सिलींडर ४
सिलींडर ४
सिलींडर ४
खोल ह्रदयात उमटला, नादमय विणेचा झंकार,
सावळे रूप विठाईचे, जाहले नयनात साकार !!
मकरकुंडले डुलती कानी, पीतांबर झळके कटीवर,
वारक-यांची वाट पाहत, उभा ठाकला विठू वीटेवर !!
टाळ मृदुंगाची धून, कानी गुंजते मधुर ,
दर्शनाची ओढ लागे, पाय चालती भर्भर !!
दोन वरीस वारी नाही, आसावले भेटीस मन,
कामात चित्त लागेना, वारीतच गुंतले ध्यान !!
वारीतला गुलाल बुक्का, उधळण भक्तीरंगाची,
पाहतसे वाट भक्तांची, चंद्रभागाही पंढरीची !!
उदास तु ही पांडुरंगा, रूक्मिणीही उदासली,
वैष्णवांच्या मेळ्यावीना, सूनी पंढरी भासली !!
पुर्वपिठिका
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!
सिलींडर ३
( विशेष सूचना: या कथेतील मी ,सिलिंडर व टेम्पो वगळता,इतर पात्रे व प्रसंग पूर्णपणे काल्पनिकआहेत)
एका कथा स्पर्धेत मी भाग घेतला होता. आयोजकांनी पहिल्या काही ओळी दिलेल्या होत्या त्या तशाच्या तशा सुरवातीला वापरून पुढे कथा रंगवायची अशी स्पर्धा होती. शब्दांचीही मर्यादा होती. कथेचं शीर्षक आपणच ठरवायचं होतं. अटलजींच्या एका सुरेख कवितेचं नाव मी शीर्षक म्हणून वापरलं आहे.
सुरवातीच्या बोल्ड इटॅलिक्समधल्या ओळी आयोजकांनी दिलेल्या होत्या. दुसरं बक्षीस मिळालं त्या अर्थी कथा बरी जमली असावी. ही तुमच्यासाठी . . . .
मानसीची बदली होऊन ती नवीन गावी आली होती.ऑफिसचा पहिला दिवस होता.शाखाधिकारी कडून काम समजून घेऊन मानसी लगबगीने तिच्या केबिनमध्ये शिरली.प्रसन्न दरवळ खोलीभर पसरला होता.समोर मोगऱ्याची फुले एका फुलदाणीत सजवली होती.हळू हळू मानसी कामात व्यस्त होऊ लागली.
तोच आवाज आला “चहा की कॉफी?काय आणू madam?”
मानसीने समोर पाहिले .तीस वयोगटातील एक सामान्य अंगकाठीची, गुलाबी गणवेशाची साडी नेसलेली,कपाळावर मोठी टिकली ,गळ्यात तुळशीची माळ घातलेली सावळी मुलगी उभी होती.
”चहाच चालेल,पण तुमच नाव?”मानसीने प्रश्न केला.
सिलींडर २
सुरुवातीचा प्रवास साधारण रितीने,ब-यापैकी झाला.
म्हणजे टेम्पो आपला,आपल्या गतीने चालला होता.टेम्पोचा वेग लक्षात घेता 'चालला'होता म्हणणेच योग्य.अंदाजे अर्ध्या तासानंतर,रस्त्यावर उभ्या असलेल्या एका पटकाधा-याने हात दाखविला.टेम्पो थांबला.म्हणजे ड्रायव्हरने थांबवला.पटकाधा-याला जवळच्या गावाला जायचे होते.तो एकटा नव्हता.सोबत दोन शेळ्या होत्या.
अभंगाची गोडी
चिपळाची जोडी
विठ्ठल नाम माळी
भक्ती फुले भाबडी...
अगम्य भिंती तोडी
शरीर झोला सांडी
चराचर चैतन्य बहू
मना सुख जोडी...
वेल वाढती वाकडी
शोधे आधार बापुडी
नाही बांडगुळ हे जाण
तू बांध नामाची झोपडी...
वाट पाहून थकली
येईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग
डोळ्यांत सूर्य बुडी...
-भक्ती
विठुराया....
तुझ्या प्रेमामृताच्या वर्षावात नित्य न्हाऊनही,
कोरडीच राहिली काया....
मन विषयी गुंतले निरंतर,
सोडवेना कधी माया...
क्षणामागून क्षण संपले,
जीवन जातसे वाया...
पश्चात्तापे मन तप्त,
लाभो तुझी छाया...
आता लागो तुझे ध्यान,
पडतसे मी पाया...
नको दूर लोटूस मजला,
विनविते तुज विठुराया...!!
जयगंधा..
९-११-२०१४.
आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही तसं स्वाभाविकच. वास्तव आणि कल्पितात अंतर असतं. ते ज्याला कळतं त्याला यश आणि अपयशाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. वास्तवाचा विसर पडणं प्रतारणा असते आपणच आपल्या विचारांशी केलेली. खरं हेही आहे की, हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. पायांचं नातं जमिनीशी अन् विचारांची सोयरिक आभाळाशी असली की, वास्तव विस्मरणात नाही जात.