हिशेब हिशेबाचा
आमची प्रेरणा
आमची प्रेरणा
प्रत्येकाने एकदा तरी वाचली पाहिजेत अशी मराठी पुस्तके -
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले.
मुखपृष्ठ :
तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा.
जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते.
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!'
मऊ शीर, तीक्ष्ण सुई
लक्क काळीज, डोळ्यात पाणी
थंड एसी, मंद दिवे
पांढऱ्या भिंती, एकट रात्री!
तासाला थेंबभर या गतीने
ठि ब क ते रक्त रात्रभर....
जखडलेल्या शरीराने
श्रमलेल्या डोळ्यांनी
हुं कि चू न करता
बघत राहतो आपण
रक्ताची journey........
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
-- शिवकन्या
महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे.
आमचं कोकणातल घर आहे जुन्या पदध्तीचं..... कौलारु.... ओटी, माजघर, देवघर, सैपाकघर आणि परसदार अशी रचना असलेलं. घर खूप मोठ असलं तरी त्या वेळच्या पद्धती प्रमाणे या घराला खोल्या तशा जास्त नाहीत. मुख्य घराच्या लेवलला एकच आहे खोली. तीच ही बोळाची खोली. बाकीच्या सगळ्या खोल्या चार पाच पायर्या खालच्या लेवलला आहेत.
आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!
-शिवकन्या
नमस्कार,
आमच्या येथे श्री मिपा क्रुपेने..........
बरेच वर्ष मिपावर वाचन मात्र राहिल्यानंतर हळूहळू अंगात लेखकूचा संचार व्हायला लागला आणि मिपाचे सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला. हे म्हणजे काठावर बसून पाण्यात मौजमजा व दंगामस्ती करणाऱ्यांकडे बघून शेवटी भोपळा बांधून पाण्यात उडी घेण्यासारखेच होते. विचार केला, थोडे हात पाय मारून ...... आपलं. ...... कळफलक बडवून तर बघू जमतंय का. आणि काही मदत लागलीच तर तुमच्या सारखे सुहृद मिपाकर आहेतच मदतीला, तरंगायला नक्कीच मदत करतील, किमान बुडू तर देणार नाहीत.
मग निर्णय पक्का झाला.
गीत :
चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले
नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले
रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट
धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट
परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले
अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी
इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी
गीतातील सूर असे का मधेच पण तुटले
तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार
ही अशीच तव छाया पण मागे धावणार
सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले
गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६
***