माझी दिवाळी
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये आपण पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी:
1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही.
2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात.
जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं. आज ऋग्वेदाला सर्वांत प्राचीन ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली आहे.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात.
पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात.
मध्यंतरी एका मैत्रिणीकडे गेले होते. म्हणजे आम्ही तिघी शाळेतल्या मैत्रीणी एका मैत्रिणीच्या घरात एकत्र जमलो होतो.
दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत गप्पा मारायच्या असा बेत होता. मी त्या मैत्रीणीकडे कुसुमकडे वेळेवर पोहोचले. माझी दुसरी मैत्रीण विजू तीही वेळेवर आली. व्हॉट्सॲप ग्रुप बनून दोन तीन वर्षे झाली असली तरी विजू मला समोरासमोर मात्र शाळेच्या शेवटच्या दिवसानंतर आजच भेटत होती. सुरुवातीलाच आम्ही गळाभेट घेतली.
आपणां सर्वांनाच सुसंगत आयुष्य जगायला आवडतं. पण अनेक वेळा आपल्याला विसंगतीला सामोरं जावंच लागतं. विसंगत म्हणजे चुकीचं, योग्य नसणारं असं,खटकणारं! काही वेळा दस्तुरखुद्द आपणच विसंगत वागत असतो.
विसंगतीचं किंवा चुकांचं सर्वांत मोठं आगार म्हणजे सिनेमा आणि टी व्ही सृष्टी. यात कथेतील कंटीनुईटीच्या चुका, लेखकापासून, संवाद लेखकापासून, गीतकारापासून ते अगदी एडिटरपर्यंतच्या अनेकांच्या डुलक्या हे सर्व येतं.
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी खेळातल्या पंचाप्रमाणे असावी. जेव्हा पंच मैदानात असतात, तेव्हा आपल्या देशाच्या खेळाडूने षटकार मारला तरी ते आनंद व्यक्त करत नाहीत आणि आउट झाल्यावर दु:खही व्यक्त करत नाहीत.
तरीही, जेव्हा सामना भारत-पाकिस्तान दरम्यान असतो, तेव्हा दोन्ही देशांचे पंचही तटस्थ राहू शकत नाहीत. बिशन सिंह बेदी आपल्या संघाला पाकिस्तानमधून परत घेऊन आले होते कारण पाकिस्तानी पंच अन्याय करत होते. तसेच, भारतीय पंच दारा धोतीवाला भारताच्या बाजूने कायम उभे दिसले.