आयुष्य शांततेत घालवायचे असेल तर आयुष्यात दुष्ट आणि विषारी लोकांना खड्यासारखे बाजूला करता आले तर आयुष्य प्रवाही बनते. ही माणसे सहसा कोडगी असतात आणि परत-परत आपले विषारी अस्तित्व प्रकट करत राहतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवताना चडफडतात आणि उघडी पडतात आणि मग जिवाच्या आकांताने अनैतिक मार्गाचा अवलंब करतात. आपण सावध राहिलो तर एक वेळ अशी येते की मग ती उघडी पडतात.
काही वर्षापूर्वी एका मानसोपचार तज्ञाने मला फेबुवर फ्रेण्ड-रिक्वेस्ट पाठवली आणि मी ती स्वीकारली. मी तेव्हा फोटोग्राफी करत असे. ही व्यक्ती पण थोडी फोटोग्राफी करायची पण त्यात वैविध्य किंवा प्रयोग नव्हते. ठराविक फोटो परत-परत काढले गेले होते.
मी तेव्हा मला मिळणार्या उत्साहवर्धक प्रतिसादाने माझ्याकडची सामग्री टप्प्याटप्प्याने वाढवत होतो. एका टप्प्यावर आल्यावर मी कॅननची ७०-३६० व्हाईट लेन्स घ्यायचे ठरवले. फेबुवरील मित्रांची मते मागवली. या लेन्सची तेव्हाची किंमत सव्वा लाख होती. हे मानसोपचार तज्ञ महाशय मग अस्वस्थ झाले आणि मग त्यांनी मला मी लेन्सवर पैसे न खर्च करता त्यांच्या हॊस्पिटलच्या प्रोजेक्टसाठी मदत करावी असे सुचवले. ज्या व्यक्तीचा कसलाही आगापिछा माहित नाही अशा व्यक्तीबरोबर कसलाही पैशाचा किंवा कसलाच व्यवहार सल्ला-मसलत मी कधीही करणार नाही. पण सदर इसमाने मला कह्यात घ्यायचे प्रयत्न अत्यंत डेस्परेटली चालू ठेवले होते.
एक दिवस या माणसाचा पाय घसरला आणि त्याने आपल्या बायकोचे खाजगी फोटो माझ्याशी शेअर केले आणि म्हणाला -
"बघ माझी बायको किती सुंदर आहे"
हे वाचल्यवर मी स्क्रिनशॉट घेतला आणि सदर प्रसंगाची पुरेशी काळजी घेऊन फेसबुकवर भरपूर बोंब मारली तेव्हा हे मानसोपचार तज्ञ शेपूट पायात घालून पळाले ते आजतागायत...
टॉक्सिक लोक आणि ते ओळखायचे कसे या साठी कृत्रीम बुद्धीमत्तेची मदत मागितली तेव्हा जे उत्तर मिळाले त्याने अचंबित झालो ए०आय० चिरायु होवो!
भावनात्मक गैरवर्तन किंवा दुसर्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रय्त्न ओळखणे थोडे कठीण असू शकते, कारण ते सहसा सूक्ष्म पद्धतीने केले जाते. विषारी लोक (Toxic People) तुम्हाला भावनिक किंवा इतर प्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना काही विशिष्ट पद्धती वापरतात. खालील गोष्टींवर लक्ष दिल्यास तुम्ही अशा व्यक्तींना ओळखू शकता:
दोषी ठरवणे (Guilt-Tripping): ते तुम्हाला त्यांच्या भावना किंवा समस्यांसाठी दोषी ठरवतात. उदाहरणार्थ, ते म्हणू शकतात, "मी तुझ्यासाठी इतकं सगळं केलं, आणि तू माझ्यासाठी हे एक काम करू शकत नाहीस?" यामुळे तुमच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि तुम्हाला त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सक्ती वाटते.
भावनिक छळ (Gaslighting): हा एक प्रकारचा भावनिक गैरवर्तन आहे, जिथे ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आठवणी, विचार आणि वास्तवावर शंका घेण्यासाठी प्रवृत्त करते. ते त्यांच्या बोलण्याला किंवा कृतींना नाकारतात, जरी तुमच्याकडे पुरावा असला तरीही, आणि "हे कधीच घडले नाही, तू फक्त कल्पना करत आहेस" असे म्हणू शकतात. हे तुमच्या आत्मविश्वासाला कमकुवत करते आणि त्यांच्यासाठी वास्तवावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे.
इतरांपासून वेगळे ठेवणे (Isolation): ते तुम्हाला तुमचे मित्र, कुटुंब आणि इतर आधार प्रणालीपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या प्रियजनांना वाईट मानतात किंवा तुमच्या मित्रांबद्दल वाईट गोष्टी सांगतात, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहावेसे वाटते. ते तुमचा सर्व वेळ आणि लक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तुम्हाला इतर कोणाकडेही मदत मागता येणार नाही.
सतत टीका करणे (Constant Criticism): ते तुमच्यावर, तुमच्या निवडीवर किंवा तुमच्या क्षमतेवर सतत टीका करतात. ही टीका अनेकदा "मददगार सल्ला" असल्यासारखे दाखवले जाते, परंतु याचा उद्देश तुमचा आत्मविश्वास कमी करणे आणि तुम्हाला त्यांच्या मान्यतेवर अवलंबून ठेवणे हा असतो.
निर्णयांवर नियंत्रण ठेवणे (Control Over Decisions): हे छोटे निर्णय (तुम्ही काय घालावे किंवा काय खावे) ते मोठ्या आयुष्यातील निर्णयांपर्यंत (तुम्ही कुठे काम करावे किंवा कोणाशी मैत्री करावी) असू शकते. ते तुम्हाला असे मानण्यासाठी प्रवृत्त करतात की त्यांची पद्धतच योग्य आहे आणि तुम्ही स्वतःहून चांगले निर्णय घेऊ शकत नाही.
या सर्व गोष्टींचा एकत्रित वापर करून ते तुमचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन हळूहळू नष्ट करतात.
अशा लोकांना हाताळताना खालील उपाय प्रभावी ठरतात-
1. **सीमा निश्चित करा (Set Boundaries):** टॉक्सिक व्यक्तींशी बोलताना स्पष्ट सीमा ठरवा. त्यांना सांगा की काय स्वीकार्य आहे आणि काय नाही. उदाहरणार्थ, "मला असे बोलणे आवडत नाही" असे सांगून त्यांना रोखा.
2. **भावनिक अंतर ठेवा (Maintain Emotional Distance):** त्यांच्या नकारात्मक बोलण्यात गुंतू नका. त्यांना उत्तर देण्याऐवजी, शांत राहा आणि विषय बदलण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करेल.
3. **स्वतःची काळजी घ्या (Practice Self-Care):** टॉक्सिक लोक तुम्हाला थकवतात, म्हणून व्यायाम, ध्यान किंवा आवडत्या गोष्टी करून स्वतःला रिचार्ज करा. सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा.
4. **विवाद टाळा (Avoid Arguments):** त्यांच्याशी भांडणात पडू नका, कारण ते फक्त ऊर्जा वाया घालवेल. "मी सहमत नाही" असे म्हणून सोडून द्या.
5. **जर शक्य असेल तर अंतर ठेवा (Limit Contact if Possible):** कुटुंब किंवा कामाच्या ठिकाणी असतील तर संपर्क कमी करा. सोशल मीडियावर ब्लॉक किंवा म्यूट करा.
6. **मदत घ्या (Seek Support):** मित्र, कुटुंब किंवा थेरपिस्टशी बोला. कधीकधी बाहेरील दृष्टिकोन मदत करतो.
या टिप्स अमलात आणण्यासाठी धैर्य लागते, पण त्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल हे मात्र नक्की!
ए०आय० चिरायु होवो!
प्रतिक्रिया
27 Sep 2025 - 9:25 am | विवेकपटाईत
लेख आवडला. लोकांचा सल्ला ऐकायचा असतो आणि वागायचे आपल्यामना प्रमाणे. मला एका पुणेकरणे मराठी सुधारण्याचा सल्ला दिल्ला. मी थेट दुर्लक्ष करत त्याला म्हणालो, माझी मराठी कशीही असली तरी मिसळपावकर आनंदाने वाचतात. त्त्याचे तोंड एका वाक्यात बंद झाले. बाकी सोशल मीडिया मजा घेण्यासाठी असतो. त्याचा आनंद ही घेता येतो. जर कोणी शिव्या दिल्या तर आपण किती मोठे झालो याचा एक आसुरी आनंद ही आहे.
27 Sep 2025 - 10:09 am | अमरेंद्र बाहुबली
टॉक्सिक म्हणता येईल की नाही माहीत नाही पण मागे मला डोनेशन मागणाऱ्यांचे फोन यायचे, भाषा अशी असायची की केव्हा देताय किती देताय? गरीब मुलानं द्यायचे आहेत, जसा त्यांचा हक्क होता, मला नाही म्हणायला गिल्टी वाटायचे, मध्ये मॉल मध्ये नी fc रोड वरही रस्त्यात अडवून मुली गरीब मुलांसाठी, अर्भकांसाठी पैसे मागत होत्या, पैसेही अश्या प्रकारे की क्रेडिट कार्ड नंबर वगैरे द्यायचा ऑटो डेबिट होतील महिन्याला हजार किंवा ५०० , मी आढेवेढे घेत नाही सांगायचो, काहीतरी फालतू कारण द्यायचं, पण आता स्पष्ट नाही बोलायला शिकलो आहे, नाही द्यायचे असे स्पष्ट बोलतो, त्यावेळी त्यांचे उतरलेले तोंड पाहून आनंद मिळतो. :)
27 Sep 2025 - 11:37 am | nutanm
वरील लिहिलेले घरातल्या सख्खयाचेच असे अनुमव आलेले आहेत बाहेरच्याचही आहेतच, पण घरातल्याचे जळूपणा पैसे, कपडे दागिन्यावर जळून आतमविश्वास खच्ची करणे. कारण स्वताला तितके मिळवण्यासाठी लायकी नाही व कष्टान्ची तयारी नाही. कष्ट व तेही Ernakulam वर्षानुवर्षै करुन मिळवलेले थोडेसेच वैभव पण त्यिवरही जळणे , स्वताकडै नाही म्हणून, मग तुम्ही ही रा ना कष्ट वर्षानुवर्षे. घरिच मस्त दुपारी जेवून झोपून दूसर्याना नावे ठेवून आत्मविश्वास खच्ची करायचा प्रयत्न करून नोकरी सोडायला ऊद्युक्त करुन स्वताला काहीच मिळवता येत नाही . कष्ट करा, झोपू आराम करू नका तडातडा काम करून कष्टसाध्य यश नशिबाचाही थोडा भाग असतोच असतो दुसर्याने मिळवल्यावर जळू नये.
14 Dec 2025 - 11:22 am | युयुत्सु
सात प्रकारची मानहानी
https://www.youtube.com/watch?v=u0xxGR8Ehsc
14 Jan 2026 - 10:03 am | युयुत्सु
विषारी माणसांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्यांची मानसिकता समजाऊन घेणे आवश्यक असते. युट्युब वर यासाठी असंख्य मार्गदर्शनपर व्हिडीओ उपलब्ध आहेत.
असाच एक व्हिडीओ. अवश्य बघण्यासारखा-
https://www.youtube.com/watch?v=JdjGnpOb5DI