राऊ कादंबरीमधील एक प्रसंग
राऊ कादंबरी परत एकदा वाचून संपवली. प्रत्येकवेळी ती मनाला वेगवेगळ्या प्रकारे भिडते. अनेकांनी अनेकदा त्यावर लिहिलं आहे. चर्चा देखील झाल्या आहेत. अलीकडे बाजीराव-मस्तानी सिनेमा देखील येऊन गेला. त्या काळात तर पेशवे... मराठा साम्राज्य... प्रेम... बेबंद स्वभावाचे बाजीराव पेशवे... या सगळ्यावर खूप खुप उहापोह झालाच. म्हणून परत एकदा राऊ कादंबरी हातात घेतली होती. त्यातील एक प्रसंग मनात खूप भिडला.. टोचला... जेव्हा मस्तानीला आपा पुणे सोडून जा सांगतात आणि बाजीराव पेशव्यांचा निरोपही न घेता मस्तानी बुंदेलखंडाला रवाना होते. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे दोन दिवसांची अविरत घोडदौड करत तिला गाठतात.