जे न देखे रवी...
बस्स! फक्त एवढंच कर...
दिवस कसाबसा निघून जाईल
कातरवेळ मात्र अंगावर येईल
तू फक्त माझी सय काढू नको
"ती" आली तशी संपून ही जाईल
मग काही अबोल-अनाथ स्वप्ने
वाऱ्यावर बेवारस फिरत-उडत
रात्रारंभी तुझ्या खिडकीशी येतील
डोळ्यांवाटे आत शिरू पाहतील
त्यांना अजिबात थारा देऊ नकोस
डोळे अगदी घट्ट मिटून घे
हात बाहेर न काढता आतूनच
निग्रहाने "ती" खिडकी बंद कर
मोठेपणा.....
भादव्याची सांज होती, शृंगार संध्येचा मांडला
जाता जाता रवीने,कांचन ठेवा सांडला
काही डोळ्यांनी टिपला,काही नदीने लुटला
डोळ्याच्या कडांनी,मनाच्या तळी तो पोचला
नदीने मात्र, मुक्तहस्ते नभाला देऊनी टाकला
श्यामश्वेत मेघांनी,तो गिरी कंदरी वाटला
चाखला डोलणाऱ्या बकांनी,ठाव सोनेरी जाहला
पच्छीमेच्या मंद वाऱ्यांनी, त्यातला,थोडा किनारी आणला
आजोळ
आज पहाटे पहाटे
ओलांडून स्थळकाळ
साकारले माझ्यापुढे
बालपणीचे आजोळ
मामा मावशी प्रेमळ
हात आजीचा सढळ
आजोबांच्या भूपाळीत
उगवतीचे आभाळ
पेरू फणसाच्या मधे
कृष्णकमळीचा वेल
पायरहाटाच्या मागे
धरे सावली पोफळ
कधी पारावर गप्पा
कधी बालिश भांडणे
रात्री चांदण्या मोजत
अंगणातले झोपणे
ना कर नाटक !
नफरत चा बाजारबंद,
म्हणाला तो सोनियानंद,
मोहबत की दुकाने खुली
नाही चालला बजरंगबली
अदानीची मोठी ताकद,
तर गरीबांची छोटा कद,
मोदी-शाह यांची जादू
स्वस्त, फूकट्यांचा बांबू
गरीबांना नको तो विकास
गॅससिलींडरने केला नाश
केरल स्टोरीचा ना असर
भाजप तू विजय विसर
कोर्टाचे नरो वा कुंजरोवा (अर्थात डबल ढोलकी)
खोकेबाज धोकेबाज ।
इतरा म्हणत गद्दार!
स्वत: दिला पदभार।
सोडोनिया ।।
ठाकरेंनी जरी घातले,
सर्वोच्च कोर्टा साकडे,
पाऊल पडले वाकडे,
भलतेची।।
अननूभवी कुणी बनला ।
निवडणूकीस न उभारता।
मालमत्ता अर्ज न भरता।
मुख्यमंत्री।।
शाह- नानाने मात दिली।
भाज्यपाल जरी चूकले।
महाविकासआघाडी झूकली।
यामुळेचि।।
चाललोय....
काळेसावळे ढग, दरीतल्या सावल्या
पावसाचा साज, बुजलेली पाऊलवाट,
वाऱ्याचे बहाणे, सोनकीचे डोलणे
मुरवत चाललोय....
हिरवीगारं कुरणं, दगडी शेवाळ
विहीरीतला खोपा, कुत्र्याच्या छत्र्या
चंद्रमौळी विसावा, खापरी कौलं
निरखत चाललोय....
||इदं न मम||
||इदं न मम||
भरली ओंजळ पूर्ण अगदी पूर्ण रिकामी करताना,
चार पावलं सोबत चालून पुन्हा मागे येताना,
उचलून घेतलं फूल पुन्हा मातीत ठेवताना,
शब्दांची साथ सोडून समंजस मुकं होताना,
डोळ्यामध्ये उगा कुणी पाणी आणू नये.
मनामध्ये उगा तेव्हा त्रागा करू नये.
हस-या मुखाने, भीष्माच्या अलिप्तपणाने
अनुभवलेली ओल, गंध, स्पर्श वा अर्थ आठवावे.
जेल भरती
https://www.lokmat.com/mumbai/during-the-ongoing-written-examination-in-...
पोलीस भरती आधी बेड्या?
अरे हे काय केलस रे वेड्या?!
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी
दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी.
वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू
दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी.
दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती
नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी.
पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे
आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी.
हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना
ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.
जोकशाही
हा मुख्यमंत्री की
तो मुख्यमंत्री
सामान्यांच्या हाती
वाणसामानाची जंत्री
भाडोत्री बँडवाले अन्
भाड्याचे वाजंत्री
आकड्यांची कुतरओढ
लोक'शाई'ची जोकतंत्री
लोकल ला अजून लटकतात
ट्रॅफीकमधे अजून अटकतात
तरुण नोकरीसाठी भटकतात
शेतमाल दलाल अंग झटकतात
ह्याची वटवट की
त्याची खटपट
सिहासन चित्रपट कि
राष्ट्रपती लागवट?!
जोकशाही
हा मुख्यमंत्री की
तो मुख्यमंत्री
सामान्यांच्या हाती
वाणसामानाची जंत्री
भाडोत्री बँडवाले अन्
भाड्याचे वाजंत्री
आकड्यांची कुतरओढ
लोक'शाई'ची जोकतंत्री
लोकल ला अजून लटकतात
ट्रॅफीकमधे अजून अटकतात
तरुण नोकरीसाठी भटकतात
शेतमाल दलाल अंग झटकतात
ह्याची वटवट की
त्याची खटपट
सिहासन चित्रपट कि
राष्ट्रपती लागवट
ध्वनिचित्र
झुळझुळत्या निळसर वळणावर
झुकून, जळाशी झुळुक झोंबते
ऐल पैल तीरांवर अवचित
स्तब्ध लव्हाळी लहरून उठते
त्या वळणाच्या पुढे जरासा
कभिन्न काळा कातळ निश्चळ
रुणझुणत्या पाण्याचे पैंजण
ऐकत फुलते वेडी बाभूळ
निळ्या सावळ्या डोहतळाशी
अचपळ मासोळी सळसळते
पुन्हा पुन्हा त्या ध्वनिचित्राच्या
आठवणीने मन मोहरते
एकदाच काय ते बोलून टाकू
होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत. मी पुण्यात पूर्वी राहिलो असल्याने माझे संदर्भ आधीचे आहेत.
चांदणचुरा !
चांदणचुरा !
प्रेम एकदाच होतं आयुष्यात !
त्या नंतर उरते ती
फक्त जिवंत राहण्यासाठीची धडपड, बस्स !
(अगं, जे घडिलेचि नाही)
आमची प्रेर्णा : अगा जे घडिलेचि नाही
एके रात्री - दुसरी सोबत, कवेत घेऊन तिसरीला
चत्वारि कुचमर्दित बसलो (खबर नव्हती पहिलीला)
पंचप्राणां धाप लागली, षड्रिपुंना तोषविले
सप्तमभोगें एकेहाती, अन्यभोगांसी लाजविले
अष्टभाव हे अनुभवतां, नवमद्वारीं योग साधला
गळुन गेले माझे मीपण दशदिशांत आनंद उरला !
अगा जे घडिलेचि नाही
एके दिवशी- दुसर्या प्रहरी- नेत्र उघडता तिसरा
मितीत चवथ्या- झालो दाखल -(खतरा होता जबरा)
पाचावरती धारण बसली - षट्चक्रे लडखडली
सप्तरंग मिसळले वर्णपटी- श्वेतप्रभा लखलखली
अष्टसिद्धी नवविधा भक्तिच्या चरणी शरण जव गेल्या
अनाहताच्या अनुनादाने - दाही दिशा दुमदुमल्या
तू जाताना...
अश्रू जरा ओघळले तू जाताना
ना शब्द ओठी फुटले तू जाताना...
जलप्रलय यावा तैसा पूर नदीला
आभाळ ही कोसळले तू जाताना...
ती रात होती पुनवेची तेव्हा ही
का चांदणे ना पडले तू जाताना...?
हे वेदनेचे काटे रस्त्यातूनी
ना फूल कोठे फुलले तू जाताना...
उधळून जीवन गेले तेव्हा माझे
वादळ जरासे उठले तू जाताना...
रापण.....
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
-प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे.
-
तारर्कर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर भटकंतीचा आनंद घेतला.तेव्हां एक वेगळाच अनुभव आला.
धूप के लिए शुक्रिया का गीत (मराठी रूपांतर)
माझे कुटुंब खूप मोठे आहे
आंब्याची सहा झाडे आहेत
दोन जांभळाची
एक लीचीचे झाड आहे
आणि चार कदंब वृक्ष
माझ्या कुटुंबात माझी आई आहे
बाबा आहे
आजोबा आहेत
कुटुंबात दोन म्हशी आहेत
आणि एक गाय
एक काळा कुत्रा देखील आहे
आम्ही तीन बहिणी आहोत
भाऊ अजून झाला नाही
(चुनी कुमारी, इयत्ता सातवी)
कुणासारखी तू, कुणासारखी...
कुणासारखी तू, कुणासारखी
कधी वागते ना मनासारखी.
तू जळासारखी
तू पळासारखी
रंगीत गंधीत फुलासारखी.
तू परीसारखी
तू सरीसारखी
धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी.
गोड स्वप्नापरी
कि तू स्वप्नपरी
निघून जाणाऱ्या पळासारखी.
- 1 of 456
- next ›