मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'

चित्रगुप्त ·

टर्मीनेटर 29/01/2024 - 16:45
मस्तच! माहिती आणि फोटोज छान 👍 (काय समस्या आहे माहित नाही पण काही फोटोज पुर्ण दिसत नाहियेत, ते नंतर पुन्हा बघतो.)
रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते.
+१००० मला पण ग्रीक/रोमन वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम, अँफी थिएटर, अ‍ॅक्वाडक्ट अशा गोष्टींचे प्रचंड आकर्षण आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:00
प्रतिसादांबद्दल अनेक आभार. फोटो आवडत आहेत हे वाचून चांगले वाटले. रोमन 'अ‍ॅक्वाडक्ट' हा अद्भुत प्रकार आहे. त्यासाठी मुद्दाम जऊन बघायला हवे. पुन्हा कधी गेलो तर नक्की बघेन. . .

Bhakti 29/01/2024 - 18:14
सर्वच फोटो, वर्णन, माहिती सुंदर आहे. धबधब्याच्या आणि बाजूला किल्ला तो फोटो जास्त आवडला.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:04
लेख आणि फोटो आवडत आहेत हे वाचून आणखी लिहिण्याचा उत्साह वाढतो आहे. @कंजूस, 'अगदी रस्त्यापासून आकाशापर्यंत आपण डोळ्यांनी बघतो तसं चित्र आहे' हे वाचून मी पुन्हा तो फोटो बघितला, आणि मलाही तसेच वाटले आणि हे कसेकाय घडले असावे, हा प्रश्न पडला आहे. .

In reply to by मनो

चित्रगुप्त 30/01/2024 - 20:02
एक सुचले ते असे, की कोणतेही दृश्य बघताना बहुतांशी आपण आपली नजर 'आडवी' फिरवत असतो. मोठा विस्तीर्ण देखावा बघताना तर विशेषच. त्या मानाने खालपासून वरपर्यंत दृष्टीक्षेप टाकण्याचे प्रसंग कमी असतात. या फोटोत 'आडवे' बघण्यासारखे काही नाही. बाजूच्या भिंतींमधील खिडक्या पण आपली नजत 'आत आत' नेत आहेत. त्या मानाने फोटोत 'उभे' घटक जास्त आहेत. 'आत' जाणारा रस्ता, पलिकडील इमारती आणि तीन ठिकाणी दिसत असलेले निळे आकाश. यामुळे असे वाटत असावे. (असे वाटते) Sir Ernst Hans Josef Gombrich यांच्या Art and illusion : a study in the psychology of pictorial representation या चित्रकलाविषयक पुस्तकात या विषयी विस्तृत उहापोह वाचल्याचे आठवते, पण नेमके काय ते विसरलो. या पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध आहे: https://archive.org/details/artillusionstud00gomb

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 10:07
Vertical shift किंवा perspective corrected पद्धतीचे wide angle lens चा एक प्रकार मिळतो. अतिशय महाग लेन्स असतं. (20/24mm prime with f/2) .तर ते वापरून फोटो घेतला असणार.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:06
सगळे फोटो स्वस्तातल्या शामसंग (-खेले होरी) मोबल्यातून, तेही फक्त आटो मोडमधे काढलेत. फक्त क्रॉप केलेत हवे तसे. बाकी काय नाय. 'दृष्टी' हवी, ती निसर्गचित्रणातून मिळाली असावी, आणि थोर चित्रकारांची चित्रे बघण्यातून. बाकी फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही.

हा लेख आणि फोटो तर आवडलेच पण त्यात दिलेल्या ईतर लिंकाही उघडुन वाचल्या. केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते. फक्त खिसा काय म्हणतो ते पहावे लागेल. :) आपण ईतकी डिटेल माहीती काढुन ठिकाणे बघताय हे विशेष. नाहीतर ईथेतिथे सगळे सारखेच, तेच राजवाडे,त्याच मुर्त्या आणि काय काय. फोटोही सुंदर आलेत. रच्याकने- फार वर्षांपुर्वी ऑफिसच्या कामानिमित्ताने ब्रसेल्स आणि अ‍ॅमस्टरडॅम बघणे झाले होते, पण मॅनिकेन पिस, तुसाँ म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम अशा २-४ गोष्टी सोडल्या तर फारशी नावेही आठवणार नाहीत. पुभाप्र

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:12
केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते.
-- अगदी खरे. माझ्या ओळखीतले जे कुणी तसे फिरुन आलेले आहेत, त्यांच्याकडून ऐकलेले माझ्या आवडीत कुठेच बसणार नाही. कुठेही जाण्यापूर्वी तिथला सांगोपांग अभ्यास करून जाणे बरे, अर्थात नेहमी ते जमत नाही आणि काही ना काही बघणे राहूनच जाते.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 13:24
सहमत. ग्रूपवाले वेळ फार घालवतात. नाश्ता, जेवण, शॉपिंग यातून वेळ उरल्यास लीडरने सांगितलेलं पाहाणं. आणि हो ग्रूप फोटो.

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला! रोमची पहिली ओळख Dan Brown च्या एंजल्स अँड डेमन्स पुस्तकातून झाली. पुस्तक वाचता वाचता एकेका स्थळविषयी इंटरनेटवर जास्त माहिती वाचत होतो. त्यातून रोममधील वास्तुकला, शिल्पकला यांची ओळख झाली. St Peter's Basilica, Castle Sant' Angelo, Pantheon या प्राचीन वास्तू, Fontana dei Quattro Fiumi (Fountain of the Four Rivers) सारखी स्थापत्य कला, Bernini सारख्या कलाकाराच्या स्वर्गीय कलाकृती - Ecstasy of St Teresa. इतक्या सुरेख, भव्य, बारकावे दाखवणाऱ्या कलाकृती! अशीच पॅरिस, लुव्र, लिओनार्दो दा विंची यांची ओळख दा विंची कोड मधून झाली, तर फ्लॉरेन्सचं सौंदर्य इन्फर्नो मधून दिसलं! ओरिजिन या पुस्तकातून Casa Milà आणि Sagrada Família अशा अनोख्या वास्तू समजल्या...

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 30/01/2024 - 13:47
तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!
या पुस्तकांपैकी फक्त 'दा विंची कोड' चे मराठी भाषांतर वाचले आहे. ते आवडले पण सिनेमा फारसा रुचला नाही. 'इन्फर्नो' वरील 'गुस्ताव्ह दोरे' (Gustave Dore) च्या चित्रांचे एक पुस्तक माझ्याकडे आहे. विलक्षण चित्रे असतात दोरेची. आत्ताच अ‍ॅमेझोनवर डॅन ब्राऊनची अन्य पुस्तके (मराठी) शोधून ठेवली आहेत. येत्या मार्चमधे दहा दिवस लंडनमधील संग्रहालये बघणार आहे. त्यासंबंधी काही विशेष पुस्तके, सिनेमे वगैरे असल्यास जरूर कळवावे. अनेक आभार.

सुंदर लेख ! दोन प्रश्न १. Tempio di Vesta मधील एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? असा उल्लेख कोठे आहे काय ? २. नदी / कालवे / समुद्राच्या अवतीभवती वसलेल्या शहरांत / गावांत त्या पाण्याचा काही विशीष्ट गंध वगैरे येतो काय ? अवांतर : बनेल काढून रोमन सम्राटाच्या आविर्भावात दिलेली पोज आवडली.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:18
एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? हा प्रश्न समजला नाही. 'जाणल्यामुळे' म्हणजे काय ? कौमार्यभंग वगैरे प्रकार रोमन साम्राज्याच्या दीर्घ इतिहासात घडलेही असतील, काही ठाऊक नाही. पाण्याला विशिष्ट गंध वगैरेही माहित नाही. त्या दिवशी कडक ऊन्ह असल्याने घामाघूम होत फिरावे लागले होते, म्हणून सदरा काढलेला होता. कुठे रोमन सम्राट आणि कुठे म्या पामर. या लेखात एवढी रुची घेत असल्याबद्दल अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

जुन्या मराठी ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांमधे जोसेफ ने मेरीला जाणल्यामुळे (संयोग झाल्यामुळे) येशूबाळाचा जन्म झाला अशा प्रकारचे उल्लेख असतात त्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 02/02/2024 - 12:32
'जाणण्या' चा नवीनच अर्थ जाणकाराकडून जाणून घेतला. आता कळले लहान मुलांना 'अजाण' 'निष्पाप' वगैरे का म्हणतात. जुन्या ख्रिस्ती धार्मिक पुस्तकातले आणखीही असे शब्दप्रयोग 'जाणून' घ्यायला आवडेल. आपली 'जाणीव' वाढीला लागली पाहिजे राव. अनेक धन्यवाद.

चौथा कोनाडा 31/01/2024 - 14:51
क्या बात ... एक नंबर मस्त ! माहिती आणि प्रचि लै छान ! रोम ची सुंदर सफर घडवलीत चित्रगुप्त जी !
या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे.
बाबो .. किती आवगड असं ह्ये म्हनायचं ! व्हिला ‘आद्रिआना जबरदस्त दिसतोय ! कल्पना करून तयार केलेला व्हिला ‘आद्रिआना चा व्हिडीओ भारी आहे ! Villa d'Este किती रम्य आहे ! वाहते पाणी,धबधबे, शंभर कारंजे, तलाव सुंदर ! रोमचा राजवाडा, गल्ल्या वास्तू भयन्कर सुंदर आहेत !
- अस्मादिक.
ह्यो फोटो लै पेशल !
आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.
हा हा हा

खूप सुंदर भटकंती आणि अप्रतिम फोटो! सोबतीला इतिहास उलगडून सांगितलात ते फार आवडलं. येणारी अनेक वर्षे तुम्हाला अशी छान भटकंती करायला मिळो या शुभेच्छा :)

नंदन 03/02/2024 - 17:02
लेख आणि फोटो - दोन्ही खासच! (काही वर्षांपूर्वी ट्रेवी कारंज्यात एक बारकंसं नाणं टाकून पुनर्भेटीचा मनसुबा व्यक्त केला होता - तो योग केव्हा येतो ते पहायचं!)

परत एकदा वाचला धागा. काय सुंदर आहेत सगळे फोटो. मन खूष झालं. असेच लिहित रहा चित्रगुप्तकाका _/\_

श्वेता२४ 08/02/2024 - 12:53
अतिशय विस्तृत ओळख करून दिलीत. फोटो देखील अतिशय सुंदर. भविष्यात ही जागा बकेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे तुमच्या या माहितीचा खूप उपयोग होईल. धन्यवाद!

चौथा कोनाडा 19/02/2024 - 22:07
श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे उद्यापासुन एक आठवडा चित्रप्रदर्शन होत आहे: माहिती खालील ठिकाणी: सेव्हन_आर्टिस्ट_फ्रॉम_इंदोर चित्रगुप्तजी, हार्दिक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठी समस्त मिपाकरांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

जुइ 27/02/2024 - 06:33
विहंगम आणि भव्य महाल! रोमचे असे सुंदर दर्शन तुमच्या मुळे झाले! फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले! रोम बद्द्ल अजून वाचायला आवडेल.

टर्मीनेटर 29/01/2024 - 16:45
मस्तच! माहिती आणि फोटोज छान 👍 (काय समस्या आहे माहित नाही पण काही फोटोज पुर्ण दिसत नाहियेत, ते नंतर पुन्हा बघतो.)
रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते.
+१००० मला पण ग्रीक/रोमन वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम, अँफी थिएटर, अ‍ॅक्वाडक्ट अशा गोष्टींचे प्रचंड आकर्षण आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:00
प्रतिसादांबद्दल अनेक आभार. फोटो आवडत आहेत हे वाचून चांगले वाटले. रोमन 'अ‍ॅक्वाडक्ट' हा अद्भुत प्रकार आहे. त्यासाठी मुद्दाम जऊन बघायला हवे. पुन्हा कधी गेलो तर नक्की बघेन. . .

Bhakti 29/01/2024 - 18:14
सर्वच फोटो, वर्णन, माहिती सुंदर आहे. धबधब्याच्या आणि बाजूला किल्ला तो फोटो जास्त आवडला.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:04
लेख आणि फोटो आवडत आहेत हे वाचून आणखी लिहिण्याचा उत्साह वाढतो आहे. @कंजूस, 'अगदी रस्त्यापासून आकाशापर्यंत आपण डोळ्यांनी बघतो तसं चित्र आहे' हे वाचून मी पुन्हा तो फोटो बघितला, आणि मलाही तसेच वाटले आणि हे कसेकाय घडले असावे, हा प्रश्न पडला आहे. .

In reply to by मनो

चित्रगुप्त 30/01/2024 - 20:02
एक सुचले ते असे, की कोणतेही दृश्य बघताना बहुतांशी आपण आपली नजर 'आडवी' फिरवत असतो. मोठा विस्तीर्ण देखावा बघताना तर विशेषच. त्या मानाने खालपासून वरपर्यंत दृष्टीक्षेप टाकण्याचे प्रसंग कमी असतात. या फोटोत 'आडवे' बघण्यासारखे काही नाही. बाजूच्या भिंतींमधील खिडक्या पण आपली नजत 'आत आत' नेत आहेत. त्या मानाने फोटोत 'उभे' घटक जास्त आहेत. 'आत' जाणारा रस्ता, पलिकडील इमारती आणि तीन ठिकाणी दिसत असलेले निळे आकाश. यामुळे असे वाटत असावे. (असे वाटते) Sir Ernst Hans Josef Gombrich यांच्या Art and illusion : a study in the psychology of pictorial representation या चित्रकलाविषयक पुस्तकात या विषयी विस्तृत उहापोह वाचल्याचे आठवते, पण नेमके काय ते विसरलो. या पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध आहे: https://archive.org/details/artillusionstud00gomb

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 10:07
Vertical shift किंवा perspective corrected पद्धतीचे wide angle lens चा एक प्रकार मिळतो. अतिशय महाग लेन्स असतं. (20/24mm prime with f/2) .तर ते वापरून फोटो घेतला असणार.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:06
सगळे फोटो स्वस्तातल्या शामसंग (-खेले होरी) मोबल्यातून, तेही फक्त आटो मोडमधे काढलेत. फक्त क्रॉप केलेत हवे तसे. बाकी काय नाय. 'दृष्टी' हवी, ती निसर्गचित्रणातून मिळाली असावी, आणि थोर चित्रकारांची चित्रे बघण्यातून. बाकी फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही.

हा लेख आणि फोटो तर आवडलेच पण त्यात दिलेल्या ईतर लिंकाही उघडुन वाचल्या. केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते. फक्त खिसा काय म्हणतो ते पहावे लागेल. :) आपण ईतकी डिटेल माहीती काढुन ठिकाणे बघताय हे विशेष. नाहीतर ईथेतिथे सगळे सारखेच, तेच राजवाडे,त्याच मुर्त्या आणि काय काय. फोटोही सुंदर आलेत. रच्याकने- फार वर्षांपुर्वी ऑफिसच्या कामानिमित्ताने ब्रसेल्स आणि अ‍ॅमस्टरडॅम बघणे झाले होते, पण मॅनिकेन पिस, तुसाँ म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम अशा २-४ गोष्टी सोडल्या तर फारशी नावेही आठवणार नाहीत. पुभाप्र

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:12
केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते.
-- अगदी खरे. माझ्या ओळखीतले जे कुणी तसे फिरुन आलेले आहेत, त्यांच्याकडून ऐकलेले माझ्या आवडीत कुठेच बसणार नाही. कुठेही जाण्यापूर्वी तिथला सांगोपांग अभ्यास करून जाणे बरे, अर्थात नेहमी ते जमत नाही आणि काही ना काही बघणे राहूनच जाते.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 13:24
सहमत. ग्रूपवाले वेळ फार घालवतात. नाश्ता, जेवण, शॉपिंग यातून वेळ उरल्यास लीडरने सांगितलेलं पाहाणं. आणि हो ग्रूप फोटो.

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला! रोमची पहिली ओळख Dan Brown च्या एंजल्स अँड डेमन्स पुस्तकातून झाली. पुस्तक वाचता वाचता एकेका स्थळविषयी इंटरनेटवर जास्त माहिती वाचत होतो. त्यातून रोममधील वास्तुकला, शिल्पकला यांची ओळख झाली. St Peter's Basilica, Castle Sant' Angelo, Pantheon या प्राचीन वास्तू, Fontana dei Quattro Fiumi (Fountain of the Four Rivers) सारखी स्थापत्य कला, Bernini सारख्या कलाकाराच्या स्वर्गीय कलाकृती - Ecstasy of St Teresa. इतक्या सुरेख, भव्य, बारकावे दाखवणाऱ्या कलाकृती! अशीच पॅरिस, लुव्र, लिओनार्दो दा विंची यांची ओळख दा विंची कोड मधून झाली, तर फ्लॉरेन्सचं सौंदर्य इन्फर्नो मधून दिसलं! ओरिजिन या पुस्तकातून Casa Milà आणि Sagrada Família अशा अनोख्या वास्तू समजल्या...

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 30/01/2024 - 13:47
तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!
या पुस्तकांपैकी फक्त 'दा विंची कोड' चे मराठी भाषांतर वाचले आहे. ते आवडले पण सिनेमा फारसा रुचला नाही. 'इन्फर्नो' वरील 'गुस्ताव्ह दोरे' (Gustave Dore) च्या चित्रांचे एक पुस्तक माझ्याकडे आहे. विलक्षण चित्रे असतात दोरेची. आत्ताच अ‍ॅमेझोनवर डॅन ब्राऊनची अन्य पुस्तके (मराठी) शोधून ठेवली आहेत. येत्या मार्चमधे दहा दिवस लंडनमधील संग्रहालये बघणार आहे. त्यासंबंधी काही विशेष पुस्तके, सिनेमे वगैरे असल्यास जरूर कळवावे. अनेक आभार.

सुंदर लेख ! दोन प्रश्न १. Tempio di Vesta मधील एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? असा उल्लेख कोठे आहे काय ? २. नदी / कालवे / समुद्राच्या अवतीभवती वसलेल्या शहरांत / गावांत त्या पाण्याचा काही विशीष्ट गंध वगैरे येतो काय ? अवांतर : बनेल काढून रोमन सम्राटाच्या आविर्भावात दिलेली पोज आवडली.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:18
एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? हा प्रश्न समजला नाही. 'जाणल्यामुळे' म्हणजे काय ? कौमार्यभंग वगैरे प्रकार रोमन साम्राज्याच्या दीर्घ इतिहासात घडलेही असतील, काही ठाऊक नाही. पाण्याला विशिष्ट गंध वगैरेही माहित नाही. त्या दिवशी कडक ऊन्ह असल्याने घामाघूम होत फिरावे लागले होते, म्हणून सदरा काढलेला होता. कुठे रोमन सम्राट आणि कुठे म्या पामर. या लेखात एवढी रुची घेत असल्याबद्दल अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

जुन्या मराठी ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांमधे जोसेफ ने मेरीला जाणल्यामुळे (संयोग झाल्यामुळे) येशूबाळाचा जन्म झाला अशा प्रकारचे उल्लेख असतात त्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 02/02/2024 - 12:32
'जाणण्या' चा नवीनच अर्थ जाणकाराकडून जाणून घेतला. आता कळले लहान मुलांना 'अजाण' 'निष्पाप' वगैरे का म्हणतात. जुन्या ख्रिस्ती धार्मिक पुस्तकातले आणखीही असे शब्दप्रयोग 'जाणून' घ्यायला आवडेल. आपली 'जाणीव' वाढीला लागली पाहिजे राव. अनेक धन्यवाद.

चौथा कोनाडा 31/01/2024 - 14:51
क्या बात ... एक नंबर मस्त ! माहिती आणि प्रचि लै छान ! रोम ची सुंदर सफर घडवलीत चित्रगुप्त जी !
या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे.
बाबो .. किती आवगड असं ह्ये म्हनायचं ! व्हिला ‘आद्रिआना जबरदस्त दिसतोय ! कल्पना करून तयार केलेला व्हिला ‘आद्रिआना चा व्हिडीओ भारी आहे ! Villa d'Este किती रम्य आहे ! वाहते पाणी,धबधबे, शंभर कारंजे, तलाव सुंदर ! रोमचा राजवाडा, गल्ल्या वास्तू भयन्कर सुंदर आहेत !
- अस्मादिक.
ह्यो फोटो लै पेशल !
आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.
हा हा हा

खूप सुंदर भटकंती आणि अप्रतिम फोटो! सोबतीला इतिहास उलगडून सांगितलात ते फार आवडलं. येणारी अनेक वर्षे तुम्हाला अशी छान भटकंती करायला मिळो या शुभेच्छा :)

नंदन 03/02/2024 - 17:02
लेख आणि फोटो - दोन्ही खासच! (काही वर्षांपूर्वी ट्रेवी कारंज्यात एक बारकंसं नाणं टाकून पुनर्भेटीचा मनसुबा व्यक्त केला होता - तो योग केव्हा येतो ते पहायचं!)

परत एकदा वाचला धागा. काय सुंदर आहेत सगळे फोटो. मन खूष झालं. असेच लिहित रहा चित्रगुप्तकाका _/\_

श्वेता२४ 08/02/2024 - 12:53
अतिशय विस्तृत ओळख करून दिलीत. फोटो देखील अतिशय सुंदर. भविष्यात ही जागा बकेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे तुमच्या या माहितीचा खूप उपयोग होईल. धन्यवाद!

चौथा कोनाडा 19/02/2024 - 22:07
श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे उद्यापासुन एक आठवडा चित्रप्रदर्शन होत आहे: माहिती खालील ठिकाणी: सेव्हन_आर्टिस्ट_फ्रॉम_इंदोर चित्रगुप्तजी, हार्दिक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठी समस्त मिपाकरांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

जुइ 27/02/2024 - 06:33
विहंगम आणि भव्य महाल! रोमचे असे सुंदर दर्शन तुमच्या मुळे झाले! फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले! रोम बद्द्ल अजून वाचायला आवडेल.
पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे. . टायबर नदीवरील अनेक पुलांपकी एक. पलीकडे सेंट पीटर्स कॅथेड्रल दिसते आहे.

३० वर्षांपासून अखंडित....

पराग१२२६३ ·

नाॅर्थ ब्लॉकमधील असताना सलग पाच वर्ष परेड खुप जवळुन बघीतली. छान ,थोडक्यात आढावा इथे सादर केलात. संपूर्ण संकलनाचे एक काॅफी पुस्तक काढा. नक्कीच लोकांना आवडेल. धन्यवाद.

मी नेहरू प्लेस ला २-३ वर्षे नोकरी केली. २५ जानेवारी ला सक्तीचा हाफ डे मिळायचा सुरक्षा कारणास्तव . प्रत्यक्ष परेड दिल्लीत राहूनही पाहिली नाही . मुंबईस पळायचो सुट्टीसाठी. ऑफिसमधले सांगायचे कि नेहरू प्लेस हुन परेड जायची फार वर्षांपूर्वी

नाॅर्थ ब्लॉकमधील असताना सलग पाच वर्ष परेड खुप जवळुन बघीतली. छान ,थोडक्यात आढावा इथे सादर केलात. संपूर्ण संकलनाचे एक काॅफी पुस्तक काढा. नक्कीच लोकांना आवडेल. धन्यवाद.

मी नेहरू प्लेस ला २-३ वर्षे नोकरी केली. २५ जानेवारी ला सक्तीचा हाफ डे मिळायचा सुरक्षा कारणास्तव . प्रत्यक्ष परेड दिल्लीत राहूनही पाहिली नाही . मुंबईस पळायचो सुट्टीसाठी. ऑफिसमधले सांगायचे कि नेहरू प्लेस हुन परेड जायची फार वर्षांपूर्वी
संग्रह सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही.

सात वारांची भारतीय पद्धती

निनाद ·

गवि 15/01/2024 - 12:31
अरे वा. तपशीलवार लेख. धन्यवाद. आता वर उल्लेखिलेली उद्धट प्रतिक्रिया शोधणे आले. सापडत नाही. बादवे माझा कोणताही दावा नाही की अमुक पद्धत पाश्चात्यच आहे किंवा भारतीय आहे.

रामायण , महाभारत , वेद, पुराणे किंव्वा प्रमुख उपनिषदे ह्यात कुठेही वारांचा उल्लेख असलेले श्लोक द्या म्हणजे तुमचे म्हणणे पुराव्याने शाबित होइल.

In reply to by प्रसाद गोडबोले

निनाद 16/01/2024 - 13:09
आरसा दाखवण्याचा मक्ता मी घेतलेला नाही. थोडा फार शोध घेतला असता तर तुम्हाला ही कदाचित हे मिळाले असते. पारंपारिक ज्ञान हे भारतीय आहे हे दाखवून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ते न करता ज्यांनी चार शब्द लिहिले आहेत, ते कसे चुकीचे असावेत अशा प्रकारची संशयाची पिंक टाकून जाणे योग्य नाही. कोणताही संदर्भ न देता फक्त विनाकारण संशय मात्र निर्माण करत आहात, हे योग्य नाही! तरी दाव्यात खोट राहू नये म्हणून - येथे सापडल्याप्रमाणे
  1. अथर्व ज्योतिष श्लोक ९३,
  2. याज्ञवल्क्य स्मृती आराध्याय श्लोक २९५
  3. महाभारत आदि पर्व १६०/७ आणि
  4. कात्यायन गृहसूत्र, तिसरे कांड, पाचवे कांड, दुसरा श्लोक यामध्ये या सप्ताह-दिवसांचा उल्लेख आहे.
  5. महाभारत काव्यात आणि कात्यायन यांनी आठवड्याच्या दिवसांसाठी 'वरा आणि वासर' असे संबोधन दिले आहे.
  6. वाल्मिकी रामायणातही गुरुवारचा उल्लेख बृहस्पती दिवस असा आहे.
याशिवाय माझ्या ऐकीव माहितीनुसार शिवपुराणात भगवान शिवाने आठवड्याचे सात दिवस निर्माण केल्याचा आणि त्यांना देवता नियुक्त केल्याचा उल्लेख आहे. त्यात असे म्हटले आहे की पहिल्या सृष्टीत सात दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी परमेश्वराने ठरवले होते. देवी भागवत पुराणातही वासरांचा उल्लेख आहे. येथे दिलेल्या प्रतिनुसार आठवड्याचे सात दिवस असा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे. माझ्या अल्पमतिनुसार लोकमान्य टिळकांनीही यावर उहापोह करून त्या काळी हा वाद निकाली काढला असावा असे वाटते. (माझ्याकडे काही संदर्भ नाहीत, वडिलांशी बोलतांना असे उल्लेख आल्याचे आठवते.) तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. आता मन मोकळेपणे वारांचे भारतीय मूळ मान्य करायला प्रत्यवाय नसावा. अर्थात भारतात जे काही ज्ञान आहे ते पाश्चात्यच आहे असे ठरवून टाकले असेल तर कोणतीही मदत करणे शक्य नाही.

In reply to by निनाद

... हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे... ... पण काही लोकांना पटतच नसेल तर काय करणार? ----- फार पूर्वी एक गाणे पण आले होते... https://youtu.be/HEvS7_hAPQg?si=xyWcX0iZ_1_aENns ------- मानसिक गुलाम सुधरत नाहीत...

In reply to by निनाद

=))))
आरसा दाखवण्याचा मक्ता मी घेतलेला नाही.
मग काय नुसता व्हॉट्सअ‍ॅप्पी प्रचार करायचा मक्ता घेतला आहे का ? तुमच्या सारख्या निर्बुध्द आळशी लोकांच्यामुळे आमच्यासारखे सनातनी लोकं बदनाम होतात. तुम्हाला खरेच तुमचा संस्कृतीचा अभ्यास असेल तर आधी किमान स्वतःतरी वाचा, आधी स्वत्:च्या मनाला पुराव्याने शाबित करा, कोणत्याही सेकंडरी सोर्स वर अवलंबुन राहु नका. तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील म्हणे. =)))) स्वतः तज्ञ बना अन मग वाट्टेल ते क्लेम करा , उगाच तोंडाच्या वाफा कशाला ?
अभ्यासोनि प्रकटावे। अभ्यासोनि प्रकटावे।ना तरी झाकोनि असावे।। प्रकटोनी नासावे।हे बरे नोहे।।
महाभारत आदि पर्व १६०/७
तुम्ही दिलेले सर्व संदर्भ भोंगळ आहेत , कुठेही नीट आवृतीचा , पान क्रमांकाचा उल्लेख नाही. तरी त्यातल्या त्यात आमच्या महाभारताचा उल्लेख सापडला म्हणुन हा संदर्भ शोधुन पाहिला : https://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/unic/mbh01_sa.html बोरीच्या संशोधित आवृत्तीत , आदिपर्वात १६० म्हणजे तापस्योपाख्यानम् नावाचा अध्याय येत आहे: त्यातील सातवा श्लोक खालील प्रमाणे :
विवस्वतो वै कौन्तेय सावित्र्यवरजा विभो | विश्रुता त्रिषु लोकेषु तपती तपसा युता ||७||
ह्यात कुठे वाराचा उल्लेख तुम्हाला दिसला ? मला तरी कळत नाही. उगाच काहीही पडताळणी न करता, दुसर्‍याचे संदभ ठोकुन दिले की असे चारचौघात फजीत व्हायला होते ! एकुणच पुरावे न देता , अभ्यास न करता ठासुन बोलण्याची वृत्ती सर्वत्र वाढत आहे हे चिंताजनक आहे. बाकी शिवपुराण वगैरे काही बोलुच नका , मला हसुच येते , #"एक लोटा जल, सब समस्याका हल". =))))
थोडा फार शोध घेतला असता तर तुम्हाला ही कदाचित हे मिळाले असते.
बर्डन ऑफ प्रूफ हे अ‍ॅसर्टिव्ह स्टेटमेंट करणार्‍यावर असते. तुम्ही काहीही विधान करत असाल तर तुम्हाला ते खरे आहे हे सिध्द करावे लागेल, तुम्ही इतरांना म्हणत असाल की "माझे विधान असत्य आहे असे तुम्ही सिध्द करुन दाखवा." तर तुमच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. ज्याला बेसिक लॉजिक कळत नाही त्याच्याशी काय बोलणार ! बाकी पुराव्याने शाबित करणार असला काही, काही ओरिजिनल श्लोक ,संदर्भ देणार असलात तर पुढे बोलु नाहीतर उगाच काही वेळ वाया घालवण्यात आम्हाला रस नाही. आम्ही प्रचेतस उर्फ वलीसर आणि बॅटमॅन शी स्वतंत्र चर्चा करु ह्या विषयावर.

In reply to by निनाद

निनाद, मी पुनरेकवार अत्यंत विनम्रपणे म्हणतो कि तुम्ही पुराव्याने शाबित करा की हिंदुंनी दिवसांची पध्दत वापरात आणली, आम्हाला त्या निमित्ताने काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अन्यथा भोंगळ विधान करुन लोकांची दिशाभुल केल्याचे तरी कबुल करा. तुमच्या लक्षात येते आहे का की ह्या असल्या निर्बुध्द क्लेम्स मुळे तुम्ही हिंदु धर्माचा हिंदु संस्कृतीचा गौरव वाढवण्याऐवजी नुकसानच करत आहात ते ! त्यातही तुम्ही स्वतः काहीच पडताळुन पाहिलेले दिसत नाही नुसतेच व्हॉट्सॅप्प युनिव्हर्सिटीवरुन फेकाफेकी करत आहात ह्यावरुन तुमच्या बुध्दीमत्तेचेही चारचौघात वस्त्रहरण होत आहे ! हिंदुं रादर सनातनी वैदिक धर्माच्या लोकांनी आकाशातील ग्रहतार्‍यांची गती , त्यांची आवर्तने अचुकपणे मोजली होती, अगदी ग्रहणाचे वेध कधी लागतात कधी सुटतात हेहे मोजले होते. चांद्र कालगणनेची सुर्यकालगणनेची सांगड घातलेली होती. त्यातही तिथींच्या, चंद्रोदयाच्या मोजमापातील एरर मुळे दर तीन वर्षांनी एक अधिक महिना सौरकालगणनेत जोडावा लागतो हे शोधुन काढले होते, त्यातही तो अधिक महिना नेहअमी एकच असत नाही तर तो ही बदलता असता जेणे करुन ऋतुचक्राचे , वातावरणाचे , सणासुदींचे गणित बिघडत नाही. इतके सगळे आमच्या पुर्वजांन्नी शोधुन काढलेले आहे , निर्णयसिंधु मध्ये कोणत्या सणाला कोणती तिथी धरावी, प्रतःव्यापिनी की माध्यान्ह व्यापिनी वगैरे ह्याचे स्पष्ट निर्देशही आहेत. दाते पंचांग वालेही व्यवस्थित चंद्रोदय सुर्योदय, नक्षत्र, ग्रहांची स्थाने वगैरे देत आहेत जे की शेकडो वर्षांपासुन चालु आहे. कालिदासानेही आषाढस्य प्रथमे दिने म्हणले आहे, त्याने दिवसाचा उल्लेख केलेला नाही , कारण दिवस ही कन्सेप्टच नव्हती , तिथी हाच मुख कालगणनेचा आधार होता. पण ह्यासर्वात कोठेच "दिवस " असा उल्लेख नाही सापडला मला तरी. तुम्ही ठासुन बोलता पण काडीमात्र पुरावा देत नाही . बरं, वस्त्रहरण झाले तरीही वस्त्रहरण झाले हे सिध्द करा असे म्हणत ती जबाबदारीही वस्त्रहरण करणार्‍यावरच ढकलत आहात ! तुमच्यासारख्या निर्बुध्द लोकांच्यामुळे सनातनी हिंदुंची बदनामी होते, अंधश्रध्दा निर्मुलनवाल्या हिंदुधर्मध्वसंक लोकांना हातात फुकटाचे कोलीत मिळते , सिक्युलर लोकांना हसण्यासाठी टॉपिक मिळतात. तुमच्यात अन त्या सनातन प्रभातवाल्या बावळट लोकांच्यात काहीही फरक नाहीये . आता तरी सुधारा.
हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची जबाबदारी उरतेच...
एकुणच तुमची विधाने बुध्दीदारिद्र दाखवणारी आहेत , बाष्कळ , बालबुध्दी आहेत असे माझे विधान आहे . आता तुमच्याच तर्काला धरुन - ते सिध्द करायची जबाबदारी माझी नाही. आणि आता हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची तुमचीच जबाबदारी उरतेच. करा सिध्द आता! ठ्ठो.

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 21/01/2024 - 22:21
अवांतर : प्रसाद गोडबोले, तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. फक्त सनातन प्रभातवाले बावळट म्हणजे नेमके कोण ते माहीत नाही. जमल्यास ते स्पष्ट करावे व त्यांचा बावळटपणाही सविस्तर सांगावा ही विनंती. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

सनातन प्रभात हो ! हे घ्या लिंक : https://sanatanprabhat.org/ ते तुमच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज काढुन देतात =)))) नुसते sanatan prabhat आध्यात्मिक पातळी असे गुगल सर्च करुन पहा, तुम्हाला अनेक लोकांच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज मिळेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 22/01/2024 - 19:59
अवांतर : टक्केवारीत बावळटपणा काय बरं? काही वर्षांपूर्वी मी सहज विचारणा केली होती. तेव्हा तिकडून उत्तर आलं होतं की ही टक्केवारी म्हणजे अतींद्रिय चाचणीचा किमान गुणांक आहे ( ESP Test minimum score ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अवांतर :
करेक्ट. खुपच अवांतर आहे हे , तुम्ही स्वतंत्र धागा काढा कि " अध्यात्मिक प्रगतीची टक्केवारी काढण्याची पध्दत " . आपण तिकडे सविस्तर चर्चा करु. =))))

कॉमी 16/01/2024 - 18:23
दोन प्रश्न आहेत. आता सरळ उत्तर द्यायचे का मार्क्सिस्ट, म्हणून रिकामे व्हायचे हा तुमचा चॉईस आहे. माझी चूक असू शकते, कारण मी तज्ञ नाहीये. सिव्हीलिटी ने संवाद होईल अशी आशा. १. भारतातली ज्ञात सर्वात जुनी कालगणना पद्धत माझ्या माहितीनुसार शके आहे. त्यात शके मध्ये सुद्धा जुनी शके, जिची अज्ञात सुरुवात किंवा epoch जवळपास ख्रिस्तपूर्व एक सहत्रक मागे आहे. ही जैन आणि बुद्ध लिखाणात आढळते. नवी शके ही ख्रिस्तपूर्व ७८ पासून चालू होते, ती शालिवाहन राजाने चालू केली असे म्हणतात. त्याआधी मला माहित असणारी कोणतीही कालगणना भारतात नव्हती. विक्रम संवत्सर सुद्धा त्यानंतर, ५४ bc. मग वेदांमध्ये वार असतील तर ते कोणत्या कॅलेंडर नुसार होते ? २. त्यापुढे आर्यभट्ट पाचव्या ते सहाव्या शतकातला आहे. त्याचा दाखला देऊन पाचव्या ते सहाव्या शतकात भारतात वर वापरात होते इतकेच सिद्ध होते. भारतीय दिवस सर्वात जुने आहेत दाखवायला रोमन कॅलेंडर पेक्षा जुना रेफ्ररंस लागणार नाही का ? ३. इतर ग्रंथांचे दाखले दिलेत त्याबद्दल काही कॉमेंट नाही, कारण रेडी दुवा नसल्याने तपासण्यास वेळ लागेल.

हा धागा नी ह्या धाग्यावरचा दावा हा सत्तर रूपयांप्रमाणे वारलाय. लेखकांनी पुढीलवेळी पुराव्यानीशी मैदानात ऊतरावे असा सल्ला देऊन खाली बसतो. जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! जय मिपा मालक!

निनाद 30/01/2024 - 09:19
अत्यंत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका करणार्‍यांना उत्तर देणे मला शक्य नाही! मी उत्तर देणारही नाही! या वादात खुपसटे तर अनेक काढता येतील या वादात. पण मूळ हे उरतेच की उगवणारा दिवस हा शनिवारचाच दिवस का आहे? जर हे ज्ञान भारतीय नाही तर मग इतरत्र ही शनिवार हा शनिवारच का याचे कारण का मिळत नाही? कारण ही वारांची संगतवार जुळणी कुणी केली तर भारतीयांनी. कारण इतरत्र कुठेही आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: हे सूत्र आहे असे दिसून येत नाही. अर्थात हे सूत्रच चुकीचे आहे असे म्हणत असाल तर आर्यभटांना चूक दाखवून योग्य त्या सूत्राचे रिबटल द्यावे. असो सूत्राप्रमाणे आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: म्हणजे जो सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यापासून ते सर्वात वेगाने चालणारा ग्रह आहे त्या क्रमाने एक एक होरा दिवसात येतो. शनि महाराज सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तर हे सर्व सात ग्रह उदयासमयी शनि महाराजांपासून सुरूवात करून एका मागे एक असे येतात. जसे की पहिला शनी, दुसरा बृहस्पति, तिसरा मंगळ, चौथा रवि, पाचवा शुक्र, सहावा बुध आणि सातवा चंद्र. १ शनी, (शनिवार सुरुवात) २बृहस्पति, ३मंगळ, ४रवि, ५ शुक्र, ६ बुध, ७चंद्र. ८ शनी, ९बृहस्पति, १०मंगळ, ११रवि, १२शुक्र, १३बुध, १४चंद्र. १५ शनी, १६बृहस्पति, १७मंगळ, १८रवि, १९शुक्र, २०बुध, २१चंद्र. २२ शनी, २३ बृहस्पति, २४ मंगळ. १ रवि (रविवार सुरुवात) २शुक्र, ३बुध, ४चंद्र, ५ शनी, ६ बृहस्पति, ७ मंगळ... तर अशा रीतीने प्रत्येक ग्रहा पासून चौथ्या ग्रहाचा वार येतो. हे गणित भारतीय ज्योतिषाचा परिणाम नसलेल्या इतरत्र कोणत्याही संस्कृतीमध्ये भारताच्या आधी बनवले गेले होते आहे याचा पुरावा आणावा. पुरावा न मिळाल्यास आपल्या भारतीय ज्योतिष ज्ञानातून पुर्वासूरींनी हे कार्य केले याचा आनंद मानावा.

अहिरावण 30/01/2024 - 12:14
तुम्हाला समजून घेण्याची इच्छा नाही आणि तुम्ही समजून घेणारही नाही. फक्त इतरांसाठी : भारतीय ज्योतिष गणित आता आता पर्यंत घटिका आणि पळे यावर होते. ५० च्या वर वय असलेल्या ज्यांच्याकडे दाते पंचांग नियमित येत असेल त्यांना काही वर्षांपूर्वी दात्यांनी २४ तासांनुसार पंचांग द्यायला सुरुवात केली हे ठाऊक असेल. ६० घटीकांचा दिवस आणि म्हणून ६० या आकड्याला बरेच मूल्य. नारदाची ६० नावे आणि त्यानुसार दर वर्षांचे नाव अमुक नाम संवत्सर इत्यादी त्यामुळे २४ तासांच्या होरा नामकरणाचा खटाटोप नक्की कसा कुणी केला हे गंमतीचे असेल. तसेही बाण मारुन मग वर्तुळ काढले की वर्तूळ काढून बाण मारला.... सोईचे काय ते पहावे. हं तर काय म्हणत होतो... तर ते असे की वारांची नावे कशी कोठून आली याबाबत जाणकारांची मते भिन्न आहेत आणि तसे असायला हरकत नाही.

अत्यंत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका करणार्‍यांना उत्तर देणे मला शक्य नाही!मी उत्तर देणारही नाही!
>>> आता एखाद्याची पातळी खरेच खालचीच असेल तर त्याच्यावर तिथेच जाऊन टीका केली पाहिजे ना ! तरी फार फार विनम्र शब्दात बोललोय आम्ही. समर्थ रामदासस्वामींनी काय काय लिहिलंय पहा : प्रचीतिवीण जे बोलणे । ते अवघेंचि कंटाळवाणे । तोंड पसरोन जैसे सुणे । रडोन गेले ।। दासबोध दशक ९ समास ५ श्लोक १५ सुणे म्हणजे कुत्रे. प्रत्यक्ष प्रचिती शिवाय जे जे काही बोलले जाते ते कुत्राच्या रडण्यासारखे आहे. आता बोला. परत एकदा , अतिशय विनम्रपणे सांगतो : बाकी काहीही बाष्कळ बडबड करून स्वत:ला लज्जित करून घेण्यापेक्षा तुम्ही कोणत्यातरी वेदातील, उपनिषद मधील, पुराणातील , किमान महाभारत रामायणातील दिवसाचा उल्लेख असणारे २-४ श्लोक उद्धृत करा, आम्हीही पडताळून पहातो. तुम्हाला तुमचा मुद्दा सिद्ध केल्याचा आनंद मिळेल अन् आम्हाला काहीतरी नवीन शिकल्याचा. अन्यथा, चालू दे तोंड पसरून रडणे.

गवि 15/01/2024 - 12:31
अरे वा. तपशीलवार लेख. धन्यवाद. आता वर उल्लेखिलेली उद्धट प्रतिक्रिया शोधणे आले. सापडत नाही. बादवे माझा कोणताही दावा नाही की अमुक पद्धत पाश्चात्यच आहे किंवा भारतीय आहे.

रामायण , महाभारत , वेद, पुराणे किंव्वा प्रमुख उपनिषदे ह्यात कुठेही वारांचा उल्लेख असलेले श्लोक द्या म्हणजे तुमचे म्हणणे पुराव्याने शाबित होइल.

In reply to by प्रसाद गोडबोले

निनाद 16/01/2024 - 13:09
आरसा दाखवण्याचा मक्ता मी घेतलेला नाही. थोडा फार शोध घेतला असता तर तुम्हाला ही कदाचित हे मिळाले असते. पारंपारिक ज्ञान हे भारतीय आहे हे दाखवून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ते न करता ज्यांनी चार शब्द लिहिले आहेत, ते कसे चुकीचे असावेत अशा प्रकारची संशयाची पिंक टाकून जाणे योग्य नाही. कोणताही संदर्भ न देता फक्त विनाकारण संशय मात्र निर्माण करत आहात, हे योग्य नाही! तरी दाव्यात खोट राहू नये म्हणून - येथे सापडल्याप्रमाणे
  1. अथर्व ज्योतिष श्लोक ९३,
  2. याज्ञवल्क्य स्मृती आराध्याय श्लोक २९५
  3. महाभारत आदि पर्व १६०/७ आणि
  4. कात्यायन गृहसूत्र, तिसरे कांड, पाचवे कांड, दुसरा श्लोक यामध्ये या सप्ताह-दिवसांचा उल्लेख आहे.
  5. महाभारत काव्यात आणि कात्यायन यांनी आठवड्याच्या दिवसांसाठी 'वरा आणि वासर' असे संबोधन दिले आहे.
  6. वाल्मिकी रामायणातही गुरुवारचा उल्लेख बृहस्पती दिवस असा आहे.
याशिवाय माझ्या ऐकीव माहितीनुसार शिवपुराणात भगवान शिवाने आठवड्याचे सात दिवस निर्माण केल्याचा आणि त्यांना देवता नियुक्त केल्याचा उल्लेख आहे. त्यात असे म्हटले आहे की पहिल्या सृष्टीत सात दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी परमेश्वराने ठरवले होते. देवी भागवत पुराणातही वासरांचा उल्लेख आहे. येथे दिलेल्या प्रतिनुसार आठवड्याचे सात दिवस असा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे. माझ्या अल्पमतिनुसार लोकमान्य टिळकांनीही यावर उहापोह करून त्या काळी हा वाद निकाली काढला असावा असे वाटते. (माझ्याकडे काही संदर्भ नाहीत, वडिलांशी बोलतांना असे उल्लेख आल्याचे आठवते.) तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. आता मन मोकळेपणे वारांचे भारतीय मूळ मान्य करायला प्रत्यवाय नसावा. अर्थात भारतात जे काही ज्ञान आहे ते पाश्चात्यच आहे असे ठरवून टाकले असेल तर कोणतीही मदत करणे शक्य नाही.

In reply to by निनाद

... हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे... ... पण काही लोकांना पटतच नसेल तर काय करणार? ----- फार पूर्वी एक गाणे पण आले होते... https://youtu.be/HEvS7_hAPQg?si=xyWcX0iZ_1_aENns ------- मानसिक गुलाम सुधरत नाहीत...

In reply to by निनाद

=))))
आरसा दाखवण्याचा मक्ता मी घेतलेला नाही.
मग काय नुसता व्हॉट्सअ‍ॅप्पी प्रचार करायचा मक्ता घेतला आहे का ? तुमच्या सारख्या निर्बुध्द आळशी लोकांच्यामुळे आमच्यासारखे सनातनी लोकं बदनाम होतात. तुम्हाला खरेच तुमचा संस्कृतीचा अभ्यास असेल तर आधी किमान स्वतःतरी वाचा, आधी स्वत्:च्या मनाला पुराव्याने शाबित करा, कोणत्याही सेकंडरी सोर्स वर अवलंबुन राहु नका. तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील म्हणे. =)))) स्वतः तज्ञ बना अन मग वाट्टेल ते क्लेम करा , उगाच तोंडाच्या वाफा कशाला ?
अभ्यासोनि प्रकटावे। अभ्यासोनि प्रकटावे।ना तरी झाकोनि असावे।। प्रकटोनी नासावे।हे बरे नोहे।।
महाभारत आदि पर्व १६०/७
तुम्ही दिलेले सर्व संदर्भ भोंगळ आहेत , कुठेही नीट आवृतीचा , पान क्रमांकाचा उल्लेख नाही. तरी त्यातल्या त्यात आमच्या महाभारताचा उल्लेख सापडला म्हणुन हा संदर्भ शोधुन पाहिला : https://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/unic/mbh01_sa.html बोरीच्या संशोधित आवृत्तीत , आदिपर्वात १६० म्हणजे तापस्योपाख्यानम् नावाचा अध्याय येत आहे: त्यातील सातवा श्लोक खालील प्रमाणे :
विवस्वतो वै कौन्तेय सावित्र्यवरजा विभो | विश्रुता त्रिषु लोकेषु तपती तपसा युता ||७||
ह्यात कुठे वाराचा उल्लेख तुम्हाला दिसला ? मला तरी कळत नाही. उगाच काहीही पडताळणी न करता, दुसर्‍याचे संदभ ठोकुन दिले की असे चारचौघात फजीत व्हायला होते ! एकुणच पुरावे न देता , अभ्यास न करता ठासुन बोलण्याची वृत्ती सर्वत्र वाढत आहे हे चिंताजनक आहे. बाकी शिवपुराण वगैरे काही बोलुच नका , मला हसुच येते , #"एक लोटा जल, सब समस्याका हल". =))))
थोडा फार शोध घेतला असता तर तुम्हाला ही कदाचित हे मिळाले असते.
बर्डन ऑफ प्रूफ हे अ‍ॅसर्टिव्ह स्टेटमेंट करणार्‍यावर असते. तुम्ही काहीही विधान करत असाल तर तुम्हाला ते खरे आहे हे सिध्द करावे लागेल, तुम्ही इतरांना म्हणत असाल की "माझे विधान असत्य आहे असे तुम्ही सिध्द करुन दाखवा." तर तुमच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. ज्याला बेसिक लॉजिक कळत नाही त्याच्याशी काय बोलणार ! बाकी पुराव्याने शाबित करणार असला काही, काही ओरिजिनल श्लोक ,संदर्भ देणार असलात तर पुढे बोलु नाहीतर उगाच काही वेळ वाया घालवण्यात आम्हाला रस नाही. आम्ही प्रचेतस उर्फ वलीसर आणि बॅटमॅन शी स्वतंत्र चर्चा करु ह्या विषयावर.

In reply to by निनाद

निनाद, मी पुनरेकवार अत्यंत विनम्रपणे म्हणतो कि तुम्ही पुराव्याने शाबित करा की हिंदुंनी दिवसांची पध्दत वापरात आणली, आम्हाला त्या निमित्ताने काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अन्यथा भोंगळ विधान करुन लोकांची दिशाभुल केल्याचे तरी कबुल करा. तुमच्या लक्षात येते आहे का की ह्या असल्या निर्बुध्द क्लेम्स मुळे तुम्ही हिंदु धर्माचा हिंदु संस्कृतीचा गौरव वाढवण्याऐवजी नुकसानच करत आहात ते ! त्यातही तुम्ही स्वतः काहीच पडताळुन पाहिलेले दिसत नाही नुसतेच व्हॉट्सॅप्प युनिव्हर्सिटीवरुन फेकाफेकी करत आहात ह्यावरुन तुमच्या बुध्दीमत्तेचेही चारचौघात वस्त्रहरण होत आहे ! हिंदुं रादर सनातनी वैदिक धर्माच्या लोकांनी आकाशातील ग्रहतार्‍यांची गती , त्यांची आवर्तने अचुकपणे मोजली होती, अगदी ग्रहणाचे वेध कधी लागतात कधी सुटतात हेहे मोजले होते. चांद्र कालगणनेची सुर्यकालगणनेची सांगड घातलेली होती. त्यातही तिथींच्या, चंद्रोदयाच्या मोजमापातील एरर मुळे दर तीन वर्षांनी एक अधिक महिना सौरकालगणनेत जोडावा लागतो हे शोधुन काढले होते, त्यातही तो अधिक महिना नेहअमी एकच असत नाही तर तो ही बदलता असता जेणे करुन ऋतुचक्राचे , वातावरणाचे , सणासुदींचे गणित बिघडत नाही. इतके सगळे आमच्या पुर्वजांन्नी शोधुन काढलेले आहे , निर्णयसिंधु मध्ये कोणत्या सणाला कोणती तिथी धरावी, प्रतःव्यापिनी की माध्यान्ह व्यापिनी वगैरे ह्याचे स्पष्ट निर्देशही आहेत. दाते पंचांग वालेही व्यवस्थित चंद्रोदय सुर्योदय, नक्षत्र, ग्रहांची स्थाने वगैरे देत आहेत जे की शेकडो वर्षांपासुन चालु आहे. कालिदासानेही आषाढस्य प्रथमे दिने म्हणले आहे, त्याने दिवसाचा उल्लेख केलेला नाही , कारण दिवस ही कन्सेप्टच नव्हती , तिथी हाच मुख कालगणनेचा आधार होता. पण ह्यासर्वात कोठेच "दिवस " असा उल्लेख नाही सापडला मला तरी. तुम्ही ठासुन बोलता पण काडीमात्र पुरावा देत नाही . बरं, वस्त्रहरण झाले तरीही वस्त्रहरण झाले हे सिध्द करा असे म्हणत ती जबाबदारीही वस्त्रहरण करणार्‍यावरच ढकलत आहात ! तुमच्यासारख्या निर्बुध्द लोकांच्यामुळे सनातनी हिंदुंची बदनामी होते, अंधश्रध्दा निर्मुलनवाल्या हिंदुधर्मध्वसंक लोकांना हातात फुकटाचे कोलीत मिळते , सिक्युलर लोकांना हसण्यासाठी टॉपिक मिळतात. तुमच्यात अन त्या सनातन प्रभातवाल्या बावळट लोकांच्यात काहीही फरक नाहीये . आता तरी सुधारा.
हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची जबाबदारी उरतेच...
एकुणच तुमची विधाने बुध्दीदारिद्र दाखवणारी आहेत , बाष्कळ , बालबुध्दी आहेत असे माझे विधान आहे . आता तुमच्याच तर्काला धरुन - ते सिध्द करायची जबाबदारी माझी नाही. आणि आता हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची तुमचीच जबाबदारी उरतेच. करा सिध्द आता! ठ्ठो.

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 21/01/2024 - 22:21
अवांतर : प्रसाद गोडबोले, तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. फक्त सनातन प्रभातवाले बावळट म्हणजे नेमके कोण ते माहीत नाही. जमल्यास ते स्पष्ट करावे व त्यांचा बावळटपणाही सविस्तर सांगावा ही विनंती. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

सनातन प्रभात हो ! हे घ्या लिंक : https://sanatanprabhat.org/ ते तुमच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज काढुन देतात =)))) नुसते sanatan prabhat आध्यात्मिक पातळी असे गुगल सर्च करुन पहा, तुम्हाला अनेक लोकांच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज मिळेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 22/01/2024 - 19:59
अवांतर : टक्केवारीत बावळटपणा काय बरं? काही वर्षांपूर्वी मी सहज विचारणा केली होती. तेव्हा तिकडून उत्तर आलं होतं की ही टक्केवारी म्हणजे अतींद्रिय चाचणीचा किमान गुणांक आहे ( ESP Test minimum score ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अवांतर :
करेक्ट. खुपच अवांतर आहे हे , तुम्ही स्वतंत्र धागा काढा कि " अध्यात्मिक प्रगतीची टक्केवारी काढण्याची पध्दत " . आपण तिकडे सविस्तर चर्चा करु. =))))

कॉमी 16/01/2024 - 18:23
दोन प्रश्न आहेत. आता सरळ उत्तर द्यायचे का मार्क्सिस्ट, म्हणून रिकामे व्हायचे हा तुमचा चॉईस आहे. माझी चूक असू शकते, कारण मी तज्ञ नाहीये. सिव्हीलिटी ने संवाद होईल अशी आशा. १. भारतातली ज्ञात सर्वात जुनी कालगणना पद्धत माझ्या माहितीनुसार शके आहे. त्यात शके मध्ये सुद्धा जुनी शके, जिची अज्ञात सुरुवात किंवा epoch जवळपास ख्रिस्तपूर्व एक सहत्रक मागे आहे. ही जैन आणि बुद्ध लिखाणात आढळते. नवी शके ही ख्रिस्तपूर्व ७८ पासून चालू होते, ती शालिवाहन राजाने चालू केली असे म्हणतात. त्याआधी मला माहित असणारी कोणतीही कालगणना भारतात नव्हती. विक्रम संवत्सर सुद्धा त्यानंतर, ५४ bc. मग वेदांमध्ये वार असतील तर ते कोणत्या कॅलेंडर नुसार होते ? २. त्यापुढे आर्यभट्ट पाचव्या ते सहाव्या शतकातला आहे. त्याचा दाखला देऊन पाचव्या ते सहाव्या शतकात भारतात वर वापरात होते इतकेच सिद्ध होते. भारतीय दिवस सर्वात जुने आहेत दाखवायला रोमन कॅलेंडर पेक्षा जुना रेफ्ररंस लागणार नाही का ? ३. इतर ग्रंथांचे दाखले दिलेत त्याबद्दल काही कॉमेंट नाही, कारण रेडी दुवा नसल्याने तपासण्यास वेळ लागेल.

हा धागा नी ह्या धाग्यावरचा दावा हा सत्तर रूपयांप्रमाणे वारलाय. लेखकांनी पुढीलवेळी पुराव्यानीशी मैदानात ऊतरावे असा सल्ला देऊन खाली बसतो. जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! जय मिपा मालक!

निनाद 30/01/2024 - 09:19
अत्यंत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका करणार्‍यांना उत्तर देणे मला शक्य नाही! मी उत्तर देणारही नाही! या वादात खुपसटे तर अनेक काढता येतील या वादात. पण मूळ हे उरतेच की उगवणारा दिवस हा शनिवारचाच दिवस का आहे? जर हे ज्ञान भारतीय नाही तर मग इतरत्र ही शनिवार हा शनिवारच का याचे कारण का मिळत नाही? कारण ही वारांची संगतवार जुळणी कुणी केली तर भारतीयांनी. कारण इतरत्र कुठेही आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: हे सूत्र आहे असे दिसून येत नाही. अर्थात हे सूत्रच चुकीचे आहे असे म्हणत असाल तर आर्यभटांना चूक दाखवून योग्य त्या सूत्राचे रिबटल द्यावे. असो सूत्राप्रमाणे आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: म्हणजे जो सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यापासून ते सर्वात वेगाने चालणारा ग्रह आहे त्या क्रमाने एक एक होरा दिवसात येतो. शनि महाराज सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तर हे सर्व सात ग्रह उदयासमयी शनि महाराजांपासून सुरूवात करून एका मागे एक असे येतात. जसे की पहिला शनी, दुसरा बृहस्पति, तिसरा मंगळ, चौथा रवि, पाचवा शुक्र, सहावा बुध आणि सातवा चंद्र. १ शनी, (शनिवार सुरुवात) २बृहस्पति, ३मंगळ, ४रवि, ५ शुक्र, ६ बुध, ७चंद्र. ८ शनी, ९बृहस्पति, १०मंगळ, ११रवि, १२शुक्र, १३बुध, १४चंद्र. १५ शनी, १६बृहस्पति, १७मंगळ, १८रवि, १९शुक्र, २०बुध, २१चंद्र. २२ शनी, २३ बृहस्पति, २४ मंगळ. १ रवि (रविवार सुरुवात) २शुक्र, ३बुध, ४चंद्र, ५ शनी, ६ बृहस्पति, ७ मंगळ... तर अशा रीतीने प्रत्येक ग्रहा पासून चौथ्या ग्रहाचा वार येतो. हे गणित भारतीय ज्योतिषाचा परिणाम नसलेल्या इतरत्र कोणत्याही संस्कृतीमध्ये भारताच्या आधी बनवले गेले होते आहे याचा पुरावा आणावा. पुरावा न मिळाल्यास आपल्या भारतीय ज्योतिष ज्ञानातून पुर्वासूरींनी हे कार्य केले याचा आनंद मानावा.

अहिरावण 30/01/2024 - 12:14
तुम्हाला समजून घेण्याची इच्छा नाही आणि तुम्ही समजून घेणारही नाही. फक्त इतरांसाठी : भारतीय ज्योतिष गणित आता आता पर्यंत घटिका आणि पळे यावर होते. ५० च्या वर वय असलेल्या ज्यांच्याकडे दाते पंचांग नियमित येत असेल त्यांना काही वर्षांपूर्वी दात्यांनी २४ तासांनुसार पंचांग द्यायला सुरुवात केली हे ठाऊक असेल. ६० घटीकांचा दिवस आणि म्हणून ६० या आकड्याला बरेच मूल्य. नारदाची ६० नावे आणि त्यानुसार दर वर्षांचे नाव अमुक नाम संवत्सर इत्यादी त्यामुळे २४ तासांच्या होरा नामकरणाचा खटाटोप नक्की कसा कुणी केला हे गंमतीचे असेल. तसेही बाण मारुन मग वर्तुळ काढले की वर्तूळ काढून बाण मारला.... सोईचे काय ते पहावे. हं तर काय म्हणत होतो... तर ते असे की वारांची नावे कशी कोठून आली याबाबत जाणकारांची मते भिन्न आहेत आणि तसे असायला हरकत नाही.

अत्यंत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका करणार्‍यांना उत्तर देणे मला शक्य नाही!मी उत्तर देणारही नाही!
>>> आता एखाद्याची पातळी खरेच खालचीच असेल तर त्याच्यावर तिथेच जाऊन टीका केली पाहिजे ना ! तरी फार फार विनम्र शब्दात बोललोय आम्ही. समर्थ रामदासस्वामींनी काय काय लिहिलंय पहा : प्रचीतिवीण जे बोलणे । ते अवघेंचि कंटाळवाणे । तोंड पसरोन जैसे सुणे । रडोन गेले ।। दासबोध दशक ९ समास ५ श्लोक १५ सुणे म्हणजे कुत्रे. प्रत्यक्ष प्रचिती शिवाय जे जे काही बोलले जाते ते कुत्राच्या रडण्यासारखे आहे. आता बोला. परत एकदा , अतिशय विनम्रपणे सांगतो : बाकी काहीही बाष्कळ बडबड करून स्वत:ला लज्जित करून घेण्यापेक्षा तुम्ही कोणत्यातरी वेदातील, उपनिषद मधील, पुराणातील , किमान महाभारत रामायणातील दिवसाचा उल्लेख असणारे २-४ श्लोक उद्धृत करा, आम्हीही पडताळून पहातो. तुम्हाला तुमचा मुद्दा सिद्ध केल्याचा आनंद मिळेल अन् आम्हाला काहीतरी नवीन शिकल्याचा. अन्यथा, चालू दे तोंड पसरून रडणे.
लेखनप्रकार
रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची व्य्वस्था पुर्णपणे भारतीय कालगणना पद्धतीने जगाला दिलेली देणगी आहे. (या वाक्यावर अनेक मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या सपक लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर माझ्या अंगावर धावून येण्याचा धोका मला दिसतो आहे.) तर वार ही भारतीय देणगी नाही - असा आक्षेप येतो त्याकडे आधी पाहू या. सर्व साधारणपणे भारतात काहीच ज्ञान नव्हते आणि जे काही भारताला माहिती आहे ते सर्व भारतात बाहेरून आणले गेले असे साधारण या आक्षेपाचे स्वरूप असते. त्यासाठी रोमन संस्कृतीने इस १०० च्या आसपास 'वार' म्हणजे दिवसांची नावे भारताला दिली असा एक धादांत खोटा 'कयास स्वरूपाचा सिद्धांत' मांडला जातो.

पॅरिसमधील शिवचरित्र

मनो ·

मनो 12/11/2023 - 01:43
मूळ बखरीतील हा परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ते सांगतो : "त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. " "मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन" ही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. यातून महाराज कसे होते याबद्दल पेशवेकालीन लोकसमज कशी होती ते आपल्याला जाणवते.

कंजूस 12/11/2023 - 05:17
संतोष. तर यापुढे कुणी ना कुणी या कागदपत्रांचा मागोवा घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे. मोडी लिपीसाठी मोडीदर्पण या नियतकालिकेचे दरवर्षी चार अंक निघतात. मागच्या दिवाळीचा अंक चांगला होता. पहिले सहा लेख मोडी लिपीमध्ये आणि त्यांचेच मराठीमध्ये लिप्यंतरही दिले होते. शिवाय मोडी बाराखडी व काही शब्दही होते. एकूण मोडी शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त अंक होता. अंकात इतर लेख कोकणातील पर्यटनाविषयी मराठी बाळबोधीत होते. वाघनखे हे एक हत्यार म्हणून राजस्थानमधील महालांत क्वचित दिसते. Everyman's Searies या पर्यटनविषयक प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाने भारतात फक्त एकच पुस्तक काढले होते ते राजस्थानचे. ( ISBN 1-85715-887-3 ) भरपूर फोटो ,नकाशे आणि समग्र माहिती देणारे एवढे रंगीत पुस्तक अजून कुणाचे नसेल. तर यामध्ये वाघनखे आहेत.(Weaponry,page 200). पाच नखे एकाच बाजूला आहेत. पहिले बोट आणि करंगळीत सरकवण्यासाठी कड्या आहेत.

मराठी बखर वाचली. अतिशय छान लिहिलं आहे. वाचताना अतिशोयक्ती हा बखरींचा गुणधर्म टाळल्याचे जाणवते. आठ वर्षांच्या मुलास आपला इतिहास व्यवस्थित समजेल, याची काळजी घेतली आहे. म्हणजे मालोजी राजे - शहाजी राजे - शिवाजी महाराज - संभाजी महाराज - राजाराम महाराज - शाहू महाराज इथपर्यंत चढत्या क्रमाने विस्ताराने लिहिले आहे. (लेखन काळाच्या दृष्टीने) अलीकडील काळ (बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्यापासून अधिक विस्ताराने लिहिले आहे. संताजी घोरपडे यांचा अंत कसा झाला, हे पहिल्यांदा कळले. बाळाजी नानांनी कान्होजी आंग्रे यांना कसे वळवून घेतले, किल्ले सोडवून घेतले, हे देखील रोचक.

देशात परत आल्यास वाचक,अभ्यासक जरूर वाढतील.संदर्भ शोधकार्यात मदतगार ठरतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा इतीहास मराठी नेत्यांनी पुढाकार घेऊन आणला पाहीजे.

मनो 13/11/2023 - 07:31
ता. क. : Rajendra Dhume यांचे खूप आभार, त्यांनी बाबासाहेबांचा मूळ व्हिडिओ उपलग्ध करुन दिला. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये या कागदांचे महत्व इथे ऐका. https://youtu.be/AcngiBh_vXo?feature=shared

मनो 12/11/2023 - 01:43
मूळ बखरीतील हा परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ते सांगतो : "त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. " "मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन" ही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. यातून महाराज कसे होते याबद्दल पेशवेकालीन लोकसमज कशी होती ते आपल्याला जाणवते.

कंजूस 12/11/2023 - 05:17
संतोष. तर यापुढे कुणी ना कुणी या कागदपत्रांचा मागोवा घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे. मोडी लिपीसाठी मोडीदर्पण या नियतकालिकेचे दरवर्षी चार अंक निघतात. मागच्या दिवाळीचा अंक चांगला होता. पहिले सहा लेख मोडी लिपीमध्ये आणि त्यांचेच मराठीमध्ये लिप्यंतरही दिले होते. शिवाय मोडी बाराखडी व काही शब्दही होते. एकूण मोडी शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त अंक होता. अंकात इतर लेख कोकणातील पर्यटनाविषयी मराठी बाळबोधीत होते. वाघनखे हे एक हत्यार म्हणून राजस्थानमधील महालांत क्वचित दिसते. Everyman's Searies या पर्यटनविषयक प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाने भारतात फक्त एकच पुस्तक काढले होते ते राजस्थानचे. ( ISBN 1-85715-887-3 ) भरपूर फोटो ,नकाशे आणि समग्र माहिती देणारे एवढे रंगीत पुस्तक अजून कुणाचे नसेल. तर यामध्ये वाघनखे आहेत.(Weaponry,page 200). पाच नखे एकाच बाजूला आहेत. पहिले बोट आणि करंगळीत सरकवण्यासाठी कड्या आहेत.

मराठी बखर वाचली. अतिशय छान लिहिलं आहे. वाचताना अतिशोयक्ती हा बखरींचा गुणधर्म टाळल्याचे जाणवते. आठ वर्षांच्या मुलास आपला इतिहास व्यवस्थित समजेल, याची काळजी घेतली आहे. म्हणजे मालोजी राजे - शहाजी राजे - शिवाजी महाराज - संभाजी महाराज - राजाराम महाराज - शाहू महाराज इथपर्यंत चढत्या क्रमाने विस्ताराने लिहिले आहे. (लेखन काळाच्या दृष्टीने) अलीकडील काळ (बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्यापासून अधिक विस्ताराने लिहिले आहे. संताजी घोरपडे यांचा अंत कसा झाला, हे पहिल्यांदा कळले. बाळाजी नानांनी कान्होजी आंग्रे यांना कसे वळवून घेतले, किल्ले सोडवून घेतले, हे देखील रोचक.

देशात परत आल्यास वाचक,अभ्यासक जरूर वाढतील.संदर्भ शोधकार्यात मदतगार ठरतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा इतीहास मराठी नेत्यांनी पुढाकार घेऊन आणला पाहीजे.

मनो 13/11/2023 - 07:31
ता. क. : Rajendra Dhume यांचे खूप आभार, त्यांनी बाबासाहेबांचा मूळ व्हिडिओ उपलग्ध करुन दिला. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये या कागदांचे महत्व इथे ऐका. https://youtu.be/AcngiBh_vXo?feature=shared
लेखनप्रकार
गेले काही महिने इंग्लंडमधील तथाकथित वाघनखे चर्चेत आहेत. ती खरी की खोटी हा मुद्दा सोडला, तरी महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक अज्ञात वस्तू, हस्तलिखिते परदेशात आहेत, ही गोष्ट मात्र १००% सत्य आहे. अश्याच एका हस्तलिखिताचा हा शोध-वृत्तांत पुढे देतो आहे. या शोधाची सुरुवात झाली ती पुण्यात. दोन वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बाबासाहेबांच्या घरी राज ठाकरे इत्यादी अनेक मान्यवर येऊन गेले. शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि भारत संशोधक मंडळाच्या कार्यकारिणीचे सभासद बाबासाहेबांना भेटले.

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

पराग१२२६३ ·
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

देखणं चेन्नई सेंट्रल

पराग१२२६३ ·

चौथा कोनाडा 14/10/2023 - 14:38
सुंदर ओळख ! खरंच देखणं आहे चेन्नई सेण्ट्रल ! चेन्नईत डेप्युट असताना चेन्नई सेण्ट्रलला ५-७ वेळा जाणं झालंय पण वेळे अभावी तिथला परिसर निवांत पणे न्याहाळणे, भटकणे हे काही जाणे झाले नाही

चौथा कोनाडा 14/10/2023 - 14:38
सुंदर ओळख ! खरंच देखणं आहे चेन्नई सेण्ट्रल ! चेन्नईत डेप्युट असताना चेन्नई सेण्ट्रलला ५-७ वेळा जाणं झालंय पण वेळे अभावी तिथला परिसर निवांत पणे न्याहाळणे, भटकणे हे काही जाणे झाले नाही
MGR Chennai Central पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.

डिमुलां कॅमिली (Desmoulins camillie)

जयंत कुलकर्णी ·

प्रचेतस 11/10/2023 - 15:58
तुमचे लेख वाचणे म्हणजे पर्वणी असते. खूप दिवसांनी लिहिते झालात. फ्रेंच राज्यक्रांती फक्त शालेय पुस्तकातून वाचली होती. गिलोटीन म्हणजे शिक्षेचा अत्यंत भीषण प्रकार. क्रूसेड्सवरील लेखमालेची आतुरतेने वाट पाहात आहे.

सौंदाळा 11/10/2023 - 17:22
प्रचेतसशी सहमत इतिहासातील अशा ज्ञात गोष्टी म्हणजे हिमनगाचे टोक. दुर्दैवी, अद्भुत, रोमांचक, वीरश्रीपूर्ण सर्वच भावना. तुमच्या युध्दविषयक लेख, लेखमालांमधून पण वेळोवेळी हे दिसून आलेच आहे.

नठ्यारा 31/01/2024 - 00:07
फ्रेंच राज्यक्रांती हा तद्दन भिकारखोट प्रकार आहे. ती कसलीही क्रांतीबिंती नव्हती. रॉबेस्पियर हा पराकोटीचा हलकट इसम होता. त्यास फुकटचा डोक्यावर चढवून ठेवला आहे. हा केवळ खऱ्या देश्प्रेमीना एकत्र आणून त्यांचा विश्वासघात करण्यासाठी नेमलेला चमचा होता. त्याने ते घृणास्पद काम चोखपणे बजावलं. सुमारे १३० वर्षांनंतर ( इ.स. १९२० नंतर ) लेनिन व स्टालिन यांनीही अशीच कुकर्मे केली. बॅस्टिलचा तुरुंग फोडणे ही फ्रेंच राज्यक्रांतीतली एक महत्त्वाची घटना मानली जाते. तो फोडून म्हणे क्रांतीकारकांना मुक्त केलं. प्रत्यक्षात त्याच्यात फक्त सहासात बेवडे पब्लिक भरले होते. ही म्हणे क्रांतीची सुरुवात. बोंबला तिच्यायला. इ.स. १७८९ च्या या तथाकथित क्रांतीनंतर फ्रेंच सत्ता दुर्बल व खिळखिळी झाली. तिला सावरलं ते नंतर १७९९ साली नेपोलियनने. तो पण १८१२ साली मोडीत निघाला. तदोपरांत फ्रेंच सत्ता परत राजेशाहीच्या मार्गाने स्थैर्याकडे वळली. यांस बर्बन घरवापसी ( Bourbon Restoration ) म्हणतात. १७८९ च्या क्रांतीचा मागमूसही उरला नाही. युरोपातली फ्रेंच सत्ता दुर्बळ झाली. क्रांतीच्या बापाचं काय जातंय म्हणा. फ्रेंच क्रांतीच्या वेळेस चौथा जॉर्ज ब्रिटनचा राजा होता. त्याने बऱ्याच काड्या घातल्या म्हणतात. या क्रांतीमुळे इंग्रजांचं चांगलंच फावलं. आठवतंय पानिपतामुळे बंगालात इंग्रज कसे माजले ते? पुढे १८४० च्या आसपास व्हिक्टोरियन युग सुरू झालं आणि इंग्रज युरोपातले एक अतिप्रबळ सत्ताधारी बनले ( पहिल्या एलिझाबेथ पासून प्रबळ होतेच ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

वामन देशमुख 03/02/2024 - 18:22
प्रतिसादाच्या आशयाशी सहमत फ्रेंच राज्यक्रांती आणि एकूणच डाव्या विचारसरणीमागचे भयावह वास्तव जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकात अभिजित जोग यांनी यथार्थ वर्णित केले आहे. उत्सुकांना वाचण्याची शिफारस करतो.

In reply to by वामन देशमुख

या आधीचा प्रतिसाद फारच उथळ वाटला, पण तुम्ही जे लिहिले आहे त्याच्याशी १००% सहमत. या पुस्तकाचे शिर्षक खरोखरच समर्पक आहे... ही डावी वाळवी वेळेवर नष्ट केलीच पाहिजे यात शंका नाही...

In reply to by जयंत कुलकर्णी

नठ्यारा 04/02/2024 - 23:13
जयंत कुलकर्णी, माझा आधीचा प्रतिसाद तिच्यायला घंट्याची राज्यक्रांती हा तुम्हांस उथळ वाटला. ते बरोबर आहे. त्यामुळे सखोल प्रतिसाद लिहितो. फ्रेंच राज्यक्रांती ही स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांच्या प्रस्थापनाची हिरीरीने लढली गेलेली लढाई असल्याचं एक रोम्यांटिक चित्रं रंगवण्यात येतं. ही खरंतर इंग्रजांनी पसरवलेली भूलथाप आहे. फ्रेंच सत्ता खिळखिळी झाल्यामुळे इंग्रजांचं भलं झालं. ते सहजिकंच क्रांतीला डोक्यावर घेऊन नाचणार. आपण भारतीयांनी काहीतरी शिकायला हवं ना त्यातनं? काय शिकायचं बरं? फ्रान्स जावो खड्ड्यात पण क्रांती यशस्वी दिसली पाहिजे, असा जो दृष्टीकोन आहे तोच नेमका भारतातही जोपासला जात होता. तुकडेतुकडे होऊन भारत जावो खड्ड्यात पण अहिंसा जिंकली पाहिजे. हाच तो देशबुडवा दृष्टीकोन. तो म्ल मोडीत काढणं अत्यावश्यक वाटतं. माझं म्हणणं सविस्तर मांडण्याची संधी दिलीत याबद्दल आभारी आहे. :-) -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

नमस्कार! फ्रान्स खड्ड्यात जावो पण्.... हा दृष्टिकोन डाव्यांचा आहे. भारत खड्ड्यात जावो पण अहिंसा नामक भ्रम जपला पाहिजे हा दृष्टिकोन डाव्यांनी/आणि नंतर काँग्रेसने व समाजवाद्यांनी व तथाकथित उदारमतवाद्यांनी जपला, पण या सगळ्यामागे अस्तित्वाची लढाई लढणारे डावेच आहेत यात माझ्या मनात शंका नाही. ( WOKE) माझ्या पुस्तकात शेवटी चांगल्या हेतूंचा कसा बोजवारा उडतो हे मी लिहिले आहे. या पुस्तकात त्या घटनेत जे नायक होते, त्यांच्या चरित्रातून उलगडत जाणारा इतिहास लिहिला आहे. असो. जेव्हा हे पुस्त छापले जाईल तेव्हा जरूर वाचावे. (ही पुस्तकाची जाहिरात नाही. वाचले नाहीत तरी चालेल)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला वाटतं विचारसरणींचा समतोल बिघडला की ज्या विचारसरणीवर / किंवा समाजाच्या वर्गावर जुलूम झालाय ती विचारसरणी/वर्ग उफाळून विरोध करतो मला वाटते हे नैसर्गिक असावे.. जेव्हा सारासार विचार करणारा समाज या मंथनातून निर्माण होतो तेव्हाच शांतता प्रस्थापित होते. मी डाव्यांच्या विरोधात आहे पण फ्रेंच राज्यक्रांतीआधी फ्रान्समध्ये काय परिस्थिती होती हे आपल्या येथे कल्पना नाही. उदा. वरील एका प्रतिसादात रॉबेस्पियर हा एक हलकट माणूस होता असे विधान केले आहे. हे विधान त्या माणसाबद्दल पुरेसे वाचन केल्याने झाले आहे असे मला वाटते. त्याला " द अनकरप्टिबल '' या नावाने ओळखत आणि ते खरे आहे. असो. हे निसर्गचक्र आहे आणि जोपर्यंत स्वत: परमेश्र्वर समानता प्रस्थापित करत नाही तोपर्यंत फिरतच राहणार... अर्थात ही माझी मते आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या मतांचा आदर आहेच..

नठ्यारा 07/02/2024 - 19:59
जयंतराव, उथळ प्रतिसादाबद्दल पहिल्याप्रथम तुमची क्षमा मागतो. तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहित आहात, ही माहिती नजरेतून निसटली. ज्या विषयाचा तुम्ही इतक्या कसोशीने शोध घेत आहात त्याबद्दल मी उथळ भाषा टाळायला हवी होती. तर मला जे सांगायचंय ते वेगळ्या शब्दांत मांडतो. त्याचं काय आहे की फ्रेंच राज्यक्रांतीमुळे नेमका कोणाचा फायदा झाला हा एक प्रश्नंच आहे. तुम्ही वर जे म्हंटलंय की ... समाजाच्या वर्गावर जुलूम झालाय ती विचारसरणी/वर्ग उफाळून विरोध करतो ..., तर हाच न्याय क्रांतीलाही लावता येईल. मला म्हणायचंय की जर सोळाव्या लुई राजाच्या दडपशाहीपायी लोकं उफाळली असतील, तर क्रांतीनंतर सगळं आलबेल व्हायला हवं होतं. पण प्रत्यक्षात लोकं तितकीच, नव्हे अधिकंच वैतागली. त्यातनं पुढे नागरी युद्ध ( French Civil War ) सुरू झालं. क्रांतीच्या विरोधात उभारलेलं व्हेंडेईचं बंड ( War in the Vendée ) फारंच गाजलं. याचा अर्थ क्रांतीच्या नावाखाली अजालुक ( अत्याचार, जाळपोळ, लुटालूट, कत्तली ) चालल्या असाव्यात. या लेखावरनं ही शंका फारंच बळावते : https://www.worldhistory.org/War_in_the_Vendee/ तेव्हा, या क्रांतीची दुसरी बाजू काय आहे हे ही तपासून घ्यायला हवं. बाकी, रॉबेस्पियरने सदर पत्राच्या लेखकाचा विश्वासघात केलाय असं लेखक म्हणजे डिमुलां स्वत:च म्हणतोय. थोडी उकराउकार केली तर रॉबेस्पियरने असंख्य लोकांना ठार मारल्याचे दावे मिळाले. ऑक्सिजनचा शोध लावणारा शास्त्रज्ञ आंतवा लव्हॉईझिये याला गिलोटिनखाली रॉबेस्पियरनेच धाडला. मग रॉबेस्पियरची विश्वासार्हता काय राहिली? त्याला अस्खलनशील, अभ्रष्ट वगैरे मानतात ते त्याच्या कंपूतले लोक आहेत. त्यांनाही जीवाची भीती आहेच. रॉबेस्पियरला जर क्रांतिकारक मानलं तर नक्षलवादीही क्रांतिकारक धरावेत का? क्रांती म्हणजे नेमकं काय आणि त्यातनं पुढे नागरी युद्ध का सुरु होतं, हे दोन कळीचे प्रश्न आहेत. त्यांचा वेध घेता आला तर पहा, म्हणून सुचवेन. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अरेच्या क्षमा कसली मागताय?.. मला एवढेच म्हणायचे आहे की कुठल्याही तत्त्वाचा अतिरेक झाला की त्याची जागा दुसरे तत्त्व घेते.. यात जो संघर्ष उडतो त्यात या असल्या गोष्टी घडतात. मी डिव्हाईन कॉमेडीचे भाषांतर केले आहे.. त्याची कथा आपल्याला माहीत असेलच.. त्यात सारासार विचार न करणाऱ्या माणसांना नरकात जागा दिली आहे. उरला प्रश्र्न दुसरी बाजू.. माझ्या पुस्तकात राजेशाहीने केलेले सामान्य जनतेवर केलेले अत्याचार, सामान्य माणसांनी सामान्य माणसांवर केलेले अत्याचार, क्रांतीकारकांवर केलेले अत्याचार, क्रांतिकारकांनी केलेले अत्याचार इ इ सगळ्याचा वेध घेतला आहे. (त्यात व्हेन्डीचे अत्याचारही आहेत..:-) असो.. धन्यवाद !

In reply to by जयंत कुलकर्णी

नठ्यारा 08/02/2024 - 22:46
जयंतराव, तुम्ही ज्यास तत्त्वाचा अतिरेक म्हणता ते तसं नसून मुद्दम घडवून आलेलं कपट कारस्थान वाटतं. अन्यथा क्रांतीमुळे नागरी युद्ध भडकण्याचं कारण काय मुळातून? -नाठाळ नठ्या

प्रचेतस 11/10/2023 - 15:58
तुमचे लेख वाचणे म्हणजे पर्वणी असते. खूप दिवसांनी लिहिते झालात. फ्रेंच राज्यक्रांती फक्त शालेय पुस्तकातून वाचली होती. गिलोटीन म्हणजे शिक्षेचा अत्यंत भीषण प्रकार. क्रूसेड्सवरील लेखमालेची आतुरतेने वाट पाहात आहे.

सौंदाळा 11/10/2023 - 17:22
प्रचेतसशी सहमत इतिहासातील अशा ज्ञात गोष्टी म्हणजे हिमनगाचे टोक. दुर्दैवी, अद्भुत, रोमांचक, वीरश्रीपूर्ण सर्वच भावना. तुमच्या युध्दविषयक लेख, लेखमालांमधून पण वेळोवेळी हे दिसून आलेच आहे.

नठ्यारा 31/01/2024 - 00:07
फ्रेंच राज्यक्रांती हा तद्दन भिकारखोट प्रकार आहे. ती कसलीही क्रांतीबिंती नव्हती. रॉबेस्पियर हा पराकोटीचा हलकट इसम होता. त्यास फुकटचा डोक्यावर चढवून ठेवला आहे. हा केवळ खऱ्या देश्प्रेमीना एकत्र आणून त्यांचा विश्वासघात करण्यासाठी नेमलेला चमचा होता. त्याने ते घृणास्पद काम चोखपणे बजावलं. सुमारे १३० वर्षांनंतर ( इ.स. १९२० नंतर ) लेनिन व स्टालिन यांनीही अशीच कुकर्मे केली. बॅस्टिलचा तुरुंग फोडणे ही फ्रेंच राज्यक्रांतीतली एक महत्त्वाची घटना मानली जाते. तो फोडून म्हणे क्रांतीकारकांना मुक्त केलं. प्रत्यक्षात त्याच्यात फक्त सहासात बेवडे पब्लिक भरले होते. ही म्हणे क्रांतीची सुरुवात. बोंबला तिच्यायला. इ.स. १७८९ च्या या तथाकथित क्रांतीनंतर फ्रेंच सत्ता दुर्बल व खिळखिळी झाली. तिला सावरलं ते नंतर १७९९ साली नेपोलियनने. तो पण १८१२ साली मोडीत निघाला. तदोपरांत फ्रेंच सत्ता परत राजेशाहीच्या मार्गाने स्थैर्याकडे वळली. यांस बर्बन घरवापसी ( Bourbon Restoration ) म्हणतात. १७८९ च्या क्रांतीचा मागमूसही उरला नाही. युरोपातली फ्रेंच सत्ता दुर्बळ झाली. क्रांतीच्या बापाचं काय जातंय म्हणा. फ्रेंच क्रांतीच्या वेळेस चौथा जॉर्ज ब्रिटनचा राजा होता. त्याने बऱ्याच काड्या घातल्या म्हणतात. या क्रांतीमुळे इंग्रजांचं चांगलंच फावलं. आठवतंय पानिपतामुळे बंगालात इंग्रज कसे माजले ते? पुढे १८४० च्या आसपास व्हिक्टोरियन युग सुरू झालं आणि इंग्रज युरोपातले एक अतिप्रबळ सत्ताधारी बनले ( पहिल्या एलिझाबेथ पासून प्रबळ होतेच ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

वामन देशमुख 03/02/2024 - 18:22
प्रतिसादाच्या आशयाशी सहमत फ्रेंच राज्यक्रांती आणि एकूणच डाव्या विचारसरणीमागचे भयावह वास्तव जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकात अभिजित जोग यांनी यथार्थ वर्णित केले आहे. उत्सुकांना वाचण्याची शिफारस करतो.

In reply to by वामन देशमुख

या आधीचा प्रतिसाद फारच उथळ वाटला, पण तुम्ही जे लिहिले आहे त्याच्याशी १००% सहमत. या पुस्तकाचे शिर्षक खरोखरच समर्पक आहे... ही डावी वाळवी वेळेवर नष्ट केलीच पाहिजे यात शंका नाही...

In reply to by जयंत कुलकर्णी

नठ्यारा 04/02/2024 - 23:13
जयंत कुलकर्णी, माझा आधीचा प्रतिसाद तिच्यायला घंट्याची राज्यक्रांती हा तुम्हांस उथळ वाटला. ते बरोबर आहे. त्यामुळे सखोल प्रतिसाद लिहितो. फ्रेंच राज्यक्रांती ही स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांच्या प्रस्थापनाची हिरीरीने लढली गेलेली लढाई असल्याचं एक रोम्यांटिक चित्रं रंगवण्यात येतं. ही खरंतर इंग्रजांनी पसरवलेली भूलथाप आहे. फ्रेंच सत्ता खिळखिळी झाल्यामुळे इंग्रजांचं भलं झालं. ते सहजिकंच क्रांतीला डोक्यावर घेऊन नाचणार. आपण भारतीयांनी काहीतरी शिकायला हवं ना त्यातनं? काय शिकायचं बरं? फ्रान्स जावो खड्ड्यात पण क्रांती यशस्वी दिसली पाहिजे, असा जो दृष्टीकोन आहे तोच नेमका भारतातही जोपासला जात होता. तुकडेतुकडे होऊन भारत जावो खड्ड्यात पण अहिंसा जिंकली पाहिजे. हाच तो देशबुडवा दृष्टीकोन. तो म्ल मोडीत काढणं अत्यावश्यक वाटतं. माझं म्हणणं सविस्तर मांडण्याची संधी दिलीत याबद्दल आभारी आहे. :-) -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

नमस्कार! फ्रान्स खड्ड्यात जावो पण्.... हा दृष्टिकोन डाव्यांचा आहे. भारत खड्ड्यात जावो पण अहिंसा नामक भ्रम जपला पाहिजे हा दृष्टिकोन डाव्यांनी/आणि नंतर काँग्रेसने व समाजवाद्यांनी व तथाकथित उदारमतवाद्यांनी जपला, पण या सगळ्यामागे अस्तित्वाची लढाई लढणारे डावेच आहेत यात माझ्या मनात शंका नाही. ( WOKE) माझ्या पुस्तकात शेवटी चांगल्या हेतूंचा कसा बोजवारा उडतो हे मी लिहिले आहे. या पुस्तकात त्या घटनेत जे नायक होते, त्यांच्या चरित्रातून उलगडत जाणारा इतिहास लिहिला आहे. असो. जेव्हा हे पुस्त छापले जाईल तेव्हा जरूर वाचावे. (ही पुस्तकाची जाहिरात नाही. वाचले नाहीत तरी चालेल)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला वाटतं विचारसरणींचा समतोल बिघडला की ज्या विचारसरणीवर / किंवा समाजाच्या वर्गावर जुलूम झालाय ती विचारसरणी/वर्ग उफाळून विरोध करतो मला वाटते हे नैसर्गिक असावे.. जेव्हा सारासार विचार करणारा समाज या मंथनातून निर्माण होतो तेव्हाच शांतता प्रस्थापित होते. मी डाव्यांच्या विरोधात आहे पण फ्रेंच राज्यक्रांतीआधी फ्रान्समध्ये काय परिस्थिती होती हे आपल्या येथे कल्पना नाही. उदा. वरील एका प्रतिसादात रॉबेस्पियर हा एक हलकट माणूस होता असे विधान केले आहे. हे विधान त्या माणसाबद्दल पुरेसे वाचन केल्याने झाले आहे असे मला वाटते. त्याला " द अनकरप्टिबल '' या नावाने ओळखत आणि ते खरे आहे. असो. हे निसर्गचक्र आहे आणि जोपर्यंत स्वत: परमेश्र्वर समानता प्रस्थापित करत नाही तोपर्यंत फिरतच राहणार... अर्थात ही माझी मते आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या मतांचा आदर आहेच..

नठ्यारा 07/02/2024 - 19:59
जयंतराव, उथळ प्रतिसादाबद्दल पहिल्याप्रथम तुमची क्षमा मागतो. तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहित आहात, ही माहिती नजरेतून निसटली. ज्या विषयाचा तुम्ही इतक्या कसोशीने शोध घेत आहात त्याबद्दल मी उथळ भाषा टाळायला हवी होती. तर मला जे सांगायचंय ते वेगळ्या शब्दांत मांडतो. त्याचं काय आहे की फ्रेंच राज्यक्रांतीमुळे नेमका कोणाचा फायदा झाला हा एक प्रश्नंच आहे. तुम्ही वर जे म्हंटलंय की ... समाजाच्या वर्गावर जुलूम झालाय ती विचारसरणी/वर्ग उफाळून विरोध करतो ..., तर हाच न्याय क्रांतीलाही लावता येईल. मला म्हणायचंय की जर सोळाव्या लुई राजाच्या दडपशाहीपायी लोकं उफाळली असतील, तर क्रांतीनंतर सगळं आलबेल व्हायला हवं होतं. पण प्रत्यक्षात लोकं तितकीच, नव्हे अधिकंच वैतागली. त्यातनं पुढे नागरी युद्ध ( French Civil War ) सुरू झालं. क्रांतीच्या विरोधात उभारलेलं व्हेंडेईचं बंड ( War in the Vendée ) फारंच गाजलं. याचा अर्थ क्रांतीच्या नावाखाली अजालुक ( अत्याचार, जाळपोळ, लुटालूट, कत्तली ) चालल्या असाव्यात. या लेखावरनं ही शंका फारंच बळावते : https://www.worldhistory.org/War_in_the_Vendee/ तेव्हा, या क्रांतीची दुसरी बाजू काय आहे हे ही तपासून घ्यायला हवं. बाकी, रॉबेस्पियरने सदर पत्राच्या लेखकाचा विश्वासघात केलाय असं लेखक म्हणजे डिमुलां स्वत:च म्हणतोय. थोडी उकराउकार केली तर रॉबेस्पियरने असंख्य लोकांना ठार मारल्याचे दावे मिळाले. ऑक्सिजनचा शोध लावणारा शास्त्रज्ञ आंतवा लव्हॉईझिये याला गिलोटिनखाली रॉबेस्पियरनेच धाडला. मग रॉबेस्पियरची विश्वासार्हता काय राहिली? त्याला अस्खलनशील, अभ्रष्ट वगैरे मानतात ते त्याच्या कंपूतले लोक आहेत. त्यांनाही जीवाची भीती आहेच. रॉबेस्पियरला जर क्रांतिकारक मानलं तर नक्षलवादीही क्रांतिकारक धरावेत का? क्रांती म्हणजे नेमकं काय आणि त्यातनं पुढे नागरी युद्ध का सुरु होतं, हे दोन कळीचे प्रश्न आहेत. त्यांचा वेध घेता आला तर पहा, म्हणून सुचवेन. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अरेच्या क्षमा कसली मागताय?.. मला एवढेच म्हणायचे आहे की कुठल्याही तत्त्वाचा अतिरेक झाला की त्याची जागा दुसरे तत्त्व घेते.. यात जो संघर्ष उडतो त्यात या असल्या गोष्टी घडतात. मी डिव्हाईन कॉमेडीचे भाषांतर केले आहे.. त्याची कथा आपल्याला माहीत असेलच.. त्यात सारासार विचार न करणाऱ्या माणसांना नरकात जागा दिली आहे. उरला प्रश्र्न दुसरी बाजू.. माझ्या पुस्तकात राजेशाहीने केलेले सामान्य जनतेवर केलेले अत्याचार, सामान्य माणसांनी सामान्य माणसांवर केलेले अत्याचार, क्रांतीकारकांवर केलेले अत्याचार, क्रांतिकारकांनी केलेले अत्याचार इ इ सगळ्याचा वेध घेतला आहे. (त्यात व्हेन्डीचे अत्याचारही आहेत..:-) असो.. धन्यवाद !

In reply to by जयंत कुलकर्णी

नठ्यारा 08/02/2024 - 22:46
जयंतराव, तुम्ही ज्यास तत्त्वाचा अतिरेक म्हणता ते तसं नसून मुद्दम घडवून आलेलं कपट कारस्थान वाटतं. अन्यथा क्रांतीमुळे नागरी युद्ध भडकण्याचं कारण काय मुळातून? -नाठाळ नठ्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार! सध्या फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहितोय. जगात घडून गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या घटनेने आपण अचंबित होतो. त्या काळातील माणसे, त्यांचे राजकारण, त्यांची त्यांच्या तत्त्वांवरील निष्ठा हे वाचल्यास सध्याच्या राजकारण्यांशी त्यांची तुलना होणे अपरिहार्य आहे. असो. ती तुलना मी मनातल्या मनात रोज करतोच. पण त्या क्रांतीतील तीन चार व्यक्‍तिरेखा मला अत्यंत आवडतात कारण जेव्हा ती क्रांती रक्‍तरंजित झाली तेव्हा ते मोठ्या धैर्याने त्या दहशतीच्याविरुद्ध उभे राहिले. त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्राणही गमावले... तो इतिहास खरोखरच विस्मयकारक आहे...

२४० वर्षांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

पराग१२२६३ ·

In reply to by अहिरावण

पराग१२२६३ 14/09/2023 - 15:34
प्राचीन काळापासून भारतातील राज्यांचे परकीय राज्यांशी व्यवहार होत होते. शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळात सुमंताकडे परराज्य व्यवहाराची जबाबदारी असे. पण आजच्या आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं मूळ ईस्ट इंडिया कंपनीच्या परराष्ट्र मंत्रालयात मानलं जातं.

In reply to by पराग१२२६३

अहिरावण 15/09/2023 - 10:31
चुकीची मान्यता आहे ती. ज्या गोष्टींचे ब्रिटीशांना क्रेडीट द्यायचे ते जरुर देऊ पण हे चुकीचे क्रेडीट आहे. सुधारणा आवश्यक आहे.

In reply to by अहिरावण

विजुभाऊ 14/09/2023 - 19:52
वेगळ्या पारराष्ट्र मंत्रालयाची संकल्पना कौटिल्याने मांडलेली होती. शिवाजी महाराजांच्या अष्ट्प्रधानांधे परराष्ट्र व्यवहारासंबंधी वेगळा प्रधान होता. संभाजी महाराजानी राजव्यवहारकोष तयार करून घेतला होता. दुर्दैवाने आपल्या इतिहासात ब्रिटिशांनी राजव्यवहार आणला असेच शिकवले जाते. मुघलांना व्यवहार म्हणजे लुलूट आणि दगाबाजी हेच माहीत होते. खरेतर त्यांच्या इतके विषेशतः औरंग्या इतके भारताचे नुकसान इतर कोणत्याही लुटारूने केले नाही.

सातवाहन कालापासून किंबहुना आगोदर पासूनच परराष्ट्र व्यवहार चालू होते. तेर ते तगर या पुस्तकात धाराशिव व रोम यांचे संबंध होते असे वाचल्याचे आठवतेय.

In reply to by अहिरावण

पराग१२२६३ 14/09/2023 - 15:34
प्राचीन काळापासून भारतातील राज्यांचे परकीय राज्यांशी व्यवहार होत होते. शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळात सुमंताकडे परराज्य व्यवहाराची जबाबदारी असे. पण आजच्या आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं मूळ ईस्ट इंडिया कंपनीच्या परराष्ट्र मंत्रालयात मानलं जातं.

In reply to by पराग१२२६३

अहिरावण 15/09/2023 - 10:31
चुकीची मान्यता आहे ती. ज्या गोष्टींचे ब्रिटीशांना क्रेडीट द्यायचे ते जरुर देऊ पण हे चुकीचे क्रेडीट आहे. सुधारणा आवश्यक आहे.

In reply to by अहिरावण

विजुभाऊ 14/09/2023 - 19:52
वेगळ्या पारराष्ट्र मंत्रालयाची संकल्पना कौटिल्याने मांडलेली होती. शिवाजी महाराजांच्या अष्ट्प्रधानांधे परराष्ट्र व्यवहारासंबंधी वेगळा प्रधान होता. संभाजी महाराजानी राजव्यवहारकोष तयार करून घेतला होता. दुर्दैवाने आपल्या इतिहासात ब्रिटिशांनी राजव्यवहार आणला असेच शिकवले जाते. मुघलांना व्यवहार म्हणजे लुलूट आणि दगाबाजी हेच माहीत होते. खरेतर त्यांच्या इतके विषेशतः औरंग्या इतके भारताचे नुकसान इतर कोणत्याही लुटारूने केले नाही.

सातवाहन कालापासून किंबहुना आगोदर पासूनच परराष्ट्र व्यवहार चालू होते. तेर ते तगर या पुस्तकात धाराशिव व रोम यांचे संबंध होते असे वाचल्याचे आठवतेय.
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३ ·

सौंदाळा 06/09/2023 - 20:37
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. यातील काहीच माहित नव्हते. 'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती

सौंदाळा 06/09/2023 - 20:37
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. यातील काहीच माहित नव्हते. 'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती
PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

वार्तालाप: नेणतां वैरी जिंकती

विवेकपटाईत ·

लिओ 01/09/2023 - 18:42
छान लिहिले आहे. एक प्रश्न राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हि ओवी फक्त नेहेरुंनीच आचरणात घेण्याची गरज होती काय ? समर्थांची ही ओवी फक्त नेहेरुंसाठी लिहिलि होती का ??

Nitin Palkar 01/09/2023 - 19:03
मोजक्या शब्दात चांगला आशय मंडला आहे. समर्थ रामदासांचे कार्य महानच आहे. नेहरूंच्या अनेक चुकांपैकी एकच तुम्ही दाखवली आहे. अनेकांना ते सलू शकेल. राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हे सदा सर्वदा सत्य आहे.

अहिरावण 01/09/2023 - 19:09
आता पुढील ओव्यांचे प्रवचन करतांना खालिल क्रमाने नेते घ्या, नेहरुंना सध्या विश्रांती द्या बोस शास्री पटेल नंदा इंदिरा गांधी संजय गांधी रा़जीव गांधी चंद्रशेखर वीपीसिंग नरसिंह राव अटल बिहारी सोनीया गांधी मनमोहन सिंग नरेंद्र मोदी आणि हो, विश्लेषण करतांना यांच्या चुकाच दाखवा. नाहीतर सोईने त्यांचे गोडवे गाल. नसेल जमत तर निदान यांच्या चुका दाखवा सावरकर गांधी इतकेही नसेल जमत तर परखडपणे तुमची स्वतःची चुक दाखवा बघु दासबोध किती उमजला आहे तुम्हाला ते

सर टोबी 01/09/2023 - 20:22
लुबाडला गेलेला देश. जिथे अन्नधान्य, अवजारं, वाहतुकीची साधनं या सर्वांची वानवा होती. भरीला शिक्षण, आरोग्य, सिंचन, दळणवळण या महत्वाच्या प्राथमिकता होत्या. अशा खचलेल्या देशाची धुरा वाहणाऱ्यांनी कधीही दुसऱ्याला किंवा परिस्थीला दोष दिला नाही. त्या उलट, एक प्रबळ लष्कर असतांना चीनच्या नव्या आक्रमकतेपुढे मौनात गेलेल्या सध्याच्या नेतृत्वाची काहीही करून री ओढायची असा खाक्या आहे. दासबोधाचं निरूपण फक्त निमित्त आहे.

भागो 02/09/2023 - 08:51
दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी>>> कोण हे नेहरू? माझ्या माहितीप्रमाणे "नेहरू" ही एक प्रधान खुंटी आहे. कुणीही यावे टपली मारून जावे. कुणीही यावे नि त्यावर काहीही लटकावून जावे. नेहरू नसते तर ह्या देशाचे काय झाले असते? जाता जाता दासबोधाचे हिंदी/गुजराती भाषांतर आहेका? नसेल तर मग मोठ्या लोकांचे काही खरे नाही रे बाबा.

In reply to by भागो

नेहरूंहद्दल ”जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” असे म्हणावेसे वाटते. वाईट काळात ज्याने घर सावरलं, श्रीमंती आणली , त्यालाच नंतरच्या नालायक पिढ्या शिव्या देतात अशी अवस्था नेहरूंची झालीय. पण ह्यामूळे नेहरूंचे महत्व आजीबात कमी होत नाही. नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. मोतीलाल नेहरूंनी कोंग्रेसला भरमसाठ पैसा लावला होता, इंदिरा गांधींबद्दल तर काय वर्णावे? वाघीन होती भारताची. असो. कूठे राजा भोज…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 04/09/2023 - 13:43
नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. आणि आपण त्यांची गुलामगिरी आणि लोकशाही च्या नावाखाली आपण त्यांची घराणेशाही चालू दयायची असेच ना

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 04/09/2023 - 10:10
जिथे तुम्ही विषयाला धरुन लिहित नाही तिथे प्रतिसाद कसे काय येतील? तुम्ही राजनीती आणता आम्ही नाही

चित्रगुप्त 02/09/2023 - 21:51
अज्ञानात असणारे 'सुख'(असलेच तर) तोपावेतोच टिकून रहाते, जोवर तुमच्याहून अधिक ज्ञानी- जाणकार येऊन तुमच्या डोक्यावर बसत नाही. त्या त्या काळी उपलब्ध असलेले 'तंत्रज्ञान' ज्यांनी जाणतेपणे वापरले (मुळात असे तंत्रज्ञान विकसित केले-) त्यांचा विजय होत असल्याची उदाहरणे इतिहासात विपुल मिळतात. समर्थांनी केलेल्या छ्त्रपतींच्या वर्णनात आलेले 'जाणता राजा' हे विशेषण महत्वाचे आहे: निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

लिओ 01/09/2023 - 18:42
छान लिहिले आहे. एक प्रश्न राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हि ओवी फक्त नेहेरुंनीच आचरणात घेण्याची गरज होती काय ? समर्थांची ही ओवी फक्त नेहेरुंसाठी लिहिलि होती का ??

Nitin Palkar 01/09/2023 - 19:03
मोजक्या शब्दात चांगला आशय मंडला आहे. समर्थ रामदासांचे कार्य महानच आहे. नेहरूंच्या अनेक चुकांपैकी एकच तुम्ही दाखवली आहे. अनेकांना ते सलू शकेल. राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हे सदा सर्वदा सत्य आहे.

अहिरावण 01/09/2023 - 19:09
आता पुढील ओव्यांचे प्रवचन करतांना खालिल क्रमाने नेते घ्या, नेहरुंना सध्या विश्रांती द्या बोस शास्री पटेल नंदा इंदिरा गांधी संजय गांधी रा़जीव गांधी चंद्रशेखर वीपीसिंग नरसिंह राव अटल बिहारी सोनीया गांधी मनमोहन सिंग नरेंद्र मोदी आणि हो, विश्लेषण करतांना यांच्या चुकाच दाखवा. नाहीतर सोईने त्यांचे गोडवे गाल. नसेल जमत तर निदान यांच्या चुका दाखवा सावरकर गांधी इतकेही नसेल जमत तर परखडपणे तुमची स्वतःची चुक दाखवा बघु दासबोध किती उमजला आहे तुम्हाला ते

सर टोबी 01/09/2023 - 20:22
लुबाडला गेलेला देश. जिथे अन्नधान्य, अवजारं, वाहतुकीची साधनं या सर्वांची वानवा होती. भरीला शिक्षण, आरोग्य, सिंचन, दळणवळण या महत्वाच्या प्राथमिकता होत्या. अशा खचलेल्या देशाची धुरा वाहणाऱ्यांनी कधीही दुसऱ्याला किंवा परिस्थीला दोष दिला नाही. त्या उलट, एक प्रबळ लष्कर असतांना चीनच्या नव्या आक्रमकतेपुढे मौनात गेलेल्या सध्याच्या नेतृत्वाची काहीही करून री ओढायची असा खाक्या आहे. दासबोधाचं निरूपण फक्त निमित्त आहे.

भागो 02/09/2023 - 08:51
दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी>>> कोण हे नेहरू? माझ्या माहितीप्रमाणे "नेहरू" ही एक प्रधान खुंटी आहे. कुणीही यावे टपली मारून जावे. कुणीही यावे नि त्यावर काहीही लटकावून जावे. नेहरू नसते तर ह्या देशाचे काय झाले असते? जाता जाता दासबोधाचे हिंदी/गुजराती भाषांतर आहेका? नसेल तर मग मोठ्या लोकांचे काही खरे नाही रे बाबा.

In reply to by भागो

नेहरूंहद्दल ”जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” असे म्हणावेसे वाटते. वाईट काळात ज्याने घर सावरलं, श्रीमंती आणली , त्यालाच नंतरच्या नालायक पिढ्या शिव्या देतात अशी अवस्था नेहरूंची झालीय. पण ह्यामूळे नेहरूंचे महत्व आजीबात कमी होत नाही. नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. मोतीलाल नेहरूंनी कोंग्रेसला भरमसाठ पैसा लावला होता, इंदिरा गांधींबद्दल तर काय वर्णावे? वाघीन होती भारताची. असो. कूठे राजा भोज…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 04/09/2023 - 13:43
नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. आणि आपण त्यांची गुलामगिरी आणि लोकशाही च्या नावाखाली आपण त्यांची घराणेशाही चालू दयायची असेच ना

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 04/09/2023 - 10:10
जिथे तुम्ही विषयाला धरुन लिहित नाही तिथे प्रतिसाद कसे काय येतील? तुम्ही राजनीती आणता आम्ही नाही

चित्रगुप्त 02/09/2023 - 21:51
अज्ञानात असणारे 'सुख'(असलेच तर) तोपावेतोच टिकून रहाते, जोवर तुमच्याहून अधिक ज्ञानी- जाणकार येऊन तुमच्या डोक्यावर बसत नाही. त्या त्या काळी उपलब्ध असलेले 'तंत्रज्ञान' ज्यांनी जाणतेपणे वापरले (मुळात असे तंत्रज्ञान विकसित केले-) त्यांचा विजय होत असल्याची उदाहरणे इतिहासात विपुल मिळतात. समर्थांनी केलेल्या छ्त्रपतींच्या वर्णनात आलेले 'जाणता राजा' हे विशेषण महत्वाचे आहे: निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥
लेखनविषय:
लेखनप्रकार
नेणतां वैरी जिंकती. नेणतां अपाई पडती. नेणतां संहारती घडती. जीवनाश. समर्थ म्हणतात नेणते पणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो. या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो. समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे.