रंजीश हि सही
तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा.
जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते.