सरतील कधी शोष शोषितांचे!
एक दीर्घकथा सुरू करीत आहे. हजारो वर्षांच्या कालपटावर ही घडली आहे, व पुढे घडणार आहे. माणसे बदलतील, स्थलकाल बदलतील.. पण माणूस बदलणार नाही.. नक्की? बघूयात..
एक दीर्घकथा सुरू करीत आहे. हजारो वर्षांच्या कालपटावर ही घडली आहे, व पुढे घडणार आहे. माणसे बदलतील, स्थलकाल बदलतील.. पण माणूस बदलणार नाही.. नक्की? बघूयात..
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.
यशवंतच्या बाकावर तो एकटाच होता. समोरच्या बाकावर एक तरुणी होती. रेखीव चेहरा. बांधेसूद व्यक्तिमत्व. गळ्यात मंगळसूत्र. संपूर्ण रुममध्ये ते दोघेच होते. पार्टीशनच्या पलीकडे रिसेप्शनिस्ट मुलगी होती. त्या पलीकडे डॉक्टरांची खोली. तिघेही डॉक्टरांची वाट पाहात होते.
डॉक्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला पेशंट झाल्यावर बोलावत असत. समोरच्या तरूणीला बोलावल्याशिवाय त्याला बोलावणे जाणार नव्हते म्हणून पुरेसा वेळ यशवंतकडे होता. यशवंत ब्रीफकेसमधून स्वतःची फाईल काढून चाळू लागला. आज डॉक्टरांना कोणती औषधे प्रेझेंट करायची आहेत, याचा एकदा आढावा घेऊ लागला. तेवढ्यात समोर हालचाल झाली.
श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले.
सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत.
त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील.
ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या लेखनकले विषयी…
हरीश उठला. आज त्याच्या घरी कोणीच नव्हते. आईबाबा दूरच्या नात्यातल्या लग्नाला गेले होते. हरीशची तिथं फार ओळख नव्हती. तो नाही आला तरी हरकत नाही, असं म्हणून फक्त आई-बाबाच लग्नाला गेले. आता हरीशपुढे अख्खा दिवस होता. त्याने रेडिओ मिर्ची लावली. स्वैपाकघरात गेला. हरीशचं घर बैठं. स्वैपाकघराच्या खिडकीतून समोरची बांधकाम सुरु असलेली इमारत दिसत होती. हरीशच्या घराचं कुंपण ओलांडलं की रस्ता. काही अंतर सोडून इमारतीचं काम. आज तिथे सामसूम होती. विटा, सिमेंटची पोती असं साहित्य पडून होतं. आज कामगारांना सुटी दिली की काय, असं हरीशला वाटलं.
तेवढ्यात मिलिंदचा फोन वाजला.
पिवळा गुलाब
दुपारची उन्हं जरा कलत नाहीत, तो सगळ्या गोपिका नटून थटून पुन्हा यशोदेकडे हजर. जणू यांची घरची सगळी कामं कृष्णाला बघण्याच्या ओढीनंच लवकर आटपायची. घरात कोणीही असो, त्या कोणतंही काम करत असोत, मनाचा एक भाग कृष्णाचं चिंतन करतच राही. घरच्यांचंही काही फार वेगळं होतं असं नाही. सगळ्या गोकुळाचंच त्याच्याकडे सतत लक्ष लागलेलं असायचं. एका अद्वितीय अशा प्रेमाच्या रेशीमधाग्यानं ते सर्व जणू बांधल्या गेलेले होतेत. त्यांच्या लेखी कृष्ण म्हणजे सर्व आणि सर्व म्हणजे कृष्ण!
खिडकीबाहेरचं जग!
ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.
शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं..
ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती. खरं तिला किरणच्या सहवासात स्वतःचा जीव नकोसा होई.
किरणचं तिला नको असताना उगाच जवळ घेणं, बोलतं करायचा प्रयत्न करणं.हे सारं तिला अजिबात आवडत नसे.तरी ती सहन करी.फक्त झोक्यावर बसण्यासाठी.
किरण तिला झोक्यात बसवुन अखंड बडबड करे त्यावेळीही तिचं लक्ष मात्र खिडकीबाहेरच असे.