मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इराण : डोंगरी भिवरलीचं अधर्मयुद्ध

गामा पैलवान ·

चेतन Wed, 03/18/2026 - 18:30
इराण युद्धाच्या भोवऱ्यात फिरणारे झिगझॅग शब्द अचानक भडकतात आणि मग थंड होतात, जिथे धूर बोलतो आणि शांतता ओरडते, तिथे कागदी रणांगणावर उडणारे अक्षरांचे तुकडे बोंबलतात विचित्र तालात. मिसाईलसारखे वाक्ये आकाशात झेप घेतात आणि मग पावसासारखी कोसळतात अर्थहीन ढगांत, जिथे इतिहास स्वतःलाच विसरतो आणि नकाशे पळून जातात पावलांच्या मागे. 2026 च्या गूढ इराण युद्धात अचानक Donald Trump चे नाव धुरकट ढगातून तरंगत येते, जणू काही शब्दांचा वेडावाकडा तारा आकाशात अडकलेला. त्याच्या सावल्या वाक्यांवर पडतात आणि अक्षरे क्षणभर सरळ उभी राहतात, पण लगेच पुन्हा गोंधळात नाचू लागतात. Israel च्या दिशेने वळलेले वारे अचानक रंग बदलतात, जिथे नकाशे स्वतःला पुन्हा रेखाटतात आणि सीमारेषा कुजबुजतात गुपिते. Strait of Hormuz च्या पाण्यात तरंगणारे विचार लाटांसोबत उलटसुलट होतात, जहाजे स्वप्नांच्या जाळ्यात अडकतात, आणि दिशाहीन कंपास हसतात. ड्रोनचे तुटक गाणे आकाशात भिरभिरते, रंगीबेरंगी निःशब्द प्रश्न फेकते, आणि जमिनीवर पडलेली उत्तरे कर्कश हसतात. शहरे झोपतात जागी राहून, लोकांच्या सावल्या वेगळ्याच दिशेने चालतात, आणि वेळ सापासारखी स्वतःभोवती गुंडाळते. वाक्यांचे सैनिक सरळ चालत नाहीत—ते गोल गोल फिरतात, एकमेकांवर आदळतात आणि हवेत विरघळतात. या विचित्र कथानकात बातम्यांचे ढग गोड, कडू आणि बुळबुळीत होतात, जिथे सत्य आणि खोटं दोन्ही हरवून बसतात. शेवटी उरतो फक्त गोंधळाचा प्रतिध्वनी—थरथरणारा, भिरभिरणारा, आणि पुन्हा नव्याने जन्म घेणारा. :-) साभार चॅटजीपीटी.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:20
तुम्ही म्हटल्याप्रमाणे नादिर शाहचे साम्राज्य अल्पकाळ टिकले, पण त्याचे महत्त्व केवळ वर्षांवरून ठरवता येत नाही. नादिर शाहला "शिया नेपोलियन" म्हटले जाते. सफावी घराण्याचा अंत झाल्यानंतर आणि झंड/काजार येण्यापूर्वी त्याने इराणला विखुरण्यापासून वाचवले होते. विशेष म्हणजे, त्याने मुघलांकडून कोहिनूर आणि मयूर सिंहासन नेले, ज्यामुळे इराणची आर्थिक स्थिती काही काळ कमालीची सुधारली होती. आगा मोहम्मद खान काजार चा उपस्थित केलेला मुद्दा की तो झंड राजकन्येचा मुलगा होता, हे अधिकृत इतिहासात लपवले जाते. कारण काजार राजांनी आपली तुर्की ओळख अधिक मांडण्याचा प्रयत्न केला. -- अरब आक्रमणापूर्वी इराणवर सासनी घराण्याचे राज्य होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या बायझेंटाईन-सासानियन युद्धांमुळे दोन्ही साम्राज्ये आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या थकली होती. अंतर्गत बंडाळ्या आणि सततचे कर यामुळे सामान्य जनताही सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. खलिफा उमर यांच्या काळात इराणवर आक्रमणे सुरू झाली. कादिसियाची लढाई आणि निहावंदची लढाई या दोन लढायांनी सासनी सत्तेचा कणा मोडला. उमय्याद काळात अरबांनी इराणवर कडक नियंत्रण ठेवले. प्रशासकीय भाषा 'पर्शियन' ऐवजी 'अरबी' करण्यात आली. जे पर्शियन लोक इस्लाम स्वीकारत, त्यांना 'मावली' म्हटले जाई. त्यांना अरबांच्या बरोबरीने अधिकार मिळत नसत, ज्यामुळे पर्शियन लोकांमध्ये असंतोष वाढला. उमय्याद राजवटीविरुद्ध झालेल्या उठावात इराणच्या अबू मुस्लिम खुरासानी यांनी मोठी भूमिका बजावली. या क्रांतीनंतर उमय्याद सत्ता जाऊन अब्बासी सत्ता आली. अरबांनी इराण जिंकला खरा, पण सांस्कृतिकदृष्ट्या इराणनेच अरबांना जिंकले असे म्हणतात. -- चंगेज खान आणि हलाकु खान यांनी इराणची खरी वाताहत केली! निशापूर, मर्व, हेरात आणि समरकंद यांसारखी वैभवशाली शहरे त्याने अक्षरशः जमिनीदोस्त केली. चंगेज खानच्या मृत्यूनंतर काही दशकांनी त्याचा नातू हलाकु खान आला. हलाकुचे सर्वात मोठे 'लक्ष्य' म्हणजे बगदाद. तेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफा मुस्तसिम याचे केंद्र होते. हा अब्बासी स्वतःला संपूर्ण मुस्लिम जगाचा आध्यात्मिक प्रमुख मानत असे. खलिफाने शरण येण्यास नकार दिल्यावर हलाकुने बगदादला वेढा घातला आणि शहराचा पाडाव केला. यानंतर हलाकू ने जी मुसलमानांची कत्तल झाली ती इतिहासातील सर्वात भीषण कत्तलींपैकी एक मानली जाते. हलाकुने खलिफाला एका गालिच्यात गुंडाळून त्याच्यावरून घोडे धावण्यास लावले आणि त्याला मारून टाकले. यासह ५०० वर्षांची अब्बासी खिलाफत अधिकृतपणे संपली. हलाकु क्रूर होता पण त्याने मराघे येथे त्या काळातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा बांधली होती. हलाकु खान - त्याचे मुख्य उद्दिष्ट पश्चिम आशियातील उरलेली मुस्लिम सत्ता संपवणे हे होते. हेच कार्य आज अमेरिका करते आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

चेतन Wed, 03/18/2026 - 18:30
इराण युद्धाच्या भोवऱ्यात फिरणारे झिगझॅग शब्द अचानक भडकतात आणि मग थंड होतात, जिथे धूर बोलतो आणि शांतता ओरडते, तिथे कागदी रणांगणावर उडणारे अक्षरांचे तुकडे बोंबलतात विचित्र तालात. मिसाईलसारखे वाक्ये आकाशात झेप घेतात आणि मग पावसासारखी कोसळतात अर्थहीन ढगांत, जिथे इतिहास स्वतःलाच विसरतो आणि नकाशे पळून जातात पावलांच्या मागे. 2026 च्या गूढ इराण युद्धात अचानक Donald Trump चे नाव धुरकट ढगातून तरंगत येते, जणू काही शब्दांचा वेडावाकडा तारा आकाशात अडकलेला. त्याच्या सावल्या वाक्यांवर पडतात आणि अक्षरे क्षणभर सरळ उभी राहतात, पण लगेच पुन्हा गोंधळात नाचू लागतात. Israel च्या दिशेने वळलेले वारे अचानक रंग बदलतात, जिथे नकाशे स्वतःला पुन्हा रेखाटतात आणि सीमारेषा कुजबुजतात गुपिते. Strait of Hormuz च्या पाण्यात तरंगणारे विचार लाटांसोबत उलटसुलट होतात, जहाजे स्वप्नांच्या जाळ्यात अडकतात, आणि दिशाहीन कंपास हसतात. ड्रोनचे तुटक गाणे आकाशात भिरभिरते, रंगीबेरंगी निःशब्द प्रश्न फेकते, आणि जमिनीवर पडलेली उत्तरे कर्कश हसतात. शहरे झोपतात जागी राहून, लोकांच्या सावल्या वेगळ्याच दिशेने चालतात, आणि वेळ सापासारखी स्वतःभोवती गुंडाळते. वाक्यांचे सैनिक सरळ चालत नाहीत—ते गोल गोल फिरतात, एकमेकांवर आदळतात आणि हवेत विरघळतात. या विचित्र कथानकात बातम्यांचे ढग गोड, कडू आणि बुळबुळीत होतात, जिथे सत्य आणि खोटं दोन्ही हरवून बसतात. शेवटी उरतो फक्त गोंधळाचा प्रतिध्वनी—थरथरणारा, भिरभिरणारा, आणि पुन्हा नव्याने जन्म घेणारा. :-) साभार चॅटजीपीटी.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:20
तुम्ही म्हटल्याप्रमाणे नादिर शाहचे साम्राज्य अल्पकाळ टिकले, पण त्याचे महत्त्व केवळ वर्षांवरून ठरवता येत नाही. नादिर शाहला "शिया नेपोलियन" म्हटले जाते. सफावी घराण्याचा अंत झाल्यानंतर आणि झंड/काजार येण्यापूर्वी त्याने इराणला विखुरण्यापासून वाचवले होते. विशेष म्हणजे, त्याने मुघलांकडून कोहिनूर आणि मयूर सिंहासन नेले, ज्यामुळे इराणची आर्थिक स्थिती काही काळ कमालीची सुधारली होती. आगा मोहम्मद खान काजार चा उपस्थित केलेला मुद्दा की तो झंड राजकन्येचा मुलगा होता, हे अधिकृत इतिहासात लपवले जाते. कारण काजार राजांनी आपली तुर्की ओळख अधिक मांडण्याचा प्रयत्न केला. -- अरब आक्रमणापूर्वी इराणवर सासनी घराण्याचे राज्य होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या बायझेंटाईन-सासानियन युद्धांमुळे दोन्ही साम्राज्ये आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या थकली होती. अंतर्गत बंडाळ्या आणि सततचे कर यामुळे सामान्य जनताही सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. खलिफा उमर यांच्या काळात इराणवर आक्रमणे सुरू झाली. कादिसियाची लढाई आणि निहावंदची लढाई या दोन लढायांनी सासनी सत्तेचा कणा मोडला. उमय्याद काळात अरबांनी इराणवर कडक नियंत्रण ठेवले. प्रशासकीय भाषा 'पर्शियन' ऐवजी 'अरबी' करण्यात आली. जे पर्शियन लोक इस्लाम स्वीकारत, त्यांना 'मावली' म्हटले जाई. त्यांना अरबांच्या बरोबरीने अधिकार मिळत नसत, ज्यामुळे पर्शियन लोकांमध्ये असंतोष वाढला. उमय्याद राजवटीविरुद्ध झालेल्या उठावात इराणच्या अबू मुस्लिम खुरासानी यांनी मोठी भूमिका बजावली. या क्रांतीनंतर उमय्याद सत्ता जाऊन अब्बासी सत्ता आली. अरबांनी इराण जिंकला खरा, पण सांस्कृतिकदृष्ट्या इराणनेच अरबांना जिंकले असे म्हणतात. -- चंगेज खान आणि हलाकु खान यांनी इराणची खरी वाताहत केली! निशापूर, मर्व, हेरात आणि समरकंद यांसारखी वैभवशाली शहरे त्याने अक्षरशः जमिनीदोस्त केली. चंगेज खानच्या मृत्यूनंतर काही दशकांनी त्याचा नातू हलाकु खान आला. हलाकुचे सर्वात मोठे 'लक्ष्य' म्हणजे बगदाद. तेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफा मुस्तसिम याचे केंद्र होते. हा अब्बासी स्वतःला संपूर्ण मुस्लिम जगाचा आध्यात्मिक प्रमुख मानत असे. खलिफाने शरण येण्यास नकार दिल्यावर हलाकुने बगदादला वेढा घातला आणि शहराचा पाडाव केला. यानंतर हलाकू ने जी मुसलमानांची कत्तल झाली ती इतिहासातील सर्वात भीषण कत्तलींपैकी एक मानली जाते. हलाकुने खलिफाला एका गालिच्यात गुंडाळून त्याच्यावरून घोडे धावण्यास लावले आणि त्याला मारून टाकले. यासह ५०० वर्षांची अब्बासी खिलाफत अधिकृतपणे संपली. हलाकु क्रूर होता पण त्याने मराघे येथे त्या काळातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा बांधली होती. हलाकु खान - त्याचे मुख्य उद्दिष्ट पश्चिम आशियातील उरलेली मुस्लिम सत्ता संपवणे हे होते. हेच कार्य आज अमेरिका करते आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, म्हंटलं इराणवर एक लेख व्हायला हवा. सध्या त्याच्या विरोधात अमेरिका व इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. तर इराणचा इतिहासाचा व आजच्या परिस्थितीचा धावता आढावा घ्यावा असा बेत आहे. तर सुरुवात कुठनं करायची? म्हंटलं नुकताच अली खामेनेई मेलाय तर त्याच्यापासनं लेख सुरू करूया. हा इसम शियांचा प्रमुख होता असा दावा आहे. क्याथलिकांचा पोप असतो तसा. मग हा पॅट्रिस लुमुंबा नामे नास्तिक कम्युनिस्ट विद्यापीठात काय झक मारायला गेला होता का? नाही. मुळीच नाही. तो तिथे कम्युनिस्ट क्रांती भक्कम करणं शिकायला गेला होता. होय, इ.स. १९७९ ची खोमेनीची इराणातली धार्मिक क्रांती कम्युनिस्ट ढाच्यावर आधारित आहे.

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

Bhakti ·

कंजूस Fri, 01/30/2026 - 17:24
बरीच माहिती गोळा केली आहे. शाळेत असताना ' गौतमाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि तो बुद्ध झाला' हे वाचलेले. पण कोणते ज्ञान हे काही कुणी सांगायला तयार नव्हते. बुद्ध आणि त्याचा धम्म - बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचल्यावर कळलं.

गामा पैलवान Sat, 01/31/2026 - 00:05
भक्ती, कृपया या वाक्यातले कृबुसंस्करण उलगडावे :
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
याचा अर्थ का होतो ? बाकी, इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो. नास्तिक हा शब्द देवांचे अस्तित्व नाकारण्याशी संबंधित नाही. वेदांचे आधिपत्य नाकारले तरी वेद हेच मूळ श्रुती आहेत असं बौद्ध मानतात. आ.न., -गा.पै.

Bhakti Sat, 01/31/2026 - 11:30
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
हरिती हिची कथा हरिती स्वतःच्या अनेक मुलांच्या उदरनिर्वाहासाठी इतरांची मुले चोरून खात असे .दुखी पालकांनी बुद्धांकडे तक्रार केली. बुद्धांनी हरितीला धडा शिकवण्यासाठी तिच्या सर्वात लाडक्या मुलाला पिंगलला लपवून ठेवले .मूल न सापडल्याने ती व्याकुळ झाली. बुद्धांनी तिला जाणीव करून दिली की, हजारो मुले असूनही एका मुलासाठी तुला इतके दुःख होत आहे, तर ज्यांची एकमेव मुले तू खाल्लीस, त्यांना किती दुःख झाले असेल?आपली चूक लक्षात आल्यावर हरितीने माफी मागितली आणि बुद्धांची अनुयायी बनली. ती मुलांची संरक्षक देवी म्हणून पूजली जाऊ लागली. पण तरीही तिला मांसभक्षणाची आठवण होई.रक्तप्राशन करावे वाटे तेव्हा रक्ताप्रमाणेच लाल रंगाचा ज्याचा रस ते डाळींबाचे दाणे त्याचा रस हे रक्ताचे रूपक होऊन ही तृषा शमवत.
याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो.
>ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे. वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही
.
इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? स्वतः बुद्धांनी याला विरोध केला.पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला हे वरती मी स्पष्टच लिहिले आहे की !

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 01/31/2026 - 11:36
पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला ऐवजी असे वाचा... पण मुळात अनुयायांनी हा (मुर्ती,कर्मकाण्ड) पसारा वाढवला.

In reply to by Bhakti

गामा पैलवान Sun, 02/01/2026 - 15:26
भक्ती, माझ्या मते गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे. मात्र त्याच्या अनुयायांच्या बाबतीत असं ठामपणे म्हणता येईल का? मी साशंक आहे. बाकी, बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. पहिला बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन होऊन गेला. तो बुद्धाच्या नंतर तीनचारशे वर्षांनी जन्मला होता. यावरून बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे. कुठल्याही पारंपरिक भारतीय पंथात दैवते शिरतात तशीच यांतही शिरली. वैविध्यपूर्ण दैवते हा भारतीय जनमानसाचा अविष्कार आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि Sun, 02/01/2026 - 20:54
गामाजी,
गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे.
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे
बुद्धाने वयाच्या ३५ -८० वर्षांपर्यंत त्याच्या शिकवणीचा त्याच्या प्रवचनांमधून (discourses) तो जिथे जिथे गेला तिथे तिथे प्रसार केला. त्याच प्रवचनांचं डॅाक्युमेंटेशन पुढे त्रिपीटकात केलं गेलं, त्याचा पश्चात. बुद्धाने कोणताही धर्म स्थापन केला नाही, धर्म (धम्म) ह्या शब्दाची योग्य व्याख्या त्याने विषद केली त्याच्या शिकवणूकीतून (प्रवचनांमधून), तसेच कोणताही पंथही त्याने स्थापन केली नाही. त्याच्या ध्यानप्रणालीची अनुपासना करणाऱ्या साधकांच्या समूहाला संघ म्हणतात पण त्यात कसलंही कर्मकांड नसल्याने, गुरू आणि गादी (उत्तराधिकारी) नसल्याने, कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा विचारसरणीच्या लोकांसाठी मर्यादित नसल्याने तो पंथ नाही. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

गामा पैलवान Mon, 02/02/2026 - 02:43
सोत्रि,
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
माझी माहिती मर्यादित आहे. पण तेव्हढ्यावर निष्कर्ष काढता येतो. जर बुद्ध वेदांविषयी आदर बाळगून नसेल तर तसं स्पष्ट म्हंटलं असतं त्यानं. बाकी माझं ढोबळ विधान स्पष्ट करावयास गुग्गुळाचार्य आहेतंच : https://www.google.com/search?q=buddha+respected+vedas खरंतर तुम्हालाच याविषयी सखोल जाण आहे. बौद्ध हा पंथ नसेल तर महायान, हीनयान वगैरे काय म्हणावेत? संप्रदाय म्हणावेत का? माझी माहिती अत्यंत मर्यादित असल्याने मला हा प्रश्न पडला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि Mon, 02/02/2026 - 14:02
गामाजी, ते ढोबळ विधान आहे असे म्हणता आहात तर ते तिथेच सोडून देवूयात. महायान, थेरवाद (हीनयान), वज्रयान, नवयान हे सगळे संप्रदाय म्हणता येतील कारण गटांची स्वतःची वेगळी तत्वज्ञानात्मक मांडणी आहे जरी मूळ आधारस्तंभ 'बुद्ध, धम्म आणि संघ' हेच आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by Bhakti

सोत्रि Mon, 02/02/2026 - 14:46
ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे.
काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti Mon, 02/02/2026 - 16:48
सुत्त निपत ८४६- ना वेदगु दिठथिया ना मुतिया सा मनामेति नही तन्मयोसो…. जो वेद जाणतो त्याला खोटा अहंकार येत नाही. तो ऐकीव गोष्टी आणि भ्रमांचा परिणाम करत नाही.
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही

In reply to by Bhakti

सोत्रि Mon, 02/02/2026 - 18:37
भक्ती, वेदगु शब्दात वेद आलेलं असलं तरी त्यात अभिप्रेत असलेला अर्थ ४ वेदांचा वेद नाही. त्याची फोड आणि अर्थ पाली भाषेत आणि त्रिपिटकाच्या परिप्रेक्षात खालीलप्रमाणे: वेद म्हणजे सर्वोच्च ज्ञान अणि गु म्हणजे प्राप्त केलेला. बुद्धाला प्राप्त झालेलं ज्ञान ह्याचा बेस वेदना (संवेदना) आहे, सतीपट्ठाण सुत्तात ह्याचे सविस्तर विष्लेषण आहे. त्यानुसार वेदना पर करून सत्यापर्यंत पोहोचलेला म्हणजे वेदगु. वेद जाणणारा म्हणजे वेदगु हे शब्दसाधर्म्यामुळे झालेलं अशुद्ध भाषांतर आहे. मूळ प्रश्न होता, काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? त्याचं उत्तर मिळालं नाही. तसेच नविन मुद्दा आला ह्या प्रतिसादात, वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का? आणि त्या दोन्हीच्या परिप्रेक्षात अहंकार म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी Mon, 02/02/2026 - 19:06
मग ते इतर संदर्भ वेदांचेच होते हे तरी कसे समजले ? तीन वेद जाणणारा हा हे इतर तीन विद्या जाणणारा नसेल कशावरून ? त्रिपिटक जर तीन आहेत तर इतर विद्या सुद्धा तीन शाखांमध्ये विभागलेल्या असू शकतात.

कॉमी Sun, 02/01/2026 - 09:44
बुध्दाने वेदाचे अधिपत्य नाकारले. बुद्धकाळात किंवा सर्वात जुन्या पाली लिखित साहित्यात वेदांचा उल्लेख आहे का ? बुद्ध वेदांबद्ल स्पष्टपणे बोलताना कुठेही आहे का ?

In reply to by कॉमी

सोत्रि Sun, 02/01/2026 - 21:20
पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात जुने बौद्ध साहित्य) वेदांचा आणि तत्कालीन वैदिक परंपरेचा अत्यंत स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख आढळतो. बुद्ध केवळ वेदांबद्दल बोललेच नाहीत, तर त्यांनी त्या काळातील वैदिक कर्मकांडांची आणि तत्त्वज्ञानाची तर्कशुद्ध चिकित्साही केली आहे. पाली साहित्यात वेदांना 'तेविज्ज' (त्रिवेद) असे म्हटले आहे. बुद्धांच्या काळात प्रामुख्याने तीनच वेद प्रचलित होते: ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. (अथर्ववेदाला नंतरच्या काळात वेदाचा दर्जा मिळाला). अनेक सुत्तांमध्ये बुद्धाने वेदांवर आणि त्यांच्या अधिकारावर भाष्य केले आहे. त्यापैकी काही प्रमुख संदर्भ: तेविज्ज सुत्त (दीघ निकाय): हे सर्वात महत्त्वाचे सुत्त आहे. यात दोन ब्राह्मण बुद्धांकडे येऊन विचारतात की, "कोणता वेद मार्ग खरा आहे?" बुद्ध त्यांना विचारतो की, "ज्या वेदांचे तुम्ही पठण करता, त्या मंत्रांच्या ऋषींनी कधी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहिले होते का?" जेव्हा उत्तर 'नाही' येते, तेव्हा बुद्ध सांगतात की, ज्यांनी स्वतः पाहिलेले नाही अशांच्या परंपरेचे आंधळेपणाने पालन करणे म्हणजे "आंधळ्यांच्या रांगेसारखे" (अंधवेणु) आहे, जिथे पुढच्याला दिसत नाही आणि मागच्यालाही नाही. अस्सलायन सुत्त (मज्झिम निकाय): यामध्ये बुद्ध वेदांवर आधारित 'चातुर्वर्ण्य' व्यवस्थेला आव्हान देतो. तो म्हणतो की, निसर्गात सर्व माणसे समान आहेत आणि श्रेष्ठत्व हे जन्मावरून (किंवा वेदांच्या ज्ञानावरून) नसून ते कर्मावरून ठरते. सुत्त निपात (ब्राह्मणधम्म सुत्त): यात बुद्ध सांगतो की, प्राचीन ऋषी हे चारित्र्यसंपन्न होते, पण नंतरच्या काळात वेदांच्या नावाखाली प्राण्यांचे बळी देणे आणि कर्मकांड करणे सुरू झाले, जे चुकीचे आहे. - (अभ्यासू) सोकाजी

प्रचेतस Sun, 02/01/2026 - 09:57
लेख खूपच संक्षिप्त वाटला, नव्हे आहेही. बौद्ध मूर्तीशास्त्र म्हटलं की जरा अधिक उपापोह हवा होता. मूर्ती ओळखण्याची प्रमुख साधने म्हणजे मुद्रा, लांच्छन, वृक्ष. ह्यांचे अधिक वर्णन फोटोसहित हवे होते. गौतम बुद्ध म्हणजे शाक्यमुनी, भविष्यातील बुद्ध मैत्रेय ह्यांचा उल्लेख कुठे दिसला नाही. हे सर्व मानुषी बुद्ध. त्यांच्या आधीचे विपश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छन्द, कनकमुनी, काश्यप ह्यांचा उल्लेखही आवश्यक होता. परत बौद्ध मूर्तीकलेत गांधारकला अधिक सुप्रसिद्ध आहे. त्याचा आढावा घ्यायला हवा होता. बाकी वेरुळ येथे महायान आणि वज्रयान परंपरेतील अनोखी शिल्पे पाहायला मिळतात. जिज्ञासूंना मानुषी बौद्ध, ध्यानी बुद्ध, स्त्री बोधीसत्व, तारा, महामायुरी, पद्मपाणी, वज्रपाणी, जंभाल, हरिती, रक्तअवलोकितेश्वर, सुजाता, मैत्रेय अशी अनोखी शिल्पे पाहायची असतील तर जरुर तेथे जाऊन ती पाहावीत.

In reply to by प्रचेतस

कंजूस Sun, 02/01/2026 - 20:18
यावर एक यूट्यूबवर मालिकाच काढावी. म्हणजे व्हिडिओंची लिंक दिली की झाले काम. वेरुळच्या लेण्यांवरही मालिका असावी. एकदा सगळे फोटो जमा करायचे आणि ते जोडायचे स्लाईडशोमध्ये आणि त्याला मागून नंतर आवाज द्यायचा.

In reply to by प्रचेतस

Bhakti Mon, 02/02/2026 - 16:58
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.बाकी बोधिसत्वचा काहीतरी विशिष्ट क्रम आहे ,जो मला नीट समाजाला नाही ...हे मी वरती लिहिलेच आहे.
रक्तअवलोकितेश्वर,
वेरुळंंमधील बौद्ध शिल्प त्याकाळात नैसर्गिक रंगाने रंगवले होते .अगदी बौद्ध पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे!परंतु कालाच्या प्रवाहात ते रंग नाहीसे झालं.रंगीत शिल्प तेव्हा किती सुंदर दिसत असतील.गांधार ,मथुरा शैली अजून फरक थोडा थोडा समाजात आहे .शैव ,वैष्णव अभ्यासक्रमातही तशा मूर्तीशैली फरक सांगितला जायचा.

In reply to by प्रचेतस

लेखन संक्षीप्त असलं तरी, लेखिकेने सुरुवातीलाच लिहिले होते की, 'चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो' आपल्याला जितके उमजले तितके लिहिणे ही चांगली गोष्ट आहे. आता उहापोह म्हटलं की जाणकारांनी लिहिले पाहिजे. जसे की, धाग्याच्या निमित्ताने सोत्रि यांनी अनुषांगिक अशी उत्तम माहिती भरली आहे. आपल्यासारखा जाणकारांनी अशा धाग्यात भर घातली पाहिजे. असे धागे समृद्ध होतात असे वाटते. बौद्ध धर्मातील हिनयान (थेरवाद) आणि महायान या दोन प्रमुख पंथांमध्ये तत्त्वज्ञानासोबतच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत आणि रंजक फरकआहेच. या फरकांचा उगम बुद्धत्वाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून होतो. आणि मग तशी सविस्तर मांडणी केली पाहिजे असे वाटते. हीनयान यात बुद्ध एक मानवी महापुरुष आणि मार्गदर्शक मानले गेले. सुरुवातीच्या काळात बुद्धांना मानवी रूपात दाखवणे वर्ज्य होते. त्यांच्या उपस्थितीसाठी पदकमल, धम्मचक्र, बोधिवृक्ष किंवा रिकामे आसन वापरले जात होते. साधी आणि संयमित कला स्तूप वगैरे. महायान यात, बुद्धांना मानवी रूपात आणि भव्य स्वरूपात पूजले जाते. यामध्ये विविध मुद्रा (उदा. भूस्पर्श, अभय, ध्यान) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. महायानमध्ये अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा, वज्रपाणी अशा अनेक बोधिसत्वांच्या अलंकारिक आणि विविध आयुधे धारण केलेल्या मूर्ती आढळतात. अत्यंत सुशोभित, दागिने, मुकुट आणि भव्यता असलेली कला. बुद्धाच्या काळात मूर्ती शक्य नव्हते तर पहिली मूर्ती केव्हा आली त्याबद्दल असे म्हटल्या जाते की, बुद्धाची पहिली मानवी मूर्ती ग्रीक-बौद्ध कलाशैलीतून निर्माण झाली. जेव्हा ग्रीक लोक भारताच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या देवांना मानवी रूपात कोरण्याची जुनी परंपरा होती. ग्रीक मूर्तिकारांनी बुद्धाला मानवी शरीर दिले, ज्याला त्यांनी 'अपोलियन बुद्ध ' असे म्हटले. अल्फ्रेड फुशे यांची ही कल्पना आहे, अर्थात ही सर्व गांधार शैली. उदा. केस भारतीय परंपरेत बुद्धाचे केस मुंडण केलेले किंवा कुरळे दाखवले जातात, पण अपोलोनियन बुद्धामध्ये ते ग्रीक शैलीतील लाटांसारखे आणि वरच्या बाजूला बांधलेले असतात. चेहरा अत्यंत रेखीव, सरळ तीक्ष्ण नाक आणि अंडाकृती चेहरा असतो, जो हुबेहूब ग्रीक शिल्पांसारखा दिसतो. बुद्धाने परिधान केलेले 'चीवर' (वस्त्र) हे साध्या कापडासारखे नसून ग्रीक 'टोगा' जाड असे असते. असे असले तरी, बुद्धाची मूर्ती ही गांधार शैलीची 'मथुरा शैली' ची यावर अभ्यासकात वाद आहेत. खालील संदर्भ पुस्तके जाणकारांनी वाचून सविस्तर लिहावे असे वाटले. संदर्भ ः १. अल्फ्रेड फूशेचं 'आर्ट ग्रेको-बौद्धिक दु गांधार' फ्रेंचभाषेतील पुस्तक भाषेत असलं तरी, गांधार कलेतील मूर्तीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी यातील चित्रे आणि विश्लेषण जागतिक स्तरावर प्रमाण मानले जाते. २, 'बुद्धाची पहिली मानवी मूर्ती' आणि ती तयार होण्यामागची प्रक्रिया यावर सविस्तर निबंध.

टर्मीनेटर Mon, 02/02/2026 - 18:54
एकतर विषय एकदम फालतू... म्हणजे काही ठराविक लोकांसाठी रसाचा असू शकेल... त्यात ज्यांना ह्या फालतू विषयात रस असेल त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देता येत नसेल तर काय उपयोग आहे असल्या फालतू विषयांचा?
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.
हे उत्तर समाधानकारक ठरेल का? तुमच्या लिखाणाला कमी किंवा निरर्थक ठरवायचा कोणताही हेतू नाही, पण मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. Mon, 02/02/2026 - 19:41
परफेक्ट..... ab .
मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
अनुभव काय? ........ ;) बाहुबलीला लै अनुभव आहे त्याला विचारयला पाहिजे..

सोत्रि Mon, 02/02/2026 - 19:47
असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
टर्मीनेटर, लेखाच्या विस्कळीत मांडणीबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. त्याबद्दल दुमत नाही. (गीतारहस्य ह्या मालिकेतही विस्कळीत मांडणीमुळे चांगला विषय वाया गेला होता हे माझं वैयक्तिक मत आहे.) पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ! - (जजमेंटल नसलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी Mon, 02/02/2026 - 19:50
सहमत. अगदी नाउमेद न करता तितक्याच ठामपणे हेच म्हणणे मांडणे शक्य होते.

In reply to by सोत्रि

टर्मीनेटर Tue, 02/03/2026 - 00:26
पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ!
सोकाजीनाना... आपला मिपा परिवार खूप मोठा आहे आणि त्यात आपली काही हक्काची माणसे आहेत. भक्ती ताई त्या हक्काच्या माणसांपैकीच आहेत. माझा प्रतिसाद थोडा (थोडा काय जास्तच) रुड वगैरे वाटला असेल, पण फार काही स्पष्टीकरण न देता एवढेच सांगतो "समझने वाले समझ गये हैं, ना समझे... ना समझे वो 'खिलाडी' हैं" 😀

गामा पैलवान Mon, 02/02/2026 - 21:19
सोत्रि,
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का?
प्रश्न अतिशय रोचक आहे. निर्वाणाची अद्वैतासोबत तुलना होऊ शकते का असाही एक उपप्रश्न पडतो. शिवाय पुनर्जन्माचाही प्रश्न आहेच. अद्वैत साधेपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो ( वा मायेमुळे घ्यावा लागतो ). तर मग निर्वाण साधेपर्यंत पुनर्जन्म कोण घेतं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Bhakti Mon, 02/02/2026 - 21:59
आता याच विषयावर एक संशोधन पेपर वाचतेय, पण मी अजिबात यात काय लिहिलंय ते सांगणार नाही... कारण मी अभ्यासक नाही!

कंजूस Mon, 02/02/2026 - 21:41
मी नाही त्यातला. लेख आवडला म्हणतो. नवअभ्यासकांना नवीन विषयात प्रश्न पडतात. त्यांना हुरुप येतो. त्याची उत्तरे देण्याचा कुणी प्रयत्न करतो. मलाही बुद्ध समजला नाही आणि गीताही नाही. पुस्तके वाचतो. त्यात कुणी काय लिहिले ते सांगतो. दोन्ही विषय गहन आहेत. पण श्रद्धा अती थोर आहे. त्यावर जग चालते. ख्रिश्चन लोक ( फादर) तुकारामाच्या साहित्याचा अभ्यास करतात. कारण तुकाराम अतिशय सोप्या भाषेत लोकांना मर्म सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.... पंडीत लोक फुटपट्टी घेऊन जातात अनुनयी श्रद्धा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 02/02/2026 - 21:57
हो ना कंकाका, माझा हेतू कायमच स्वछ असतो.मिपावर लेख द्यायला आवडयचं, फार " व्यासंगी " लोकांचे मत समजतात. पण पूर्ण अभ्यासू असल्याशिवाय लेख कशाला इथे द्यायचे.?? मी जर अभ्यासक असते तर कशाला लेख लिहिले असते?? "पुस्तकच लिहिले नसते का??" पण एकंदरीत अभ्यासक नसल्यास इथे लिहू नये, हा मोठा धडा आज इथे मिळाला. आपलं चेपूच बरं, नॉन अभ्यासाकांना! उरलो आता वाचनापुरते!!!

In reply to by Bhakti

गामा पैलवान Mon, 02/02/2026 - 23:57
भक्ती, पांघरा गेंड्याची कातडी आणि लिहा हो बेधडक. एक ठेच लागली तर वाचनमात्र होताय! काय म्हणावं तुम्हांस. उघडं पडायची वेळ आली तेव्हा मी कसा बघा ढोबळमानाने मोघम मार्ग पत्करला. मध्यममार्ग म्हणतात तो हाच तर नव्हे? आ.न., -गा.पै.

In reply to by Bhakti

कंजूस Tue, 02/03/2026 - 04:22
कालच्या प्रतिसादात एक वाक्य मी लिहिलं होतं पण ते नंतर गाळलं होतं. आणि तसंच झालं. यापुढे " Bhakti लेखन करणार नाही." आणि तेच तिने लिहिलंय.

लेखन करीत राहा. लोक टीका करीत राहतात. लेखनात यंव नाही, लेखनात त्यंव नाही, हे असं सगळं चालायचंचं. आपल्याला वाटतं लिहायचं तरी नक्की लिहा. कोणताही प्रस्थापित अभ्यासक-लेखक हा पहिल्यांदा नवलेखकच असतो, तेव्हा आपण नवलेखक आहोत असे समजून लिहीत राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Tue, 02/03/2026 - 10:17
भक्तीताई टिकेला घाबरून पळ काढणाऱ्यांतल्या नाहीत हो सर, त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि 'त्या' प्रतिसादाचा रोख नक्की कशाकडे आहे हे समजण्या एवढ्या 'स्मार्ट' देखील आहेत. त्यामुळे चिंता नसावी, त्या लिहित्या रहातील ह्याची खात्री बाळगा!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. Tue, 02/03/2026 - 19:18
तुमचे पर्सनल व्हॅल्युएशन तुमच्यापाशी, इथे मिपावर लिहू नका असे सुचवणेच चुकीचे आहे. लेखकाने कीती स्मार्ट आणि स्ट्राँग राहायचे ते लेखकाने स्वतः ठरवायचे, कुणी लिहू नका म्हणले तर त्यातून काय अर्थ निघतो हे बघण्याआधी "तू कोण सांगणार?" हे विचारावे अशीच माझीतर अपेक्षा आहे. अर्थात कित्येक पटाईत लेखकांनी काहीही लिहिण्यापेक्क्षा काही लिहूच नये अशी सर्वसामान्य अपेक्षा असताना तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करुन भक्तीताईसारख्या मिपाधर्म सांभाळणार्‍या अस्सल मिपाकर लेखिकेला इथे लिहू नको असे सांगणे खरेच दुर्दैवी आहे. टर्मीभाऊंची मनातली सच्छील इच्छा समजत असली आणि त्यांचा प्रांजळ स्वभाव कळत असला तरी......... टर्मीनेटर तुम्हारा इधर चुक्याच....

कंजूस Tue, 02/03/2026 - 10:38
टीका केल्याने / झाल्याने बरेच नवलेखक येथून पळाले आहेत. आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]

In reply to by कंजूस

Bhakti Tue, 02/03/2026 - 11:50
आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]
एकदम बरोब्बर काका, हाच सरळ स्वच्छ हेतू असतो सोशल मीडियावर लिहिताना. पण दरवेळी आपल्यालाच आत्मपरीक्षण करायची वेळ येत असेल तर... जरा थांबलंच पाहिजे,बदलायला पाहिजे हॆ जाणवत आहे.

तरी पुन्हा सांगतो. मिपावर(किवा कुठल्याही सोमिवर) व्यक्त होण्याआधी "फाट्यावर मारणे" हा मुख्य गुण अंगी बाणवुन घ्यावा लागतो. ज्ञानोबांनी सांगितलेच आहे " जे की राजहंसाचे चालणे........" पूर्ण ओवी आठवत नाही पण म्हणुन कावळ्याने चालुच नये की काय? असे काहीसे.

गोरगावलेकर Tue, 02/03/2026 - 13:24
भक्ती ताई, मिपावर सल्ला देण्या इतका माझा अभ्यास नाही . तरीही सांगते, निराश होऊ नका. टर्मीनेटर यांनी पूर्वी कोणाच्या तरी काश्मीर भटकंतीबद्दल असाच एक संक्षिप्त प्रतिसाद दिला होता तो बऱ्याच जणांना रुचला नव्हता. पण नंतर त्यांनी त्यामागचा हेतू स्पष्ट केला तेव्हा तो बहुतेकांना आणि मुख्य म्हणजे ज्याला उद्देशून लिहिला होता त्यालाही पटला. असाच एक प्रतिसाद माझ्या लेखातील फोटोंबद्दलही होता. नंतर माझ्या पुढील लेखात सुधारणा झाल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. तेव्हा त्यांच्या स्पष्ट बोलण्यात निश्चितच काही चांगला हेतू असेल. लिहिते रहा.

गवि Tue, 02/03/2026 - 13:37
लिहीत रहा पण रँडम असंख्य विषयांवर वरवर लिहिण्याऐवजी आपल्याला आतून प्रचंड उर्मी येईल तेव्हा जे काही मनातून येईल ते लिहा. ते नेहमीच चांगलं असेल. लोकांना ते आवडेल आणि एखाद दुसऱ्याला नाही आवडलं तरी ते पटलं नाही या स्वरूपात असेल. जर आत्मपरीक्षण करण्याची गरज जाणवली असेल तर ते मोठं यश आहे. तुटक किंवा कडवट होऊन आता लेखनच थांबवते असं म्हणण्यात अर्थ नाही. याची कारणे दोन: १. मनातून ते पटत नसतं. नुसतं म्हणायला म्हटलेलं असतं. २. खरंच लिहिणं बंद केलं तर जगाला काही फारसा फरक पडत नसतो. आपण विस्मरणात विलीन होऊन जातो. तर लिहिण्याची गरज आपल्याला आहे हे मान्य करून "आता थांबले पाहिजे" वगैरे असे कोणतेही जाहीरनामे करणे आवश्यक नाही. लोकांसाठी आपण लिहीतो. पूर्ण स्वांत सुखाय लिहिणे हा भ्रम आहे. लोकांपुढे आपण ठेवतो तेच मुळात त्यांना आवडेल अशा अपेक्षेने. त्यांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. जशी रेसिपी तसंच हे. मग ते चेक न करता, अशुद्ध (भाषा अशुद्ध नव्हे, लेखन टंकन), शब्दांची आगगाडी, सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे होतोय त्याचे भान टाळून असे लिहीले तर लोकांना ते वाचताना आनंद कसा मिळेल ! ? अर्थ, भावार्थ हे पुढचे पुढे राहिले. तेव्हा लिहिणे थांबवू नका. विचार करा. आणि अभ्यासोनि प्रकटा. प्रचू, लिहित बरोबर की लिहीत?

प्रचेतस Tue, 02/03/2026 - 14:46
लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण नाही, उलट आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करता हे कौतुकास्पदच आहे. मुळात असे विषय जरा अवघड. मूर्तीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अशा विषयांवर लिहिणे सोपे नव्हेच. एकवेळ हिंदू मूर्तीशास्त्र तुलनेने सोपे आहे, लक्षणे स्पष्ट असतात, तत्त्वज्ञान समजणेही बऱ्याच साधनांमुळे काहीसे साध्य होते मात्र बुद्ध किंवा जैन तत्त्वज्ञाने अथवा मूर्तीतील फरक समजणे सोपे नाही, अतिशय कमी किंवा अस्पष्ट लक्षणे असतात, साधनेही अत्यंत मर्यादित असतात. लिहिताना काही गडबड होणे किंवा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता न येणे हे साहजिक आहे पण म्हणून अभ्यास सोडायचा नाही किंवा लिहिणेही सोडायचे नाही. उलट प्रतिसादांतून अधिकाधिक माहिती मिळत जाते हा फायदाच.

कंजूस Tue, 02/03/2026 - 14:56
सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं नोंदवणे किंवा फोटो देणे. मग अभ्यासक त्यामागचे रहस्य सांगत जातात. माझ्याकडे बुद्धाच्या भारतातील लेणी लेख इमारती स्तूप किंवा संबंधित गोष्टींवर पर्यटन माहिती आहे ती मी इथे एका वेगळ्या लेखात देईन म्हणतो. माहिती मला विविध प्रदर्शनातील पत्रकांतून मिळाली आहे. काॅपिराईटचा प्रश्न नाहीये. फक्त अडचण काय की काही माहिती पत्रके फार मोठ्या साईजची आहेत. त्यांचा एक मोठा फोटो काढून पाहतो. कुणाला उत्साह आणि आवड असल्यास उपयोगी पडेल.

Bhakti Tue, 02/03/2026 - 17:48
योगायोगाने हॆ आजच दिसले.. 1 तुमच्या सर्वांच्या आपुलकीपूर्ण प्रतिसादने खरंच भारवले आहे_/\_ माझं पुस्तकांवर, शब्दांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी लिहिणं थांबवण शक्यच नाही पण काही काळं ब्रेक योग्य ठरेल.भेटू लवकरच!

कंजूस Fri, 01/30/2026 - 17:24
बरीच माहिती गोळा केली आहे. शाळेत असताना ' गौतमाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि तो बुद्ध झाला' हे वाचलेले. पण कोणते ज्ञान हे काही कुणी सांगायला तयार नव्हते. बुद्ध आणि त्याचा धम्म - बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचल्यावर कळलं.

गामा पैलवान Sat, 01/31/2026 - 00:05
भक्ती, कृपया या वाक्यातले कृबुसंस्करण उलगडावे :
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
याचा अर्थ का होतो ? बाकी, इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो. नास्तिक हा शब्द देवांचे अस्तित्व नाकारण्याशी संबंधित नाही. वेदांचे आधिपत्य नाकारले तरी वेद हेच मूळ श्रुती आहेत असं बौद्ध मानतात. आ.न., -गा.पै.

Bhakti Sat, 01/31/2026 - 11:30
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
हरिती हिची कथा हरिती स्वतःच्या अनेक मुलांच्या उदरनिर्वाहासाठी इतरांची मुले चोरून खात असे .दुखी पालकांनी बुद्धांकडे तक्रार केली. बुद्धांनी हरितीला धडा शिकवण्यासाठी तिच्या सर्वात लाडक्या मुलाला पिंगलला लपवून ठेवले .मूल न सापडल्याने ती व्याकुळ झाली. बुद्धांनी तिला जाणीव करून दिली की, हजारो मुले असूनही एका मुलासाठी तुला इतके दुःख होत आहे, तर ज्यांची एकमेव मुले तू खाल्लीस, त्यांना किती दुःख झाले असेल?आपली चूक लक्षात आल्यावर हरितीने माफी मागितली आणि बुद्धांची अनुयायी बनली. ती मुलांची संरक्षक देवी म्हणून पूजली जाऊ लागली. पण तरीही तिला मांसभक्षणाची आठवण होई.रक्तप्राशन करावे वाटे तेव्हा रक्ताप्रमाणेच लाल रंगाचा ज्याचा रस ते डाळींबाचे दाणे त्याचा रस हे रक्ताचे रूपक होऊन ही तृषा शमवत.
याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो.
>ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे. वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही
.
इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? स्वतः बुद्धांनी याला विरोध केला.पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला हे वरती मी स्पष्टच लिहिले आहे की !

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 01/31/2026 - 11:36
पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला ऐवजी असे वाचा... पण मुळात अनुयायांनी हा (मुर्ती,कर्मकाण्ड) पसारा वाढवला.

In reply to by Bhakti

गामा पैलवान Sun, 02/01/2026 - 15:26
भक्ती, माझ्या मते गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे. मात्र त्याच्या अनुयायांच्या बाबतीत असं ठामपणे म्हणता येईल का? मी साशंक आहे. बाकी, बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. पहिला बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन होऊन गेला. तो बुद्धाच्या नंतर तीनचारशे वर्षांनी जन्मला होता. यावरून बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे. कुठल्याही पारंपरिक भारतीय पंथात दैवते शिरतात तशीच यांतही शिरली. वैविध्यपूर्ण दैवते हा भारतीय जनमानसाचा अविष्कार आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि Sun, 02/01/2026 - 20:54
गामाजी,
गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे.
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे
बुद्धाने वयाच्या ३५ -८० वर्षांपर्यंत त्याच्या शिकवणीचा त्याच्या प्रवचनांमधून (discourses) तो जिथे जिथे गेला तिथे तिथे प्रसार केला. त्याच प्रवचनांचं डॅाक्युमेंटेशन पुढे त्रिपीटकात केलं गेलं, त्याचा पश्चात. बुद्धाने कोणताही धर्म स्थापन केला नाही, धर्म (धम्म) ह्या शब्दाची योग्य व्याख्या त्याने विषद केली त्याच्या शिकवणूकीतून (प्रवचनांमधून), तसेच कोणताही पंथही त्याने स्थापन केली नाही. त्याच्या ध्यानप्रणालीची अनुपासना करणाऱ्या साधकांच्या समूहाला संघ म्हणतात पण त्यात कसलंही कर्मकांड नसल्याने, गुरू आणि गादी (उत्तराधिकारी) नसल्याने, कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा विचारसरणीच्या लोकांसाठी मर्यादित नसल्याने तो पंथ नाही. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

गामा पैलवान Mon, 02/02/2026 - 02:43
सोत्रि,
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
माझी माहिती मर्यादित आहे. पण तेव्हढ्यावर निष्कर्ष काढता येतो. जर बुद्ध वेदांविषयी आदर बाळगून नसेल तर तसं स्पष्ट म्हंटलं असतं त्यानं. बाकी माझं ढोबळ विधान स्पष्ट करावयास गुग्गुळाचार्य आहेतंच : https://www.google.com/search?q=buddha+respected+vedas खरंतर तुम्हालाच याविषयी सखोल जाण आहे. बौद्ध हा पंथ नसेल तर महायान, हीनयान वगैरे काय म्हणावेत? संप्रदाय म्हणावेत का? माझी माहिती अत्यंत मर्यादित असल्याने मला हा प्रश्न पडला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि Mon, 02/02/2026 - 14:02
गामाजी, ते ढोबळ विधान आहे असे म्हणता आहात तर ते तिथेच सोडून देवूयात. महायान, थेरवाद (हीनयान), वज्रयान, नवयान हे सगळे संप्रदाय म्हणता येतील कारण गटांची स्वतःची वेगळी तत्वज्ञानात्मक मांडणी आहे जरी मूळ आधारस्तंभ 'बुद्ध, धम्म आणि संघ' हेच आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by Bhakti

सोत्रि Mon, 02/02/2026 - 14:46
ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे.
काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti Mon, 02/02/2026 - 16:48
सुत्त निपत ८४६- ना वेदगु दिठथिया ना मुतिया सा मनामेति नही तन्मयोसो…. जो वेद जाणतो त्याला खोटा अहंकार येत नाही. तो ऐकीव गोष्टी आणि भ्रमांचा परिणाम करत नाही.
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही

In reply to by Bhakti

सोत्रि Mon, 02/02/2026 - 18:37
भक्ती, वेदगु शब्दात वेद आलेलं असलं तरी त्यात अभिप्रेत असलेला अर्थ ४ वेदांचा वेद नाही. त्याची फोड आणि अर्थ पाली भाषेत आणि त्रिपिटकाच्या परिप्रेक्षात खालीलप्रमाणे: वेद म्हणजे सर्वोच्च ज्ञान अणि गु म्हणजे प्राप्त केलेला. बुद्धाला प्राप्त झालेलं ज्ञान ह्याचा बेस वेदना (संवेदना) आहे, सतीपट्ठाण सुत्तात ह्याचे सविस्तर विष्लेषण आहे. त्यानुसार वेदना पर करून सत्यापर्यंत पोहोचलेला म्हणजे वेदगु. वेद जाणणारा म्हणजे वेदगु हे शब्दसाधर्म्यामुळे झालेलं अशुद्ध भाषांतर आहे. मूळ प्रश्न होता, काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? त्याचं उत्तर मिळालं नाही. तसेच नविन मुद्दा आला ह्या प्रतिसादात, वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का? आणि त्या दोन्हीच्या परिप्रेक्षात अहंकार म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे? - (जिज्ञासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी Mon, 02/02/2026 - 19:06
मग ते इतर संदर्भ वेदांचेच होते हे तरी कसे समजले ? तीन वेद जाणणारा हा हे इतर तीन विद्या जाणणारा नसेल कशावरून ? त्रिपिटक जर तीन आहेत तर इतर विद्या सुद्धा तीन शाखांमध्ये विभागलेल्या असू शकतात.

कॉमी Sun, 02/01/2026 - 09:44
बुध्दाने वेदाचे अधिपत्य नाकारले. बुद्धकाळात किंवा सर्वात जुन्या पाली लिखित साहित्यात वेदांचा उल्लेख आहे का ? बुद्ध वेदांबद्ल स्पष्टपणे बोलताना कुठेही आहे का ?

In reply to by कॉमी

सोत्रि Sun, 02/01/2026 - 21:20
पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात जुने बौद्ध साहित्य) वेदांचा आणि तत्कालीन वैदिक परंपरेचा अत्यंत स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख आढळतो. बुद्ध केवळ वेदांबद्दल बोललेच नाहीत, तर त्यांनी त्या काळातील वैदिक कर्मकांडांची आणि तत्त्वज्ञानाची तर्कशुद्ध चिकित्साही केली आहे. पाली साहित्यात वेदांना 'तेविज्ज' (त्रिवेद) असे म्हटले आहे. बुद्धांच्या काळात प्रामुख्याने तीनच वेद प्रचलित होते: ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. (अथर्ववेदाला नंतरच्या काळात वेदाचा दर्जा मिळाला). अनेक सुत्तांमध्ये बुद्धाने वेदांवर आणि त्यांच्या अधिकारावर भाष्य केले आहे. त्यापैकी काही प्रमुख संदर्भ: तेविज्ज सुत्त (दीघ निकाय): हे सर्वात महत्त्वाचे सुत्त आहे. यात दोन ब्राह्मण बुद्धांकडे येऊन विचारतात की, "कोणता वेद मार्ग खरा आहे?" बुद्ध त्यांना विचारतो की, "ज्या वेदांचे तुम्ही पठण करता, त्या मंत्रांच्या ऋषींनी कधी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहिले होते का?" जेव्हा उत्तर 'नाही' येते, तेव्हा बुद्ध सांगतात की, ज्यांनी स्वतः पाहिलेले नाही अशांच्या परंपरेचे आंधळेपणाने पालन करणे म्हणजे "आंधळ्यांच्या रांगेसारखे" (अंधवेणु) आहे, जिथे पुढच्याला दिसत नाही आणि मागच्यालाही नाही. अस्सलायन सुत्त (मज्झिम निकाय): यामध्ये बुद्ध वेदांवर आधारित 'चातुर्वर्ण्य' व्यवस्थेला आव्हान देतो. तो म्हणतो की, निसर्गात सर्व माणसे समान आहेत आणि श्रेष्ठत्व हे जन्मावरून (किंवा वेदांच्या ज्ञानावरून) नसून ते कर्मावरून ठरते. सुत्त निपात (ब्राह्मणधम्म सुत्त): यात बुद्ध सांगतो की, प्राचीन ऋषी हे चारित्र्यसंपन्न होते, पण नंतरच्या काळात वेदांच्या नावाखाली प्राण्यांचे बळी देणे आणि कर्मकांड करणे सुरू झाले, जे चुकीचे आहे. - (अभ्यासू) सोकाजी

प्रचेतस Sun, 02/01/2026 - 09:57
लेख खूपच संक्षिप्त वाटला, नव्हे आहेही. बौद्ध मूर्तीशास्त्र म्हटलं की जरा अधिक उपापोह हवा होता. मूर्ती ओळखण्याची प्रमुख साधने म्हणजे मुद्रा, लांच्छन, वृक्ष. ह्यांचे अधिक वर्णन फोटोसहित हवे होते. गौतम बुद्ध म्हणजे शाक्यमुनी, भविष्यातील बुद्ध मैत्रेय ह्यांचा उल्लेख कुठे दिसला नाही. हे सर्व मानुषी बुद्ध. त्यांच्या आधीचे विपश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छन्द, कनकमुनी, काश्यप ह्यांचा उल्लेखही आवश्यक होता. परत बौद्ध मूर्तीकलेत गांधारकला अधिक सुप्रसिद्ध आहे. त्याचा आढावा घ्यायला हवा होता. बाकी वेरुळ येथे महायान आणि वज्रयान परंपरेतील अनोखी शिल्पे पाहायला मिळतात. जिज्ञासूंना मानुषी बौद्ध, ध्यानी बुद्ध, स्त्री बोधीसत्व, तारा, महामायुरी, पद्मपाणी, वज्रपाणी, जंभाल, हरिती, रक्तअवलोकितेश्वर, सुजाता, मैत्रेय अशी अनोखी शिल्पे पाहायची असतील तर जरुर तेथे जाऊन ती पाहावीत.

In reply to by प्रचेतस

कंजूस Sun, 02/01/2026 - 20:18
यावर एक यूट्यूबवर मालिकाच काढावी. म्हणजे व्हिडिओंची लिंक दिली की झाले काम. वेरुळच्या लेण्यांवरही मालिका असावी. एकदा सगळे फोटो जमा करायचे आणि ते जोडायचे स्लाईडशोमध्ये आणि त्याला मागून नंतर आवाज द्यायचा.

In reply to by प्रचेतस

Bhakti Mon, 02/02/2026 - 16:58
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.बाकी बोधिसत्वचा काहीतरी विशिष्ट क्रम आहे ,जो मला नीट समाजाला नाही ...हे मी वरती लिहिलेच आहे.
रक्तअवलोकितेश्वर,
वेरुळंंमधील बौद्ध शिल्प त्याकाळात नैसर्गिक रंगाने रंगवले होते .अगदी बौद्ध पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे!परंतु कालाच्या प्रवाहात ते रंग नाहीसे झालं.रंगीत शिल्प तेव्हा किती सुंदर दिसत असतील.गांधार ,मथुरा शैली अजून फरक थोडा थोडा समाजात आहे .शैव ,वैष्णव अभ्यासक्रमातही तशा मूर्तीशैली फरक सांगितला जायचा.

In reply to by प्रचेतस

लेखन संक्षीप्त असलं तरी, लेखिकेने सुरुवातीलाच लिहिले होते की, 'चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो' आपल्याला जितके उमजले तितके लिहिणे ही चांगली गोष्ट आहे. आता उहापोह म्हटलं की जाणकारांनी लिहिले पाहिजे. जसे की, धाग्याच्या निमित्ताने सोत्रि यांनी अनुषांगिक अशी उत्तम माहिती भरली आहे. आपल्यासारखा जाणकारांनी अशा धाग्यात भर घातली पाहिजे. असे धागे समृद्ध होतात असे वाटते. बौद्ध धर्मातील हिनयान (थेरवाद) आणि महायान या दोन प्रमुख पंथांमध्ये तत्त्वज्ञानासोबतच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत आणि रंजक फरकआहेच. या फरकांचा उगम बुद्धत्वाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून होतो. आणि मग तशी सविस्तर मांडणी केली पाहिजे असे वाटते. हीनयान यात बुद्ध एक मानवी महापुरुष आणि मार्गदर्शक मानले गेले. सुरुवातीच्या काळात बुद्धांना मानवी रूपात दाखवणे वर्ज्य होते. त्यांच्या उपस्थितीसाठी पदकमल, धम्मचक्र, बोधिवृक्ष किंवा रिकामे आसन वापरले जात होते. साधी आणि संयमित कला स्तूप वगैरे. महायान यात, बुद्धांना मानवी रूपात आणि भव्य स्वरूपात पूजले जाते. यामध्ये विविध मुद्रा (उदा. भूस्पर्श, अभय, ध्यान) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. महायानमध्ये अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा, वज्रपाणी अशा अनेक बोधिसत्वांच्या अलंकारिक आणि विविध आयुधे धारण केलेल्या मूर्ती आढळतात. अत्यंत सुशोभित, दागिने, मुकुट आणि भव्यता असलेली कला. बुद्धाच्या काळात मूर्ती शक्य नव्हते तर पहिली मूर्ती केव्हा आली त्याबद्दल असे म्हटल्या जाते की, बुद्धाची पहिली मानवी मूर्ती ग्रीक-बौद्ध कलाशैलीतून निर्माण झाली. जेव्हा ग्रीक लोक भारताच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या देवांना मानवी रूपात कोरण्याची जुनी परंपरा होती. ग्रीक मूर्तिकारांनी बुद्धाला मानवी शरीर दिले, ज्याला त्यांनी 'अपोलियन बुद्ध ' असे म्हटले. अल्फ्रेड फुशे यांची ही कल्पना आहे, अर्थात ही सर्व गांधार शैली. उदा. केस भारतीय परंपरेत बुद्धाचे केस मुंडण केलेले किंवा कुरळे दाखवले जातात, पण अपोलोनियन बुद्धामध्ये ते ग्रीक शैलीतील लाटांसारखे आणि वरच्या बाजूला बांधलेले असतात. चेहरा अत्यंत रेखीव, सरळ तीक्ष्ण नाक आणि अंडाकृती चेहरा असतो, जो हुबेहूब ग्रीक शिल्पांसारखा दिसतो. बुद्धाने परिधान केलेले 'चीवर' (वस्त्र) हे साध्या कापडासारखे नसून ग्रीक 'टोगा' जाड असे असते. असे असले तरी, बुद्धाची मूर्ती ही गांधार शैलीची 'मथुरा शैली' ची यावर अभ्यासकात वाद आहेत. खालील संदर्भ पुस्तके जाणकारांनी वाचून सविस्तर लिहावे असे वाटले. संदर्भ ः १. अल्फ्रेड फूशेचं 'आर्ट ग्रेको-बौद्धिक दु गांधार' फ्रेंचभाषेतील पुस्तक भाषेत असलं तरी, गांधार कलेतील मूर्तीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी यातील चित्रे आणि विश्लेषण जागतिक स्तरावर प्रमाण मानले जाते. २, 'बुद्धाची पहिली मानवी मूर्ती' आणि ती तयार होण्यामागची प्रक्रिया यावर सविस्तर निबंध.

टर्मीनेटर Mon, 02/02/2026 - 18:54
एकतर विषय एकदम फालतू... म्हणजे काही ठराविक लोकांसाठी रसाचा असू शकेल... त्यात ज्यांना ह्या फालतू विषयात रस असेल त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देता येत नसेल तर काय उपयोग आहे असल्या फालतू विषयांचा?
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.
हे उत्तर समाधानकारक ठरेल का? तुमच्या लिखाणाला कमी किंवा निरर्थक ठरवायचा कोणताही हेतू नाही, पण मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. Mon, 02/02/2026 - 19:41
परफेक्ट..... ab .
मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
अनुभव काय? ........ ;) बाहुबलीला लै अनुभव आहे त्याला विचारयला पाहिजे..

सोत्रि Mon, 02/02/2026 - 19:47
असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
टर्मीनेटर, लेखाच्या विस्कळीत मांडणीबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. त्याबद्दल दुमत नाही. (गीतारहस्य ह्या मालिकेतही विस्कळीत मांडणीमुळे चांगला विषय वाया गेला होता हे माझं वैयक्तिक मत आहे.) पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ! - (जजमेंटल नसलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी Mon, 02/02/2026 - 19:50
सहमत. अगदी नाउमेद न करता तितक्याच ठामपणे हेच म्हणणे मांडणे शक्य होते.

In reply to by सोत्रि

टर्मीनेटर Tue, 02/03/2026 - 00:26
पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ!
सोकाजीनाना... आपला मिपा परिवार खूप मोठा आहे आणि त्यात आपली काही हक्काची माणसे आहेत. भक्ती ताई त्या हक्काच्या माणसांपैकीच आहेत. माझा प्रतिसाद थोडा (थोडा काय जास्तच) रुड वगैरे वाटला असेल, पण फार काही स्पष्टीकरण न देता एवढेच सांगतो "समझने वाले समझ गये हैं, ना समझे... ना समझे वो 'खिलाडी' हैं" 😀

गामा पैलवान Mon, 02/02/2026 - 21:19
सोत्रि,
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का?
प्रश्न अतिशय रोचक आहे. निर्वाणाची अद्वैतासोबत तुलना होऊ शकते का असाही एक उपप्रश्न पडतो. शिवाय पुनर्जन्माचाही प्रश्न आहेच. अद्वैत साधेपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो ( वा मायेमुळे घ्यावा लागतो ). तर मग निर्वाण साधेपर्यंत पुनर्जन्म कोण घेतं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Bhakti Mon, 02/02/2026 - 21:59
आता याच विषयावर एक संशोधन पेपर वाचतेय, पण मी अजिबात यात काय लिहिलंय ते सांगणार नाही... कारण मी अभ्यासक नाही!

कंजूस Mon, 02/02/2026 - 21:41
मी नाही त्यातला. लेख आवडला म्हणतो. नवअभ्यासकांना नवीन विषयात प्रश्न पडतात. त्यांना हुरुप येतो. त्याची उत्तरे देण्याचा कुणी प्रयत्न करतो. मलाही बुद्ध समजला नाही आणि गीताही नाही. पुस्तके वाचतो. त्यात कुणी काय लिहिले ते सांगतो. दोन्ही विषय गहन आहेत. पण श्रद्धा अती थोर आहे. त्यावर जग चालते. ख्रिश्चन लोक ( फादर) तुकारामाच्या साहित्याचा अभ्यास करतात. कारण तुकाराम अतिशय सोप्या भाषेत लोकांना मर्म सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.... पंडीत लोक फुटपट्टी घेऊन जातात अनुनयी श्रद्धा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 02/02/2026 - 21:57
हो ना कंकाका, माझा हेतू कायमच स्वछ असतो.मिपावर लेख द्यायला आवडयचं, फार " व्यासंगी " लोकांचे मत समजतात. पण पूर्ण अभ्यासू असल्याशिवाय लेख कशाला इथे द्यायचे.?? मी जर अभ्यासक असते तर कशाला लेख लिहिले असते?? "पुस्तकच लिहिले नसते का??" पण एकंदरीत अभ्यासक नसल्यास इथे लिहू नये, हा मोठा धडा आज इथे मिळाला. आपलं चेपूच बरं, नॉन अभ्यासाकांना! उरलो आता वाचनापुरते!!!

In reply to by Bhakti

गामा पैलवान Mon, 02/02/2026 - 23:57
भक्ती, पांघरा गेंड्याची कातडी आणि लिहा हो बेधडक. एक ठेच लागली तर वाचनमात्र होताय! काय म्हणावं तुम्हांस. उघडं पडायची वेळ आली तेव्हा मी कसा बघा ढोबळमानाने मोघम मार्ग पत्करला. मध्यममार्ग म्हणतात तो हाच तर नव्हे? आ.न., -गा.पै.

In reply to by Bhakti

कंजूस Tue, 02/03/2026 - 04:22
कालच्या प्रतिसादात एक वाक्य मी लिहिलं होतं पण ते नंतर गाळलं होतं. आणि तसंच झालं. यापुढे " Bhakti लेखन करणार नाही." आणि तेच तिने लिहिलंय.

लेखन करीत राहा. लोक टीका करीत राहतात. लेखनात यंव नाही, लेखनात त्यंव नाही, हे असं सगळं चालायचंचं. आपल्याला वाटतं लिहायचं तरी नक्की लिहा. कोणताही प्रस्थापित अभ्यासक-लेखक हा पहिल्यांदा नवलेखकच असतो, तेव्हा आपण नवलेखक आहोत असे समजून लिहीत राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Tue, 02/03/2026 - 10:17
भक्तीताई टिकेला घाबरून पळ काढणाऱ्यांतल्या नाहीत हो सर, त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि 'त्या' प्रतिसादाचा रोख नक्की कशाकडे आहे हे समजण्या एवढ्या 'स्मार्ट' देखील आहेत. त्यामुळे चिंता नसावी, त्या लिहित्या रहातील ह्याची खात्री बाळगा!

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. Tue, 02/03/2026 - 19:18
तुमचे पर्सनल व्हॅल्युएशन तुमच्यापाशी, इथे मिपावर लिहू नका असे सुचवणेच चुकीचे आहे. लेखकाने कीती स्मार्ट आणि स्ट्राँग राहायचे ते लेखकाने स्वतः ठरवायचे, कुणी लिहू नका म्हणले तर त्यातून काय अर्थ निघतो हे बघण्याआधी "तू कोण सांगणार?" हे विचारावे अशीच माझीतर अपेक्षा आहे. अर्थात कित्येक पटाईत लेखकांनी काहीही लिहिण्यापेक्क्षा काही लिहूच नये अशी सर्वसामान्य अपेक्षा असताना तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करुन भक्तीताईसारख्या मिपाधर्म सांभाळणार्‍या अस्सल मिपाकर लेखिकेला इथे लिहू नको असे सांगणे खरेच दुर्दैवी आहे. टर्मीभाऊंची मनातली सच्छील इच्छा समजत असली आणि त्यांचा प्रांजळ स्वभाव कळत असला तरी......... टर्मीनेटर तुम्हारा इधर चुक्याच....

कंजूस Tue, 02/03/2026 - 10:38
टीका केल्याने / झाल्याने बरेच नवलेखक येथून पळाले आहेत. आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]

In reply to by कंजूस

Bhakti Tue, 02/03/2026 - 11:50
आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]
एकदम बरोब्बर काका, हाच सरळ स्वच्छ हेतू असतो सोशल मीडियावर लिहिताना. पण दरवेळी आपल्यालाच आत्मपरीक्षण करायची वेळ येत असेल तर... जरा थांबलंच पाहिजे,बदलायला पाहिजे हॆ जाणवत आहे.

तरी पुन्हा सांगतो. मिपावर(किवा कुठल्याही सोमिवर) व्यक्त होण्याआधी "फाट्यावर मारणे" हा मुख्य गुण अंगी बाणवुन घ्यावा लागतो. ज्ञानोबांनी सांगितलेच आहे " जे की राजहंसाचे चालणे........" पूर्ण ओवी आठवत नाही पण म्हणुन कावळ्याने चालुच नये की काय? असे काहीसे.

गोरगावलेकर Tue, 02/03/2026 - 13:24
भक्ती ताई, मिपावर सल्ला देण्या इतका माझा अभ्यास नाही . तरीही सांगते, निराश होऊ नका. टर्मीनेटर यांनी पूर्वी कोणाच्या तरी काश्मीर भटकंतीबद्दल असाच एक संक्षिप्त प्रतिसाद दिला होता तो बऱ्याच जणांना रुचला नव्हता. पण नंतर त्यांनी त्यामागचा हेतू स्पष्ट केला तेव्हा तो बहुतेकांना आणि मुख्य म्हणजे ज्याला उद्देशून लिहिला होता त्यालाही पटला. असाच एक प्रतिसाद माझ्या लेखातील फोटोंबद्दलही होता. नंतर माझ्या पुढील लेखात सुधारणा झाल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. तेव्हा त्यांच्या स्पष्ट बोलण्यात निश्चितच काही चांगला हेतू असेल. लिहिते रहा.

गवि Tue, 02/03/2026 - 13:37
लिहीत रहा पण रँडम असंख्य विषयांवर वरवर लिहिण्याऐवजी आपल्याला आतून प्रचंड उर्मी येईल तेव्हा जे काही मनातून येईल ते लिहा. ते नेहमीच चांगलं असेल. लोकांना ते आवडेल आणि एखाद दुसऱ्याला नाही आवडलं तरी ते पटलं नाही या स्वरूपात असेल. जर आत्मपरीक्षण करण्याची गरज जाणवली असेल तर ते मोठं यश आहे. तुटक किंवा कडवट होऊन आता लेखनच थांबवते असं म्हणण्यात अर्थ नाही. याची कारणे दोन: १. मनातून ते पटत नसतं. नुसतं म्हणायला म्हटलेलं असतं. २. खरंच लिहिणं बंद केलं तर जगाला काही फारसा फरक पडत नसतो. आपण विस्मरणात विलीन होऊन जातो. तर लिहिण्याची गरज आपल्याला आहे हे मान्य करून "आता थांबले पाहिजे" वगैरे असे कोणतेही जाहीरनामे करणे आवश्यक नाही. लोकांसाठी आपण लिहीतो. पूर्ण स्वांत सुखाय लिहिणे हा भ्रम आहे. लोकांपुढे आपण ठेवतो तेच मुळात त्यांना आवडेल अशा अपेक्षेने. त्यांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. जशी रेसिपी तसंच हे. मग ते चेक न करता, अशुद्ध (भाषा अशुद्ध नव्हे, लेखन टंकन), शब्दांची आगगाडी, सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे होतोय त्याचे भान टाळून असे लिहीले तर लोकांना ते वाचताना आनंद कसा मिळेल ! ? अर्थ, भावार्थ हे पुढचे पुढे राहिले. तेव्हा लिहिणे थांबवू नका. विचार करा. आणि अभ्यासोनि प्रकटा. प्रचू, लिहित बरोबर की लिहीत?

प्रचेतस Tue, 02/03/2026 - 14:46
लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण नाही, उलट आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करता हे कौतुकास्पदच आहे. मुळात असे विषय जरा अवघड. मूर्तीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अशा विषयांवर लिहिणे सोपे नव्हेच. एकवेळ हिंदू मूर्तीशास्त्र तुलनेने सोपे आहे, लक्षणे स्पष्ट असतात, तत्त्वज्ञान समजणेही बऱ्याच साधनांमुळे काहीसे साध्य होते मात्र बुद्ध किंवा जैन तत्त्वज्ञाने अथवा मूर्तीतील फरक समजणे सोपे नाही, अतिशय कमी किंवा अस्पष्ट लक्षणे असतात, साधनेही अत्यंत मर्यादित असतात. लिहिताना काही गडबड होणे किंवा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता न येणे हे साहजिक आहे पण म्हणून अभ्यास सोडायचा नाही किंवा लिहिणेही सोडायचे नाही. उलट प्रतिसादांतून अधिकाधिक माहिती मिळत जाते हा फायदाच.

कंजूस Tue, 02/03/2026 - 14:56
सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं नोंदवणे किंवा फोटो देणे. मग अभ्यासक त्यामागचे रहस्य सांगत जातात. माझ्याकडे बुद्धाच्या भारतातील लेणी लेख इमारती स्तूप किंवा संबंधित गोष्टींवर पर्यटन माहिती आहे ती मी इथे एका वेगळ्या लेखात देईन म्हणतो. माहिती मला विविध प्रदर्शनातील पत्रकांतून मिळाली आहे. काॅपिराईटचा प्रश्न नाहीये. फक्त अडचण काय की काही माहिती पत्रके फार मोठ्या साईजची आहेत. त्यांचा एक मोठा फोटो काढून पाहतो. कुणाला उत्साह आणि आवड असल्यास उपयोगी पडेल.

Bhakti Tue, 02/03/2026 - 17:48
योगायोगाने हॆ आजच दिसले.. 1 तुमच्या सर्वांच्या आपुलकीपूर्ण प्रतिसादने खरंच भारवले आहे_/\_ माझं पुस्तकांवर, शब्दांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी लिहिणं थांबवण शक्यच नाही पण काही काळं ब्रेक योग्य ठरेल.भेटू लवकरच!
लेखनविषय:
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:)) तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच...

अदृश्य जगाचे कुतूहल-०१

Bhakti ·

In reply to by हेमंतकुमार

Bhakti Mon, 01/12/2026 - 14:58
मला वाटत नाही ,इथे मी सर्व भाग देऊ शकेल.सुक्ष्मदर्शिका चार भागात लिहिली आहे.अल्ट्रामायक्रोस्कोप ,फेज काँट्रास्ट मायक्रोस्कोप,फ्लूओरेसेन्स मायक्रोस्कोप, टेम (TEM) आणि सेम (SEM) या सर्व सुक्ष्मदर्शिका थोड्क्यात समजण्यासाठी माझा ब्लॉग नक्की वाचा :) https://bhagat-bhakti.blogspot.com/ धन्यवाद.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर Mon, 01/12/2026 - 15:31
मला वाटत नाही ,इथे मी सर्व भाग देऊ शकेल.
का हो? द्या की इथेच... काही शंका असतील तर त्या विचारायला आणि पुरक माहिती शेअर करायला सदस्यांना ते सोयीचे ठरते.

स्वधर्म Mon, 01/12/2026 - 19:51
शास्त्रीय विषय गोष्टीरूपाने सोपा करून सांगितलाय. त्यामुळे वाचतच गेलो. आणखी लिहा. मागच्या वर्षी डार्वीनचे घर पाहण्याचा योग आला. त्यात काय काय जपून ठेवले आहे डार्वीनचे स्वतः चे अक्षर वगैरे. त्यात डार्वीनने वापरलेले तीन सूक्ष्मदर्शकही पाहिले. तिथल्या लोकांनी ते कसे सुधारत गेले तेही सांगितले व त्यातून सूक्ष्म वनस्पती पाहता आल्या.

सोत्रि Tue, 01/13/2026 - 04:53
सुंदर, माहितीपूर्ण प्रवाही लेख. - (तांत्रिक) सोकाजी

निनाद Tue, 01/13/2026 - 06:09
खूप छान ओळख करुन दिली. अवांतर भारतात सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवीधरांची संख्या मोठी असली, तरी आपण जागतिक संशोधनात मागे पडतोय, हे अगदी कडू सत्य आहे! याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपली पदवी-केंद्रित शिक्षण व्यवस्था. आपल्याकडे प्रयोगांपेक्षा परीक्षेत मार्क मिळवण्यावर आणि थिअरी पाठ करण्यावर जास्त भर दिला जातो. आणि त्या त्या विभागातले संशोधन सोडून बाकी सर्व राजकारण करणारे दिव्य प्राध्यापक आणि त्यांच्या टोळ्या! . तसाही संशोधनासाठी लागणारा निधी आणि जागतिक दर्जाच्या लॅब्स आजही मोजक्याच संस्थांमध्ये मर्यादित आहेत. संशोधन ही एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, पण आपल्याकडे उद्योगांकडून संशोधनात होणारी गुंतवणूक खूपच कमी आहे. आणि इथेच आपले प्राध्यापक माती खातात. मग काय करणार? त्यात भर पडते ब्रेन ड्रेनची. म्हणजे आपले हुशार तरुण चांगले पगार आणि आधुनिक सोयीसुविधांच्या शोधात परदेशात निघून जातात. जोपर्यंत आपण विद्यापीठांमधील अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजांशी जोडत नाही आणि संशोधकांना प्रशासकीय कटकटींतून मुक्त करून मोकळं वातावरण देत नाही, तोपर्यंत केवळ 'पदवीधरांची फौज असून उपयोग नाही. आपल्याला आता 'सर्टिफिकेट' देणारी यंत्रणा बदलून इनोव्हेशनला सन्मान देणारी संस्कृती रुजवावी लागेल. ते होण्याची काहीही आशा मला आता वाटत नाही...

In reply to by हेमंतकुमार

Bhakti Mon, 01/12/2026 - 14:58
मला वाटत नाही ,इथे मी सर्व भाग देऊ शकेल.सुक्ष्मदर्शिका चार भागात लिहिली आहे.अल्ट्रामायक्रोस्कोप ,फेज काँट्रास्ट मायक्रोस्कोप,फ्लूओरेसेन्स मायक्रोस्कोप, टेम (TEM) आणि सेम (SEM) या सर्व सुक्ष्मदर्शिका थोड्क्यात समजण्यासाठी माझा ब्लॉग नक्की वाचा :) https://bhagat-bhakti.blogspot.com/ धन्यवाद.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर Mon, 01/12/2026 - 15:31
मला वाटत नाही ,इथे मी सर्व भाग देऊ शकेल.
का हो? द्या की इथेच... काही शंका असतील तर त्या विचारायला आणि पुरक माहिती शेअर करायला सदस्यांना ते सोयीचे ठरते.

स्वधर्म Mon, 01/12/2026 - 19:51
शास्त्रीय विषय गोष्टीरूपाने सोपा करून सांगितलाय. त्यामुळे वाचतच गेलो. आणखी लिहा. मागच्या वर्षी डार्वीनचे घर पाहण्याचा योग आला. त्यात काय काय जपून ठेवले आहे डार्वीनचे स्वतः चे अक्षर वगैरे. त्यात डार्वीनने वापरलेले तीन सूक्ष्मदर्शकही पाहिले. तिथल्या लोकांनी ते कसे सुधारत गेले तेही सांगितले व त्यातून सूक्ष्म वनस्पती पाहता आल्या.

सोत्रि Tue, 01/13/2026 - 04:53
सुंदर, माहितीपूर्ण प्रवाही लेख. - (तांत्रिक) सोकाजी

निनाद Tue, 01/13/2026 - 06:09
खूप छान ओळख करुन दिली. अवांतर भारतात सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवीधरांची संख्या मोठी असली, तरी आपण जागतिक संशोधनात मागे पडतोय, हे अगदी कडू सत्य आहे! याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपली पदवी-केंद्रित शिक्षण व्यवस्था. आपल्याकडे प्रयोगांपेक्षा परीक्षेत मार्क मिळवण्यावर आणि थिअरी पाठ करण्यावर जास्त भर दिला जातो. आणि त्या त्या विभागातले संशोधन सोडून बाकी सर्व राजकारण करणारे दिव्य प्राध्यापक आणि त्यांच्या टोळ्या! . तसाही संशोधनासाठी लागणारा निधी आणि जागतिक दर्जाच्या लॅब्स आजही मोजक्याच संस्थांमध्ये मर्यादित आहेत. संशोधन ही एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, पण आपल्याकडे उद्योगांकडून संशोधनात होणारी गुंतवणूक खूपच कमी आहे. आणि इथेच आपले प्राध्यापक माती खातात. मग काय करणार? त्यात भर पडते ब्रेन ड्रेनची. म्हणजे आपले हुशार तरुण चांगले पगार आणि आधुनिक सोयीसुविधांच्या शोधात परदेशात निघून जातात. जोपर्यंत आपण विद्यापीठांमधील अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजांशी जोडत नाही आणि संशोधकांना प्रशासकीय कटकटींतून मुक्त करून मोकळं वातावरण देत नाही, तोपर्यंत केवळ 'पदवीधरांची फौज असून उपयोग नाही. आपल्याला आता 'सर्टिफिकेट' देणारी यंत्रणा बदलून इनोव्हेशनला सन्मान देणारी संस्कृती रुजवावी लागेल. ते होण्याची काहीही आशा मला आता वाटत नाही...
लेखनविषय:
लेखनप्रकार
सूक्ष्मदर्शिका -१ 1 खूप दिवसांनी सूक्ष्मजीवशास्त्र (microbiology ) चा ग्रंथ वाचायला घेतला . तसे सर्वच विज्ञान वैज्ञानिकांच्या अचाट शोधमोहीमेने भरलेले आहे. पण सूक्ष्मजीवशास्त्र या अदृश्य जगाचे शोध खरच थक्क करणारे आणि जरा उशीरा लागले.

कल्पद्रुमाचिये तळी(ऐसी अक्षरे ३२)

Bhakti ·

निनाद Tue, 09/16/2025 - 15:11
फारच थोडक्यात मांडला आहे विषय. विस्तार आवडला असता. शेवट तर अगदीच त्रोटक आहे. तेथे विस्तार हवाच हवा.

In reply to by निनाद

Bhakti Tue, 09/16/2025 - 15:44
धन्यवाद,ह्या सर्व गोष्टींची ओळख माझ्यासाठी खूप नवी अनोखी होती.यातील प्रत्येक मुद्द्यांवर मोठे अभ्यासपूर्ण लेख मालिका होईल असे हे विषय आहेत.तरीही अजून बरेच मुद्दे मांडायला हवे होते हे मान्य आहे. हो कैलास लेणं आणि गीतेचा अठरावा अध्याय ज्ञानेश्वरांची रूपक रचना नक्कीच वाचली पाहिजे, अप्रतिम!!!

निनाद Tue, 09/16/2025 - 15:11
फारच थोडक्यात मांडला आहे विषय. विस्तार आवडला असता. शेवट तर अगदीच त्रोटक आहे. तेथे विस्तार हवाच हवा.

In reply to by निनाद

Bhakti Tue, 09/16/2025 - 15:44
धन्यवाद,ह्या सर्व गोष्टींची ओळख माझ्यासाठी खूप नवी अनोखी होती.यातील प्रत्येक मुद्द्यांवर मोठे अभ्यासपूर्ण लेख मालिका होईल असे हे विषय आहेत.तरीही अजून बरेच मुद्दे मांडायला हवे होते हे मान्य आहे. हो कैलास लेणं आणि गीतेचा अठरावा अध्याय ज्ञानेश्वरांची रूपक रचना नक्कीच वाचली पाहिजे, अप्रतिम!!!
लेखनविषय:
१ कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे दिसते सुनीळ तेज गे मज पाहता वेणु वेदध्वनि नाद । उमटताली सहज गे बाईजे ।। ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.

बैलपोळ्या निमित्ताने

Bhakti ·

सुबोध खरे Fri, 08/22/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:19
चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Fri, 08/22/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Sat, 08/23/2025 - 12:49
धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

श्वेता व्यास Wed, 09/03/2025 - 09:59
छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य Fri, 08/22/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

धर्मराजमुटके Sat, 08/23/2025 - 09:14
छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी Sat, 08/23/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य Mon, 08/25/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता Sun, 08/24/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. Mon, 08/25/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti Tue, 08/26/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा Wed, 09/03/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.

सुबोध खरे Fri, 08/22/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:19
चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Fri, 08/22/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Sat, 08/23/2025 - 12:49
धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

श्वेता व्यास Wed, 09/03/2025 - 09:59
छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य Fri, 08/22/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

धर्मराजमुटके Sat, 08/23/2025 - 09:14
छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी Sat, 08/23/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य Mon, 08/25/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता Sun, 08/24/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. Mon, 08/25/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti Tue, 08/26/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा Wed, 09/03/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

गीतारहस्य प्रकरण ८ -विश्वाची उभारणी व संहारणी

Bhakti ·

उत्तम ! एक शंका : आधी बुद्धी की आधी अहंकार ? माझ्या आकलनानुसार अहंकार हा आधी येत असला पाहिजे आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या "मी" ह्या जाणिवेला टिकवून ठेवण्यासाठी बुद्धीचा उगम होत असावा. बुद्धी नसते तेव्हाही अहंकार असतोच ना.

Bhakti Wed, 08/13/2025 - 14:48
अहंकार हा बुद्धीचाच एक पोटभेद असल्यामुळे पहिल्यानें बुद्धि झाल्याखेरीज अहंकार उत्पन्न होऊ शकत नाहीं. म्हणून अहंकार हा दुसरा म्हणजे बुद्धीच्या मागाहूनचा गुण आहे असें सांख्यांनी ठरविलें आहे. सात्त्विक, राजस व तामस भेदानें बुद्धीप्रमाणें अहंकारहि अनंत प्रकारचा असतो हैं सांगावयास नको. पुढील गुणहि याचप्रमाणें प्रत्येकीं त्रिघात अनंत आहेत. किंबहुना व्यक्त सृष्टींत प्रत्येक वस्तूचे याचप्रमाणें अनंत सात्त्विक, राजस व तामस भेद होत असतात; व या सिद्धान्तास अनुसरूनच गीतेंत गुणत्रयविभाग व श्रद्धात्रयविभाग सांगितले आहेत (गी. अ. १४ व १७).
बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.
मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात. १ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि २.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि
ग्रंथात याबाबत सांख्यांचे स्पष्टीकरण सांगितले आहे.वेदांताचा याबाबत संदर्भ या ग्रंथात नाही. तसेच प्रकृतिला किंवा ब्रम्हाला आधी व्यवसायात्मक बुद्धी जी अचेतन आहे ती होऊन विस्तार करावा वाटतो.
अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढें व्यक्त सृष्टि निर्माण करण्याचा निश्चय प्रथम करीत असते निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणें हैं बुद्धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतींत व्यवसायात्मिक बुद्धि हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असें सांख्यानीं ठरविलें आहे. सारांश, मनुष्याला ज्याप्रमाणें एखादें कृत्य करण्याची बुद्धि प्रथम होते, त्याचप्रमाणें प्रकृतीलाहि आपला पसारा करण्याची बुद्धि प्रथम व्हावी लागते. निण मनुष्यप्राणी सचेतन असल्यामुळे, म्हणजे त्याच्या ठायीं प्रकृतीच्या बुद्धीशीं सचेतन पुरुषाचा (आत्म्याचा) संयोग झाला असल्यामुळे, मनुष्याला झालेली व्यवसायात्मिक बुद्धि मनुष्याला समजते, आणि प्रकृति स्वतः अचेतन म्हणजे जड असल्यामुळे तिच्या बुद्धीचें तिला स्वतःला ज्ञान नसतें, असा या दोहोंमध्यें मोठा फरक आहे, हा फरक पुरुषाच्या संयोगानें प्रकृतींत उत्पन्न झालेल्या चैतन्यामुळे होत असतो; तो नुसत्या जड प्रकृतीचा गुण नव्हे. मानवी इच्छेच्या तोडीची पण अस्वयंवेद्य शक्ति जड पदार्थांतहि आहे असें मानिल्याखेरीज गुरुत्वाकर्षण किंवा रसायनक्रियेचें व लोहचुंबकाचें आकर्षण व अपसारण, इत्यादि केवळ जड सृष्टींतच आढळून येणाऱ्या आवडीनिवडीची नीट उपपत्ति लागत नाहीं, असें अर्वाचीन आधिभौतिक सृष्टिशास्त्रज्ञहि आतां म्हणू लागले आहेत, हैं लक्षांत आणिलें म्हणजे प्रकृतींत प्रथम बुद्धि हा गुण उत्पन्न होतो, या सांख्याच्या सिद्धान्ताचें आश्चर्य वाटण्याचें कांहीं कारण रहात नाहीं. प्रकृर्तीत प्रथम उत्पन्न होणाऱ्या या गुणास पाहिजे तर अचेतन किंवा अस्वयंवेद्य म्हणजे स्वतःस न कळणारी बुद्धि म्हणा. पण कांहीं म्हटलें तरी मनुष्यास होणारी बुद्धि आणि प्रकृतीस होणारी बुद्धि या दोन्ही मुळांत एकाच वर्गातल्या आहेत हें उघड आहे

उत्तम ! एक शंका : आधी बुद्धी की आधी अहंकार ? माझ्या आकलनानुसार अहंकार हा आधी येत असला पाहिजे आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या "मी" ह्या जाणिवेला टिकवून ठेवण्यासाठी बुद्धीचा उगम होत असावा. बुद्धी नसते तेव्हाही अहंकार असतोच ना.

Bhakti Wed, 08/13/2025 - 14:48
अहंकार हा बुद्धीचाच एक पोटभेद असल्यामुळे पहिल्यानें बुद्धि झाल्याखेरीज अहंकार उत्पन्न होऊ शकत नाहीं. म्हणून अहंकार हा दुसरा म्हणजे बुद्धीच्या मागाहूनचा गुण आहे असें सांख्यांनी ठरविलें आहे. सात्त्विक, राजस व तामस भेदानें बुद्धीप्रमाणें अहंकारहि अनंत प्रकारचा असतो हैं सांगावयास नको. पुढील गुणहि याचप्रमाणें प्रत्येकीं त्रिघात अनंत आहेत. किंबहुना व्यक्त सृष्टींत प्रत्येक वस्तूचे याचप्रमाणें अनंत सात्त्विक, राजस व तामस भेद होत असतात; व या सिद्धान्तास अनुसरूनच गीतेंत गुणत्रयविभाग व श्रद्धात्रयविभाग सांगितले आहेत (गी. अ. १४ व १७).
बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.
मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात. १ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि २.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि
ग्रंथात याबाबत सांख्यांचे स्पष्टीकरण सांगितले आहे.वेदांताचा याबाबत संदर्भ या ग्रंथात नाही. तसेच प्रकृतिला किंवा ब्रम्हाला आधी व्यवसायात्मक बुद्धी जी अचेतन आहे ती होऊन विस्तार करावा वाटतो.
अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढें व्यक्त सृष्टि निर्माण करण्याचा निश्चय प्रथम करीत असते निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणें हैं बुद्धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतींत व्यवसायात्मिक बुद्धि हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असें सांख्यानीं ठरविलें आहे. सारांश, मनुष्याला ज्याप्रमाणें एखादें कृत्य करण्याची बुद्धि प्रथम होते, त्याचप्रमाणें प्रकृतीलाहि आपला पसारा करण्याची बुद्धि प्रथम व्हावी लागते. निण मनुष्यप्राणी सचेतन असल्यामुळे, म्हणजे त्याच्या ठायीं प्रकृतीच्या बुद्धीशीं सचेतन पुरुषाचा (आत्म्याचा) संयोग झाला असल्यामुळे, मनुष्याला झालेली व्यवसायात्मिक बुद्धि मनुष्याला समजते, आणि प्रकृति स्वतः अचेतन म्हणजे जड असल्यामुळे तिच्या बुद्धीचें तिला स्वतःला ज्ञान नसतें, असा या दोहोंमध्यें मोठा फरक आहे, हा फरक पुरुषाच्या संयोगानें प्रकृतींत उत्पन्न झालेल्या चैतन्यामुळे होत असतो; तो नुसत्या जड प्रकृतीचा गुण नव्हे. मानवी इच्छेच्या तोडीची पण अस्वयंवेद्य शक्ति जड पदार्थांतहि आहे असें मानिल्याखेरीज गुरुत्वाकर्षण किंवा रसायनक्रियेचें व लोहचुंबकाचें आकर्षण व अपसारण, इत्यादि केवळ जड सृष्टींतच आढळून येणाऱ्या आवडीनिवडीची नीट उपपत्ति लागत नाहीं, असें अर्वाचीन आधिभौतिक सृष्टिशास्त्रज्ञहि आतां म्हणू लागले आहेत, हैं लक्षांत आणिलें म्हणजे प्रकृतींत प्रथम बुद्धि हा गुण उत्पन्न होतो, या सांख्याच्या सिद्धान्ताचें आश्चर्य वाटण्याचें कांहीं कारण रहात नाहीं. प्रकृर्तीत प्रथम उत्पन्न होणाऱ्या या गुणास पाहिजे तर अचेतन किंवा अस्वयंवेद्य म्हणजे स्वतःस न कळणारी बुद्धि म्हणा. पण कांहीं म्हटलें तरी मनुष्यास होणारी बुद्धि आणि प्रकृतीस होणारी बुद्धि या दोन्ही मुळांत एकाच वर्गातल्या आहेत हें उघड आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
गीतारहस्य -प्रकरण८ ( पान क्र. १०२-११८) **विश्वाची उभारणी व संहारणी सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे. प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्‌गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे.

गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

Bhakti ·

प्रचेतस गुरुवार, 06/19/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_

प्रचेतस गुरुवार, 06/19/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_
लेखनविषय:
गीतारहस्य-७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्‌धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्‌धांताला अद्वैत सिद्‌धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे. सांख्य शब्दाचा अर्थ- १.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले. २.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे) असा व्यापक अर्थ बनला. ३.ईश्वरकृष्णाचा (इ.स.

पंचमयकोश

Bhakti ·
लेखनविषय:
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे. "१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा" मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय.. यावर उपाय म्हणजे आपण हात उगारणे,त्यांना सतत धाक दाखवणे,शिक्षा करणे हे नसते.तर आपण संयमाने सतत तूही संयम दाखव हे दोघांवर बिंबवत राहणे हे असते. याबद्दलचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.यात भारतीय गुरूकुल पद्धतीत , पूर्वीच्या काळी कशाप्रकारे मुलांशी संवाद

गीतारहस्य चिंतन (प्रकरण -६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार

Bhakti ·

In reply to by कंजूस

Bhakti Wed, 06/04/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti गुरुवार, 06/05/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 06:49
गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.

In reply to by कंजूस

Bhakti Wed, 06/04/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti गुरुवार, 06/05/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 06:49
गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.
लेखनविषय:
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार मनोदेवता प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्‌ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्‌सद्विवेकबुद्‌धी आहे- -आधिदैवतपक्ष. या सदविवेकबुद्‌धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय." -वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे. वेदःस्मृतिः सदाचारः स्वस्थ च प्रियमात्मनः । एतच्चतुर्विधं प्रा..

माझा साक्षात्कारी हृदयरोग (ऐसी अक्षरे -२७)

Bhakti ·

In reply to by युयुत्सु

Bhakti Sun, 06/01/2025 - 07:52
खुप छान भाषांतर आहे.
"माफक श्रम आणि फुरसतीचा वेळ या दोन्ही गोष्टी साध्य करण्याची कला सर्वांना प्राप्त झाल्यास जीवनाचा अर्थ/आनंद अनुभवता येतो"-भक्ती
या दुव्यामुळे मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेतील आदिती यांच्या रसेलचा जीवन परीचय आणि धनंजय यांनी दिलेला 'बल' विषयावरील लेखही वाचला.खरोखर हे मिपामुळे घडलं, ह्या गोष्टी मिपावर २००८ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत आणि मी आता वाचते, खुप उशीरा मिपावर आले याची कायम चुटपुट वाटते ;) आता रसेल वाचायची खुप खुप उत्सुकता आहे. खुप खुप धन्यवाद!

In reply to by Bhakti

युयुत्सु Sun, 06/01/2025 - 08:58
खुप छान भाषांतर आहे. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद! ना०मू०काकांना आणि त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना कुणीतरी हा निबंध वाचायला द्यायला हवा.

In reply to by युयुत्सु

Bhakti Tue, 06/24/2025 - 22:42
निसर्गायण लेखक दिलीप कुलकर्णी हे पुस्तक मी सध्या वाचतेय.बरचसं माझा साक्षात्कारी हृदयरोग सारखं पण निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नीती मूल्य कशी जपली.भारतीय विरूद्ध पाश्चात्य यांची निसर्ग विषयक विचारसरणी(पहिले,दुसरे प्रकरण) मांडली आहे.

In reply to by युयुत्सु

रीडर Sat, 05/31/2025 - 16:55
यावर सविस्तर लेख येऊ दे. आपली विचार प्रक्रिया, तयारी समजून घ्यायला आवडेल Financial independence retire early या concept बद्दल मी जाणून घेत आहे सध्या

In reply to by युयुत्सु

कंजूस Sat, 05/31/2025 - 17:58
?40 व्या वर्षी निवृत्त? हातापायाने काम करणारे साठाव्या वर्षी निवृत्त केले जातात आणि होतात. डोक्याने काम करणाऱ्यांना ते बंधन नसते. पेपरात ( टाइम्स , इककनॉमिक टाइम्स वगैरे) जे लेख येतात "साठाव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी किती पैसे जमवायला हवेत" त्यात म्हणतात की महागाई इतकी वेगाने वाढते आहे की आताच्या सुखसोयींनी जगण्यासाठी साठवलेले पैसे पुरणार नाहीत, अर्धवेळ तरी काम पकडायची तयारी ठेवा. किंवा सुखसोयींना कात्री लावायची तयारी ठेवा.

In reply to by कंजूस

कानडाऊ योगेशु Sun, 06/01/2025 - 11:43
40 व्या वर्षी निवृत्त?
माझ्या मते इथे निवृत्तीचा अर्थ एकाच रहाटगाड्यात अडकुन अर्थार्जनासाठी केलेले काम असे असावे. निवृत्ती नंतर ते बंधन नसावे.युयुत्सु सर शेअर बाजार सक्रिय असल्याने अर्थप्राप्तीचा भाग सांभाळून असावेत असे वाटते.

कंजूस Sat, 05/31/2025 - 13:33
परदेशी तक्ते असतात त्यात वजन, शर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे कमी अधिक किंवा योग्य अशी आकडेवारी पाहून अभयला वाटत होते की मला कधी अटॅक येणार नाही. तरीही आलाच तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती परिमाणं भारतात लागू नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti Sat, 05/31/2025 - 13:45
हो,त्यांच्या आहारात आधी दुधाचा समावेश खुप होता तो त्यांनी skimmed milk ३०० मिली/दिवस केला.तसेच काही पूर्वीच्या टेस्ट चुकीच्या ठरल्या,जे त्यांना माहीती नव्हते, त्यामुळे गाफील राहिले.

हे पुस्तक मी माझ्या साक्षात्कारी हृदयरोगाच्या विश्रांती काळात म्हणजे १९९२ साली वाचले होते. आता त्याला ३३ वर्षे झाली. अंनिसमधीला माझ्या बुद्धीवादी मित्रांच्या दृष्टीने या पुस्तकातील विचार छद्मशास्त्रीय होते. तो काळही अंनिसच्या ऐन बहराचा होता. मला देखील तसेच वाटले होते तेव्हा. तरीही वाचून बरे वाटले

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 09:01
वैज्ञानिक/अवैज्ञानिक, विवेक/अविवेक इ० ची प्रशस्तीपत्रके वाटायचा मक्ता घेतलेल्या अनिसला जीवशास्त्र किती कळते असा मला प्रश्न पडला आहे. वरील पुस्तकातले कोणते विचार छद्मविज्ञान आहेत हे न सांगता लेबले लावत हिंडणे याला विवेकी कृती म्हणायचे का?

गवि Mon, 06/02/2025 - 10:51
हे पुस्तक खूप गाजले होते. अर्थातच ते वाचले आहे. उपयोगी पुस्तक आहे. मूलभूत विचार त्यात आहेत. फक्त एकच कमी जाणवते, (पुस्तकात नव्हे) तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का? असा फॉलो अप कुठेतरी छापून यायला हवा होता. त्या पुस्तकातले आणि त्यानंतरचे सर्व लिखाण त्या दोन वर्षांतले आहे. बातम्या वाचल्या असता त्यांना पुढेही हृदय विकारासाठी रुग्णालयात दाखल करायला लागले होते असे दिसते (एकाहून अधिक वेळा). अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण एखादा बदल घडवला तर त्याचे पुढे काय झाले हे समजल्यास अधिक बरे वाटते.

In reply to by गवि

स्वधर्म Mon, 06/02/2025 - 14:52
पुस्तक लिहिल्यानंतर काही वर्षांनी मी बंग यांचे भाषण ऐकले होते. पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यात ते काय म्हणाले होते ते आता आठवत नाही. पुस्तकात त्याचे सासरे कसे स्वतःची कार असून बसने फिरतात असा उल्लेख होता. त्याचे कारण म्हणजे लोकांशी संपर्क, त्यांच्यात मिसळणे इ. पण पुण्यातील त्या भाषणात त्यांनी मी विमानाने कसा आलो, तरीही सकाळी कसा फिरायला गेलो होतो इ. उल्लेख केले होते. पुढे दिलीप कुलकर्णी यांनी त्यांच्या वातानुकुलित प्रार्थनास्थळाची व संस्थेची माहीती दिली होती. त्यामुळे ते आता मोठे हस्ती झाले आहेत व त्याचा पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जगण्याशी संबंध कमी झाला असावा असे वाटले होते. पण मला वाटते पुस्तकातील उपायांचा काही प्रमाणात उपयोग होत असावा, पण आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सिध्द करणे अवघड आहे. बंग हे उत्तम लेखक आहेत. परंतु वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिणे वेगळे व विज्ञानाच्या कसोटीवर काही सिध्द करणे वेगळे. परंतु वाचकांना जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळते हेही नसे थोडके.

In reply to by स्वधर्म

Bhakti Mon, 06/02/2025 - 15:23
+१ बरोबर,change is only constant thing. जाणकार वाचक वा थेट जाणकार लेखकही हे मान्य करतात की, सद्यस्थितीला लिहिलेले काळानुरूप सर्वोपरी लागू होणार नाही.पण प्रत्येक पुस्तकाचे एक सत्व अबाधित राहते.या पुस्तकासाठी आहार,व्यायामाची योग्य सांगड, मन शुद्धी आणि ताण कमी करणारे भारतीय दर्शनाचे अवलंब आहे,जे नेहमी लागू होईल,प्रेरणा देत राहील.

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 10:53
तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का?> भरपूर संशोधन झाले आहे. हवे असेल तर माहिती मिळवून देऊ शकेन.

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 10:58
### Key Points - Research suggests lifestyle modifications can reduce the risk of recurrent coronary events. - It seems likely that changes like diet, exercise, and smoking cessation are effective, based on multiple studies. - The evidence leans toward cardiac rehabilitation programs also lowering recurrence rates, though participation rates vary. ### Introduction Coronary events, such as heart attacks, can recur, and lifestyle modifications are often recommended to prevent this. Research has explored how changes in diet, physical activity, and other habits impact these recurrence rates. Below, we break down the findings for a clearer understanding. ### Research Overview Studies show that adopting a healthy lifestyle can significantly lower the chances of another coronary event. For instance, the Mediterranean diet has been linked to reduced risks, and quitting smoking post-heart attack can improve long-term outcomes. However, the effectiveness can vary based on individual factors and how well these changes are maintained. ### Cardiac Rehabilitation and Participation Cardiac rehabilitation, which includes lifestyle changes, has been shown to reduce mortality rates by up to 21% over five years. Yet, participation remains low, with rates around 10–20% in earlier years and under 30% more recently, highlighting a need for better access and awareness. --- ### Detailed Survey Note Coronary artery disease remains a leading cause of death globally, with approximately 805,000 individuals in the US experiencing a myocardial infarction (MI) each year, nearly 25% of which are reinfarctions. Given the significant burden, follow-up research on preventing recurrence through lifestyle modification is crucial. This note synthesizes findings from recent studies, emphasizing the role of lifestyle changes in reducing recurrent coronary events and improving patient outcomes. #### Background and Prevalence Coronary events, including MIs and subsequent reinfarctions, pose a persistent threat, particularly post-intervention like percutaneous coronary intervention (PCI). Advances in medical therapy, such as dual antiplatelet therapy (DAPT) and statins, have improved survival rates, but recurrent events remain a concern. Research suggests that lifestyle modifications can complement pharmacotherapy to further mitigate this risk. #### Impact of Lifestyle Modifications Numerous studies have investigated the efficacy of lifestyle changes in secondary prevention. Key areas include: - **Smoking Cessation**: Post-MI, quitting smoking reduces mortality risk by 37% over 13 years compared to continuing, with a 18% risk reduction for those reducing cigarette intake by 5 daily. Combination therapy (pharmacotherapy and behavioral support) improves cessation success by 70–100% compared to minimal intervention, as supported by studies like [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) and [Combination Therapy Effectiveness](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3). - **Dietary Changes**: The Mediterranean diet, rich in fruits, vegetables, whole grains, and olive oil, showed a 72% reduction in recurrent nonfatal MI and 56% mortality reduction over 4 years in the Lyon Diet Heart Study. The PREDIMED study found a 30% reduction in cardiovascular events with Mediterranean diet supplemented by extra-virgin olive oil or nuts. The DASH diet, reducing systolic blood pressure by 5.5 mmHg and diastolic by 3.0 mmHg, also showed benefits, particularly in hypertensive patients, with effects comparable to one antihypertensive medication (DASH-Sodium Trial). Vegetarian diets were associated with 30% lower ischemic heart disease mortality compared to non-vegetarian diets, while ketogenic diets, despite weight loss benefits, showed increased post-MI mortality with higher animal fat intake. - **Exercise and Physical Activity**: Post-MI, remaining active or increasing activity reduces mortality by 71% and 59% at 1 year compared to remaining inactive. Guidelines recommend 150–300 minutes of moderate or 75–150 minutes of vigorous weekly activity to maintain cardiovascular health. - **Weight Management**: A 5% weight reduction improves blood pressure, cholesterol, and glycemic control. Bariatric surgery in obese patients reduced all-cause mortality by 45% and cardiovascular mortality by 41%. The SELECT trial with semaglutide showed 10% weight loss and a 20% reduction in cardiovascular outcomes, highlighting the role of weight management. - **Stress Management and Psychological Health**: Cardiac rehabilitation (CR) programs, which often include stress management, reduced 5-year mortality by 21% in Medicare cohorts, with dose-dependent benefits. Participants attending more sessions showed improved MI and death outcomes, with a 63% decrease in depressive symptoms and 73% mortality reduction in depressed CR participants. #### Cardiac Rehabilitation and Participation Challenges CR is a cornerstone of secondary prevention, integrating lifestyle modifications with supervised exercise and education. It reduces 5-year mortality by 21%, with greater session attendance linked to better outcomes. However, participation rates are low, historically at 10–20% in 2005 and under 30% by 2014, due to barriers like low referral rates (men 1.5 times more likely referred than women), age over 60, and socioeconomic factors. Alternatives like home-based CR (HBCR) showed better 6-minute walk test results, quality of life, and completion rates (>85%) compared to facility-based programs, with hybrid models being non-inferior at 1 year. #### Long-Term Observational Insights Long-term studies like the Nurses' Health Study and Health Professionals Follow-up Study provide insights into lifestyle impacts on CVD risk, including coronary events. These observational data underscore the sustained benefits of lifestyle modifications, with higher quality diets associated with lower all-cause mortality post-MI, as seen in recent cohort analyses. #### Comparative Analysis The following table summarizes key lifestyle interventions and their impact on recurrent coronary events: | **Intervention** | **Impact on Recurrence** | **Supporting Evidence** | |--------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------| | Smoking Cessation | 37% mortality risk reduction over 13 years post-MI | [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) | | Mediterranean Diet | 72% reduction in nonfatal MI, 56% mortality reduction | Lyon Diet Heart Study, PREDIMED Study | | DASH Diet | Reduces blood pressure, comparable to one drug | DASH-Sodium Trial | | Exercise (150+ min/week) | 71–59% mortality reduction at 1 year post-MI | Guidelines and observational data | | Weight Loss (5%) | Improves BP, cholesterol, glycemic control | SELECT Trial, bariatric surgery outcomes | | Cardiac Rehabilitation | 21% reduction in 5-year mortality | Medicare cohort, dose-dependent benefits | #### Conclusion Follow-up research clearly supports the role of lifestyle modifications in reducing the recurrence of coronary events. From dietary shifts like the Mediterranean and DASH diets to smoking cessation and increased physical activity, these changes offer significant benefits, often enhanced by CR programs. However, challenges in participation and implementation highlight the need for improved access and tailored interventions, particularly for underserved populations. ### Key Citations - [Smoking Cessation Outcomes in Post-MI Patients](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) - [Combination Therapy Effectiveness for Smoking Cessation](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3)

विवेकपटाईत Mon, 06/02/2025 - 11:57
हृदयाघाताचा मला ही भरपूर अनुभव आहे. आमच्या कार्यालयातील जोतिषाचा शौक असलेल्या एक बाबू मला एकदा म्हणाला होता पटाईतजी आपके कुंडली में राहू बहुत स्ट्रॉंग है, यमराज बेचेरा हार के लौट जाता है. पाच वेळा हृदयाघाता , पाच वेगळे हॉस्पिटल्स, तीनदा अंजीओ, एकदा स्टेन्ट, एकदा बायपास. मजेदार प्रत्येक वेळी हृदयाची गती 110/70 होती. वजन ही जास्त नव्हते. बाहेरचे खाणे ही नाही (आता वाढले आहे), पान सिगरेट तंबाकू दारू ही नाही. कारण कार्यालयात जास्त वेळ काम करणे आणि स्ट्रैस असावा.

In reply to by युयुत्सु

Bhakti Sun, 06/01/2025 - 07:52
खुप छान भाषांतर आहे.
"माफक श्रम आणि फुरसतीचा वेळ या दोन्ही गोष्टी साध्य करण्याची कला सर्वांना प्राप्त झाल्यास जीवनाचा अर्थ/आनंद अनुभवता येतो"-भक्ती
या दुव्यामुळे मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेतील आदिती यांच्या रसेलचा जीवन परीचय आणि धनंजय यांनी दिलेला 'बल' विषयावरील लेखही वाचला.खरोखर हे मिपामुळे घडलं, ह्या गोष्टी मिपावर २००८ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत आणि मी आता वाचते, खुप उशीरा मिपावर आले याची कायम चुटपुट वाटते ;) आता रसेल वाचायची खुप खुप उत्सुकता आहे. खुप खुप धन्यवाद!

In reply to by Bhakti

युयुत्सु Sun, 06/01/2025 - 08:58
खुप छान भाषांतर आहे. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद! ना०मू०काकांना आणि त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना कुणीतरी हा निबंध वाचायला द्यायला हवा.

In reply to by युयुत्सु

Bhakti Tue, 06/24/2025 - 22:42
निसर्गायण लेखक दिलीप कुलकर्णी हे पुस्तक मी सध्या वाचतेय.बरचसं माझा साक्षात्कारी हृदयरोग सारखं पण निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नीती मूल्य कशी जपली.भारतीय विरूद्ध पाश्चात्य यांची निसर्ग विषयक विचारसरणी(पहिले,दुसरे प्रकरण) मांडली आहे.

In reply to by युयुत्सु

रीडर Sat, 05/31/2025 - 16:55
यावर सविस्तर लेख येऊ दे. आपली विचार प्रक्रिया, तयारी समजून घ्यायला आवडेल Financial independence retire early या concept बद्दल मी जाणून घेत आहे सध्या

In reply to by युयुत्सु

कंजूस Sat, 05/31/2025 - 17:58
?40 व्या वर्षी निवृत्त? हातापायाने काम करणारे साठाव्या वर्षी निवृत्त केले जातात आणि होतात. डोक्याने काम करणाऱ्यांना ते बंधन नसते. पेपरात ( टाइम्स , इककनॉमिक टाइम्स वगैरे) जे लेख येतात "साठाव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी किती पैसे जमवायला हवेत" त्यात म्हणतात की महागाई इतकी वेगाने वाढते आहे की आताच्या सुखसोयींनी जगण्यासाठी साठवलेले पैसे पुरणार नाहीत, अर्धवेळ तरी काम पकडायची तयारी ठेवा. किंवा सुखसोयींना कात्री लावायची तयारी ठेवा.

In reply to by कंजूस

कानडाऊ योगेशु Sun, 06/01/2025 - 11:43
40 व्या वर्षी निवृत्त?
माझ्या मते इथे निवृत्तीचा अर्थ एकाच रहाटगाड्यात अडकुन अर्थार्जनासाठी केलेले काम असे असावे. निवृत्ती नंतर ते बंधन नसावे.युयुत्सु सर शेअर बाजार सक्रिय असल्याने अर्थप्राप्तीचा भाग सांभाळून असावेत असे वाटते.

कंजूस Sat, 05/31/2025 - 13:33
परदेशी तक्ते असतात त्यात वजन, शर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे कमी अधिक किंवा योग्य अशी आकडेवारी पाहून अभयला वाटत होते की मला कधी अटॅक येणार नाही. तरीही आलाच तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती परिमाणं भारतात लागू नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti Sat, 05/31/2025 - 13:45
हो,त्यांच्या आहारात आधी दुधाचा समावेश खुप होता तो त्यांनी skimmed milk ३०० मिली/दिवस केला.तसेच काही पूर्वीच्या टेस्ट चुकीच्या ठरल्या,जे त्यांना माहीती नव्हते, त्यामुळे गाफील राहिले.

हे पुस्तक मी माझ्या साक्षात्कारी हृदयरोगाच्या विश्रांती काळात म्हणजे १९९२ साली वाचले होते. आता त्याला ३३ वर्षे झाली. अंनिसमधीला माझ्या बुद्धीवादी मित्रांच्या दृष्टीने या पुस्तकातील विचार छद्मशास्त्रीय होते. तो काळही अंनिसच्या ऐन बहराचा होता. मला देखील तसेच वाटले होते तेव्हा. तरीही वाचून बरे वाटले

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 09:01
वैज्ञानिक/अवैज्ञानिक, विवेक/अविवेक इ० ची प्रशस्तीपत्रके वाटायचा मक्ता घेतलेल्या अनिसला जीवशास्त्र किती कळते असा मला प्रश्न पडला आहे. वरील पुस्तकातले कोणते विचार छद्मविज्ञान आहेत हे न सांगता लेबले लावत हिंडणे याला विवेकी कृती म्हणायचे का?

गवि Mon, 06/02/2025 - 10:51
हे पुस्तक खूप गाजले होते. अर्थातच ते वाचले आहे. उपयोगी पुस्तक आहे. मूलभूत विचार त्यात आहेत. फक्त एकच कमी जाणवते, (पुस्तकात नव्हे) तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का? असा फॉलो अप कुठेतरी छापून यायला हवा होता. त्या पुस्तकातले आणि त्यानंतरचे सर्व लिखाण त्या दोन वर्षांतले आहे. बातम्या वाचल्या असता त्यांना पुढेही हृदय विकारासाठी रुग्णालयात दाखल करायला लागले होते असे दिसते (एकाहून अधिक वेळा). अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण एखादा बदल घडवला तर त्याचे पुढे काय झाले हे समजल्यास अधिक बरे वाटते.

In reply to by गवि

स्वधर्म Mon, 06/02/2025 - 14:52
पुस्तक लिहिल्यानंतर काही वर्षांनी मी बंग यांचे भाषण ऐकले होते. पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यात ते काय म्हणाले होते ते आता आठवत नाही. पुस्तकात त्याचे सासरे कसे स्वतःची कार असून बसने फिरतात असा उल्लेख होता. त्याचे कारण म्हणजे लोकांशी संपर्क, त्यांच्यात मिसळणे इ. पण पुण्यातील त्या भाषणात त्यांनी मी विमानाने कसा आलो, तरीही सकाळी कसा फिरायला गेलो होतो इ. उल्लेख केले होते. पुढे दिलीप कुलकर्णी यांनी त्यांच्या वातानुकुलित प्रार्थनास्थळाची व संस्थेची माहीती दिली होती. त्यामुळे ते आता मोठे हस्ती झाले आहेत व त्याचा पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जगण्याशी संबंध कमी झाला असावा असे वाटले होते. पण मला वाटते पुस्तकातील उपायांचा काही प्रमाणात उपयोग होत असावा, पण आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सिध्द करणे अवघड आहे. बंग हे उत्तम लेखक आहेत. परंतु वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिणे वेगळे व विज्ञानाच्या कसोटीवर काही सिध्द करणे वेगळे. परंतु वाचकांना जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळते हेही नसे थोडके.

In reply to by स्वधर्म

Bhakti Mon, 06/02/2025 - 15:23
+१ बरोबर,change is only constant thing. जाणकार वाचक वा थेट जाणकार लेखकही हे मान्य करतात की, सद्यस्थितीला लिहिलेले काळानुरूप सर्वोपरी लागू होणार नाही.पण प्रत्येक पुस्तकाचे एक सत्व अबाधित राहते.या पुस्तकासाठी आहार,व्यायामाची योग्य सांगड, मन शुद्धी आणि ताण कमी करणारे भारतीय दर्शनाचे अवलंब आहे,जे नेहमी लागू होईल,प्रेरणा देत राहील.

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 10:53
तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का?> भरपूर संशोधन झाले आहे. हवे असेल तर माहिती मिळवून देऊ शकेन.

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 10:58
### Key Points - Research suggests lifestyle modifications can reduce the risk of recurrent coronary events. - It seems likely that changes like diet, exercise, and smoking cessation are effective, based on multiple studies. - The evidence leans toward cardiac rehabilitation programs also lowering recurrence rates, though participation rates vary. ### Introduction Coronary events, such as heart attacks, can recur, and lifestyle modifications are often recommended to prevent this. Research has explored how changes in diet, physical activity, and other habits impact these recurrence rates. Below, we break down the findings for a clearer understanding. ### Research Overview Studies show that adopting a healthy lifestyle can significantly lower the chances of another coronary event. For instance, the Mediterranean diet has been linked to reduced risks, and quitting smoking post-heart attack can improve long-term outcomes. However, the effectiveness can vary based on individual factors and how well these changes are maintained. ### Cardiac Rehabilitation and Participation Cardiac rehabilitation, which includes lifestyle changes, has been shown to reduce mortality rates by up to 21% over five years. Yet, participation remains low, with rates around 10–20% in earlier years and under 30% more recently, highlighting a need for better access and awareness. --- ### Detailed Survey Note Coronary artery disease remains a leading cause of death globally, with approximately 805,000 individuals in the US experiencing a myocardial infarction (MI) each year, nearly 25% of which are reinfarctions. Given the significant burden, follow-up research on preventing recurrence through lifestyle modification is crucial. This note synthesizes findings from recent studies, emphasizing the role of lifestyle changes in reducing recurrent coronary events and improving patient outcomes. #### Background and Prevalence Coronary events, including MIs and subsequent reinfarctions, pose a persistent threat, particularly post-intervention like percutaneous coronary intervention (PCI). Advances in medical therapy, such as dual antiplatelet therapy (DAPT) and statins, have improved survival rates, but recurrent events remain a concern. Research suggests that lifestyle modifications can complement pharmacotherapy to further mitigate this risk. #### Impact of Lifestyle Modifications Numerous studies have investigated the efficacy of lifestyle changes in secondary prevention. Key areas include: - **Smoking Cessation**: Post-MI, quitting smoking reduces mortality risk by 37% over 13 years compared to continuing, with a 18% risk reduction for those reducing cigarette intake by 5 daily. Combination therapy (pharmacotherapy and behavioral support) improves cessation success by 70–100% compared to minimal intervention, as supported by studies like [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) and [Combination Therapy Effectiveness](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3). - **Dietary Changes**: The Mediterranean diet, rich in fruits, vegetables, whole grains, and olive oil, showed a 72% reduction in recurrent nonfatal MI and 56% mortality reduction over 4 years in the Lyon Diet Heart Study. The PREDIMED study found a 30% reduction in cardiovascular events with Mediterranean diet supplemented by extra-virgin olive oil or nuts. The DASH diet, reducing systolic blood pressure by 5.5 mmHg and diastolic by 3.0 mmHg, also showed benefits, particularly in hypertensive patients, with effects comparable to one antihypertensive medication (DASH-Sodium Trial). Vegetarian diets were associated with 30% lower ischemic heart disease mortality compared to non-vegetarian diets, while ketogenic diets, despite weight loss benefits, showed increased post-MI mortality with higher animal fat intake. - **Exercise and Physical Activity**: Post-MI, remaining active or increasing activity reduces mortality by 71% and 59% at 1 year compared to remaining inactive. Guidelines recommend 150–300 minutes of moderate or 75–150 minutes of vigorous weekly activity to maintain cardiovascular health. - **Weight Management**: A 5% weight reduction improves blood pressure, cholesterol, and glycemic control. Bariatric surgery in obese patients reduced all-cause mortality by 45% and cardiovascular mortality by 41%. The SELECT trial with semaglutide showed 10% weight loss and a 20% reduction in cardiovascular outcomes, highlighting the role of weight management. - **Stress Management and Psychological Health**: Cardiac rehabilitation (CR) programs, which often include stress management, reduced 5-year mortality by 21% in Medicare cohorts, with dose-dependent benefits. Participants attending more sessions showed improved MI and death outcomes, with a 63% decrease in depressive symptoms and 73% mortality reduction in depressed CR participants. #### Cardiac Rehabilitation and Participation Challenges CR is a cornerstone of secondary prevention, integrating lifestyle modifications with supervised exercise and education. It reduces 5-year mortality by 21%, with greater session attendance linked to better outcomes. However, participation rates are low, historically at 10–20% in 2005 and under 30% by 2014, due to barriers like low referral rates (men 1.5 times more likely referred than women), age over 60, and socioeconomic factors. Alternatives like home-based CR (HBCR) showed better 6-minute walk test results, quality of life, and completion rates (>85%) compared to facility-based programs, with hybrid models being non-inferior at 1 year. #### Long-Term Observational Insights Long-term studies like the Nurses' Health Study and Health Professionals Follow-up Study provide insights into lifestyle impacts on CVD risk, including coronary events. These observational data underscore the sustained benefits of lifestyle modifications, with higher quality diets associated with lower all-cause mortality post-MI, as seen in recent cohort analyses. #### Comparative Analysis The following table summarizes key lifestyle interventions and their impact on recurrent coronary events: | **Intervention** | **Impact on Recurrence** | **Supporting Evidence** | |--------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------| | Smoking Cessation | 37% mortality risk reduction over 13 years post-MI | [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) | | Mediterranean Diet | 72% reduction in nonfatal MI, 56% mortality reduction | Lyon Diet Heart Study, PREDIMED Study | | DASH Diet | Reduces blood pressure, comparable to one drug | DASH-Sodium Trial | | Exercise (150+ min/week) | 71–59% mortality reduction at 1 year post-MI | Guidelines and observational data | | Weight Loss (5%) | Improves BP, cholesterol, glycemic control | SELECT Trial, bariatric surgery outcomes | | Cardiac Rehabilitation | 21% reduction in 5-year mortality | Medicare cohort, dose-dependent benefits | #### Conclusion Follow-up research clearly supports the role of lifestyle modifications in reducing the recurrence of coronary events. From dietary shifts like the Mediterranean and DASH diets to smoking cessation and increased physical activity, these changes offer significant benefits, often enhanced by CR programs. However, challenges in participation and implementation highlight the need for improved access and tailored interventions, particularly for underserved populations. ### Key Citations - [Smoking Cessation Outcomes in Post-MI Patients](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) - [Combination Therapy Effectiveness for Smoking Cessation](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3)

विवेकपटाईत Mon, 06/02/2025 - 11:57
हृदयाघाताचा मला ही भरपूर अनुभव आहे. आमच्या कार्यालयातील जोतिषाचा शौक असलेल्या एक बाबू मला एकदा म्हणाला होता पटाईतजी आपके कुंडली में राहू बहुत स्ट्रॉंग है, यमराज बेचेरा हार के लौट जाता है. पाच वेळा हृदयाघाता , पाच वेगळे हॉस्पिटल्स, तीनदा अंजीओ, एकदा स्टेन्ट, एकदा बायपास. मजेदार प्रत्येक वेळी हृदयाची गती 110/70 होती. वजन ही जास्त नव्हते. बाहेरचे खाणे ही नाही (आता वाढले आहे), पान सिगरेट तंबाकू दारू ही नाही. कारण कार्यालयात जास्त वेळ काम करणे आणि स्ट्रैस असावा.
लेखनविषय:
माझा साक्षात्कारी हृदयरोग डॉ.