मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवटचा अश्रू

अनुस्वार ·
लेखनप्रकार
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.

घर..

आजी ·

अशाच घराचं स्वप्न आहे. बांधकाम कमी असलं तरी चालेल, पण मोकळी जागा भरपूर हवी. अगदी लॅण्डस्केप करून नाही, पण घरात वापरात येतील अशी फळे, रोपे, फुले, भाज्या असाव्यात.

गवि 22/02/2021 - 14:48
पाण्यात टाकल्यावर फुटणा-या बिया खूप दशकांनी आठवल्या. आणखी ती एक फळे (बहुधा तेरड्याची असावीत, चुभूद्याघ्या) . ती थोडी बोटांनी चुरगळली की फट्ट करुन फुटून उघडायची आणि वळकटीचे रुप धारण करायची.

माझेही लहानपण (७वी पर्यंत) अशाच कौलारु घरात गेले. अंगणात थोडीफार फुलझाडे, मागे एक आंब्याचे झाड. मातीच्या भिंती, पावसाळ्यात येणारी ओल, फटाके वाजले तर माळ्यावरुन पडणारी माती, अंगणातील पागोळ्या,समोरासमोर वाडे, सगळीकडे अशीच घरे,चाळी,वाडेबिडे,नारळाची झाडे,शाळेचा वेळ सोडला तर कोणाच्याही वाड्यात पडीक असलेली खेळणारी मुले, थोडे मागे चालत गेले की घोडे,टांगेवाले, मग सायकल हाती आल्यावर मित्रांसोबत लांब लांबच्या फेर्‍या. पण लवकरच बिल्डर नावाची कीड लागली आणि वाडे पाडुन बिल्डींग बांधायचा रोग साथीसारखा पसरला. काही काळ अर्धवट बांधलेल्या ईमारतींमध्येही आम्ही आनंदाने बागडलो, वाळूत खेळलो, सळयात फिरलो,विटांवर चढलो,सिमेंट्ने माखलो. पण ती मजा हळुहळु गेलीच. ते बालपणही संपले आणि पांगापांग झाली.

कंजूस 23/02/2021 - 06:20
घराच्या आठवणी आवडल्या आणि समोर दिसलेही. पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या सर्वांकडेच मोठी घरे नव्हती. मोठमोठ्या इमारती श्रीमंत व्यापाऱ्यांनी बांधलेल्या त्यात भाडेकरू. घरं लहान असली तरी आजुबाजूला सोयी सवलती खूप. शाळा, कॉलेजेस,वाहतूक,वाचनिलयं,मैदानं. शि।क्षण आणि करमणूक सोपं. आता काळ बदलला.

आजी 27/02/2021 - 07:48
तुषार काळभोर-तुमचा अभिप्राय वाचून समाधान वाटले.धन्यवाद. गवि-तुमचा अभिप्राय वाचून तेरड्याची फळं मलाही आठवली.मीही जुन्या काळात गेले. मुक्तविहारी-दुर्दैव.दुसरं काय!पर चलता है! सविता-धन्यवाद. राजेंद्र मेहेंदळे-खरंय तुमचं. उंच इमारतींमुळे खूपशा खेड्यातील नैसर्गिक सौंदर्य बिघडवलंय.पण नव्या घरांची मागणी नागरिकांनी केली हेही खरंच आहे. रमेश आठवले-कदाचित माझा आकडा तितकासा बरोबर नसेल कारण तो कुठूनतरी कानावर आलेला आहे.माझे वयही त्यावेळी लहान होते.१९५६/५७सालची गोष्ट असावी. कंजूस- धन्यवाद. आवडल्या सिरुसेरी - thank यू गणेशा- मस्त. धन्यवाद. सौंदाळा-नावात काय आहे? कोणतंही प्रातिनिधिक निमशहर घ्या.

अशाच घराचं स्वप्न आहे. बांधकाम कमी असलं तरी चालेल, पण मोकळी जागा भरपूर हवी. अगदी लॅण्डस्केप करून नाही, पण घरात वापरात येतील अशी फळे, रोपे, फुले, भाज्या असाव्यात.

गवि 22/02/2021 - 14:48
पाण्यात टाकल्यावर फुटणा-या बिया खूप दशकांनी आठवल्या. आणखी ती एक फळे (बहुधा तेरड्याची असावीत, चुभूद्याघ्या) . ती थोडी बोटांनी चुरगळली की फट्ट करुन फुटून उघडायची आणि वळकटीचे रुप धारण करायची.

माझेही लहानपण (७वी पर्यंत) अशाच कौलारु घरात गेले. अंगणात थोडीफार फुलझाडे, मागे एक आंब्याचे झाड. मातीच्या भिंती, पावसाळ्यात येणारी ओल, फटाके वाजले तर माळ्यावरुन पडणारी माती, अंगणातील पागोळ्या,समोरासमोर वाडे, सगळीकडे अशीच घरे,चाळी,वाडेबिडे,नारळाची झाडे,शाळेचा वेळ सोडला तर कोणाच्याही वाड्यात पडीक असलेली खेळणारी मुले, थोडे मागे चालत गेले की घोडे,टांगेवाले, मग सायकल हाती आल्यावर मित्रांसोबत लांब लांबच्या फेर्‍या. पण लवकरच बिल्डर नावाची कीड लागली आणि वाडे पाडुन बिल्डींग बांधायचा रोग साथीसारखा पसरला. काही काळ अर्धवट बांधलेल्या ईमारतींमध्येही आम्ही आनंदाने बागडलो, वाळूत खेळलो, सळयात फिरलो,विटांवर चढलो,सिमेंट्ने माखलो. पण ती मजा हळुहळु गेलीच. ते बालपणही संपले आणि पांगापांग झाली.

कंजूस 23/02/2021 - 06:20
घराच्या आठवणी आवडल्या आणि समोर दिसलेही. पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या सर्वांकडेच मोठी घरे नव्हती. मोठमोठ्या इमारती श्रीमंत व्यापाऱ्यांनी बांधलेल्या त्यात भाडेकरू. घरं लहान असली तरी आजुबाजूला सोयी सवलती खूप. शाळा, कॉलेजेस,वाहतूक,वाचनिलयं,मैदानं. शि।क्षण आणि करमणूक सोपं. आता काळ बदलला.

आजी 27/02/2021 - 07:48
तुषार काळभोर-तुमचा अभिप्राय वाचून समाधान वाटले.धन्यवाद. गवि-तुमचा अभिप्राय वाचून तेरड्याची फळं मलाही आठवली.मीही जुन्या काळात गेले. मुक्तविहारी-दुर्दैव.दुसरं काय!पर चलता है! सविता-धन्यवाद. राजेंद्र मेहेंदळे-खरंय तुमचं. उंच इमारतींमुळे खूपशा खेड्यातील नैसर्गिक सौंदर्य बिघडवलंय.पण नव्या घरांची मागणी नागरिकांनी केली हेही खरंच आहे. रमेश आठवले-कदाचित माझा आकडा तितकासा बरोबर नसेल कारण तो कुठूनतरी कानावर आलेला आहे.माझे वयही त्यावेळी लहान होते.१९५६/५७सालची गोष्ट असावी. कंजूस- धन्यवाद. आवडल्या सिरुसेरी - thank यू गणेशा- मस्त. धन्यवाद. सौंदाळा-नावात काय आहे? कोणतंही प्रातिनिधिक निमशहर घ्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझे वडील डॉक्टर होते. सरकारी नोकरी होती. त्यांच्या दर दोन,तीन वर्षांनी बदल्या होत. प्रत्येक गावात राहायला सरकारी क्वार्टर्स असत. त्यामुळं वेगवेगळ्या खूप घरांतून राहायचा मला अनुभव मिळाला. घरे मोठी,ऐसपैस. वडील रिटायर झाले. तेव्हा मी पाचवीत होते. मी माझ्या आईवडिलांना उशीरा झालेली मुलगी आहे. माझ्या भावंडांच्यात आणि माझ्यात वयाचं खूपच अंतर आहे. वडील रिटायर झाल्यावर आम्ही भाड्याच्या घरातही राहिलो. मग लगेचच आम्ही थोडंसं गावाबाहेर स्वतःचं घर बांधलं. ते घर चौदा हजारांत बांधून झालं. त्यावेळी मी सहावीत शिकत होते. त्या घरात आम्ही राहायला आलो.

आरण्यक :

जयंत कुलकर्णी ·

Ram anuse 22/02/2021 - 16:47
माझ्याकडे ह्या पुस्तकाची मराठी अनुवादीत एक खूप जुनी प्रत आहे.निदान दहावेळा तरी ह्या पुस्तकाचे पारायण झाले असेल..खूप सुंदर पुस्तक आहे..अभिनंदन काका

Ram anuse 22/02/2021 - 16:47
माझ्याकडे ह्या पुस्तकाची मराठी अनुवादीत एक खूप जुनी प्रत आहे.निदान दहावेळा तरी ह्या पुस्तकाचे पारायण झाले असेल..खूप सुंदर पुस्तक आहे..अभिनंदन काका
लेखनविषय:
लेखनप्रकार
आरण्यक Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्र आणि मैत्रिणींनो, आज एक नवीन पुस्तक घेऊन येत आहे. या पुस्तकाचा मी अनुवाद करणार आहे हे मी पूर्वीच सांगितले होते. त्याप्रमाणे हे पुस्तक आपल्यापुढे सादर करण्यास मला आनंद होतोय.

व्यंगचित्रांच्या निमित्ताने...

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

चौथा कोनाडा 01/12/2020 - 15:01
कादंबरी कशी लिहावी हे राजकीय लोक सांगतील, कविता कशी लिहावी, लेख कसा लिहावा, कथा कशी लिहावी, नाटक कसं लिहावं हे राजकीय लोक सांगतील आणि कलावंतानी त्याच आशयाचं लिहायला हवं. चित्र कशी काढावीत हेही तेच सांगतील. सिनेमा कसा निर्माण करावा, कसा दाखवावा हे आधी राजकीय लोकांना तो दाखवून मंजूरी घ्यावी, नंतरच सेन्सार बोर्डाकडे जावं.
यात सर्व काही आलेच ! टोळ्यांच्या हातात शक्ती एकवटत चाललेली आहे. ज्या वेळी जी टोळी पॉवरफुल, त्यावेळी त्यांचे राज्य. ते सांगतील तेच करायचं नाही तर .... एका छोट्याशा कारणांवरून डॉ आनंद यादव यांना संमेलनाध्यक्ष पदावर पाणी सोडावं लागलं त्यावेळी खुप वाईट वाटलेलं. असो. आता कश्याचंही काही वाटून घ्यायचं नाही असे दिवस आलेत. उत्तम लेख +१

चौथा कोनाडा 01/12/2020 - 15:01
कादंबरी कशी लिहावी हे राजकीय लोक सांगतील, कविता कशी लिहावी, लेख कसा लिहावा, कथा कशी लिहावी, नाटक कसं लिहावं हे राजकीय लोक सांगतील आणि कलावंतानी त्याच आशयाचं लिहायला हवं. चित्र कशी काढावीत हेही तेच सांगतील. सिनेमा कसा निर्माण करावा, कसा दाखवावा हे आधी राजकीय लोकांना तो दाखवून मंजूरी घ्यावी, नंतरच सेन्सार बोर्डाकडे जावं.
यात सर्व काही आलेच ! टोळ्यांच्या हातात शक्ती एकवटत चाललेली आहे. ज्या वेळी जी टोळी पॉवरफुल, त्यावेळी त्यांचे राज्य. ते सांगतील तेच करायचं नाही तर .... एका छोट्याशा कारणांवरून डॉ आनंद यादव यांना संमेलनाध्यक्ष पदावर पाणी सोडावं लागलं त्यावेळी खुप वाईट वाटलेलं. असो. आता कश्याचंही काही वाटून घ्यायचं नाही असे दिवस आलेत. उत्तम लेख +१
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे (संदर्भ: 2012 साली केंद्रीय विद्यालयांच्या राज्यशास्त्र- नागरीकशास्त्र विषयांतील अभ्यासाला पुरक असलेल्या स्वातंत्र्याच्या पहाट काळातील काही भारतीय राजकीय ऐतिहासिक व्यक्‍तींच्या व्यंगचित्रांमुळे भावना दुखावण्याचा प्रसंग उद्‍भवला होता. म्हणून तत्कालीन शासनाकडून अनेक चांगली व्यंगचित्रे त्या अभ्यासक्रमातून हटवण्यात आली होती. त्यावेळी लिहिलेला हा लेख. पण ब्लॉगवर अजूनही प्रकाशित केला नव्हता.) आजचे राजकीय नेते नको इतके संवेदनाशील झालेले आहेत.

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

पाषाणभेद ·

माझ्या मतांच्या दोन काड्या टाकून देतो. दमदार काथ्याकूट आहे. ( दोनशे प्रतिसाद अपेक्षित) ''लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग करण्यावर साहित्यिकांनी जो आक्षेप नोंदवला आहे, तो योग्यच आहे असे वाटते. भाजपा आणि राज्यपालांच्या करोनाच्या काळात ज्या विविध भूमिका होत्या त्या पाहता सतत सरकारावर टीका करणे, अडचणी वाढविणे असाच हेतू स्पष्ट दिसतो. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची पत्रापत्री आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली आहे, त्यामुळे साहित्यिकांची आणि संबंधितांनी घेतलेली भूमिका जी मुख्यमंत्र्यांना पाठींबा देण्याची आहे, त्याबद्दल व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून त्यांनी केलेली मतं ही सर्वांना पटलीच पाहिजे असे काही नाही असे वाटते. पण त्या भूमिका व्यक्तीश मला पटणारी आहे. प्रार्थनास्थळे मग ती हिंदूंची असो की मुस्लीमधर्मीयांची किंवा अन्य कोणाचीही तरीही यासंबंधात वेळोवेळी त्या त्या पुढा-यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने दिलेली दिसतात. व्याकूळ भक्तांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रार्थनास्थळे हळुहळु इतर जगरहाटीप्रमाणे उघडू असे म्हटल्याचे आठवते, शारिरिक अंतर, योग्य काळजी आणि सर्व संबंधित गोष्टी यांची काळजी घेत, जनता आपल्या जीवनव्यवहाराला लागलेली दिसत आहे, तेव्हा आता करोनाची भिती तशी राहीलेली नाही, कमी झालेली आहे. आपण सर्वच आत्मनिर्भरतेच्या वाटेला लागलेलो आहोत. तेव्हा मा.मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी जरी सर्व प्रार्थनास्थळे बंद केलेली असली तरी देव आणि भक्त यांच्यात असलेली नियमित भक्तीची व्याकुळता पाहता, सर्वच गोष्टींकडे धर्माधिष्ठीत नजरेने पाहात राजकारण करणा-यांची व्याकुळता पाहता आता फ़ार काळ दुरावा निर्माण व्हायला नको, भक्तांना ताटकळत ठेवायला नको असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 13:19
आपण एकतर इकडे या नाहीतर पलिकडे जा. पहिल्या परिच्छेदात प्रार्थनास्थळांच्या बंद असण्याच्या समर्थनार्थ अन त्याखालील परिच्छेदात देव अन भक्त यांची भावनिकता दर्शवून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत आपली भुमिका परस्परविरोधी आहे. देवाच्या बाबतीत भावनिकता निराळी अन व्यवहार निराळा. अगदी पुजारी अन भक्तदेखील देवाशी व्यवहारच करतात ना? तु काहीतरी दे म्हणजे मी अमुक तमुक अर्पण करेन हा व्यवहारच झाला. कोण देवळात जातो अन केवळ नमस्कार करतो असा असेल तर तो विरळा. प्रस्तूत लेखात साहित्यीकांनी आपली भुमिका मांडण्याची जी वेळ निवडली आहे ती संशयास्पद आहे. त्यांनी ती भुमिका आताच का घेतली असावी याचीही कारणमिमांसा वर केलेली आहे अन त्यात बरेच तथ्य आहे. इतर राज्यात प्रार्थनास्थळांबाबत काय परिस्थिती आहे ते पण लिहीले आहे. आस्थापना, आकडेवारी, कोरोनाची लागण इत्यादी अनेक मुद्दे आहेत की जे साहित्यीकांच्या बोलण्याविरूद्ध आहेत. थोडक्यात त्यांचा बोलविता धनी (अन खरोखर धन देणारा धनीही असू शकतो) निराळाच आहे.

In reply to by पाषाणभेद

पहिली भूमिका आहे, साहित्यिकांनी घेतलेल्या 'श्रद्धेच्या राजकारणाच्या' भूमिकेचं त्याचं स्वागत केलं आहे, सहमती व्यक्त केली आहे. दुसरी भूमिका मा.मुख्यमंत्री यांनी केलेले जे मत होतं (हळुहळु अनलॉक )त्या भूमिकेचंही स्वागत केलं, आणि तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे, काळानुरुप हे बदलते मुद्दे आणि मतं आहेत.. आपल्याला या भूमिका परस्परविरोधी वाटत असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. बाकी आपल्या मूळ काथ्याकूट आणि प्रतिसादातील मुद्यांवर काथ्याकूट करता येईलच...चर्चा सुरु ठेवा. -दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 14:09
मग ठिक आहे. तरीपण साहित्यीकांना असले काही लिहून द्या असे आवाहन केले असल्यास त्यांनी नकार द्यायला हवा होता. कारण हे निवेदन सार्वजनीक आहे. अनेक साहित्यीक, मान्यवर यांनी मिळून दिलेले असल्याने त्याचे महत्व वाढलेले आहे. म्हणूनच त्यातील भुमिकेविषयी बघायला होणार असे त्यांना माहीत असतांना आपले मत अजाणतेपणी दुटप्पी होते आहे असा संशयही त्यांना आला नसावा काय?

Gk 24/10/2020 - 14:15
प्रार्थना स्थळ उघडणे जर योग्य असते तर मोदींनी जन्मभूमी समारंभाला दहा वीस हजार लोक तरी नक्की जमा केले असते , स्वतः पूजा करतात अन इतरांना मात्र बोलावत नाहीत , किती हा दुटप्पीपणा !!

In reply to by आनन्दा

Gk 25/10/2020 - 09:31
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे

In reply to by Gk

Gk 25/10/2020 - 11:00
फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे >>> ------ उरलेले सर्व सेवक सिमेवर गेले आहेत..... चीनला हुसकवण्यासाठी. ३ दिवसांत फौज उभी करु असे ते बोल्ले होते ना ? दसरा हा ३.५ मुहुर्तां पैकी एक आहे, या दिवशी सिमोलंघन...

Rajesh188 24/10/2020 - 15:44
Covid19 च्या प्रकोपला अटकाव निर्माण करण्यासाठी प्रार्थना स्थळ बंद केली होती. ती योग्य वेळ आल्यावर उघडली जातील. पण ती आताच उघडली पाहिजेत. ट्रेन,बस, बार,दुकाने चालू केली मग प्रार्थना स्थळ च बंद का. पण तुम्ही बाकी अस्थापण आणि प्रार्थना स्थळ ह्यांची बरोबरी कशी करू शकता. अर्थ चक्र थांबू नये फिरत राहवे म्हणून बाकी आस्थापना चालू केली आहेत ती पण नाईलाज म्हणून. धोका तर आहेच ह्या निर्णयात. म्हणून अजुन धोका वाढवायचा का प्रार्थना स्थळ उघडून. मुळात ही मागणीच राजकीय आहे . त्या वर जास्त गंभीर पने विचार करण्याची गरज नाही.

In reply to by Rajesh188

बाप्पू 24/10/2020 - 18:40
राजेश जी बऱ्याच ठिकाणी आपली मते विभिन्न असली तरी इथे मात्र मी सहमत आहे. सरकारने जोवर कोरोना संकट आटोक्यात येत नाही तोवर सर्वच प्रार्थनास्थळे ( फक्त मंदिरे नव्हे ) बंद ठेवावीत. कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले होते आणि त्याला गती देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने सर्व दुकाने, कंपन्या, कार्यालये इ सुरु केलेत जेणेकरून त्यावर अवलंबून असणारे लोकं उपाशी मरू नयेत. पण हाच न्याय प्रार्थनास्थळांना लावता येणार नाही. प्रार्थनास्थळे ही जीवनावश्यक गोष्ट नाहीये. परमेश्वराला वंदन करण्यासाठी फक्त तिथेच जाण्याची गरज नाही. सर्व काही घरून देखील करू शकता . बीजेपी किंवा जे कोणी लोकं प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायेत तो एकप्रकारे राजकीय डाव आहे. सामान्य माणसांनी याला बळी पडू नये. राज्यपाल केशारी यांनी ठाकरे सरकारला "सेकुलर" म्हणून डिवचणे या ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी जर सरकारने फक्त मंदिरे बंद ठेवून बाकी धर्मियांना अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली काहीही चाळे करायची मुभा दिली असती ( जी कि खांग्रेस ची जुनी खोड आहे ) तर ती टीका योग्य होती.. पण सरसकट सर्व प्रार्थनास्थळे बंद असताना सरकार वर मंदिरे उघडण्यासाठी दबाव टाकणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि सर्वांनी समर्थन करावे असे वाटते. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे. दुसऱ्या बाजूच्या लोकांची मते वाचायला आवडतील.

In reply to by बाप्पू

सॅगी 24/10/2020 - 19:17
प्रार्थनास्थळांवरही अनेक लोकांचे जीवन अवलंबून असतेच की... जसे की फूल/हार विक्रेते, मोठ्या प्रार्थनास्थळांजवळील हॉटेल्स्/लॉजेस ईत्यादी..

शा वि कु 24/10/2020 - 18:52
इतर गोष्टी विनासायास चालू असताना प्रार्थनास्थळे बंद करून काय फायदा होणार ?
तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे,
हे प्राडॉंचे म्हणणे पटले. ऑल इन ऑर नथिंग हे लॉकडाऊनचे मॉडेल आहे असे वाटते. इतरत्र गर्दी होणे चालत असेल तर, उपयोगी/गरजेची असो वा नसो, गर्दी आहेच. मग ती प्रार्थनास्थळी काय आणि बसस्टेशनवर काय.

विजुभाऊ 24/10/2020 - 19:20
हल्ली बरेचसे व्यवहार कॅशलेस होतात. ए टीम मशीन पर्यंत जाण्याची गरजच भासत नाही. फारसे काही अडते असे नाही. तद्वत देवळात , प्रार्थनस्थळी जाण्याचीही तशी गरज नसते. घरातला देव वेगळी आणि देवळातला देव वेगळा असे काही असेल असे वाटत नाही. लोकांना देवळाची प्रार्थनास्थळाची गरज भासते कारण तेथे इतर बरेच काही मिळते/इतर समविचारी लोक भेटतात वगैरे वगैरे. प्ण हे ऑन लाईनही शक्य आहे. मनुष्य हा सामाजप्रिय प्राणी आहे , तो एकटा राहू शकत नाही. अन्यथा देवळांची प्रार्थनास्थळांची गरज आहे असे वाटत नाही

चौथा कोनाडा 24/10/2020 - 19:26
प्रार्थना घरीही करू शकतो, त्यासाठी प्रार्थना स्थळातच जायला पाहिजे असे नाही ! या अनुषंगाने सध्या तरी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा. दिवाळी पुर्वी पर्यंत कोविडचा आलेख नक्की पहावा व त्या नुसार निर्णय घ्यावा.

Rajesh188 24/10/2020 - 19:28
घरात मागवले ल जेवण आणि हॉटेल मध्ये जावून तिथे बसून केलेलं जेवण काय फरक असतो तेच पदार्थ असणार. पण विशिष्ट जागेला महत्व आहे. मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.

In reply to by Rajesh188

मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.
हे काहींबाबत खरे जरी असले तरी अशा परिस्थितीत ते करावे का? आपल्या धर्मात मानसपूजेची देखील सोय आहे नुसत्या दर्शनाचे काय घेउन बसलात. परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे ना!

Gk 25/10/2020 - 09:37
सोलापुरात देऊळ प्रकरणावरून विहिप चे हिंसक आंदोलन . खरे आहे का ? सत्ता नसलेल्या राज्यातच आंदोलन होते , हा योगायोग म्हणे , नैतर गुजरात अन वाराणशीत देवळे सुरू आहेत का ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:12
सहमत GK. तुमची असलेली गुजरात ची कावीळ परत दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. स्त्रियांवरील अत्याचार किंवा बलात्कार यांचा देखील असाच विरोध आणि आंदोलने एका विशिष्ठ राज्यात च होतात. इतके मोठे आंदोलन ( इव्हेंट ) असते कि राजकुमारी आणि राजकुमार दोघेही रस्त्यावर येतात. जिकडे त्यांची सत्ता असते तिथे स्त्रियांवर अत्याचार / बलात्कार होत नाहीत का?? तिकडे अश्या घटना झाल्यावर दोघेही पर्यटनाला निघून जातात.. आणि आंदोलन सूरु करण्याआधी व्हिक्टीम ची जात लगेच शोधून काढली जाते. कारण त्यानुसार आंदोलनाची तीव्रता ठरवावी लागते.. किती माणसे भाड्याने बोलवायची ते ठरवले जात असावे.. जिथे राजकुमार यांची pvt ltd सत्तेत आहे तिथे जातींचे रेकॉर्ड ठेवले जात नाही का??

In reply to by बाप्पू

Gk 25/10/2020 - 10:18
आम्हाला वाईट म्हणता म्हणता तुम्हीही आमच्यासारखेच वागू लागले, मग पार्टी विथ डिफ्रँस मध्ये आता डिफ्फेरेंट काय राहिले म्हणे ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:55
तुमच्या चुका दाखवल्या कि लगेच आमच्यावर भाजेपायी असा शिक्का मारून टाकला राव.. चला थोड्या वेळासाठी मान्य करू कि आहे मी भाजपेयी.. भक्त किंवा जे काय असेल ते.. तुम्ही तुमच सांगा ओ. .. सर्वात जुनी पार्टी, स्वातंत्र्य मिळवून देणारी पार्टी, लोकशाही वादी पार्टी, भाईचारा पार्टी ( ज्यामध्ये इक जण नेहमीच भाई आणि दुसरा चारा बनत आलाय ) असे असून तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी एकाच राज्याची उचकी का हो लागते?? आणि मी वर लिहिल्याप्रमाणे मी मंदिर उघडण्याचे, संबंधित आंदोलनाचे, राज्यपाल केशारी यांच्या वागणुकीचे समर्थन करत नाही, कारण माझी बुद्धी मी एका पक्षाच्या, एका धर्माच्या, एका खानदानाच्या, एका विचारसरणीच्या दावणीला बांधलेली नाही. पण तुम्ही मात्र नेहमीच प्रत्येक धाग्यावर येन केन प्रकारे मोदी आणि गुजरात आणून आपल्या काविळीचा परिचय देता आणि त्याचबरोबर आपल्या मानसिक गुलामीचा देखील. एखाद्याने व्हॅलिड मुद्दा मांडला तरी त्याच्या प्रतिसादातीत एखादा विशिष्ट शब्द शोधून फक्त तेवढ्यावर च त्याला डिवचायचे.. एवढंच करता. मग त्याचे बाकीचे मुद्दे गेले गाढवाच्या xxx..

In reply to by डॅनी ओशन

बाप्पू 25/10/2020 - 12:06
समझने वाले समझ गये.. !! :D सॉरी. आम्ही अस्सल कोल्हापूरवाले असल्याने चार पाच वाक्यानंतर असे काहीसे आपसूकच तोंडात येते.. न आल्यास चुकल्या चुकल्या सारखे वाटते..

सर्वप्रथम - मी जाहीरपणे आर्य सनातन वैदिक हिंदु आहे आणि तरीही मंदिरे अजुनही उघडली नाहीत ह्या बद्दल मला मनापासुन आनंद आहे ! १. मंदिरांचा देवस्थानांचा अक्षरशः बाजार मांडला होता , मेन्यु कार्ड छापल्यासारखे ह्या पुजेला इतकी देणगी अन त्या सेवेला इतकी देणगी अशी पत्रके मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत . भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा असा धंदा मांडणार्‍याच्या बाजार उठवल्या बद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. २. मंदिराबाहेरच्या छोट्यामोठ्ठ्या व्यापार्‍यांनी देवस्थान परीसरांची अवस्था अक्षरशः हगणदारी सदृष करुन टाकली होती , कोणीही यावे कोठेही तंबु टाकावे , बाजार मांडावा , आओ जाओ राज तुम्हारा चालु होते . हा प्रकार मी देहु , अलंदी , सज्जनगड , कोल्हापुर ह्या माझ्या आवडत्या देवस्थानात पाहिला आहे अन हळहळलो आहे . घृष्णेश्वरला तर अशाच एका व्यापार्‍याने चप्पल आणि मोबाईल मंदिरात नेणे अलाऊड नाही इथेच ठेवा असे सांगुन १० -२० रुपये मागितल्याचे आठवते. भीमाशंकरला तर भर गाभार्‍यात "पावती फाडली नाही तर प्रदक्षिणा नाही " असे एका पुजार्‍याने मला सांगितले होते तेही शिवलिंगासमोर !! मंदिरे बंद असल्याने ह्या असल्या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय आलेला पाहुन मला मनस्वी समाधान मिळत आहे ( त्याला सात्विक की तामसिक जे काही लेबल लावायचे ते लावा ) . ३. " आम्ही डोंबार्‍याचा खेळ मांडल्यासारखे पुजा अर्चा करतो " असे एका पुरोहिताने मला स्पष्ट सांगितले आहे , धर्माचा धंदा करुन, भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रध्देचा फायदा उचलुन स्वतःची तुंबडी भरणार्‍या लोकांच्या बाजारु वृतीला नकळत का होईना पण चाप लागला आहे हे चांगलेच आहे ! ४. साहित्यिक दुट्टप्पी भुमिका घेत आहेत हे चांगलेच आहे कारण त्यांची इच्छा नसली तरीही योगायोगाने त्यांची भुमिका ही खर्‍या सश्रध्द भाविकाच्या हिताचीच आहे , शिवाय त्यांचे पुरोगामित्वाचे बुरखे तेच स्वतःहुन फाडत आहेत ह्याचे समाधान आहे ! ५. आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे - हिंदुधर्मातील देवसथानांच्या बाजारु वृतीला ठेचुन काढण्याचे काम हे हिंदुत्ववादी लोकांना करावे लागत नसुन इतरांना करावे लागत आहे हे म्हणजे अक्षरशः जावयाच्या काठीने साप मारण्यातला प्रकार आहे , सापही मरत आहे अन काठी तुटली तरी ती शेजार्‍याची असेल आपली नाही ! लय भारी ! :) तळटीप : वरील प्रतिसादात काही उपरोधिक सारक्यास्टिक नाही , जे आहे ते सरळ स्पष्ट आहे. अवांतर : सश्रध्द आणि भोळ्या भाविकांना , विशेषकरुन जे नित्यनेमाने मंदिरात जातात त्यांना , देवाचा विरहाने काय मानसिक वेदना होत असतील हे मी जाणतो . पण मंदिरात गेलो नाही म्हणुन काही अडुन रहात नाही , समर्थांची ओवी प्रसिध्दच आहे - धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ तस्मात मंदिरे बंद आहेत म्हणुन हळहळ करण्यासारखे काहीच नाही . माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगतात - एर्‍हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ प्र्त्येक प्राणीमात्राच्या हृदयात स्फुरण पावणारा "मी आहे " हा विचारच परमात्मा असल्याने खर्‍या भक्ताला उपासना करायला मंदिर बंद असल्याने काहीच फरक पडत नाही ! अजुन काही काळ संयम धरु , करोना संपला की राममंदिरात जायचे आहेच आपल्याला!! इत्यलम .

In reply to by प्रसाद गोडबोले

ही म्हण नक्की काय ? ही म्हण नक्की काय आहे , शेजार्‍याच्या काठी साप मारणे की जावयाच्या काठीने साप मारणे ? काही का असेना , साप तर मेला पाहिजे अन आपली काठी तुटली नाही की बस्स , जिंकलो =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 25/10/2020 - 20:40
मार्कस ऑरेलियस, मुद्द्यात पॉईन्ट आहे. पण हे देखील व्यावसायिक कारखाने आहेत आणि या साखळीतील तळागाळाच्या कष्टकर्‍यांची उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ?

In reply to by चौथा कोनाडा

त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ? >>> नाही . पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये . नो मोअर गव्हर्न्मेन्ट स्पेन्डिंग ! लेट द बॅड बिजनेस फेल ! लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह ! थोडे अवांतर आहे हे . आपल्या लोकांना राजकारणाचा , मोदीद्वेषाचा ओव्हरडोस झालाय त्याला मिपाही अफवाद नाही पण असो इकोनॉमिक्स आणि रिकव्हरी फ्रॉम रिसेशन हा नक्कीच चर्चा करण्यासारखा विषय आहे. निवांत बोलु कधीतरी .

In reply to by प्रसाद गोडबोले

Gk 26/10/2020 - 05:27
आणि मग उद्योगपतींना मोदी सरकार कर्जे माफ करते , त्याचे काय करणार ? नेचरल क्युअर पाहिजे तर मग मोदी सरकारने रिजर्व ब्यांकटले पैसे का काढले ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 26/10/2020 - 17:25
मार्कस ऑरेलियस साहेब, फिल्म मस्तच आहे ! (या पार्श्वभुमीवर भारताच्या इकॉनोमीची रिकव्हरी / सुरळित व्हावी म्हणुन केन्द्र शासकिय कर्मचार्‍यांना भरघोस बोनस देऊन त्यांना खरेदीसाठी उद्युक्त केले जाणार आहे, अन त्याच वेळी कित्येक छोटे उद्योग, तळागाळातील कष्टकरी प्रचंड आर्थिक चणचणीत आहेत, त्यांचा सर्व्हायव्हल साठी निकराची धडपड सुरु आहे हे जाता जाता आठवले)
पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये .
मग 'आरक्षण" हे पॅकेज नाही तर काय आहे ? जगभरात विविध देशांमध्ये पॅकेज देत असतातच, त्या अर्थी पॅकेज देणे हे जगतिक पातळीवरील आर्थिक धोरणांचा भाग आहे. त्यामुळे हे विधान भाबडे वाटतेय.
लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी
हे फारच थेरॉटिकल होतेय ! अपंगाना विविध सवलती देतात ते त्यांच्या नॅचरल रिकव्हरीसाठीच देतात ना ?
अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह !
हे तत्वतः मान्य होण्यासार्खे असले तरी (भारतात तरी) व्यवहार्य नाही.

पाषाणभेद साहेब ! आपला लेख वाचला. काही मुद्द्यांवर मत मांडतो. १. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात बहुतांश वेळा स्वत:ला निर्धर्मी म्हणविणारे पण प्रत्यक्षात धर्मांध असणारे पक्षच सत्तेत आहेत. त्यामुळे मंदीरांबद्द्लचा त्यांचा दृष्टीकोण आजपासून नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून जगजाहिर आहे. त्यात नवे किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सध्या महाराष्ट्रात ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे त्यांनी स्वतःला निधर्मी म्हणणार्‍या पक्षांशी युती केली असल्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य काय यापेक्षा इतर दोन पक्षांची काय मते आहेत याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. हाच पक्ष आज जर सत्तेत नसता तर आज मंदीरांबद्द्ल त्यांची भुमिका नेमकी १८० अंशाने विरुद्ध राहिली असते हे सांगायला कोणत्याही ज्योतीषाची (किंवा वै़ज्ञानिकाची) आवश्यकता नाही. राजकारण्यांना जनतेच्या हितापेक्षा सत्तेचा विचार नेहमीच अग्रक्रमाने करावा लागतो कारण सत्ता हे त्यांचे प्रथम ध्येय्य असते. सत्तेच्या अनुषंगाने मिळालेल्या जबाबदार्‍या पार पाडणे ही दुय्यम जबाबदारी असते. २. साहित्यिक आणि बुद्धीजीवी यांचा सामान्य जनतेशी संबंंध कधीच नव्हता (सन्माननिय अपवाद होते, आहेत आणि पुढेही असणारच आहेत). मात्र साहित्यिकांनी पाठींबा दिला म्हणून मतपेटीच्या राजकारणावर त्याचा परीणाम होत नसतो हे सत्ताधार्‍यांना, सामान्य जनतेला चांगले माहित आहे. साहित्यिकांना कितपत माहित आहे हे त्यांचे त्यांना ठाऊक. साहित्यिकांचा उल्लेख वर्तमानपत्रात केवळ साहित्य संमेलनाच्या काळात आणि असाच एखाद दुसर्‍या वेळी येतो. त्यामुळे जर साहित्यिकांना बातम्यात झळकण्याची संधी मिळाली आहे तीचा त्यांना जरुर लाभ व्हावा. त्यानिमित्ताने तरी वाचनशत्रू जनतेला २-४ साहित्यिकांची नावे माहित होतील. न जाणो या कारणामुळे काहींना मराठी साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्यामुळे याही निमित्ताने व्यथित होण्याचे कारण नाही. ३. राहता राहिला प्रश्न मंदीरे उघडण्याचा. मंदिरे उघडली काय आणि न उघडली काय, खर्‍या भाविकांस त्यापासून काही फरक पडणार नाही. आपल्या लाडक्या देवतेचे दर्शन न झाल्यामुळे तो कदाचित दु:खी होईल मात्र विरहभावनेमुळे त्याच्या दैवतावरील प्रेमात अभिवृद्धी होईल यात शंका नाही. त्यामुळे थोडी वाट पाहूया, आज ना उद्या मंदिरे नक्कीच उघडतील यात एक आस्तिक हिंदू म्हणून माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. दानपेटीत काय अर्पण करायचे आणि मतपेटीत काय अर्पण करायचे याचा निर्णय सुज्ञ जनता नक्कीच घेईल. तोपर्यंत धीर धरी मना ! ध्यान धरी मना ! आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गामा पैलवान 26/10/2020 - 19:56
मार्कस ऑरेलियस, तुमचा इथला https://www.misalpav.com/comment/1084117#comment-1084117 संदेश वाचला. माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे. देव जरी चराचरांत असला तरी तो चटकन दिसून येत नाही. तस्मात देवळे हवीच. हवा सर्वत्र असली तरी छातीत सतत ओढून घ्यावीच लागते. गायीचं दूध तिच्या रक्तापासनं बनतं. रक्त गायीच्या देहात सर्वत्र आहे. पण म्हणून तिचं दूध शिंगं खूर, इत्यादि अवयवांत मिळंत नाही. त्यासाठी सडच पिळावे लागतात. या धर्तीवर देवळांची उपयुक्तता ध्यानी यावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा.पै. , सादर नमस्कार ! मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल कोणतीच शंका नाही, मंदिरे आवश्यक आहेतच . पण
माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे.
मंदिरांचे बाजारीकरण करणार्‍या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय द्यायला टाळेबंदी हा उत्तम उपाय आहे इतकेच माझे मत आहे . ही अपप्रवृत्ती प्रबोधनाने निपटुन काढता येत नाही हे कटु सत्य आहे . देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :( हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल. आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो. आपण कोणतेही एक , ज्याच्याविषयी तुम्हाला आत्मीयता आहे असे एखादे देवस्थान निवडा अन केवळ प्रबोधनाने तेथील बाजारु अपप्रवृत्तींचा नायनाट करुन दाखवा , मी चुक मान्य करत आपली क्षमा मागेन ! पण हे होईल असे दिसत नाही :( माझ्या एका अत्यंत प्रिय ठिकाणच्या देवस्थानाने मंदिरात येणार्‍या भाविकांची अन पर्यायाने देणगीची आवक कमी झाली म्हणुन चक्क फेसबुक पेज काढले आहे अन तिथे त्यांचे " मेन्युकार्ड" दिले आहे , शिवाय बँक खाते क्रमांक यु.पी. आय क्रमांकही दिला आहे . " देवाच्या मुर्तींचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे" असले बोर्ड लाऊन मंदिराच्या गाभार्‍याचे विद्रुपीकरण करणारे हे लोक आता स्वतःच रोजच्या नित्यपुजेचे फोटो आणि विदिओ अपलोड करतात + मेन्युकार्ड आहेच सोबत. आता आपण मंदिराच्या गाभार्‍यातील तो बाजारु बोर्ड केवळ प्रबोधन करुन काढुन दाखवणार का ? लगेच देवस्थानाची लिंक पाठवतो तुम्हाला ! बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 27/10/2020 - 19:25
मार्कस ऑरेलियस, तुम्ही एक कसलेले भक्त आहात. साहजिकंच तुम्हांस चराचरांत देव सापडतो. पण सामान्य जनतेचं तसं नसतं. देवळांवर फक्त भक्तांचाच अधिकार आहे. जे काही करायचं ते सेवा म्हणून करायचं असतं. हे प्रबोधन अंगी मुरायला आजून दोनेक पिढ्या खर्ची पडतील. याला कारण धर्मशिक्षणाचा अभाव हे आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे कोणी नसल्याने हिंदूंमध्ये धर्मविघातक दृष्टीकोन बळावले आहेत. बाजारू प्रवृत्ती याचाच परिपाक आहेत. तर या बाजारू विकृतींना टाळेबंदीच्या मिषाने बाजूला सारण्यात यश लाभलं, तरी ते अल्पकालीन असेल. ते दृढमूल करण्यासाठी दीर्घकालीन धर्मशिक्षण हाच उपाय आहे. मला वाटतं हे तुम्हांस मान्य व्हावं. आता असं बघा की, आपली देवळं ही धर्मशिक्षणाची केंद्रं आहेत. नेमकी तीच बंद ठेवली तर धर्मशिक्षण मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे एकीकडे टाळेबंदीचे फायदे व दुसरीकडे धर्मशिक्षणाच्या अभावाचे नुकसान अशा दोन्ही बाजू विचारांत घ्यायला हव्यात. माझ्या मते धर्मशिक्षण हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून देवळं उघडायला हवीत. तुम्ही मला प्रबोधनयोगे कोणत्याची एका धर्मस्थानातला बाजार बंद करण्याविषयी सुचवलं होतंत. तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे. समजा मी हे उद्दिष्ट प्राप्त करून दाखवलं तरी तत्पावेतो दोनपाच वर्षे लोटतील. तोवर आजचा प्रश्न कालबाह्य झालेला असेल. धर्मशिक्षण ही वेळखाऊ व दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिच्यातून सत्वर निकाल अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर तुमची काही विधाने निरखतो. १.
देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :(
हे खरंय. माझ्या मते याचं कारण असं की, देवदर्शनार्थ भक्त येतात ते प्रामुख्याने प्रापंचिक विवंचना दूर करायला. म्हणून त्यांचंही प्रबोधन होणं आवश्यक आहे. देव हा नडभागवू निकडपुरवठादार नसून साधनेचा सहाय्यक आहे, हा दृष्टीकोन घट्ट झाला पाहिजे. त्यासाठीही धर्मशिक्षण आवश्यक आहेच. २.
हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल.
शेजाऱ्याकडनं मारला गेला तर आनंदच आहे. पण मी या परावलंबनाविषयी साशंक आहे. ३.
आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो.
यांत खेद कसला? उलट भक्तांमध्ये विविधांगी चर्चा व्हायला हवीये. म्हणून आपलेतुपले मतभेद हा खेदाचा विषय आजिबात नाही. ४.
बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.
क्या बात है. आपण (दोघेही) असेच मिळून मिसळून राहूया. सहवीर्यं करवावहै ! असो. देव भावाचे भुकेले आहेत. त्यांना किती दिवस उपाशी ठेवायचं? एखाद महिना ठीके. पण सहासहा महिने देवळं बंद राहणार असतील तर देवांचा कोप होईल. हिरण्यकश्यपू व रावणाने देवतार्चन थांबवलं होतं. त्यांचं काय झालं हे सर्वांना माहितीये. तसलं काही उद्धव ठाकऱ्यांचं होऊ नये, अशीही माझी एक उपेच्छा आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 26/10/2020 - 23:45
पण ह्या अप्रवती आणि लोकांच्या श्रद्धा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोक मंदिरात जातात ते श्रधेपोटी, भक्ती पोटी. त्या श्रध्देचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी करून घेणारी अप्रवृती मंदिर परिसरात आणि मंदिरात दिसून येते खरी. ते नाकारता येणार नाही. आणि ह्या मध्ये सुधारणा करणे हे आपले म्हणजे हिंदू चेच काम आहे.

माझ्या मतांच्या दोन काड्या टाकून देतो. दमदार काथ्याकूट आहे. ( दोनशे प्रतिसाद अपेक्षित) ''लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग करण्यावर साहित्यिकांनी जो आक्षेप नोंदवला आहे, तो योग्यच आहे असे वाटते. भाजपा आणि राज्यपालांच्या करोनाच्या काळात ज्या विविध भूमिका होत्या त्या पाहता सतत सरकारावर टीका करणे, अडचणी वाढविणे असाच हेतू स्पष्ट दिसतो. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची पत्रापत्री आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली आहे, त्यामुळे साहित्यिकांची आणि संबंधितांनी घेतलेली भूमिका जी मुख्यमंत्र्यांना पाठींबा देण्याची आहे, त्याबद्दल व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून त्यांनी केलेली मतं ही सर्वांना पटलीच पाहिजे असे काही नाही असे वाटते. पण त्या भूमिका व्यक्तीश मला पटणारी आहे. प्रार्थनास्थळे मग ती हिंदूंची असो की मुस्लीमधर्मीयांची किंवा अन्य कोणाचीही तरीही यासंबंधात वेळोवेळी त्या त्या पुढा-यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने दिलेली दिसतात. व्याकूळ भक्तांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रार्थनास्थळे हळुहळु इतर जगरहाटीप्रमाणे उघडू असे म्हटल्याचे आठवते, शारिरिक अंतर, योग्य काळजी आणि सर्व संबंधित गोष्टी यांची काळजी घेत, जनता आपल्या जीवनव्यवहाराला लागलेली दिसत आहे, तेव्हा आता करोनाची भिती तशी राहीलेली नाही, कमी झालेली आहे. आपण सर्वच आत्मनिर्भरतेच्या वाटेला लागलेलो आहोत. तेव्हा मा.मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी जरी सर्व प्रार्थनास्थळे बंद केलेली असली तरी देव आणि भक्त यांच्यात असलेली नियमित भक्तीची व्याकुळता पाहता, सर्वच गोष्टींकडे धर्माधिष्ठीत नजरेने पाहात राजकारण करणा-यांची व्याकुळता पाहता आता फ़ार काळ दुरावा निर्माण व्हायला नको, भक्तांना ताटकळत ठेवायला नको असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 13:19
आपण एकतर इकडे या नाहीतर पलिकडे जा. पहिल्या परिच्छेदात प्रार्थनास्थळांच्या बंद असण्याच्या समर्थनार्थ अन त्याखालील परिच्छेदात देव अन भक्त यांची भावनिकता दर्शवून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत आपली भुमिका परस्परविरोधी आहे. देवाच्या बाबतीत भावनिकता निराळी अन व्यवहार निराळा. अगदी पुजारी अन भक्तदेखील देवाशी व्यवहारच करतात ना? तु काहीतरी दे म्हणजे मी अमुक तमुक अर्पण करेन हा व्यवहारच झाला. कोण देवळात जातो अन केवळ नमस्कार करतो असा असेल तर तो विरळा. प्रस्तूत लेखात साहित्यीकांनी आपली भुमिका मांडण्याची जी वेळ निवडली आहे ती संशयास्पद आहे. त्यांनी ती भुमिका आताच का घेतली असावी याचीही कारणमिमांसा वर केलेली आहे अन त्यात बरेच तथ्य आहे. इतर राज्यात प्रार्थनास्थळांबाबत काय परिस्थिती आहे ते पण लिहीले आहे. आस्थापना, आकडेवारी, कोरोनाची लागण इत्यादी अनेक मुद्दे आहेत की जे साहित्यीकांच्या बोलण्याविरूद्ध आहेत. थोडक्यात त्यांचा बोलविता धनी (अन खरोखर धन देणारा धनीही असू शकतो) निराळाच आहे.

In reply to by पाषाणभेद

पहिली भूमिका आहे, साहित्यिकांनी घेतलेल्या 'श्रद्धेच्या राजकारणाच्या' भूमिकेचं त्याचं स्वागत केलं आहे, सहमती व्यक्त केली आहे. दुसरी भूमिका मा.मुख्यमंत्री यांनी केलेले जे मत होतं (हळुहळु अनलॉक )त्या भूमिकेचंही स्वागत केलं, आणि तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे, काळानुरुप हे बदलते मुद्दे आणि मतं आहेत.. आपल्याला या भूमिका परस्परविरोधी वाटत असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. बाकी आपल्या मूळ काथ्याकूट आणि प्रतिसादातील मुद्यांवर काथ्याकूट करता येईलच...चर्चा सुरु ठेवा. -दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 14:09
मग ठिक आहे. तरीपण साहित्यीकांना असले काही लिहून द्या असे आवाहन केले असल्यास त्यांनी नकार द्यायला हवा होता. कारण हे निवेदन सार्वजनीक आहे. अनेक साहित्यीक, मान्यवर यांनी मिळून दिलेले असल्याने त्याचे महत्व वाढलेले आहे. म्हणूनच त्यातील भुमिकेविषयी बघायला होणार असे त्यांना माहीत असतांना आपले मत अजाणतेपणी दुटप्पी होते आहे असा संशयही त्यांना आला नसावा काय?

Gk 24/10/2020 - 14:15
प्रार्थना स्थळ उघडणे जर योग्य असते तर मोदींनी जन्मभूमी समारंभाला दहा वीस हजार लोक तरी नक्की जमा केले असते , स्वतः पूजा करतात अन इतरांना मात्र बोलावत नाहीत , किती हा दुटप्पीपणा !!

In reply to by आनन्दा

Gk 25/10/2020 - 09:31
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे

In reply to by Gk

Gk 25/10/2020 - 11:00
फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे >>> ------ उरलेले सर्व सेवक सिमेवर गेले आहेत..... चीनला हुसकवण्यासाठी. ३ दिवसांत फौज उभी करु असे ते बोल्ले होते ना ? दसरा हा ३.५ मुहुर्तां पैकी एक आहे, या दिवशी सिमोलंघन...

Rajesh188 24/10/2020 - 15:44
Covid19 च्या प्रकोपला अटकाव निर्माण करण्यासाठी प्रार्थना स्थळ बंद केली होती. ती योग्य वेळ आल्यावर उघडली जातील. पण ती आताच उघडली पाहिजेत. ट्रेन,बस, बार,दुकाने चालू केली मग प्रार्थना स्थळ च बंद का. पण तुम्ही बाकी अस्थापण आणि प्रार्थना स्थळ ह्यांची बरोबरी कशी करू शकता. अर्थ चक्र थांबू नये फिरत राहवे म्हणून बाकी आस्थापना चालू केली आहेत ती पण नाईलाज म्हणून. धोका तर आहेच ह्या निर्णयात. म्हणून अजुन धोका वाढवायचा का प्रार्थना स्थळ उघडून. मुळात ही मागणीच राजकीय आहे . त्या वर जास्त गंभीर पने विचार करण्याची गरज नाही.

In reply to by Rajesh188

बाप्पू 24/10/2020 - 18:40
राजेश जी बऱ्याच ठिकाणी आपली मते विभिन्न असली तरी इथे मात्र मी सहमत आहे. सरकारने जोवर कोरोना संकट आटोक्यात येत नाही तोवर सर्वच प्रार्थनास्थळे ( फक्त मंदिरे नव्हे ) बंद ठेवावीत. कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले होते आणि त्याला गती देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने सर्व दुकाने, कंपन्या, कार्यालये इ सुरु केलेत जेणेकरून त्यावर अवलंबून असणारे लोकं उपाशी मरू नयेत. पण हाच न्याय प्रार्थनास्थळांना लावता येणार नाही. प्रार्थनास्थळे ही जीवनावश्यक गोष्ट नाहीये. परमेश्वराला वंदन करण्यासाठी फक्त तिथेच जाण्याची गरज नाही. सर्व काही घरून देखील करू शकता . बीजेपी किंवा जे कोणी लोकं प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायेत तो एकप्रकारे राजकीय डाव आहे. सामान्य माणसांनी याला बळी पडू नये. राज्यपाल केशारी यांनी ठाकरे सरकारला "सेकुलर" म्हणून डिवचणे या ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी जर सरकारने फक्त मंदिरे बंद ठेवून बाकी धर्मियांना अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली काहीही चाळे करायची मुभा दिली असती ( जी कि खांग्रेस ची जुनी खोड आहे ) तर ती टीका योग्य होती.. पण सरसकट सर्व प्रार्थनास्थळे बंद असताना सरकार वर मंदिरे उघडण्यासाठी दबाव टाकणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि सर्वांनी समर्थन करावे असे वाटते. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे. दुसऱ्या बाजूच्या लोकांची मते वाचायला आवडतील.

In reply to by बाप्पू

सॅगी 24/10/2020 - 19:17
प्रार्थनास्थळांवरही अनेक लोकांचे जीवन अवलंबून असतेच की... जसे की फूल/हार विक्रेते, मोठ्या प्रार्थनास्थळांजवळील हॉटेल्स्/लॉजेस ईत्यादी..

शा वि कु 24/10/2020 - 18:52
इतर गोष्टी विनासायास चालू असताना प्रार्थनास्थळे बंद करून काय फायदा होणार ?
तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे,
हे प्राडॉंचे म्हणणे पटले. ऑल इन ऑर नथिंग हे लॉकडाऊनचे मॉडेल आहे असे वाटते. इतरत्र गर्दी होणे चालत असेल तर, उपयोगी/गरजेची असो वा नसो, गर्दी आहेच. मग ती प्रार्थनास्थळी काय आणि बसस्टेशनवर काय.

विजुभाऊ 24/10/2020 - 19:20
हल्ली बरेचसे व्यवहार कॅशलेस होतात. ए टीम मशीन पर्यंत जाण्याची गरजच भासत नाही. फारसे काही अडते असे नाही. तद्वत देवळात , प्रार्थनस्थळी जाण्याचीही तशी गरज नसते. घरातला देव वेगळी आणि देवळातला देव वेगळा असे काही असेल असे वाटत नाही. लोकांना देवळाची प्रार्थनास्थळाची गरज भासते कारण तेथे इतर बरेच काही मिळते/इतर समविचारी लोक भेटतात वगैरे वगैरे. प्ण हे ऑन लाईनही शक्य आहे. मनुष्य हा सामाजप्रिय प्राणी आहे , तो एकटा राहू शकत नाही. अन्यथा देवळांची प्रार्थनास्थळांची गरज आहे असे वाटत नाही

चौथा कोनाडा 24/10/2020 - 19:26
प्रार्थना घरीही करू शकतो, त्यासाठी प्रार्थना स्थळातच जायला पाहिजे असे नाही ! या अनुषंगाने सध्या तरी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा. दिवाळी पुर्वी पर्यंत कोविडचा आलेख नक्की पहावा व त्या नुसार निर्णय घ्यावा.

Rajesh188 24/10/2020 - 19:28
घरात मागवले ल जेवण आणि हॉटेल मध्ये जावून तिथे बसून केलेलं जेवण काय फरक असतो तेच पदार्थ असणार. पण विशिष्ट जागेला महत्व आहे. मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.

In reply to by Rajesh188

मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.
हे काहींबाबत खरे जरी असले तरी अशा परिस्थितीत ते करावे का? आपल्या धर्मात मानसपूजेची देखील सोय आहे नुसत्या दर्शनाचे काय घेउन बसलात. परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे ना!

Gk 25/10/2020 - 09:37
सोलापुरात देऊळ प्रकरणावरून विहिप चे हिंसक आंदोलन . खरे आहे का ? सत्ता नसलेल्या राज्यातच आंदोलन होते , हा योगायोग म्हणे , नैतर गुजरात अन वाराणशीत देवळे सुरू आहेत का ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:12
सहमत GK. तुमची असलेली गुजरात ची कावीळ परत दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. स्त्रियांवरील अत्याचार किंवा बलात्कार यांचा देखील असाच विरोध आणि आंदोलने एका विशिष्ठ राज्यात च होतात. इतके मोठे आंदोलन ( इव्हेंट ) असते कि राजकुमारी आणि राजकुमार दोघेही रस्त्यावर येतात. जिकडे त्यांची सत्ता असते तिथे स्त्रियांवर अत्याचार / बलात्कार होत नाहीत का?? तिकडे अश्या घटना झाल्यावर दोघेही पर्यटनाला निघून जातात.. आणि आंदोलन सूरु करण्याआधी व्हिक्टीम ची जात लगेच शोधून काढली जाते. कारण त्यानुसार आंदोलनाची तीव्रता ठरवावी लागते.. किती माणसे भाड्याने बोलवायची ते ठरवले जात असावे.. जिथे राजकुमार यांची pvt ltd सत्तेत आहे तिथे जातींचे रेकॉर्ड ठेवले जात नाही का??

In reply to by बाप्पू

Gk 25/10/2020 - 10:18
आम्हाला वाईट म्हणता म्हणता तुम्हीही आमच्यासारखेच वागू लागले, मग पार्टी विथ डिफ्रँस मध्ये आता डिफ्फेरेंट काय राहिले म्हणे ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:55
तुमच्या चुका दाखवल्या कि लगेच आमच्यावर भाजेपायी असा शिक्का मारून टाकला राव.. चला थोड्या वेळासाठी मान्य करू कि आहे मी भाजपेयी.. भक्त किंवा जे काय असेल ते.. तुम्ही तुमच सांगा ओ. .. सर्वात जुनी पार्टी, स्वातंत्र्य मिळवून देणारी पार्टी, लोकशाही वादी पार्टी, भाईचारा पार्टी ( ज्यामध्ये इक जण नेहमीच भाई आणि दुसरा चारा बनत आलाय ) असे असून तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी एकाच राज्याची उचकी का हो लागते?? आणि मी वर लिहिल्याप्रमाणे मी मंदिर उघडण्याचे, संबंधित आंदोलनाचे, राज्यपाल केशारी यांच्या वागणुकीचे समर्थन करत नाही, कारण माझी बुद्धी मी एका पक्षाच्या, एका धर्माच्या, एका खानदानाच्या, एका विचारसरणीच्या दावणीला बांधलेली नाही. पण तुम्ही मात्र नेहमीच प्रत्येक धाग्यावर येन केन प्रकारे मोदी आणि गुजरात आणून आपल्या काविळीचा परिचय देता आणि त्याचबरोबर आपल्या मानसिक गुलामीचा देखील. एखाद्याने व्हॅलिड मुद्दा मांडला तरी त्याच्या प्रतिसादातीत एखादा विशिष्ट शब्द शोधून फक्त तेवढ्यावर च त्याला डिवचायचे.. एवढंच करता. मग त्याचे बाकीचे मुद्दे गेले गाढवाच्या xxx..

In reply to by डॅनी ओशन

बाप्पू 25/10/2020 - 12:06
समझने वाले समझ गये.. !! :D सॉरी. आम्ही अस्सल कोल्हापूरवाले असल्याने चार पाच वाक्यानंतर असे काहीसे आपसूकच तोंडात येते.. न आल्यास चुकल्या चुकल्या सारखे वाटते..

सर्वप्रथम - मी जाहीरपणे आर्य सनातन वैदिक हिंदु आहे आणि तरीही मंदिरे अजुनही उघडली नाहीत ह्या बद्दल मला मनापासुन आनंद आहे ! १. मंदिरांचा देवस्थानांचा अक्षरशः बाजार मांडला होता , मेन्यु कार्ड छापल्यासारखे ह्या पुजेला इतकी देणगी अन त्या सेवेला इतकी देणगी अशी पत्रके मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत . भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा असा धंदा मांडणार्‍याच्या बाजार उठवल्या बद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. २. मंदिराबाहेरच्या छोट्यामोठ्ठ्या व्यापार्‍यांनी देवस्थान परीसरांची अवस्था अक्षरशः हगणदारी सदृष करुन टाकली होती , कोणीही यावे कोठेही तंबु टाकावे , बाजार मांडावा , आओ जाओ राज तुम्हारा चालु होते . हा प्रकार मी देहु , अलंदी , सज्जनगड , कोल्हापुर ह्या माझ्या आवडत्या देवस्थानात पाहिला आहे अन हळहळलो आहे . घृष्णेश्वरला तर अशाच एका व्यापार्‍याने चप्पल आणि मोबाईल मंदिरात नेणे अलाऊड नाही इथेच ठेवा असे सांगुन १० -२० रुपये मागितल्याचे आठवते. भीमाशंकरला तर भर गाभार्‍यात "पावती फाडली नाही तर प्रदक्षिणा नाही " असे एका पुजार्‍याने मला सांगितले होते तेही शिवलिंगासमोर !! मंदिरे बंद असल्याने ह्या असल्या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय आलेला पाहुन मला मनस्वी समाधान मिळत आहे ( त्याला सात्विक की तामसिक जे काही लेबल लावायचे ते लावा ) . ३. " आम्ही डोंबार्‍याचा खेळ मांडल्यासारखे पुजा अर्चा करतो " असे एका पुरोहिताने मला स्पष्ट सांगितले आहे , धर्माचा धंदा करुन, भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रध्देचा फायदा उचलुन स्वतःची तुंबडी भरणार्‍या लोकांच्या बाजारु वृतीला नकळत का होईना पण चाप लागला आहे हे चांगलेच आहे ! ४. साहित्यिक दुट्टप्पी भुमिका घेत आहेत हे चांगलेच आहे कारण त्यांची इच्छा नसली तरीही योगायोगाने त्यांची भुमिका ही खर्‍या सश्रध्द भाविकाच्या हिताचीच आहे , शिवाय त्यांचे पुरोगामित्वाचे बुरखे तेच स्वतःहुन फाडत आहेत ह्याचे समाधान आहे ! ५. आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे - हिंदुधर्मातील देवसथानांच्या बाजारु वृतीला ठेचुन काढण्याचे काम हे हिंदुत्ववादी लोकांना करावे लागत नसुन इतरांना करावे लागत आहे हे म्हणजे अक्षरशः जावयाच्या काठीने साप मारण्यातला प्रकार आहे , सापही मरत आहे अन काठी तुटली तरी ती शेजार्‍याची असेल आपली नाही ! लय भारी ! :) तळटीप : वरील प्रतिसादात काही उपरोधिक सारक्यास्टिक नाही , जे आहे ते सरळ स्पष्ट आहे. अवांतर : सश्रध्द आणि भोळ्या भाविकांना , विशेषकरुन जे नित्यनेमाने मंदिरात जातात त्यांना , देवाचा विरहाने काय मानसिक वेदना होत असतील हे मी जाणतो . पण मंदिरात गेलो नाही म्हणुन काही अडुन रहात नाही , समर्थांची ओवी प्रसिध्दच आहे - धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ तस्मात मंदिरे बंद आहेत म्हणुन हळहळ करण्यासारखे काहीच नाही . माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगतात - एर्‍हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ प्र्त्येक प्राणीमात्राच्या हृदयात स्फुरण पावणारा "मी आहे " हा विचारच परमात्मा असल्याने खर्‍या भक्ताला उपासना करायला मंदिर बंद असल्याने काहीच फरक पडत नाही ! अजुन काही काळ संयम धरु , करोना संपला की राममंदिरात जायचे आहेच आपल्याला!! इत्यलम .

In reply to by प्रसाद गोडबोले

ही म्हण नक्की काय ? ही म्हण नक्की काय आहे , शेजार्‍याच्या काठी साप मारणे की जावयाच्या काठीने साप मारणे ? काही का असेना , साप तर मेला पाहिजे अन आपली काठी तुटली नाही की बस्स , जिंकलो =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 25/10/2020 - 20:40
मार्कस ऑरेलियस, मुद्द्यात पॉईन्ट आहे. पण हे देखील व्यावसायिक कारखाने आहेत आणि या साखळीतील तळागाळाच्या कष्टकर्‍यांची उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ?

In reply to by चौथा कोनाडा

त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ? >>> नाही . पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये . नो मोअर गव्हर्न्मेन्ट स्पेन्डिंग ! लेट द बॅड बिजनेस फेल ! लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह ! थोडे अवांतर आहे हे . आपल्या लोकांना राजकारणाचा , मोदीद्वेषाचा ओव्हरडोस झालाय त्याला मिपाही अफवाद नाही पण असो इकोनॉमिक्स आणि रिकव्हरी फ्रॉम रिसेशन हा नक्कीच चर्चा करण्यासारखा विषय आहे. निवांत बोलु कधीतरी .

In reply to by प्रसाद गोडबोले

Gk 26/10/2020 - 05:27
आणि मग उद्योगपतींना मोदी सरकार कर्जे माफ करते , त्याचे काय करणार ? नेचरल क्युअर पाहिजे तर मग मोदी सरकारने रिजर्व ब्यांकटले पैसे का काढले ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 26/10/2020 - 17:25
मार्कस ऑरेलियस साहेब, फिल्म मस्तच आहे ! (या पार्श्वभुमीवर भारताच्या इकॉनोमीची रिकव्हरी / सुरळित व्हावी म्हणुन केन्द्र शासकिय कर्मचार्‍यांना भरघोस बोनस देऊन त्यांना खरेदीसाठी उद्युक्त केले जाणार आहे, अन त्याच वेळी कित्येक छोटे उद्योग, तळागाळातील कष्टकरी प्रचंड आर्थिक चणचणीत आहेत, त्यांचा सर्व्हायव्हल साठी निकराची धडपड सुरु आहे हे जाता जाता आठवले)
पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये .
मग 'आरक्षण" हे पॅकेज नाही तर काय आहे ? जगभरात विविध देशांमध्ये पॅकेज देत असतातच, त्या अर्थी पॅकेज देणे हे जगतिक पातळीवरील आर्थिक धोरणांचा भाग आहे. त्यामुळे हे विधान भाबडे वाटतेय.
लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी
हे फारच थेरॉटिकल होतेय ! अपंगाना विविध सवलती देतात ते त्यांच्या नॅचरल रिकव्हरीसाठीच देतात ना ?
अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह !
हे तत्वतः मान्य होण्यासार्खे असले तरी (भारतात तरी) व्यवहार्य नाही.

पाषाणभेद साहेब ! आपला लेख वाचला. काही मुद्द्यांवर मत मांडतो. १. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात बहुतांश वेळा स्वत:ला निर्धर्मी म्हणविणारे पण प्रत्यक्षात धर्मांध असणारे पक्षच सत्तेत आहेत. त्यामुळे मंदीरांबद्द्लचा त्यांचा दृष्टीकोण आजपासून नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून जगजाहिर आहे. त्यात नवे किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सध्या महाराष्ट्रात ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे त्यांनी स्वतःला निधर्मी म्हणणार्‍या पक्षांशी युती केली असल्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य काय यापेक्षा इतर दोन पक्षांची काय मते आहेत याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. हाच पक्ष आज जर सत्तेत नसता तर आज मंदीरांबद्द्ल त्यांची भुमिका नेमकी १८० अंशाने विरुद्ध राहिली असते हे सांगायला कोणत्याही ज्योतीषाची (किंवा वै़ज्ञानिकाची) आवश्यकता नाही. राजकारण्यांना जनतेच्या हितापेक्षा सत्तेचा विचार नेहमीच अग्रक्रमाने करावा लागतो कारण सत्ता हे त्यांचे प्रथम ध्येय्य असते. सत्तेच्या अनुषंगाने मिळालेल्या जबाबदार्‍या पार पाडणे ही दुय्यम जबाबदारी असते. २. साहित्यिक आणि बुद्धीजीवी यांचा सामान्य जनतेशी संबंंध कधीच नव्हता (सन्माननिय अपवाद होते, आहेत आणि पुढेही असणारच आहेत). मात्र साहित्यिकांनी पाठींबा दिला म्हणून मतपेटीच्या राजकारणावर त्याचा परीणाम होत नसतो हे सत्ताधार्‍यांना, सामान्य जनतेला चांगले माहित आहे. साहित्यिकांना कितपत माहित आहे हे त्यांचे त्यांना ठाऊक. साहित्यिकांचा उल्लेख वर्तमानपत्रात केवळ साहित्य संमेलनाच्या काळात आणि असाच एखाद दुसर्‍या वेळी येतो. त्यामुळे जर साहित्यिकांना बातम्यात झळकण्याची संधी मिळाली आहे तीचा त्यांना जरुर लाभ व्हावा. त्यानिमित्ताने तरी वाचनशत्रू जनतेला २-४ साहित्यिकांची नावे माहित होतील. न जाणो या कारणामुळे काहींना मराठी साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्यामुळे याही निमित्ताने व्यथित होण्याचे कारण नाही. ३. राहता राहिला प्रश्न मंदीरे उघडण्याचा. मंदिरे उघडली काय आणि न उघडली काय, खर्‍या भाविकांस त्यापासून काही फरक पडणार नाही. आपल्या लाडक्या देवतेचे दर्शन न झाल्यामुळे तो कदाचित दु:खी होईल मात्र विरहभावनेमुळे त्याच्या दैवतावरील प्रेमात अभिवृद्धी होईल यात शंका नाही. त्यामुळे थोडी वाट पाहूया, आज ना उद्या मंदिरे नक्कीच उघडतील यात एक आस्तिक हिंदू म्हणून माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. दानपेटीत काय अर्पण करायचे आणि मतपेटीत काय अर्पण करायचे याचा निर्णय सुज्ञ जनता नक्कीच घेईल. तोपर्यंत धीर धरी मना ! ध्यान धरी मना ! आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गामा पैलवान 26/10/2020 - 19:56
मार्कस ऑरेलियस, तुमचा इथला https://www.misalpav.com/comment/1084117#comment-1084117 संदेश वाचला. माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे. देव जरी चराचरांत असला तरी तो चटकन दिसून येत नाही. तस्मात देवळे हवीच. हवा सर्वत्र असली तरी छातीत सतत ओढून घ्यावीच लागते. गायीचं दूध तिच्या रक्तापासनं बनतं. रक्त गायीच्या देहात सर्वत्र आहे. पण म्हणून तिचं दूध शिंगं खूर, इत्यादि अवयवांत मिळंत नाही. त्यासाठी सडच पिळावे लागतात. या धर्तीवर देवळांची उपयुक्तता ध्यानी यावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा.पै. , सादर नमस्कार ! मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल कोणतीच शंका नाही, मंदिरे आवश्यक आहेतच . पण
माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे.
मंदिरांचे बाजारीकरण करणार्‍या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय द्यायला टाळेबंदी हा उत्तम उपाय आहे इतकेच माझे मत आहे . ही अपप्रवृत्ती प्रबोधनाने निपटुन काढता येत नाही हे कटु सत्य आहे . देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :( हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल. आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो. आपण कोणतेही एक , ज्याच्याविषयी तुम्हाला आत्मीयता आहे असे एखादे देवस्थान निवडा अन केवळ प्रबोधनाने तेथील बाजारु अपप्रवृत्तींचा नायनाट करुन दाखवा , मी चुक मान्य करत आपली क्षमा मागेन ! पण हे होईल असे दिसत नाही :( माझ्या एका अत्यंत प्रिय ठिकाणच्या देवस्थानाने मंदिरात येणार्‍या भाविकांची अन पर्यायाने देणगीची आवक कमी झाली म्हणुन चक्क फेसबुक पेज काढले आहे अन तिथे त्यांचे " मेन्युकार्ड" दिले आहे , शिवाय बँक खाते क्रमांक यु.पी. आय क्रमांकही दिला आहे . " देवाच्या मुर्तींचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे" असले बोर्ड लाऊन मंदिराच्या गाभार्‍याचे विद्रुपीकरण करणारे हे लोक आता स्वतःच रोजच्या नित्यपुजेचे फोटो आणि विदिओ अपलोड करतात + मेन्युकार्ड आहेच सोबत. आता आपण मंदिराच्या गाभार्‍यातील तो बाजारु बोर्ड केवळ प्रबोधन करुन काढुन दाखवणार का ? लगेच देवस्थानाची लिंक पाठवतो तुम्हाला ! बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 27/10/2020 - 19:25
मार्कस ऑरेलियस, तुम्ही एक कसलेले भक्त आहात. साहजिकंच तुम्हांस चराचरांत देव सापडतो. पण सामान्य जनतेचं तसं नसतं. देवळांवर फक्त भक्तांचाच अधिकार आहे. जे काही करायचं ते सेवा म्हणून करायचं असतं. हे प्रबोधन अंगी मुरायला आजून दोनेक पिढ्या खर्ची पडतील. याला कारण धर्मशिक्षणाचा अभाव हे आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे कोणी नसल्याने हिंदूंमध्ये धर्मविघातक दृष्टीकोन बळावले आहेत. बाजारू प्रवृत्ती याचाच परिपाक आहेत. तर या बाजारू विकृतींना टाळेबंदीच्या मिषाने बाजूला सारण्यात यश लाभलं, तरी ते अल्पकालीन असेल. ते दृढमूल करण्यासाठी दीर्घकालीन धर्मशिक्षण हाच उपाय आहे. मला वाटतं हे तुम्हांस मान्य व्हावं. आता असं बघा की, आपली देवळं ही धर्मशिक्षणाची केंद्रं आहेत. नेमकी तीच बंद ठेवली तर धर्मशिक्षण मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे एकीकडे टाळेबंदीचे फायदे व दुसरीकडे धर्मशिक्षणाच्या अभावाचे नुकसान अशा दोन्ही बाजू विचारांत घ्यायला हव्यात. माझ्या मते धर्मशिक्षण हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून देवळं उघडायला हवीत. तुम्ही मला प्रबोधनयोगे कोणत्याची एका धर्मस्थानातला बाजार बंद करण्याविषयी सुचवलं होतंत. तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे. समजा मी हे उद्दिष्ट प्राप्त करून दाखवलं तरी तत्पावेतो दोनपाच वर्षे लोटतील. तोवर आजचा प्रश्न कालबाह्य झालेला असेल. धर्मशिक्षण ही वेळखाऊ व दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिच्यातून सत्वर निकाल अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर तुमची काही विधाने निरखतो. १.
देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :(
हे खरंय. माझ्या मते याचं कारण असं की, देवदर्शनार्थ भक्त येतात ते प्रामुख्याने प्रापंचिक विवंचना दूर करायला. म्हणून त्यांचंही प्रबोधन होणं आवश्यक आहे. देव हा नडभागवू निकडपुरवठादार नसून साधनेचा सहाय्यक आहे, हा दृष्टीकोन घट्ट झाला पाहिजे. त्यासाठीही धर्मशिक्षण आवश्यक आहेच. २.
हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल.
शेजाऱ्याकडनं मारला गेला तर आनंदच आहे. पण मी या परावलंबनाविषयी साशंक आहे. ३.
आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो.
यांत खेद कसला? उलट भक्तांमध्ये विविधांगी चर्चा व्हायला हवीये. म्हणून आपलेतुपले मतभेद हा खेदाचा विषय आजिबात नाही. ४.
बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.
क्या बात है. आपण (दोघेही) असेच मिळून मिसळून राहूया. सहवीर्यं करवावहै ! असो. देव भावाचे भुकेले आहेत. त्यांना किती दिवस उपाशी ठेवायचं? एखाद महिना ठीके. पण सहासहा महिने देवळं बंद राहणार असतील तर देवांचा कोप होईल. हिरण्यकश्यपू व रावणाने देवतार्चन थांबवलं होतं. त्यांचं काय झालं हे सर्वांना माहितीये. तसलं काही उद्धव ठाकऱ्यांचं होऊ नये, अशीही माझी एक उपेच्छा आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 26/10/2020 - 23:45
पण ह्या अप्रवती आणि लोकांच्या श्रद्धा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोक मंदिरात जातात ते श्रधेपोटी, भक्ती पोटी. त्या श्रध्देचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी करून घेणारी अप्रवृती मंदिर परिसरात आणि मंदिरात दिसून येते खरी. ते नाकारता येणार नाही. आणि ह्या मध्ये सुधारणा करणे हे आपले म्हणजे हिंदू चेच काम आहे.
प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत.

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

आणखी काय हवं?

Pratham ·

राघव 15/10/2020 - 19:20
सेटअप आवडला! छिद्रान्वेषीपणा: आणखी केवळ एम.एस.ई.बी. ची कृपा हवी असं म्हणायला जागा आहे! 😉

राघव 15/10/2020 - 19:20
सेटअप आवडला! छिद्रान्वेषीपणा: आणखी केवळ एम.एस.ई.बी. ची कृपा हवी असं म्हणायला जागा आहे! 😉
मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा पावसाचे पाणी व मातीचा सुगंध बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज गरम चहा बरोबर आवडते पुस्तक बोला आणखी काय हवं?

मावळतीला

Pratham ·
लेखनप्रकार
दिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पाण्य

न बदलणारं 'पंगतीतलं पान'

महासंग्राम ·

आपल्या गावगाड्यात जात नावाची व्यवस्था अगदी पाचर मारल्यासारखी फिट्ट बसली आहे. कितीही हाकला म्हंटलं तर जात नाही ती जात असं तिचं वर्णन केलं जातं. आपण सगळे जण कळत नकळतपणे का होईना या जातिव्यवस्थाचे पाईक आहोत. भारताच्या कुठल्याही खेड्यात गेलं तर हे वास्तव सहजपणे दिसून येतं. शहरात थेट नसला तर वेगवेगळ्या पद्धतीने जातीभेद दिसतोच. कधी तो रहाण्याच्या बाबतीत असतो, तर कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत.

शिक्षक दिन

कवि मनाचा ·
लेखनप्रकार
५ सप्टेंबर... शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. छोट्या-छोट्या प्रसंगातून शिक्षक-विद्यार्थ्यातले संवाद व त्याद्वारे समजलेली शिक्षणमूल्ये लिहिण्याचा हा एक प्रयत्न... ------------------------------------- एक आई आपल्या लहानग्या मुलाला शिकवते की, जीवनात नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी. चांगली संगत असेल तरच तुझी प्रगती होईल. वाईट संगत तुला वाईट मार्गावर नेईल. म्हणून देवाची तू प्रार्थना कर - "देवा, मला आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात ठेव." वाचनाची आवड लागावी म्हणून आई त्या मुलाला गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जाण्याची सवयही लावते. मुलगा वाचनालयात जाऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. व्ही.