तमिळनाडूचा इतिहास भाग - ७
काँग्रेस बनवून तर झाली होती, अधिवेशनही होत होते. पण करायचं काय हे स्पष्ट नव्हतं. भारतीयांसाठी निवडणूक प्रक्रिया त्या वेळी नव्हती. दुसरी गोष्ट हि कि ते ब्रिटिशांसोबत सोबत काम करायचं म्हणत होते. पारसी आणि ब्राम्हण नेता, दोघांचा कम्फर्ट झोन हाच होता, कारण हे लोकं तळागाळातील आंदोलक नव्हते. हे तर त्यांचं एक पार्ट टाइम काम होतं कि वकिली वैगरे सोबत थोडी राजकारणाची चर्चा हि करता येईल. त्यांचे काही नेते इंग्रजांकडून पगारही मिळवत होते किंवा त्यांच्याशी संबंध बनवून होते त्यामुळे विरोध करायचा प्रश्नच नव्हता.