सूर्य पाहिलेला माणूस-नाटक


आदरणीय, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे सर, यांचे वृद्धापकाळाने काल सकाळी निधन झाले. सर, ब-याच दिवसांपासून आजारी होते. मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार सरांना जाहीर झाला होता, मसापच्या वतीने तो पुरस्कार साहित्य परिषदेच्या पदाधिका-यांनी घरी जाऊन सरांना तो पुरस्कार दिला तेव्हा, सरांची खालावलेली तब्येत, थकलेपणा, आणि वृद्धापकाळ स्पष्ट दिसत होता.
गीतारहस्य चिंतन -१
#कर्मजिज्ञासा२
* अस्तेय (चोरी)
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
एका गुलाबी संध्याकाळी
________________________
तो लेखक होता.
तो कथा लिहित असे. मधून मधून एखादी कविताही लिहित असे.
“चुकलेल्या वाटा.” हा त्याचा एकमेव कथासंग्रह होता.
त्याच्या घरात त्याच्या शिवाय अजून दोन मेंबर होते. एक स्त्री आणि एक मुलगा.
दुपारी चार वाजता तो तयार झाला. कुठेतरी जायचे होते. कुठे?
जिकडे वाट फुटेल तिकडे, जिकडे पाय नेतील तिकडे.
तो जायला निघाला तेव्हा ती स्त्री आणि तो मुलगा टीवी बघत होते.
“मी जातोय.”
Nobody said anything.
जा, नका जाऊ, लौकर ये. टेक केअर. काही नाही.
कदाचित त्यांना ऐकू गेले नसावे.
कोणीतरी बोललेही असेल पण मग ह्याला ऐकू गेले नसणार.
कां कुणास ठाऊक आज प्रो.देसाई मला म्हणाले ” सामंत,आज तुम्ही जरा उदास,उदास दिसता.कारण समजेल का? मी म्हणालो ” हे बघा, भाऊसाहेब मी एव्हड्या कविता लिहीतो,बरेच वेळा तुम्ही मला स्फूर्ती दिलीत आणि मी लिहीत गेलो.बरेच जणाना मी कविता पाठवतो,पण मी पहातोय तुम्ही आणि एक दोन सोडले तर इतर कोणी टीका पण करत नाहीत.का कळत नाही.” त्यावर भाऊसाहेब म्हणाले ” सामंत तुम्ही लिहित चला,कुणी गाईली नाही,वाचली नाही,आणि वाचून ऐकली नाही तरी हरकत नाही.”हे त्यांचे शब्द ऐकल्यावर मला एक कविता सुचली.
माझ्या कविता
कुणिही गात नाही
कुणिही वाचत नाही
वाचली तरी ऐकत नाही
परंतु
लिव बामणां लिव
तुकां होयां तां लिव
पण लिवत र्हंव
काय लिवचा,कसा लिवचा
कधी लिवचा,खंय लिवचा
ह्या तुझां तूच ठरंव
पण लिवत र्हंव
कधी आठवणी लिव
कधी अनुभव लिव
कधी अनुवाद लिव
कधी भाषांतर लिव
कधी रुपांतर लिव
कधी अवांतर लिव
पण लिवत र्हंव
संदर्भ देवचो की नाय
ह्यां तुझां तूच ठरंव
तूका रुचांत तसां लिव
पण लिवत र्हंव
लिव बामणां लिव
तुका होयां तां लिव
पण लिवत र्हंव

चित्रकारः John William Waterhouse. (1888)
Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !