौजन्य या गोष्टींना सर्वांत वरचे स्थान आहे. उच्च स्थानी पोहोचलेल्या एखाद्या गायक्/वादक मान्यवराला जर आपण एखाद्या नवोदित कलाकाराबद्दल मत विचारले तर माझ्यापेक्षा चांगला गातो/गाते किंवा वाजवतो/वाजवते असे विनम्र उत्तर मिळते हा माझा अनुभव आहे. एखाद्या मान्यवराच्या एखाद्या मैफिलीला आपण गेलों आणि त्याच शहरात जर एकदोन दिवसातच दुसया मैफिलीला गेलो आणि त्या मान्यवर कलाकाराची आपल्यावर नजर पडलीच तर परवाच्या मैफिलीला पण आपण होतांत ना? अशी चौकशी केली जाते. असा सामान्य रसिकाचाही आदर ठेवणार्‍या संस्कृतीत असे काही घडते याचा मला सध्या फार मोठा धक्का बसला आहे. द्वेषाधिष्ठित विचारसरणी पाहून मन नक्कीच उद्विग्न होते. पण चालायचेच. कालाय तस्मै नम:. आपणा सर्वांसारखी तसेच इतर बहुसंख्य मिपाकरांसारखी चांगली माणसे अजून आहेत म्हणून जग चालले आहे यावर माझा विश्वास आहे. पुन्हां एकदा धन्यवाद देतो आणि संगीतातली आणखी सौंदर्यस्थळे शोधायला लागतों.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 18/06/2025 - 18:30
जाऊ द्या हो आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे अहंमन्य कोंबडे जगात कमी आहेत का? आणि आज आपण आरवलो नाही म्हणजे सूर्योदय झालाच नाही असे ठासून सांगणारे कोंबडे सुद्धा बरेच आहेत. कुठे जीवाला त्रास करून घेताय?

In reply to by सुधीर कांदळकर

कांदळकरजी, आपले मवाळ प्रतिसाद वाचून पुरूषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार मधली नाट्यगीते आठवली.. खां साहेब राजगायक बनल्यावर पंडितजींच्या घरात पाय ठेवताच म्हणतात,"या भवनातील मवाळ हळवे सूर,जाऊ द्यात ". भार्गवराम अचरेकरांचे, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद ",याचा ताणा बाणा खां साहेब आपल्या शैलीत पेश करतात. वसंतराव, भारगवराम,बकुल पंडीत,फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, इनामदार असे दिग्गजांकडून सादरीकरण, प्रत्यक्ष ऐकण्याचा अमृतानुभव.. फाट्यावर मारा व लिहीते रहा. सत्तरीत मी पण आहे पण आजही विचारले ",हाऊ इज जोश",तर अपसूक निघते "यस्स सर". तुकोबाराय अशा लोकांसाठी सांगतात, , तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा

विजुभाऊ 19/06/2025 - 09:04
सुधीरजी इतका चांगला लेख लिहीलात. सर्वसामान्य माणसांना जी गोष्ट चांगलीवाटते ती गोष्ट समिक्षकांना वाइट वाटू शकते. त्या बद्दल त्या समिक्षकांत दुमत कधीच नसते. कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते पन म्हणून ते तसे प्रत्यक्षात नसते. (माझ्या एका वचनावर गाढ विश्वास आहे " एव्हरी वन हॅज राईट टी गो राँग " ) कोणीतरी म्हणाले आहे की मोनालीसाच्या चित्रातल्या हास्याचे गूढ म्हणजे तीला बद्धकोष्ठ झाला होता. म्हणणाराला लोकांनी फाट्यावर मारत चित्राचे सौंदर्य महत्वाचे मानले. असो. तुम्ही असेच आणखी काही संगीत क्षण शेअर करा. मजा येईल.

Bhakti 19/06/2025 - 10:58
नादमय सुंदर लेख आहे. सध्या अवचिता परिमळूचे निरूपणासह पारायण सुरु आहे. अवांतर स्वगत Sapphire चे पण पारायण निराळेच ;)

@रामे : धन्यवाद राजेंद्रजी. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भीमसेनजींचे ऐकले होते. एकदां बेळगांव ते व्हाया यल्लापूर कारवार या प्रवासात बस सकाळी सहासाडेसहाला मस्तीकट्टा या गांवात चहासाठी थांबली होती. नुकतेच फटफटत होते. जवळच्या मंदिरात लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर हे गाणे लागले होते. पाठोपाठ कन्नड भाषेतली संतवाणी आपल्यास चालीवर भीमसेन लताच्या आवाजात सुरू झाली होती. तो अनुभव विसरूंच शकत नाही. तुमच्या प्रतिसादाने ही आठवण ताजी केली. अनेक, अनेक, धन्यवाद. आर्याचे आजच ऐकले. आवडले. @ मूकवाचकः आपण विविध घराण्यांतल्या गायनशैलीच्या विषयींच्या वाचनाचा तपशील दिला आहे. तो मी वाचलेला मला आठवतो आहे. बहुधा कुमारांचे गुरुबंधु चंद्रशेखर रेळे यांच्या 'कुमार माझा सखा' या पुस्तकात. वसंतराव देशपांडे खास पंजाब घराण्याच्या गायनशैलीचा अभ्यास करण्यासाठी लाहोरला जाऊन आले असा त्यांनी एका मैफिलीत उल्लेख केल्याचे आठवते. रेळेंचे पुस्तक वाचले तेव्हां आणखी एक सुंदर, संस्मरणीय पुस्तक वाचले होते. आपल्या मनांत ठेवा म्हणून जपून ठेवावे असे. दत्ता मारुलकर यांचे 'अंतर्यामी सूर गवसला'. हे खळेकाकांवर आहे. अनेक आठवणी जागविल्यात अनेक अनेक धन्यवाद. @भक्ती: धन्यवाद भक्तीताई. @विजूभाऊ, कर्नल तपस्वी, डॉ. सुबोध खरेसाहेब : पुन्हा एकदां धन्यवाद.

लेख वाचताना माझ्या मनातही असाच विचार आला की लेखकाने कुठल्या धुदींत हा लेख लिहीला असावा? कमीत कमी तीन चार वेळातही वाचला पाहिजे. वाचताना पं जयतिर्थ मेवूंडी आणी कौशीकी यानी गायलेले "बाजे रे मुरलिया" गाणे आठवले. गाण्याच्या आगोदर मेवूंडी व कौशिकी यांचा संवाद मनाला भुरळ घालतो. तसे हे गाणे पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांनी अजरामर करून ठेवले आहे . मेवूंडी,कौशिक यांच्या जोडीने तेव्हढ्याच ताकदीने पेलले आहे. https://youtu.be/DwvWvjszKas?si=_3WbFcaosKOXZC7b धन्यवाद. गागाण्यातले काही कळत नाही पण कानाला गोड वाटते म्हणून जीवाला ओढ लागते.

मारवा 15/06/2025 - 09:08
सुधीरजी भारतीय संगीतावरील तुमचे उत्कट प्रेम जाणवते. तुम्ही दिलेले दुवे पण मेजवानी आहेत. मी कौशिकीपेक्षा त्यांच्या वडिलांचा अजॉय चक्रवर्ती यांचा फॅन आहे. जगजितसिंग सुद्धा कौशिकी प्रमाणे नेहमीच त्यांच्या सहकलाकारांना मानाची वागणूक देत असत. या गायकांचं हे वेगळेपणं उठून दिसतं. लेखाचा विषय साथ सांगत आहे तरीही ध्रुपद गायक उदय भवाळकर यांचा हा दरबारी तुम्ही ऐकलाय का ? https://youtu.be/gBHZmbyyynU?si=GZWRS5FW2K500_Dj अतीव सुंदर असा आहे.

सुंदर लेख ! कौशिकी चक्रवर्ती माझ्या आवडत्या गायिका आहेत. मी पहिल्यांदा युट्यूबवर त्यांच्याच ध्वनिफिती पाहिल्या. त्यांच्या वडीलांच्या नंतर. दोन्ही अतिशय उत्तम गायक आहेत. या निमित्ताने सारेगामा लिटील चॅप्स मधून पुढे आलेली बाल गायिका आर्या आंबेकर हिने गायलेलेलं "सहेला रे" आठवलं. वयाच्या मानाने चांगले गायलयं.

In reply to by कर्नलतपस्वी

हे गाणेच मुळी स्वतंत्र लेखाचा विषय आहे. फार कमी गायक हे गाणे गातात आणि त्यातही अपेक्षित उंची गाठू शकतात. पं. भीमसेन जोशी यांसारख्या कलाकारांनी हे गाणे वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. एकदम घरगुती वाटणार्‍या कार्यक्रमात आर्या आंबेकरने गायलेले हे गाणे पहा. साथीला असणारे कलाकारही दिग्गज आहेत. तबल्यावर भरत कामत, पेटीवर तन्मय देवचके आणि टाळ वादन करणारे माउली टाकळकर सुद्धा. https://www.youtube.com/watch?v=UeQtfXbs8gc बाकी लेखाबद्दल काय बोलावे? बर्‍याच दिवसांनी मिपावर असा तब्येतीत लिहिलेला लेख (ए आय वगैरे कुबड्या न वापरता) बघितला आणि भरुन आले. असे अभ्यासपूर्ण लेख वाचणे हीच आमच्यासारख्या कानसेनांना मेजवानी. लिहित रहा.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

विजुभाऊ 15/06/2025 - 21:46
ऐकताना आपनी श्रीमंती कित्येक पटीने वाढलेली असते. फक्त ऐकताना हेडफोन किंवा मोठ्या स्पीकरवर ऐका. आसपासचा विसर पडतो. बासरी आणि मृदुंगही आनंदात भर घालतात

सुक्या 16/06/2025 - 00:14
सुंदर लेख. आसे लेख मिपा वर यायला हवे. जगजित सिंह, पं झाजिर हुसैन, पं हरीप्रसाद चौरासिया यांचे गायन / वादन प्रत्यक्ष अनुभवनाची संधी मिळाली असल्याने मैफिली चे वातावरण अनुभवले आहे. पं हरीप्रसाद चौरासिया यांच्या कार्यक्रमात तर ते बासरी वाजवत असताना लोक ईतके मंत्रमुग्ध झाले की त्यांचे वादन संपले तरी सारा हॉल स्तब्ध बसुन राहीला ... मग स्वतः हरीप्रसाद चौरासिया यांनी सांगीतले की या रागाचे वादन संपले आहे. मग कुठे लोक भानावर आली नी टाळ्या वाजवत राहीली. नवीन पीढी ची नव्या दमाचे वादक / गायक आता दिसायला लागले आहेत. वारसा चालवत आहेत. मला आवडलेल्या अभंगापैकी हा एक. विश्वजित बोरवण्कर. https://www.youtube.com/watch?app=desktop&v=o8vEdhKHMms&t=0s

वेढा वेढा रे बोरवणकरांनी अप्रतिम गायले आहे. अनेक वेळा ऐकले तरी गोडी अवीट. मंजुषा कुलकर्णी पाटील अशीच उभरती कलाकार. मास्टर कृष्णराव आणी राम मराठे यांनी गायलेला "परब्रह्म निष्काम तो हा",नामदेवांचा अभंग अतिशय सुंदर गायला आहे. https://youtu.be/BeZS_9du3Og?si=HK80SgeOYLOMx3LP बादवे, वेढा वेढा वर राजकिय विडंबन मिसळपाव वर आहे कदाचित आवडेल. ज्याहीरात केली. https://misalpav.com/node/51141

In reply to by कर्नलतपस्वी

सुक्या 16/06/2025 - 08:39
तुमचा बेतुक्याचे चऱ्हाट कसा काय सुटला बॉ? आज वाचली कवीता :). जुणी असली तरी अगदी समयोचित कविता होती ... भारतीय संगीतकारांची अजुन एक जमेची बाजु म्हणजे त्यांचा रियाज. रियाज करुन करुन त्यांच्ये सुर / ताल ईतके घट्ट झालेले असतात की समोर त्यांना कागद लागतच नाही. पं झाकीर हुसेन, कमला रमानाथ व जयन्ति कुमारेश यांची मैफील बघायला मी सहकुटूंब गेलो असता, दोन तास तिन्ही संगीतकारांनी कुठलाही स्कोर न बघता अप्रतीम पर्फॉर्मन्स दिला त्याचे माझ्या मुलीला खुप अप्रुप वाटले होते. अजुन गंम्म्त म्हणजे सारा कार्यक्रम झाल्यावर, तिघेही स्टेज वरुन निघुन गेले. लोक मात्र तसेच उभे राहुन जवळ्पास १० मिनिटे टाळ्या वाजवत होते. ते पाहुन पं. झकिर हुसेन दोन्ही कलाकारंसोबत परत स्टेज वर आले व त्यांनी १५ मिनिटे अजुन एक अप्रतिम राग सादर केला. केवळ अप्रतीम.

युयुत्सु 16/06/2025 - 18:19
कौशिकी चक्रवर्ती या बाईंबद्दल इतकं उत्कटेने लिहीलेले वाचून मला भडभडून आलं. यांच्या पुण्यात प्रवेशबंदी आणि गायनबंदी घालावी अशा मताचा मी आहे.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 17/06/2025 - 09:56
प्रत्येकाची आवडनिवड असू शकते वेगळी. आता एखाद्याला जर अमरीशपुरीने म्हंटलेला राग दरबारी कानडा आवडत असेल आणि त्यापुढे इतर सर्व फिक्के ,इतर कोणी गावू ऐकू नये असे वाटत असेल तर काय बोलावे . पण एव्हरी वन हॅज राइट टू गो राँग....... या वचनावर ठाम विश्वास ठेवून चालतोय अजूनही. असो.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 10:16
हो, हो नक्कीच! प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक भेटला पाहिजे आणि प्रत्येक गायकाला त्याचा श्रोता मिळायलाच हवा! पण पुण्याच्या गायनसंस्कृतीला विटाळणारे कलाकार वेशीबाहेर असावेत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 18/06/2025 - 10:29
प्रत्येकाचे मत हे घड्याळासारखे असते. प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर. त्यातून काही लोकांचा नुसता असा विश्वास नसतो कि आपलेच घड्याळ बरोबर आहे. तर इतरांचे घड्याळ चूकच आहे.

@विजूभाऊ: ऐकण्यासाठी हेडफोन वा होम थिएटर हवेच. धन्यवाद. @ सुक्या: बोरवणकर उत्कृष्टच. धन्यवाद. @ कर्नल तपस्वी: मंजुषाताईंचे गाणे प्रत्यक्ष देखील ऐकले आहे. परब्रह्म ... छान. @मूकवाचकः धन्यवाद.

@अनिंद्यः आपल्या शब्दपारखी नजरेची तारीफ करावी तेवढी थोडीच. अन्यत्र प्रशंसिलेला मोदवर्तमान हा शब्दहीआठवतो आहे. धन्यवाद.

मा. साहित्य संपादक यांस, या लेखातल्या कांही भागामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. तरी कांही मिपकरांच्या तीव्र भावना लक्षांत घेऊन हा संपूर्ण लेख डिलीट करावा ही नम्र विनंती. सुधीर कांदळकर

In reply to by सुधीर कांदळकर

मारवा 17/06/2025 - 21:51
सुधीरजी माझ्यासारख्या अनेकांच्या भावना हबलेख वाचून सुखावल्या देखील आहेत. त्यामुळे हा लेख राहू द्यावा. प्रत्येकाचे एकमत व्हावे ही अपेक्षाच चुकीची आहे. लेख कुठलाही असो उडविण्याची गरजच नाही. लेख हा व्हिडिओ सारखा आढळत नसतो तो वाचणे न वाचणे किंवा वाचून सोडून देणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. आपण लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम केले. गाढवाला गुळाची चव नसते त्यात गुळाचा काय दोष.? जसा गुळ आपला गोडाचा गुणधर्म सोडत नाही तसेच आपणही लिहीत रहा. अशाच सुंदर लेखाच्या प्रतिक्षेत असलेला कानसेन.

विजुभाऊ 17/06/2025 - 17:00
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. नेहमीप्रमाणे ते कारण त्यानाही अज्ञातच असते. काळजी करू नका. तुमचे लिखाण मस्त आहे. सौंदर्यचा आस्वाद घेण्याच्या प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असते. सुंदरीच्या गालावरच्या तीळाला, गालबोट म्हणणारे महाभाग सर्वत्र असतात.

काय संतुलित प्रतिसाद, आगदी तुकोबारायांचा अभंग आठवतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्या आधी. मला कधी जमेल हे माहीत नाही.

मूकवाचक 17/06/2025 - 23:04
कौशिकी चक्रवर्ती या पं. अजय चक्रवर्ती यांची पतियाळा घराण्याची परंपरा पुढे चालवत आहेत. पतियाळा घराणे म्हणजेच उस्ताद बडे गुलाम अली असे एक समीकरण देखील रसिकांच्या मनात पक्के ठसलेले आहे. घरंदाज गायकीबद्दल कित्येक दशकांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्याचा सारांश आजही लक्षात आहे. तपशील थोडाफार चुकू शकेल, पण त्यातले विश्लेषण साधारणपणे असे आहे: किराणा घराणे स्वरप्रधान - सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल गया अशी या घराण्याची पहचान काही लोक करून देतात. आग्रा घराणे लयकारी प्रधान - ताल आणि लयीत 'जहांबाज' असलेले गायक अशी या घराण्याची ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्यात स्वर आणि ताल दोन्हींना समतोल महत्व आहे, पण गायकी बरीच सरधोपट किंवा सुगम आहे. जयपूर घराण्यात स्वर आणि ताल यांचा बुद्धीप्रधान, काहीसा समजायला क्लिष्ट पण सौंदर्यप्रधान असा मिलाफ आहे. ही चार प्रमुख घराण्यांची खासियत. या पुस्तकात पतियाळा घराण्याच्या गायकीबद्दलचे मतप्रदर्शन साधारण या धर्तीवर आहे - गायकीमधली 'तयारी' या बाबतीत पतियाळा घराण्याची बरोबरी करायला कुणीही धजावणार नाही. विलक्षण तयारी बरोबरच गायकीतले सगळे प्रकार (शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत वगैरे) तितक्याच समर्थपणे पेलणे हे काम देखील प्राधान्याने पतियाळा घराण्यातल्या गायकांनीच केलेले आहे. चमत्कृतीप्रधान गाण्याकडे कल असल्याने, काही वेळा या चमत्कृतींचा अनाठायी वापर केल्याने गाण्यातून रसनिर्मिती होत नाही, भाव निर्मिती होत नाही असा आक्षेप पतियाळा घराण्याच्या गायकांवर पूर्वापार होत आलेला आहे. कौशिकी चक्रवर्ती यांचा आणि त्यांच्या टीकाकारांचा जन्म होण्यापूर्वीपासून अशी टीका होत आलेली आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. पतियाळा घराण्याचा एकही गायक अशा टीकेने विचलीत झालेला नाही. या गायकांनी आपल्या तयारी, कल्पकता आणि रसिकांचे प्रेम या जोरावर मैफिली गाजवलेल्या आहेत, पद्म पुरस्कार वगैरेंना गवसणी घातलेली आहे. आजचे शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल (विचार) गायकी. यात व्यक्तिपरत्वे भिन्नता असणारच. वानगीदाखल सांगायचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायकीतून 'सरगम' हा प्रकार वर्ज्य मानलेला होता, तर डॉ. प्रभा अत्रे 'सरगम' विषयी कित्येक तास भरभरून बोलू शकतील इतके त्यांचे सरगम वर प्रेम होते, व्यासंग होता. तेव्हा थोडा साक्षेप बाळगत विचार केला, तर टोकाचे मतप्रदर्शन करण्याची गरज उरणार नाही. पण यातही व्यक्तिपरत्वे भिन्नता असायचीच. असो.

सुबोध खरे 18/06/2025 - 10:41
@सुधीर कांदळकर आपण लेख अप्रतिम लिहिला आहे. यातील अनेक कलाकारांचे गायन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. मला संगीतात काहीही कळत नाही राग ओळखता येत नाही परंतु शास्त्रीय संगीत तीन चार तास सलग ऐकू शकतो इतकं आवडतं. उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत हे जास्त आवडतं. अर्थात आपण लिहिलंय तसं उत्कटपणे लिहिणं सुद्द्धा जमत नाही. आपण लिहीत रहा. काही विघ्न संतोषी लोक सर्वत्र असतातच. आता औरंगजेब ९० वर्षे जगला म्हणजे त्याचे वंशज पण बरेच असणार. तुम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. आणि लिहीते राहा

धन्यवाद. मारवा, सुक्या, कर्नल तपस्वी, विजूभाऊ, मूकवाचक, डॉ. खरेसाहेब, सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. आता सत्तरीपार गेल्यानंतर मला आयुष्यात आणखी काहीही कमवायचे नाही. जरी रक्तदाब हृदय सारे सामान्य असले तरी आता मानसिकदृष्ट्या माझ्यात काहीही फायटिंग स्पिरीट राहिलेले नाही. आयुष्यातले उरलेले दिवस मस्त मनोरंजनात घालवायचे एवढाच उद्योग आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या संस्कृतीत नम्रता, सौजन्य या गोष्टींना सर्वांत वरचे स्थान आहे. उच्च स्थानी पोहोचलेल्या एखाद्या गायक्/वादक मान्यवराला जर आपण एखाद्या नवोदित कलाकाराबद्दल मत विचारले तर माझ्यापेक्षा चांगला गातो/गाते किंवा वाजवतो/वाजवते असे विनम्र उत्तर मिळते हा माझा अनुभव आहे. एखाद्या मान्यवराच्या एखाद्या मैफिलीला आपण गेलों आणि त्याच शहरात जर एकदोन दिवसातच दुसया मैफिलीला गेलो आणि त्या मान्यवर कलाकाराची आपल्यावर नजर पडलीच तर परवाच्या मैफिलीला पण आपण होतांत ना? अशी चौकशी केली जाते. असा सामान्य रसिकाचाही आदर ठेवणार्‍या संस्कृतीत असे काही घडते याचा मला सध्या फार मोठा धक्का बसला आहे. द्वेषाधिष्ठित विचारसरणी पाहून मन नक्कीच उद्विग्न होते. पण चालायचेच. कालाय तस्मै नम:. आपणा सर्वांसारखी तसेच इतर बहुसंख्य मिपाकरांसारखी चांगली माणसे अजून आहेत म्हणून जग चालले आहे यावर माझा विश्वास आहे. पुन्हां एकदा धन्यवाद देतो आणि संगीतातली आणखी सौंदर्यस्थळे शोधायला लागतों.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 18/06/2025 - 18:30
जाऊ द्या हो आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे अहंमन्य कोंबडे जगात कमी आहेत का? आणि आज आपण आरवलो नाही म्हणजे सूर्योदय झालाच नाही असे ठासून सांगणारे कोंबडे सुद्धा बरेच आहेत. कुठे जीवाला त्रास करून घेताय?

In reply to by सुधीर कांदळकर

कांदळकरजी, आपले मवाळ प्रतिसाद वाचून पुरूषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार मधली नाट्यगीते आठवली.. खां साहेब राजगायक बनल्यावर पंडितजींच्या घरात पाय ठेवताच म्हणतात,"या भवनातील मवाळ हळवे सूर,जाऊ द्यात ". भार्गवराम अचरेकरांचे, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद ",याचा ताणा बाणा खां साहेब आपल्या शैलीत पेश करतात. वसंतराव, भारगवराम,बकुल पंडीत,फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, इनामदार असे दिग्गजांकडून सादरीकरण, प्रत्यक्ष ऐकण्याचा अमृतानुभव.. फाट्यावर मारा व लिहीते रहा. सत्तरीत मी पण आहे पण आजही विचारले ",हाऊ इज जोश",तर अपसूक निघते "यस्स सर". तुकोबाराय अशा लोकांसाठी सांगतात, , तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा

विजुभाऊ 19/06/2025 - 09:04
सुधीरजी इतका चांगला लेख लिहीलात. सर्वसामान्य माणसांना जी गोष्ट चांगलीवाटते ती गोष्ट समिक्षकांना वाइट वाटू शकते. त्या बद्दल त्या समिक्षकांत दुमत कधीच नसते. कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते पन म्हणून ते तसे प्रत्यक्षात नसते. (माझ्या एका वचनावर गाढ विश्वास आहे " एव्हरी वन हॅज राईट टी गो राँग " ) कोणीतरी म्हणाले आहे की मोनालीसाच्या चित्रातल्या हास्याचे गूढ म्हणजे तीला बद्धकोष्ठ झाला होता. म्हणणाराला लोकांनी फाट्यावर मारत चित्राचे सौंदर्य महत्वाचे मानले. असो. तुम्ही असेच आणखी काही संगीत क्षण शेअर करा. मजा येईल.

Bhakti 19/06/2025 - 10:58
नादमय सुंदर लेख आहे. सध्या अवचिता परिमळूचे निरूपणासह पारायण सुरु आहे. अवांतर स्वगत Sapphire चे पण पारायण निराळेच ;)

@रामे : धन्यवाद राजेंद्रजी. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भीमसेनजींचे ऐकले होते. एकदां बेळगांव ते व्हाया यल्लापूर कारवार या प्रवासात बस सकाळी सहासाडेसहाला मस्तीकट्टा या गांवात चहासाठी थांबली होती. नुकतेच फटफटत होते. जवळच्या मंदिरात लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर हे गाणे लागले होते. पाठोपाठ कन्नड भाषेतली संतवाणी आपल्यास चालीवर भीमसेन लताच्या आवाजात सुरू झाली होती. तो अनुभव विसरूंच शकत नाही. तुमच्या प्रतिसादाने ही आठवण ताजी केली. अनेक, अनेक, धन्यवाद. आर्याचे आजच ऐकले. आवडले. @ मूकवाचकः आपण विविध घराण्यांतल्या गायनशैलीच्या विषयींच्या वाचनाचा तपशील दिला आहे. तो मी वाचलेला मला आठवतो आहे. बहुधा कुमारांचे गुरुबंधु चंद्रशेखर रेळे यांच्या 'कुमार माझा सखा' या पुस्तकात. वसंतराव देशपांडे खास पंजाब घराण्याच्या गायनशैलीचा अभ्यास करण्यासाठी लाहोरला जाऊन आले असा त्यांनी एका मैफिलीत उल्लेख केल्याचे आठवते. रेळेंचे पुस्तक वाचले तेव्हां आणखी एक सुंदर, संस्मरणीय पुस्तक वाचले होते. आपल्या मनांत ठेवा म्हणून जपून ठेवावे असे. दत्ता मारुलकर यांचे 'अंतर्यामी सूर गवसला'. हे खळेकाकांवर आहे. अनेक आठवणी जागविल्यात अनेक अनेक धन्यवाद. @भक्ती: धन्यवाद भक्तीताई. @विजूभाऊ, कर्नल तपस्वी, डॉ. सुबोध खरेसाहेब : पुन्हा एकदां धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा. तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात. परंतु आज जास्तीत जास्त रसिक हे सुगम संगीत ऐकतात.

नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व १ गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट! #मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा

गीतारहस्य चिंतन (प्रकरण -६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार

Bhakti ·

In reply to by कंजूस

Bhakti 04/06/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा 05/06/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti 05/06/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस 05/06/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा 05/06/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.

In reply to by कंजूस

Bhakti 04/06/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा 05/06/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti 05/06/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस 05/06/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा 05/06/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.
लेखनविषय:
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार मनोदेवता प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्‌ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्‌सद्विवेकबुद्‌धी आहे- -आधिदैवतपक्ष. या सदविवेकबुद्‌धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय." -वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे. वेदःस्मृतिः सदाचारः स्वस्थ च प्रियमात्मनः । एतच्चतुर्विधं प्रा..

गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)

Bhakti ·

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.
लेखनप्रकार
#गर्जामहाराष्ट्र लेखक-सदानंद मोरे अ इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते. नीरक्षीरविवेक बुद्‌धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात द

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

Bhakti ·

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.
अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

भुलेश्वर मंदिर सौंदर्य

Bhakti ·

कंजूस 14/05/2025 - 18:15
छान. पन्नास टक्के शिल्पे फोडलेली आहेत, पहायला नको वाटते. ............. इकडे यवत ( सोलापूर रस्त्यावरील) वरून सकाळी पावणे दहाची बस सुटते त्याने गेलो पण परतीला वाहन नव्हते. मग बऱ्याच वेळाने एक टेम्पो आला त्याने घेतले. आत खूप अंधार आहे , मोबाईलने फोटो बरोबर येत नाहीत.

१९७२ मधे मॅट्रिक परिक्षे आगोदर सर्व मित्र पांगणार म्हणून सायकल वर भुलेश्वर सहल आयोजित केली होती. आता फार काही लक्षात नाही. तेव्हांचा एक मित्र किराणामालाचा मोठा घाऊक व्यापारी असल्याने संपर्कात आहे. पुन्हा एकदा जायला हवे.

प्रचेतस 15/05/2025 - 19:37
चांगलं लिहिलंय. भुलेश्वरला खूप वेळा जाऊनही समुद्रमंथनाचा पट मला अंधारामुळे नीट पाहता आला नव्हता , आता तिथे विजेचा दिवा लावलेला दिसतोय. दुसरे म्हणजे ह्या मंदिराचा निर्मितीकाल निश्चित माहीत नाही, बहुधा ही चालुक्यांची निर्मिती असावी. इथली स्रीरूपी देवतांची शिल्पे इथला शाक्त प्रभाव सांगतात. बाकी ह्या लेखामुळे पूर्वी मी लिहिलेल्या भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट ह्या लेखाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/05/2025 - 20:42
समुद्रमंथन पट मला www.discoveringtemples.com येथून मिळाली होती.ती अशी ,या फोटो बरोबर ती मॅच करून समजते ते रत्न कोणते. मोरासारखी शेपटी असलेली कामधेनू गाय - कोणतीही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय अमृत कुंभ - अमरत्वाचे अमृत देवतांमध्ये वाटण्यात आले. चंद्र - हो, आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र समुद्र मंथनातून आला आहे. उच्चैःश्रवास - राक्षसांचा राजा बळी याने घेतलेला सात डोक्यांचा उडणारा घोडा. ऐरावत - देवांचा देव इंद्र याने घेतलेला पांढरा हत्ती. अप्सरा रंभा - स्वर्गातील दिव्य सौंदर्य देवी लक्ष्मी - संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णूने घेतली. तसेच अशाच उंचीवर एक मारीच मृग वध आहे तो मला घाईत सापडला नाही.

In reply to by प्रचेतस

स्वधर्म 23/05/2025 - 13:56
काही वर्षांपूर्वी मी व काही मित्र या मंदीराला भेट देण्यासाठी गेलो होतो. या मंदीराचीच निवड करण्याचे कारण म्हणजे प्रचेतस यांचा वरील लेख. तसेच त्यांच्या लेखातील माहितीमुळे आपण काय पहात आहोत व त्याचा काय अर्थ आहे ते समजत होते. भक्ती यांनी पण उत्तम माहिती दिली आहे. दोन्ही व्यासंगी लोकांचे आभार.

चौथा कोनाडा 15/05/2025 - 20:23
वाह, सुंदर अप्रतिम !!! दर वेळा हा प्रश्न पडतो की एवढी अप्रतिम कलाकुसर आणी प्रमाणबद्धता कशी केली केली असेल ? तीन चार वर्षांपुर्वी गेलो होतो, तेव्हा घाईत सहल झाली होती. आता पुन्हा निवांत जायला हवे ! धन्यवाद !

कंजूस 14/05/2025 - 18:15
छान. पन्नास टक्के शिल्पे फोडलेली आहेत, पहायला नको वाटते. ............. इकडे यवत ( सोलापूर रस्त्यावरील) वरून सकाळी पावणे दहाची बस सुटते त्याने गेलो पण परतीला वाहन नव्हते. मग बऱ्याच वेळाने एक टेम्पो आला त्याने घेतले. आत खूप अंधार आहे , मोबाईलने फोटो बरोबर येत नाहीत.

१९७२ मधे मॅट्रिक परिक्षे आगोदर सर्व मित्र पांगणार म्हणून सायकल वर भुलेश्वर सहल आयोजित केली होती. आता फार काही लक्षात नाही. तेव्हांचा एक मित्र किराणामालाचा मोठा घाऊक व्यापारी असल्याने संपर्कात आहे. पुन्हा एकदा जायला हवे.

प्रचेतस 15/05/2025 - 19:37
चांगलं लिहिलंय. भुलेश्वरला खूप वेळा जाऊनही समुद्रमंथनाचा पट मला अंधारामुळे नीट पाहता आला नव्हता , आता तिथे विजेचा दिवा लावलेला दिसतोय. दुसरे म्हणजे ह्या मंदिराचा निर्मितीकाल निश्चित माहीत नाही, बहुधा ही चालुक्यांची निर्मिती असावी. इथली स्रीरूपी देवतांची शिल्पे इथला शाक्त प्रभाव सांगतात. बाकी ह्या लेखामुळे पूर्वी मी लिहिलेल्या भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट ह्या लेखाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/05/2025 - 20:42
समुद्रमंथन पट मला www.discoveringtemples.com येथून मिळाली होती.ती अशी ,या फोटो बरोबर ती मॅच करून समजते ते रत्न कोणते. मोरासारखी शेपटी असलेली कामधेनू गाय - कोणतीही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय अमृत कुंभ - अमरत्वाचे अमृत देवतांमध्ये वाटण्यात आले. चंद्र - हो, आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र समुद्र मंथनातून आला आहे. उच्चैःश्रवास - राक्षसांचा राजा बळी याने घेतलेला सात डोक्यांचा उडणारा घोडा. ऐरावत - देवांचा देव इंद्र याने घेतलेला पांढरा हत्ती. अप्सरा रंभा - स्वर्गातील दिव्य सौंदर्य देवी लक्ष्मी - संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णूने घेतली. तसेच अशाच उंचीवर एक मारीच मृग वध आहे तो मला घाईत सापडला नाही.

In reply to by प्रचेतस

स्वधर्म 23/05/2025 - 13:56
काही वर्षांपूर्वी मी व काही मित्र या मंदीराला भेट देण्यासाठी गेलो होतो. या मंदीराचीच निवड करण्याचे कारण म्हणजे प्रचेतस यांचा वरील लेख. तसेच त्यांच्या लेखातील माहितीमुळे आपण काय पहात आहोत व त्याचा काय अर्थ आहे ते समजत होते. भक्ती यांनी पण उत्तम माहिती दिली आहे. दोन्ही व्यासंगी लोकांचे आभार.

चौथा कोनाडा 15/05/2025 - 20:23
वाह, सुंदर अप्रतिम !!! दर वेळा हा प्रश्न पडतो की एवढी अप्रतिम कलाकुसर आणी प्रमाणबद्धता कशी केली केली असेल ? तीन चार वर्षांपुर्वी गेलो होतो, तेव्हा घाईत सहल झाली होती. आता पुन्हा निवांत जायला हवे ! धन्यवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
१ भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे.

धामणस्करांची 'वोक' कविता

माहितगार ·

सोत्रि 09/05/2025 - 05:21
विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या.. मी पुन्हा तरूण ययातीसारखा; माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.
सुपर्ब!! पद्यातलं जास्त काही कळत नाही पण हे कविता खुप खोलवर पोहोचली. - (गद्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

मूकवाचक 09/05/2025 - 09:56
एकत्र 'बसलो' असताना माझे डोके जड झाले, तेव्हा उसळत्या तारूण्याची माझी लेक मला म्हणाली: द्या इकडे. मी ग्लास तत्काळ मुलीच्या हाती सोपवला चखण्यासहित. मुलीनेही ग्लास हातात घेतला नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित बूर्झ्वापण फाट्यावर मारल्याच्या. .... मी लगेच भानावर, अट्ट्ल बेवड्यासारखा लेक लोळतेय आपल्याच वांतीत आधुनिकतेचा सोस नडलेली

गवि 10/05/2025 - 10:03
विसर्जनाची कविता पहिल्यांदा वाचण्यात आली तेव्हाच हा कवी सॉलिड आहे हे जाणवले होते. मराठीत वेगवेगळ्या शैलीचे खणखणीत दर्जेदार कवी आणि कवयित्री होते आणि आहेत. बाकीबाब, कोलटकर, महानोर, ग्रेस वगैरे परंपरा आहेच.

सोत्रि 09/05/2025 - 05:21
विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या.. मी पुन्हा तरूण ययातीसारखा; माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.
सुपर्ब!! पद्यातलं जास्त काही कळत नाही पण हे कविता खुप खोलवर पोहोचली. - (गद्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

मूकवाचक 09/05/2025 - 09:56
एकत्र 'बसलो' असताना माझे डोके जड झाले, तेव्हा उसळत्या तारूण्याची माझी लेक मला म्हणाली: द्या इकडे. मी ग्लास तत्काळ मुलीच्या हाती सोपवला चखण्यासहित. मुलीनेही ग्लास हातात घेतला नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित बूर्झ्वापण फाट्यावर मारल्याच्या. .... मी लगेच भानावर, अट्ट्ल बेवड्यासारखा लेक लोळतेय आपल्याच वांतीत आधुनिकतेचा सोस नडलेली

गवि 10/05/2025 - 10:03
विसर्जनाची कविता पहिल्यांदा वाचण्यात आली तेव्हाच हा कवी सॉलिड आहे हे जाणवले होते. मराठीत वेगवेगळ्या शैलीचे खणखणीत दर्जेदार कवी आणि कवयित्री होते आणि आहेत. बाकीबाब, कोलटकर, महानोर, ग्रेस वगैरे परंपरा आहेच.
लेखनप्रकार
काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती.