मत

बाप ------- हवा आहे पण कशाला?

मी कोण's picture
मी कोण in जनातलं, मनातलं
10 Sep 2016 - 6:41 pm

खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

धोरणमांडणीसमाजजीवनमानराजकारणरेखाटनप्रकटनविचारसमीक्षालेखबातमीअनुभवमतमाहितीमदत

<< हिशेब-ठिशेब>>

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
2 Sep 2016 - 12:49 pm

प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..)
मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.

मांडणीधर्मइतिहासवाङ्मयकथाप्रकटनप्रतिक्रियामाध्यमवेधअनुभवमतसंदर्भचौकशीविरंगुळा

कुणाचेही काहीच चुकलं नाही?

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 9:28 pm

सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना अनुभवलेली ही घटना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडतेयं. वय वर्षे २० असलेली आदिवासी समाजातील मंजुळा फार दूर नाही, नाशिकपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावरल्या एका गावात राहणारी. दुस-या बाळंतपणा दरम्यान तिचा मृत्यू झाला. ना पेपरात बातमी छापून आली, ना कुठे त्यावर चर्चा झाली. पण या प्रातिनिधीक घटनेमागे बरचं काही घडलेलं आहे.

धोरणसमाजजीवनमानऔषधोपचारप्रकटनबातमीमत

१४ ऑगस्ट २०१६

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
14 Aug 2016 - 11:02 am

८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं....

सुचलं तेव्हडं लिहावं
दिसलं त्तेव्हडं वाचावं
रुचलं तेव्हडं ऐकावं
आवडलं तेव्हडं बोलावं
विचारलं तेव्हडं सांगावं
दिलं तेव्हडं घ्यावं
पचलं तेव्हडं खावं
जमलं तेव्हडं चालावं
जीवन तृप्त असावं

आणि कुणी म्हटलं तसं

"ह्या जन्मावरं
ह्या जगण्यावरं
शतदा प्रेम करावं"

शुभेच्छा देण्यार्‍यांचे आणि न देण्यार्‍यांचेही आभार.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

जीवनमानमत

रूस्तम

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
13 Aug 2016 - 2:13 pm

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा.

चित्रपटआस्वादमतविरंगुळा

दीर्घकालीन रोगांचे उपचार : समज-गैरसमजातून जाणारी निर्णयप्रक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
25 Jul 2016 - 10:26 am

"दुर्धर" आणि/अथवा "दीर्घकालीन" आणि/अथवा "असाध्य" रोग हे केवळ रुग्णाच्या शरिरावरच नाही तर मनावर व जीवनशैलीवर जोरदार आघात करतात. याशिवाय ते रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांच्यावरही शारिरीक, मानसिक व भावनिक प्रभाव टाकतात. अर्थातच, अश्या रोगांचे उपचार ठरविताना रुग्णाच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीबरोबर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीचा विचार अत्यावश्यक ठरतो. हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

******

तंत्रऔषधोपचारमतशिफारससल्ला

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
19 Jul 2016 - 5:33 pm

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख
बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल.
पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला.

धोरणवावरसमाजजीवनमानराहती जागाशिक्षणप्रकटनविचारसद्भावनामाध्यमवेधअनुभवमत

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
24 Jun 2016 - 9:56 am

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते.

कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे. वगैरे.

संस्कृतीकथासमाजजीवनमानराहणीविचारलेखमत

कांचीवरम

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
21 Jun 2016 - 5:12 pm

कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर!

'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम.

कलाकथासमाजजीवनमानचित्रपटछायाचित्रणविचारप्रतिक्रियासमीक्षामाध्यमवेधमत