हिशेब हिशेबाचा
आमची प्रेरणा
आमची प्रेरणा
आमची प्रेरणा
फाळणीच्या कथा तश्या वेदनादायकच असतात. गेले खूप दिवस हि कथा मनात घर करून होती, काल जयंत काकांच्या मंटोच्या कथा वाचतांना पुन्हा आठवली.
उर्दू कथा : नन्दकिशोर विक्रम
__________________________________________________________________________
असाही एक अजब गजब दिन ! !
तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा.
जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते.
थर थर वरवर
लावून भरभर
चढतो सरसर
गोविंदा ...
मनात हुरहुर
भयाण काहूर
धपापतो उर
गोविंदा...
अखेरचा थर
निसटला जर
लटकतो वर
गोविंदा...
खालुनि घुमतो
गर्दीचा स्वर
गोपाळा रे
गोविंदा!!
===================================================================
रघु: ओके मन्या. काय म्हणालास? कोण येतंय?
मन्या: ( फोनवर) अरे तो कास्टिंग डिरेक्टर येतोय. बालाजी फिल्म्स चा
रघु: कास्टिंग डिरेक्टर? कशाला?
मन्या: अरे वहिनीना त्यांच्या सिरीयल साठी घेतोय म्हणे.
रघु: पण ती इथे कुठे आहे.
मन्या : तेच तर म्हणतोय मी. सुप्रिया मॅडम घरी नाहीत म्हणून मी सांगितलय. तो मॅडमच्या सेक्रेटरीशी बोलायला येतोय.
रघु: मग. मी काय करु?
मन्या: हे बघ मी पण आज बाहेर आहे. त्यामुळे तू त्याला सुप्रिया मॅडमचा सेक्रेटरी म्हणून भेट.
रघु: मी मॅडमचा सेक्रेटरी?
मन्या: हो रे ....आजच्या पुरता तरी बन.
झुला, झोपाळा, पाळणा प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. सुगंधी, रंगीबिरंगी हारा-फुलांनी सजून, फिरत्या भिंगरीच्या खेळण्याच्या गमतीत, ठरलेले नाव फुला-रांगोळ्यांसह गुपित सांभाळत, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या च्या सुरेल लयीत, बाळाचे नाव पाळण्याच्या कुशीत, पाळण्याच्या साक्षीने बाळाच्या कानात ऐकवून प्रचलित केले जाते. पाळणा गीताच्या सुरांवर बाळाच्या उंच झोक्यांची सुरुवात इथूनच होते. अशा प्रकारे अगदी बालपणापासूनच पाळण्याची संगत प्रत्येकालाच लाभलेली असते.