कथा - पिवळा गुलाब
पिवळा गुलाब
पिवळा गुलाब
दुपारची उन्हं जरा कलत नाहीत, तो सगळ्या गोपिका नटून थटून पुन्हा यशोदेकडे हजर. जणू यांची घरची सगळी कामं कृष्णाला बघण्याच्या ओढीनंच लवकर आटपायची. घरात कोणीही असो, त्या कोणतंही काम करत असोत, मनाचा एक भाग कृष्णाचं चिंतन करतच राही. घरच्यांचंही काही फार वेगळं होतं असं नाही. सगळ्या गोकुळाचंच त्याच्याकडे सतत लक्ष लागलेलं असायचं. एका अद्वितीय अशा प्रेमाच्या रेशीमधाग्यानं ते सर्व जणू बांधल्या गेलेले होतेत. त्यांच्या लेखी कृष्ण म्हणजे सर्व आणि सर्व म्हणजे कृष्ण!
खिडकीबाहेरचं जग!
ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.
शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं..
ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती. खरं तिला किरणच्या सहवासात स्वतःचा जीव नकोसा होई.
किरणचं तिला नको असताना उगाच जवळ घेणं, बोलतं करायचा प्रयत्न करणं.हे सारं तिला अजिबात आवडत नसे.तरी ती सहन करी.फक्त झोक्यावर बसण्यासाठी.
किरण तिला झोक्यात बसवुन अखंड बडबड करे त्यावेळीही तिचं लक्ष मात्र खिडकीबाहेरच असे.
तलावाच्या शहरातल्या तलावापैकी हा एक तलाव, अगदीच छोटेखानी, त्यांचे खोलवरचे सगळे पाण्याचे झरे विरत चालेले, हल्लीच तलावाच्यावरुन एका उडडाणपूलाचं बांधकाम झाल्यापासून तर तिथल्या पाण्यात सूर्यकिरणं यायला वावच राहिला नव्हता, या असल्या वातावरणात तिथं तंग धरु शकतील असे वनस्पतीजीव, जलचराचं मात्र यामुळे फारच हाल होतं होते.
बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली!
चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली.
वाशी नाकावरच्या मेन रस्त्यावर ती म्हातारी मागच्या दोन दिवसांपासून भीख मागत बसली होती, राहायची चेंबूरला…. म्हातारीचा नवरा वारला बाई जवानीत असताना, एकुलता एक मुलगा मस्त सिंधी कॉलनीजवळच्या सरळ रेषेत असलेल्या म्हाडाच्या ब्लिडिंगच्या शेवटच्या टोकाला लागून पसरलेल्या वीस-पचवीस घराच्या बैठया चाळीपैंकी एका घरात राहतो, एकच रुम त्यात पडदा टाकून किचन आतल्या बाजूला, सलग मोरी, तरी ही म्हातारी इथं अशी रस्त्यावर का? अशी दीनवाणी…. अंगावरचं लुगडं ते तसचं, दोन दिवस झाले….. अंगाला पाणी नव्हतं….
तपकिरी रंगाचं बांड कुत्रं ते. इवल्याशा झुडपाच्या सावलीत अंग चोरून बसले होते. दुपारचं लाही लाही करणारं ऊन. रानवटीचे खुरटे झोंबरे काटे. वारा सुटला तरी तापलेल्या झळया लाग्याव्यात. वाळलेली कुसळं आणि सुदूर पसरलेल्या येड्या बाभळी. चढउतार असलेला खडकाळ प्रदेश. पहावे तिकडे मृगजळेच दिसावी. लखोबाची वाडी अशी भरदुपारी शांत निवांत सुस्तावून जायची. भरगच्च जेवलेल्या ढेरपोट्या म्हाताऱ्यासारखी.
मध्यानरात्रीच्या काळोखात ते टुमदार फार्महाऊस भयाण भासत होते. आजूबाजूची मोठाड झाडे सळसळ करत हलक्या वाऱ्यात झुलत होती. हॅलोजनचा एक बल्ब पोर्चमध्ये जळत होता. मधूनच सुरु झालेल्या धप्प धप्प आवाजाने आता तिथली शांतता भंग पावत होती.
टिकाव हातात धरून घामाने डबडबलेला सुरेंद्र जरा वेळ थांबला. त्याला धाप लागली होती. मान वर करून त्याने छातीत हवा भरून घेतली. कोपराच्या बाहीने त्याने घाम पुसला. खड्डा आता चांगलाच रूंदावला होता.
"बस झाला एवढाच" मिनल खड्ड्यात वाकून बघत म्हणाली. तिच्या हातात टॉर्च होता. आणि म्हटलं तरी तीही आता थकली होती.
मंडळी,
आज मी आपणाला कवी कसे बनावे याच्या चार सोप्या टिप्स देणार आहे. होतकरू तरूणांना यांचा निश्चित फायदा होईल. अनेकांना कविता लिहायची इच्छा असते. पण ती लिहावी कशी हे मात्र कळत नाही. त्यांच्यासाठी या टिप्स फार उपयोगी ठरतील.
पहिली टिप : सुरुवातीला आपल्या मनातल्या भावना मुक्तपणे वाहू द्या. मनात येतील ते शब्द कागदावरती लिहून घ्या. तीन चार शब्दांची एक ओळ करा. आणि त्या ओळी एकाखाली एक लिहा. अभिनंदन! तुमची पहिली कविता तयार आहे. याला मुक्तकविता असे नाव देऊन कुठेही चिपकवा.