कावळ्यांतला आईनस्टाईन !!!
आंतरजालावर असलेली ही व्हिडिओ क्लिप मला एका नातेवाईकाने पाठवली. ती इतकी आश्चर्यकारक आहे की इथे टाकल्याशिवाय राहवले नाही. प्रत्यक्ष पाहूनच ठरवा शिर्षक बरोबर आहे की नाही !
आंतरजालावर असलेली ही व्हिडिओ क्लिप मला एका नातेवाईकाने पाठवली. ती इतकी आश्चर्यकारक आहे की इथे टाकल्याशिवाय राहवले नाही. प्रत्यक्ष पाहूनच ठरवा शिर्षक बरोबर आहे की नाही !
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे.
ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे.
मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे.
28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.
लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग 1
संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक
भारतीय राज्यघटनेच्या १९.१.अ अन्वये व्यक्तीच्या सभांषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला जातो, त्याच १९व्या कलमातील २ र्या उपकलमात इतर काही गोष्टींसोबत बदनामी/बेअब्रू (डिफामेशन) करण्यासाठी हे स्वातंत्र्य नसल्याची आणि त्या दृष्टीने कायदे करण्याचा कायदे मंडळांना अधिकारही प्रदान करत.
आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे समर्थन सहसा कुणीच करत नाही. आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे आरोप आणि जबाबदारीचा उल्लेख करण्या साठी लागणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संबंधीत आरोपीत व्यक्तींची हकनाक बदनामी होणार नाही ह्याचे पथ्यपाळण्याचा समतोल ह्याचे कायदेविषयक पैलू वेगळ्या धाग्याचा विषय आहे.
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत.
येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे.
तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा.
समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.
नमस्कार!
अॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.
नमस्कार,
रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात,
१. शिवसेनेला जीवदान मिळाले
२. मनसेची धुळ्दाण झाली
३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या
असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ?
टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.
अर्धांगिनीचा प्रवासात होणारा त्रास वाचविण्यासाठी अस्मादिकांनि स्वतःचा त्रास वाढविण्याचे ठराविले आहे.
घर शोधुन देणार्या दलालांना दलाली *pardon* देणे आमच्या तत्वात बसत नसल्याने (आणि खिशाला परवडत नसल्याने *sad* ) नविन घर शोधण्यासाठी मिपावरिल मित्रांची मदत अपेक्षित आहे
अपेक्षा :
१. शहर : पुणे
२. भाग : नगर रोड वरिल खराडी बायपास चौक अथवा मुंडवा-केशवनगर चौक (या ठिकाणांन पासुन पायी जावु शकेन इतपत अंतरावर)
३. १ अंतःपुर्-बैठक-स्वयंपाकघर ( 1BHK)
४. २४ तास पाणी
५. आर्थिक क्षमता : ७००० भाडे/ १५०००अनामत रक्कम