मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·

रेवती Sat, 11/02/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा Sat, 11/02/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती Sat, 11/02/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या Sun, 11/03/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा Sun, 11/03/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)

रेवती Sat, 11/02/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा Sat, 11/02/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती Sat, 11/02/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या Sun, 11/03/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा Sun, 11/03/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम

ताजे प्रेत ·

ताजे प्रेत Wed, 03/18/2026 - 13:01
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराजवळ 'रघुनाथराव' यांची मिसळ आणि वडापावची एक अत्यंत जुनी आणि साधी गाडी (हातगाडी) होती. अंगावर मळकट सदरा, राखेने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम हसू... हीच रघुनाथरावांची ओळख होती. त्यांचा मुलगा, 'सिद्धार्थ', मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ होता. सिद्धार्थने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आणि स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर कोल्हापुरात एक अतिशय भव्य, पाचतारांकित (5-Star) हॉटेल उभे केले. या हॉटेलसाठी त्याने बँकेकडून १० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हॉटेलचे काम पूर्ण झाले, पण सिद्धार्थला स्वतःच्या बापाच्या त्या 'रस्त्यावरच्या' वडापावच्या गाडीची आणि गरिबीची भयंकर लाज वाटायची. हॉटेलच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी सिद्धार्थ रागाने रघुनाथरावांच्या गाडीवर गेला. "उद्या माझ्या हॉटेलचं ओपनिंग आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मोठे साहेब येणार आहेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या त्या राखेने माखलेल्या हातांनी आणि फाटक्या कपड्यांनी माझ्या हॉटेलच्या आसपासही फिरकू नका. लोक मला हसतील की एका पाचतारांकित हॉटेलच्या मालकाचा बाप रस्त्यावर वडापाव विकतोय. माझी इज्जत घालवू नका, उद्या घरीच थांबा!" सिद्धार्थ अत्यंत क्रूरपणे आणि सर्वांसमोर बापाचा अपमान करून निघून गेला. रघुनाथरावांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, पण ते मूकपणे स्वतःच्या चुलीतील राख पुसत गप्प राहिले. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा सुरू झाला. हजारो व्हीआयपी (VIP) पाहुणे आले होते. पण रात्री आठ वाजता निसर्गाने भयंकर रूप धारण केले. कोल्हापुरात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटाने संपूर्ण शहराची वीज गेली. आणि सर्वात मोठा आघात तेव्हा झाला, जेव्हा हॉटेलच्या मुख्य किचनमधील गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला. सुरक्षिततेसाठी संपूर्ण हॉटेलचा गॅस सप्लाय बंद पडला. किचनमध्ये अंधार आणि गोंधळ उडाला. बाहेर ५०० व्हीआयपी पाहुणे जेवणाची वाट बघत होते आणि किचनमध्ये एक कणभरही अन्न शिजवणे शक्य नव्हते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. "पाहुण्यांना जेवण दिलं नाही, तर मीडियात माझी बदनामी होईल. हॉटेलची इज्जत जाईल आणि माझं १० कोटींचं कर्ज बुडेल!" सिद्धार्थ वेड्यासारखा डोक्याला हात लावून रडत होता. त्याचे परदेशातून बोलावलेले शेफ (Chefs) गॅसशिवाय काहीही करू शकत नव्हते. सिद्धार्थला स्वतःचे आयुष्य संपल्यासारखे वाटत होते. पण बरोबर नऊ वाजता... हॉटेलच्या मागच्या दारातून वेटर्सनी गरम, वाफाळणाऱ्या आणि अत्यंत चविष्ट जेवणाचे ताट आणून पाहुण्यांना वाढायला सुरुवात केली! अन्नाचा तो सुगंध संपूर्ण हॉटेलमध्ये पसरला. पाहुणे बोटे चाटून जेवत होते. सिद्धार्थला काहीच समजेना. "हे जेवण कुठून आलं? किचन तर बंद आहे!" त्याने मॅनेजरला ओरडून विचारले. "साहेब... मागच्या सर्व्हिस गल्लीत कोणीतरी बाहेरून येऊन चूल पेटवलीये. ते तिथून जेवण पाठवतायत," मॅनेजर म्हणाला. सिद्धार्थ धावतच हॉटेलच्या मागच्या अंधाऱ्या गल्लीत गेला. आणि तिथे मुसळधार पावसात जे दृश्य त्याने पाहिले, ते बघून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याच्या पायाखालची जमीन कायमची सरकली. हॉटेलच्या मागच्या मोकळ्या जागेत, एका फाटलेल्या प्लास्टिकच्या ताडपत्रीखाली 'रघुनाथराव' उभे होते! त्यांनी पावसात भिजतच विटांच्या तीन भल्यामोठ्या चुली मांडल्या होत्या. त्यांच्या अंगावरचा सदरा पावसात पूर्णपणे भिजला होता, पाठीवर पावसाचे थंडगार थेंब आणि विजांचा कडकडाट कोसळत होता, पण त्यांच्या समोर असलेल्या त्या महाकाय चुलींमधून भयंकर आगीचे लोळ उठत होते. वेळ अजिबात नव्हता आणि पाहुणे जास्त होते, त्यामुळे पकड किंवा चिमटा शोधायला वेळ घालवण्याऐवजी... रघुनाथराव स्वतःच्या 'उघड्या हातांनी' ते उकळत्या रस्स्याचे आणि गरम भाज्यांचे महाकाय पातेले चुलीवरून खाली उतरवत होते! सिद्धार्थ तिथेच थिजून गेला. त्याने बापाच्या हातांकडे पाहिले. रघुनाथरावांच्या दोन्ही हातांची कातडी त्या भयंकर उष्णतेने आणि उकळत्या पातेल्यांच्या चटक्यांनी पूर्णपणे सोलवटून निघाली होती. त्यांच्या हातांवर लिंबाएवढे पाण्याचे फोड आले होते, त्यातून रक्त आणि पाणी गळत होते. पण तो बाप चेहऱ्यावर कोणताही वेदनेचा भाव न आणता, स्वतःचे रक्तबंबाळ आणि जळालेले हात पुन्हा पुन्हा त्या भयंकर उष्णतेत घालत होता... फक्त एकाच वेडेपणापायी... "माझ्या पोराची इज्जत गेली नाही पाहिजे, माझ्या पोराचं स्वप्न मोडलं नाही पाहिजे!" ज्या गरिबीची आणि ज्या राखेने माखलेल्या हातांची सिद्धार्थला काल लाज वाटत होती, आज त्याच जळलेल्या आणि रक्तबंबाळ हातांनी त्याच्या १० कोटींच्या हॉटेलची इज्जत आणि त्याचे भविष्य वाचवले होते! परदेशातून आलेले ते हाय-क्लास शेफ अंधारात लपून बसले होते, पण एक 'रस्त्यावरचा वडापाव विकणारा बाप' स्वतःच्या कातडीचे आणि रक्ताचे पाणी करून भरपावसात आपल्या पोराचा संसार उभा करत होता. अखेर शेवटचे पातेले खाली उतरवल्यावर, वेदना असह्य होऊन रघुनाथराव तिथेच त्या चिखलात आणि पावसात बेशुद्ध होऊन कोसळले. "बाबा...!" सिद्धार्थच्या घशातून एक भयंकर किंकाळी फुटली. तो धावत गेला आणि त्या चिखलात, बापाच्या शेजारी गुडघ्यावर कोसळला. त्याने स्वतःचा तो महागडा कोट फाडून फेकून दिला. त्याने रघुनाथरावांचे ते जळालेले, सोलवटलेले आणि रक्ताने माखलेले हात स्वतःच्या छातीशी घट्ट आवळून धरले. तो पावसाच्या आवाजापेक्षाही मोठ्याने ओक्साबोक्शी रडत होता. पैशांचा, पाचतारांकित हॉटेलचा आणि यशाचा तो हिमालयाएवढा अहंकार आज चिखलात पडलेल्या एका बापाच्या जळलेल्या हातांसमोर कायमचा राख झाला होता. आपणच आपल्या देवाला हॉटेलमधून कुत्र्यासारखे हाकलून लावले, ही पश्चात्तापाची आणि अपराधीपणाची जाणीव इतकी भयंकर आणि जीवघेणी होती की, सिद्धार्थ एका जिवंत प्रेतासारखा त्या चिखलात कायमचा थिजून गेला. ती सुन्न करणारी शांतता आज त्या मुसळधार पावसापेक्षाही भयंकर होती. आपल्याला जे यश मिळते, ते अनेकदा आपल्या आई-वडिलांनी स्वतःचे हात आणि आयुष्य जाळून मिळवून दिलेले असते. कधीही स्वतःच्या यशाचा अहंकार करून आई-वडिलांच्या साधेपणाची लाज वाटून घेऊ नका. कारण जेव्हा तुमची सर्व संपत्ती आणि जगातील सर्व लोक साथ सोडतात, तेव्हा तुमचे आई-वडीलच स्वतःच्या अस्तित्वाची राख करून तुम्हाला अंधारातून बाहेर काढतात.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:24
रखमाची मुलगी - णूड्रॅली !! कुठून अशी नावे सुचतात?? हॅट्स ऑफ !!

गवि गुरुवार, 03/19/2026 - 07:44
पण उद्घाटनाच्या अवघे काही तास आधी एक भयंकर घटना घडली. पाणबुडीला उडवण्यासाठी लागणारे मुख्य इंधन—'प्लुटोनियम' (Plutonium)—कोणीतरी लॅबमधून चोरून नेले!
तरी बरे, "फ्यूज कंडक्टर" काढून नाही नेले..

In reply to by गवि

मुक्त विहारि गुरुवार, 03/19/2026 - 09:59
तुम्हाला पण ही कूट कथा समजली नाही? "बाराला दहा कमी" हे पुस्तक वाचलेत तर , समजेल. एक शास्त्रज्ञ, "बेरियम" औषध म्हणून पीत होता. हा ह्या कथेचा पूर्व भाग. जर्मन शास्त्रज्ञ, अणु बाँब बनवू शकत होते. पण, हिटलर ही गोष्ट समजू शकला नाही आणि नंतर आर्थिक दृष्टीने, अणुबॉम्ब तयार करणे, जर्मनीला अशक्य झाले. हीच गोष्ट रॉकेट सायन्स बाबतीत घडली... ह्या गोष्टी म्हणजे, कथेचा मध्यभाग. आणि एखादा मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, बऱ्याच जणांना आपले प्राण खर्ची घालावे लागतात आणि अशा लोकांना कुणीही , प्रकल्प पूर्ण झाला की, विचारात घेत नाही. हा कथेचा उत्तरार्ध... थोडक्यात सांगायचे तर, "नाही चिरा, नाही पणती..." अशी ही एका वाक्यातली कूट कथा आहे. तुम्ही , ह्याच कथेला, "मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे...." असे काव्यात पण म्हणू शकता.... बाय द वे, मनोरंजक प्रतिसाद लिहीण्यापेक्षा, अशा कूट कथा लिहिणे, फार उत्तम.... हे माझे वैयक्तिक मत आहे....

ताजे प्रेत Wed, 03/18/2026 - 13:01
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराजवळ 'रघुनाथराव' यांची मिसळ आणि वडापावची एक अत्यंत जुनी आणि साधी गाडी (हातगाडी) होती. अंगावर मळकट सदरा, राखेने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम हसू... हीच रघुनाथरावांची ओळख होती. त्यांचा मुलगा, 'सिद्धार्थ', मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ होता. सिद्धार्थने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आणि स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर कोल्हापुरात एक अतिशय भव्य, पाचतारांकित (5-Star) हॉटेल उभे केले. या हॉटेलसाठी त्याने बँकेकडून १० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हॉटेलचे काम पूर्ण झाले, पण सिद्धार्थला स्वतःच्या बापाच्या त्या 'रस्त्यावरच्या' वडापावच्या गाडीची आणि गरिबीची भयंकर लाज वाटायची. हॉटेलच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी सिद्धार्थ रागाने रघुनाथरावांच्या गाडीवर गेला. "उद्या माझ्या हॉटेलचं ओपनिंग आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मोठे साहेब येणार आहेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या त्या राखेने माखलेल्या हातांनी आणि फाटक्या कपड्यांनी माझ्या हॉटेलच्या आसपासही फिरकू नका. लोक मला हसतील की एका पाचतारांकित हॉटेलच्या मालकाचा बाप रस्त्यावर वडापाव विकतोय. माझी इज्जत घालवू नका, उद्या घरीच थांबा!" सिद्धार्थ अत्यंत क्रूरपणे आणि सर्वांसमोर बापाचा अपमान करून निघून गेला. रघुनाथरावांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, पण ते मूकपणे स्वतःच्या चुलीतील राख पुसत गप्प राहिले. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा सुरू झाला. हजारो व्हीआयपी (VIP) पाहुणे आले होते. पण रात्री आठ वाजता निसर्गाने भयंकर रूप धारण केले. कोल्हापुरात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटाने संपूर्ण शहराची वीज गेली. आणि सर्वात मोठा आघात तेव्हा झाला, जेव्हा हॉटेलच्या मुख्य किचनमधील गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला. सुरक्षिततेसाठी संपूर्ण हॉटेलचा गॅस सप्लाय बंद पडला. किचनमध्ये अंधार आणि गोंधळ उडाला. बाहेर ५०० व्हीआयपी पाहुणे जेवणाची वाट बघत होते आणि किचनमध्ये एक कणभरही अन्न शिजवणे शक्य नव्हते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. "पाहुण्यांना जेवण दिलं नाही, तर मीडियात माझी बदनामी होईल. हॉटेलची इज्जत जाईल आणि माझं १० कोटींचं कर्ज बुडेल!" सिद्धार्थ वेड्यासारखा डोक्याला हात लावून रडत होता. त्याचे परदेशातून बोलावलेले शेफ (Chefs) गॅसशिवाय काहीही करू शकत नव्हते. सिद्धार्थला स्वतःचे आयुष्य संपल्यासारखे वाटत होते. पण बरोबर नऊ वाजता... हॉटेलच्या मागच्या दारातून वेटर्सनी गरम, वाफाळणाऱ्या आणि अत्यंत चविष्ट जेवणाचे ताट आणून पाहुण्यांना वाढायला सुरुवात केली! अन्नाचा तो सुगंध संपूर्ण हॉटेलमध्ये पसरला. पाहुणे बोटे चाटून जेवत होते. सिद्धार्थला काहीच समजेना. "हे जेवण कुठून आलं? किचन तर बंद आहे!" त्याने मॅनेजरला ओरडून विचारले. "साहेब... मागच्या सर्व्हिस गल्लीत कोणीतरी बाहेरून येऊन चूल पेटवलीये. ते तिथून जेवण पाठवतायत," मॅनेजर म्हणाला. सिद्धार्थ धावतच हॉटेलच्या मागच्या अंधाऱ्या गल्लीत गेला. आणि तिथे मुसळधार पावसात जे दृश्य त्याने पाहिले, ते बघून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याच्या पायाखालची जमीन कायमची सरकली. हॉटेलच्या मागच्या मोकळ्या जागेत, एका फाटलेल्या प्लास्टिकच्या ताडपत्रीखाली 'रघुनाथराव' उभे होते! त्यांनी पावसात भिजतच विटांच्या तीन भल्यामोठ्या चुली मांडल्या होत्या. त्यांच्या अंगावरचा सदरा पावसात पूर्णपणे भिजला होता, पाठीवर पावसाचे थंडगार थेंब आणि विजांचा कडकडाट कोसळत होता, पण त्यांच्या समोर असलेल्या त्या महाकाय चुलींमधून भयंकर आगीचे लोळ उठत होते. वेळ अजिबात नव्हता आणि पाहुणे जास्त होते, त्यामुळे पकड किंवा चिमटा शोधायला वेळ घालवण्याऐवजी... रघुनाथराव स्वतःच्या 'उघड्या हातांनी' ते उकळत्या रस्स्याचे आणि गरम भाज्यांचे महाकाय पातेले चुलीवरून खाली उतरवत होते! सिद्धार्थ तिथेच थिजून गेला. त्याने बापाच्या हातांकडे पाहिले. रघुनाथरावांच्या दोन्ही हातांची कातडी त्या भयंकर उष्णतेने आणि उकळत्या पातेल्यांच्या चटक्यांनी पूर्णपणे सोलवटून निघाली होती. त्यांच्या हातांवर लिंबाएवढे पाण्याचे फोड आले होते, त्यातून रक्त आणि पाणी गळत होते. पण तो बाप चेहऱ्यावर कोणताही वेदनेचा भाव न आणता, स्वतःचे रक्तबंबाळ आणि जळालेले हात पुन्हा पुन्हा त्या भयंकर उष्णतेत घालत होता... फक्त एकाच वेडेपणापायी... "माझ्या पोराची इज्जत गेली नाही पाहिजे, माझ्या पोराचं स्वप्न मोडलं नाही पाहिजे!" ज्या गरिबीची आणि ज्या राखेने माखलेल्या हातांची सिद्धार्थला काल लाज वाटत होती, आज त्याच जळलेल्या आणि रक्तबंबाळ हातांनी त्याच्या १० कोटींच्या हॉटेलची इज्जत आणि त्याचे भविष्य वाचवले होते! परदेशातून आलेले ते हाय-क्लास शेफ अंधारात लपून बसले होते, पण एक 'रस्त्यावरचा वडापाव विकणारा बाप' स्वतःच्या कातडीचे आणि रक्ताचे पाणी करून भरपावसात आपल्या पोराचा संसार उभा करत होता. अखेर शेवटचे पातेले खाली उतरवल्यावर, वेदना असह्य होऊन रघुनाथराव तिथेच त्या चिखलात आणि पावसात बेशुद्ध होऊन कोसळले. "बाबा...!" सिद्धार्थच्या घशातून एक भयंकर किंकाळी फुटली. तो धावत गेला आणि त्या चिखलात, बापाच्या शेजारी गुडघ्यावर कोसळला. त्याने स्वतःचा तो महागडा कोट फाडून फेकून दिला. त्याने रघुनाथरावांचे ते जळालेले, सोलवटलेले आणि रक्ताने माखलेले हात स्वतःच्या छातीशी घट्ट आवळून धरले. तो पावसाच्या आवाजापेक्षाही मोठ्याने ओक्साबोक्शी रडत होता. पैशांचा, पाचतारांकित हॉटेलचा आणि यशाचा तो हिमालयाएवढा अहंकार आज चिखलात पडलेल्या एका बापाच्या जळलेल्या हातांसमोर कायमचा राख झाला होता. आपणच आपल्या देवाला हॉटेलमधून कुत्र्यासारखे हाकलून लावले, ही पश्चात्तापाची आणि अपराधीपणाची जाणीव इतकी भयंकर आणि जीवघेणी होती की, सिद्धार्थ एका जिवंत प्रेतासारखा त्या चिखलात कायमचा थिजून गेला. ती सुन्न करणारी शांतता आज त्या मुसळधार पावसापेक्षाही भयंकर होती. आपल्याला जे यश मिळते, ते अनेकदा आपल्या आई-वडिलांनी स्वतःचे हात आणि आयुष्य जाळून मिळवून दिलेले असते. कधीही स्वतःच्या यशाचा अहंकार करून आई-वडिलांच्या साधेपणाची लाज वाटून घेऊ नका. कारण जेव्हा तुमची सर्व संपत्ती आणि जगातील सर्व लोक साथ सोडतात, तेव्हा तुमचे आई-वडीलच स्वतःच्या अस्तित्वाची राख करून तुम्हाला अंधारातून बाहेर काढतात.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:24
रखमाची मुलगी - णूड्रॅली !! कुठून अशी नावे सुचतात?? हॅट्स ऑफ !!

गवि गुरुवार, 03/19/2026 - 07:44
पण उद्घाटनाच्या अवघे काही तास आधी एक भयंकर घटना घडली. पाणबुडीला उडवण्यासाठी लागणारे मुख्य इंधन—'प्लुटोनियम' (Plutonium)—कोणीतरी लॅबमधून चोरून नेले!
तरी बरे, "फ्यूज कंडक्टर" काढून नाही नेले..

In reply to by गवि

मुक्त विहारि गुरुवार, 03/19/2026 - 09:59
तुम्हाला पण ही कूट कथा समजली नाही? "बाराला दहा कमी" हे पुस्तक वाचलेत तर , समजेल. एक शास्त्रज्ञ, "बेरियम" औषध म्हणून पीत होता. हा ह्या कथेचा पूर्व भाग. जर्मन शास्त्रज्ञ, अणु बाँब बनवू शकत होते. पण, हिटलर ही गोष्ट समजू शकला नाही आणि नंतर आर्थिक दृष्टीने, अणुबॉम्ब तयार करणे, जर्मनीला अशक्य झाले. हीच गोष्ट रॉकेट सायन्स बाबतीत घडली... ह्या गोष्टी म्हणजे, कथेचा मध्यभाग. आणि एखादा मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, बऱ्याच जणांना आपले प्राण खर्ची घालावे लागतात आणि अशा लोकांना कुणीही , प्रकल्प पूर्ण झाला की, विचारात घेत नाही. हा कथेचा उत्तरार्ध... थोडक्यात सांगायचे तर, "नाही चिरा, नाही पणती..." अशी ही एका वाक्यातली कूट कथा आहे. तुम्ही , ह्याच कथेला, "मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे...." असे काव्यात पण म्हणू शकता.... बाय द वे, मनोरंजक प्रतिसाद लिहीण्यापेक्षा, अशा कूट कथा लिहिणे, फार उत्तम.... हे माझे वैयक्तिक मत आहे....
लेखनविषय:
लेखनप्रकार
उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम पुण्यातील एका वस्तीत 'रखमा' नावाच्या एका स्त्रीचा हातभट्टीचा (गावठी दारूचा) अड्डा होता. अंगावर जुनी साडी, दारूच्या वासाने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम एक निर्विकार भाव... हीच रखमाची ओळख होती. पण यामागे एक मोठे रहस्य होते. रखमाने 'न्यूक्लिअर इंजिनिअरिंग'मध्ये डिप्लोमा केलेला होता. पण वशिलेबाजीमुळे आणि नशिबामुळे तिला कुठेच जॉब मिळाला नाही. शेवटी पोटापाण्यासाठी तिने पुण्यात हातभट्टी लावली होती. तिची मुलगी, 'णूड्रॅली', मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ होती. णूड्रॅलीला आपल्या आईची आणि तिच्या हातभट्टीच्या व्यवसायाची भयंकर चीड होती.

सहज सुचलं म्हणून _ २०२६

कंजूस ·

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 08:54
पासकी या गुगल पासवर्ड मॅनेजरशी सिंक असेल ना? फोन हरवला असेल, तर तुम्ही तुमच्या गुगल आयडीने दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, किंवा जुन्या फोनवरून लॉगिन करून चालू शकेल. क्लाउड सिंकिंगमुळे तुमच्या सर्व पासकी आपोआप दुसऱ्या फोन वर मिळतील. अकाउंट लॉक होत नाही. पास्वर्ड पण कुठे जात नाही. पण फोअन हरवला असेल तर अँड्रॉइडसाठी 'फाइंड माय डिव्हाइस वरून लॉक करा. अनोळखी व्यक्तीला तुमच्या बायोमेट्रिक्सशिवाय किंवा फोनच्या पिनशिवाय त्या पासकीचा वापर करता येणार नाही. दुसर्‍या फोन वरून सेटिंग्जमध्ये जाऊन हरवलेल्या फोनशी संबंधित असलेली जुनी पासकी कायमची काढून टाकायची.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 08:54
पासकी या गुगल पासवर्ड मॅनेजरशी सिंक असेल ना? फोन हरवला असेल, तर तुम्ही तुमच्या गुगल आयडीने दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, किंवा जुन्या फोनवरून लॉगिन करून चालू शकेल. क्लाउड सिंकिंगमुळे तुमच्या सर्व पासकी आपोआप दुसऱ्या फोन वर मिळतील. अकाउंट लॉक होत नाही. पास्वर्ड पण कुठे जात नाही. पण फोअन हरवला असेल तर अँड्रॉइडसाठी 'फाइंड माय डिव्हाइस वरून लॉक करा. अनोळखी व्यक्तीला तुमच्या बायोमेट्रिक्सशिवाय किंवा फोनच्या पिनशिवाय त्या पासकीचा वापर करता येणार नाही. दुसर्‍या फोन वरून सेटिंग्जमध्ये जाऊन हरवलेल्या फोनशी संबंधित असलेली जुनी पासकी कायमची काढून टाकायची.
लेखनविषय:
मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे. राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी. ----------------------------- एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD १. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली. २. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे? ३. एकच password लक्षात ठेवा आणि तो password vault साठी वापरा. त्यात सर्व इतर passwords ठेवा सांगतात.

इराण : डोंगरी भिवरलीचं अधर्मयुद्ध

गामा पैलवान ·

चेतन Wed, 03/18/2026 - 18:30
इराण युद्धाच्या भोवऱ्यात फिरणारे झिगझॅग शब्द अचानक भडकतात आणि मग थंड होतात, जिथे धूर बोलतो आणि शांतता ओरडते, तिथे कागदी रणांगणावर उडणारे अक्षरांचे तुकडे बोंबलतात विचित्र तालात. मिसाईलसारखे वाक्ये आकाशात झेप घेतात आणि मग पावसासारखी कोसळतात अर्थहीन ढगांत, जिथे इतिहास स्वतःलाच विसरतो आणि नकाशे पळून जातात पावलांच्या मागे. 2026 च्या गूढ इराण युद्धात अचानक Donald Trump चे नाव धुरकट ढगातून तरंगत येते, जणू काही शब्दांचा वेडावाकडा तारा आकाशात अडकलेला. त्याच्या सावल्या वाक्यांवर पडतात आणि अक्षरे क्षणभर सरळ उभी राहतात, पण लगेच पुन्हा गोंधळात नाचू लागतात. Israel च्या दिशेने वळलेले वारे अचानक रंग बदलतात, जिथे नकाशे स्वतःला पुन्हा रेखाटतात आणि सीमारेषा कुजबुजतात गुपिते. Strait of Hormuz च्या पाण्यात तरंगणारे विचार लाटांसोबत उलटसुलट होतात, जहाजे स्वप्नांच्या जाळ्यात अडकतात, आणि दिशाहीन कंपास हसतात. ड्रोनचे तुटक गाणे आकाशात भिरभिरते, रंगीबेरंगी निःशब्द प्रश्न फेकते, आणि जमिनीवर पडलेली उत्तरे कर्कश हसतात. शहरे झोपतात जागी राहून, लोकांच्या सावल्या वेगळ्याच दिशेने चालतात, आणि वेळ सापासारखी स्वतःभोवती गुंडाळते. वाक्यांचे सैनिक सरळ चालत नाहीत—ते गोल गोल फिरतात, एकमेकांवर आदळतात आणि हवेत विरघळतात. या विचित्र कथानकात बातम्यांचे ढग गोड, कडू आणि बुळबुळीत होतात, जिथे सत्य आणि खोटं दोन्ही हरवून बसतात. शेवटी उरतो फक्त गोंधळाचा प्रतिध्वनी—थरथरणारा, भिरभिरणारा, आणि पुन्हा नव्याने जन्म घेणारा. :-) साभार चॅटजीपीटी.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:20
तुम्ही म्हटल्याप्रमाणे नादिर शाहचे साम्राज्य अल्पकाळ टिकले, पण त्याचे महत्त्व केवळ वर्षांवरून ठरवता येत नाही. नादिर शाहला "शिया नेपोलियन" म्हटले जाते. सफावी घराण्याचा अंत झाल्यानंतर आणि झंड/काजार येण्यापूर्वी त्याने इराणला विखुरण्यापासून वाचवले होते. विशेष म्हणजे, त्याने मुघलांकडून कोहिनूर आणि मयूर सिंहासन नेले, ज्यामुळे इराणची आर्थिक स्थिती काही काळ कमालीची सुधारली होती. आगा मोहम्मद खान काजार चा उपस्थित केलेला मुद्दा की तो झंड राजकन्येचा मुलगा होता, हे अधिकृत इतिहासात लपवले जाते. कारण काजार राजांनी आपली तुर्की ओळख अधिक मांडण्याचा प्रयत्न केला. -- अरब आक्रमणापूर्वी इराणवर सासनी घराण्याचे राज्य होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या बायझेंटाईन-सासानियन युद्धांमुळे दोन्ही साम्राज्ये आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या थकली होती. अंतर्गत बंडाळ्या आणि सततचे कर यामुळे सामान्य जनताही सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. खलिफा उमर यांच्या काळात इराणवर आक्रमणे सुरू झाली. कादिसियाची लढाई आणि निहावंदची लढाई या दोन लढायांनी सासनी सत्तेचा कणा मोडला. उमय्याद काळात अरबांनी इराणवर कडक नियंत्रण ठेवले. प्रशासकीय भाषा 'पर्शियन' ऐवजी 'अरबी' करण्यात आली. जे पर्शियन लोक इस्लाम स्वीकारत, त्यांना 'मावली' म्हटले जाई. त्यांना अरबांच्या बरोबरीने अधिकार मिळत नसत, ज्यामुळे पर्शियन लोकांमध्ये असंतोष वाढला. उमय्याद राजवटीविरुद्ध झालेल्या उठावात इराणच्या अबू मुस्लिम खुरासानी यांनी मोठी भूमिका बजावली. या क्रांतीनंतर उमय्याद सत्ता जाऊन अब्बासी सत्ता आली. अरबांनी इराण जिंकला खरा, पण सांस्कृतिकदृष्ट्या इराणनेच अरबांना जिंकले असे म्हणतात. -- चंगेज खान आणि हलाकु खान यांनी इराणची खरी वाताहत केली! निशापूर, मर्व, हेरात आणि समरकंद यांसारखी वैभवशाली शहरे त्याने अक्षरशः जमिनीदोस्त केली. चंगेज खानच्या मृत्यूनंतर काही दशकांनी त्याचा नातू हलाकु खान आला. हलाकुचे सर्वात मोठे 'लक्ष्य' म्हणजे बगदाद. तेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफा मुस्तसिम याचे केंद्र होते. हा अब्बासी स्वतःला संपूर्ण मुस्लिम जगाचा आध्यात्मिक प्रमुख मानत असे. खलिफाने शरण येण्यास नकार दिल्यावर हलाकुने बगदादला वेढा घातला आणि शहराचा पाडाव केला. यानंतर हलाकू ने जी मुसलमानांची कत्तल झाली ती इतिहासातील सर्वात भीषण कत्तलींपैकी एक मानली जाते. हलाकुने खलिफाला एका गालिच्यात गुंडाळून त्याच्यावरून घोडे धावण्यास लावले आणि त्याला मारून टाकले. यासह ५०० वर्षांची अब्बासी खिलाफत अधिकृतपणे संपली. हलाकु क्रूर होता पण त्याने मराघे येथे त्या काळातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा बांधली होती. हलाकु खान - त्याचे मुख्य उद्दिष्ट पश्चिम आशियातील उरलेली मुस्लिम सत्ता संपवणे हे होते. हेच कार्य आज अमेरिका करते आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

चेतन Wed, 03/18/2026 - 18:30
इराण युद्धाच्या भोवऱ्यात फिरणारे झिगझॅग शब्द अचानक भडकतात आणि मग थंड होतात, जिथे धूर बोलतो आणि शांतता ओरडते, तिथे कागदी रणांगणावर उडणारे अक्षरांचे तुकडे बोंबलतात विचित्र तालात. मिसाईलसारखे वाक्ये आकाशात झेप घेतात आणि मग पावसासारखी कोसळतात अर्थहीन ढगांत, जिथे इतिहास स्वतःलाच विसरतो आणि नकाशे पळून जातात पावलांच्या मागे. 2026 च्या गूढ इराण युद्धात अचानक Donald Trump चे नाव धुरकट ढगातून तरंगत येते, जणू काही शब्दांचा वेडावाकडा तारा आकाशात अडकलेला. त्याच्या सावल्या वाक्यांवर पडतात आणि अक्षरे क्षणभर सरळ उभी राहतात, पण लगेच पुन्हा गोंधळात नाचू लागतात. Israel च्या दिशेने वळलेले वारे अचानक रंग बदलतात, जिथे नकाशे स्वतःला पुन्हा रेखाटतात आणि सीमारेषा कुजबुजतात गुपिते. Strait of Hormuz च्या पाण्यात तरंगणारे विचार लाटांसोबत उलटसुलट होतात, जहाजे स्वप्नांच्या जाळ्यात अडकतात, आणि दिशाहीन कंपास हसतात. ड्रोनचे तुटक गाणे आकाशात भिरभिरते, रंगीबेरंगी निःशब्द प्रश्न फेकते, आणि जमिनीवर पडलेली उत्तरे कर्कश हसतात. शहरे झोपतात जागी राहून, लोकांच्या सावल्या वेगळ्याच दिशेने चालतात, आणि वेळ सापासारखी स्वतःभोवती गुंडाळते. वाक्यांचे सैनिक सरळ चालत नाहीत—ते गोल गोल फिरतात, एकमेकांवर आदळतात आणि हवेत विरघळतात. या विचित्र कथानकात बातम्यांचे ढग गोड, कडू आणि बुळबुळीत होतात, जिथे सत्य आणि खोटं दोन्ही हरवून बसतात. शेवटी उरतो फक्त गोंधळाचा प्रतिध्वनी—थरथरणारा, भिरभिरणारा, आणि पुन्हा नव्याने जन्म घेणारा. :-) साभार चॅटजीपीटी.

निनाद गुरुवार, 03/19/2026 - 07:20
तुम्ही म्हटल्याप्रमाणे नादिर शाहचे साम्राज्य अल्पकाळ टिकले, पण त्याचे महत्त्व केवळ वर्षांवरून ठरवता येत नाही. नादिर शाहला "शिया नेपोलियन" म्हटले जाते. सफावी घराण्याचा अंत झाल्यानंतर आणि झंड/काजार येण्यापूर्वी त्याने इराणला विखुरण्यापासून वाचवले होते. विशेष म्हणजे, त्याने मुघलांकडून कोहिनूर आणि मयूर सिंहासन नेले, ज्यामुळे इराणची आर्थिक स्थिती काही काळ कमालीची सुधारली होती. आगा मोहम्मद खान काजार चा उपस्थित केलेला मुद्दा की तो झंड राजकन्येचा मुलगा होता, हे अधिकृत इतिहासात लपवले जाते. कारण काजार राजांनी आपली तुर्की ओळख अधिक मांडण्याचा प्रयत्न केला. -- अरब आक्रमणापूर्वी इराणवर सासनी घराण्याचे राज्य होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या बायझेंटाईन-सासानियन युद्धांमुळे दोन्ही साम्राज्ये आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या थकली होती. अंतर्गत बंडाळ्या आणि सततचे कर यामुळे सामान्य जनताही सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. खलिफा उमर यांच्या काळात इराणवर आक्रमणे सुरू झाली. कादिसियाची लढाई आणि निहावंदची लढाई या दोन लढायांनी सासनी सत्तेचा कणा मोडला. उमय्याद काळात अरबांनी इराणवर कडक नियंत्रण ठेवले. प्रशासकीय भाषा 'पर्शियन' ऐवजी 'अरबी' करण्यात आली. जे पर्शियन लोक इस्लाम स्वीकारत, त्यांना 'मावली' म्हटले जाई. त्यांना अरबांच्या बरोबरीने अधिकार मिळत नसत, ज्यामुळे पर्शियन लोकांमध्ये असंतोष वाढला. उमय्याद राजवटीविरुद्ध झालेल्या उठावात इराणच्या अबू मुस्लिम खुरासानी यांनी मोठी भूमिका बजावली. या क्रांतीनंतर उमय्याद सत्ता जाऊन अब्बासी सत्ता आली. अरबांनी इराण जिंकला खरा, पण सांस्कृतिकदृष्ट्या इराणनेच अरबांना जिंकले असे म्हणतात. -- चंगेज खान आणि हलाकु खान यांनी इराणची खरी वाताहत केली! निशापूर, मर्व, हेरात आणि समरकंद यांसारखी वैभवशाली शहरे त्याने अक्षरशः जमिनीदोस्त केली. चंगेज खानच्या मृत्यूनंतर काही दशकांनी त्याचा नातू हलाकु खान आला. हलाकुचे सर्वात मोठे 'लक्ष्य' म्हणजे बगदाद. तेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफा मुस्तसिम याचे केंद्र होते. हा अब्बासी स्वतःला संपूर्ण मुस्लिम जगाचा आध्यात्मिक प्रमुख मानत असे. खलिफाने शरण येण्यास नकार दिल्यावर हलाकुने बगदादला वेढा घातला आणि शहराचा पाडाव केला. यानंतर हलाकू ने जी मुसलमानांची कत्तल झाली ती इतिहासातील सर्वात भीषण कत्तलींपैकी एक मानली जाते. हलाकुने खलिफाला एका गालिच्यात गुंडाळून त्याच्यावरून घोडे धावण्यास लावले आणि त्याला मारून टाकले. यासह ५०० वर्षांची अब्बासी खिलाफत अधिकृतपणे संपली. हलाकु क्रूर होता पण त्याने मराघे येथे त्या काळातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा बांधली होती. हलाकु खान - त्याचे मुख्य उद्दिष्ट पश्चिम आशियातील उरलेली मुस्लिम सत्ता संपवणे हे होते. हेच कार्य आज अमेरिका करते आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, म्हंटलं इराणवर एक लेख व्हायला हवा. सध्या त्याच्या विरोधात अमेरिका व इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. तर इराणचा इतिहासाचा व आजच्या परिस्थितीचा धावता आढावा घ्यावा असा बेत आहे. तर सुरुवात कुठनं करायची? म्हंटलं नुकताच अली खामेनेई मेलाय तर त्याच्यापासनं लेख सुरू करूया. हा इसम शियांचा प्रमुख होता असा दावा आहे. क्याथलिकांचा पोप असतो तसा. मग हा पॅट्रिस लुमुंबा नामे नास्तिक कम्युनिस्ट विद्यापीठात काय झक मारायला गेला होता का? नाही. मुळीच नाही. तो तिथे कम्युनिस्ट क्रांती भक्कम करणं शिकायला गेला होता. होय, इ.स. १९७९ ची खोमेनीची इराणातली धार्मिक क्रांती कम्युनिस्ट ढाच्यावर आधारित आहे.

शेवटचा तुकडा..

गवि ·

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.
जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!

kvponkshe ·

ईंटरव्ह्युला चांगली तयारी करुन , चांगले फॉर्मल कपडे घालुन, वेळे आधीच पोचावे हे खरे , पण नाहीच सिलेक्शन झाले तर "है फिदा तो, आ xx नही तो तेरी xxx" म्हणुन पुढे जावे. माझ्या बाबतीत एका नामांकीत आय टी कंपनीत आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पोझिशन साठी मुलाखती झाल्या पण प्रत्येक वेळी कुठेतरी माशी शिंकली आणि ते मला तिथेच कळले होते. शेवटी मी कानाला खडा लावला की वडापावची गाडी टाकेन पण या कंपनीत नोकरी करणार किवा मागणार नाही.

विजुभाऊ Sun, 03/08/2026 - 17:42
मला एका इन्टर्व्ह्यू मधे फारच विचित्र अनुभव आला होता. मुलाखत घेणारा हा पक्का पुणेरी इसम होता. थेट मुलाखात होती. माझे आडनाव वाचून मी नोकरी कशाला करतो त्यापेक्षा बिझनेस का नाही करत असे थेट विचारले. या आडनावाच्या माणसाला नोकरी कशाला हवी असे बोलून अत्यंत कुजकट हसला. आणि मी तुम्हाला रीजेक्ट करतो आहे.असे सांगितले. त्या वेळेस कामाची खूपच गरज होती. म्हणून माज दाखवू शकलो नाही. पण इतके वर्षानंतर आजही मी त्या इसमाची तक्रार त्या एच आर कडे करायला हवी होती असे वाटते.

पाषाणभेद Mon, 03/09/2026 - 12:35
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो. त्यातही तो दिसतो कसा, बाह्यरूप कसे आहे, कपडे कसे आहेत या कमी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. (ते महत्वाचे असते पण अगदी गरजेचे नसते.) त्यातही भारतात आडनाव, नाव, जात, लिंग, धर्म, वर्ण इत्यादींना अवास्तव महत्व दिले जाते. जे काम आहे ते जर येत असेल तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले तर ठिक असते. पण अगदी बेसीक प्रश्न अनुभवी उमेदवाराला विचारले जातात. अभ्यासबाह्य, कामाच्या व्यतिरीक्त प्रश्न विचारतात. ट्रांन्सपरंट मुलाखत हवी असेल तर मुलाखत घेणारा, देणारा दोन वेगवेगळ्या खोल्यांत बसवा. उमेदवाराला टोकन नंबर द्या अन त्यानेच ओळखा. चेहेरा न दिसता, पाहता काही राऊंड घ्या अन मगच पुढे जा असे हवे. आयटीतल्या मुलाखतीत भयंकर अडवणूक होते.

In reply to by पाषाणभेद

कानडाऊ योगेशु Mon, 03/09/2026 - 20:27
बरोबर बोललात. मी गेली कित्येक वर्षे आय.टी क्षेत्रात काम करत आहे व इंटरव्यु टेबलच्या दोन्ही बाजुचा बराच अनुभव आहे. करिअरच्या सुरवातीला एका अगदीच साधारण कंपनीत निवड झाली होती व त्यावेळी तशी परिस्थिती असल्याने ती कंपनी जॉईन केली होती तिथे मिळालेला अनुभव अजुनही कामास येतो त्याविरूद्ध त्यानंतर त्याच कंपनीच्या अनुभवाच्या जोरावर एका नामांकित कंपनीत इंटरव्यु देऊन निवड झाली होती तिथे काम तसे बरे होते पण राजकारण भरपूर असा प्रकार होता.तिथे जेमतेम १ वर्ष टिकलो. बरेच जण अश्या कंपनीत केवळ एच-१ विसासाठी काम करत होते. पुढे जेव्हा इंटरव्यु पॅनेल मध्ये उमेदवार निवडीसाठी बसु लागलो तिथे तर मुलाखतीत उत्कृष्ठ कामगिरी करणारे प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत अगदीच साधारण होते.नंतर नंतर केवळ कमीत कमी निकष पूर्ण करणार्या एक दोघांना टेक्निकल मध्ये जास्त खोलात न जाता निवडले तर ते तुलनेने चांगले काम करत होते असे आढळले.उत्कृष्ठ रिज्युमे असणारे उमेदवार कंपनीत जास्त दिवस टिकत नाहीत. बरेच जण त्यांच्या कंपनीत नोटीस पिरियड वर असतात व केवळ पॅकेज वाढवुन मिळावे म्हणुन त्याअवधीत वेगवेगळ्या कंपन्यात मुलाखती देतात. असे उमेदवार लगेल कळून येतात त्यांना बर्याच वेळेला वाटेला लावावे लागते. मुलाखत हा बर्याच वेळेला फार्सच असतो. मी ही एखादा उमेदवार जर कमीत कमी निकष पूर्ण करणारा असेल तर बाकीचे फॅक्टर्स पाहतो. (सौदेंडियन जसे स्वतःच्या लोकांना प्राथमिकता देतात तसाच प्रकार.)

In reply to by पाषाणभेद

अभ्यासबाह्य किंवा कामाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारणे आणि त्यावरून निकाल देणे हे चूकच आहे परंतु अनुभवी उमेदवाराला बेसिक प्रश्न विचारायला हरकत नसावी. भले तो माणूस त्या विशिष्ट डोमेन मध्ये १० वर्ष कार्यरत असेल पण ग्राउंड लेवल ला काय होतं हे माहिती असलंच पाहिजे. हां, अनुभवी व्यक्तीला फक्त बेसिक प्रश्न विचारून लगेच ऑफर दिली तर मात्र बरोबर नाही.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या Wed, 03/11/2026 - 21:24
मला मात्र उलटा अनुभव आला होता. फार वर्षापुर्वी मुलाखत दीली होती. एक तर मी मुलाखतीला तयार नव्हतो कारण त्यांना ज्या कामासाठी माणूस हवा होता ते काम मी गेले वर्षभर केले नव्हते. पण त्यावेळी दुर्मीळ असलेले सर्टिफिकेशन मी केले होते. त्यामुळेच मी त्यांनी दोन दोन वेळा कॉल करुन मी तीसर्‍या वेळी तयार झालो. मुलाखतीच्या सुरवातीलाच सांगुन टाकले की मी सर्टिफिकेशन केले आहे पण गेले एक वर्ष त्यावर अजिबात काम करायची संधी मिळालेली नाही. आणि तुम्ही एकदम डीप डाइव्ह करुन टेक्नीकल प्रश्न विचाराल ती मी उत्तरे देउ शकणार नाही. त्यांना कसेही करुन माणूस हवाच होता आणि त्यांना सर्टिफिकेशन वालाच हवा होता त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे आपण बघुया, येत नसेल तर तुम्हाला आठवत नाही असे समजू कारण तुम्हाला थेयरी येतेय हे सर्टिफिकेशन वरुन दिसतय. त्यांना बहुतेक माझे सर्टिफिकेट क्लायंट ला दाखवायचे होते. मुलाखतीच्या सुरवातीला त्यानी बेसीक प्रश्न विचारुन माझा पाया पक्का आहे याची खात्री करुन घेतली. नंतर हळू हळू डीप डाइव्ह करायला लागले. डीप डाइव्ह मधे मी उत्तर द्यायला वेळ लावतोय असे पाहिल्यावर ते चक्क मला हिंट देउन लागले. मुलाखत टेलीफोन वर चालु होती. त्यांनी हींट देउन देउन माझ्याकडून उत्तरे काढून घेतली. मला कळत नव्हते काय चालु आहे, प्रश्न विचारला जायचा आणि मी गप्प बसल्यावर दोन तीन हींट दिल्या जायच्या. मग मी अपेक्षित उत्तर देत होतो. शेवटी त्या तिन मुलाखत घेणार्‍यानी मला दोन दिवसात सिलेक्ट केलानी. माझे सर्टिफिकेट मागवुन घेतलानी. क्लायंट ला पाठवलानी. मी रुजु झालो आणि एक वर्ष काम केले. खुप काही शिकलो. नंतर विचारले की अशी कशी मुलाखत घेतली तुम्ही. मला तर काही येत नसताना तुम्ही मला सिलेक्ट पन केलात. ते म्हणाले की आम्ही तुझा बाकीचा रेजुमे पाहीला त्यात बरेच काही होते, तुझ्या पहील्या कंपनितल्या एच आर सोबत बोललो. चांग्ला फिडबैक मिळाला. आणि तू येत नसताना सरळ येत नाही म्हणून सांगत होतास ते खूप प्रामाणिक वाटले. खरे तर मला त्या कंपनीत जायची इच्छा नव्हती. पण भक्कम पगार वाढ मिळाली म्हणून गेलो. थोड्क्यात - उगाच द्यायची म्हणून मुलाखत द्यायची अशा ज्या ज्या मुलाखती मी बेफिकीरीने दिल्या त्यात उत्तीर्ण झालो. आणि जिथे खुप इच्छा होती आणि तयारी करुन बसलो तिथे अनुतीर्ण झालो. काही कंपन्या टेक्नीकल बघतात, काही जण अटिट्युड बघतात.

विजुभाऊ Tue, 03/10/2026 - 12:36
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो.
. हे असे सरसकट नसते. मी मुलाखत घेण्याचेही काम केले आहे मुलाखत घेताना जॉब डिस्क्रिप्शन जे डी मधे जे लिहीलेले आहे त्या नुसार प्रश्नांचा रोख असावा लागतो. दुसरे म्हणजे कंपनीला कामासाठी उमेदवार हवा असतो. त्यामुले सरसकट रीजेक्ट केले जात नाही. कमीअधीक स्किल्स असतील तरी त्याचा विचार केला जातो. कंपन्याना शक्यतो लवकर जॉईन करेल असा उमेदवार हवा असतो. दुसरे म्हणजे बरेचदा हैदराबाद येथील उमेदवारांचा आनुभव अग्दी विचित्र आला आहे. यात सी व्ही मधे अनुभव वाढवून लिहीणे, खोटा ( न केलेला ) अनुभव लिहीणे. फोनकॉलवर मुलाखत असेल तर दुसर्‍याच कोणीतरी उत्तरे देणे. ( हे अगदी व्होडीओ कॉल मधेही केले जाते) . बरेचदा समाधान मुलाखती नंतरह उमेदवाराने जॉईन केल्या नंतर उमेदवाराला आवश्यक स्कील्स चे अत्यल्प ज्ञान आहे किंवा नाहीच असे आढळून आलेले आहे. बर्‍याच भारतीय कंपन्या बॅग्राऊंड चेक / व्हेरीफिकेशन चा आग्रह धरतात ते या साठीच.

हैद्राबाद मधुन बरेच फेक उमेदवार येत असल्याने आमच्याकडे तेथील उमेदवारांना फक्त ऑफिसमध्ये मुलाखतीला बोलावतात, व्हिडिओवर नाही. बाकी मी आतापर्यंत आय टी मध्ये शेकडो मुलाखती घेतल्या आहेत (प्रत्यक्ष आणि व्हिडिओ). पण उमेदवार रिजेक्ट करणे हा क्रायटेरिआ कधीच नसतो. रेझ्युम मधे जी टेक्नॉलॉजी लिहिलेय आणि जित्क्या वर्षाचा अनुभव दाखवलाय तेव्हढे येत आहे की नाही, संभाषण कौशल्य आहे की नाही हेच मी तरी बघतो. जात पात धर्म लिंग यांचा काही संबंध नाही. बहुतेक वेळा पहिल्या काही मिनिटातच मुलाखतीचा रोख समजतो आणि उमेदवाराचा अंदाज येतो. पण कधी कधी मध्यातच मुलाखतीचा रोख पालटतो आणि ती ईंटरेस्टिंग किवा बोरिंग ही बनु शकते. कधी कंपनीला जास्त गरज असते, कधी उमेदवार लवकर रुजु होउ शकतो अशा कारणामुळे तडजोडही करावी लागते. मागे एकदा माझ्या प्रोजेक्ट मध्ये गरज होती म्हणुन मी लिंक्ड ईन वर पोस्ट केले तर ५०-६० रेझ्युम आले. ते रेक्रुटमेंट टीमला दिले. त्यातले बरेच त्यांच्या नियमात न बसल्याने रिजेक्ट झाले, उरलेल्यांमधील बरेच जण मुलाखतीत रिजेक्ट झाले. ४-५ ऑफर गेल्या आणि शेवटी त्यातील एकच जण जॉइन झाला.

विजुभाऊ Tue, 03/10/2026 - 17:48
सध्या बर्‍याच आय टी कंपन्यात ९० दिवस नोटीस पिरीयड असतो. त्यामुळे उमेदवार बरेचदा एक इन्टरव्ह्यू घेऊन राजिनामा देतात. आणि आणखी एखादी नवी ऑफर येतेय का याची चाचपणी करतात. जास्त पगार मिळेल तेथे जॉईन करतात. वाईट म्हणजे ज्या कम्पनीने पहिली ऑफर दिली त्या कंपनीला तसे कळवायचे कष्टही घेत नाहीत. अर्थात एच आर जसे तुम्हाला रिजेक्ट केल्याचे कळवत नाहीत तसेच काहीसे हे.

In reply to by विजुभाऊ

कानडाऊ योगेशु Tue, 03/10/2026 - 18:02
एच.आर गमतीशीर प्रकरण आहे. बेंगलोरमधल्या एका नामांकित कंपनी १ वर्षानंतर राजीनामा दिला तेव्हा तिथल्या एका महिला एच.आर ने कोपच्यात घेऊन माझे बौध्दिक घेतले व असे एका वर्षानंतर कंपनी सोडणे मॉरली इथिकली राँग आहे वगैरे डोस पाजले.माझाही निर्णय डळमळीत होऊ लागला होता पण तिथे असलेले राजकारण इतके तीव्र होते कि तिथे जॉब कंटीन्यु करणे अशक्य होते. पुढे मी नोटीस पिरियड मध्ये असतानाच कळले कि ज्या एच.आर ने माझी भलामण केली होती तिने कंपनी सोडली होती म्हणजे ती बया जेव्हा मला मोरॅलिटीचे डोस पाजत होती तेव्हा ती स्वतःच नोटीस पिरियड मध्ये होती.

नचिकेत जवखेडकर गुरुवार, 03/12/2026 - 07:11
मी चेन्नई ला काम करत असतानाची गोष्टं . 2 वर्षे काढल्यावर पुण्यात यायची खटपट चालू केली आणि एका नामांकित कंपनीमध्ये मुलाखत झाली, त्यांनी सिलेक्ट पण केलं पण नोटीस पिरियड च्या मुद्द्यांमध्ये माशी शिंकली. ती कंपनी 3 महिने थांबायला तयार नव्हती आणि चेन्नईची कंपनी लवकर सोडायला तयार नव्हती(बाय आऊट फक्त नावाला आहे असं सांगितलं). नाईलाजाने मी पुण्यातील कंपनीला परिस्थिती सांगितली तर तिकडचा एचआर मला म्हणे की तू ऍब्सकॉन्ड करून ये. त्याला म्हटलं ए बाबा, मला असलं काही जमणार नाही आणि मुळात मी 2 वर्ष झाली इकडे काम करतोय तर उगाच गालबोट नाही लावायचं माझ्या अनुभवाला. तर मला शिकवत बसला की, आमची कंपनी इतकी छान आहे की तू थेट निवृत्त होऊनच बाहेर जाशील, बाकी कुठे नोकरी करायचीच गरज नाही. तरी पण मी अडून बसलो म्हटल्यावर मला म्हणे उद्यापर्यंत विचार कर आणि मला सांग. दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की मला जमणार नाही तर ओके वगैरे काहीही ना म्हणता थेट फोन बंद करून टाकला. मजा म्हणजे मला त्या कंपनीकडून इतक्या वेळेला मुलाखतीसाठी बोलावलं होतं पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी होऊन निवड नाही झालेली :)

एकुलता एक डॉन Sat, 03/14/2026 - 08:37
माझ्या बाबतीत झाले होते धिंगाणा मध्ये 2012 मध्ये ऑफर होती मी 1 लाख तर ते 95 वर अडकून बसले शेवटी ceo- स्वतः कॉल केला आणि म्हणाला कि तुला कोण एवढा पगार देणार आहे आहे तिथेच शांत बसलो गुगल मध्ये

ईंटरव्ह्युला चांगली तयारी करुन , चांगले फॉर्मल कपडे घालुन, वेळे आधीच पोचावे हे खरे , पण नाहीच सिलेक्शन झाले तर "है फिदा तो, आ xx नही तो तेरी xxx" म्हणुन पुढे जावे. माझ्या बाबतीत एका नामांकीत आय टी कंपनीत आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पोझिशन साठी मुलाखती झाल्या पण प्रत्येक वेळी कुठेतरी माशी शिंकली आणि ते मला तिथेच कळले होते. शेवटी मी कानाला खडा लावला की वडापावची गाडी टाकेन पण या कंपनीत नोकरी करणार किवा मागणार नाही.

विजुभाऊ Sun, 03/08/2026 - 17:42
मला एका इन्टर्व्ह्यू मधे फारच विचित्र अनुभव आला होता. मुलाखत घेणारा हा पक्का पुणेरी इसम होता. थेट मुलाखात होती. माझे आडनाव वाचून मी नोकरी कशाला करतो त्यापेक्षा बिझनेस का नाही करत असे थेट विचारले. या आडनावाच्या माणसाला नोकरी कशाला हवी असे बोलून अत्यंत कुजकट हसला. आणि मी तुम्हाला रीजेक्ट करतो आहे.असे सांगितले. त्या वेळेस कामाची खूपच गरज होती. म्हणून माज दाखवू शकलो नाही. पण इतके वर्षानंतर आजही मी त्या इसमाची तक्रार त्या एच आर कडे करायला हवी होती असे वाटते.

पाषाणभेद Mon, 03/09/2026 - 12:35
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो. त्यातही तो दिसतो कसा, बाह्यरूप कसे आहे, कपडे कसे आहेत या कमी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. (ते महत्वाचे असते पण अगदी गरजेचे नसते.) त्यातही भारतात आडनाव, नाव, जात, लिंग, धर्म, वर्ण इत्यादींना अवास्तव महत्व दिले जाते. जे काम आहे ते जर येत असेल तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले तर ठिक असते. पण अगदी बेसीक प्रश्न अनुभवी उमेदवाराला विचारले जातात. अभ्यासबाह्य, कामाच्या व्यतिरीक्त प्रश्न विचारतात. ट्रांन्सपरंट मुलाखत हवी असेल तर मुलाखत घेणारा, देणारा दोन वेगवेगळ्या खोल्यांत बसवा. उमेदवाराला टोकन नंबर द्या अन त्यानेच ओळखा. चेहेरा न दिसता, पाहता काही राऊंड घ्या अन मगच पुढे जा असे हवे. आयटीतल्या मुलाखतीत भयंकर अडवणूक होते.

In reply to by पाषाणभेद

कानडाऊ योगेशु Mon, 03/09/2026 - 20:27
बरोबर बोललात. मी गेली कित्येक वर्षे आय.टी क्षेत्रात काम करत आहे व इंटरव्यु टेबलच्या दोन्ही बाजुचा बराच अनुभव आहे. करिअरच्या सुरवातीला एका अगदीच साधारण कंपनीत निवड झाली होती व त्यावेळी तशी परिस्थिती असल्याने ती कंपनी जॉईन केली होती तिथे मिळालेला अनुभव अजुनही कामास येतो त्याविरूद्ध त्यानंतर त्याच कंपनीच्या अनुभवाच्या जोरावर एका नामांकित कंपनीत इंटरव्यु देऊन निवड झाली होती तिथे काम तसे बरे होते पण राजकारण भरपूर असा प्रकार होता.तिथे जेमतेम १ वर्ष टिकलो. बरेच जण अश्या कंपनीत केवळ एच-१ विसासाठी काम करत होते. पुढे जेव्हा इंटरव्यु पॅनेल मध्ये उमेदवार निवडीसाठी बसु लागलो तिथे तर मुलाखतीत उत्कृष्ठ कामगिरी करणारे प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत अगदीच साधारण होते.नंतर नंतर केवळ कमीत कमी निकष पूर्ण करणार्या एक दोघांना टेक्निकल मध्ये जास्त खोलात न जाता निवडले तर ते तुलनेने चांगले काम करत होते असे आढळले.उत्कृष्ठ रिज्युमे असणारे उमेदवार कंपनीत जास्त दिवस टिकत नाहीत. बरेच जण त्यांच्या कंपनीत नोटीस पिरियड वर असतात व केवळ पॅकेज वाढवुन मिळावे म्हणुन त्याअवधीत वेगवेगळ्या कंपन्यात मुलाखती देतात. असे उमेदवार लगेल कळून येतात त्यांना बर्याच वेळेला वाटेला लावावे लागते. मुलाखत हा बर्याच वेळेला फार्सच असतो. मी ही एखादा उमेदवार जर कमीत कमी निकष पूर्ण करणारा असेल तर बाकीचे फॅक्टर्स पाहतो. (सौदेंडियन जसे स्वतःच्या लोकांना प्राथमिकता देतात तसाच प्रकार.)

In reply to by पाषाणभेद

अभ्यासबाह्य किंवा कामाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारणे आणि त्यावरून निकाल देणे हे चूकच आहे परंतु अनुभवी उमेदवाराला बेसिक प्रश्न विचारायला हरकत नसावी. भले तो माणूस त्या विशिष्ट डोमेन मध्ये १० वर्ष कार्यरत असेल पण ग्राउंड लेवल ला काय होतं हे माहिती असलंच पाहिजे. हां, अनुभवी व्यक्तीला फक्त बेसिक प्रश्न विचारून लगेच ऑफर दिली तर मात्र बरोबर नाही.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या Wed, 03/11/2026 - 21:24
मला मात्र उलटा अनुभव आला होता. फार वर्षापुर्वी मुलाखत दीली होती. एक तर मी मुलाखतीला तयार नव्हतो कारण त्यांना ज्या कामासाठी माणूस हवा होता ते काम मी गेले वर्षभर केले नव्हते. पण त्यावेळी दुर्मीळ असलेले सर्टिफिकेशन मी केले होते. त्यामुळेच मी त्यांनी दोन दोन वेळा कॉल करुन मी तीसर्‍या वेळी तयार झालो. मुलाखतीच्या सुरवातीलाच सांगुन टाकले की मी सर्टिफिकेशन केले आहे पण गेले एक वर्ष त्यावर अजिबात काम करायची संधी मिळालेली नाही. आणि तुम्ही एकदम डीप डाइव्ह करुन टेक्नीकल प्रश्न विचाराल ती मी उत्तरे देउ शकणार नाही. त्यांना कसेही करुन माणूस हवाच होता आणि त्यांना सर्टिफिकेशन वालाच हवा होता त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे आपण बघुया, येत नसेल तर तुम्हाला आठवत नाही असे समजू कारण तुम्हाला थेयरी येतेय हे सर्टिफिकेशन वरुन दिसतय. त्यांना बहुतेक माझे सर्टिफिकेट क्लायंट ला दाखवायचे होते. मुलाखतीच्या सुरवातीला त्यानी बेसीक प्रश्न विचारुन माझा पाया पक्का आहे याची खात्री करुन घेतली. नंतर हळू हळू डीप डाइव्ह करायला लागले. डीप डाइव्ह मधे मी उत्तर द्यायला वेळ लावतोय असे पाहिल्यावर ते चक्क मला हिंट देउन लागले. मुलाखत टेलीफोन वर चालु होती. त्यांनी हींट देउन देउन माझ्याकडून उत्तरे काढून घेतली. मला कळत नव्हते काय चालु आहे, प्रश्न विचारला जायचा आणि मी गप्प बसल्यावर दोन तीन हींट दिल्या जायच्या. मग मी अपेक्षित उत्तर देत होतो. शेवटी त्या तिन मुलाखत घेणार्‍यानी मला दोन दिवसात सिलेक्ट केलानी. माझे सर्टिफिकेट मागवुन घेतलानी. क्लायंट ला पाठवलानी. मी रुजु झालो आणि एक वर्ष काम केले. खुप काही शिकलो. नंतर विचारले की अशी कशी मुलाखत घेतली तुम्ही. मला तर काही येत नसताना तुम्ही मला सिलेक्ट पन केलात. ते म्हणाले की आम्ही तुझा बाकीचा रेजुमे पाहीला त्यात बरेच काही होते, तुझ्या पहील्या कंपनितल्या एच आर सोबत बोललो. चांग्ला फिडबैक मिळाला. आणि तू येत नसताना सरळ येत नाही म्हणून सांगत होतास ते खूप प्रामाणिक वाटले. खरे तर मला त्या कंपनीत जायची इच्छा नव्हती. पण भक्कम पगार वाढ मिळाली म्हणून गेलो. थोड्क्यात - उगाच द्यायची म्हणून मुलाखत द्यायची अशा ज्या ज्या मुलाखती मी बेफिकीरीने दिल्या त्यात उत्तीर्ण झालो. आणि जिथे खुप इच्छा होती आणि तयारी करुन बसलो तिथे अनुतीर्ण झालो. काही कंपन्या टेक्नीकल बघतात, काही जण अटिट्युड बघतात.

विजुभाऊ Tue, 03/10/2026 - 12:36
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो.
. हे असे सरसकट नसते. मी मुलाखत घेण्याचेही काम केले आहे मुलाखत घेताना जॉब डिस्क्रिप्शन जे डी मधे जे लिहीलेले आहे त्या नुसार प्रश्नांचा रोख असावा लागतो. दुसरे म्हणजे कंपनीला कामासाठी उमेदवार हवा असतो. त्यामुले सरसकट रीजेक्ट केले जात नाही. कमीअधीक स्किल्स असतील तरी त्याचा विचार केला जातो. कंपन्याना शक्यतो लवकर जॉईन करेल असा उमेदवार हवा असतो. दुसरे म्हणजे बरेचदा हैदराबाद येथील उमेदवारांचा आनुभव अग्दी विचित्र आला आहे. यात सी व्ही मधे अनुभव वाढवून लिहीणे, खोटा ( न केलेला ) अनुभव लिहीणे. फोनकॉलवर मुलाखत असेल तर दुसर्‍याच कोणीतरी उत्तरे देणे. ( हे अगदी व्होडीओ कॉल मधेही केले जाते) . बरेचदा समाधान मुलाखती नंतरह उमेदवाराने जॉईन केल्या नंतर उमेदवाराला आवश्यक स्कील्स चे अत्यल्प ज्ञान आहे किंवा नाहीच असे आढळून आलेले आहे. बर्‍याच भारतीय कंपन्या बॅग्राऊंड चेक / व्हेरीफिकेशन चा आग्रह धरतात ते या साठीच.

हैद्राबाद मधुन बरेच फेक उमेदवार येत असल्याने आमच्याकडे तेथील उमेदवारांना फक्त ऑफिसमध्ये मुलाखतीला बोलावतात, व्हिडिओवर नाही. बाकी मी आतापर्यंत आय टी मध्ये शेकडो मुलाखती घेतल्या आहेत (प्रत्यक्ष आणि व्हिडिओ). पण उमेदवार रिजेक्ट करणे हा क्रायटेरिआ कधीच नसतो. रेझ्युम मधे जी टेक्नॉलॉजी लिहिलेय आणि जित्क्या वर्षाचा अनुभव दाखवलाय तेव्हढे येत आहे की नाही, संभाषण कौशल्य आहे की नाही हेच मी तरी बघतो. जात पात धर्म लिंग यांचा काही संबंध नाही. बहुतेक वेळा पहिल्या काही मिनिटातच मुलाखतीचा रोख समजतो आणि उमेदवाराचा अंदाज येतो. पण कधी कधी मध्यातच मुलाखतीचा रोख पालटतो आणि ती ईंटरेस्टिंग किवा बोरिंग ही बनु शकते. कधी कंपनीला जास्त गरज असते, कधी उमेदवार लवकर रुजु होउ शकतो अशा कारणामुळे तडजोडही करावी लागते. मागे एकदा माझ्या प्रोजेक्ट मध्ये गरज होती म्हणुन मी लिंक्ड ईन वर पोस्ट केले तर ५०-६० रेझ्युम आले. ते रेक्रुटमेंट टीमला दिले. त्यातले बरेच त्यांच्या नियमात न बसल्याने रिजेक्ट झाले, उरलेल्यांमधील बरेच जण मुलाखतीत रिजेक्ट झाले. ४-५ ऑफर गेल्या आणि शेवटी त्यातील एकच जण जॉइन झाला.

विजुभाऊ Tue, 03/10/2026 - 17:48
सध्या बर्‍याच आय टी कंपन्यात ९० दिवस नोटीस पिरीयड असतो. त्यामुळे उमेदवार बरेचदा एक इन्टरव्ह्यू घेऊन राजिनामा देतात. आणि आणखी एखादी नवी ऑफर येतेय का याची चाचपणी करतात. जास्त पगार मिळेल तेथे जॉईन करतात. वाईट म्हणजे ज्या कम्पनीने पहिली ऑफर दिली त्या कंपनीला तसे कळवायचे कष्टही घेत नाहीत. अर्थात एच आर जसे तुम्हाला रिजेक्ट केल्याचे कळवत नाहीत तसेच काहीसे हे.

In reply to by विजुभाऊ

कानडाऊ योगेशु Tue, 03/10/2026 - 18:02
एच.आर गमतीशीर प्रकरण आहे. बेंगलोरमधल्या एका नामांकित कंपनी १ वर्षानंतर राजीनामा दिला तेव्हा तिथल्या एका महिला एच.आर ने कोपच्यात घेऊन माझे बौध्दिक घेतले व असे एका वर्षानंतर कंपनी सोडणे मॉरली इथिकली राँग आहे वगैरे डोस पाजले.माझाही निर्णय डळमळीत होऊ लागला होता पण तिथे असलेले राजकारण इतके तीव्र होते कि तिथे जॉब कंटीन्यु करणे अशक्य होते. पुढे मी नोटीस पिरियड मध्ये असतानाच कळले कि ज्या एच.आर ने माझी भलामण केली होती तिने कंपनी सोडली होती म्हणजे ती बया जेव्हा मला मोरॅलिटीचे डोस पाजत होती तेव्हा ती स्वतःच नोटीस पिरियड मध्ये होती.

नचिकेत जवखेडकर गुरुवार, 03/12/2026 - 07:11
मी चेन्नई ला काम करत असतानाची गोष्टं . 2 वर्षे काढल्यावर पुण्यात यायची खटपट चालू केली आणि एका नामांकित कंपनीमध्ये मुलाखत झाली, त्यांनी सिलेक्ट पण केलं पण नोटीस पिरियड च्या मुद्द्यांमध्ये माशी शिंकली. ती कंपनी 3 महिने थांबायला तयार नव्हती आणि चेन्नईची कंपनी लवकर सोडायला तयार नव्हती(बाय आऊट फक्त नावाला आहे असं सांगितलं). नाईलाजाने मी पुण्यातील कंपनीला परिस्थिती सांगितली तर तिकडचा एचआर मला म्हणे की तू ऍब्सकॉन्ड करून ये. त्याला म्हटलं ए बाबा, मला असलं काही जमणार नाही आणि मुळात मी 2 वर्ष झाली इकडे काम करतोय तर उगाच गालबोट नाही लावायचं माझ्या अनुभवाला. तर मला शिकवत बसला की, आमची कंपनी इतकी छान आहे की तू थेट निवृत्त होऊनच बाहेर जाशील, बाकी कुठे नोकरी करायचीच गरज नाही. तरी पण मी अडून बसलो म्हटल्यावर मला म्हणे उद्यापर्यंत विचार कर आणि मला सांग. दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की मला जमणार नाही तर ओके वगैरे काहीही ना म्हणता थेट फोन बंद करून टाकला. मजा म्हणजे मला त्या कंपनीकडून इतक्या वेळेला मुलाखतीसाठी बोलावलं होतं पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी होऊन निवड नाही झालेली :)

एकुलता एक डॉन Sat, 03/14/2026 - 08:37
माझ्या बाबतीत झाले होते धिंगाणा मध्ये 2012 मध्ये ऑफर होती मी 1 लाख तर ते 95 वर अडकून बसले शेवटी ceo- स्वतः कॉल केला आणि म्हणाला कि तुला कोण एवढा पगार देणार आहे आहे तिथेच शांत बसलो गुगल मध्ये
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग ३ - इंटरव्ह्यू चे काही अनुभव ! अनुभव १: साधारण १० एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच CISSP ही सायबर सेक्युरिटी मधील अत्यंत मानाची मानली जाणारी परीक्षा पास झालो होतो. मग एका ओपनिंग साठी एका मल्टी नॅशनल कंपनीत माझा एक इंटरव्ह्यू झालेला. पोझीशन मिड मॅनॅजमेण्ट ची होती. मी अगदी वेळेच्या आधी त्या कंपनीत पोहोचलो. अजून एक दोन जण होते. ते बहुदा बिग ४ मधून आलेले असावेत. माझा नंबर आल्यावर मी आत गेलो. मुलाखत घेणारे पॅनल ३ का चार जणांचे होते. मी आत जाताच त्यांनी एकमेकांकडे सूचक नजरेतून पहिले, आणि काही क्षण माझ्याकडे पाहून मग मला बसायला सांगितले. इंटरव्ह्यू झाला. चांगला म्हणता येईल असा गेला.

"गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..

आजी ·

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/26/2026 - 15:16
हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे गुरुवार, 02/26/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

कानडाऊ योगेशु Fri, 02/27/2026 - 08:35
इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान गुरुवार, 02/26/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण Fri, 02/27/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी Sun, 03/08/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/26/2026 - 15:16
हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे गुरुवार, 02/26/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

कानडाऊ योगेशु Fri, 02/27/2026 - 08:35
इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान गुरुवार, 02/26/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण Fri, 02/27/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी Sun, 03/08/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात. आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.

सी पी बेरार सर्किट

गवि ·

कंजूस Wed, 02/18/2026 - 16:09
आमचे बाबा बोलताना म्हणायचे आज 'बीबीला' जावं लागणार आहे. आपली 'जीआइपी'. तिकडे जास्ती {लोकल} गाड्या असतात. बीबी... म्हणजे Bombay, Baroda and Central India Railway (BB&CI) त्यांचे लघुरूप BB. आताची वेस्टर्न रेल्वे. जीआइपी...Great Indian Peninsula Railway. आताची सेंट्रल रेल्वे.

विजुभाऊ Wed, 02/18/2026 - 16:54
सी पी म्हणजे सेन्ट्रल प्रोव्हिन्स ( ज्याला आपण आज मध्य प्रदेश म्हणतो) आणि यु पी म्हणजे युनायटेट प्रोव्हिन्स अशी नावे होती. बेरार म्हणजे वर्‍हाड

गवि Wed, 02/18/2026 - 17:03
ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर भारतातल्या लोकांना ब्रिटनचं नागरिकत्व घेण्याचा चॉईस देणं अशक्यच होतं कारण भारतातल्या लहान राज्याइतका त्यांचा देश होता. पण गोवा हे राज्य (पोर्तुगीज काळात) आकाराने लहान होतं. ते सोडून जाताना आणि त्यानंतर पोर्तुगालने गोवा राज्यात १९६० सालापूर्वी जन्म झाल्याचा पुरावा सादर करणाऱ्या गोव्याच्या नागरिकांना पोर्तुगालचं नागरिकत्व देऊ केलं होतं. अनेकांनी शाळा सोडल्याचे दाखले सादर करून, आणि कदाचित नसलेले तयार करून देखील, ते नागरिकत्व घेतलं आणि युरोपात स्थायिक झाले. मी असे काही लोक बघितले आहेत.

In reply to by गवि

चावटमेला Wed, 02/18/2026 - 17:17
हो. ह्यांतील बरेचसे लोक hospitality धंद्यांत आहेत. लंडन मध्ये ,विशेषतः हिथ्रो विमानतळाजवळील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मधे बव्हंशी मॅनेजर, वेटर हे गोवन पाहिले आहेत जे पोर्तुगाल चे नागरिकत्व घेवून आले आहेत. कदाचित इंग्रजी वरील प्रभुत्वामुळे त्यांना ह्या नोकर्‍या सहज मिळत असाव्यात. शिवाय ह्या धंद्यांत पंजाबी विरुद्ध गोवन लॉबीचे राजकारण जोरात चालते असे एका housemate कडून ऐकले. खेदाची बाब म्हणजे भारतात वाढून, शिकून सुद्धा ह्या लोकांना भारताबाबत काडीचेही ममत्व नाही. आम्ही भारतीय नाही तर गोवन आहोत असे अगदी ठासून सांगतात.

In reply to by गवि

खटपट्या Wed, 02/18/2026 - 21:34
१९६० च्या आधी जन्म, ही अट अजुनही आहे का? कारण माझा एक मित्र, जो १९६० च्या नंतर जन्माला आला आहे त्याने पोर्तूगाल चे नागरीकत्व घेतले आहे. त्याचा जन्म गोव्याचा.

In reply to by खटपट्या

चावटमेला Wed, 02/18/2026 - 22:07
कंपनीतील एका सहकार्‍याच्या मते जर आई-वडील किंवा आजी-आजोबा ह्यांच्यापैकी कुणीही पोर्तुगीज अमदानीतील गोव्यात जन्मले असेल तर काही कागदपत्रांची पूर्तता करून पोर्तुगीज नागरिकत्व मिळू शकते. त्याच्या बायकोला मिळाले. मी एक यूट्युब विडिओ पाहिला होता त्यानुसार दरवर्षी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यात गोव्याचा नंबर पहिला आहे, अगदी पंजाब आणि गुजरातच्याही आधी. असो, उगाच चांगला धागा भरकटू नये म्हणून आवरते घेतो.

चावटमेला Wed, 02/18/2026 - 17:07
मी शाळेत असताना २५ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश होते. पुढे उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, आणि काही वर्षांनी तेलंगाणा अशी चार राज्यांची भर पडली. अलीकडेच जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश झाले, आणि दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली चे एकत्रीकरण करून एकच केंद्रशासित प्रदेश केला.

In reply to by चावटमेला

गवि Wed, 02/18/2026 - 17:12
त्या दादरा नगर हवेलीची पण एक गंमत आहे. त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.

In reply to by गवि

त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.
हे माहित नव्हते. आताच नकाशात बघितले- मेघवाल हे त्या ठिकाणाचे नाव. विकिपीडीया म्हणत आहे की जानेवारी २०२२ मध्ये मेघवालचे दादरा-नगरहवेलीमध्ये विलीनकरण करायचा निर्णय घेतला होता पण त्याचे पुढे काही झाले नाही. पूर्वी दिव-दमण आणि दादरा-नगरहवेली हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश होते. पण या दोन त्यामानाने लहान असलेल्या प्रदेशांसाठी स्वतंत्र प्रशासन चालवायचा खर्च जास्त होता म्हणून त्या दोन्हींचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश जानेवारी २०२० मध्ये करण्यात आला. गुजरातमध्ये कागदावर दारूबंदी आहे त्यामुळे हॉटेलांमध्ये वगैरे दारू मिळत नाही. (जुगाड करून घरी दारूची व्यवस्था करता येते पण अधिकृतपणे बाहेर मिळत नाही). त्यामुळे गुजरातचे बरेच लोक या ठिकाणी दारू प्यायला म्हणून जातात :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चेतन गुरुवार, 02/19/2026 - 12:54
केरळमध्ये माहे नावाचे एक गाव आहे जे पांडिचेरीचा भाग आहे. याचे कारण हा फ्रेन्च वसाहतिचा भाग होता. तो अजुनही स्वस्त दारुसाठि तसाच ठेवला असावा.

सौंदाळा Wed, 02/18/2026 - 17:27
हे पहिल्यांदाच ऐकले रच्याकने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील महाविद्यालये पण मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत यायची वाटतं पुर्वी.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि Wed, 02/18/2026 - 17:50
कॉलेजे अजूनही मुंबई विद्यापीठाखालीच येतात. रत्नागिरीत त्यांचे उपकेंद्र पण आहे. दहावी बारावी मात्र पापुमं कोल्हापूर डिव्हिजनखाली येत असावी. पुन्हा चुभुदेघे..

In reply to by गवि

अनिकेत वैद्य Wed, 02/18/2026 - 19:48
पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या ७ जिल्ह्यातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. दहावी, बारावी साठी पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड ह्या जिल्ह्यात मुंबई विभाग आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांसाठी कोल्हापूर विभाग आहे.

अरे वा. मस्त विषय. मला इतिहासाची आवड आहे आणि निदान नकाशा उघडून बघितला नाही तर इतिहास समजणार नाही असे मला तरी वाटते त्यामुळे भूगोलातील इतर संकल्पना (भूखंडमंच/ टुंड्रा प्रदेश वगैरे अजिबात आवडत नसल्या तरी) नकाशा बघायला खूप आवडते. त्यामुळे जमेल तितकी भर टाकेन. पाँडेचेरी (आताचे पुद्दुचेरी) या केंद्रशासित प्रदेशातील पाँडेचेरी शहर चेन्नईच्या दक्षिणेला आहे. पण त्याबरोबरच त्या केंद्रशासित प्रदेशात इतर काही प्रदेश आहेत ते पाँडेचेरीला संलग्न नाहीत. ते प्रदेश आहेत- यानम (जे आंध्र प्रदेशात पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे), कराईकल (जे तामिळनाडूत पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे) आणि माहे (जे केरळमध्ये पाँडेचेरीचे इन्क्लेव्ह आहे). ही तीनही ठिकाणे लहान बंदरांची ठिकाणे आहेत. भारतात युरोपिअनांचे राज्य स्थापित झाले त्यावेळेस बंदरांवर नियंत्रण असणे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्या दृष्टीने फ्रेंचांनी ही तीन ठिकाणे ताब्यात घेतली असावीत. कलकत्त्याजवळ चंद्रनगर म्हणून एक ठिकाण आहे. ते पण फ्रेंचांच्या ताब्यात होते. १९५० मध्ये तिथे सार्वमत घेतले गेले आणि ते ठिकाण भारतात विलीन झाले. जसे पाँडेचेरीमध्ये यानम, माहे, कराईकल ही ठिकाणे लांब आहेत त्याप्रमाणेच गोव्यापासून दिव आणि दमण ही ठिकाणे पण बरीच लांब- गुजरातजवळ आहेत. पण ती ठिकाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती त्यामुळे १९६१ मध्ये गोवा मुक्ती झाली तेव्हा गोवा-दिव-दमण हा केंद्रशासित प्रदेश झाला. सीपी-बेरार म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरार. बेरार म्हणजे विदर्भाचा पश्चिम भाग. विदर्भाचा पूर्वेकडचा भाग मध्य भारत या राज्यात होता तर पश्चिमेकडचा भाग सीपी-बेरारमध्ये. १९५६ मध्ये मध्य प्रदेश राज्य स्थापन झाले तेव्हा सीपी-बेरारमधील बेरार म्हणजे पश्चिम विदर्भ आणि मध्य भारतात असलेला पूर्व विदर्भ (नागपूर वगैरे) मुंबई प्रांतात सामील केले गेले. उरलेले सीपी, मध्य भारत तसेच विंध्य भारत आणि भोपाळ ही राज्ये एकत्र करून मध्य प्रदेश हे राज्य निर्माण करण्यात आले. आता कर्नाटकात बॉम्बे कर्नाटक आणि हैद्राबाद कर्नाटक हे भाग दिसतात. ते कुठून आले? तर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली तेव्हा हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आले आणि उरलेला भाग- गुलबर्गा, रायचूर, यादगीर वगैरे कर्नाटकात (तेव्हाच्या म्हैसूर राज्यात) विलीन करण्यात आला- तो हैद्राबाद कर्नाटक. तसेच मुंबई राज्यातून उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) तसेच बेळगाव वगैरे भाग कर्नाटकात विलीन करण्यात आला- तो बॉम्बे कर्नाटक. लिहिण्यासारखे बरेच काही आहे. नंतर कधीतरी लिहेन.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गवि Wed, 02/18/2026 - 17:58
याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.

In reply to by गवि

याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.
हो डचांचे कोचीन आणि क्विलॉन (आताचे कनन्नोर) या केरळमधील भागांवर तसेच नागापट्टणम या तामिळनाडूतील बंदराच्या शहरावर नियंत्रण होते. आजही कोचीनमध्ये एक डच पॅलेस आहे. पण नंतर डचांनी भारतापेक्षा मसाल्याच्या पदार्थांसाठी अधिक प्रसिध्द अशा इंडोनेशिया आणि श्रीलंकेतील काही भागांवर लक्ष केंद्रीत केले आणि भारतात ते राहिले नाहीत. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तेव्हा महाराजांनी मागितलेली खंडणी देऊन डचांनी त्यांची सुरतमधील वखार वाचवली होती. डॅनिश लोकांचे अंदमानवर नियंत्रण होते. १८६८ मध्ये ते ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले. कौन बनेगा करोडपती मध्ये पहिला ५ कोटी मिळवलेला बिहारचा एक होता त्याला ५ कोटींसाठी अंदमान कोणाच्या ताब्यात होते हा प्रश्न होता. त्याने डॅनिश लोकांच्या हे उत्तर दिले होते. त्यानंतर आंतरजालावर शोधाशोध करून हे समजले. जर पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई बेट हुंड्यात भेट म्हणून दिले नसते तर कदाचित मुंबई पण पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले असते. इतिहासात जर-तरला काहीही अर्थ नसतो पण त्या एका निर्णयामुळे सगळे काही किती बदलले. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यामुळे शहरात व्यापार-शिक्षण यांचा बराच विकास झाला. नाहीतर पोर्तुगीजांच्या ताब्यात असते तर गोव्याप्रमाणे स्वस्त दारू मिळणारे ठिकाण हीच मुंबईची ओळख राहिली असती का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आणि मुंबईची तुंबई झाली, मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुबईत महाराष्ट्र नाही वगैरे गोष्टींपासून आमचा बचाव झाला असता. सुबोधजी खरे साहेब सुशेगात होऊन 'चील' म्हंटले असते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे गुरुवार, 02/19/2026 - 09:47
क्विलॉन (आताचे कनन्नोर) तपशिलात त्रुटी क्विलॉन म्हणजे कोल्लम हे कोची च्या दक्षिणेस आहे तर कनन्नोर म्हणजे आताचे कण्णूर हे कोची च्या उत्तरेस आहे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अनामिक सदस्य गुरुवार, 02/19/2026 - 09:55
जर ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले नसते आणि ते डॅनिश लोकांच्या ताब्यातच राहिले असते तर आज भारताचा भाग असले असते का?

In reply to by अनामिक सदस्य

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 02/19/2026 - 12:10
झाले असते. फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली ठिकाणे नंतरच्या काळात भारतात सामील झालीच. तसेच कधीना कधी अंदमानचेही झाले असते.

स्वधर्म Wed, 02/18/2026 - 18:11
आजही भारतातील विमानांच्या बॉडीवर व्ही टी - नंबर लिहिलेला असतो. व्हीटी म्हणजे व्हिक्टोरिया टेरिटरी आहे असे समजले होते. इंग्रजांचे राज्य जाऊन किती वर्षे झाली, पण आपण आपल्या विमानांना अजून व्हीटी असे नोंदवतो हे समजायला कठीण आहे.

In reply to by स्वधर्म

गवि गुरुवार, 02/19/2026 - 09:47
VT बदलले पाहिजे हे तात्विकदृष्ट्या रास्त पण रजिस्ट्रेशन बदलणे आणि इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या विमानांचे, टप्प्याटप्प्याने, हे प्रचंड किचकट आणि खर्चिक काम आहे. त्यातही ही फक्त नंबर प्लेट किंवा शेपट्या नव्याने रंगवण्यापुरती साधी प्रक्रिया नसून असंख्य ठिकाणी त्याची तांत्रिक एन्ट्री देखील असते. त्यात विमान वाहतुकीची वेळापत्रक दृष्टीने महाप्रचंड उलथापालथ होऊ शकते. ही खूप जुन्या काळापासून जागतिक पातळीवर एस्टॅब्लिश झालेली पद्धत बदलून BH किंवा तत्सम बदल करणे वाटते तितके सोपे नाही. म्हणून ते तहकूब आहे. VT याच अक्षरांचा भारतीय इतिहासातील गौरवास्पद असा फुल फॉर्म शोधणे हा अधिक स्मार्ट उपाय ठरेल. उदा. BMC, बॉम्बे शब्द बदलला तरी बृहन्मुंबई वापरून शॉर्टफॉर्म तसाच ठेवता येतो तत्सम. किंवा VJTI सारखं. व्हिक्टोरिया ज्युबिली ऐवजी वीरमाता जिजाबाई.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारतात ब्रिटिशांच्या अंमलाखाली प्रदेश होता आणि संस्थानेही होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटिश भारताला. त्यानंतर एकेक करून संस्थाने भारतात विलीन झाली. पंजाबमधील अशा संस्थानांचे १९४८ मध्ये पेप्सू म्हणून राज्य स्थापन केले गेले होते. पेप्सू म्हणजे पतियाळा अ‍ॅन्ड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन. त्या राज्याची राजधानी पतियाळा होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग त्या पतियाळाच्या संस्थानिकांच्या कुटुंबातील. म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पेप्सू ही राज्ये होती. खालील नकाशात दिसेल की त्यावेळेस पेप्सू आणि हिमाचल प्रदेश हे एकसलग भाग नव्हते तसेच पेप्सूमध्येही पंजाबचा एक भाग 'एन्क्लेव्ह' म्हणून होता. Punjab (नकाशाचा संदर्भः विकीपीडीया) मग नंतरच्या काळात पेप्सू पंजाबमध्ये विलीन करण्यात आले आणि काही भाग हिमाचलमध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर इंदिरा गांधींनी १९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा हे राज्य वेगळे केले.

अनिकेत वैद्य Wed, 02/18/2026 - 19:44
रेल्वेचे एकुण १८ झोन आहेत. त्यान्ची नावे खालीलप्रमाणे १. मध्य रेल्वे (CR): मुंबई २. पश्चिम रेल्वे (WR): मुंबई ३. उत्तर रेल्वे (NR): दिल्ली ४. दक्षिण रेल्वे (SR): चेन्नई ५. पूर्व रेल्वे (ER): कोलकाता ६. दक्षिण पूर्व रेल्वे (SER): कोलकाता ७. उत्तर पूर्व रेल्वे (NER): गोरखपूर ८. ईशान्य सीमा रेल्वे (NFR): गुवाहाटी ९. दक्षिण मध्य रेल्वे (SCR): सिकंदराबाद १०. पूर्व मध्य रेल्वे (ECR): हाजीपूर ११. उत्तर पश्चिम रेल्वे (NWR): जयपूर १२. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR): हुबळी १३. उत्तर मध्य रेल्वे (NCR): अलाहाबाद (प्रयागराज) १४. पश्चिम मध्य रेल्वे (WCR): जबलपूर १५. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR): बिलासपूर १६. पूर्व किनारी रेल्वे (ECoR): भुवनेश्वर १७. कोलकाता मेट्रो (MR): कोलकाता १८. दक्षिण कोस्ट रेल्वे (SCoR): विशाखापट्टणम (१८ वा झोन) ह्यातील मध्य रेल्वे हा झोन पाहिला तर मुखालय मुंबई (छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) हा झोन महाराष्ट्राचा बराचसा भाग, कर्नाटकचा उत्तर पूर्व भाग आणि मध्य प्रदेशचा दक्षिण भाग व्यापतो. त्यातही चर्चगेट ते बडोदा/वडोदरा हा मार्ग पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत. मराठवाड्यातला काही भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यात. कोकण रेल्वेची हद्द सुरु होते रोहा (जिल्हा रायगड) ह्या स्थानकानंतर. ठाणे जिल्ह्यातील उत्तरकोकणाचा भाग पश्चिम रेल्वेत, मुंबई ते रोहा (पनवेल मार्गे) मध्य रेल्वेत आणि रोहा नंतर कोकण रेल्वे. कागदावरील महसुली जिल्हे, राज्ये आणि रेल्वेची हद्द ह्या एकमेकांशी सुसंगत नसणाऱ्या गोष्टी आहेत. तुघलकाबाद हे स्थान भौगोलिकदृष्ट्या दिल्लीजवळ, आजूबाजूला सगळीकडे उत्तर रेल्वेचे साम्राज्य, पण तुघलकाबाद मधील विद्युत लोको शेड हि पश्चिम मध्य रेल्वे (मुख्यालय: जबलपूर) ह्यांच्या अख्यतारीत.

In reply to by अनिकेत वैद्य

एकतर रेल्वे हे राज्य आणि केंद्र या दोन्ही सूचींत न ठेवता फक्त केंद्र सूचीत आहे त्यामुळे राज्यांना आपल्या राज्यांतर्गत रेल्वे मार्ग विकसित करता येत नाहीत. असे का मला ठाऊक नाही. एकूण भारतीय रेल्वे ही प्रचंड अकार्यक्षम, अजागळ आणि जनतेच्या प्रचंड गैरसोयीची गोष्ट आहे. ती मॉडर्नाईज करणे एवढे विलंब लावणारे प्रकरण आहे की बस्स. डेक्कन भागात रेल्वेचे जाळे अजिबात पसलेले नाही याला केवळ भूगोल कारणीभूत आहे का?

सुबोध खरे Wed, 02/18/2026 - 20:04
आमच्या लहानपणी कोकणातील जिल्हे म्हणजे मुंबई आणि ठाकुर असे होते म्हणजे ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी. १९७८ च्या आसपास रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा करायचे ठरले तेंव्हा हे कोकणचे जिल्हे "ठाकुरसि" होणार होते म्हणजे ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग . पण श्री अंतुले यांनी तेवढ्यात मखलाशी करून कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड केले त्यामुळे हे ठारारसि झाले ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि आता पालघर जिल्हा वेगळा होऊन पाठारारसि झालंय

स्वातंत्र्यानंतरचे मद्रास राज्य म्हणजे एक अजब प्रकार होता. आताच्या कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्हा (मंगलोर वगैरे), सध्याच्या केरळमधील उत्तरेकडील मलबार भाग (कासारगोड, कोझिकोडे, मल्लापुरम वगैरे), कन्याकुमारी वगळता सध्याचे पूर्ण तामिळनाडू राज्य आणि तेलंगण वगळता सध्याचा आंध्र प्रदेश एवढा मोठा भाग त्या राज्यात येत होता. सध्या केरळमध्ये असलेले मध्य भागातील कोचीन आणि दक्षिण भागातील त्रावणकोर (तिरूवनंतपुरम वगैरे) यांचे कोचीन-त्रावणकोर हे वेगळे राज्य होते. सध्या कर्नाटकात असलेले कूर्ग हे सुंदर ठिकाण वेगळे राज्य होते. तर सध्या कर्नाटकात असलेला उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) आणि बेळगाव वगैरे उत्तर पश्चिमेकडील भाग मुंबई राज्यात होते. तर कर्नाटकात उत्तर पूर्वेकडील गुलबर्गा, बीदर, रायचूर आणि बेल्लारी सुध्दा हे भाग हैद्राबाद राज्यात होते. सध्या कर्नाटकात असलेले इतर भाग त्यावेळेस म्हैसूर राज्यात होते. १२ वर्षांपूर्वी तेलंगणची स्थापना होण्यापूर्वी दक्षिण भारतात चार (आणि आता पाच) राज्ये दिसतात त्यापेक्षा पूर्ण दक्षिण भारताचा भूगोल पूर्ण वेगळा होता हे आणि मद्रास राज्य किती विलक्षण गुंतागुंतीचे होते हे पुढील नकाशावरून समजेलच. Madras पोट्टी श्रीरामूलूंचा उपोषणात मृत्यू झाल्यानंतर १९५३ मध्ये मद्रास राज्यातील तेलुगु भाषिक भाग वेगळा करून आंध्र प्रदेश हे राज्य स्थापन करण्यात आले. त्यात कोस्टल आंध्र (विजयवाडा, विशाखापट्टणम वगैरे) आणि रायलसीमा (नेल्लोर, कडप्पा, कुर्नूल वगैरे) भागांचा समावेश केला गेला. तेव्हा आंध्र प्रदेशची राजधानी होती कुर्नूल. वर म्हटल्याप्रमाणे कन्याकुमारी त्यावेळेस मद्रास राज्यात नव्हते तर ते कोचीन-त्रावणकोर या राज्यात होते. त्या राज्यात मल्याळम भाषा प्रमुख होती तर कन्याकुमारी होते तामिळ भाषिक. म्हणून कन्याकुमारीचे तामिळचे प्रभुत्व असलेल्या मद्रास राज्यात विलीनीकरण करावे म्हणून कन्याकुमारीत निदर्शने झाली. ही गोष्ट १९५५ मधील. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात लढणारे दोन प्रमुख समाजवादी पक्ष होते- जयप्रकाश नारायणांचा समाजवादी पक्ष आणि आचार्य कॄपलानींचा किसान मजदूर प्रजा पक्ष. दोन्ही पक्षांनी बर्‍यापैकी मते घेतली पण काँग्रेसविरोधी मते विभागली गेल्याने त्यांना निवडणुक जिंकणे सोडाच जागाही बर्‍याच कमी मिळाल्या. म्हणून १९५२ मध्ये निवडणुक संपल्यावर या दोन पक्षांचे विलीनीकरण झाले आणि प्रजा समाजवादी पक्ष हा पक्ष निर्माण झाला. त्यावेळेस कोचीन-त्रावणकोरचे मुख्यमंत्री होते या प्रजा समाजवादी पक्षाचे वासुदेवन नायर (बहुदा). तर कन्याकुमारीचे मद्रास राज्यात विलीनीकरण व्हावे म्हणून जी निदर्शने झाली होती त्यावर या वासुदेवन नायर यांच्या सरकारने गोळीबार केला आणि त्यात काही लोक मारले गेले. मग आपल्याच लोकांवर आपले सरकार गोळीबार कसा करू शकते या मुद्द्यावरून राम मनोहर लोहिया या प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन केला. समाजवादी परिवारात पडलेल्या शेकडो फुटींपैकी ही पहिली फूट होती. त्यानंतर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली त्यात बरेच बदल केले गेले. एक तर मद्रास राज्यातून मलबार जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तो मलबार जिल्हा तसेच कोचीन-त्रावणकोर राज्य यांचे विलीनीकरण झाले आणि नवे केरळ हे राज्य बनले. त्याचवेळेस कन्याकुमारीला मद्रास राज्यात जोडण्यात आले. तसेच मुंबई राज्यातील उत्तर कन्नड जिल्हा, बेळगाव वगैरे भाग, हैद्राबाद राज्यातील तेलंगण हा तेलुगू भाषिक भाग वगळता गुलबर्गा, रायचूर वगैरे भाग, कूर्ग यांचे म्हैसूर राज्यात विलीनीकरण करण्यात आले. आता आपण ज्याला कर्नाटक म्हणतो त्याला तेव्हा म्हैसूर राज्य म्हणायचे. कर्नाटक हे नाव १९७० च्या दशकात दिले गेले. त्याप्रमाणेच हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करून राज्याची नवी राजधानी झाली हैद्राबाद. आणि हे सगळे भाग जाऊन उरलेला भाग राहिला मद्रास राज्यात. त्या राज्याचे नाव १९७० च्या दशकात तामिळनाडू असे केले गेले.

गवि Wed, 02/18/2026 - 20:59
काही कायदे देखील पूर्ण राज्य कव्हर न करता एका विशिष्ट भागापुरते लागू होतात. बॉम्बे टेनन्सी ॲक्ट हा पूर्वी मुंबई, महाराष्ट्रातला काही भाग आणि गुजरातचा काही भाग, या एरियात लागू होता. बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणत असत, त्या भागात बहुधा. आताही तो गुजरातमध्ये वेगळ्या नावाने लागू आहे. महाराष्ट्रात या कायद्यात मुंबई आणि काही जिल्हे त्यात कव्हर होतात. पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि कोंकण. मराठवाडा आणि विदर्भाला तो लागू होत नाही. वकिलांनी खात्री करून द्यावी.

मनो Wed, 02/18/2026 - 21:21
गवि, मुळात उत्तर आणि दक्षिण असे कोकणचे दोनच भाग ब्रिटिश राज्यात होते. त्यांचा उगम त्याहूनही मागे म्हणजे इसवी १५५० सुमारास आहे. नगरच्या निजामशाहीच्या ताब्यात असणारे कोकण याला मोगल निजामशाही तळकोकण म्हणत. त्यात मुंबई, चौल, जंजिरा, अलिबाग इत्यादी सर्व भाग येई. दुसरा भाग म्हणजे आदिलशाही तळकोकण. त्यात तुम्ही म्हणता तो सर्व भाग येई, थेट गोव्याच्या पलीकडे कारवार पर्यंत. शहाजहान बादशहाने निजामशाही घेतली आणि औरंगझेबाने आदिलशाही, यात पन्नास वर्षे मध्ये गेली. हा भाग असा दोन तुकड्यात विभाजित होण्याचाही आधी आणि काही काळ नंतरही यात छोटी छोटी स्वतंत्र राज्ये होती. भौगोलिक दुर्गमतेमुळे ऐन मुसलमानी बहामनी राज्यातही ती कशीबशी टिकून राहिली. सूर्यराव सुर्वे, चंद्रराव मोरे, पालवणीचे दळवी, वेंगुर्ला आणि वाडीचे सावंत भोसले, यांची मुळे याहूनही खोलवर जातात. यांच्यावर आपली सत्ता बसवण्यासाठी बहामनी महमूद गवान इत्यादी लोकांनी कोकणात स्वाऱ्याही केल्या. विशाळगडचा दर्गा मला वाटते असल्याच एक आक्रमकाचा आहे. मुळात शिवाजी महाराजांचे आणि मोगलांचे वैर होण्याचे आद्य कारण म्हणजे निजामशाही तळकोकण, कारण यातील कल्याण, रायरी हा जुना निजामशाही तळकोकणाचा भाग निजामशाहीचे नवे मालक मोगलांना मिळायला हवा, परंतु आदिलशाही आणि मोगल यांच्या भांडणात शिवाजी महाराज हा भाग आपल्या राज्यात सामील करून बसले होते. कोकणचे भौगोलिक दुर्गमत्व आणि व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन महाराजांनी आपल्या राज्यात सामील केलेला हा पहिला प्रदेश. तुमच्या भूगोलात इतका मोठा इतिहास दडलेला आहे!

In reply to by मनो

गामा पैलवान Wed, 02/18/2026 - 23:29
मनो, भूगोलातल्या इतिहासावरनं आठवलं की शंभूपुत्र शाहूमहाराज आपलं राज्य जेफनापट्टण म्हणजे आजचा जाफना इथवर मानीत असंत. तसं असेल तर ते मोठं रोचक तथ्य ठरावं. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रचेतस

रूमशान म्हणजे रोम किंवा सिरिया असे दोन्ही प्रदेश हे होऊ शकतात. पण भारतीयांना इस्तंबूल हेच युरोपातले मोठे शहर वाटत होते का? कुणीतरी मला मागे रूमशान इस्तंबूलच असे सांगितले होते त्यामुळे माझा गोंधळ झाला. विषय होता की शिवशंभू नंतर तेव्हड्या प्रचंड महत्त्वाकांक्षेचे त्या घरात कुणी जन्मले नाही असा. तेव्हा शाहू महाराजांना इस्तंबूल देखील जिंकून घ्यायचे होते असे कुणीतरी मला सांगितले. रेडिट वर की कोरा वर ते आठवत नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 12:29
इस्तंबूलला कुंस्तुंतुनिया (बायझन्टाईन साम्राज्यातले कॉस्न्टेन्टिनोपल) असेही इकडे म्हटले जात असे. मराठेशाही किंबहुना मुघलकाळात देखील तुर्कीचे ऑटोमन साम्राज्य बलाढ्य होते. इतके की मुघल बादशहांना सुद्धा आपल्या बादशहापदासाठी तुर्की खलिफाची मान्यता असणे भाग्याचे आणि जरुरीचे वाटत असे.

In reply to by प्रचेतस

अजून एक विषय मला तुम्हाला विचारायचा आहे की जुन्या भारतीयांची भौगोलिक समज काय होती उर्वरीत जगाबद्दल? म्हणजे त्यांना मंगोलिया चीन बद्दल माहीत होते का? मराठे मादागास्कर वगैरे पर्यंत गेले होते असे अलीकडे समोर येत आहे. मात्र तेव्हा भारतीयांची युरोपबद्दल काय समज होती. सिकंदर तर खूपच पूर्वी येऊन गेला त्यामुळे भारतीयांना ग्रीस वगैरे प्रदेश ऐकून तरी ठाऊक असणार आहेत. पण त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलेच असेल ना. अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत! https://www.davidrumsey.com/ १५५४ च्या आसपासचा Pirî Reis याचा एक अटलास माझा absolute favorite आहे! त्या वेळेस या माणसाचे एकुण भौगोलिक ज्ञान पाहून मी चाटच पडलो होतो त्याने एवढा प्रचंड अ‍ॅक्युरेट नकाशा बनवला होता तेही अनेक नकाशांचे आणि लोकांचे ज्ञान गोळा करून.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 12:47
अगदी मौर्यकाळापासून ग्रीकांशी व्यापार होत असे. अलेक्झांडरमुळे इंडो बॅक्ट्रियन राज्ये इकडे होतीच. सेल्युकस निकेटरची मुलगी चंद्रगुप्ताला पत्नी म्हणून दिलेली होती. मात्र प्रवासी भारतीयांना लिहिण्याची सवय नसल्यामुळे त्यांचे वृत्तांत फारसे उपलब्ध नाहीत. मात्र पेरीप्लस ऑफ एरिथ्रियन सी मध्ये त्याबद्द्ल विपुल प्रमाणात आलेले आहे. रोमन इतिहासकार प्लिनीने तर भारतीय आयातीच्या बदल्यात रोमनांच्या सुवर्णनाण्यांचा ओघ भारतात वाहात असल्याबद्द्ल चिंता व्यक्त केली होती. बाकी मंगोलिया, चीन्बद्द्ल तर पूर्वीपासून माहिती होतेच. चीनशी बराच व्यापार होता. मंगोल टोळीवाल्यांनी तर जवळपास १/४ भूभागावर राज्य केले. चोळांनी इंडोनेशिया, मलेशिया इत्यादींशी आपल्या सीमा भिडवल्या होत्या. तर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आरमाराची दहशत खुद्द मस्कतच्या अरबांनी घेतली होती (यावर आजच मिपाकर बॅटमॅनने एक लेख लिहिला आहे) मात्र आपल्या प्रवाश्यांनी केलेली परदेशातील प्रवासांची वर्णने फारशी नाहीत.
अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत!
याबद्द्ल धन्यवाद. सवडीने बघावे अशीच साईट आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

दोहो बाजुन व्यापार चालू असल्याने आपल्याला आणी युरोपियनांना एकमेकांविषयी भरपुर माहीती होती. भृगकच्छ, शुर्पारक, कलीयान, माहीम, चेउल (सेमुल्ला) ही प्रमुख बंदरे. यातून सर्वदुर व्यापारी संपर्क असल्याने भौगोलीक माहीतिचीही देवाण घेवाण होत असणारच... (रॉटरडॅम इथल्या नावीक संग्रहात एका कार्टोग्राफरने १६१९ मधे काढलेला कोकणचा नकाशा ठेवलाय तिथे ही बंदरे स्पष्ट दाखवली माझ्याकडे त्याचा फोटो आहे पण मोबाईल मधे आहे. इथे कसा द्यायचा माहीत नाही)

१. पश्चिम महाराष्ट्र पश्चिमेला नाही. २. मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा की नगर? ३. खानदेश नेमका कुठे आहे? आणि नाशिक पश्चिम महाराष्ट्रात घ्यावे का? ४. माणदेश आणि पश्चिम वेगळा करायचा का? ५. मावळ नेमका भाग कुठला? ६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो? ७. कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे. ८. कोल्हापूर, सांगली यांना दक्षिण महाराष्ट्र का म्हणत नाहीत? की बेळगाव आणि त्या भागाला म्हणायचे? ९. कारवार बिदर वगैरे हे अलभ्य मराठी प्रदेश यांना काय म्हणावं?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

म्हणजे नेमके काय? माझ्या मते, घाट उतरल्यावर जो तुलनेने समतल प्रदेश लागतो त्याला तळकोकण म्हणतात. का दक्षिण कोकणाला तळकोकण म्हणतात?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि Wed, 02/18/2026 - 23:49
मला वाटते कोंकणातील कोअर भाग. म्हणजे रायगडच्या दक्षिणेचा, याला म्हणत असावेत. किंवा ते कोंकण जे घाटांच्या उताराच्याही खाली समुद्रसपाटीवर प्रॉपर वसलेलं आहे, ते.. असाही अर्थ असू शकेल. उदा. आंबाघाट येथील गावे, साखरपा येईपर्यंत तळकोकणात मोजत नसतील पण रत्नागिरी, दापोली, गुहागर, देवगड, कुणकेश्वर हे त्यात येत असेल. नेमके माहीत नाही तिकडे लहानपण गेले असले तरी. मी त्याचा अर्थ कुडाळ देवगड सावंतवाडी असा घेत आलोय.

In reply to by गवि

इथे डोंगर आणि टेकड्या संपून बर्‍यापैकी समुद्रसपाटीचा किंवा थोडा उंच पठारी प्रदेश सुरु होतो म्हणून याला तळकोकण म्हणत असावेत कारण घाट उतरल्यावर आपण तळावरच जाणार.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

खटपट्या गुरुवार, 02/19/2026 - 01:30
पालघर पासुन गोव्याच्या सिमेपर्यंत कोकण आहे, तळकोकण म्हणजे दक्षिणेकडचे कोकण - चिपळूण पासून खाली तळकोकण म्हणण्यास हरकत नाही, पण तळकोकणाची काही सिमा नाही. जसे साउथ मुंबई. पश्चिम महाराष्ट्राबाबत नेहमीच गोंधळ आहे. कारण खरे तर महाराष्ट्राच्या पष्चिमेला कोकण येतो पण त्यास पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाहीत. असो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विजुभाऊ गुरुवार, 02/19/2026 - 10:40
जावळीत जावळी नावाचे गावच नाहिय्ये, दुसरे म्हणजे पुणे शहर हे हवेली तालुक्यात येते. डेक्कन मात्र भांबुर्डेमधे यते

In reply to by विजुभाऊ

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 11:34
जावळी हे नाव गावावरुन नव्हे तर तेथील घनदाट जंगलावरुन आले आहे. झाडांची इतकी दाटी जशी झाडांची जाळीच जणू ते जावळी.

In reply to by विजुभाऊ

आहे. महाबळेश्वर पायथ्याच्या दरे खोर्‍यात जावळी गाव आहे. कुंभरोशी वरुन दरे कडे जाताना रस्त्यावर हे गाव आहे. पुर्वी एक असेल पण सध्या दोन वाड्या आहेत. थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.
मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत का? हे विचारायचे कारण म्हणजे एक गोष्ट आठवली. शाळेत असताना आमची सहल प्रतापगड आणि शिवथरघळ येथे गेली होती. तेव्हा शिवथरघळीहून एक दिवस सकाळी 'आपल्याला चंद्रराव मोर्‍यांचा वाडा बघायला जायचे आहे' म्हणून आम्हाला नेले. डोंगरावरून बराच वेळ चालत गेल्यावरही वाड्याचा पत्ता नव्हता. शेवटी एके ठिकाणी गेल्यावर- इथे चंद्रराव मोर्‍यांचा वाडा होता अशी आमची बोळवण केली गेली. प्रत्यक्षात तिथे काहीही नव्हते- नुसते गवत होते. एक दगडही नव्हता. बहुदा आमच्या बरोबर आलेल्या शिक्षकांनाही तो वाडा नक्की कुठे होता हे माहिती नसावे त्यामुळे आम्हाला नुसतेच चालत नेले आणि आपण रस्ता चुकलो किंवा आपल्याला माहित नाही हे मान्य करायचे नसेल म्हणून कदाचित 'इथे वाडा होता' असे काहीतरी सांगून आम्हाला पिटाळून लावले असावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवथर इथुन थोडे वरच्या बाजुला सह्याद्रीच्या अगदी पायथ्याला चेरावडी म्हणून गाव आहे (१.५ किमी). त्या गावाच्या पुढे अगदी डोंगर तळात मोर्‍यांचा वाडा आहे... अगदी आत जंगलात असल्याने चटकन सापडत नाही आणी आता फक्त काहीच अवशेष उरलेत. सह्यमाथ्यावरच्या कुंड गावातून खाली खुटे नावाची घाटवाट उतरते तेव्हा ह्या वाड्यावरुन वाट जाते. अम्ही खुटे घाट वाट ट्रेक केलेला तेव्हा हा वाडा बघीतलेला.. तसा अजुन एक मोर्‍यांचा वाडा आहे.. कोयना धरण क्षेत्रात उचाट नावाचे एक गाव आहे त्या गावाच्या पुढे निरपजी म्हणून मोर्‍यांचे कुलदैवत आणी देवराई आहे, तिथेही मोर्‍यांचा वाड्याचे अवशेष आहेत...

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 11:30
५. मावळ नेमका भाग कुठला?
मावळाचा प्राचीन उल्लेख कार्ले येथील शिलालेखात मामाड असा आलाय. तर ह्या प्रदेशाला त्याकाळात 'मामलाहार' म्हणत. मावळ म्हणजे रूढार्थाने मावळतीकडचा म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश. इकडील नद्यांच्या खोर्‍यांवरुन त्या त्या मावळाला विशिष्ट नावे पडली. पवनेच्या खोर्‍यातील पवन मावळ, आंद्रेच्या खोर्‍यातील आंदर मावळ तर कसबे नाणे गावाभोवतालचे नाणेमावळ.
६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो?
बेरार म्हणजे सर्वसाधारणपणे अमरावती, वर्धा, नागपूर. बहमनी साम्राज्याची पाच छकले होऊन अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळाकोंड्याची कुत्बशाही आणि बेरारची इमादशाही अशा पाच सल्तनती स्थापन झाल्या. इमादशाहाची राजधानी एलिचपूर (आजचे अचलपूर). विस्ताराने जरी मोठं असलं तरी ह्यांचे सैनिकी सामर्थ्य तुलनेने कमी होते पण नरनाळा, गाविलगड असे बलाढ्य किल्ले त्यांच्या आधिपत्याखाली होते.
कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे.
कोंकणाचे पूर्वीचे नाव म्हणजे अपरान्त. पहिल्या शतकातला परकीय प्रवासी स्ट्राबो कोंकणाचा उल्लेख 'कोनियकोई' असा करतो. कोंकणाची व्युत्त्पत्ती तशी नीट लागत नाही मात्र कोण म्हणे डोंगरमाथा व रेणुकादेवीचे इकडील नाव कुंकुणा अशा नावावरुन कोंकण नाव आले असे मानले जाते. मध्ययुगात लाट (दक्षिण गुजरात), शूर्पारक (आजचे नालासोपारा), अष्टागर (अक्षी, नागाव, किहिम वगैरे प्रदेश) आणि त्या खालचे कोंकण व तदनंतर गोमंतक असे मानले जात असे. तळकोकण मात्र चिपळूणपासून पुढे हे सहज मानता यावे.

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे गुरुवार, 02/19/2026 - 12:06
तळकोकण म्हणजे सध्याचा सिंधुदुर्ग जिल्हा. येथे मालवणी भाषा हि जास्त बोलली जाते. रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण डोंगराळ आहे . पोलादपूर सोडल्यावर कशेडी घाट चालू होतो तेथे रत्नागिरी जिल्हा चालू होतो तेथपासून हा जिल्हा बराचसा डोंगर आणि माथ्यावरील सडा असाच दिसतो ते खारे पाटण पर्यंत . तेथून सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो त्यातील बराचसा भाग हा सपाटीचा आहे. हा महाराष्ट्रात कोकणच्या नकाशात दक्षिणेकडचा तळाकडचा भाग म्हणून याला तळकोकण म्हणतात. रत्नागिरी लांजा राजापूर हा भाग सहसा तळकोकणात धरला जात नाही. येथे संगमेश्वरी बोली ( मराठीची एक बोली) बोलली जाते.

In reply to by प्रचेतस

ज्ञानसमृद्ध प्रतिसाद. धन्यवाद. याविषयी खरेतर स्वतंत्र लिहायला हवे की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची भागोलिक समज. आजकाल ऐतिहासिक चित्रपट दाखवतात तेव्हा शिवराय किंवा एखादा खान खलबते करत असताना टेबलवर चक्क त्यांच्यापुढे नकाशा वगैरे मांडलेला असतो आणि ते त्यात लाकडाचे घोडे वगैरे सरकवून स्ट्रॅटेजी हाकतात. तेव्हा मला प्रश्न पडायचा की यांना समुद्र कुठून कुठे आहे हे तरी कसे कळायचे. कारण कार्टोग्राफर ही एक अतिशय महत्त्वची गोष्ट असणार तेव्हा शिवरायांनी तशा माणसाला अतिशय उच्च पद दिले असेल इंदलकर सारखे.

याबरोबरच लहानपणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाकेंद्र ओरोस बुद्रुक आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाकेंद्र मालवण का नाही? ओरोस का निवडले? जिल्ह्यांना राजधान्या नसतात म्हणून आपल्या पंप्रंची चेष्टा झाली होती तेव्हा जाणवले आपल्या कडे सुद्धा जिल्ह्याच्या केंद्रांना शब्दच नाही आहे. राजधानी म्हणायला काही हरकत नाही. तरीही ओरोस कडे कुणाचे विषेश लक्ष जात नाही. आता तर तिथे मोठे सरकारी मेडिकल कॉलेज देखील आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नावाच्या गावात कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा रुग्णालय सोडून काहीही नाही. हे गाव अजिबात वाढले नाही. कुडाळ बरेच मोठे झाले आहे असे दिसते. मालवण देखील बरेच मोठे आहे. मग या ओरोस मधे जाते तरी कोण? त्या जिल्हा रुग्णालयाचा काही उपयोग आहे का? कुणाच्या डोक्यात आले होते हे ओरोस चे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ओरोसजवळून आता हातखंबा गोवा महामार्ग गेला आहे. याच गावाला स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे. पश्चिमेला रेल्वे स्टेशन आणि पूर्वेला हायवे. त्यांच्या मधे एक गाव. या गावात जिल्हापरिषदेपासून सगळी जिल्ह्याची मुख्य ठिकाणे आहेत. या गावात 2021 ला सरकारी मेडिकल कॉलेज झाले आहे. याच गावाजवळ अजून एक मेडिकल कॉलेज आहे. या गावात एक मोठे तळे असून गावाला पाणी पुरवठा भरपूर आहे. या गावात एक इंजिनियरिंग कॉलेज आहे. हे गाव भविष्यात चांगले वाढू शकते त्यामुळे ओरोस या ठिकाणी गुंतवणूक करण्यास चांगला वाव आहे. इथे गुंठामंत्री होणे सध्या शक्य वाटते.

In reply to by गवि

ओरोस अगदी सेंटरला आहे. आधी वळणे वळणे म्हणून अंतर जास्त त्यात एका टोकाला केंद्र नको म्हणून निवडलेले दिसते. शिवाय लँड घेणे हा प्रोब्लेम इतर शहरात येतोय असे दिसतेय.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सुबोध खरे Fri, 02/20/2026 - 12:04
माझ्या माहितीप्रमाणे ओरोस बुद्रुक या गावाला राजधानी बनवण्याचे कारण राजधानी बनवण्यावर असलेले वाद. यात कणकवली, मालवण कुडाळ आणि सावंतवाडी अशा चारही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना आपल्याच शहरात राजधानी हवी होती. यावर तोडगा म्हणून चारही ठिकाणच्या मध्यभागी असलेले आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मुंबईत गोवा रेल्वे मार्गावर असलेले ओरोस बुद्रुक हे गाव निवडण्यात आले. मालवण आणि सावंतवाडी पासून दोन्ही (रस्ता आणि रेल्वे मार्ग) तसे लांबच होते शिवाय सरकारी कार्यालयांसाठी भरपूर जमीन हवी होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. यामुळे ओरोस बुद्रुक हे गाव निवडले आणि मालवण जवळ असलेला समुद्रातील किल्ला सिंधुदुर्ग यावरुन गावाचे नाव सिंधुदुर्ग नगरी आणि जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. एकदा सरकारी कार्यालये आली कि शहर वसतेच. कारण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस मुख्यालय, आर टी ओ, जिल्हा रुग्णालय, जिल्हा आणि सत्र न्यायालय अशी कार्यालये आली आणि त्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या कि वस्ती होतेच

भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर बिहार आणि बंगाल यांना उत्तर भारतात का धरतात आणि मेघालय वगैरे यांना पूर्वेकडेची राज्ये न म्हणता इशान्येकडेची का म्हणतात हा गोंधळ मला नेहमी होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि गुरुवार, 02/19/2026 - 00:04
यासदृश एक आणखी निरीक्षण माझंही आहे. अंदमान निकोबार बेटे ही सांस्कृतिक दृष्ट्या काही प्रमाणात ओरिजनल असली (उदा. आदिवासी) आणि तिथली आधुनिक संस्कृती ही भारतातल्या अनेक भागातल्या लोकांची संस्कृती- सरमिसळ असली, तरी अनेकदा व्यवहारात, नियोजनात, कंपन्या किंवा संस्थांच्या विभागीय वाटणीत, शाखांचे मुख्य ऑफिस कुठे, या दृष्टीने अंदमान हे चेन्नईपेक्षा कोलकत्याशी जास्त जोडलेलं दिसतं. अंदमानातून बाहेर पडलेले लोक कोलकात्यात चेन्नईपेक्षा जास्त दिसतात आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील पश्चिम बंगालशी अधिक जवळचे असतात. इतर कोणाचं निरीक्षण अगदी विरुद्ध देखील असू शकतं. माझ्याकडे मोठा विदा नाही.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 02/19/2026 - 00:09
स्पेनचे एक शहर आफ्रिका खंडात आहे- त्या शहराचे नाव आहे सेयुटा. सौदी अरेबियामध्ये इस्लामचा उदय झाल्यानंतर अरबांनी हल्ले सुरू केले. जॉर्डन-पॅलेस्टाईन ओलांडून ते आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात घुसले. त्यातून ते आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला असलेल्या मोरोक्कोपर्यंत पोचले. तिथून जिब्राल्टरचा समुद्र ओलांडला की स्पेन येते. ते स्पेनमध्येही घुसले. त्यांना स्पॅनिश लोक मूर म्हणायचे. त्या मुस्लिम आक्रमणाविरोधात स्पेनचे लोक जवळपास ५०० वर्षे लढत होते आणि त्यांनी १४९२ मध्ये मूरांना हाकलून दिले. १४१० मध्ये स्पेनमधील एका राजपुत्राने सध्या पोर्तुगाल आहे तो प्रदेश मुक्त केला आणि तिथे पोर्तुगाल या नव्या राज्याची स्थापना केली. त्यापूर्वी पोर्तुगाल असा वेगळा देश नव्हता. तिथे हेनरी म्हणून राजा होता. युरोपातून भारत आणि दक्षिणपूर्व आशियाबरोबर व्यापार चालायचा त्या व्यापार मार्गावर मुस्लिमांचे वर्चस्व होते तसेच कॉन्स्टॅन्टीनोपल (आताचे इस्तंबूल) मार्गे आलेला माल इटलीतील व्हेनिस आणि जिनोआमार्गे युरोपात जायचा तेव्हा त्या व्यापारावर इटालीयनांचेही वर्चस्व होते या गोष्टी स्पॅनिश आणि पोर्तुगीज ख्रिश्चनांना डाचत होत्या. त्यामुळे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधून काढायचे प्रयत्न त्या हेनरी राजाने सुरू केले. त्यामुळे त्याला हेनरी द नेव्हिगेटर असेही म्हणतात. त्यात धार्मिक अँगल पण होतात- मुस्लिमांचे वर्चस्व खिश्चनांना डाचत होते. त्यामुळे हेनरी द नेव्हिगेटरने युरोपिअन देशांनी केलेली पहिली समुद्र मोहिम काढली आणि सेयुटा या मोरोक्कोतील शहरावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट १४१५ ची. त्यानंतर १४८० मध्ये पोर्तुगाल आणि स्पेनचे एकीकरण झाले आणि सेयुटावर स्पॅनिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. १५४० मध्ये परत पोर्तुगाल वेगळा झाला तरीही सेयुटावर स्पेनचे नियंत्रण कायम राहिले- आजही आहे. खालील नकाशात सेयुटा स्पेनच्या जवळ आहे हे दिसेल. Ceuta या नकाशावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधायच्या उद्योगात पोर्तुगीज लोक पुढे का होते. त्याचे कारण पश्चिमेकडे अटलांटिकचा अ‍ॅक्सेस त्यांना जवळ होता आणि आफ्रिका खंडही जवळ होता. तीच गोष्ट स्पॅनिश लोकांची. त्यामानाने इंग्लंड बरेच लांब आहे. त्यामुळे भारतात युरोपिअनांनी हातपाय पसरायला सुरवात केली त्या काळात पोर्तुगीज दिसतील- मग फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश. त्याचे कारण या भूगोलात दडले आहे. त्यात इटालियन, ग्रीक आणि जर्मनांचे नावही दिसणार नाही. त्याचे कारणही हा नकाशा बघून समजेल. इटली आणि ग्रीसला अटलांटिकचा डायरेक्ट अ‍ॅक्सेसच नाही कारण भूमध्य समुद्र आणि आजूबाजूचे जमिन यातून जहाजे जाणार कुठून? जर्मनीला थोडासाच अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे पण त्या भागात कदाचित चांगले बंदर असायला परिस्थिती अनुकूल नसावी. त्या तुलनेत डच लोक भारतात पोचले आणि इंडोनेशियातही पोचले. कारण नॉर्थ सी मधून त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे. तीच गोष्ट डेन्मार्कची. ते मर्यादित प्रमाणात का होईना भारतात पोचले. कारण त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस होता. इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास अशा बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टिनटिन गुरुवार, 02/19/2026 - 11:58
ह्या वरून आठवले , अब्दालीसारखा नदीचा उतार शोधत आमचा एक मित्र खडवलीच्या काळू नदीत घसरून पडला होता

खटपट्या गुरुवार, 02/19/2026 - 01:33
ब्रिटीशांच्या काळातील मुंबै प्रोविन्स शोधत असताना तो फार मोठा होता असे ऐकले. नुकतेच कुठे तरी वाचले की ब्रिटीश मुंबई प्रोव्हिन्स हे ओमान पर्यन्त होते.

In reply to by खटपट्या

अनिकेत वैद्य गुरुवार, 02/19/2026 - 11:53
नौदल पश्चिम विभाग (मुख्यालय :मुंबई) ह्यांच्या अखत्यातातील भागात अजूनही बहुदा एकच पोलीस स्टेशन आहे. नौदलातील नागरी तक्रारांसाठी/गुन्ह्यांसाठी येथे गुन्हा नोंदवला जातो. त्याची हद्द गुजरात खंबात पासून अगदी केरळ, कन्याकुमारीपर्यंत आहे. नक्की नाव आणि संदर्भ आठवत नाहीये. मिळाले कि बाकी पोस्ट करतो.

गणेशा गुरुवार, 02/19/2026 - 08:53
छान चर्चा.. भूगोल - इतिहास शाळेत असताना खुप आवडायचा, वाचतो आहे..

कांदा लिंबू गुरुवार, 02/19/2026 - 11:45
जिल्हाकेंद्र - जिल्हाकेंद्र / जिल्ह्याचे मुख्यालय / डिस्ट्रिक हेड क्वार्टर याला राजधानी हा शब्द सध्या अनपेक्षित वाटत असला तरी रुळल्यावर तो योग्य वाटेल असे वाटते. सामान्यतः जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव हे एकाच असते. उदाहरण नांदेड या जिल्ह्याची राजधानी नांदेड या नावाच्या गावी (किंवा शहरात) आहे. तथापि, काही ठिकाणी जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव ही दोन्ही वेगवेगळी असलेली दिसतात. महाराष्ट्रात रायगड हा बहुधा असा एकाच जिल्हा असावा ज्या जिल्ह्याच्या राजधानीचे नाव वेगळे, अलिबाग हे आहे. आंध्र प्रदेशात (सध्याचा तेलंगणा धरून) मात्र असे अनेक जिल्हे पूर्वी होते. मागच्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्यांची विभाजने झाली व हा भूगोल काहीसा बदलला. २०१४ पूर्वीची स्थिती - जिल्हा -- राजधानी पूर्व गोदावरी -- काकिनाडा पश्चिम गोदावरी -- एलुरु कृष्णा -- मछलीपट्टणम मेदक -- संगारेड्डी प्रकाशम -- ओंगोल

In reply to by कांदा लिंबू

प्रकाशम -- ओंगोल
या प्रकाशम जिल्ह्याची नेहमी गंमत वाटते. प्रकाशम नावाचे कोणतेही गाव आहे असे वाटत नाही कारण त्या जिल्ह्याचे नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी.पी.प्रकाशम यांच्या नावावरून दिले आहे. मुख्यमंत्र्याच्या नावावरून जिल्हा हा जरा गंमतीचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात चव्हाण, पवार, नाईक किंवा फडणवीस नावाचा जिल्हा असेल तर कसे वाटेल? तसेच तिकडे केले आहे. उत्तर प्रदेशात मायावतींनी जिल्ह्यांचे नामकरण करून मूर्खपणाची परिसीमा गाठली होती. अमेठी जिल्ह्याचे नामकरण केले छत्रपती शाहूजी महाराज नगर. शाहू महाराजांच्या कामाविषयी आदर असला तरी शतकानुशतके असलेले एखाद्या ठिकाणाचे अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर करायचे? शाहू महाराजांचा कधी अमेठीशी संपर्क आला असेल असे वाटत नाही. मग अचानक अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर हे नाव देणे तसे विचित्रच वाटते. तीच गोष्ट अमरोहाची. अमरोहा जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर असे केले. मग यथावकाश ज्योतिबा फुले नगरचे लोकांनी जेपी नगर केले. अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर ही नावे बदलली पण समजा अशी नावे बदलली नसती तर जेपी नगर म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या नावाने नाव दिले आहे असे कोणाला वाटले असते. असे ऐकले आहे की कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी विद्यापीठ असे सुटसुटीत नाव ठेवावे असा आग्रह धरला होता. त्याचे कारण वडोदर्‍याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे एम.एस.युनिव्हर्सिटी झाले तसे कोल्हापूरमधील विद्यापीठाचे सी.एस.एम युनिव्हर्सिटी व्हायला नको- जसे युपीत जेपी नगर झाले. जिल्ह्याविषयी आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे सांगली जिल्ह्याची. सांगली जिल्ह्याचे मुख्यालय अर्थातच सांगली शहर आहे. पण सांगली जिल्ह्यात सांगली हा तालुकाच नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सांगली शहर येते मिरज तालुक्यात. असेही फार कुठे बघायला मिळत नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे महानगर असले तरी ते हातकणंगले तालुक्यात येते. काही गावांचे नशीब फळफळते तसे आहे. इस्लामपूर आताचे ईश्वरपूर आणि वाळवा तालुका, खानापूर तालुका पण विटा मुख्य शहर असे अनेक. लहानपणी काका लोकांना मुली पाहायला जेव्हा सगळी फॅमिली जात असे तेव्हा पहिल्यांदा भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेली गावे पाहता येत. वेगळेच फीलिंग असायचे. मी खूप हट्ट करून नवनीतचा अटलास विकत घेतला होता. तासनतास नकाशे पाहत घालवणे आणि ती गावे कशी असतील यांचे इमॅजिनेशन करणे खूप उत्तम टाइमपास. पहिल्यांदा कोल्हापूर पहिले तेव्हा तर भंजाळूनच गेलो होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. Sun, 02/22/2026 - 16:19
अजून एक गम्मत म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणी सांगली जिल्हा ह्यांच्या सीमारेषेवर रेल्वे लाईनजवळ निमशिरगाव आणि तांदळगे हि दोन गावे आहेत. त्या छोट्याश्या स्टेशनला दोन्ही गावाची नावे आहेत पण निमशिरगाव चे इंग्लिश बरोबर आहे तांदळगे चे स्पेलिंगनुसार तमदलगे असे केलेले आहे आणि स्टेशनबोर्डवर तसेच देवनागरीत लिहिलेले आहे. कॉलेजला दररोज मिरज-कोल्हापूर-मिरज ट्रेनने प्रवास करताना ते तमदलगे असे कसे नांव म्हणून मजा वाटायची. m

In reply to by अभ्या..

गवि Sun, 02/22/2026 - 17:50
ऑ??? मी तर खरोखरच तमदलगे असंच आजतागायत समजत होतो. - (शिवाजी विद्यापिठाचा जुना विद्यार्थी) गवि ता.क. गूगल सर्च केली असता विकिपीडिया पानावर, लोकसत्ता आणि अन्य अनेक वृत्तपत्रांत तमदलगे असंच दिसतं आहे. आणि तांदळगे असं शोधू गेलं तर एकही निकाल आला नाही. म्हणजे मूळ नाव सर्वत्रच चुकीचं पसरलं असावं. तमदलगे हे नाव बसेसवर बघितल्याचं आठवतं आहे सांगली कोल्हापूरमध्ये असताना तीस वर्षांपूर्वी.

In reply to by गवि

अभ्या.. Sun, 02/22/2026 - 17:59
Locality Name : Tamdalage ( तांदलगे ) Taluka Name : Shirol District : Kolhapur State : Maharashtra Region : Desh or Paschim Maharashtra Division : Pune Language : Marathi and Kannada Current Time 05:55 PM Date: Sunday , Feb 22,2026 (IST) Time zone: IST (UTC+5:30) Elevation / Altitude: 550 meters. Above Seal level Telephone Code / Std Code: 02322 . मी खूप जणाना तांदळगे असेच म्हणताना ऐकलेले आहे.

In reply to by गवि

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे. गोव्यात निदान कुंकळे माजोर्डे किंवा तशी नावे स्थानिकांच्या बोलण्यात तरी असतात मात्र बहुतेक बाहेरचे लेम करतात असे काहीसे कोल्हापुरात होईल असे वाटले नव्हते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे.
मी पण. माझी पहिली अस्थायी नोकरी कोल्हापुरात होती- २००२ मध्ये. तेव्हा विश्रामबागहून सकाळी सव्वाआठच्या सुमारास येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजरने दररोज कोल्हापूरला जायचो. तेव्हा जयसिंगपूर आणि हातकणंगले या दोन स्टेशनच्या मध्ये निमशिरगाव-तमदलगे हे स्टेशन होते. ते एक बिना प्लॅटफॉर्मचे स्टेशन होते. नुसत्या दोन पाट्या त्यावेळेस त्या स्टेशनला होत्या. पहिली पाटी म्हणजे स्टेशन सुरू झाले आणि दुसरी पाटी म्हणजे स्टेशन संपले :) त्या स्टेशनवर ती पॅसेंजर थांबायची. तमदलगे हेच नाव त्या स्टेशनवर आणि पुढारी वगैरे स्थानिक पेपरांमध्येही वाचल्याचे चांगलेच आठवते. गुगल मॅपवर मराठीत तांदळगे हे नाव वाचल्यावर त्या नावाला तमदलगे हे एडिट सुचवले होते. पण गुगल मॅपने ते मान्य केले नाही. बाकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीकाही गावांची नावे अगदीच विचित्र आहेत. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, गैबी कुडुत्री, येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, यशवंंतराव चव्हाणांचे जन्मगाव देवराष्ट्रे, विठुरायाचीवाडी, दिघंची, बेळंकी, बेळुंडगी वगैरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

रूढ नसलेली डबल बॅरल नावे ही सांगली जिल्ह्याची खासियत म्हणवी लागेल. १. येडे * २. कवठे * ३. ३२ शिराळा ४. म्हैसाळ (एम) ५. करोली (टी) ६. शिंदेवाडी (एच) ७. रामपूरवाडी (द्विरूक्ती) ८. अलकूड (एम) ९. अग्रण धुळगाव कर्नाटकी नावे : आमचे रावळगुंडवाडी, अचकनहळ्ळी

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. Sun, 02/22/2026 - 20:27
जुन्या बार्शी लाईट रूटवर बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान चिंचगाव नावाचे गाव आहे. तेथील स्टेशन हे चिंक हिल नावाने आहे. ब्रिटिश काळापासूनच तसे नाव आहे स्टेशनचे. मध्यरेल्वेच्या अखत्यारीत येते. तेथे नॅरोगेज असताना स्टीम इंजिने पाणी भरायला थांबायची. बहुधा इथे आधी आरक्षी प्रशिक्षण केम्द्र ही होते. सध्याचे माहीत नाही. चिंक हिल हे अगदी नॉर्थवेस्ट किंवा कुर्ग भागात असल्यासारखे हे नाव चक्क पंढरपूर तालुक्यात कुर्डूवाडी जंक्शनजवळ आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हो असे कुठून जाताना कुठेतरी वाचलेल्या/ऐकलेल्या नावाच्या गावाची पाटी दिसणे हा एक मस्त अनुभव असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाताना असा अनुभव अनेकदा येतो. काही काही टिपीकल कोकणी अडनावे असतात त्या लोकांचे मूळ गाव असलेली गावे दिसली की छान वाटले. पूर्वी झारापकर टेलरींग कॉलेज म्हणून एक मुंबईत होते. ते झाराप नावाचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तीच गोष्ट वायंगणकर अडनावाच्या लोकांचे मूळ गाव- वायंगणी, वालावलकरांचे वालावली, आचरेकरांचे आचरे, मुणगेकरांचे मुणगे वगैरे. ही गावे नकाशात बघितली होती त्यापैकी काही गावांच्या नावाच्या पाट्या रस्त्यावरून जाताना बघितल्यावर छान वाटले होते. तीच गोष्ट गोव्यात- मयेकरांचे मये(म), बोरकरांचे बोरी(म), पोंभुर्पेकरांचे पोंभुर्पे, लोटलीकरांचे लोटली वगैरे. दक्षिण गोव्यात कांसावलीमधून दाबोळी विमानतळावर जाताना एक डॉ.लुई प्रोतो बार्बोझा रोड दिसला होता. डॉ.लुईस प्रोतो बार्बोझा हे १९९० मध्ये काही महिने गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर त्यांचे नाव ऐकले ते थेट २०११ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा. त्यांच्या नावाचा रोड तिथे पहिल्यांदा बघितल्यावर एकदम छान फिलींग आले. कदाचित ते त्या भागातील असावे. पण दरवेळेस अशी नावे वाचून छान फिलींग येते असे नाही. गुरगावमध्ये अशीच एकदा ध्यानीमनी नसताना शहिद रूपीन कट्याल मार्ग ही पाटी बघितली आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरण आठवून विलक्षण कालवाकालव झाली. ते कंदाहार हायजॅकिंग प्रकरण, रूपीन कट्यालची गळा चिरून केलेली हत्या आणि त्याची पत्नी रचनाची त्यावेळेस काय अवस्था झाली असेल अशा काही गोष्टी निदान या जन्मात तरी विसरता येणार्‍यातील नाहीत. बहुदा रूपीन कट्यालचे घर त्या भागात कुठेतरी असावे. तसेच एकदा दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडिअम मेट्रो स्टेशनजवळ असाच शहिद अजय आहुजा मार्ग ही पाटी दिसली होती. कारगील युध्दात दुसर्‍या दिवशी आपली दोन विमाने पडली होती. त्यापैकी एका विमानाचा वैमानिक होता दिल्लीचा अजय आहुजा. बहुतेक तो दिल्लीत त्या भागात राहायला असावा.

कंजूस गुरुवार, 02/19/2026 - 11:58
माझ्याकडे रेल्वेची बरीच पुस्तके आहेत आणि त्यांत भरमसाठ माहिती आहे. माथेरान रेल्वे साठीचा खर्च आजही जीजीभॉय यांनी केला होता. नंतर ती रेल्वे सेंट्रल रेल्वेकडे देण्यात आली. पण आताचे रेल्वे मंडळ ही माहिती त्यांच्या हिल रेल्वेमध्ये देत नाही.

तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. १९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत. माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.

कंजूस Wed, 02/18/2026 - 16:09
आमचे बाबा बोलताना म्हणायचे आज 'बीबीला' जावं लागणार आहे. आपली 'जीआइपी'. तिकडे जास्ती {लोकल} गाड्या असतात. बीबी... म्हणजे Bombay, Baroda and Central India Railway (BB&CI) त्यांचे लघुरूप BB. आताची वेस्टर्न रेल्वे. जीआइपी...Great Indian Peninsula Railway. आताची सेंट्रल रेल्वे.

विजुभाऊ Wed, 02/18/2026 - 16:54
सी पी म्हणजे सेन्ट्रल प्रोव्हिन्स ( ज्याला आपण आज मध्य प्रदेश म्हणतो) आणि यु पी म्हणजे युनायटेट प्रोव्हिन्स अशी नावे होती. बेरार म्हणजे वर्‍हाड

गवि Wed, 02/18/2026 - 17:03
ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर भारतातल्या लोकांना ब्रिटनचं नागरिकत्व घेण्याचा चॉईस देणं अशक्यच होतं कारण भारतातल्या लहान राज्याइतका त्यांचा देश होता. पण गोवा हे राज्य (पोर्तुगीज काळात) आकाराने लहान होतं. ते सोडून जाताना आणि त्यानंतर पोर्तुगालने गोवा राज्यात १९६० सालापूर्वी जन्म झाल्याचा पुरावा सादर करणाऱ्या गोव्याच्या नागरिकांना पोर्तुगालचं नागरिकत्व देऊ केलं होतं. अनेकांनी शाळा सोडल्याचे दाखले सादर करून, आणि कदाचित नसलेले तयार करून देखील, ते नागरिकत्व घेतलं आणि युरोपात स्थायिक झाले. मी असे काही लोक बघितले आहेत.

In reply to by गवि

चावटमेला Wed, 02/18/2026 - 17:17
हो. ह्यांतील बरेचसे लोक hospitality धंद्यांत आहेत. लंडन मध्ये ,विशेषतः हिथ्रो विमानतळाजवळील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मधे बव्हंशी मॅनेजर, वेटर हे गोवन पाहिले आहेत जे पोर्तुगाल चे नागरिकत्व घेवून आले आहेत. कदाचित इंग्रजी वरील प्रभुत्वामुळे त्यांना ह्या नोकर्‍या सहज मिळत असाव्यात. शिवाय ह्या धंद्यांत पंजाबी विरुद्ध गोवन लॉबीचे राजकारण जोरात चालते असे एका housemate कडून ऐकले. खेदाची बाब म्हणजे भारतात वाढून, शिकून सुद्धा ह्या लोकांना भारताबाबत काडीचेही ममत्व नाही. आम्ही भारतीय नाही तर गोवन आहोत असे अगदी ठासून सांगतात.

In reply to by गवि

खटपट्या Wed, 02/18/2026 - 21:34
१९६० च्या आधी जन्म, ही अट अजुनही आहे का? कारण माझा एक मित्र, जो १९६० च्या नंतर जन्माला आला आहे त्याने पोर्तूगाल चे नागरीकत्व घेतले आहे. त्याचा जन्म गोव्याचा.

In reply to by खटपट्या

चावटमेला Wed, 02/18/2026 - 22:07
कंपनीतील एका सहकार्‍याच्या मते जर आई-वडील किंवा आजी-आजोबा ह्यांच्यापैकी कुणीही पोर्तुगीज अमदानीतील गोव्यात जन्मले असेल तर काही कागदपत्रांची पूर्तता करून पोर्तुगीज नागरिकत्व मिळू शकते. त्याच्या बायकोला मिळाले. मी एक यूट्युब विडिओ पाहिला होता त्यानुसार दरवर्षी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यात गोव्याचा नंबर पहिला आहे, अगदी पंजाब आणि गुजरातच्याही आधी. असो, उगाच चांगला धागा भरकटू नये म्हणून आवरते घेतो.

चावटमेला Wed, 02/18/2026 - 17:07
मी शाळेत असताना २५ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश होते. पुढे उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, आणि काही वर्षांनी तेलंगाणा अशी चार राज्यांची भर पडली. अलीकडेच जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश झाले, आणि दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली चे एकत्रीकरण करून एकच केंद्रशासित प्रदेश केला.

In reply to by चावटमेला

गवि Wed, 02/18/2026 - 17:12
त्या दादरा नगर हवेलीची पण एक गंमत आहे. त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.

In reply to by गवि

त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.
हे माहित नव्हते. आताच नकाशात बघितले- मेघवाल हे त्या ठिकाणाचे नाव. विकिपीडीया म्हणत आहे की जानेवारी २०२२ मध्ये मेघवालचे दादरा-नगरहवेलीमध्ये विलीनकरण करायचा निर्णय घेतला होता पण त्याचे पुढे काही झाले नाही. पूर्वी दिव-दमण आणि दादरा-नगरहवेली हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश होते. पण या दोन त्यामानाने लहान असलेल्या प्रदेशांसाठी स्वतंत्र प्रशासन चालवायचा खर्च जास्त होता म्हणून त्या दोन्हींचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश जानेवारी २०२० मध्ये करण्यात आला. गुजरातमध्ये कागदावर दारूबंदी आहे त्यामुळे हॉटेलांमध्ये वगैरे दारू मिळत नाही. (जुगाड करून घरी दारूची व्यवस्था करता येते पण अधिकृतपणे बाहेर मिळत नाही). त्यामुळे गुजरातचे बरेच लोक या ठिकाणी दारू प्यायला म्हणून जातात :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चेतन गुरुवार, 02/19/2026 - 12:54
केरळमध्ये माहे नावाचे एक गाव आहे जे पांडिचेरीचा भाग आहे. याचे कारण हा फ्रेन्च वसाहतिचा भाग होता. तो अजुनही स्वस्त दारुसाठि तसाच ठेवला असावा.

सौंदाळा Wed, 02/18/2026 - 17:27
हे पहिल्यांदाच ऐकले रच्याकने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील महाविद्यालये पण मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत यायची वाटतं पुर्वी.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि Wed, 02/18/2026 - 17:50
कॉलेजे अजूनही मुंबई विद्यापीठाखालीच येतात. रत्नागिरीत त्यांचे उपकेंद्र पण आहे. दहावी बारावी मात्र पापुमं कोल्हापूर डिव्हिजनखाली येत असावी. पुन्हा चुभुदेघे..

In reply to by गवि

अनिकेत वैद्य Wed, 02/18/2026 - 19:48
पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या ७ जिल्ह्यातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. दहावी, बारावी साठी पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड ह्या जिल्ह्यात मुंबई विभाग आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांसाठी कोल्हापूर विभाग आहे.

अरे वा. मस्त विषय. मला इतिहासाची आवड आहे आणि निदान नकाशा उघडून बघितला नाही तर इतिहास समजणार नाही असे मला तरी वाटते त्यामुळे भूगोलातील इतर संकल्पना (भूखंडमंच/ टुंड्रा प्रदेश वगैरे अजिबात आवडत नसल्या तरी) नकाशा बघायला खूप आवडते. त्यामुळे जमेल तितकी भर टाकेन. पाँडेचेरी (आताचे पुद्दुचेरी) या केंद्रशासित प्रदेशातील पाँडेचेरी शहर चेन्नईच्या दक्षिणेला आहे. पण त्याबरोबरच त्या केंद्रशासित प्रदेशात इतर काही प्रदेश आहेत ते पाँडेचेरीला संलग्न नाहीत. ते प्रदेश आहेत- यानम (जे आंध्र प्रदेशात पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे), कराईकल (जे तामिळनाडूत पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे) आणि माहे (जे केरळमध्ये पाँडेचेरीचे इन्क्लेव्ह आहे). ही तीनही ठिकाणे लहान बंदरांची ठिकाणे आहेत. भारतात युरोपिअनांचे राज्य स्थापित झाले त्यावेळेस बंदरांवर नियंत्रण असणे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्या दृष्टीने फ्रेंचांनी ही तीन ठिकाणे ताब्यात घेतली असावीत. कलकत्त्याजवळ चंद्रनगर म्हणून एक ठिकाण आहे. ते पण फ्रेंचांच्या ताब्यात होते. १९५० मध्ये तिथे सार्वमत घेतले गेले आणि ते ठिकाण भारतात विलीन झाले. जसे पाँडेचेरीमध्ये यानम, माहे, कराईकल ही ठिकाणे लांब आहेत त्याप्रमाणेच गोव्यापासून दिव आणि दमण ही ठिकाणे पण बरीच लांब- गुजरातजवळ आहेत. पण ती ठिकाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती त्यामुळे १९६१ मध्ये गोवा मुक्ती झाली तेव्हा गोवा-दिव-दमण हा केंद्रशासित प्रदेश झाला. सीपी-बेरार म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरार. बेरार म्हणजे विदर्भाचा पश्चिम भाग. विदर्भाचा पूर्वेकडचा भाग मध्य भारत या राज्यात होता तर पश्चिमेकडचा भाग सीपी-बेरारमध्ये. १९५६ मध्ये मध्य प्रदेश राज्य स्थापन झाले तेव्हा सीपी-बेरारमधील बेरार म्हणजे पश्चिम विदर्भ आणि मध्य भारतात असलेला पूर्व विदर्भ (नागपूर वगैरे) मुंबई प्रांतात सामील केले गेले. उरलेले सीपी, मध्य भारत तसेच विंध्य भारत आणि भोपाळ ही राज्ये एकत्र करून मध्य प्रदेश हे राज्य निर्माण करण्यात आले. आता कर्नाटकात बॉम्बे कर्नाटक आणि हैद्राबाद कर्नाटक हे भाग दिसतात. ते कुठून आले? तर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली तेव्हा हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आले आणि उरलेला भाग- गुलबर्गा, रायचूर, यादगीर वगैरे कर्नाटकात (तेव्हाच्या म्हैसूर राज्यात) विलीन करण्यात आला- तो हैद्राबाद कर्नाटक. तसेच मुंबई राज्यातून उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) तसेच बेळगाव वगैरे भाग कर्नाटकात विलीन करण्यात आला- तो बॉम्बे कर्नाटक. लिहिण्यासारखे बरेच काही आहे. नंतर कधीतरी लिहेन.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गवि Wed, 02/18/2026 - 17:58
याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.

In reply to by गवि

याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.
हो डचांचे कोचीन आणि क्विलॉन (आताचे कनन्नोर) या केरळमधील भागांवर तसेच नागापट्टणम या तामिळनाडूतील बंदराच्या शहरावर नियंत्रण होते. आजही कोचीनमध्ये एक डच पॅलेस आहे. पण नंतर डचांनी भारतापेक्षा मसाल्याच्या पदार्थांसाठी अधिक प्रसिध्द अशा इंडोनेशिया आणि श्रीलंकेतील काही भागांवर लक्ष केंद्रीत केले आणि भारतात ते राहिले नाहीत. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तेव्हा महाराजांनी मागितलेली खंडणी देऊन डचांनी त्यांची सुरतमधील वखार वाचवली होती. डॅनिश लोकांचे अंदमानवर नियंत्रण होते. १८६८ मध्ये ते ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले. कौन बनेगा करोडपती मध्ये पहिला ५ कोटी मिळवलेला बिहारचा एक होता त्याला ५ कोटींसाठी अंदमान कोणाच्या ताब्यात होते हा प्रश्न होता. त्याने डॅनिश लोकांच्या हे उत्तर दिले होते. त्यानंतर आंतरजालावर शोधाशोध करून हे समजले. जर पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई बेट हुंड्यात भेट म्हणून दिले नसते तर कदाचित मुंबई पण पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले असते. इतिहासात जर-तरला काहीही अर्थ नसतो पण त्या एका निर्णयामुळे सगळे काही किती बदलले. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यामुळे शहरात व्यापार-शिक्षण यांचा बराच विकास झाला. नाहीतर पोर्तुगीजांच्या ताब्यात असते तर गोव्याप्रमाणे स्वस्त दारू मिळणारे ठिकाण हीच मुंबईची ओळख राहिली असती का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आणि मुंबईची तुंबई झाली, मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुबईत महाराष्ट्र नाही वगैरे गोष्टींपासून आमचा बचाव झाला असता. सुबोधजी खरे साहेब सुशेगात होऊन 'चील' म्हंटले असते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे गुरुवार, 02/19/2026 - 09:47
क्विलॉन (आताचे कनन्नोर) तपशिलात त्रुटी क्विलॉन म्हणजे कोल्लम हे कोची च्या दक्षिणेस आहे तर कनन्नोर म्हणजे आताचे कण्णूर हे कोची च्या उत्तरेस आहे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अनामिक सदस्य गुरुवार, 02/19/2026 - 09:55
जर ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले नसते आणि ते डॅनिश लोकांच्या ताब्यातच राहिले असते तर आज भारताचा भाग असले असते का?

In reply to by अनामिक सदस्य

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 02/19/2026 - 12:10
झाले असते. फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली ठिकाणे नंतरच्या काळात भारतात सामील झालीच. तसेच कधीना कधी अंदमानचेही झाले असते.

स्वधर्म Wed, 02/18/2026 - 18:11
आजही भारतातील विमानांच्या बॉडीवर व्ही टी - नंबर लिहिलेला असतो. व्हीटी म्हणजे व्हिक्टोरिया टेरिटरी आहे असे समजले होते. इंग्रजांचे राज्य जाऊन किती वर्षे झाली, पण आपण आपल्या विमानांना अजून व्हीटी असे नोंदवतो हे समजायला कठीण आहे.

In reply to by स्वधर्म

गवि गुरुवार, 02/19/2026 - 09:47
VT बदलले पाहिजे हे तात्विकदृष्ट्या रास्त पण रजिस्ट्रेशन बदलणे आणि इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या विमानांचे, टप्प्याटप्प्याने, हे प्रचंड किचकट आणि खर्चिक काम आहे. त्यातही ही फक्त नंबर प्लेट किंवा शेपट्या नव्याने रंगवण्यापुरती साधी प्रक्रिया नसून असंख्य ठिकाणी त्याची तांत्रिक एन्ट्री देखील असते. त्यात विमान वाहतुकीची वेळापत्रक दृष्टीने महाप्रचंड उलथापालथ होऊ शकते. ही खूप जुन्या काळापासून जागतिक पातळीवर एस्टॅब्लिश झालेली पद्धत बदलून BH किंवा तत्सम बदल करणे वाटते तितके सोपे नाही. म्हणून ते तहकूब आहे. VT याच अक्षरांचा भारतीय इतिहासातील गौरवास्पद असा फुल फॉर्म शोधणे हा अधिक स्मार्ट उपाय ठरेल. उदा. BMC, बॉम्बे शब्द बदलला तरी बृहन्मुंबई वापरून शॉर्टफॉर्म तसाच ठेवता येतो तत्सम. किंवा VJTI सारखं. व्हिक्टोरिया ज्युबिली ऐवजी वीरमाता जिजाबाई.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारतात ब्रिटिशांच्या अंमलाखाली प्रदेश होता आणि संस्थानेही होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटिश भारताला. त्यानंतर एकेक करून संस्थाने भारतात विलीन झाली. पंजाबमधील अशा संस्थानांचे १९४८ मध्ये पेप्सू म्हणून राज्य स्थापन केले गेले होते. पेप्सू म्हणजे पतियाळा अ‍ॅन्ड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन. त्या राज्याची राजधानी पतियाळा होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग त्या पतियाळाच्या संस्थानिकांच्या कुटुंबातील. म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पेप्सू ही राज्ये होती. खालील नकाशात दिसेल की त्यावेळेस पेप्सू आणि हिमाचल प्रदेश हे एकसलग भाग नव्हते तसेच पेप्सूमध्येही पंजाबचा एक भाग 'एन्क्लेव्ह' म्हणून होता. Punjab (नकाशाचा संदर्भः विकीपीडीया) मग नंतरच्या काळात पेप्सू पंजाबमध्ये विलीन करण्यात आले आणि काही भाग हिमाचलमध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर इंदिरा गांधींनी १९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा हे राज्य वेगळे केले.

अनिकेत वैद्य Wed, 02/18/2026 - 19:44
रेल्वेचे एकुण १८ झोन आहेत. त्यान्ची नावे खालीलप्रमाणे १. मध्य रेल्वे (CR): मुंबई २. पश्चिम रेल्वे (WR): मुंबई ३. उत्तर रेल्वे (NR): दिल्ली ४. दक्षिण रेल्वे (SR): चेन्नई ५. पूर्व रेल्वे (ER): कोलकाता ६. दक्षिण पूर्व रेल्वे (SER): कोलकाता ७. उत्तर पूर्व रेल्वे (NER): गोरखपूर ८. ईशान्य सीमा रेल्वे (NFR): गुवाहाटी ९. दक्षिण मध्य रेल्वे (SCR): सिकंदराबाद १०. पूर्व मध्य रेल्वे (ECR): हाजीपूर ११. उत्तर पश्चिम रेल्वे (NWR): जयपूर १२. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR): हुबळी १३. उत्तर मध्य रेल्वे (NCR): अलाहाबाद (प्रयागराज) १४. पश्चिम मध्य रेल्वे (WCR): जबलपूर १५. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR): बिलासपूर १६. पूर्व किनारी रेल्वे (ECoR): भुवनेश्वर १७. कोलकाता मेट्रो (MR): कोलकाता १८. दक्षिण कोस्ट रेल्वे (SCoR): विशाखापट्टणम (१८ वा झोन) ह्यातील मध्य रेल्वे हा झोन पाहिला तर मुखालय मुंबई (छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) हा झोन महाराष्ट्राचा बराचसा भाग, कर्नाटकचा उत्तर पूर्व भाग आणि मध्य प्रदेशचा दक्षिण भाग व्यापतो. त्यातही चर्चगेट ते बडोदा/वडोदरा हा मार्ग पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत. मराठवाड्यातला काही भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यात. कोकण रेल्वेची हद्द सुरु होते रोहा (जिल्हा रायगड) ह्या स्थानकानंतर. ठाणे जिल्ह्यातील उत्तरकोकणाचा भाग पश्चिम रेल्वेत, मुंबई ते रोहा (पनवेल मार्गे) मध्य रेल्वेत आणि रोहा नंतर कोकण रेल्वे. कागदावरील महसुली जिल्हे, राज्ये आणि रेल्वेची हद्द ह्या एकमेकांशी सुसंगत नसणाऱ्या गोष्टी आहेत. तुघलकाबाद हे स्थान भौगोलिकदृष्ट्या दिल्लीजवळ, आजूबाजूला सगळीकडे उत्तर रेल्वेचे साम्राज्य, पण तुघलकाबाद मधील विद्युत लोको शेड हि पश्चिम मध्य रेल्वे (मुख्यालय: जबलपूर) ह्यांच्या अख्यतारीत.

In reply to by अनिकेत वैद्य

एकतर रेल्वे हे राज्य आणि केंद्र या दोन्ही सूचींत न ठेवता फक्त केंद्र सूचीत आहे त्यामुळे राज्यांना आपल्या राज्यांतर्गत रेल्वे मार्ग विकसित करता येत नाहीत. असे का मला ठाऊक नाही. एकूण भारतीय रेल्वे ही प्रचंड अकार्यक्षम, अजागळ आणि जनतेच्या प्रचंड गैरसोयीची गोष्ट आहे. ती मॉडर्नाईज करणे एवढे विलंब लावणारे प्रकरण आहे की बस्स. डेक्कन भागात रेल्वेचे जाळे अजिबात पसलेले नाही याला केवळ भूगोल कारणीभूत आहे का?

सुबोध खरे Wed, 02/18/2026 - 20:04
आमच्या लहानपणी कोकणातील जिल्हे म्हणजे मुंबई आणि ठाकुर असे होते म्हणजे ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी. १९७८ च्या आसपास रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा करायचे ठरले तेंव्हा हे कोकणचे जिल्हे "ठाकुरसि" होणार होते म्हणजे ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग . पण श्री अंतुले यांनी तेवढ्यात मखलाशी करून कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड केले त्यामुळे हे ठारारसि झाले ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि आता पालघर जिल्हा वेगळा होऊन पाठारारसि झालंय

स्वातंत्र्यानंतरचे मद्रास राज्य म्हणजे एक अजब प्रकार होता. आताच्या कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्हा (मंगलोर वगैरे), सध्याच्या केरळमधील उत्तरेकडील मलबार भाग (कासारगोड, कोझिकोडे, मल्लापुरम वगैरे), कन्याकुमारी वगळता सध्याचे पूर्ण तामिळनाडू राज्य आणि तेलंगण वगळता सध्याचा आंध्र प्रदेश एवढा मोठा भाग त्या राज्यात येत होता. सध्या केरळमध्ये असलेले मध्य भागातील कोचीन आणि दक्षिण भागातील त्रावणकोर (तिरूवनंतपुरम वगैरे) यांचे कोचीन-त्रावणकोर हे वेगळे राज्य होते. सध्या कर्नाटकात असलेले कूर्ग हे सुंदर ठिकाण वेगळे राज्य होते. तर सध्या कर्नाटकात असलेला उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) आणि बेळगाव वगैरे उत्तर पश्चिमेकडील भाग मुंबई राज्यात होते. तर कर्नाटकात उत्तर पूर्वेकडील गुलबर्गा, बीदर, रायचूर आणि बेल्लारी सुध्दा हे भाग हैद्राबाद राज्यात होते. सध्या कर्नाटकात असलेले इतर भाग त्यावेळेस म्हैसूर राज्यात होते. १२ वर्षांपूर्वी तेलंगणची स्थापना होण्यापूर्वी दक्षिण भारतात चार (आणि आता पाच) राज्ये दिसतात त्यापेक्षा पूर्ण दक्षिण भारताचा भूगोल पूर्ण वेगळा होता हे आणि मद्रास राज्य किती विलक्षण गुंतागुंतीचे होते हे पुढील नकाशावरून समजेलच. Madras पोट्टी श्रीरामूलूंचा उपोषणात मृत्यू झाल्यानंतर १९५३ मध्ये मद्रास राज्यातील तेलुगु भाषिक भाग वेगळा करून आंध्र प्रदेश हे राज्य स्थापन करण्यात आले. त्यात कोस्टल आंध्र (विजयवाडा, विशाखापट्टणम वगैरे) आणि रायलसीमा (नेल्लोर, कडप्पा, कुर्नूल वगैरे) भागांचा समावेश केला गेला. तेव्हा आंध्र प्रदेशची राजधानी होती कुर्नूल. वर म्हटल्याप्रमाणे कन्याकुमारी त्यावेळेस मद्रास राज्यात नव्हते तर ते कोचीन-त्रावणकोर या राज्यात होते. त्या राज्यात मल्याळम भाषा प्रमुख होती तर कन्याकुमारी होते तामिळ भाषिक. म्हणून कन्याकुमारीचे तामिळचे प्रभुत्व असलेल्या मद्रास राज्यात विलीनीकरण करावे म्हणून कन्याकुमारीत निदर्शने झाली. ही गोष्ट १९५५ मधील. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात लढणारे दोन प्रमुख समाजवादी पक्ष होते- जयप्रकाश नारायणांचा समाजवादी पक्ष आणि आचार्य कॄपलानींचा किसान मजदूर प्रजा पक्ष. दोन्ही पक्षांनी बर्‍यापैकी मते घेतली पण काँग्रेसविरोधी मते विभागली गेल्याने त्यांना निवडणुक जिंकणे सोडाच जागाही बर्‍याच कमी मिळाल्या. म्हणून १९५२ मध्ये निवडणुक संपल्यावर या दोन पक्षांचे विलीनीकरण झाले आणि प्रजा समाजवादी पक्ष हा पक्ष निर्माण झाला. त्यावेळेस कोचीन-त्रावणकोरचे मुख्यमंत्री होते या प्रजा समाजवादी पक्षाचे वासुदेवन नायर (बहुदा). तर कन्याकुमारीचे मद्रास राज्यात विलीनीकरण व्हावे म्हणून जी निदर्शने झाली होती त्यावर या वासुदेवन नायर यांच्या सरकारने गोळीबार केला आणि त्यात काही लोक मारले गेले. मग आपल्याच लोकांवर आपले सरकार गोळीबार कसा करू शकते या मुद्द्यावरून राम मनोहर लोहिया या प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन केला. समाजवादी परिवारात पडलेल्या शेकडो फुटींपैकी ही पहिली फूट होती. त्यानंतर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली त्यात बरेच बदल केले गेले. एक तर मद्रास राज्यातून मलबार जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तो मलबार जिल्हा तसेच कोचीन-त्रावणकोर राज्य यांचे विलीनीकरण झाले आणि नवे केरळ हे राज्य बनले. त्याचवेळेस कन्याकुमारीला मद्रास राज्यात जोडण्यात आले. तसेच मुंबई राज्यातील उत्तर कन्नड जिल्हा, बेळगाव वगैरे भाग, हैद्राबाद राज्यातील तेलंगण हा तेलुगू भाषिक भाग वगळता गुलबर्गा, रायचूर वगैरे भाग, कूर्ग यांचे म्हैसूर राज्यात विलीनीकरण करण्यात आले. आता आपण ज्याला कर्नाटक म्हणतो त्याला तेव्हा म्हैसूर राज्य म्हणायचे. कर्नाटक हे नाव १९७० च्या दशकात दिले गेले. त्याप्रमाणेच हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करून राज्याची नवी राजधानी झाली हैद्राबाद. आणि हे सगळे भाग जाऊन उरलेला भाग राहिला मद्रास राज्यात. त्या राज्याचे नाव १९७० च्या दशकात तामिळनाडू असे केले गेले.

गवि Wed, 02/18/2026 - 20:59
काही कायदे देखील पूर्ण राज्य कव्हर न करता एका विशिष्ट भागापुरते लागू होतात. बॉम्बे टेनन्सी ॲक्ट हा पूर्वी मुंबई, महाराष्ट्रातला काही भाग आणि गुजरातचा काही भाग, या एरियात लागू होता. बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणत असत, त्या भागात बहुधा. आताही तो गुजरातमध्ये वेगळ्या नावाने लागू आहे. महाराष्ट्रात या कायद्यात मुंबई आणि काही जिल्हे त्यात कव्हर होतात. पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि कोंकण. मराठवाडा आणि विदर्भाला तो लागू होत नाही. वकिलांनी खात्री करून द्यावी.

मनो Wed, 02/18/2026 - 21:21
गवि, मुळात उत्तर आणि दक्षिण असे कोकणचे दोनच भाग ब्रिटिश राज्यात होते. त्यांचा उगम त्याहूनही मागे म्हणजे इसवी १५५० सुमारास आहे. नगरच्या निजामशाहीच्या ताब्यात असणारे कोकण याला मोगल निजामशाही तळकोकण म्हणत. त्यात मुंबई, चौल, जंजिरा, अलिबाग इत्यादी सर्व भाग येई. दुसरा भाग म्हणजे आदिलशाही तळकोकण. त्यात तुम्ही म्हणता तो सर्व भाग येई, थेट गोव्याच्या पलीकडे कारवार पर्यंत. शहाजहान बादशहाने निजामशाही घेतली आणि औरंगझेबाने आदिलशाही, यात पन्नास वर्षे मध्ये गेली. हा भाग असा दोन तुकड्यात विभाजित होण्याचाही आधी आणि काही काळ नंतरही यात छोटी छोटी स्वतंत्र राज्ये होती. भौगोलिक दुर्गमतेमुळे ऐन मुसलमानी बहामनी राज्यातही ती कशीबशी टिकून राहिली. सूर्यराव सुर्वे, चंद्रराव मोरे, पालवणीचे दळवी, वेंगुर्ला आणि वाडीचे सावंत भोसले, यांची मुळे याहूनही खोलवर जातात. यांच्यावर आपली सत्ता बसवण्यासाठी बहामनी महमूद गवान इत्यादी लोकांनी कोकणात स्वाऱ्याही केल्या. विशाळगडचा दर्गा मला वाटते असल्याच एक आक्रमकाचा आहे. मुळात शिवाजी महाराजांचे आणि मोगलांचे वैर होण्याचे आद्य कारण म्हणजे निजामशाही तळकोकण, कारण यातील कल्याण, रायरी हा जुना निजामशाही तळकोकणाचा भाग निजामशाहीचे नवे मालक मोगलांना मिळायला हवा, परंतु आदिलशाही आणि मोगल यांच्या भांडणात शिवाजी महाराज हा भाग आपल्या राज्यात सामील करून बसले होते. कोकणचे भौगोलिक दुर्गमत्व आणि व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन महाराजांनी आपल्या राज्यात सामील केलेला हा पहिला प्रदेश. तुमच्या भूगोलात इतका मोठा इतिहास दडलेला आहे!

In reply to by मनो

गामा पैलवान Wed, 02/18/2026 - 23:29
मनो, भूगोलातल्या इतिहासावरनं आठवलं की शंभूपुत्र शाहूमहाराज आपलं राज्य जेफनापट्टण म्हणजे आजचा जाफना इथवर मानीत असंत. तसं असेल तर ते मोठं रोचक तथ्य ठरावं. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रचेतस

रूमशान म्हणजे रोम किंवा सिरिया असे दोन्ही प्रदेश हे होऊ शकतात. पण भारतीयांना इस्तंबूल हेच युरोपातले मोठे शहर वाटत होते का? कुणीतरी मला मागे रूमशान इस्तंबूलच असे सांगितले होते त्यामुळे माझा गोंधळ झाला. विषय होता की शिवशंभू नंतर तेव्हड्या प्रचंड महत्त्वाकांक्षेचे त्या घरात कुणी जन्मले नाही असा. तेव्हा शाहू महाराजांना इस्तंबूल देखील जिंकून घ्यायचे होते असे कुणीतरी मला सांगितले. रेडिट वर की कोरा वर ते आठवत नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 12:29
इस्तंबूलला कुंस्तुंतुनिया (बायझन्टाईन साम्राज्यातले कॉस्न्टेन्टिनोपल) असेही इकडे म्हटले जात असे. मराठेशाही किंबहुना मुघलकाळात देखील तुर्कीचे ऑटोमन साम्राज्य बलाढ्य होते. इतके की मुघल बादशहांना सुद्धा आपल्या बादशहापदासाठी तुर्की खलिफाची मान्यता असणे भाग्याचे आणि जरुरीचे वाटत असे.

In reply to by प्रचेतस

अजून एक विषय मला तुम्हाला विचारायचा आहे की जुन्या भारतीयांची भौगोलिक समज काय होती उर्वरीत जगाबद्दल? म्हणजे त्यांना मंगोलिया चीन बद्दल माहीत होते का? मराठे मादागास्कर वगैरे पर्यंत गेले होते असे अलीकडे समोर येत आहे. मात्र तेव्हा भारतीयांची युरोपबद्दल काय समज होती. सिकंदर तर खूपच पूर्वी येऊन गेला त्यामुळे भारतीयांना ग्रीस वगैरे प्रदेश ऐकून तरी ठाऊक असणार आहेत. पण त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलेच असेल ना. अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत! https://www.davidrumsey.com/ १५५४ च्या आसपासचा Pirî Reis याचा एक अटलास माझा absolute favorite आहे! त्या वेळेस या माणसाचे एकुण भौगोलिक ज्ञान पाहून मी चाटच पडलो होतो त्याने एवढा प्रचंड अ‍ॅक्युरेट नकाशा बनवला होता तेही अनेक नकाशांचे आणि लोकांचे ज्ञान गोळा करून.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 12:47
अगदी मौर्यकाळापासून ग्रीकांशी व्यापार होत असे. अलेक्झांडरमुळे इंडो बॅक्ट्रियन राज्ये इकडे होतीच. सेल्युकस निकेटरची मुलगी चंद्रगुप्ताला पत्नी म्हणून दिलेली होती. मात्र प्रवासी भारतीयांना लिहिण्याची सवय नसल्यामुळे त्यांचे वृत्तांत फारसे उपलब्ध नाहीत. मात्र पेरीप्लस ऑफ एरिथ्रियन सी मध्ये त्याबद्द्ल विपुल प्रमाणात आलेले आहे. रोमन इतिहासकार प्लिनीने तर भारतीय आयातीच्या बदल्यात रोमनांच्या सुवर्णनाण्यांचा ओघ भारतात वाहात असल्याबद्द्ल चिंता व्यक्त केली होती. बाकी मंगोलिया, चीन्बद्द्ल तर पूर्वीपासून माहिती होतेच. चीनशी बराच व्यापार होता. मंगोल टोळीवाल्यांनी तर जवळपास १/४ भूभागावर राज्य केले. चोळांनी इंडोनेशिया, मलेशिया इत्यादींशी आपल्या सीमा भिडवल्या होत्या. तर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आरमाराची दहशत खुद्द मस्कतच्या अरबांनी घेतली होती (यावर आजच मिपाकर बॅटमॅनने एक लेख लिहिला आहे) मात्र आपल्या प्रवाश्यांनी केलेली परदेशातील प्रवासांची वर्णने फारशी नाहीत.
अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत!
याबद्द्ल धन्यवाद. सवडीने बघावे अशीच साईट आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

दोहो बाजुन व्यापार चालू असल्याने आपल्याला आणी युरोपियनांना एकमेकांविषयी भरपुर माहीती होती. भृगकच्छ, शुर्पारक, कलीयान, माहीम, चेउल (सेमुल्ला) ही प्रमुख बंदरे. यातून सर्वदुर व्यापारी संपर्क असल्याने भौगोलीक माहीतिचीही देवाण घेवाण होत असणारच... (रॉटरडॅम इथल्या नावीक संग्रहात एका कार्टोग्राफरने १६१९ मधे काढलेला कोकणचा नकाशा ठेवलाय तिथे ही बंदरे स्पष्ट दाखवली माझ्याकडे त्याचा फोटो आहे पण मोबाईल मधे आहे. इथे कसा द्यायचा माहीत नाही)

१. पश्चिम महाराष्ट्र पश्चिमेला नाही. २. मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा की नगर? ३. खानदेश नेमका कुठे आहे? आणि नाशिक पश्चिम महाराष्ट्रात घ्यावे का? ४. माणदेश आणि पश्चिम वेगळा करायचा का? ५. मावळ नेमका भाग कुठला? ६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो? ७. कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे. ८. कोल्हापूर, सांगली यांना दक्षिण महाराष्ट्र का म्हणत नाहीत? की बेळगाव आणि त्या भागाला म्हणायचे? ९. कारवार बिदर वगैरे हे अलभ्य मराठी प्रदेश यांना काय म्हणावं?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

म्हणजे नेमके काय? माझ्या मते, घाट उतरल्यावर जो तुलनेने समतल प्रदेश लागतो त्याला तळकोकण म्हणतात. का दक्षिण कोकणाला तळकोकण म्हणतात?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि Wed, 02/18/2026 - 23:49
मला वाटते कोंकणातील कोअर भाग. म्हणजे रायगडच्या दक्षिणेचा, याला म्हणत असावेत. किंवा ते कोंकण जे घाटांच्या उताराच्याही खाली समुद्रसपाटीवर प्रॉपर वसलेलं आहे, ते.. असाही अर्थ असू शकेल. उदा. आंबाघाट येथील गावे, साखरपा येईपर्यंत तळकोकणात मोजत नसतील पण रत्नागिरी, दापोली, गुहागर, देवगड, कुणकेश्वर हे त्यात येत असेल. नेमके माहीत नाही तिकडे लहानपण गेले असले तरी. मी त्याचा अर्थ कुडाळ देवगड सावंतवाडी असा घेत आलोय.

In reply to by गवि

इथे डोंगर आणि टेकड्या संपून बर्‍यापैकी समुद्रसपाटीचा किंवा थोडा उंच पठारी प्रदेश सुरु होतो म्हणून याला तळकोकण म्हणत असावेत कारण घाट उतरल्यावर आपण तळावरच जाणार.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

खटपट्या गुरुवार, 02/19/2026 - 01:30
पालघर पासुन गोव्याच्या सिमेपर्यंत कोकण आहे, तळकोकण म्हणजे दक्षिणेकडचे कोकण - चिपळूण पासून खाली तळकोकण म्हणण्यास हरकत नाही, पण तळकोकणाची काही सिमा नाही. जसे साउथ मुंबई. पश्चिम महाराष्ट्राबाबत नेहमीच गोंधळ आहे. कारण खरे तर महाराष्ट्राच्या पष्चिमेला कोकण येतो पण त्यास पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाहीत. असो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विजुभाऊ गुरुवार, 02/19/2026 - 10:40
जावळीत जावळी नावाचे गावच नाहिय्ये, दुसरे म्हणजे पुणे शहर हे हवेली तालुक्यात येते. डेक्कन मात्र भांबुर्डेमधे यते

In reply to by विजुभाऊ

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 11:34
जावळी हे नाव गावावरुन नव्हे तर तेथील घनदाट जंगलावरुन आले आहे. झाडांची इतकी दाटी जशी झाडांची जाळीच जणू ते जावळी.

In reply to by विजुभाऊ

आहे. महाबळेश्वर पायथ्याच्या दरे खोर्‍यात जावळी गाव आहे. कुंभरोशी वरुन दरे कडे जाताना रस्त्यावर हे गाव आहे. पुर्वी एक असेल पण सध्या दोन वाड्या आहेत. थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.
मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत का? हे विचारायचे कारण म्हणजे एक गोष्ट आठवली. शाळेत असताना आमची सहल प्रतापगड आणि शिवथरघळ येथे गेली होती. तेव्हा शिवथरघळीहून एक दिवस सकाळी 'आपल्याला चंद्रराव मोर्‍यांचा वाडा बघायला जायचे आहे' म्हणून आम्हाला नेले. डोंगरावरून बराच वेळ चालत गेल्यावरही वाड्याचा पत्ता नव्हता. शेवटी एके ठिकाणी गेल्यावर- इथे चंद्रराव मोर्‍यांचा वाडा होता अशी आमची बोळवण केली गेली. प्रत्यक्षात तिथे काहीही नव्हते- नुसते गवत होते. एक दगडही नव्हता. बहुदा आमच्या बरोबर आलेल्या शिक्षकांनाही तो वाडा नक्की कुठे होता हे माहिती नसावे त्यामुळे आम्हाला नुसतेच चालत नेले आणि आपण रस्ता चुकलो किंवा आपल्याला माहित नाही हे मान्य करायचे नसेल म्हणून कदाचित 'इथे वाडा होता' असे काहीतरी सांगून आम्हाला पिटाळून लावले असावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवथर इथुन थोडे वरच्या बाजुला सह्याद्रीच्या अगदी पायथ्याला चेरावडी म्हणून गाव आहे (१.५ किमी). त्या गावाच्या पुढे अगदी डोंगर तळात मोर्‍यांचा वाडा आहे... अगदी आत जंगलात असल्याने चटकन सापडत नाही आणी आता फक्त काहीच अवशेष उरलेत. सह्यमाथ्यावरच्या कुंड गावातून खाली खुटे नावाची घाटवाट उतरते तेव्हा ह्या वाड्यावरुन वाट जाते. अम्ही खुटे घाट वाट ट्रेक केलेला तेव्हा हा वाडा बघीतलेला.. तसा अजुन एक मोर्‍यांचा वाडा आहे.. कोयना धरण क्षेत्रात उचाट नावाचे एक गाव आहे त्या गावाच्या पुढे निरपजी म्हणून मोर्‍यांचे कुलदैवत आणी देवराई आहे, तिथेही मोर्‍यांचा वाड्याचे अवशेष आहेत...

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 11:30
५. मावळ नेमका भाग कुठला?
मावळाचा प्राचीन उल्लेख कार्ले येथील शिलालेखात मामाड असा आलाय. तर ह्या प्रदेशाला त्याकाळात 'मामलाहार' म्हणत. मावळ म्हणजे रूढार्थाने मावळतीकडचा म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश. इकडील नद्यांच्या खोर्‍यांवरुन त्या त्या मावळाला विशिष्ट नावे पडली. पवनेच्या खोर्‍यातील पवन मावळ, आंद्रेच्या खोर्‍यातील आंदर मावळ तर कसबे नाणे गावाभोवतालचे नाणेमावळ.
६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो?
बेरार म्हणजे सर्वसाधारणपणे अमरावती, वर्धा, नागपूर. बहमनी साम्राज्याची पाच छकले होऊन अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळाकोंड्याची कुत्बशाही आणि बेरारची इमादशाही अशा पाच सल्तनती स्थापन झाल्या. इमादशाहाची राजधानी एलिचपूर (आजचे अचलपूर). विस्ताराने जरी मोठं असलं तरी ह्यांचे सैनिकी सामर्थ्य तुलनेने कमी होते पण नरनाळा, गाविलगड असे बलाढ्य किल्ले त्यांच्या आधिपत्याखाली होते.
कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे.
कोंकणाचे पूर्वीचे नाव म्हणजे अपरान्त. पहिल्या शतकातला परकीय प्रवासी स्ट्राबो कोंकणाचा उल्लेख 'कोनियकोई' असा करतो. कोंकणाची व्युत्त्पत्ती तशी नीट लागत नाही मात्र कोण म्हणे डोंगरमाथा व रेणुकादेवीचे इकडील नाव कुंकुणा अशा नावावरुन कोंकण नाव आले असे मानले जाते. मध्ययुगात लाट (दक्षिण गुजरात), शूर्पारक (आजचे नालासोपारा), अष्टागर (अक्षी, नागाव, किहिम वगैरे प्रदेश) आणि त्या खालचे कोंकण व तदनंतर गोमंतक असे मानले जात असे. तळकोकण मात्र चिपळूणपासून पुढे हे सहज मानता यावे.

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे गुरुवार, 02/19/2026 - 12:06
तळकोकण म्हणजे सध्याचा सिंधुदुर्ग जिल्हा. येथे मालवणी भाषा हि जास्त बोलली जाते. रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण डोंगराळ आहे . पोलादपूर सोडल्यावर कशेडी घाट चालू होतो तेथे रत्नागिरी जिल्हा चालू होतो तेथपासून हा जिल्हा बराचसा डोंगर आणि माथ्यावरील सडा असाच दिसतो ते खारे पाटण पर्यंत . तेथून सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो त्यातील बराचसा भाग हा सपाटीचा आहे. हा महाराष्ट्रात कोकणच्या नकाशात दक्षिणेकडचा तळाकडचा भाग म्हणून याला तळकोकण म्हणतात. रत्नागिरी लांजा राजापूर हा भाग सहसा तळकोकणात धरला जात नाही. येथे संगमेश्वरी बोली ( मराठीची एक बोली) बोलली जाते.

In reply to by प्रचेतस

ज्ञानसमृद्ध प्रतिसाद. धन्यवाद. याविषयी खरेतर स्वतंत्र लिहायला हवे की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची भागोलिक समज. आजकाल ऐतिहासिक चित्रपट दाखवतात तेव्हा शिवराय किंवा एखादा खान खलबते करत असताना टेबलवर चक्क त्यांच्यापुढे नकाशा वगैरे मांडलेला असतो आणि ते त्यात लाकडाचे घोडे वगैरे सरकवून स्ट्रॅटेजी हाकतात. तेव्हा मला प्रश्न पडायचा की यांना समुद्र कुठून कुठे आहे हे तरी कसे कळायचे. कारण कार्टोग्राफर ही एक अतिशय महत्त्वची गोष्ट असणार तेव्हा शिवरायांनी तशा माणसाला अतिशय उच्च पद दिले असेल इंदलकर सारखे.

याबरोबरच लहानपणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाकेंद्र ओरोस बुद्रुक आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाकेंद्र मालवण का नाही? ओरोस का निवडले? जिल्ह्यांना राजधान्या नसतात म्हणून आपल्या पंप्रंची चेष्टा झाली होती तेव्हा जाणवले आपल्या कडे सुद्धा जिल्ह्याच्या केंद्रांना शब्दच नाही आहे. राजधानी म्हणायला काही हरकत नाही. तरीही ओरोस कडे कुणाचे विषेश लक्ष जात नाही. आता तर तिथे मोठे सरकारी मेडिकल कॉलेज देखील आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नावाच्या गावात कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा रुग्णालय सोडून काहीही नाही. हे गाव अजिबात वाढले नाही. कुडाळ बरेच मोठे झाले आहे असे दिसते. मालवण देखील बरेच मोठे आहे. मग या ओरोस मधे जाते तरी कोण? त्या जिल्हा रुग्णालयाचा काही उपयोग आहे का? कुणाच्या डोक्यात आले होते हे ओरोस चे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ओरोसजवळून आता हातखंबा गोवा महामार्ग गेला आहे. याच गावाला स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे. पश्चिमेला रेल्वे स्टेशन आणि पूर्वेला हायवे. त्यांच्या मधे एक गाव. या गावात जिल्हापरिषदेपासून सगळी जिल्ह्याची मुख्य ठिकाणे आहेत. या गावात 2021 ला सरकारी मेडिकल कॉलेज झाले आहे. याच गावाजवळ अजून एक मेडिकल कॉलेज आहे. या गावात एक मोठे तळे असून गावाला पाणी पुरवठा भरपूर आहे. या गावात एक इंजिनियरिंग कॉलेज आहे. हे गाव भविष्यात चांगले वाढू शकते त्यामुळे ओरोस या ठिकाणी गुंतवणूक करण्यास चांगला वाव आहे. इथे गुंठामंत्री होणे सध्या शक्य वाटते.

In reply to by गवि

ओरोस अगदी सेंटरला आहे. आधी वळणे वळणे म्हणून अंतर जास्त त्यात एका टोकाला केंद्र नको म्हणून निवडलेले दिसते. शिवाय लँड घेणे हा प्रोब्लेम इतर शहरात येतोय असे दिसतेय.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सुबोध खरे Fri, 02/20/2026 - 12:04
माझ्या माहितीप्रमाणे ओरोस बुद्रुक या गावाला राजधानी बनवण्याचे कारण राजधानी बनवण्यावर असलेले वाद. यात कणकवली, मालवण कुडाळ आणि सावंतवाडी अशा चारही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना आपल्याच शहरात राजधानी हवी होती. यावर तोडगा म्हणून चारही ठिकाणच्या मध्यभागी असलेले आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मुंबईत गोवा रेल्वे मार्गावर असलेले ओरोस बुद्रुक हे गाव निवडण्यात आले. मालवण आणि सावंतवाडी पासून दोन्ही (रस्ता आणि रेल्वे मार्ग) तसे लांबच होते शिवाय सरकारी कार्यालयांसाठी भरपूर जमीन हवी होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. यामुळे ओरोस बुद्रुक हे गाव निवडले आणि मालवण जवळ असलेला समुद्रातील किल्ला सिंधुदुर्ग यावरुन गावाचे नाव सिंधुदुर्ग नगरी आणि जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. एकदा सरकारी कार्यालये आली कि शहर वसतेच. कारण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस मुख्यालय, आर टी ओ, जिल्हा रुग्णालय, जिल्हा आणि सत्र न्यायालय अशी कार्यालये आली आणि त्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या कि वस्ती होतेच

भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर बिहार आणि बंगाल यांना उत्तर भारतात का धरतात आणि मेघालय वगैरे यांना पूर्वेकडेची राज्ये न म्हणता इशान्येकडेची का म्हणतात हा गोंधळ मला नेहमी होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि गुरुवार, 02/19/2026 - 00:04
यासदृश एक आणखी निरीक्षण माझंही आहे. अंदमान निकोबार बेटे ही सांस्कृतिक दृष्ट्या काही प्रमाणात ओरिजनल असली (उदा. आदिवासी) आणि तिथली आधुनिक संस्कृती ही भारतातल्या अनेक भागातल्या लोकांची संस्कृती- सरमिसळ असली, तरी अनेकदा व्यवहारात, नियोजनात, कंपन्या किंवा संस्थांच्या विभागीय वाटणीत, शाखांचे मुख्य ऑफिस कुठे, या दृष्टीने अंदमान हे चेन्नईपेक्षा कोलकत्याशी जास्त जोडलेलं दिसतं. अंदमानातून बाहेर पडलेले लोक कोलकात्यात चेन्नईपेक्षा जास्त दिसतात आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील पश्चिम बंगालशी अधिक जवळचे असतात. इतर कोणाचं निरीक्षण अगदी विरुद्ध देखील असू शकतं. माझ्याकडे मोठा विदा नाही.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 02/19/2026 - 00:09
स्पेनचे एक शहर आफ्रिका खंडात आहे- त्या शहराचे नाव आहे सेयुटा. सौदी अरेबियामध्ये इस्लामचा उदय झाल्यानंतर अरबांनी हल्ले सुरू केले. जॉर्डन-पॅलेस्टाईन ओलांडून ते आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात घुसले. त्यातून ते आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला असलेल्या मोरोक्कोपर्यंत पोचले. तिथून जिब्राल्टरचा समुद्र ओलांडला की स्पेन येते. ते स्पेनमध्येही घुसले. त्यांना स्पॅनिश लोक मूर म्हणायचे. त्या मुस्लिम आक्रमणाविरोधात स्पेनचे लोक जवळपास ५०० वर्षे लढत होते आणि त्यांनी १४९२ मध्ये मूरांना हाकलून दिले. १४१० मध्ये स्पेनमधील एका राजपुत्राने सध्या पोर्तुगाल आहे तो प्रदेश मुक्त केला आणि तिथे पोर्तुगाल या नव्या राज्याची स्थापना केली. त्यापूर्वी पोर्तुगाल असा वेगळा देश नव्हता. तिथे हेनरी म्हणून राजा होता. युरोपातून भारत आणि दक्षिणपूर्व आशियाबरोबर व्यापार चालायचा त्या व्यापार मार्गावर मुस्लिमांचे वर्चस्व होते तसेच कॉन्स्टॅन्टीनोपल (आताचे इस्तंबूल) मार्गे आलेला माल इटलीतील व्हेनिस आणि जिनोआमार्गे युरोपात जायचा तेव्हा त्या व्यापारावर इटालीयनांचेही वर्चस्व होते या गोष्टी स्पॅनिश आणि पोर्तुगीज ख्रिश्चनांना डाचत होत्या. त्यामुळे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधून काढायचे प्रयत्न त्या हेनरी राजाने सुरू केले. त्यामुळे त्याला हेनरी द नेव्हिगेटर असेही म्हणतात. त्यात धार्मिक अँगल पण होतात- मुस्लिमांचे वर्चस्व खिश्चनांना डाचत होते. त्यामुळे हेनरी द नेव्हिगेटरने युरोपिअन देशांनी केलेली पहिली समुद्र मोहिम काढली आणि सेयुटा या मोरोक्कोतील शहरावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट १४१५ ची. त्यानंतर १४८० मध्ये पोर्तुगाल आणि स्पेनचे एकीकरण झाले आणि सेयुटावर स्पॅनिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. १५४० मध्ये परत पोर्तुगाल वेगळा झाला तरीही सेयुटावर स्पेनचे नियंत्रण कायम राहिले- आजही आहे. खालील नकाशात सेयुटा स्पेनच्या जवळ आहे हे दिसेल. Ceuta या नकाशावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधायच्या उद्योगात पोर्तुगीज लोक पुढे का होते. त्याचे कारण पश्चिमेकडे अटलांटिकचा अ‍ॅक्सेस त्यांना जवळ होता आणि आफ्रिका खंडही जवळ होता. तीच गोष्ट स्पॅनिश लोकांची. त्यामानाने इंग्लंड बरेच लांब आहे. त्यामुळे भारतात युरोपिअनांनी हातपाय पसरायला सुरवात केली त्या काळात पोर्तुगीज दिसतील- मग फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश. त्याचे कारण या भूगोलात दडले आहे. त्यात इटालियन, ग्रीक आणि जर्मनांचे नावही दिसणार नाही. त्याचे कारणही हा नकाशा बघून समजेल. इटली आणि ग्रीसला अटलांटिकचा डायरेक्ट अ‍ॅक्सेसच नाही कारण भूमध्य समुद्र आणि आजूबाजूचे जमिन यातून जहाजे जाणार कुठून? जर्मनीला थोडासाच अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे पण त्या भागात कदाचित चांगले बंदर असायला परिस्थिती अनुकूल नसावी. त्या तुलनेत डच लोक भारतात पोचले आणि इंडोनेशियातही पोचले. कारण नॉर्थ सी मधून त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे. तीच गोष्ट डेन्मार्कची. ते मर्यादित प्रमाणात का होईना भारतात पोचले. कारण त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस होता. इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास अशा बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टिनटिन गुरुवार, 02/19/2026 - 11:58
ह्या वरून आठवले , अब्दालीसारखा नदीचा उतार शोधत आमचा एक मित्र खडवलीच्या काळू नदीत घसरून पडला होता

खटपट्या गुरुवार, 02/19/2026 - 01:33
ब्रिटीशांच्या काळातील मुंबै प्रोविन्स शोधत असताना तो फार मोठा होता असे ऐकले. नुकतेच कुठे तरी वाचले की ब्रिटीश मुंबई प्रोव्हिन्स हे ओमान पर्यन्त होते.

In reply to by खटपट्या

अनिकेत वैद्य गुरुवार, 02/19/2026 - 11:53
नौदल पश्चिम विभाग (मुख्यालय :मुंबई) ह्यांच्या अखत्यातातील भागात अजूनही बहुदा एकच पोलीस स्टेशन आहे. नौदलातील नागरी तक्रारांसाठी/गुन्ह्यांसाठी येथे गुन्हा नोंदवला जातो. त्याची हद्द गुजरात खंबात पासून अगदी केरळ, कन्याकुमारीपर्यंत आहे. नक्की नाव आणि संदर्भ आठवत नाहीये. मिळाले कि बाकी पोस्ट करतो.

गणेशा गुरुवार, 02/19/2026 - 08:53
छान चर्चा.. भूगोल - इतिहास शाळेत असताना खुप आवडायचा, वाचतो आहे..

कांदा लिंबू गुरुवार, 02/19/2026 - 11:45
जिल्हाकेंद्र - जिल्हाकेंद्र / जिल्ह्याचे मुख्यालय / डिस्ट्रिक हेड क्वार्टर याला राजधानी हा शब्द सध्या अनपेक्षित वाटत असला तरी रुळल्यावर तो योग्य वाटेल असे वाटते. सामान्यतः जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव हे एकाच असते. उदाहरण नांदेड या जिल्ह्याची राजधानी नांदेड या नावाच्या गावी (किंवा शहरात) आहे. तथापि, काही ठिकाणी जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव ही दोन्ही वेगवेगळी असलेली दिसतात. महाराष्ट्रात रायगड हा बहुधा असा एकाच जिल्हा असावा ज्या जिल्ह्याच्या राजधानीचे नाव वेगळे, अलिबाग हे आहे. आंध्र प्रदेशात (सध्याचा तेलंगणा धरून) मात्र असे अनेक जिल्हे पूर्वी होते. मागच्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्यांची विभाजने झाली व हा भूगोल काहीसा बदलला. २०१४ पूर्वीची स्थिती - जिल्हा -- राजधानी पूर्व गोदावरी -- काकिनाडा पश्चिम गोदावरी -- एलुरु कृष्णा -- मछलीपट्टणम मेदक -- संगारेड्डी प्रकाशम -- ओंगोल

In reply to by कांदा लिंबू

प्रकाशम -- ओंगोल
या प्रकाशम जिल्ह्याची नेहमी गंमत वाटते. प्रकाशम नावाचे कोणतेही गाव आहे असे वाटत नाही कारण त्या जिल्ह्याचे नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी.पी.प्रकाशम यांच्या नावावरून दिले आहे. मुख्यमंत्र्याच्या नावावरून जिल्हा हा जरा गंमतीचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात चव्हाण, पवार, नाईक किंवा फडणवीस नावाचा जिल्हा असेल तर कसे वाटेल? तसेच तिकडे केले आहे. उत्तर प्रदेशात मायावतींनी जिल्ह्यांचे नामकरण करून मूर्खपणाची परिसीमा गाठली होती. अमेठी जिल्ह्याचे नामकरण केले छत्रपती शाहूजी महाराज नगर. शाहू महाराजांच्या कामाविषयी आदर असला तरी शतकानुशतके असलेले एखाद्या ठिकाणाचे अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर करायचे? शाहू महाराजांचा कधी अमेठीशी संपर्क आला असेल असे वाटत नाही. मग अचानक अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर हे नाव देणे तसे विचित्रच वाटते. तीच गोष्ट अमरोहाची. अमरोहा जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर असे केले. मग यथावकाश ज्योतिबा फुले नगरचे लोकांनी जेपी नगर केले. अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर ही नावे बदलली पण समजा अशी नावे बदलली नसती तर जेपी नगर म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या नावाने नाव दिले आहे असे कोणाला वाटले असते. असे ऐकले आहे की कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी विद्यापीठ असे सुटसुटीत नाव ठेवावे असा आग्रह धरला होता. त्याचे कारण वडोदर्‍याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे एम.एस.युनिव्हर्सिटी झाले तसे कोल्हापूरमधील विद्यापीठाचे सी.एस.एम युनिव्हर्सिटी व्हायला नको- जसे युपीत जेपी नगर झाले. जिल्ह्याविषयी आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे सांगली जिल्ह्याची. सांगली जिल्ह्याचे मुख्यालय अर्थातच सांगली शहर आहे. पण सांगली जिल्ह्यात सांगली हा तालुकाच नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सांगली शहर येते मिरज तालुक्यात. असेही फार कुठे बघायला मिळत नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे महानगर असले तरी ते हातकणंगले तालुक्यात येते. काही गावांचे नशीब फळफळते तसे आहे. इस्लामपूर आताचे ईश्वरपूर आणि वाळवा तालुका, खानापूर तालुका पण विटा मुख्य शहर असे अनेक. लहानपणी काका लोकांना मुली पाहायला जेव्हा सगळी फॅमिली जात असे तेव्हा पहिल्यांदा भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेली गावे पाहता येत. वेगळेच फीलिंग असायचे. मी खूप हट्ट करून नवनीतचा अटलास विकत घेतला होता. तासनतास नकाशे पाहत घालवणे आणि ती गावे कशी असतील यांचे इमॅजिनेशन करणे खूप उत्तम टाइमपास. पहिल्यांदा कोल्हापूर पहिले तेव्हा तर भंजाळूनच गेलो होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. Sun, 02/22/2026 - 16:19
अजून एक गम्मत म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणी सांगली जिल्हा ह्यांच्या सीमारेषेवर रेल्वे लाईनजवळ निमशिरगाव आणि तांदळगे हि दोन गावे आहेत. त्या छोट्याश्या स्टेशनला दोन्ही गावाची नावे आहेत पण निमशिरगाव चे इंग्लिश बरोबर आहे तांदळगे चे स्पेलिंगनुसार तमदलगे असे केलेले आहे आणि स्टेशनबोर्डवर तसेच देवनागरीत लिहिलेले आहे. कॉलेजला दररोज मिरज-कोल्हापूर-मिरज ट्रेनने प्रवास करताना ते तमदलगे असे कसे नांव म्हणून मजा वाटायची. m

In reply to by अभ्या..

गवि Sun, 02/22/2026 - 17:50
ऑ??? मी तर खरोखरच तमदलगे असंच आजतागायत समजत होतो. - (शिवाजी विद्यापिठाचा जुना विद्यार्थी) गवि ता.क. गूगल सर्च केली असता विकिपीडिया पानावर, लोकसत्ता आणि अन्य अनेक वृत्तपत्रांत तमदलगे असंच दिसतं आहे. आणि तांदळगे असं शोधू गेलं तर एकही निकाल आला नाही. म्हणजे मूळ नाव सर्वत्रच चुकीचं पसरलं असावं. तमदलगे हे नाव बसेसवर बघितल्याचं आठवतं आहे सांगली कोल्हापूरमध्ये असताना तीस वर्षांपूर्वी.

In reply to by गवि

अभ्या.. Sun, 02/22/2026 - 17:59
Locality Name : Tamdalage ( तांदलगे ) Taluka Name : Shirol District : Kolhapur State : Maharashtra Region : Desh or Paschim Maharashtra Division : Pune Language : Marathi and Kannada Current Time 05:55 PM Date: Sunday , Feb 22,2026 (IST) Time zone: IST (UTC+5:30) Elevation / Altitude: 550 meters. Above Seal level Telephone Code / Std Code: 02322 . मी खूप जणाना तांदळगे असेच म्हणताना ऐकलेले आहे.

In reply to by गवि

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे. गोव्यात निदान कुंकळे माजोर्डे किंवा तशी नावे स्थानिकांच्या बोलण्यात तरी असतात मात्र बहुतेक बाहेरचे लेम करतात असे काहीसे कोल्हापुरात होईल असे वाटले नव्हते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे.
मी पण. माझी पहिली अस्थायी नोकरी कोल्हापुरात होती- २००२ मध्ये. तेव्हा विश्रामबागहून सकाळी सव्वाआठच्या सुमारास येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजरने दररोज कोल्हापूरला जायचो. तेव्हा जयसिंगपूर आणि हातकणंगले या दोन स्टेशनच्या मध्ये निमशिरगाव-तमदलगे हे स्टेशन होते. ते एक बिना प्लॅटफॉर्मचे स्टेशन होते. नुसत्या दोन पाट्या त्यावेळेस त्या स्टेशनला होत्या. पहिली पाटी म्हणजे स्टेशन सुरू झाले आणि दुसरी पाटी म्हणजे स्टेशन संपले :) त्या स्टेशनवर ती पॅसेंजर थांबायची. तमदलगे हेच नाव त्या स्टेशनवर आणि पुढारी वगैरे स्थानिक पेपरांमध्येही वाचल्याचे चांगलेच आठवते. गुगल मॅपवर मराठीत तांदळगे हे नाव वाचल्यावर त्या नावाला तमदलगे हे एडिट सुचवले होते. पण गुगल मॅपने ते मान्य केले नाही. बाकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीकाही गावांची नावे अगदीच विचित्र आहेत. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, गैबी कुडुत्री, येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, यशवंंतराव चव्हाणांचे जन्मगाव देवराष्ट्रे, विठुरायाचीवाडी, दिघंची, बेळंकी, बेळुंडगी वगैरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

रूढ नसलेली डबल बॅरल नावे ही सांगली जिल्ह्याची खासियत म्हणवी लागेल. १. येडे * २. कवठे * ३. ३२ शिराळा ४. म्हैसाळ (एम) ५. करोली (टी) ६. शिंदेवाडी (एच) ७. रामपूरवाडी (द्विरूक्ती) ८. अलकूड (एम) ९. अग्रण धुळगाव कर्नाटकी नावे : आमचे रावळगुंडवाडी, अचकनहळ्ळी

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. Sun, 02/22/2026 - 20:27
जुन्या बार्शी लाईट रूटवर बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान चिंचगाव नावाचे गाव आहे. तेथील स्टेशन हे चिंक हिल नावाने आहे. ब्रिटिश काळापासूनच तसे नाव आहे स्टेशनचे. मध्यरेल्वेच्या अखत्यारीत येते. तेथे नॅरोगेज असताना स्टीम इंजिने पाणी भरायला थांबायची. बहुधा इथे आधी आरक्षी प्रशिक्षण केम्द्र ही होते. सध्याचे माहीत नाही. चिंक हिल हे अगदी नॉर्थवेस्ट किंवा कुर्ग भागात असल्यासारखे हे नाव चक्क पंढरपूर तालुक्यात कुर्डूवाडी जंक्शनजवळ आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हो असे कुठून जाताना कुठेतरी वाचलेल्या/ऐकलेल्या नावाच्या गावाची पाटी दिसणे हा एक मस्त अनुभव असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाताना असा अनुभव अनेकदा येतो. काही काही टिपीकल कोकणी अडनावे असतात त्या लोकांचे मूळ गाव असलेली गावे दिसली की छान वाटले. पूर्वी झारापकर टेलरींग कॉलेज म्हणून एक मुंबईत होते. ते झाराप नावाचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तीच गोष्ट वायंगणकर अडनावाच्या लोकांचे मूळ गाव- वायंगणी, वालावलकरांचे वालावली, आचरेकरांचे आचरे, मुणगेकरांचे मुणगे वगैरे. ही गावे नकाशात बघितली होती त्यापैकी काही गावांच्या नावाच्या पाट्या रस्त्यावरून जाताना बघितल्यावर छान वाटले होते. तीच गोष्ट गोव्यात- मयेकरांचे मये(म), बोरकरांचे बोरी(म), पोंभुर्पेकरांचे पोंभुर्पे, लोटलीकरांचे लोटली वगैरे. दक्षिण गोव्यात कांसावलीमधून दाबोळी विमानतळावर जाताना एक डॉ.लुई प्रोतो बार्बोझा रोड दिसला होता. डॉ.लुईस प्रोतो बार्बोझा हे १९९० मध्ये काही महिने गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर त्यांचे नाव ऐकले ते थेट २०११ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा. त्यांच्या नावाचा रोड तिथे पहिल्यांदा बघितल्यावर एकदम छान फिलींग आले. कदाचित ते त्या भागातील असावे. पण दरवेळेस अशी नावे वाचून छान फिलींग येते असे नाही. गुरगावमध्ये अशीच एकदा ध्यानीमनी नसताना शहिद रूपीन कट्याल मार्ग ही पाटी बघितली आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरण आठवून विलक्षण कालवाकालव झाली. ते कंदाहार हायजॅकिंग प्रकरण, रूपीन कट्यालची गळा चिरून केलेली हत्या आणि त्याची पत्नी रचनाची त्यावेळेस काय अवस्था झाली असेल अशा काही गोष्टी निदान या जन्मात तरी विसरता येणार्‍यातील नाहीत. बहुदा रूपीन कट्यालचे घर त्या भागात कुठेतरी असावे. तसेच एकदा दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडिअम मेट्रो स्टेशनजवळ असाच शहिद अजय आहुजा मार्ग ही पाटी दिसली होती. कारगील युध्दात दुसर्‍या दिवशी आपली दोन विमाने पडली होती. त्यापैकी एका विमानाचा वैमानिक होता दिल्लीचा अजय आहुजा. बहुतेक तो दिल्लीत त्या भागात राहायला असावा.

कंजूस गुरुवार, 02/19/2026 - 11:58
माझ्याकडे रेल्वेची बरीच पुस्तके आहेत आणि त्यांत भरमसाठ माहिती आहे. माथेरान रेल्वे साठीचा खर्च आजही जीजीभॉय यांनी केला होता. नंतर ती रेल्वे सेंट्रल रेल्वेकडे देण्यात आली. पण आताचे रेल्वे मंडळ ही माहिती त्यांच्या हिल रेल्वेमध्ये देत नाही.

तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. १९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत. माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.
लेखनविषय:
आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली. माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो.

बाई माझी कंबर लचकली..

आजी ·

छानच विषय, आणि फिजिओ घेउन तुमची कंबरदुखी थांबली हे वाचुन फारच आनंद झाला. नशीब , तुमची फिजिओ ही कायरो प्रॅक्टीशनर नाही. तो एक भयानक अनुभव आहे. कंबरदुखीसाठी आम्ही एका फिजिओ कम कायरो कम कम कम...अशा बाईकडे गेलो. तिकडे तिने वेगवेगळ्या प्रकारची व्यायाम तर करुन घेतलेच आणि बक्कळ फी सुद्धा घेतली पण "मी भारतातील २० का ३० का ४० कायरो पैकी एक आहे" असे म्हणुन "मान सैल सोडा/ हात सैल सोडा/पाय सैल सोडा ,जबडा सैल सोडा" असे म्हणत म्हणत ईतके अवयव पिळले आणि असे काही पिळले की मूळची कंबरदुखी बाजुला राहुन नवीन नवीन अवयव दुखायला लागले. ते सेशन घेउन आल्यावर जिम मध्ये १ तास व्यायाम केल्यावर जसा थकवा येतो तसेच वाटते आणि झोपण्याशिवाय दुसरे काही करण्याची ईच्छा होत नाही. या पेक्षा सक्तमजुरी परवडली.

चित्रगुप्त गुरुवार, 02/19/2026 - 05:45
आर्‍अ‍ॅच्।च्।आआ.. अरेच्चा. लॅपटॉपीवर ( उशीवर, गादीवर, चादरीवर प्रमाणे) टाईपताना 'क्याप्स्लॉक' का काय म्हणतात ते उघडे होते, त्यामुळे 'अरेच्चा' हे आर्‍अ‍ॅच्।च्।आआ' असे लिहिले गेले. आणि प्रतिसादाचे शीर्षक काय लिहीले होते ते मी 'वयोमाना'मुळे विसरलो, त्यामुळे ते तसेच राहु दिले. -- ते कसे ओळखायचे हे कुणी सांगू शकेल का ? (सध्या मिपावर हुशार हुशार आयायटीयनांचा वावर आहे, त्यापैकी कुणीतरी नक्कीच सांगू शकेल असे वाटते.) असो. नमनालाच पाच उनित वीज घालवून आता पुढचे लिहीतो. आजी, तुम्ही लई म्हणजे लईच खुसखुषीत लिहीता ब्वॉ. (खुसखुशीत' ऐवजी 'खुसखुषीत' जास्त मजेशीर वाटते) तुमच्या त्या इंग्रजी स्पेलिंगांच्या गमती, एमाराय, "धडकने लगता हैं मेरा दिल तेरे नाम से,ऐसा लगता हैं कि अब हम गये कामसे" वगैरेंमुळे तर "कयामत से मेरी जां कम नही हो" असेच म्हणावे लागेल. मस्त. असेच लिहीत रहा.

सुबोध खरे गुरुवार, 02/19/2026 - 10:04
काही वर्षांपूर्वी माझ्या आईची एक मैत्रीण ( तेंव्हा वय वर्षे ७५) माझ्या दवाखान्यात सुनेबरोबर आली होती. जाता जाता मला म्हणाली अरे डॉक्टर ( आईची मैत्रीण असल्याने मला अगदी लहानपणापासून ओळखते म्हणून अरे) आजकाल मधून मधून माझे गुढघे आणि कंबर दुखतात. मी त्यांना म्हटलं मावशी तुम्ही घरात फिरून एक गोष्ट तपासून पहा - ७५ वर्षे जुनी कोणती वस्तू आजही चालू आहे का? दोन मिनिटे विचार करून त्या म्हणाल्या अरे हो इतकं जुनं अगदी घड्याळ सुद्धा चालू नाही. मग मी त्यांना म्हणालो मावशी, ७५ वर्षे काम करून तुमचं शरीर झिजलं आहे. तेंव्हा असं थोडं फार चालायचंच. ७५ व्य वर्षी तुम्ही उत्तम चालत्या फिरत्या आहात याचा आनंद मानायचा कि दुःख हे तुम्हीच ठरवा. मंगेश पाडगावकर लिहून गेले आहेत. जगायचं कसं ? कण्हत कण्हत का गाणं म्हणत? त्यावर त्या हसून म्हणाल्या-- बरोबर आहे तुझं!

सौंदाळा गुरुवार, 02/19/2026 - 19:13
माझी आई काही वर्षांपूर्वी अगदी याच टप्प्यांमधून गेली होती. पण नंतर फिजिओथेरपीने दुखण्याला उतार पडला. आता बसून खूप वेळ प्रवास केला तर अजून त्रास होतो. त्यामुळे आईनेच लेख लिहिला असे वाटले.

छानच विषय, आणि फिजिओ घेउन तुमची कंबरदुखी थांबली हे वाचुन फारच आनंद झाला. नशीब , तुमची फिजिओ ही कायरो प्रॅक्टीशनर नाही. तो एक भयानक अनुभव आहे. कंबरदुखीसाठी आम्ही एका फिजिओ कम कायरो कम कम कम...अशा बाईकडे गेलो. तिकडे तिने वेगवेगळ्या प्रकारची व्यायाम तर करुन घेतलेच आणि बक्कळ फी सुद्धा घेतली पण "मी भारतातील २० का ३० का ४० कायरो पैकी एक आहे" असे म्हणुन "मान सैल सोडा/ हात सैल सोडा/पाय सैल सोडा ,जबडा सैल सोडा" असे म्हणत म्हणत ईतके अवयव पिळले आणि असे काही पिळले की मूळची कंबरदुखी बाजुला राहुन नवीन नवीन अवयव दुखायला लागले. ते सेशन घेउन आल्यावर जिम मध्ये १ तास व्यायाम केल्यावर जसा थकवा येतो तसेच वाटते आणि झोपण्याशिवाय दुसरे काही करण्याची ईच्छा होत नाही. या पेक्षा सक्तमजुरी परवडली.

चित्रगुप्त गुरुवार, 02/19/2026 - 05:45
आर्‍अ‍ॅच्।च्।आआ.. अरेच्चा. लॅपटॉपीवर ( उशीवर, गादीवर, चादरीवर प्रमाणे) टाईपताना 'क्याप्स्लॉक' का काय म्हणतात ते उघडे होते, त्यामुळे 'अरेच्चा' हे आर्‍अ‍ॅच्।च्।आआ' असे लिहिले गेले. आणि प्रतिसादाचे शीर्षक काय लिहीले होते ते मी 'वयोमाना'मुळे विसरलो, त्यामुळे ते तसेच राहु दिले. -- ते कसे ओळखायचे हे कुणी सांगू शकेल का ? (सध्या मिपावर हुशार हुशार आयायटीयनांचा वावर आहे, त्यापैकी कुणीतरी नक्कीच सांगू शकेल असे वाटते.) असो. नमनालाच पाच उनित वीज घालवून आता पुढचे लिहीतो. आजी, तुम्ही लई म्हणजे लईच खुसखुषीत लिहीता ब्वॉ. (खुसखुशीत' ऐवजी 'खुसखुषीत' जास्त मजेशीर वाटते) तुमच्या त्या इंग्रजी स्पेलिंगांच्या गमती, एमाराय, "धडकने लगता हैं मेरा दिल तेरे नाम से,ऐसा लगता हैं कि अब हम गये कामसे" वगैरेंमुळे तर "कयामत से मेरी जां कम नही हो" असेच म्हणावे लागेल. मस्त. असेच लिहीत रहा.

सुबोध खरे गुरुवार, 02/19/2026 - 10:04
काही वर्षांपूर्वी माझ्या आईची एक मैत्रीण ( तेंव्हा वय वर्षे ७५) माझ्या दवाखान्यात सुनेबरोबर आली होती. जाता जाता मला म्हणाली अरे डॉक्टर ( आईची मैत्रीण असल्याने मला अगदी लहानपणापासून ओळखते म्हणून अरे) आजकाल मधून मधून माझे गुढघे आणि कंबर दुखतात. मी त्यांना म्हटलं मावशी तुम्ही घरात फिरून एक गोष्ट तपासून पहा - ७५ वर्षे जुनी कोणती वस्तू आजही चालू आहे का? दोन मिनिटे विचार करून त्या म्हणाल्या अरे हो इतकं जुनं अगदी घड्याळ सुद्धा चालू नाही. मग मी त्यांना म्हणालो मावशी, ७५ वर्षे काम करून तुमचं शरीर झिजलं आहे. तेंव्हा असं थोडं फार चालायचंच. ७५ व्य वर्षी तुम्ही उत्तम चालत्या फिरत्या आहात याचा आनंद मानायचा कि दुःख हे तुम्हीच ठरवा. मंगेश पाडगावकर लिहून गेले आहेत. जगायचं कसं ? कण्हत कण्हत का गाणं म्हणत? त्यावर त्या हसून म्हणाल्या-- बरोबर आहे तुझं!

सौंदाळा गुरुवार, 02/19/2026 - 19:13
माझी आई काही वर्षांपूर्वी अगदी याच टप्प्यांमधून गेली होती. पण नंतर फिजिओथेरपीने दुखण्याला उतार पडला. आता बसून खूप वेळ प्रवास केला तर अजून त्रास होतो. त्यामुळे आईनेच लेख लिहिला असे वाटले.
लेखनप्रकार
हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या "चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे." काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.) "गार फरशीवर खूप वेळ बसलीस का?" "कमरेचे व्यायाम जास्त वेळ केलेस का?" (नशीब,कुणी झुम्बा डान्स केलास का?