कारण हे निमित्तमात्र
मग पुढे असं होतं की ..
अोळखीचा समोरचा आज अनोळखी वाटतो
हाच का तो हा प्रश्न मनास पडतो
शोध नव्याच्या नव्यानी चालू होतो
डोके टेकवायला 'ताजा' खांदा शोधतो
नवा खांदाही शेवटी जुना होतो
अपेक्षांच्या अोझ्याला जरासा बळी पडतो
सोबतीच्या लक्षावधी क्षणांना क्षणात विसरतो
एखादा फुटकळ क्षण बाहेर डोकावतो
अव्याहत भूक हा तर इथला जिवनमंत्र
नाती संपावयास कारण हे निमित्तमात्र..