विचार

बांग्लादेशची सुरक्षास्थिती आणि भारता समोरचे आव्हान

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 8:01 am

बांग्लादेशात असुरक्षीतता नवीन नसावी, कडवे लोक हिंसेच्या माध्यमातून व्यवस्था हातात घेण्यास आतूर होताना दिसतात. गेल्या दोन दिवसा पुर्वी ढाक्यातील परदेशी दूतावास क्षेत्रातील परदेशी लोकांचा वावर असलेल्या बेकरीवरील दहशतवादी हल्ला, बांग्लादेशातील सुरक्षा व्यवस्थेची समस्या हाताच्या बाहेर जात नाहीए ना अशी साशंकता निर्माण करतो.

समाजराजकारणविचारबातमी

विरह.....2

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जनातलं, मनातलं
28 Jun 2016 - 4:08 pm

मी बसलो ती खालच्या स्वरात म्हणाली, सॅारी मी म्हटले का? ती म्हणाली,"मी तुझ्याशी त्या दिवशी फार
रागात बोलले, म्हणून मी तीला म्हणालो अंग ते विसरुन जा मी ते कधीच विसरलो ती म्हणाली मी तुला सम्यंक
म्हटंल तर चालेल, मी म्हटंल हो का नाही. बघता बघता आमची चांगली मैत्री झाली मी दहावी बोर्डाची परीक्षा
पास झालो आणि सायन्सला अॅडमिशन घेतलं अवनी आता आठवीत आली होती, पण तीचं गणित काय सुधरत
नव्हंत मला पण आश्चर्य वाटत होतं की अवनीला रोज गणित समजावून पण तीला ते का कळत नाही, हे कळंत
नव्हत, अशीच दोन वर्ष निघुन गेली, कळलच नाही, अवनी दहावीत आली ती एक दिवस जरी घरी नाही आली

धर्मविचार

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १०: काही कटु प्रश्न आणि काही कटु उत्तरे

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
28 Jun 2016 - 1:34 pm
संस्कृतीधर्मसमाजजीवनमानतंत्रविचारलेख

विरह ........

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जनातलं, मनातलं
28 Jun 2016 - 12:47 am

सर्वत्र काळोख पसरलेला होता पाऊल कुठल्या दिशेनं पडत होती याचाही संदर्भ
लागत नव्हता, मी भ्रमिष्टा अवस्थेत चालत होते, मला मन आहे, विचारशक्ती
आहे, याच भानंच नव्हत! गत आयुष्यातील घटनांचा आढावा घेतांना खरंच वाटत
नाही आपण इतकं काही भोगलंय! पण आता त्या आठवणीसुध्दा सोबत सोडतील,
मन पुन्हा त्या आठवणींना उजाळा देऊ लागले!
सात वर्षापुर्वी आमची पहिली भेट! ती शाळेतुन घरी येत होती मी आपला
बाजारात किराना घ्यायला स्कुटरवर जात होतो, रस्तात अचानक 'ती' समोर
आल्यामुळे मी ब्रेक देऊन सुध्दा आमची टक्कर झाली, ती पडली, मी घाई घाई

धर्मविचार

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
24 Jun 2016 - 9:56 am

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते.

कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे. वगैरे.

संस्कृतीकथासमाजजीवनमानराहणीविचारलेखमत

कांचीवरम

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
21 Jun 2016 - 5:12 pm

कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर!

'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम.

कलाकथासमाजजीवनमानचित्रपटछायाचित्रणविचारप्रतिक्रियासमीक्षामाध्यमवेधमत

चिंता!!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
17 Jun 2016 - 9:04 am

लोकांची डोकी बाकी भारी चालतात!
पाऊस लांबल्यानं सारे चिंताग्रस्त आहेत, हे खरंच. आणखी काही दिवस पाऊस पडलाच नाही, समजा उभा हंगामच कोरडा गेला, तर काय होणार या नुसत्या विचारानेही चक्कर येऊ शकते. शरीर शुष्क होऊ शकते, घामही थांबू शकतो...
हे खरंय.
मग आपापल्या परीने, पाऊस यावा म्हणून काय करता येईल याची उत्तरं शोधायचा प्रयत्न सुरू होतो.
काल ट्रेनमधे एक टोळकं गंभीरपणाने याचीच चर्चा करत होतं.

मुक्तकप्रकटनविचार

गरीब-श्रीमंत

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
16 Jun 2016 - 11:25 am

परवा मी रद्दी आणि काही जुनं सामान भंगारात देण्यासाठी काढलं, आणि बराच कचराही काढून टाकला. यात काही जुने कपडेही होते. भंगारात काही जुनी विजेची उपकरणे, काही भांडी, वगैरे होतं. आमच्याकडे नेहमी रद्दीसाठी येणाऱ्या भंगारवाल्याने ते सारं भंगार एका बॉक्समधे भरलं. त्यानं किती पैसे द्यावेत यावर मी कधीच घासाघीस करत नाही.
तो बॉक्स उचलून तो निघाला आणि मला कचऱ्याची पिशवी आठवली. खाली जाताजाता ती कचऱ्याच्या डब्यात टाकशील का, असं मी त्यालाच विचारलं, आणि त्याने खांद्यावरचा बॉक्स खाली ठेवून कचऱ्याची पिशवी उघडली.
आतले जुने कपडे पाहून त्याचे डोळे चमकत होते.

मुक्तकप्रकटनविचार

मुदत ठेवींचे पतमानांकन

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
16 Jun 2016 - 9:20 am

सर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे. ही किमान आर्थिक साक्षरता गुंतवणूकदारांनी पाळल्यास त्यांची फसवणूक निश्चितपणे टळू शकेल.

हे ठिकाणधोरणप्रकटनविचार