वाङ्मय
क्रॉसओव्हर आणि परत माघारी-३ शेवट.
“त्याचे काय?” चिंटूच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता.
त्याने आपल्या कोटाच्या खिशातून पिस्तुल काढून टेबलावर ठेवले. चिंटू मनातून चरकला. हा रुणझुणरुणझुणवाला दिसतो तितका साधा नाही.
“आता मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जाणार नाही अशी मला आशा आहे. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा की मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जायला नाही पाहिजे.”
हार्डी बॉइजच्या कथा वाचून चिंटूला एक गोष्ट चांगली माहीत होती की ज्याच्याकडे पिस्तुल असते त्याच्याशी कधी आर्ग्युमेंट करायचे नसते. हो नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.
पॅरिसमधील शिवचरित्र
गेले काही महिने इंग्लंडमधील तथाकथित वाघनखे चर्चेत आहेत. ती खरी की खोटी हा मुद्दा सोडला, तरी महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक अज्ञात वस्तू, हस्तलिखिते परदेशात आहेत, ही गोष्ट मात्र १००% सत्य आहे. अश्याच एका हस्तलिखिताचा हा शोध-वृत्तांत पुढे देतो आहे.
या शोधाची सुरुवात झाली ती पुण्यात.
शुक्राची चांदणी
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी बाहेर शेतात झोपणं म्हणजे एक पर्वणीचं असायची. उत्तर-दक्षिण उभी पसरलेली शेतं आणि दक्षिण टोकाला, उत्तरेकडे तोंड करून असलेली घरांची वस्ती, घरांसमोर, वस्तीतील वापराचा पुर्व-पश्चिम जाणारा कच्चा माती-फुफाट्याचा रस्ता व रस्त्याच्या पलीकडे ज्याच्या त्याच्या वाटणीची शेतं. या शेतांच्या कडेने सोडलेल्या व साफ केलेल्या जागेत एखाद्या जुनाट पटकुरानं झाकलेली अंथरूण-पांघरुणे दिवसभर उन्हात धूळ खात पडून असत.
हे वाचा: बगळा
कटाक्ष-
लेखक: प्रसाद कुमठेकर
प्रकाशन: पार पब्लिकेशन्स
पहिली आवृत्ती: २०१६
पृष्ठे: १५८
किंमत: ₹३००
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला"
वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी
श्रवणी लोभ उपजेल तेथे
विवेक केंचा असेल तेथे.
बैसली दुराशेची भुते
तया अधोगती.
सध्या काय वाचताय?
बऱ्याच वर्षानी एक कादंबरी एकाच बैठकीत वाचून संपवली-
हाकामारी -हृषीकेश गुप्ते.
वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.
दुर्जन प्राणी समजावे.
परी ते प्रगट न करावे.
सज्जना परीस आळवावे.
महत्त्व देऊनी.
समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे. नीती कथाही म्हणतात दुर्जन आणि नीच शत्रूला थोडे बहुत देऊन संतुष्ट केले पाहिजे आणि तुल्यबळ शत्रूशी युद्ध केले पाहिजे.
'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)
पेर्णा १:
पेर्णा २.
( काटा रुते कुणाला )
'बाट्या' हव्यात मजला
ऐकीत नाही कोणी
मिळतील का पुण्यात
ठावे कुणास नाही
विसरू कशी आता मी
इंदोरची ती बाटी
पुणे-तेथ कायुणे
भलतीच बात खोटी
स्वगृही करू पहातो
रुजतो अनर्थ तेथे
भार्या पुणेकरिण ती
हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला
कळ आतल्या जिवाची
बाट्या न खात जगणे
मज शाप हाचि आहे