माझी दिवाळी
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
सकाळी जरा उशिराच जाग आली. कार्डिओचे काही व्यायाम प्रकार जमत नसल्याने घराच्या खिडक्या बंद करून, यूट्यूबवरची गाणी लावून मी स्लो मोशन नृत्य अधूनमधून करून बघतो. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आज घरी मंडळींनी अभंग लावलेले. त्यावर जरासा ताल धरला. या तालावर उडी मारणे मला जमत नाही, याकडे आमच्या मंडळींनी लक्ष वेधले. तसे, एका कामवाल्या आजीबाईंच्या अभंगाच्या तालावरील 'विठ्ठल रखुमाई, ज्ञानबा तुकाराम' म्हणत उत्साहाने मारलेल्या त्यांच्या उड्यांच्या आठवणींनी मला १९८० च्या दशकात गावाकडे नेले.
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी
राखू कशी, अंगावरली ?
राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!!
कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील.
सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो.
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं.
यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे.
कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही.
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली. याच हस्तलिखितातले ,मन्ना डे यांनी गायलेले गाणे,"घन वन माला नभी ग्रासल्या,कोसळती धारा",हे अप्रतिम गाणे आपल्याला मिळाले.
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort
✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक
✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का?
✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू?
✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर?
✪ आपत्ती येणारच आहेत
✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो?
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे.
"१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा"
मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय..
माझा साक्षात्कारी हृदयरोग
डॉ. अभय बंग
शोधग्राम, गडचिरोली येथील प्रसिद्ध सामाजिक नेते डॉ अभय बंग यांनी त्यांच्या हृदयरोगावर कशाप्रकारे काम करत यशस्वीपणे हा आजार दूर केला याबाबतचे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे पुस्तक आहे, जे अनेकांना प्रेरणा देणारे आहे.
वायुसेनेतील आठवणी - कॉपल पांडे जी एस – भाग ३
“कला आणि करुणेचा साक्षात सिपाही – कॉपल पांडे”
"मेन लाईक जीएस पांडे आर जीनियस अँड दे आर अबव्ह ऑल एक्सपेक्टेशन्स."
(“जीएस पांडेसारखे माणसं असामान्य बुद्धिमत्तेची असतात आणि सर्व अपेक्षांच्या पलीकडे जातात.”)
माझं मन पुन्हा भूतकाळात हरवलं…
दुपारी २ वाजता मी ऑफिसमधून बाहेर पडत होतो. पवार, ऑफिस बॉयने माझ्या कारमध्ये ब्रीफकेस ठेवली. रियर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर कुणीतरी सावधपणे माझ्या दिशेने येत होतं. मी चेहरा थोडा उग्र केला, आणि त्याने लगेच सॅल्यूट करत म्हटलं:
“गुड आफ्टरनून सर, धिस इज कॉपल पांडे रिपोर्टिंग!”
नमस्कार. डॉ. जयंत नारळीकर गेले! अनेकांना ज्यांच्यामुळे खगोलशास्त्र कळालं ते नारळीकर सर! विदेशात उच्च पदावर असूनही प्रवाहाविरुद्ध भारतामध्ये विज्ञान प्रसारासाठी आलेले नारळीकर सर! संशोधक, शिक्षक आणि विज्ञान प्रसारक! त्यांना दोनदा भेटण्याचा मला योग आला होता. त्यांची पत्रंही आली होती. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.