निषेध!
काहीच सुचत नसेल
तर खुशाल कविता लिहायला घ्या..
कवितेला नसतं विषयाचं बंधन
पण,
पण म्हणून काहीही लिहायचं का?
असल्या कवितांचा मी निषेध करतो
- जव्हेरगंज
काहीच सुचत नसेल
तर खुशाल कविता लिहायला घ्या..
कवितेला नसतं विषयाचं बंधन
पण,
पण म्हणून काहीही लिहायचं का?
असल्या कवितांचा मी निषेध करतो
- जव्हेरगंज
....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५
जागतो आहे रात्र रात्र
आठवणी्च्या दुनियेत
न राहिलो मी माझा
फक्त तुझ्यामुळेच
का नाही कळ्ले तुला
काय आहे माझ्या मनी
बुड्लो आहे आकंठ
पोहणे माहीती असुनी
पायातील पैजंणात तुझ्या
कैद केलेस तु मला
सुटका नाही मज आता
टाक सरळ चिरडुन मला
होते समजत तुला तर
का नाही बोललीस
आग लागण्याआधीच
राख का नाही चोळ्लीस
किती लौकर आज उजाडलं बाई
..किती लौकरच आज उजाडलं बाई..
सजणाच्या मिठीमध्ये कळालच नाही
किती लौकरच आज उजाडलं बाई...
सजणाच्या प्रेमाला ह्या नाही वेळ काळ
झोपलयं पहा कसं कुक्कुलसं बाळ..
झोपमोड त्याची मला करवत नाही..
चांदण्यात न्हालो दोघे काल पुरी रात्र..
अमृताने तृप्त झाली,हर एक गात्र..
वाटे सकाळच कधी उगवणार नाही..!
तसा आहे आज छान रविवार सुस्त..
घ्यावी गडे अजुनिया..झोप थोडी मस्त...
लावले मी दूर त्याला पिटाळुन बाई..
सजणाच्या प्रेमालाही काळवेळ नाही...
किती लौकरच आज उजाडलं बाई
+ कानडाऊ योगेशु
किती दिवसांनी आज
वेदनेच्या गावात
भरून आलंय आभाळ
ठसठसत्या जखमांची
खपली काढायला
मग त्या ओल्या जखमा
वाहतील डोळ्यातून
फुंकर मारायला असेलच
तुझी आठवण
भर दिवसा कसा
फक्त अंधारच
उरलाय घरभर?
होत्यानव्हत्या
सगळ्याच पणत्या
नेल्यास ना सोबत?
त्या पणत्यांच्या उजेडात
उजळशीलच तू
मला दिसशीलच आणि
चमचमणार्या एका वीजेत
..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
हातात हात आले,ह्रदयात नाम झाले
ती सोबतीस आली,कामात काम झाले
शिकवण समान होती,त्यांची जरी तरी ती..
कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
ऐटीत कार गेली,मंत्रीमहोदयांची..
शिस्तीत चालणारे,ट्राफिक जाम झाले..
सारेच चोर होते,पण एकला पळाला
त्याच्या फरार नावे,नंतर इनाम झाले
रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले
ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले
त्यांचीच सर्व दु:खे,त्यांनाच छान विकली
पाहुनि खूश तेव्हा,पब्लिक तमाम झाले
शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी
खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले
....विश्वाची उलगड होते.....
केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते..
केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते..
पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते.
मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते.
तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते!
मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते.
मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही
तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.**
असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते...
नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.
ठयरे हुए पानी मे
किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक
होता है रे बाबा तेरा मारना!!
एक हलकी फुलकी कविता.
बायको कोण असते...
कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते
कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते
कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते
कधी समजून घेणारी मित्र असते
कधी त्रास देणारी डोकेदुखी असते
कधी मस्का लावणारी असते
कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते
आणि कधी नको असताना जवळ असते
कधी न सांगता समजून घेते
कधी गैरसमज करून घेते
कधी मुलांची काळजी करते
कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते
कधी नवर्याला नावे ठेवते
कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते