प्रश्नोपनिषद (१)
===================================================================
===================================================================
मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता. त्यानुसार, निर्गुणाच्या इच्छेने प्रथम निर्गुणातून चार लोकांची निर्मिती, त्यानंतर हिरण्यपुरुषाची निर्मिती, त्याच्या अवयवातून चार लोकाच्या लोकपालांची म्हणजे गुणांची निर्मिती, मग गुणांच्या कार्यसाफल्यासाठी मानवी देहाची निर्मिती, या देहातील विवक्षित अवयवांमध्ये एकेका गुणाने स्थान ग्रहण करणे आणि मग देहाच्या टाळूतून चैतन्य शक्तीने मानवी देहात प्रवेश करणे असा पहिल्या चरणाचा अर्थ लावला होता.
सुनता है गुरु ग्यानी या भजनावरचा मागचा लेख धृवपदामुळे माझ्या मनात आलेले विचार असा होता. त्यावरील प्रतिक्रियेत माझे मित्र संकेत यांनी फार चांगला संदर्भ दिला. कबीर विणकर होते. हातमागावर चालणारा त्यांचा व्यवसाय. हातमागावर कापड विणताना देखील “झिनी झिनी” आवाज होतअसतो. पूर्वेचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी येथील राहिवासी अभिषेक प्रभुदेसाई यांनी देखील त्याला दुजोरा दिला. आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो. या अंगाने मी कबीरांच्या भजनांचा विचार केला नव्हता.
कंच हिरव्या ओल्या गाली
मधुमती फुलांचा बहर फुलवि
मोहक धरती आर्जवि हसती
घननिळा बरस..मी एक प्यासी
क्षितिजावर मग तो ही झुकला
शामल देहि कवळुनि तिजला
चुंबुन म्हणे त्या गौरीला
तुज ओटी माझा अंकुर रुजला
नव यौवना ती धरा बहरली
अंग अंग कांतिही भरली
पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी
नव जन्माने तृप्त जाहली
गणपती बाप्पा मोरया!
सालाबादप्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्याच्या पाककृती मिसळपाववर प्रकाशित करणार आहोत.
गणपतीचे विविध प्रकारचे नैवेद्य आपल्या घरी बनत असतात. घरोघरच्या चालीरीतींप्रमाणे खिरापती ,शिदोरी आदि वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यांच्या पाककृती तसेच आपल्या कल्पनेतून सादर केलेल्या विविध प्रकारच्या नैवेद्य पाककृती तुम्हाला फोटोसकट लिहून पाठवायच्या आहेत .
या उपक्रमात भाग घेण्यासाठी सर्व मिपाकरांना हे निमंत्रण.
इकडे निर्गुणी भजनांची सिरीज सुरू केली होती, पण तेंव्हा मनमेघ यांनी देखील त्याच विषयावर आणि वेगवेगळ्या निर्गुणी भजनांवर माझ्या आधी सिरीज सुरू केली होती. त्यामुळे मी थांबलो. नंतर इथे पोस्ट करायचे राहूनच गेले. 'आता आमोद सुनांस जाले' वर परवा लिहिलं तेंव्हा आठवलं की मिपावर निर्गुणी भजनेची सिरीज टाकायची राहून गेली आहे. मग इथे ती सिरीज टाकायच्या विचाराने उचल खाल्ली.
सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्का-याला किंवा बलात्का-यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत.
आदिवासी लोकांबद्दल तशी आपल्याला बरीच माहिती आहे, त्यांची भाषा जीवनशैली त्यांचे राहणीमान,कारण त्यांचा प्रगत जगाशी बऱ्यापैकी संपर्क असतो. परंतु आजच्या या विज्ञान युगात अजूनही अशा अनेक आदिवासी जमाती आहेत ज्यांचा या प्रगत जगाशी कोणताही संपर्क नाही काहीही संबंध नाही.
===================================================================
गेले आठ दिवस श्रवंती शेखरला भेटायचा प्रयत्न करत होती. दर तासाला फोन करत होती पण साहेब काही फोन उचलत नव्हते. त्यांच्या सगळ्या कॉमन मित्र मैत्रीणीना फोन करून झाले होते पण कुणालाच कल्पना नव्हती काय झाले त्याची. सिक लिव्ह घेतलीये एवढंच कसंबस कळलं होत. एरवी कधीही असं न वागणाऱ्या शेखरला असं अचानक काय झालं हे तिला काही केल्या कळत नव्हतं. डॉकटरकडे जायचंय म्हणालेला. आता घरी जाऊन खात्री केल्याशिवाय चैन पडणार नाही असा विचार करून श्रवंती ऑफिसमधून बाहेर पडली.
काकांनी दार उघडलं आणि त्यांना वाटलं कुणी सेल्समन आलिए की काय म्हणून त्यांनी "कसली औषधं विकायला आलायत?" असं विचारलं.