विचार
चुकचुकली पाल एक...!
गीत :
चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले
नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले
रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट
धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट
परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले
अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी
इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी
गीतातील सूर असे का मधेच पण तुटले
तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार
ही अशीच तव छाया पण मागे धावणार
सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले
गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६
***
एन्टरप्रेन्युअर
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता.
तो प्रसंग
अत्ययिक अवस्थेत वैद्यकीय सेवांचे नियोजन असा आम्हा मंडळींना न आवडत्या विषयाची मांडणी करत असताना तो प्रसंग पुन्हा आठवला.
अंधविश्वास भाग (3) - सकारात्मक लढा
एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी राहतात, तिथे लोकांचा विश्वास डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला.
अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध
अमेरीकतल्या निवडणुकांच्या दरम्यान भारतीयांमधे भारत-अमेरीका संबंध चर्चा होणे अपरीहार्य होत असते. त्यात डेमोक्रॅट्स आवडणारे, न आवडणारे, रिपब्लिकन्स कसे बरोबर आहेत वगैरे सांगणारे सर्वच येतात. मी देखील त्यातला एक आहेच! ह्या लेखाचा विषय प्रामुख्याने केवळ अमेरीका-भारत संबंध या संदर्भातच असल्याने या लेखादरम्यान इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे.
निर्गुणी भजने (भाग २.६) सुनता है गुरु ग्यानी - चौथा आणि पाचवा चरण
सुनता है गुरु ग्यानी या भजनाचा कुंडलिनीच्या प्रवासाशी मी लावलेला संबंध काही वाचकांना, "मारून मुटकून गणपती" बनवण्याचा माझा प्रयत्न वाटला. आणि काहींनी सौम्य शब्दात तशी प्रतिक्रिया देखील दिली. अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे ढगांच्या आकारातून प्राणी शोधण्याचा एक प्रकार वाटू शकतो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनात कुंडलिनी आणि या भजनाचा संबंध लागण्याचे सगळ्यात मोठे कारण असलेल्या चरणापर्यंत आपण आता पोहोचलो आहोत. त्यामुळे या दोन चरणांचा अर्थ वाचताना कदाचित माझा सगळा प्रयत्न वायफळाचे मळे फुलवण्याचा नव्हता हे वाचकांना पटेल असे मला वाटते.
निर्गुणी भजने (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - तिसरा चरण
दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा अजून एक पाठभेद सांगितला. तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे. श्री प्रल्हाद तिपनिया आणि बागली गावातील हस्तलिखित यांच्याशी तो शब्दशः जुळणारा नसला तरी त्याचा अर्थ मात्र तिपनीया यांच्या पाठभेदाशी जुळणारा आहे आणि मला लागलेला अर्थ देखील त्याने अजून बळकट होतो.
किशोर कुमार ची गाणी आणि शास्त्रीय संगीत
मला व्यक्तिशः रागदारीतलं काहीही कळत नाही. हे माझं दुर्दैव! इच्छा असूनही इतक्या वर्षांमध्ये वेळ काढू शकलो नाही ही एक खंत आहे, आणि उर्वरित आयुष्यात जमेल अशी शक्यता अति-धूसर आहे. पण तरीही जमेल तशी माहिती गोळा करीत रहातो, कधीतरी वाचेन या आशेवर!
पत्ता
नाही, मी माझा पत्ता नाही सांगत आहे इकडे, त्या आणि ह्या धाग्याचा काहीच संबंध नाही
तर आता मुख्य विषयाकडे ,
मला वाटत जेव्हा केव्हा मानवी संस्कृती निर्माण झाली , माणसाला एक ठिकाणाहून दुसरीकडे मुद्दामून जायची गरज निर्माण झाली, किंवा दुसऱ्याला पाठवायची/ बोलवायची गरज निर्माण झाली, तेव्हा पासून पत्ता या संकल्पनेची सुरवात झाली असेल. त्यातूनच एखाद्या मानवी वस्तीला गाव संबोधून त्याला नाव देणे, रस्त्याला नाव देणेही चालू झाले असेल. अर्थात पत्ता हि संकल्पना का निर्माण झाली याचा हा शोध निबंध नाही.