भारांच्या जगात... ३
भारांच्या जगात... ३
मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत
भारांच्या जगात... ३
मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत
बऱ्याच दिवसांनी पाऊस पुन्हा सुरू झाला आणि ती धावत गच्चीवर पोहोचली.
पावसाचं आणि तिचं नातं खूप जुनं. ती जन्माला आली आणि मोठी झाली ती अशाच भरपूर पाऊस पडणाऱ्या नगरीत. बाकी लोक जसं म्हणायचे "मी बरेच पावसाळे पाहिलेत" तसं ती म्हणायची "बऱ्याच पावसाळ्यांनी मला पाहिलंय". आणि खरंच तर होतं ते.
प्रिय अन्नपूर्णा,
तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते.
‘आठवणी’ एक लहानसाच, पण अर्थाचे अनेक आयाम असणारा शब्द. आनंदाच्या पाकळ्या घेऊन उमलत राहणारा, कधी वेदनांच्या व्यथा घेऊन कोमेजणारा. आठवणी समुद्रासारख्या अथांग. आभाळासारख्या अफाट. क्षितिजासारख्या अमर्याद. आयुष्याच्या वाटेवरून प्रवास घडताना इच्छा असो, नसो स्मृतींची सोबत घडत राहते. कुणासाठी त्या आनंदाचं अभिधान असतात, तर कुणासाठी वेदनांचे वेद. आठवणींचं पाथेय घेऊन निघालेली माणसे सुखांचे कवडसे हाती लागताना हरकतात. पदरी पडणाऱ्या वंचनेच्या वेदनांनी विकल होतात. त्यांचं असणं, नसणं जेवढं कालसापेक्ष तेवढंच परिस्थितीसापेक्ष.
( सत्तर शब्दांची लघुतम कथा लिहिण्याचा प्रयोग. )
पॉझीटीव्ह
......
त्याने चादर डोक्यावर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप.
तेवढ्यात मेसेजची रिंग वाजली. बघणे भागच होते.
त्याने मोठ्या कष्टाने पांघरूण बाजूला केले.
स्क्रीनवर तिचा मेसेज चमकत होता, ‘पॉझीटीव्ह’.
‘Abort.’ याने इकडून मेसेज पाठवला.
रडण्याची स्मायली तिकडून.
‘Don’t cry. Me too positive.’
‘What?’
‘Just got the reports. HIV positive.’
त्याने सरळ फोन बंद केला. त्याला याक्षणी काहीच, कुणीच नको होते.
चादर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप.
पूर्वार्ध इथे आहे: https://www.misalpav.com/node/42843
* * * * * *
इ-माध्यम
सध्या यांत प्रसिद्ध होणारे साहित्य ते साधारण ३ गटांत मोडते:
१. वैयक्तिक अनुदिनी: येथे एखादा लेखक त्याचे लेखन स्वतःच जालावर नियमित प्रसिद्ध करतो. या प्रकारे जगातील कोणीही इच्छुक लेखक बनू शकतो आणि मनसोक्त, विनाअडथळा लिहू शकतो.
२. संस्थळे: यांना एक प्रकारे जालावरची नियतकालिके म्हणता येईल.
३. इ-पुस्तकांची निर्मिती.
पंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला.
- डॉ. सुधीर रा. देवरे
बांडगूळं आधीही दिसायची…
पण, ती रानात.
राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर…
....जुन्या खोडांवर.
आता मात्र ती दिसतात
अगदी कुठेही…
म्हणजे...
रोपांवर वगैरे.
इथपर चाललं असतं
पण आता ती
यायला लागलीत
तणांवर..
माजलेल्या…
…विचारांच्या तणांवर!
संदीप चांदणे (११/६/२०१८)
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात.