(शशक-एक पायाचा कावळा)
फांदिवरी बसून
तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा
हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली
परी न तो बधला
छळावयास तुम्हां
येईन फिरून वदला
पोटात कोकताना
कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक,
म्हणाले......
मिटवून हिशोब टाक
फांदिवरी बसून
तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा
हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली
परी न तो बधला
छळावयास तुम्हां
येईन फिरून वदला
पोटात कोकताना
कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक,
म्हणाले......
मिटवून हिशोब टाक
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात मनुवादी ब्राह्मणी अर्थव्यवस्था ही गरिबांच्या शोषणावर उभी होती. ब्राह्मणी मानसिकतेने ग्रस्त उद्योगपतींनी मजुरांचे श्रम, त्यांचे हक्क आणि त्यांची माणुसकी यांची पायमल्ली केली. त्या काळात बॉलीवूडनेही जनतेच्या बाजूने भूमिका घेतली. चित्रपटांमधून शोषणाविरुद्ध आवाज उठवला. मिल मालक 'प्राण' शोषण करणार्या ब्राह्मणी अर्थव्यवस्थेचे प्रतीक होते—जो मजुरांच्या घामातून आपला वैभव उभारायचा.
डिस्क्लेमर-: सदर लेख केवळ मनोरंजनार्थ आहे. वेळ भरपूर,रिकामा मेंदू,स्वतःशी वाचाळ पंचाळशी करताना प्रसवलेल्या विचारातून प्रसूत झालेला आहे.याचा मृत अथवा जीवीत व्यक्तीशी,स्थळाशी,कल्पनां यांच्याशी काही एक संबंध नाही. तसे भासल्यास निव्वळ योगायोग समजावा.कृबुला विचारून बघू नये,विचारल्यास मिळालेल्या उत्तराचे उत्तर दायित्व प्रश्न कर्त्यावर असेल.आमच्या लेखी ए आय म्हंजे,
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची क्षमा मागून.
रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |
हॉर्नचे आवाज आणि धूर ||१||
"रोड रेज" चे जीवा होतसे आघात |
तरी दामटतो आपुले वाहन नित्य ||२||
मी म्हणे ह्या प्रदूषणाचिया बळे |
अवघ्यांचे काळें केले तोंड ||३||
विडंबन
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
निघती ठसके जोराचे
तशात घाबरल्या पोरांचे
कुजबुजही थांबली पोरींची
पाचावर बसली सगळ्यांची
ऐशा रमलेल्या त्या स्थानी..
बोचती सरांचे ते कटाक्ष
संपले, गालावर हासू मावळले
होता हृदयाची दो शकले
बोटातुन सिगरेट ओघळले
घाली फुंकर हलकेच कुणी..
सर आले दुरूनी
सर आले दुरूनी
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.
एक ढू आय डी द्या मज आणून
शिंपीन तो मी स्व प्रतिसादाने
खोडून काढीन सारी वचने
सार्या धाग्यांची वाट मी लावीन
टिका टिप्पणी,चाले चौफेर लेखणी
बृहस्पती,वाचस्पती,बाजीसम या रणी
सारे ज्ञात मज,स्व प्रज्ञेचा मी धणी
भल्या भल्यांची वाट लावतो, क्षणोक्षणी
जर्द पिवळी विजार, तीतून
द्वार ठोठावत आलेले
आतड्यांतुनी साठलेले
पोटी आवळून धरलेले
संधी मिळाली नाही तेंव्हा
आडोशाला बसण्याची
जे त्याज्य ते त्याग करूनी
मोकलाया दाही दिश्यांची
आधी असं झालं नाही
कधी पिवळं झालं नाही
त्या कातर वेळी मात्र
रोखून धरणं झालं नाही
मग जनाची ना मनाची
कसली लाज कुणाची
निसर्ग-हाकेला ओ देऊन
क्लांत शांत होण्याची
- (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्
चार भिडू डावे
उजवेही चार
कुंपणाच्या वर
दोन भिडू
भिडू भिडतात
त्वेषे परस्परा
मौज ही इतरा
फुकटची
राजकारणाच्या
व्यतिरिक्त काही
घडतची नाही
देशात ह्या
ऐसा आविर्भाव
भिडू बाळगती
आता झाले अती
हौस फिटे
बिहार मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, " जब तक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा हमारा लालू". ही आहे समोसेची महत्ता. माझ्या आयुष्याचा सुरवातीचा कालखंड जुन्या दिल्लीत गेला. जुन्या दिल्लीत अनेक बाजारांची नावे त्या बाजारात मिळणार्या वस्तूंवर आहे. आम्ही गली तेलियान मधून खाण्याचे तेल विकत घ्यायचो. बतासे वाली गल्लीत साखर, बतासे, गुड, मुरब्बा ते चॉकलेट पर्यन्त गोड पदार्थ मिळायचे. तसेच एका गल्लीचे नाव समोसे वाली गल्ली आहे. या गल्लीत विभिन्न प्रकारचे समोसे मिळतात. त्यात मुगाच्या आणि चण्याच्या डाळीचे समोसे सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. हे समोसे काही महीने टिकतात.