सुखासन
आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!
-शिवकन्या
आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!
-शिवकन्या
प्रेरणा : गेम
आयडी कसा बदलता आला पाहिजे
डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे...
थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे
वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे
सगळ्यांना हे जमतंच असं नाही...
धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही
तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत..
सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं ..
'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग
हासत..
आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज'
करत...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
चांगली उन्हाची सवय झाली होती ...
तो डबडबणारा घाम
ते काळवंडलेले शरीर
तो कोरडेपणा ... ती रखरख
यांना चांगली लय आली होती ...
कुठून हे काळे ढग आले ... आता सगळ बेताल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
त्याची केव्हाही आठवण आली तरी,
सर्वांगावर सरकन् काटा येतो,
डोक्यावरचा केस न केस उभा रहातो,
आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो,
अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर,
जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर,
कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले,
याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले,
तो आहेच असा भितीदायक,
आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक,
मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची,
नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची,
तुझे नाव
नी केवळ भितीने गारठून जायला होते
पानांवरून ओघळून गेलेला प्रत्येक थेंब
डागांची लांबच रांग दुखण्याचीही थांबलेली
अन तुझी आठवण म्हणजे स्मरण शब्दातील
रण, सरण आणि मरण
जसा सडलेल्या समुद्राने त्याच्या उदरातून
ओकलेल्या सड्याचा
किनार्यावर पसरलेला ऊग्र वास
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच !
पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय?
तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …!
***
होती अमुची प्रिया एक ती
आमची मंजे कंपनीची
सदैव वाटे तिजला कांही
नविन करावे प्रतिमासी
कधी कनेक्टे हार्ट आमुचे
कधी पॉलीस्यां अपडेटवी
तसा एकदा सर्व्हे केला
'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि !
मनात नसता भाग घेउनि
सारे प्रतीसादून आले
सर्व्हे झाला पटपट आणिक
सार निघाले हो झटपट
किती दिवसांनी आज
वेदनेच्या गावात
भरून आलंय आभाळ
ठसठसत्या जखमांची
खपली काढायला
मग त्या ओल्या जखमा
वाहतील डोळ्यातून
फुंकर मारायला असेलच
तुझी आठवण
भर दिवसा कसा
फक्त अंधारच
उरलाय घरभर?
होत्यानव्हत्या
सगळ्याच पणत्या
नेल्यास ना सोबत?
त्या पणत्यांच्या उजेडात
उजळशीलच तू
मला दिसशीलच आणि
चमचमणार्या एका वीजेत
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.
ठयरे हुए पानी मे
किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक
होता है रे बाबा तेरा मारना!!
पैजारबुवा के पाऊल पे पाऊल डालते हुए मयभी इधर अपनी एक मजबूर रचना प्रस्तुत करती हूँ. मिकादादा, पैजारबुवा, एसभाय, और अपने मोहल्ले के आन बान शान अभ्या दो डॉट सबकी माफी पयलेसे ले लेती हूँ. दुनियाकी हर एक औरत अपने नवरे का सबसे ज्यादा म्हणजे लयच गुस्सा कब करती मालूम? जब वो घोरता है तब. इसलिये मैने यइच टॉपिकपे फटाफट सटासट एक कविता लिखही डाली.
ठहेरे हुए पानी मे
किसीने डाले पत्थरकी तरह
होता है तेरा घोरना
कहेने को तो पत्थरकी आवाज
चूल्लूक इत्तीसीच होती है
बस पानी में उस चूल्लूककी
अनगिनत तरंगें उठती है
बांधावरचा पिंपळ सांगे
सोनसावळी दुःखे ओली
फांदी-फांदी जीर्ण पर्णिका
बांडगुळांची गर्दी सगळी
अस्ताईचे सूर अनोळखी
शुष्क पान्हा हळवी देवकी
कशी रुचावी जगण्यालाही
अस्थाईविन बंदिश पोरकी
सुकली पाने सुकली माती
खिन्न विरहिणी होय पालवी
पाणी सुकले बुंध्यापाशी
त्राही त्राही अंकुर डोकावी
कधी अकस्मित ओल मुळांना
कधी मेघांचे हळवे चुंबन
लागे जलदांना ओढ भूमीची
कधी अचानक अधीरे मिलन
नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे
नश्वरतेचा शाप सुखाला
शाश्वत ऐसे इथे न काही
श्वासांचा का ध्यास जीवाला ?