साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे.
"१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा"
मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय..
यावर उपाय म्हणजे आपण हात उगारणे,त्यांना सतत धाक दाखवणे,शिक्षा करणे हे नसते.तर आपण संयमाने सतत तूही संयम दाखव हे दोघांवर बिंबवत राहणे हे असते.
याबद्दलचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.यात भारतीय गुरूकुल पद्धतीत , पूर्वीच्या काळी कशाप्रकारे मुलांशी संवाद वागणूक होते हे सांगितले.
"तुमच्या मुलांना सर्वांपेक्षा हुशार बनवण्यासाठी वैदिक युक्ती (पुरावा!)" हा हायपर क्वेस्ट व्हिडिओ पंचकोश सिद्धांतात खोलवर जातो
(पंचकोश सिद्धांत) वैदिक परंपरेतील, समग्र मानवी विकासासाठी एक चौकट.
हे प्राचीन भारतीय शैक्षणिक तत्वज्ञान असे मानते की मानव पाच परस्पर जोडलेले "म्यान" किंवा थरांनी बनलेले आहेत:
१. भौतिक शरीर (अन्नमय कोश),
साधारणतः ३ वर्षांपर्यंत मुलांना योग्य आहाराने वाढ होण्याची अधिक लक्षपूर्वक ध्यान ठेवण्याची गोष्ट आहे .
२.तद्नंतर ९ वर्षांपर्यंत जीवन ऊर्जा (प्राणमय कोश) म्हणजे व्यायाम,योग, खेळातील शिस्त हे गुण अंगी वाढवण्यासाठी सोपे होते,ती ऊर्जा चॅनॅलाईज होते.
३.
१०-१५ वर्षांपर्यत मन (मनोमय कोश) यावर काम हवं .या वयात मन चंचल असते .नाना प्रकारचे राग विकार मुलांच्या मनात उफाळत असतात.अशावेळी संयम शिकवावा.वाचनाची, निसर्ग निरीक्षण समजावून सांगावे.याने एकाग्रता वाढते.
४ .
१६- २१ वर्षांपर्यंत बुद्धी (विज्ञानमय कोश) यात अधिक अभ्यास पूर्ण वाचन, शिक्षणानू तर्क विचारशक्ती जागृत होते.ती परिपूर्ण करण्यासाठी खुप अभ्यास अगदी झोकून देऊन करावा
५. आनंद (आनंदमय कोश) या नंतर विकसित होतो तेव्हा आतापर्यंत योग्य ज्ञानामुळे यापुढे आयुष्यात सृजनाचा आनंद सहज मिळतो.
व्हिडिओमध्ये असा युक्तिवाद केला आहे की प्राचीन गुरुकुल प्रणालींमध्ये प्रचलित असलेल्या विकासाच्या योग्य टप्प्यांवर प्रत्येक कोशाचे पालनपोषण करून, व्यक्ती अति-बुद्धिमत्ता आणि संतुलित अस्तित्व प्राप्त करू शकतात, ही पद्धत आधुनिक पाश्चात्य शिक्षण प्रणालींनी देखील स्वीकारली आहे. भौतिक शरीरासाठी योग्य आहारापासून ते आनंद आवरणासाठी आनंद आणि सर्जनशीलता जोपासण्यापर्यंत, या थरांना समजून घेणे आणि जाणीवपूर्वक पोषण करणे, सुदृढ आणि अपवादात्मकपणे सक्षम मुलांचे संगोपन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
-भक्ती