प्रवास
रेल्वे रिटायरिंग रूम्स
रेल्वेचा प्रवास म्हणजे अस्वच्छ अशी छबी पुसून काढणाऱ्या अनेक गोष्टींपैकी अजून एक गोष्ट म्हणजे जंक्शनसारख्या ठिकाणी दिसणाऱ्या रेल्वे रिटायरिंग रूम्स.डिलक्स आणि डॉर्मिटरी प्रकारात सदर रूम उपलब्ध असतात.
भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग १
जानेवारीत बातमी आली की महिला दिनानिमित्त १ मार्च ते ८ मार्च दरम्यान MTDC च्या कोणत्याही रिसॉर्टमध्ये बुकिंग कारणाऱ्या महिलांना ५० टक्के सूट दिली जाईल. निश्चित कोणा कोणाला सूट मिळेल ते बातमीतून समजत नव्हते. मंडळाकडे चौकशी केली असता कळले कि ज्या महिलेच्या नावावर बुकिंग आहे तिच्या सोबत पुरुष व्यक्तीही येऊ शकतात. अट मात्र अशी होती की जिच्या नावावर बुकिंग आहे ती महिला हॉटेलमध्ये प्रवेश करते वेळी तेथे हजर असावी.
जुनेरलं नातं...निरोपाची वेळं
प्राची ताईच्या कवीता नेहमीच काहीतरी नवीन देऊन जातात. प्रतिपदेची चंद्रकोर बघून काही ओळी सुचल्या होत्या पण पुर्ण नव्हत्या झाल्या त्या आज पुर्ण झाल्यासारख्या वाटतात.
जुनेरलं नातं...
आभाळीची चंद्रकोर
शोभते तुझ्या भाळी
तुझ्या पैंजण नादाने
आनंदाची मांदियाळी
चंद्रकोरीचा गारवा
सुखावतो डोळा
विचार चांदण्याचा
मनी घुमतो पारवा
चंद्रकोर झाली बिंब
उजळल्या दाही दिशा
चंचल मन शिंजीर
पालवल्या नव्या आशा
जसे नभी सुर्य चंद्र
दिनरात अशी साथ
कधी तार कधी मंद्र
ताल,सुरांचे आर्त
माझी नर्मदा परिक्रमा
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !
रेवदंड्याचं दर्शन
बेलापूरचा किल्ला
सात आठशे वर्षांचा इतिहास असला तरी काहीसा दुर्लक्षित असा नव्या मुंबईतील बेलापूरचा हा किल्ला. नुकताच एका प्रतिसादात मी या किल्ल्याचा उल्लेख केला होता.
किल्ला सिद्धींनी १५६० ते १५७० या काळात बांधला. त्यानंतर पोर्तुगिजांनी याचा ताबा घेतला. १७३३/१७३७ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याचा ताबा मिळवला. त्यानंतर १९ व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांच्या ताब्यात गेला (माहिती आंतर्जालाहून साभार)
एक माहितीपर लेख येथे वाचावयास मिळेल.
इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास
अविस्मरणीय लिंगाणा...
दुर्गराज श्रीमान रायगडावरून, राजवाडा, राजसदर वा जगदीश्वर मंदीर असो की भवानी टोक, तिथून साधारण पुर्वेला पाहिलं की एक सुळका त्याच्या वैशिष्ट्यपुर्ण आकाराने लगेचंच लक्ष वेधून घेतो. तिथून, उंचीला तो श्रीमान रायगडाच्याही वरचढ भासतो. वातावरण स्वच्छ असेल तर त्या सुळक्यामागे एक विस्तीर्ण पठार ही नजरेस पडते, श्रीमान रायगडावरून जेव्हा-जेव्हा हा सुळका नजरेस पडायचा तेव्हा-तेव्हा तो मनात एक आव्हान पेरायचा, जणु काही "आहे का हिंमत माझ्या वाटेला यायची ? " असंच विचारतोय असं वाटायचं.