मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्ट्रिंग थिअरीचा पाया

अनन्त्_यात्री ·

In reply to by अनन्त्_यात्री

चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 17:15
आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले. -- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)

स्वधर्म Fri, 08/29/2025 - 16:46
"जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? हे सॉलीड आहे :-)

सोत्रि गुरुवार, 09/04/2025 - 11:15
हा हा हा ... हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे ! - (स्वांत-सुखी) सोकाजी

In reply to by अनन्त्_यात्री

चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 17:15
आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले. -- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)

स्वधर्म Fri, 08/29/2025 - 16:46
"जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? हे सॉलीड आहे :-)

सोत्रि गुरुवार, 09/04/2025 - 11:15
हा हा हा ... हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे ! - (स्वांत-सुखी) सोकाजी
लेखनविषय:
काव्यरस
(FunU)वादी लेखनाची होता उर्मी अनावर ब्रह्मलीन असूनही प्रकटू का मिपावर? बादरायणी संबंध येतील का माझ्या कामी? (एन्ट्रॉपीचे ॐकाराशी करू कलम कसे मी?) "जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? ओव्या, अभंग, सूक्तांची लेखा जोडू का शेपटी? डिस्क्लेमर टाकावा का स्वांत:सुखाचा शेवटी? असिधारा व्रत माझे (FunU)वादी लेखनाचे जरी गायबलो सध्या लोड नका घेऊ त्याचे ! एक शिक्रेट सांगतो कोणालाही सांगू नका (FunU)वादी लेखनाचा माझा आ-मिपांत* ठेका ! ~~~~~~~~~~~~ *आ-मिपांत= मिपाच्या अंतापर्यंत प्रेमळ सूचना: मुमुक्षूंनी कृपया हलके घ्यावे :)))

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार ·

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 10:07
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 15:44
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि Tue, 06/17/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार Sun, 06/22/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 10:07
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 15:44
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि Tue, 06/17/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार Sun, 06/22/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)
लेखनविषय:
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
लेखनविषय:
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

माहितगार ·

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 03/19/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Wed, 03/20/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण Wed, 03/20/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

मुक्त विहारि Wed, 03/20/2024 - 07:09
एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो Wed, 03/20/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार Wed, 03/20/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख Wed, 03/20/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

चांदणे संदीप Wed, 03/20/2024 - 16:26
मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 03/19/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Wed, 03/20/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण Wed, 03/20/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

मुक्त विहारि Wed, 03/20/2024 - 07:09
एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो Wed, 03/20/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार Wed, 03/20/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख Wed, 03/20/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

चांदणे संदीप Wed, 03/20/2024 - 16:26
मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

टुकार कविता: मामीचे गाणे

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
मामीची अदा पाहा मामींचे गाणे ऐका. मर्दानी आवाज आहे छान छान छान. मामीचे गाणे ऐकून मामाची झोप उडाली. वेश बदलून मामा आता दिन - रात भटकतो. मामाच्या सभेत मामी गायली रिकाम्या खुर्च्यांनी सभा गाजवली. मामीच्या गाण्याला हजारों प्रतिसाद मामी मुळे होतो मामाचाच प्रचार.

योद्धा

कर्नलतपस्वी ·

कर्नलतपस्वी Mon, 09/18/2023 - 09:09
खरी शक्ती,यानेच कित्येकदा नियती सुद्धा हार मानते. अशाच एका योद्ध्याची घमासान लढाई मध्ये लढताना केलेली आणखी एक शब्द रचना. शब्द येतात कविता घेऊन आजारी असताना माणसं येतात, डझनभर केळी घेऊन, किती असतात कोण जाणे, आलेली आपण होऊन.।। भेटताना ही येतात, हातावरती वेळ बांधुन, जाताना मात्र म्हणतात, परत येऊ वेळ घेऊन.।। कोणी आणतात फुलं पानं, क्षण जातात सुगंधात न्हाऊन , मळभ दाटलेले विरु लागते, जातात वृत्ती स्वच्छ होऊन.।। आलं कोणी भेटायला की, डॉक्टर तेंव्हाच जातात पाहुन , गर्दी कमी करण्यासाठी, जातात मोठ्ठं इंजेक्शन देऊन.।। सगळ्यांच्या शुभेच्छांनी, आजार जातो बरा होऊन, उमटतात त्याच्या पाऊलखुणा, अन शब्द येतात कविता घेऊन.।।

धष्टपुष्ट Fri, 01/05/2024 - 15:06
घेउनी जखमा उरी,फिरलो कसा ठाऊक नाही./ घेउनी व्रण ते उरी, फिरलो कसा ठाऊक नाही . अंधारल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. जिंकताना नेमके, हरलो कसा ठाऊक नाही. कटिबद्ध होती ती, नि होता विपुल तीचा शस्त्रसाठा/ बांधली होती कटी अन् विपुल होता शस्त्रसाठा

कर्नलतपस्वी Mon, 09/18/2023 - 09:09
खरी शक्ती,यानेच कित्येकदा नियती सुद्धा हार मानते. अशाच एका योद्ध्याची घमासान लढाई मध्ये लढताना केलेली आणखी एक शब्द रचना. शब्द येतात कविता घेऊन आजारी असताना माणसं येतात, डझनभर केळी घेऊन, किती असतात कोण जाणे, आलेली आपण होऊन.।। भेटताना ही येतात, हातावरती वेळ बांधुन, जाताना मात्र म्हणतात, परत येऊ वेळ घेऊन.।। कोणी आणतात फुलं पानं, क्षण जातात सुगंधात न्हाऊन , मळभ दाटलेले विरु लागते, जातात वृत्ती स्वच्छ होऊन.।। आलं कोणी भेटायला की, डॉक्टर तेंव्हाच जातात पाहुन , गर्दी कमी करण्यासाठी, जातात मोठ्ठं इंजेक्शन देऊन.।। सगळ्यांच्या शुभेच्छांनी, आजार जातो बरा होऊन, उमटतात त्याच्या पाऊलखुणा, अन शब्द येतात कविता घेऊन.।।

धष्टपुष्ट Fri, 01/05/2024 - 15:06
घेउनी जखमा उरी,फिरलो कसा ठाऊक नाही./ घेउनी व्रण ते उरी, फिरलो कसा ठाऊक नाही . अंधारल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. जिंकताना नेमके, हरलो कसा ठाऊक नाही. कटिबद्ध होती ती, नि होता विपुल तीचा शस्त्रसाठा/ बांधली होती कटी अन् विपुल होता शस्त्रसाठा
लेखनविषय:
दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही, घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही. . वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो, जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही. . हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली, अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. . सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती, जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही. . सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती, श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही. . कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही - कवी योगेश

सखये,बाई ग.....

कर्नलतपस्वी ·
सख्या रे... प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला. काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली.

उष्णकटिबंधीय वसंत

माहितगार ·

कर्नलतपस्वी Mon, 04/25/2022 - 18:57
पुरणपोळ्या पचल्यावर साखरेच्या गाठ्या दिसल्यावर आभाळातली पाने खाली पडल्यावर जमीनी वरची फुलं आभाळात गेल्यावर जेव्हा नसती हुरहूर संपते आणी मनी उधाण वारे शिरते तेव्हा समजावे शिशीराचे दिवस सरले आणी ऋतुराज वसंत अवतरले. मुक्तक आवडले

कर्नलतपस्वी Mon, 04/25/2022 - 18:57
पुरणपोळ्या पचल्यावर साखरेच्या गाठ्या दिसल्यावर आभाळातली पाने खाली पडल्यावर जमीनी वरची फुलं आभाळात गेल्यावर जेव्हा नसती हुरहूर संपते आणी मनी उधाण वारे शिरते तेव्हा समजावे शिशीराचे दिवस सरले आणी ऋतुराज वसंत अवतरले. मुक्तक आवडले
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार ·

माहितगार Mon, 04/25/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार

माहितगार Mon, 04/25/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे