'माज' आणि 'मान'!
'माज' आणि 'मान'!
'माज' आणि 'मान'!
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला.
शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.
दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा अजून एक पाठभेद सांगितला. तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे. श्री प्रल्हाद तिपनिया आणि बागली गावातील हस्तलिखित यांच्याशी तो शब्दशः जुळणारा नसला तरी त्याचा अर्थ मात्र तिपनीया यांच्या पाठभेदाशी जुळणारा आहे आणि मला लागलेला अर्थ देखील त्याने अजून बळकट होतो.
===================================================================
मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता. त्यानुसार, निर्गुणाच्या इच्छेने प्रथम निर्गुणातून चार लोकांची निर्मिती, त्यानंतर हिरण्यपुरुषाची निर्मिती, त्याच्या अवयवातून चार लोकाच्या लोकपालांची म्हणजे गुणांची निर्मिती, मग गुणांच्या कार्यसाफल्यासाठी मानवी देहाची निर्मिती, या देहातील विवक्षित अवयवांमध्ये एकेका गुणाने स्थान ग्रहण करणे आणि मग देहाच्या टाळूतून चैतन्य शक्तीने मानवी देहात प्रवेश करणे असा पहिल्या चरणाचा अर्थ लावला होता.
सुनता है गुरु ग्यानी या भजनावरचा मागचा लेख धृवपदामुळे माझ्या मनात आलेले विचार असा होता. त्यावरील प्रतिक्रियेत माझे मित्र संकेत यांनी फार चांगला संदर्भ दिला. कबीर विणकर होते. हातमागावर चालणारा त्यांचा व्यवसाय. हातमागावर कापड विणताना देखील “झिनी झिनी” आवाज होतअसतो. पूर्वेचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी येथील राहिवासी अभिषेक प्रभुदेसाई यांनी देखील त्याला दुजोरा दिला. आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो. या अंगाने मी कबीरांच्या भजनांचा विचार केला नव्हता.
कंच हिरव्या ओल्या गाली
मधुमती फुलांचा बहर फुलवि
मोहक धरती आर्जवि हसती
घननिळा बरस..मी एक प्यासी
क्षितिजावर मग तो ही झुकला
शामल देहि कवळुनि तिजला
चुंबुन म्हणे त्या गौरीला
तुज ओटी माझा अंकुर रुजला
नव यौवना ती धरा बहरली
अंग अंग कांतिही भरली
पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी
नव जन्माने तृप्त जाहली
गणपती बाप्पा मोरया!
सालाबादप्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्याच्या पाककृती मिसळपाववर प्रकाशित करणार आहोत.
गणपतीचे विविध प्रकारचे नैवेद्य आपल्या घरी बनत असतात. घरोघरच्या चालीरीतींप्रमाणे खिरापती ,शिदोरी आदि वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यांच्या पाककृती तसेच आपल्या कल्पनेतून सादर केलेल्या विविध प्रकारच्या नैवेद्य पाककृती तुम्हाला फोटोसकट लिहून पाठवायच्या आहेत .
या उपक्रमात भाग घेण्यासाठी सर्व मिपाकरांना हे निमंत्रण.
इकडे निर्गुणी भजनांची सिरीज सुरू केली होती, पण तेंव्हा मनमेघ यांनी देखील त्याच विषयावर आणि वेगवेगळ्या निर्गुणी भजनांवर माझ्या आधी सिरीज सुरू केली होती. त्यामुळे मी थांबलो. नंतर इथे पोस्ट करायचे राहूनच गेले. 'आता आमोद सुनांस जाले' वर परवा लिहिलं तेंव्हा आठवलं की मिपावर निर्गुणी भजनेची सिरीज टाकायची राहून गेली आहे. मग इथे ती सिरीज टाकायच्या विचाराने उचल खाल्ली.
सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्का-याला किंवा बलात्का-यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत.